Home Blog Page 87

भारतातील या 5 शहरांमध्ये होणार नाहीत आयपीएलचे सामने, बीसीसीआयचा आश्चर्यकारक निर्णय

0

अपेक्षेप्रमाणे, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी होताच, बीसीसीआयने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. आयपीएल 2025 चे उर्वरित 13 ग्रुप स्टेज सामने ज्यामध्ये अंतिम, क्वालिफायर आणि एलिमिनेटरचा समावेश आहे, आता 17 मे ते 3 जून दरम्यान खेळवले जातील. तथापि, नवीन वेळापत्रक जाहीर करताना, बीसीसीआयने आपल्या एका निर्णयाने आश्चर्यचकित केले आहे. आणि तो निर्णय भारतातील 5 शहरांमध्ये आयपीएल 2025 चे सामने न घेण्याशी संबंधित आहे. नवीन वेळापत्रकानुसार, भारतातील फक्त 6 शहरांमध्ये सामने खेळवले जातील.

आता प्रश्न असा आहे की, भारतातील त्या ५ शहरांमध्ये आयपीएल 2025 च्या सामन्यांवर बंदी का घालण्यात आली? तर याचे उत्तर असे आहे की ती शहरे सीमेजवळ आहेत. नवीन वेळापत्रकात, बीसीसीआयने सामने आयोजित करण्यासाठी त्याच 6 शहरांची निवड केली आहे, जी भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून खूप दूर आहेत. जे कोणत्याही शेजारील देशाच्या सीमेला लागून नाही.

आता प्रश्न असा आहे की, बीसीसीआयने आयपीएल 2025 चे सामने न आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला कोणता शहर आहे? आयपीएल 2025 चे सामने यापूर्वी बेंगळुरू, जयपूर, दिल्ली, लखनौ, चेन्नई, धर्मशाळा, कोलकाता, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद, मुल्लानपूर, विशाखापट्टणम आणि गुवाहाटी येथे खेळवण्यात आले होते. या 13 शहरांपैकी आता फक्त 6 ठिकाणी आयपीएल 2025 चे सामने होणार आहेत. ती 6 ठिकाणे म्हणजे बंगळुरू, जयपूर, दिल्ली, लखनऊ, मुंबई आणि अहमदाबाद.

उर्वरित शहरांमध्ये, विशाखापट्टणम आणि गुवाहाटी यांना फारसे महत्त्व नाही, कारण तिथे फारसे सामने झाले नव्हते. धर्मशाळा हे पंजाब किंग्जचे दुसरे तळ आहे, परंतु ते महत्त्वाचे ठरते कारण येथे सामना सुरू होता, जो भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे घाईघाईने रद्द करण्यात आला. धर्मशाळा हे भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून फार दूर नाही, त्यामुळे बीसीसीआयने येथे पुढील सामने न घेण्याचा निर्णय घेतला.
धर्मशाळा वगळता चेन्नई, मुल्लानपूर, कोलकाता आणि हैदराबादमध्ये पुढील कोणतेही सामने होणार नाहीत. चेन्नई, मुल्लानपूर, कोलकाता ही भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेली शहरे आहेत. चेन्नई आणि हैदराबादमध्ये सामना न आयोजित करण्याचे आणखी एक कारण म्हणजे आयपीएल 2025 मध्ये त्या शहरांच्या संघांची खराब कामगिरी. ते आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

भाजपची देशभर १० दिवसीय तिरंगा यात्रा; ‘ऑपरेशन सिंदूर’चे यशाची माहिती कानाकोपऱ्यात पोचविण्याचा उद्देश

0

पाकिस्तानरोधात राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोचविण्याच्या उद्देशाने भाजपकडून १३ ते २३ मे या कालावधीत तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय एकता आणि तिरंगा ध्वजाचा सन्मान वाढविण्याचा दृष्टिकोन देखील या यात्रेमागे असल्याचे पक्ष सूत्रांकडून सोमवारी सांगण्यात आले. केंद्र आणि राज्यातील मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, अन्य पदाधिकारी तसेच सर्व स्तरावरील कार्यकर्ते तिरंगा यात्रेत सहभागी होणार आहेत.

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम हाती घेतली होती. मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधले नऊ दहशतवादी अड्डे उद्‍ध्वस्त करण्यात आले तर ११ हवाई तळांवर हल्ले चढवत पाकिस्तानच्या हवाई दलाला जबर दणका देण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रव्यापी अभियानाच्या स्वरूपात भाजपतर्फे तिरंगा यात्रा काढली जाणार आहे. काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी दिल्लीसह अन्य काही ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात आली होती, हे विशेष.

‘चुकीचे दावे खोडून काढा’

‘ऑपरेशन सिंदूर’च्या अनुषंगाने काही लोकांकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे. ही माहिती यात्रेदरम्यान खोडून काढण्याचे निर्देश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अलीकडेच झालेल्या बैठकीत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तिरंगा यात्रेच्या समन्वयाची जबाबदारी विनोद तावडे, संबित पात्रा, तरुण चुघ या वरिष्ठ नेत्यांकडे सोपविण्यात आली आहे.

मान्सून आज अंदमान-निकोबारला पोहचण्याची शक्यता, महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

0

मान्सून अंदमान निकोबार बेटावर आज दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमान-निकोबारमध्ये मुसळधार पाऊस झाला असून येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अंदमान-निकोबारनंतर पुढच्या पाच दिवसात बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातही मान्सून पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या २४ तासात निकोबार बेटावर काही भागात मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने म्हटलं की, मंगळवारी १३ मे रोजी मान्सून अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागरात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालीय. यानंतर मान्सून मालदीव, कोमोरिन आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मान्सूनच्या दाखल होण्याआधी महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावलीय. सोमवारी राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने काही ठिकाणी फळबागांचे प्रचंड नुकसान झालंय. येत्या ४८ तासातही राज्यात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.

राज्यात पावसामुळे तापमानाचा पारा खाली आला आहे. उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. येत्या दोन दिवसात विदर्भासह कोकण आणि गोव्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. तर मंगळवारी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Live; ‘सैन्याचा पराक्रम देशाच्या माता, भगिनी आणि मुलींना समर्पित’; वाचा भाषणातील मुद्दे

0

मुंबई : भारत-पाकिस्तान तणाव आता निवळला आहे. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत सशस्त्रसंधीबाबत चर्चा झाली. दोन्ही देशांमधील तणाव कमी झाल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता देशाच्या जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती समोर आली. गेल्या आठवड्याभरातील घडामोडींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेशी संवाद साधणार असल्याने अनेकांचं मोदींकडे लक्ष लागलेलं होतं. विशेष म्हणजे मोदी यांच्या भाषणाची वेळ देखील महत्त्वाची आहे. नरेंद्र मोदी रात्री आठ वाजता संबोधित करणार असल्याची माहिती समोर आली होती. मोदी यांनी याआधी नोटाबंधी आणि लॉकडाऊनची घोषणा रात्री आठ वाजताच केली होती. त्यामुळे मोदी यांच्या आजच्या संबोधनाबाबत सस्पेन्स निर्माण झाला. यानंतर आता मोदी जनतेशी संवाद साधत आहेत.

“नमस्कार, आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाचं सामर्थ्य आणि संयम पाहिलं आहे. मी सर्वात आधी भारताच्या पराक्रमी सेना, सशस्त्र बल आमच्या गुप्तचर यंत्रणा, वैज्ञानिक यांना प्रत्येक देशवासियांकडून सलाम करतो. आमच्या वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी असीम शौर्याचं प्रदर्शन केलं. मी त्यांच्या वीरतेला नमन करतो, त्यांचं धाडस, पराक्रम देशाच्या प्रत्येक माता, बहीण आणि मुलीला समर्पित करतो”, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली.

पहलगाम हल्ल्यावर मोदींचं भाष्य

“22 एप्रिलला पहलगामध्ये दहशतवाद्यांनी जो निष्ठुरपणा दाखवला होता त्याने देश आणि जगाला धक्का दिला होता. सुट्टी साजरा करणाऱ्या निर्दोष निष्पाप नागरिकांना धर्म विचारुन त्यांच्या परिवारासमोर, मुलांसमोर अतिशय निर्घृणपणे मारुन टाकणं हे दहशतवादाचा बिभत्स चेहरा होता, क्रूरता होती. देशाच्या सद्भावनेला तोडायचा घाणेरडा प्रयत्न होता. माझ्यासाठी वैयक्तिकरित्या ही घटना खूप मोठी होती. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरीक, प्रत्येक समाज, प्रत्येक पक्ष एका स्वरमध्ये दहशतवादविरोधात कडक कारवाईसाठी उभे राहिले. आम्ही दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सूट दिली. आज प्रत्येक दहशतवादी आणि त्यांची संघटनेला जाणीव झाली आहे की, आमच्या माता, भगिणींच्या माथेवरील सिंदूर हटवण्याचे परिणाम काय होतात”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की…’

“ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाही. हे देशाच्या कोटी कोटी भावनेचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. 6 मे च्या रात्री उशिरा, 7 मे च्या सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेला परिणामात बदलताना पाहिलं आहे. भारताच्या सेनेने पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर, त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की, भारत एवढा मोठा निर्णय घेऊ शकतो. पण देश जेव्हा एकजूट होतो. भारत प्रथमची भावनेत असतो, तेव्हा असे निर्णय घेतला जातो”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी अमेरिकेची मध्यस्थी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर, ‘तो’ दाखला देत म्हणाले…..

0

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला, दरम्यान त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं हा हल्ला परतून लावला, त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं, पाकिस्तानचे अनेक एअर बेस उद्ध्वस्त झाले.

अखेर भारत आणि पाकिस्तानच्या युद्धविरामासाठी अमेरिकेनं पुढाकार घेतला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर पाकिस्तान आणि भारतानं युद्धविरामाची घोषणा केली, या बद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांचं अभिनंदन देखील केलं आहे.

दरम्यान भारतानं युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर आता विरोधकांकडून विशेष अधिवेश बोलावण्याची मागणी होत आहे, तसेच अमेरिकेनं केलेल्या मध्यस्थिच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत आहेत, यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही पण त्यात किती माहिती दिली जाईल हे सांगता येत नाही. संरक्षणाशी संबंधित काही माहिती देता येत नाही. अशी माहिती गोपनीय ठेवावी लागते. अधिवेशन बोलवायचे असेल तर बोलवा. मात्र त्यापेक्षा सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवून माहिती दिली गेली पाहीजे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या युद्धविरामासाठी अमेरिकेनं मध्यस्थी केली यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिमला करार हा भुत्तो आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्यात झाला होता. त्यात आमच्या देशाचे मुद्दे आम्ही सोडवू, आमचा विषय आम्हीच सोडवणार , त्यात इतरांनी हस्तक्षेप करायचा नाही असं ठरलं होतं. मग त्यात आता इतरांनी नाक खूपसण्याचं कारण काय? असा सवाल यावेळी शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण तुम्ही ही ऐका, मी ही ऐकतो. त्यानंतर बोलू असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं.

भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील युद्धबंदीनंतरची चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही

0

भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तानचे डीजीओमओ यांची दुपारी चर्चा होणार होती. मात्र या चर्चेची वेळ पुढे ढकलण्यात आली होती आणि ही चर्चा संध्याकाळी पूर्ण झाली.

हॉटलाईनवरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या DGMO नी एकमेकांशी चर्चा केली. यावेळी पाकिस्तान काहिसा नरमला असल्याचे पाहायला मिळाले तर यापुढे कोणत्याही प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन होणार नाही, अशी मोठी ग्वाही यावेळी दोन्ही देशांच्या DGMO च्या चर्चेवेळी पाकिस्तानकडून देण्यात आली. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या DGMO च्या चर्चेंदरम्यान पीओके, दहशतवादाच्या मुद्द्याशिवाय इतर कोणतीही चर्चा होणार नसल्याचे सांगण्यात आले होते.

MPSC च्या परीक्षेत वैष्णवी गायकवाड राज्यात मुलींमध्ये प्रथम, कोचिंग न लावता मिळवले असे यश

0

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर झाला. त्यात स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत सोलापुरातील वैष्णवी राम गायकवाड हिने मुलींमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण नु.म.वि. शाळेत तर माध्यमिक शिक्षण दमाणी विद्या मंदिर येथे झाले आहे. पुढे तिने अभियांत्रिकी शिक्षणासाठी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयात अव्वल क्रमांक पटकावला होता. अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षी ती बाटू विद्यापीठात प्रथम आली होती. वैष्णवी ही मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांची कन्या आहे.

नियमित आठ ते दहा तास अभ्यास

वैष्णवी हिने सिव्हील इंजिनिअरींगची पदवी घेतली. त्यानंतर सरकारी सेवेत जाण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. वैष्णवी हिने सांगितले की, सुरुवातीला पुण्यात जाऊन अभ्यास सुरु केला. दीड ते दोन वर्ष पुण्यात अभ्यास केला. परंतु एकही क्लास मला चांगला वाटला नाही. त्यामुळे स्वत:च अभ्यास केला. त्यानंतर पहिल्यांदा परीक्षा दिली. परंतु त्यात यश आले नाही. त्यानंतर सोलापूरमध्ये येऊन घरीच अभ्यास सुरु केला. जिद्द चिकाटी आणि सातत्याच्या बळावर तिने हे यश संपादन केल्याचे वैष्णवी हिने सांगितले. कोणतेही कोचिंग क्लास न लावता तिने एमपीएससीचा अभ्यास केला. रोज आठ ते दहा तास अभ्यास करीत होती. त्या माध्यमातून यशापर्यंत पोहचली.

स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी दोन ते पाच वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे त्यापद्धतीने नियोजन करुन आणि कुटुंबाशी संवाद साधून या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घ्यावा, असै वैष्णवी गायकवाड हिने सांगितले.

एका सर्वसामान्य शिक्षकाची मुलगी क्लास वन अधिकारी झाल्याने वैष्णवी गायकवाड हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ साली घेण्यात आली होती. त्यानंतर मुलाखती ४ मार्च ते ९ मे २०२५ या कालावधीत नवी मुंबई केंद्रावर घेतल्या होत्या. त्याची गुणवत्ता यादी लावण्यात आली आहे. त्यात मुलींमध्ये वैष्णवी गायकवाड ही प्रथम आली.

भारतातील हे बनले पहिले भिकारीमुक्त शहर, प्रभावी उपाययोजनांचा परिणाम; ‘ही’ मोहीम ठरली आदर्श शहरभर होते सुमारे ५००० भिकारी

0

एखादं शहर भिकारीमुक्त होऊ शकतं, असं म्हटलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे शक्य झालं आहे. शहर भिकारीमुक्त होणं म्हणजे गरिबी कमी होणं, असं आपण एका अर्थाने म्हणू शकतो. मध्य प्रदेशातील इंदूर शहरानं ही कामगिरी केली असून हे शहर भिकारीमुक्त झाले आहे. इंदूरमध्ये भीक मागणे तसेच भिक्षा देणे आणि भिकाऱ्यांकडून कोणतीही वस्तू खरेदी करण्यावर प्रशासनाने कायदेशीर बंदी घातली असून या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आतापर्यंत तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पण, हे कसं शक्य झालं? इंदूर शहर भिकारीमुक्त होण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या गेल्या? याविषयीची सविस्तर माहिती आम्ही पुढे देत आहोत, चला तर मग जाणून घेऊया.

मध्य प्रदेशातील इंदूर हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर ठरले आहे. गुरुवारी प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने हा दावा केला. भिकाऱ्यांचे पुनर्वसन तसेच भीक मागणाऱ्यांविरोधात केलेल्या कायदेशीर उपाययोजनांमुळे शहराने ही कामगिरी केल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, इंदूर हे पूर्णपणे भिकारीमुक्त होणारे देशातील पहिले शहर ठरले आहे.

‘ही’ मोहीम आदर्श ठरली

भिकारी निर्मूलनासाठी इंदूरमध्ये सुरू करण्यात आलेली मोहीम एक मॉडेल म्हणून प्रस्थापित झाली आहे. या मॉडेलला केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आणि जागतिक बँकेच्या टीमनेही मान्यता दिली आहे.

महिला आणि बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रामनिवास बुधोलिया यांनी सांगितले की, फेब्रुवारी 2024 मध्ये इंदूरमध्ये भीक मागण्याविरोधात मोहीम सुरू करण्यात आली होती आणि शहरात 500 मुलांसह सुमारे पाच हजार भिकारी होते.

‘आम्ही पहिल्या टप्प्यात भीक मागण्याविरोधात जनजागृती मोहीम राबविली. त्यानंतर भिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्यात आले. याच दरम्यान आम्ही अनेक भिकाऱ्यांना भेटलो, जे राजस्थानहून इंदूरला प्रोफेशनली भीक मागण्यासाठी येत असत.

भीक मागणे आणि त्यांच्याकडून वस्तू खरेदी करण्यास मनाई

इंदूरमध्ये भीक मागणे तसेच भिक्षा देणे आणि भिकाऱ्यांकडून कोणतीही वस्तू खरेदी करण्यावर प्रशासनाने कायदेशीर बंदी घातली असून या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आतापर्यंत तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.शहरात भीक मागणाऱ्यांची अचूक माहिती देणाऱ्यास एक हजार रुपयांचे बक्षीस म्हणून प्रशासनाने जाहीर केले असून अनेकांना हा पुरस्कार यापूर्वीच देण्यात आला आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने इंदूरसह देशातील 10 शहरे भिकारीमुक्त करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे.

जगातील 2500 वर्ष जुना सर्वात पावरफुल कोर्स! फक्त 10 दिवसांत आयुष्य बदलेल; महाराष्ट्रातही मिळते प्रशिक्षण

0

प्रत्येकाच्या आयुष्यात दु:ख हे आहेच हे निर्विवाद सत्य आहे. समस्या, चिंता, तणाव, संकटे अशा नानाविविध मोर्चांवर दररोज लढा द्यावा लागतो. विद्यार्थी असो वा गृहस्थ, नोकरदार असो वा व्यावसायिक, प्रत्येकांसमाेर समस्यांचे डोंगर उभे आहेत. पण, या समस्यांवर मात करण्याचे सोडून काहीजण डिप्रेसमध्ये जातात आणि मग आत्महत्यासारखं टोकाची पाऊल उचलून आयुष्यच संपवतात. काहीजण व्यसनाच्या आहारी जातो. आयुष्य बरबाद होते. पण, या सर्वांतून फक्त दहा दिवसांत सुटका होऊ शकते. वाचूनच आश्चर्य वाटेल, पण हे शक्य आहे. 2500 वर्ष जुना कोर्स तुम्हाला 10 दिवसांत सगळ्यातून बाहेर काढेल.

या कोर्स मध्ये कोणतेही पुस्तकी ज्ञान शिकवले जात नाही. यात तुम्हाला स्वत:चाच शोध घेण्याचा मार्ग दाखवला जातो. हा कोर्स म्हणजे मेडिटेशन अर्थात विपश्यना ध्यान. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेडिटेशन सेंटर आहेत. दहा दिवसांचा विपश्यना कोर्स केल्यास आयुष्य कसं असावं आणि ते कसं जगावं, याचे उत्तर सापडेल. आता तुम्हाला वाटत असेल की या कोर्ससाठी किती पैसे मोजावे लागतील, तर थांबा… हा कोर्स विनामूल्य असून, दहा दिवसांचे राहणे, खाणे मोफत आहे. एक रुपयाचाही खर्च नाही.

विपश्यना म्हणजे काय?

विपश्यना ही भारताची एक अत्यंत प्राचीन ध्यान-विधि आहे. मानवजातीपासून हरवलेली,आजपासून जवळजवळ 2500 वर्षांपूर्वी गौतम बुध्दांनी ही ध्यान विधी पुन्हा शोधून काढली होती. विपश्यना शब्दाचा अर्थ असा की, जी वस्तू खरोखरच जशी आहे, ती त्याच प्रकारे जाणून घेणे. स्व-निरिक्षणाद्वारे आत्मशुद्धी करण्याची ही प्रक्रिया (साधना) आहे.

कुणीही मनाच्या एकाग्रतेसाठी नैसर्गिक श्वासाच्या निरीक्षणाव्दारे सुरूवात करतो. तीक्ष्ण सजगतेने शरीर व चित्ताच्या बदलत्या जातिस्वभावाचे निरिक्षण करु लागतो आणि नश्वरता, दुःख व अहंभावाच्या जागतिक सत्याचा अनुभव घेतो. प्रत्यक्ष अनुभवाद्वारे ह्या सत्याची अनुभूती ही एक शुध्दीकरणाची प्रक्रिया आहे.

हा संपूर्ण मार्ग म्हणजे जागतिक वाद-विषयांवर एक जागतिक उपाय आहे आणि ह्याचे कोणत्याही संघटित धर्म किंवा संप्रदायाशी देणे घेणे नाही. ह्याच कारणामुळे, कुणीही, वंश,समाज किंवा धर्मामुळे होणाऱ्या झगड्याशिवाय कोणत्याही वेळी, ह्याचा मुक्तपणे अभ्यास करु शकतो, आणि सर्वांना एकसारखी फायदेशीर असल्याचे सिद्ध होईल.

विपश्यना काय नाही?

– विपश्यना अंधश्रध्देवर आधारीत कर्मकांड नाही.

– ही साधना बौध्दिक मनोरंजन किंवा दार्शनिक वादविवादासाठी नाही.

– ही सुट्टी घालविण्यासाठी किंवा सामाजिक आदानप्रदानासाठी नाही.

– ही रोजच्या जीवनातल्या ताणतणावापासून पलायन करविणारी साधना नाही.

विपश्यना काय आहे?

– ही दुःखमुक्तिची साधना आहे.

– ही मनाला निर्मळ करणारी अशी साधना आहे, ज्यामुळे साधक जीवनांतील चढ-उतारांचा सामना शांतिपूर्वक तसेच संतुलित – राहून करु शकेल.

– ही जीवन जगण्याची कला आहे ज्यापासून साधक एका स्वस्थ समाजाच्या निर्मितीमध्ये सहयोगी होतो.

अनुशासन संहिता

शील अर्थात नैतिक वर्तणुक हा साधनेचा पाया आहे. समाधीच्या म्हणजे मनाच्या एकाग्रतेच्या विकासासाठी शील हाच पाया आहे आणि मनाची शुध्दता प्रज्ञेव्दारे होते, यालाच आंतरिक ज्ञान म्हणतात.

राज्यात ‘पूर्वमोसमी’ला पोषक वातावरण; कसे असेल हवामान? जाणून घ्या सविस्तर…

0

उष्णतेने भाजून काढल्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आता पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला आहे. अंदमानजवळील समुद्रात ढगांची रेलचेल वाढली असून निकोबार बेटांवर रविवारपासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मान्सूनची चाल यंदा वेगवान होण्याची दाट शक्यता असून येत्या चार ते पाच दिवसांत मोसमी वारे संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्येही, दक्षिण अरबी समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

राज्यातही पावसाला पूरक असे हवामान तयार होत आहे. यामुळे विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचे सावट कायम आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मंगळवारी वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही ठिकाणी सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

सोमवारी कोकणातील रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर, तसेच विदर्भातील नागपूर, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४१.३ अंश तापमानाची नोंद झाली. अमरावती, ‎परभणी, चंद्रपूर, ‎ब्रह्मपुरी, जळगाव, ‎वर्धा येथे ४० अंशांपेक्षा अधिक, ‎‎जेऊर, ‎गडचिरोली, ‎गोंदिया, ‎नागपूर आणि ‎यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. ‎धुळे, ‎सोलापूर, ‎धाराशिव आणि ‎वाशीम येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

मंगळवारी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

सोमवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎पुणे (३६.२-२४), ‎‎धुळे (३८-२२.६), ‎जळगाव (४०-२६.५), ‎

जेऊर (३९.५-२२), ‎कोल्हापूर (३४-२३.६), ‎महाबळेश्वर (२७.४-१७.६), ‎मालेगाव (३६.६-२३.२), ‎नाशिक (३३.२-२२.६), ‎निफाड (३५.६-२४.४), ‎सांगली (३५.७-२४), ‎सातारा (३६.२-२२), ‎सोलापूर (३८.९-२६.६), डहाणू (३३.८-२५.९), ‎रत्नागिरी (३३.७-२६.३), ‎छत्रपती संभाजीनगर (३६.६-२५.२), ‎धाराशिव (३८.९-२३), ‎परभणी (४०.४-२५.६), अमरावती (४०.८-२३.३), ‎‎भंडारा (३७-२६), ‎बुलडाणा (३६.२-२३.८), ‎ब्रह्मपुरी (४०.१-२५.१), ‎चंद्रपूर (४०.४-२६.८), ‎गडचिरोली (३९-२५.२), ‎गोंदिया (३९.४-२५.८), ‎नागपूर (३९.१-२६), ‎वर्धा (४०-२५.६), ‎यवतमाळ (३९-२४).