Home Blog Page 102

कोथरूड रखडलेल्या रस्त्यांसाठी सक्तीचे भूसंपादन स्थायी समितीकडे प्रस्ताव ;आमदार चंद्रकांत पाटील यांची बैठक

0

कोथरूड सर्वाधिक वेगाने विकसित होणारा भाग म्हणून गिनीज बुकात नोंद झाल्याचे ऐकले असले तरीसुद्धा या भागातील वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्ते ही दिवसेंदिवस मोठी समस्या बनत चालली आहे. त्यातच गेली 11 वर्षे भारतीय जनता पक्षाचा ताब्यात असलेल्या या विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी नागरिकांना हैराण करत असतानाच नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांच्या समवेत याबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक लावून यावरती कायमस्वरूपी उपाय करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोथरूड, बाणेर, बावधन या परिसरातील अनेक रस्त्यांचे भूसंपादन होत नसल्याने रस्ते अर्धवट आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे किंवा बॉटलनेक होत असल्याने कोंडी होत आहे. यातून सुटका करण्यासाठी सक्तीचे सक्तीच्या भूसंपादन केले जाणार आहे. याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आले आहे अशी माहिती कोथरूड विधानसभा मतदारसंघातील बैठकीत देण्यात आली. कोथरूडचे आमदार व उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (ता. २८) कोथरूडच्या प्रश्‍नावर बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. व एम जे प्रदीप चंद्रन आदी उपस्थित होते. कोथरूडमधील रस्त्यांचे भूसंपादन करण्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. त्यावेळी पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी माहिती सादर केली.

कोथरूड विधानसभा मतदारसंघालगत हे आहेत अर्धवट रस्ते

– यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाकडून गांधीभवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका दीड गुंठा जागा ताब्यात आलेली नाही. तेथे मालक आणि दिव्यांग भाडेकरूसोबत चर्चा करूनही मार्ग निघाला नाही, त्यामुळे सक्तीचे भूसंपादन केले जाणार आहे.

– कर्वे पुतळा येथील पेट्रोल पंपाच्या बाजूने २० मीटरचा डीपी रस्ता आहे, तो केल्यास थेट मयूर कॉलनीशी हा भाग जोडला जाईल.

– पौड फाटा येथील सावरकर उड्डाणपूल ते मयूर कॉलनी डीपी रस्त्यावरील भीमनगर येथील एक स्वच्छतागृहाचा प्रश्‍न कायम आहे त्यास अंतिम नोटीस लवकरच बजावली जाणार आहे. तसेच ‘बीएसयूपी’च्या पाच घरांबाबतची प्रक्रिया मे महिन्यात पूर्ण होईल.

– वारजे येथील डॉ. आंबेडकर चौकापासून तिरूपतीनगरमार्गे डुक्कर खिंडीला जोडणारा रस्ता आहे, यातील जागा बीडीपीतील असून जागा मालकांनी निवासी दराने नुकसान भरपाई मागितली आहे. त्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवला आहे.

– पाषाण येथील पीएमपी डेपो ते बाह्यवळण रस्त्याचा सेवा रस्ता व ननावरे बायपास येथील जागा ताब्यात आली आहे, लवकरच रस्ता केला जाईल.

– कस्पटे वस्ती येथील पुलाच्या पोहोच रस्ता, बाणेर पाषाण लिंक ३६ मीटर रस्ता, पाषाण सर्कल येथील ३० मीटर रस्त्यासाठी सक्तीचे भूसंपादन केले जाणार आहे.

राज्य सरकार वाढीव १.३२ लाख कोटी कर्ज घेणार; पहिल्या महिन्यातच १३,००० कोटी घेतले एकूण कर्ज 9.5लाख कोटी

0

राज्य सरकारच्या २०२५-२६च्या महसुली उत्पन्नाच्या उद्दिष्टानुसार तिजोरीत दरमहा सरासरी ४३ हजार कोटी रुपये जमा होत नसल्याने राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात एक लाख ३२ हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचे ठरविले आहे. त्यासाठी केंद्राच्या आर्थिक कामकाज विभागाकडे परवानगी मागितली आहे. तुर्तास, सरकारने १३ हजार कोटींचे कर्ज काढले आहे. यंदाच्या कर्जामुळे सरकारकडील कर्जाची रक्कम साडेनऊ लाख कोटींवर जाईल, अशी माहिती वित्त विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या (जीएसडीपी- सकल राज्य देशांतर्गत उत्पादन) तीन टक्के रक्कम राज्य सरकारला कर्ज म्हणून घेण्यास परवानगी दिली जाते. त्यानुसार राज्य सरकारने यंदा एक लाख ३२ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची तयारी केली असून तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. केंद्राच्या मंजुरीनंतर राज्य सरकार दरमहा किंवा प्रत्येक आठवड्याला किती रुपयांचे कर्ज घेणार, यासंदर्भातील कॅलेंडर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून अंतिम करून घेतले जाणार आहे.

तुर्तास, सरकारला दरमहा तीन ते चार हजार कोटींचे कर्ज आवश्यक असून त्यातून सर्वाधिक रक्कम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अन्य वैयक्तिक योजनांसाठीच लागतील. या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारला चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात १३ हजार कोटींचे कर्ज काढावे लागल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले. आता कर्जावरील व्याजाची रक्कम दरमहा सुमारे पाच हजार कोटींनी वाढणार आहे.

राज्याची आर्थिक स्थिती (२०२५-२६)

अपेक्षित महसुली उत्पन्न ५,६०,९६३ कोटी

संभाव्य एकूण खर्च ६,०६,८५४ कोटी

नियोजित कर्ज १.३२ लाख कोटी

सध्या दरमहा कर्जाचे व्याज ४५,८९१ कोटी

उत्तन-विरार कोस्टल रोडसाठी ८७ हजार कोटी

उत्तन (भाईंदर) ते विरार हा ५५ किमी लांबीचा नवा कोस्टल रोड केला जात आहे. त्यात २४ किमी सागरी मार्ग आहे. १९.१ मीटर रुंद आणि ५ लेनच्या या रस्त्यासाठी तब्बल ८७ हजार ४२७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. २०२५-२६ च्या आर्थिक वर्षात या रस्त्यासाठी मोठा निधी राज्य सरकार देणार आहे. याशिवाय सिंचन प्रकल्पांसाठी देखील ३० हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यासाठी देखील कर्जातील रक्कम वापरली जाणार असल्याचे वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे विमानतळावर घुसला बिबट्या, प्रवाशांची भीतीने उडाली गाळण; नेमकं काय घडलं?

0

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी दोनदा बिबट्या दिसल्याने प्रवाशांमध्ये आणि विमानतळाशेजारी राहणाऱ्या स्थानिकांमध्ये घबराट पसरली. सोमवारी सकाळी आणि रात्री बिबट्या दिसल्याने प्रशासन आणि वन विभाग सतर्क झाला असून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. हा बिबट्या नवीन टर्मिनल पासून अवघ्या ८०० मीटर अंतरावर आल्याने प्रवाशांची भीतीने गाळण उडाली. स्थानिक नागरिकांच्या ग्रुपवर बिबट्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला.

पुणे विमानतळावर सोमवारी सकाळी ७ वाजता आणि नंतर रात्री ८ वाजता दोनदा बिबट्या दिसला. स्थानिक नागरिकांच्या ग्रुपमध्ये पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, विमानतळाच्या एअरसाईडवर, प्रतिबंधित क्षेत्रात जिथे लँडिंग, टेक-ऑफ आणि जमिनीवरील हालचाली यासारख्या महत्त्वाचे विमान ऑपरेशन्स होतात, तिथे बिबट्या आढळून आला. पण सोमवारी विमानांच्या उड्डाणांवर कोणताही परिणाम झाला नाही, असे विमानतळावरील सूत्रांनी सांगितले.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की ते विमानतळ परिसरात बिबट्याचा माग काढत आहेत. “सोमवारी सकाळी ७ वाजता आणि नंतर दिवसा रात्री ८ वाजताच्या सुमारास तो दिसला. रात्री तो धावपट्टीपासून सुमारे ५०० मीटर आणि नवीन टर्मिनल इमारतीपासून ७००-८०० मीटर अंतरावर दिसला. आम्ही आता विमानतळाच्या एअरसाईडवर त्याचा शोध घेत आहोत. आम्ही कॅमेरा ट्रॅप बसवले आहेत. आम्हाला आशा आहे की आम्ही मंगळवारी तो पकडू,” असे पुणे वन विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुरेश वरक यांनी सांगितले.

पुणे विमानतळ सल्लागार समितीने विमानतळ परिसरात वन्य प्राण्यांच्या वावराबाबत चर्चा करण्यासाठी ज्या दिवशी बैठक घेतली त्याच दिवशी बिबट्या दिसला. बैठकीदरम्यान, पुणे विमानतळाचे संयुक्तपणे संचालन करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आवाहन केल्याचे समजते. सल्लागार समितीची बैठक नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्यात आयएएफ, सीआयएसएफ आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.मोहोळ यांनी सांगितले की, “बैठकीदरम्यान, बिबट्या दिसण्याबद्दल चर्चा झाली. मी अधिक जाणून घेण्यासाठी पुणे विमानतळ संचालक आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.

विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांनी सांगितले की त्यांनी आता त्यांच्या सर्व शेजाऱ्यांना दरवाजे बंद करून सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. विमाननगरमधील एका गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशाने सांगितले की काही दिवसांपूर्वी एअर फोर्स स्टेशन कॅम्पसमध्ये बिबट्या दिसला होता. आता पुन्हा सोमवारी दोनदा बिबट्या दिसल्याने रहिवाशांमध्ये घबराट आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलला बिबट्याचा व्हिडिओ एअर फोर्स स्टेशन कॅम्पसच्या आतून घेण्यात आला होता. त्यात स्पॉटलाइट्समध्ये बिबट्या सीमा भिंतीच्या काटेरी तारांवर उडी मारताना दिसत आहे. विमानतळाजवळील एका गृहनिर्माण सोसायटीत राहणाऱ्या एका निवृत्त आयएएफ अधिकाऱ्याने सांगितले की, कॅम्पसमधील एअर फोर्स स्कूलला मंगळवारी सुट्टी देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की सुट्टीच्या सूचनेत या घोषणेचे नेमके कारण नमूद केलेले नाही.

चीनने गरळ ओकलीच! आम्ही दोन्ही देशांचे शेजारी ; संयम बाळगतील, संवाद आणि सल्लाद्वारे प्रश्न योग्यरित्या हाताळतील…

0

पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये, पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले असून सिंधु जल करारासंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे भारतीय सैन्य दलाला अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे, जगाचे लक्ष भारत आणि पाकिस्तानकडे लागले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना हल्ल्याची घटना वाईट असल्याचे म्हटले. तसेच, दोन्ही देश मला जवळचे आहेत, ते आपापसात हा वाद मिटवतील, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. आता, भारताचा शेजारी असलेल्या चीननेही पहलगाम हल्ल्यानंतर 4 दिवसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही देशांनी परिस्थिती शांत ठेवण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे चीनने म्हटलं आहे.

काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याबाबत अमेरिकेनंतर आता चीननेही प्रतिक्रिया दिली आहे. चीन हा भारत आणि पाकिस्तानचा शेजारी देश आहे. त्यामुळे, चीनच्या प्रतिक्रियेला अधिक महत्त्व आहे. काश्मीरमधील हल्ल्यानंतर दोन्ही देशातील परिस्थिती शांत ठेवण्यास मदत करणाऱ्या प्रत्येक निर्णय, उपाययोजनांचे चीन स्वागत करतो. तर, लवकरात लवकरच या हल्ल्याच्या घटनेची चौकशी करण्यात यावी, त्यास आमचा पाठिंबा असेल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी म्हटलं आहे. चीन हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा शेजारी आहे. त्यामुळे, दोन्ही देश आपल्या बाजूंनी संयम बाळगतील, एकाच दिशेने काम करतील, संवाद आणि सल्ला मसलतीद्वारे हा प्रश्न योग्यरित्या हाताळतील, अशी आम्हाला आशा आहे. दोन्ही राष्ट्र संयुक्तपणे आपल्या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखतील, अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली आहे.

पुण्यात उष्णतेचा कहर! १२८ वर्षांतील सर्वोच्च तापमानच्या विक्रमाला मागे टाकले, राज्यातील सर्वाधिक तापमानाची या शहरात नोंद

0

राज्यात उन्हाचा चटका वाढला असून प्रचंड उकाडा वाढला असून नागरिकांना घराबाहेर पडणं अशक्य वाटू लागले आहे, रविवारी पुणे शहरात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून पुण्याने विदर्भालाही मागे टाकले आहे. यामुळे सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत शहरात फिरणे अवघड झाले आहे.

पुणे शहरातील लोहगाव परिसरात ४२.८ अंश तापमानाची नोंद झाली असून लोहगाव सह इतर परिसरात ४०.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात उन्हाचा चटका कायम आहे. काल अकोला, वाशिम मध्ये पारा ४२.४ अंशावर पोहोचला होता. तर वर्धा, यवतमाळ नागपूर मध्ये सुद्धा उन्हाळा कायम असून ३९ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

मराठवाड्यात परभणी मध्ये ४२.४, बीड मध्ये ४१.९, धाराशिव मध्ये ४१.८ अंश तापमानाची नोंद झाली असून उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचे चित्र पाहता मालेगाव मध्ये ४२.४ अंश, जळगाव, ४२.३, सोलापूरमध्ये ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

१२८ वर्षांतील सर्वोच्च तापमान

पुण्यात चार दिवसांपूर्वी तामानाने उच्चांक गाठला होता. पुणे शहराचा पारा २३ एप्रिल रोजी ४३.६ अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानावर गेला होता. या तापमानाने १२८ वर्षांतील कमाल तापमानाच्या विक्रमाला मागे टाकले होते. ३० एप्रिल १८९७ रोजी शहराचे तापमान ४३.३ अंशांवर होते. एप्रिलमधील मागील १२८ वर्षांतील हे सर्वोच्च तापमान होते. शहरात एप्रिल महिन्यात यंदा लोहगावचे तापमान सलग पाचव्या दिवशी ४३ अंशावर गेले होते.

देशविरोधी आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या वक्तव्यांबद्दल वडेट्टीवारांवर कारवाई करा; केंद्रीय मंत्र्यांचे फडणवीसांना पत्र

0

पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये, पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले असून सिंधु जल करारासंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे भारतीय सैन्य दलाला अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे, जगाचे लक्ष भारत आणि पाकिस्तानकडे लागले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना हल्ल्याची घटना वाईट असल्याचे म्हटले. तसेच, दोन्ही देश मला जवळचे आहेत, ते आपापसात हा वाद मिटवतील, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. आता, भारताचा शेजारी असलेल्या चीननेही पहलगाम हल्ल्यानंतर 4 दिवसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही देशांनी परिस्थिती शांत ठेवण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे चीनने म्हटलं आहे.

काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याबाबत अमेरिकेनंतर आता चीननेही प्रतिक्रिया दिली आहे. चीन हा भारत आणि पाकिस्तानचा शेजारी देश आहे. त्यामुळे, चीनच्या प्रतिक्रियेला अधिक महत्त्व आहे. काश्मीरमधील हल्ल्यानंतर दोन्ही देशातील परिस्थिती शांत ठेरण्यास मदत करणाऱ्या प्रत्येक निर्णय, उपाययोजनांचे चीन स्वागत करतो. तर, लवकरात लवकरच या हल्ल्याच्या घटनेची चौकशी करण्याच यावी, त्यास आमचा पाठिंबा असेल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी म्हटलं आहे. चीन हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा शेजारी आहे. त्यामुळे, दोन्ही देश आपल्या बाजूंनी संयम बाळगतील, एकाच दिशेने काम करतील, संवाद आणि सल्लामसलतीद्वारे हा प्रश्न योग्यरित्या हाताळतील, अशी आम्हाला आशा आहे. दोन्ही राष्ट्र संयुक्तपणे आपल्या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखतील, अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली आहे.

लाडाची लेक UPSC पास, पेढे वाटताना वडिलांना हार्टअटॅक, पुसद पंचायत समितीत सेवानिवृत्त विस्तार अधिकारी

0

केंद्रीय लोकसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. लेक UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं कळताच पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यातच त्यांचे निधन झाल्याची दुःखद घटना घडलीय. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातल्या वागद ( इजारा) येथे घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे .प्रल्हाद खंदारे असे मृत्यमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे .यूपीएससीच्या निकालानंतर मोहिनी प्रल्हाद खंदारेच्या वडिलांच्या निधनाने संपूर्ण खंदारे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे .

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगली रँक मिळवत मोहिनी खंदारे या तरुणीनं कुटुंबीयांची मान उंचावली खरी मात्र आपल्या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या वडिलांवर काळाने घाला घातल्यानं मोठं यश आयुष्यभराचं दुःख देऊन जाणारं ठरलंय .

लेक UPSC त उत्तीर्ण, पेढे वाटताना वडिलांना हार्टअटॅक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला .यात मोहिनी प्रल्हाद खंदारे हिला 884 रँक मिळाला. मुलगी प्रशासकीय अधिकारी होणार या बातमीने सुखावलेल्या वडिलांनी गावकऱ्यांना पेढे वाटायला सुरुवात केली .ग्रामस्थांना पेढे वाटतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला .यातच त्यांचा मृत्यू झाला .एकीकडे मुलीचा आनंदाचा दिवस दुसरीकडे वडिलांच्या मृत्यूने क्षणार्धात कुटुंब पोरकं झालं . प्रल्हाद खंदारे असे मोहिनीच्या वडिलांचे नाव आहे .पुसद पंचायत समिती बुलढाणा येथे ते सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते . त्यांच्या मृत्यूने सारा गाव हळहळलाय.

खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी असून त्यांची मुलगी मोहिनी हिला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगली रँक मिळाली. हा आनंदोत्सव साजरा करताना प्रल्हाद खंदारे हे ग्रामस्थांना पेढे वाटत होते. या वेळी खंदारे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे खंदारे परिवारावर आनंदाच्या क्षणी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोहिनी खंदारेने पुण्यात कोचिंग क्लासेस करत आपल्या अभ्यासावर भर देत हे यश मिळवले आहे. याआधी 2021 मध्ये एमपीएससी परीक्षेत यशस्वी झाली होती.

राजस्थान रॉयल्सचा ‘वैभव’शाली शानदार विजय, गुजरातचा 8 विकेट्सने धुव्वा

0

राजस्थान रॉयल्सने 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने केलेल्या ऐतिहासिक शतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सवर 8 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. गुजरातने राजस्थानला विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं होत. राजस्थानने हे आव्हान वैभवच्या वादळी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं

राजस्थानने 25 बॉलआधी आणि 2 विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पूर्ण केलं आणि एकतर्फी विजय मिळवला. राजस्थानने 15.5 ओव्हरमध्ये 212 धावा केल्या. वैभव सूर्यवंशी व्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल यानेही विजयात योगदान दिलं. यशस्वीने नाबाद 70 धावा केल्या. तर कर्णधार रियान परागही 32 धावावंर नाबाद परतला. राजस्थानचा हा सलग पाचव्या पराभवानंतर पहिला तर एकूण तिसरा विजय ठरला.

मॉडर्न विकास मंडळ, पुणे आयोजित ३५व्या भव्य रक्तदान शिबिराची जोरदार तयारी सुरू

0

कोथरूड भागात कायमच समाज उपयोगी उपक्रम राबवणारे प्रतिष्ठान म्हणून नावारुपास आलेल्या मॉडर्न विकास मंडळ पुणे चा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या ‘रक्तदान शिबिर’ उपक्रमाचे यंदाचे पण 35 वे वर्ष असून निर्णय टप्प्यावर या नियोजनामध्ये कमालीचा उत्साह असून कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 12 व प्रभाग क्रमांक 11 मधील रक्तदात्यांसाठी आवाहात्मक फलक, व्हाईस कॉल बल्क sms अन् व्हाट्सअप च्या माध्यमातूनही आव्हान करण्यात येत आहे. गुरुवार दि. १ मे २०२५ रोजी सकाळी ८ ते २ वा. दरम्यान गोकुळ सभागृह शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरूड येथे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

पुणे शहरातील सध्या वाढते तापमान लक्षात घेता यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करताना रक्तदात्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली असून कोणत्या नागरिकांना त्रास झाल्यानंतर काळजी घेण्यासाठी विशेष डॉक्टरांचे पथकही नियुक्त करण्यात आलेले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.प्रकाशजी जावडेकर

(माजी केंद्रीय मंत्री) व मा. ना. श्रीमती माधुरीताई मिसाळ (पर्यावरण, नगरविकास राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) निमंत्रित आहेत. तर प्रमुख उपस्थितीत म्हणून मा. धीरजजी घाटे (शहराध्यक्ष, पुणे भा.ज.पा.) मा. राजेशजी पांडे महामंत्री, (भाजपा महाराष्ट्र प्रदेश) मा. रविजी अनासपुरे (कार्यालयीन मंत्री, महाराष्ट्र भाजपा) मा. अंकीतजी काणे (संपादक, मल्टिमिडीया सकाळ माध्यम समूह), मा. प्रविणजी बडेकर (प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक) व मा. सौ. मोनिकाताई मोहोळ (मा. नगरसेविका, पुणे म.न.पा.) मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पुणे शहरात सामाजिक जबाबदारी म्हणून मॉडर्न विकास मंडळ, पुणे विविध उपक्रम राबवत असते. गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान आरोग्य पथक, लहान मुलांच्या कलागुणांना देण्यासाठी विविध उपक्रम महिलांच्या आरोग्यविषयक विविध शिबीर आयोजित करत असली तरी रक्तदान शिबिर हे संस्थेचा एक सर्वोच्च उपक्रम आहे. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा तरुणांचा साहिल प्रतिसाद लाभत राहिला आहे तरी 35 व्या उपक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ही अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला व कार्याध्यक्षा सौ. मनिषा बुटाला यांनी केले आहे.

कोथरूड भीमजयंती निमित्त महाबुद्धवंदनेस ‘भीमसागर’ लोटला; समाजभूषण अन् समाजरत्न पुरस्कार प्रदान

0

पुणे – कोथरुड भीम महोत्सव समिती आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त ऐतिहासिक महाबुद्धवंदना हा सामूहिक कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कोथरूड येथे घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जन सामान्यात पोहचावे, आणि आंबेडकरी चळवळ सशक्त करणे या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवणे  हा उद्देश होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्व गौतम बुद्ध याना समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देउन्न मानवंदना दैन्यात आली. पहलगाम येथिल अतिरेकी हल्ल्यातील मृत देशबांधवाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवर आणि हजारो समाजबांधव आणि नागरीक यांच्या साक्षीने महाबुद्ध वंदना पार पडली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहरप्रमुख श्री गजानन थरकुडे, भाजपा नेते श्री शामराव देशपांडे, भारतीय दलित कोब्राचे प्रमुख एडवोकेट भाई विवेक चव्हाण, बिग बॉस फेम फिल्म अभिनेते अभिजीत बिचुकले, पतीत पाहून संघटना शहर प्रमुख श्रीकांत शिळमकर, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष  ॲड. अरविंद तायडे, संदीप मोकाटे, जयदीप पडवळ, उमेश भेलके, योगेश राजापूरकर, गिरीश भेलके, दुष्यंत मोहोळ, गणेश वरपे, नवनाथ जाधव, मारुती वरवे, अनिरुद्ध खांडेकर, संतोष लांडे, अर्चना चंदनशिवे, नितीन शिंदे, अजय भालशंकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी उत्कृष्ट सामाजिक योगदानाबद्दल गायक साजन बेंद्रे यांना समाजभूषण तर समाजरत्न म्हणून श्री जनार्दन साळवे, रमेश पाटोळे, बाबासाहेब जाधव, ॲड.गोरक्ष लोखंडे, वैजनाथ गायकवाड, छाया भोसले, किशोर दळवी, दशरथ खांकाळ, निवृत्ती वाघमारे आदींचा सम्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट बुद्धविहार पुरस्कारामध्ये सारनाथ बुद्धविहार कोथरूड, भीमरत्न बुद्ध विहार बालेवाडी, सम्यक बुद्ध विहार श्रीकृष्णनगर यांना पुरस्कार देण्यात आले. जयंतीच्या निमित्ताने राज्याची लाडकी जोड़ी साजन- विशाल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष बापूसाहेब डाकले, उपाध्यक्ष बाळासाहेब खांकाळ, नामदेव ओव्हाल, दीपक कांबले, विजय सावंत, दीपक सगर, जितेश दामोदरे, वसंत ओव्हाल, सतीश रणवरे, अमर पांडागळे, विशाल सरवदे, अमित तुरुकमारे, भारत भोसले, वसंतराव ओव्हाळ, के जी पवळे, राजाभाऊ गायकवाड, अमोल जगताप, नामदेव ओव्हाळ, उमेश कांबळे, सिद्धार्थ उजागरे, सचिन ढाकले, संतोष शेडगे, अशोक जाधव, कैलास कदम, दिनेश चव्हाण, विनोद पाटोळे, जितेश दामोदरे, कचरू खळगे, संतोष म्हस्के, दीपक सगर, विनोद बचुटे आणि इतर कोथरूड महोत्सव समितीच्या सदस्यांनी यशस्वी आयोजन केले.

 – बुद्धम शरणम् गच्छामी, शरण बुद्धास.. शरण धम्मास.. शरण संघास.. मी भीमराया। या भीमगीताने सुरुवात झाली. साजन विशाल यांच्या भीम गीतांनी माहोल दणाणून सोडला. परिसरातील भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव मुरकुटे यांनी केले तर आभार बाळासाहेब खंकाळ यांनी मानले.