Home Blog Page 82

पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्की आणि चीनला भारतीयांच्या शिव्याशाप, निसर्ग कोपला

0

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात पाकिस्तानला पाठिंबा देणारे जगातील देश आता निसर्गाच्या प्रकोपाला सामोरे जात आहेत. तुर्की आणि चीन या दोन्ही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनएससी) सांगितले की, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी होती. सुरुवातीच्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 6.30 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र जमिनीत 10 किलोमीटर खोलवर होते.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (NSC) नुसार, गुरुवारी संध्याकाळी तुर्कीयेमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी मोजली गेली. तुर्कीच्या मध्यवर्ती भागात भूकंपाचे धक्के जाणवले आणि राजधानी अंकारामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

गेल्या एका आठवड्यात जगातील अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अफगाणिस्तान, चीन आणि तुर्की व्यतिरिक्त इतर अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी रात्री 1 वाजता अफगाणिस्तानला पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 मोजण्यात आली. सध्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. तथापि, हे खरे आहे की भूकंपामुळे लोक घाबरले आणि घराबाहेर पळाले.

IPL 2025 : हे 2 खेळाडू हंगामाच्या मध्यात सोडणार मुंबई इंडियन्सची साथ, संघाने आधीच केली पर्यायी व्यवस्था

0

१७ मे पासून पुन्हा एकदा आयपीएल 2025 सुरू होणार आहे. भारत-पाकिस्तान तणावामुळे बीसीसीआयने 9 मे रोजी ही स्पर्धा स्थगित केली होती. पण आता हंगामातील उर्वरित 17 सामने पूर्ण होतील. पण याआधी काही संघांमध्ये मोठे बदल झाले आहेत. काही परदेशी खेळाडू आंतरराष्ट्रीय ड्युटीमुळे भारतात परतत नाहीत, ज्यामुळे संघांना बदली खेळाडूंचा शोध घ्यावा लागत आहे. मुंबई संघाची परिस्थितीही अशीच काहीशी आहे. मुंबई इंडियन्सचे दोन स्टार खेळाडू हंगामाच्या मध्यात त्यांच्या देशात परतू शकतात. अशा परिस्थितीत, त्यांनी बदली म्हणून 2 स्टार खेळाडूंची निवड केली आहे.

मुंबई इंडियन्सचे स्टार फलंदाज विल जॅक्स आणि रायन रिकेलटन आयपीएल 2025 च्या प्लेऑफसाठी उपलब्ध नसतील. खरंतर, विल जॅक्स मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या दोन ग्रुप-स्टेज सामन्यांपूर्वी भारतात परतला होता, पण तो प्लेऑफपूर्वी त्याच्या देशात परतेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची इंग्लंड संघात निवड झाली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, इंग्लंडचा स्टार खेळाडू जॉनी बेअरस्टो मुंबई संघात विल जॅक्सची जागा घेऊ शकतो. जर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एनओसी दिली, तर तो प्लेऑफ सामन्यांमध्ये मुंबईकडून खेळताना दिसेल. तथापि, मुंबई संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दुसरीकडे, रायन रिकेलटन देखील राष्ट्रीय कर्तव्यामुळे प्लेऑफचा भाग असणार नाही. रायन रिकेलटन हा 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भाग आहे आणि क्रिकेट साउथ आफ्रिकेने त्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम संघातील सदस्यांना 27 मे पर्यंत मायदेशी परतण्याची विनंती केली आहे. अशा परिस्थितीत, तो ग्रुप स्टेज संपताच भारत सोडून जाईल. रायन रिकेलटनच्या जागी रिचर्ड ग्लीसनला मुंबई संघात स्थान मिळू शकते. रिचर्ड ग्लीसनने गेल्या वर्षी सीएसकेकडून खेळून आयपीएलमध्ये पदार्पण केले. पण त्याला 2 सामन्यात फक्त 1 विकेट घेता आली.

मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम आतापर्यंत खूप चांगला गेला आहे. 12 सामन्यांत 7 विजयांसह ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. त्याचे पुढील दोन सामने दिल्ली आणि पंजाब संघांविरुद्ध खेळले जाणार आहेत. अशा परिस्थितीत, त्याला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची उत्तम संधी आहे. तथापि, त्याला त्याच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्याआधी मुंबईने सलग 6 सामने जिंकले होते.

25 Glorious Years of Symbiosis Centre for Distance Learning

0

Unveiling of the Silver Jubilee Logo of Symbiosis Centre for Distance Learning

 

Pune – Symbiosis Centre for Distance Learning (SCDL), which has been doing remarkable work in the field of distance education, has completed 25 successful years. On this occasion, a special event was organized at the auditorium of Symbiosis Skills and Professional University, Kiwale, where the silver jubilee logo of SCDL was unveiled.

The unveiling was done at the hands of Muktangan De-addiction Centre Director Mukta Avachat Puntambekar, President of Symbiosis Open Education Society Dr. S. B. Mujumdar, and Principal Director of Symbiosis Open Education Society Dr. Swati Mujumdar.

Speaking on the occasion, Dr. Swati Mujumdar said, “Technology is going to play a crucial role in the future, especially in making education accessible in remote areas. It is because of this technology that we will be able to connect with remote regions. With this in mind, I envisioned creating a virtual global campus. Started in 2006 at Model Colony, Symbiosis Centre for Distance Learning has now become a Centre of Excellence. Due to the facilities we have provided, our distance learning program has become popular. This journey has completed 25 glorious years, but there is still a long way to go. We intend to continue this progress. Within the next two years, we plan to transform this into an open university, where students will be awarded degrees instead of diplomas.”

These 25 years have been a legacy of development, success, academic excellence, commitment, innovation, and transformation. A grand celebration of this legacy and the journey of education was held on this momentous occasion.

महापालिका निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश

0

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाले आहे. निवडणूक आयोगाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिले आहेत.

६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले होते. “चार महिन्यांच्या आत रखडलेल्या निवडणुका घ्या,” असे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठराविक वेळेत घ्या, उर्वरित वादाचे मुद्दे टाळा, असे निर्देशही कोर्टाने दिले होते. कोर्टाच्या या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सक्रिय झाला आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश:

राज्य निवडणूक आयोगाने सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा, असे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आयोगाने राज्य सरकारला बुधवारी दिले.

तसेच, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची रचना करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला पालिकांची प्रभाग रचना, तसेच गट आणि गणांची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.

Election |चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश :

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात सप्टेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबतची सुनावणी झाली.

राज्यातील संभाजीनगरसह अनेक महापालिकांमध्ये पाच वर्षांपासून निवडणुका झाल्या नसल्याचे आणि प्रशासक तिथे काम करत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आले. लोकशाहीसाठी हे योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले. त्यानुसार, येत्या चार आठवड्यांत निवडणुकीच्या नोटिफिकेशन्स काढण्याचे आणि चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत या निवडणुका होणार आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे शहराध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी? मुंबईमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक या नावांची चर्चा

0

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या राजीनाम्यानंतर आता पक्षाचा शहराध्यक्ष कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी महापौर दत्ता धनकवडे व माजी नगरसेवक आप्पा रेणुसे यांच्या नावांची पक्षात चर्चा सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. परदेशी तरुणीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात शंतनू कुकडे याच्यासह आठ जणांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याच प्रकरणातील आरोपी रौनक जैन याने दीपक मानकर व त्यांच्या मुलाच्या बॅंक खात्यात पावणे दोन कोटी रूपये टाकल्याचे प्रकरण पुढे आले होते.

मानकर यांच्याविरुद्ध जमीन खरेदी प्रकरणी बनावट दस्त तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मानकर यांनी मंगळवारी रात्री शहराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केला. मानकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकले झाल्यानंतर शहर कार्यकारणी मध्ये विद्यमान आमदारांनी घेतलेला सहभाग लक्षात घेता पूर्ण कार्यकारिणी त्यांच्या ताब्यात देणे किती योग्य आहे यावरही चर्चा करण्यात आली. शहर कार्यकारणी मध्ये कार्यकर्त्यांना वेळ देण्यासाठी पूर्णवेळ काम करणारा शहराध्यक्ष असेल तरच पुणे महापालिकेतील पूर्वीची सन्मानाची जागा गाठण्यासाठी कार्यकर्त्यातील चेहऱ्याची निवड करावी अशी मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात बुधवारी मुंबईमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाची शहराध्यक्षपदासाठी चर्चा झाली.

तसेच पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांना शहराध्यक्षपदी बढती देण्यावरही चर्चा झाली. तुपे, टिंगरे व देशमुख या तिन्ही नावांची शहराध्यक्षपदासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे शहराध्यक्षपदी नेमकी कोणाला संधी देणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवाद्यांविरोधात कारवाई तिव्र… आसाम रायफल्सने 10 अतिरेक्यांचा केला खात्मा

0

मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यातील न्यू समतल गावाजवळ भारत-म्यानमार सीमेवर बुधवारी (१४ मे) रात्री झालेल्या तीव्र चकमकीत आसाम रायफल्सने १० अतिरेक्यांना ठार केले. भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडने दिलेल्या माहितीनुसार, खेंगजॉय तहसीलमधील या भागात सशस्त्र अतिरेक्यांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.ऑपरेशन अद्याप सुरू असून, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

ऑपरेशनची पार्श्वभूमी

भारतीय लष्कराने ‘X’ वर दिलेल्या माहितीनुसार, “चांदेल जिल्ह्यातील न्यू समतल गावाजवळ सशस्त्र अतिरेक्यांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाल्याने १४ मे २०२५ रोजी आसाम रायफल्सच्या युनिटने स्पीअर कॉर्प्सच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सुरू केले.” या ऑपरेशनदरम्यान, संशयित अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देताना आसाम रायफल्सच्या जवानांनी तातडीने पुनर्स्थापना करून संयमित आणि मोजक्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले. यानंतर झालेल्या चकमकीत १० अतिरेकी ठार झाले.

लष्कराने सांगितले की, “या चकमकीत १० अतिरेकी ठार झाले असून, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.” ठार झालेल्या अतिरेक्यांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. सुरक्षा दलांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

काश्मीर सीमेलगतची गावे हळूहळू पूर्वपदावर; सुरक्षा दलांची उरी भागातील अनेक रहिवाशांना घरी परतण्याची परवानगी

0

जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती गावांमध्ये सध्या तात्पुरती शांतता आहे. बाजारपेठा हळूहळू सुरू होत असून लोक दैनंदिन व्यवहार पुन्हा सुरू करत आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय प्रत्युत्तरानंतर सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारामुळे स्थलांतर करणे भाग पडल्याने काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला, कुपवाडा आणि गुरेझमधील सीमेवरील भाग तसेच जम्मूमधील पूँच, राजौरी येथील गावे सुनसान होती. घरे रिकामी आणि दुकाने बंद असल्याने सर्वत्र भीतीचे पसरल्याने नागरिकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला होता. भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीमुळे येथील नागरिकांनी निःश्वास सोडला असून भीतीची टांगती तलवार आणि स्थलांतरामुळे अस्थिर वातावरणामुळे सध्याची शांततेने त्यांनी दिलासा मिळाला आहे.

‘आम्हाला युद्ध नव्हे तर शांतता हवी आहे. युद्धामुळे विनाशाशिवाय काहीही मिळत नाही. आमच्या मुलांना शांततेत जगायचे असून शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचे आहे, ”अशी भावना उरीतील स्थानिक दुकानदाराने व्यक्त केली. भारत-पाकिस्तान संघर्षानंतर प्रथमच त्याने दुकान सुरू केले.

अनेक रहिवाशांनीही अशाच भावना व्यक्त केल्या असून दोन्ही देशांनी शस्त्रसंधी कायम ठेवावी व नियंत्रणरेषेजवळ राहणाऱ्या लोकांच्या हिताला प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. स्फोट न झालेले शस्त्रसाठे (यूएक्सओ) काढून टाकल्यानंतर सुरक्षा दलांनी उरी भागातील अनेक रहिवाशांना घरी परतण्याची परवानगी मंगळवारी (ता.१३) देण्यात आली. सुरुवातीला सहा गावे सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी तपासानंतर जाहीर केले.

उरी आणि नियंत्रणरेषेवरील कुपवाडा, राजौरी आणि पूँच आदी भागांत अजूनही तपासाची प्रक्रिया सुरू आहे. जम्मू आणि काश्मीरमधील इतर नियंत्रणरेषेवरील भागांमध्येही गोळीबार आणि स्थलांतरानंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. बंद असलेले बाजार सुरू होत असून उघडू लागले आहेत आणि स्थानिक लोक आता बाहेर पडू लागले आहेत.

‘आता फक्त शांतता टिकून राहावी, एवढेच आम्हाला हवे आहे,’ असे जम्मूतील रहिवाशांनी सांगितले. नियंत्रणरेषेजवळ राहणाऱ्या रहिवाशांनी शस्त्रसंधीचे एकमुखाने स्वागत केले आहे. ही शस्त्रसंधी भीती आणि स्थलांतरातून मोठा दिलासा आहे, असे त्‍यांना वाटत आहे.

पुण्यात दहशतवादी हल्ल्याची शक्यतापुणे पोलिसांचा मोठा निर्णय; पुणे शहरात १२ जून २०२५ पर्यंत या उपकरणांच्या वापरावर बंदी

0

भारत आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरनंतर तणाव वाढला होता. शस्त्रसंधीमुळे तणाव कमी झाला असला तरी पाकिस्तान किंवा दहशतवाद्यांकडून हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दहशतवादी संघटनांकडून संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेता पुणे पोलिसांनी सुरक्षा उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुणे शहरात १२ जून २०२५ पर्यंत काही हवाई उपकरणांच्या वापरावर बंदी घातली आहे. यात ड्रोन, रिमोट कंट्रोल एअरक्राफ्ट, मायकोलाइट विमान, पॅराग्लायडर, पॅरामोटर, हॅण्डग्लायडर, हॉट एअर बलून इत्यादी उपकरणांचा समावेश आहे. पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने ही बंदी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानने अलीकडेच जम्मू, राजस्थान आणि पंजाब सीमांवर आक्रमक पावले उचलली होती. त्यानंतर भारतानेही लाहोर, कराची आणि इस्लामाबादमध्ये ड्रोनद्वारे लक्ष्य करून जोरदार प्रत्युत्तर दिलं. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय.

मुंबईतही पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे आणि सार्वजनिक ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान काही ठिकाणी ब्लॅकआउटचीही अंमलबजावणी करण्यात आली होती. या सर्व घडामोडींचा विचार करता, पुण्यासह मुंबईत हल्ल्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली तर तात्काळ पोलिसांना सांगा असं आवाहन केलंय.

न्या.गवईंची सरन्यायाधीशपदाची शपथ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलले मोठे पाऊल.. उद्या देशभर परिणाम करणारे पहिलेच मोठं प्रकरण सुनावणीस 

0

न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन येथे त्यांना बुधवारी शपथ दिली. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना हे १३ मे रोजी निवृत्त झाले. भूषण गवई हे आता २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. २००७ साली सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे न्या. के.जी. बालाकृष्णन यांच्यानंतर न्या. गवई हे दुसरे दलित व्यक्ती ठरणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

सुमारे दहा मिनिटे हा शपथविधी सोहळा चालला. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, निवृत्त सरन्यायाधीश संजीव खन्ना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाश सिंह, विधी मंत्री अर्जुन राम मेघवाल, उद्योग मंत्री पीयुष गोयल, रसायन विभागाचे मंत्री जेपी नड्डा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शपथविधी सोहळा संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कृती सध्या चर्चेचे कारण ठरत आहे.

मोदींनी काय केले?

न्या. गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावतीमध्ये झाला. त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी होते. त्यांना दादासाहेब म्हणून ओळखले जायचे. त्यांनी अमरावतीचे खासदारपद व पुढे बिहार, सिक्किम आणि केरळचे राज्यपालपद भूषवले. गवई राजकीय कुटुंबातून आले असले तरी न्याय क्षेत्रात त्यांनी कधीही याचा परिणाम होऊ दिला नाही. न्या. गवई यांना सरन्यायाधीश म्हणून अगदी सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.

सरन्यायाधीशपदाची शपथ घेताच १५ मे रोजी त्यांच्यासमोर वक्फ कायद्याचे प्रकरण सुनावणीसाठी येईल. न्यायपालिकेवर विश्वास कमी करणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गवईंकडे सरन्यायाधीशपद आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर न्या.गवई यांचा शपथविधी सोहळा महत्वपूर्ण आहे. शपथविधी सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने झाली. यानंतर लगेचच राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू आणि त्यांच्या पाठोपाठ उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रस्थान करायला सुरूवात केली. राष्ट्रपती बाहेर प्रस्थान करत असतानाच मोदी थेट गवई यांच्या कुटुंबीयांकडे वळले.

न्या.गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांच्याकडे मोदी गेले आणि त्यांचा हात पकडून त्यांना अभिवादन केले आणि आपुलकीने संवाद साधला. मोदी यांनी कमलाताई गवई यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली. दरम्यान, न्या.गवई यांचे बंधू राजेंद्र गवई यांनी समोर येऊन मोदी यांच्यासोबत हस्तांदोलन केले. उल्लेखनीय आहे की अलिकडेच नागपूर दौऱ्यादरम्यान आलेल्या मोदींनी दीक्षाभूमीला भेट दिली होती. त्यावेळी देखील मोदी यांनी कमलाताई गवई यांच्या प्रकृतीबाबत राजेंद्र गवई यांना विचारणा केली होती.

कर्नल सोफिया कुरेशींच्या घरावर हल्ला?, RSS चा उल्लेख करत सोशल मीडियावर पोस्ट; कर्नाटक पोलिसांची तात्काळ दखल घेत ही कारवाई

0

पहलगामवरील हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला. हा तणाव फक्त सीमेवरच नाही तर सायबर हल्ल्यातूनही दिसून येत आहे. अपप्रचार करून गोंधळ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर अफवा पसरविण्याचे प्रयत्न होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर प्रकाशझोतात आलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. त्यांच्या देशभक्तीबद्दल सर्वांनाच अप्रूप वाटले. मात्र सोफिया कुरेशींच्या बेळगावमधील घरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्यांनी हल्ला केल्याची अफवा सोशल मीडियावर उठविण्यात आली. कर्नाटक पोलिसांनी याची दखल घेऊन सदर पोस्ट डिलीट केली आहे.

एक्सवर अनीस उद्दीन या अकाऊंटवरून सदर खोटी पोस्ट शेअर करण्यात आली होती. कर्नल सोफिया कुरेशी आणि त्यांच्या मुलावर हल्ला झाला असून घराला आग लावण्यात आल्याचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला होता. सोफिया कुरेशी यांच्या घराबाहेर मुस्लीम समाजाविरोधात द्वेषपूर्ण घोषणा दिल्या गेल्या, असाही दावा पोस्टमध्ये करण्यात आला होता.

सदर अकाऊंटचे लोकेशन कॅनडामधील ब्रिटिश कोलम्बिया येथील दाखवले गेले. या अकाऊंटवरून ४०५ जणांना फॉलो करण्यात आले होते. तर त्याचे ३१ फॉलोअर्स होते. विशेष म्हणजे हे अकाऊंट व्हेरिफाईड ब्लू टीक असलेले अकाऊंट होते. तसेच पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान मोहम्मद अली जीना, लष्करप्रमूख असीम मुनीर आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांचा फोटो अकाऊंटला जोडण्यात आलेला होता.

 कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर घरावर हल्ला झाल्याची डिलीट केलेली खोटी पोस्ट-

एक्सवरील @JN_Araain या आणखी एका अकाऊंटवरून अशाच प्रकारची पोस्ट टाकण्यात आली होती. या पोस्टमध्ये लिहिले गेले, “RSS ने पुन्हा एकदा द्वेष पसरविला. भारतीय लष्कराच्या अधिकारी आणि प्रवक्त्या कर्नल सोफिया कुरेशी यांना लक्ष्य करण्यात आले आहे. बेळगावमधील त्यांच्या घरावर मध्यरात्री ३ वाजता हल्ला करण्यात आला. मुलगा समीर गंभीर जखमी झाला आहे. तर घर पेटवून देण्यात आले. कुरेशी यांचे कुटुंब सध्या दिल्लीत लष्कराच्या संरक्षणाखाली आहे.”

कर्नाटक पोलिसांनी काय म्हटले?

बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुलेद यांनी सदर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अशाप्रकारची घटनाच घडली नसल्याचे स्पष्ट केले. सदर पोस्ट खोटी असून केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी केली असल्याचे त्यांनी म्हटले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक एसएन श्रुती यांनीही ही पोस्ट बोगस असल्याचे म्हटले. “ही पोस्ट ज्या अकाऊंटवरून शेअर झाली, त्याचे वापरकर्ते परदेशातील आहेत. आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कुरेशी यांच्या कुटुंबाला सुरक्षा पुरविण्यात आली असून आम्ही पुढील तपास करत आहोत.

ऑपरेशन सिंदूरनंतर कर्नल कुरेशी यांच्याशी संबंधित सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाली होती. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सात गटांची ओळख पटवली होती, ज्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील महत्त्वाच्या संकेतस्थळांना लक्ष्य करणारे १५ लाख सायबर हल्ले केले होते. यापैकी केवळ १५० हल्ले यशस्वी ठरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाने रोड ऑफ सिंदूर नावाच्या अहवालाच्या माध्यमातून पाकिस्तान पुरस्कृत सायबर हल्ल्यांची माहिती दिली असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.