Home Blog Page 4

तयारीला लागा! निवडणुकांचा ‘दिवाळी धमाका’च? पालिकेची पारूप प्रभाग रचना ४ ऑगस्टला ‘नगरविकास’ कडे जाणार; कामही पूर्ण…

0

पुणे महापालिकेची बहुप्रतिक्षित महापालिका निवडणूक लवकरच होण्याची संकेत मिळत असून प्रशासकीय स्तरावरच्या सर्व प्रक्रिया पूर्णत्वाकडे जात असल्याने पुणे महापालिकेचा ‘दिवाळी धमाका’ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक स्तरावरील प्रभाग रचना अंतिम स्वरूपात तयार झाली असून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडे या आठवड्यामध्ये सर्व प्रभाग रचना जमा होण्याची संकेत निर्माण झालेले आहेत. पुणे महापालिकेच्याही आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत प्रारूप प्रभाग रचनेचे काम आटोक्यात आले असून या अंतिम मसुद्यावर २५ ते ३१ जुलैदरम्यान निर्णय अधिकारी समिती सदस्यांच्या सह्या होणार आहे. त्यानंतर महापालिका प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा ४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केला जाणार आहे.

संपूर्ण राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संपूर्ण राज्यभर स्थानिक पातळीवरती प्रभाग रचना अंतिम करण्याचे काम सुरू आहे. पुणे महापालिकेमध्येही 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार हे निश्चित झाल्यामुळे २०११च्या जनगणनेनुसार शहरात १६५ नगरसेवक असतील. या गणितानुसार पुणे महापालिकेमध्ये सुमारे 41 प्रभाग तयार करण्यात येणार असून यानुसार सध्या निवडणूक कार्यालयाकडून गुगल मॅपिंगचा वापर करून प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पुणे महापालिकेच्या वतीने सध्या शहरभर प्रभाग रचनेच्या हद्दी २३ ते २४ जुलैपर्यंत हे काम पूर्ण करून त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रभागांच्या सीमारेषांची पाहणी करण्याचे कामही पूर्णत्वास आल्याने आज किंवा उद्या संबंधित प्रारूप प्रभाग रचना समितींच्या सह्या करून महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येईल. महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने अंतिम झालेले प्रारूप ४ ऑगस्टपर्यंत नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी हा प्रारूप आराखडा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे जमा केल्यानंतर नगर विकास विभागाच्या वतीने गुगल मॅपिंगच्याद्वारेच फेर पडताळणी करण्यात येणार असून काही किरकोळ किंवा निवडक बदलांसह राज्य शासनाच्या नगरविकास भागाकडून ६ ते ११ ऑगस्टदरम्यान महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगास संबंधित अंतिम प्रभाग रचना सादर केली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जमा करण्यात आलेल्या प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाकडून २२ ते २८ ऑगस्ट दरम्यान प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यासाठी पालिकेस सूचना केल्या जाऊ शकतात. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सुनावणी मागविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून ऑगस्ट महिना अखेर अंतिम प्रभाग रचनेवर हरकत यांनी सुनावणी घेण्याच्या आदेश आल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत संबंधित प्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबर मध्ये संपूर्ण प्रभाग रचना निवडणुकी साठी तयार होणार असल्याने ‘ऑक्टोबर’च्या दिवाळी धमक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे.

दिल्ली ७ खासदारांनी गाजवली; महिला खासदारांची संसदरत्न पुरस्कारात बाजी; विशेष ज्युरी पुरस्कारही प्राप्त

0

संसदेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण १७ खासदारांना संसदरत्न पुरस्कार २०२५ देण्यात आलाय. राज्यातील ७ खासदारांचा पुरस्कारात समावेश आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांचाही समावेश आहे. भाजप, काँग्रेस, शिंदे गट आदी पक्षांच्या खासदारांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांना विशेष ज्युरी पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.

संसदेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी १७ खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या पुरस्कार यादीत सुप्रिया सुळे, रवीकिशन, निशिकांत दुबे, अरविंद सावंत यांच्यासहित इतर खासदारांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील ७ खासदारांचा समावेश आहे.

संसदेतील चार खासदारांना विशेष ज्युरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. यात भाजपचे भर्तृहरि महताब, खासदार एन के प्रेमचंद्रन, सुप्रिया सुळे, श्रीरंग अप्पा बारणे यांच्या नावाचा समावेश आहे. या सर्वांनी १६ व्या लोकसभेपासून चांगली कामगिरी केली आहे.

कोणाकोणाला मिळाला संसदरत्न पुरस्कार?

भाजपच्या स्मिता वाघ, शिंदे गटाचे नरेश म्हस्के, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, भाजपच्या मेधा कुलकर्णी, प्रवीण पटेल, विद्युत बरन महतो, दिलीप सैकिया यांना पुरस्कार मिळाला आहे. तर खासदार एनके प्रेमचंद्रन यांना पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.

कोणत्या राज्यातून कोणाला पुरस्कार?

महाराष्ट्र – स्मिता वाघ, अरविंद सावंत, नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड, मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, श्रीरंग अप्पा बारणे

उत्तर प्रदेश – रवी किशन, प्रवीण पटेल

झारखंड – निशिकांत दुबे, विद्युत बरन महतो

राजस्थान – पी. पी. चौधरी, मदन राठोर

ओडिशा – भर्तृहरि महताब

तमिळनाडू – सी. एन. अन्नादुराई

आसाम – दिलीप सैकिया

यंदाचा संसदरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला?

सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड, स्मिता वाघ, नरेश म्हस्के, मेधा कुलकर्णी, अरविंद सावंत,श्रीरंग बारणे यांच्यासह एकूण १७ खासदारांना देण्यात आला.

यंदा विशेष ज्युरी पुरस्कार कोणाला मिळाला?

सुप्रिया सुळे, , एन.के. प्रेमचंद्रन, श्रीरंग बारणे आणि भर्तृहरि महताब यांना विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला.

राज्यातील कोणते खासदार पुरस्कारार्थी ठरले?

नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड, स्मिता वाघ, अरविंद सावंत, मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, आणि श्रीरंग अप्पा बारणे.

.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोटारीत बसत सरपंचावरच संताप; हिंजवडी IT पार्क आत्ता हैदराबाद, बंगळुरूला..

0

हिंजवडी गावठाणातून डांगे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणात मंदिरांवर कारवाई करू नये, अशी मागणी करणारे हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले. धरणे करताना मंदिरे जातात की नाही? जवळचे आयटी पार्क पुण्यातून हैदराबाद, बंगळुरूला चालले आहे. याचे तुम्हाला काही पडले नाही, असे त्यांनी सुनावले.

राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडीमधील वाढती वाहतूककोंडी, नागरी समस्यांची पाहणी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी (शनिवारी) पहाटे सहा वाजता केली. दोन आठवड्यांपूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे का, त्यानुसार विकासकामांना सुरुवात केली आहे का, याची पवार यांनी पाहणी केली. आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील या वेळी उपस्थित होते.

हिंजवडीतील समस्यांची पाहणी करून जाताना अजित पवार मोटारीत बसत होते. त्याच वेळी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर तिथे आले. हिंजवडी गावठाणातून डांगे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणात मंदिरांवर कारवाई करू नये, पर्याय भरपूर असल्याचे सांगण्याचा प्रयत्न सरपंच जांभूळकर करीत होते. त्यावर पवार यांनी, ‘धरणे करताना मंदिरे जातात की नाही, तुम्हाला काय सांगायचे ते सांगा, मी ऐकून घेतो. मला काय करायचे ते मी करतो. हिंजवडीचे आयटी पार्क पुणे, महाराष्ट्रातून हैदराबाद, बंगळुरूला चालले आहे. याचे तुम्हाला काही पडले नाही. मी कशाला पहाटे सहा वाजता येऊन पाहणी करीत आहे. मला कळत नाही का? माझेही लोक आहेत. परंतु, ते केल्याशिवाय गत्यंतर नाही’, असे पवार म्हणाले.

माझा आवाज थोडा मोठा आहे. मी काही बोललो, की बातमी केली जाते. अजित पवारांनी अमक्याला झापले. मी काही कोणाला झापायला आलो नाही. सर्वांबाबत आदर असून, सर्वजण सहकार्य करीत आहेत.

– अजित पवार, उपमुख्यमंत्री

हिंजवडीतील छत्रपती शिवाजी चौक ते डांगे चौक या रस्त्यालगत गणपती, पांडुरंगाचे मंदिर, शाळा, दशक्रिया विधी घाट आहे. हा रस्ता ३० ऐवजी १८ मीटर करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. पण, प्रशासन ऐकत नाही, हे अजित पवार यांना सांगत होतो. वाकड रोड ३० मीटरच राहू द्यावा. ३६ मीटर करू नये.

 -गणेश जांभूळकर,सरपंच, हिंजवडी

टीम इंडियाच्या इतिहासातील काळा दिवस, 42 वर्षांचा विक्रम मोडला, पराभवाचे संकट शून्यावर दोन विकेट! 

0

मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडने आपली पकड भक्कम केली आहे आणि भारतावर पराभवाचे मोठे संकट ओढवले आहे.टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 358 धावांच्या प्रत्युत्तरात, इंग्लंडचा पहिला डाव चौथ्या दिवशी 669 धावांवर संपला. अशाप्रकारे, यजमान संघाला 311 धावांची आघाडी मिळाली. त्याच वेळी, जेव्हा भारत दुसऱ्या डावात खेळण्यासाठी आला, तेव्हा त्याने पहिल्याच षटकात शून्यावर दोन विकेट गमावल्या. अशाप्रकारे, भारतीय संघाच्या कसोटी इतिहासात 42 वर्षांच्या इतिहासात हे पहिलेच वेळा आहे, जेव्हा त्याने 0 धावांवर पहिल्या दोन फलंदाजांचे बळी गमावले आहेत.

 

पहिल्याच षटकात दोन मोठे धक्के

 

ही मोठी आघाडी मिळाल्यानंतर इंग्लंडने भारतावर दडपण आणले. दुसऱ्या डावात फलंदाजीस उतरलेला भारत पहिल्याच षटकात कोलमडला. क्रिस वोक्सने चौथ्या चेंडूवर यशस्वी जैस्वालला स्लिपमध्ये जो रूटकडून झेलबाद केलं आणि जैस्वाल खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे भारताची पहिली विकेट शून्यावर गेली. त्याच वेळी, पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा साई सुदर्शन काही विशेष करू शकला नाही आणि तोही खाते न उघडता दुसऱ्या स्लिपमध्ये हॅरी ब्रूककडे झेल दिला. सुदर्शनने वोक्सचा चेंडू खेळायचा की सोडायचा हे ठरवण्यास विलंब केला आणि जेव्हा तो बाहेर सोडण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा चेंडू बॅटच्या कडेला लागला आणि दुसऱ्या स्लिपमध्ये गेला, जिथे ब्रूकने कोणतीही चूक केली नाही. अशाप्रकारे, सुदर्शन गोल्डन डकवर बाद झाला आणि भारताने त्यांचे दोन्ही पहिले विकेट 0 च्या धावसंख्येवर गमावले.

42 वर्षात पहिल्यांदाच लाजीरवाणी सुरुवात

भारताने आपल्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 42 वर्षांनी पुन्हा एकदा अशी सुरुवात केली आहे. याआधी डिसेंबर 1983 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नईत खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने 0 धावांवर पहिल्या दोन विकेट्स गमावल्या होत्या. त्या वेळी अंशुमान गायकवाड आणि दिलीप वेंगसरकर शून्यावर बाद झाले होते. त्या सामन्यात सुनील गावसकरने चौथ्या क्रमांकावर येऊन 236 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती, आणि त्यांच्या कारकिर्दीतील ती एकमेव खेळी होती जी त्यांनी चौथ्या क्रमांकावर येऊन केली होती.

भारतावर पराभवाचे संकट

 

भारताची दुसऱ्या डावाची सुरुवात अत्यंत लाजीरवाणी ठरली आहे. इंग्लंडकडून मिळालेली मोठी आघाडी, आणि त्यावर ही धक्कादायक सुरुवात त्यामुळे भारतीय संघावर पराभवाचे संकट आहे. केएल राहुल आणि शुभमन गिलकडून आता मोठ्या अपेक्षा आहेत. भारताचा स्कोअर 2 विकेटसाठी 42 धावा आहे. शुभमन गिल 31 चेंडूत 5 चौकारांसह 27 धावांवर आहे. केएल राहुल 46 चेंडूत 2 चौकारासह 14 धावांवर आहे. भारत अजूनही 269 धावांनी मागे आहे.

महाराष्ट्रावर मोठं जलप्रलयी संकट, उरले फक्त काही तास, 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी ; पश्चिम महाराष्ट्रात हाय अलर्ट

0

राज्यात पुन्हा एकदा पावसानं जोर पकडला आहे, पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाकडून (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ड जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान अतिमुसळधार पाऊस झाल्यास महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाकडून आज कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, तसेच पालघर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे आज ठाणे आणि मुंबईत देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, दरम्यान बदललेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही हाय अलर्ट

पश्चिम महाराष्ट्रातही आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर पुणे आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भात जोरदार पाऊस

सुरुवातीच्या पावसामुळे विदर्भात मोठं नुकसान झालं होतं, दरम्यान आता पुन्हा एकदा विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून, काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

काल देखील हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता, मात्र पावसाने हुलकावणी दिली असून केवळ रिमझिम ते मध्यम स्वरुपाचा पाऊस जिल्ह्यात बरसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 51 टक्के एवढा पाऊस पडला आहे, दरम्यान हवामान खात्याने आणखी दोन दिवस शहर आणि जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे, जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गोंदिया जिल्ह्याला आज सलग दुसऱ्या दिवशी हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातील बेवारटोला प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. धरणांच्या पाणीपातळीत देखील झपाट्यानं वाढ होत आहे.

उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ

कर्जत परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे . रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे उल्हास नदी ही दुथडी भरून वाहत आहे. मात्र बदलापूर परिसरात पावसाचा जोर कमी असल्याने अजूनही बदलापूर शहरात कुठेही पाणी साचल्याची घटना समोर आल्या नाहीत , पालिका प्रशासनाने उल्हास नदीच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जोरदार वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. कणकवलीकुडाळमालवणसहसावंतवाडी तालुक्यात पावसाचा जोर दिसून येत आहे. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 34 मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

रायगडमध्येही पाऊस

रायगड जिल्ह्याला आज पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे, तर दुसरीकडे महाबळेश्वर परिसरात काल रात्री जास्त पाऊस झाल्याने सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीअसून, पावसाचा जोर वाढल्यास सावित्री नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

डॉ. आनंद तांबेंच्या जन्मदिनी 122 बाटल्यांचे संकलन; लाडक्या बहिणी अभिष्टचिंतन सांस्कृतिक मेजवानीत मंत्रमुक्त

0

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब व डॉ. आनंद (बंडूशेठ) तांबे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने कर्वेनगरमध्ये सामाजिक जाणिवेचे भान ठेवून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 122 बाटल्यांचे रक्तसंकलन करण्यात आले तर शेकडो महिलांच्या उपस्थितीत देशी फळझाडांचे वृक्षारोपण पार पडल्यानंतर डॉ. आनंद तांबे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सुप्रसिद्ध गायक संजय मरळ प्रस्तुत संजय मरळ व डॉ. अनघा राजवाडे यांच्या मराठी हिंदी गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात कर्वेनगर परिसरातील लाडक्या बहिणी मंत्रमुग्ध झाल्या.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप कार्याध्यक्ष प्रदीपदादा देशमुख, अक्रूरशेठ कुदळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिव नितीन धुमाळे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, महिला शहराध्यक्ष सौ प्रियाताई गदादे, ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे अखिल भारतीय राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री डॉ. बाबा कांबळे, महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब बराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांस्कृतिक व कला विभागाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष अनिल धवने पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराचे वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय माणिक शेठ दुधाने, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत आप्पा बराटे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जगदीश राव दिघे, कर्वेनगर भूषण हिंदुराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद वालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष माननीय कुमार शेठ नानासाहेब बराटे, संभाजीराव बराटे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहराच्या कार्याध्यक्ष सौ संगीता ताई संजय बराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर संघटक माननीय संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोथरूड विधानसभा महिला अध्यक्ष तेजलताई दुधाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष सौ मीनाताई मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्ष सौ अपूर्वा स्वप्निल तांबे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोथरूड मतदारसंघ युवक अध्यक्ष मा. मोहित आबा बराटे, विठ्ठलराव बराटे, मयुरेश बराटे, किंग ऑफ किंग ग्रुप चे संस्थापक संकेत शितोळे , स्वप्निल तांबे, आदित्य बराटे , गणेश हगवणे, बंटी निलंगेकर, संतोष आंबेडे ,जय खत्री, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आनंद पाटील, मराठा महासंघाचे पदाधिकारी सुनील तोडकर ,संजय बराटे, आजिनाथ नगरे, बाजीराव मासाळ, नामदेवराव राजगुरू , भरत शेठ बुरटे पाटील पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोषजी शर्मा, पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे खजिनदार बापू भावे , सल्लागार चंद्रकांत गोडबोले, सरचिटणीस प्रदीप भालेराव, कृती समितीचे संघटक तुषार पवार , मोटर वाहन सल्लागार आरटीओ पुणे आप्पा काळभोर व वरिष्ठ मोटार वाहन सल्लागार आप्पा मोकाशी यांच्यासह कर्वेनगर परिसरातील नामांकित व्यक्ती व पुणे शहरातील रिक्षा चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी बाळकृष्ण नेहरकर यांच्या उपस्थितीत रिक्षा चालकांसाठीचा भव्य लकी ड्रॉ ते उद्घाटन करण्यात आले, या लकी ड्रॉ मध्ये स्मार्ट वॉच (सत्तार सवार), रिक्षा टायर (दिलीप दस,चंद्रकांत कदम), युनिफॉर्म (पोपटराव आढागळे, राजाभाऊ मारणे), ब्लूटूथ हेडफोन (गणेश गवळी) टी-शर्ट, रिक्षासाठी संपूर्ण हुड, हेडफोन, स्मार्ट वॉच, सहभागी 155 सभासदांना HSRP नंबर प्लेटचे ब्रॅकेट व मीटरचे कव्हर त्याचप्रमाणे रिक्षाचे संपूर्ण हुड वाटप करण्यात आले. प्रत्येक रक्तदात्यासाठी १ किलो चिकन किंवा अर्धा किलो मलई पनीर किंवा टी-शर्ट अशी सप्रेम भेट योजना ठेवण्यात आली होती. दर्श अमावस्या या पवित्र सणाच्या निमित्ताने पनीर वाटप व सुप्रसिद्ध गायक संजय मरळ व डॉ. अनघा राजवाडे यांच्या मराठी हिंदी गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात हा अभिनव उपक्रम राबवल्याने हिंगणे होम कॉलनी व कर्वेनगर परिसरातील ‘लाडक्या बहिणीं’तर्फे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी शुभेच्छा मिळाल्या.

गेल्या ४० वर्षांपासून वंचित, दुर्लक्षित, गोरगरिबांसाठी आणि रिक्षा चालकांच्या हक्कांसाठी अथक कार्य करणाऱ्या डॉ. आनंद तांबे यांनी पुणे शहरातील रिक्षा व्यवसायाला नवे स्थान मिळवून दिले. रिक्षा स्टँडची निर्मिती, प्रवासी रिक्षा चालक व प्रशासन यांच्यातील संबंध मजबूत करणे, तसेच दिव्यांग, अपंग, विधवा महिला, सामाजिक आणि  शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे. दिल्ली येथील भव्य समारंभात CEDARBROOK UNIVERCITY USA  या विद्यापीठाकडून HONORARY DOCTORATE  हा बहुमान डॉक्टर आनंद तांबे यांना प्रदान करून त्यांच्या चाळीस वर्षातील सामाजिक कार्याची व अथक परिश्रमाची दखल घेत हा सन्मान त्यांच्या योगदानाचा व समर्पणाचा खऱ्या अर्थाने गौरव करण्यात आला. डॉ. आनंद तांबे यांचा पुण्यातील रिक्षा चालक मालकांतर्फे ‘पुणेरी पगडी’, सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष माननीय श्री सुभाष भाऊ जगताप , कार्याध्यक्ष प्रदीप दादा देशमुख कार्याध्यक्ष अक्रूर शेठ कुदळे महिला शहराध्यक्ष सौ प्रियाताई गदादे माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबासाहेब धुमाळ बाळासाहेब बराटे, चंद्रकांत आप्पा बराटे ,संभाजी बराटे, बंडाशेठ बराटे व उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी कर्वेनगर मधील ग्रामस्थ कर्वेनगर परिवर्तन आघाडीचे सर्व संस्थापक सदस्य ,यशवंतराव मोहिते कॉलेजचे माजी विद्यार्थी फ्रेंड सर्कल, किंग ऑफ किंग ग्रुप चे सर्व सदस्य, महाराष्ट्राची रणरागिणी महिला संघटनेच्या सर्व पदाधिकारी, हिंगणे होम कॉलनी विकास मंचचे सर्व सदस्य तसेच कर्वेनगर हिंगणे होम कॉलनीतील सर्व गणेश मंडळाचे , दहीहंडी उत्सव समितीचे तसेच नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच मित्र हितचिंतक ज्येष्ठ नागरिक आप्तेष्ट नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा पवार साहेब,आनंद तांबे व शुभम तांबे अभिष्टचिंतन सोहळ्याचे संयोजक स्वप्निल तांबे व संकेत शितोळे यांनी केले होते.

संसदेत सर्वोत्तम कामगिरी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्कार; केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते सन्मान

0

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांना संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन येथे आयोजित सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण झाले. प्रसंगी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आदी उपस्थित होते.

प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी लोकसभा आणि राज्यसभेतील उल्लेखनीय कार्याबद्दल खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा १७ खासदारांना या पुरस्काराचा मान मिळाला. राज्यसभेची पहिलीच टर्म असलेल्या प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत सक्रिय सहभाग नोंदवत सर्वच आघाड्यांवर उल्लेखनीय व लोक-देशहिताचे मुद्दे मांडत प्रभावी कामगिरी केली. सर्वोत्तम कामगिरीसाठी डॉ. कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. यंदा राज्यसभेतील प्रभावी कामगिरीसाठी निवड झालेल्या खासदारांमध्ये प्रा. डॉ. कुलकर्णी यांचा समावेश झाल्याने महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः पुण्यासाठी ही गौरवाची बाब ठरली आहे.

प्रा. कुलकर्णी यांनी महिला आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय, वक्फ बोर्डाच्या संबंधित विषयांवर संसदेमध्ये सातत्याने मुद्देसूद भाष्य केले आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यांनी ग्रामीण भागातील महिलांमध्ये वाढत चाललेल्या कर्करोगाच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. तसेच नवीन शिक्षण धोरणासंबंधित काही सूचना केल्या होत्या.

पुरस्कार स्वीकारताना प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “हा सन्मान केवळ माझा नाही, तर जनतेच्या अपेक्षा संसदेत प्रभावीपणे मांडण्याच्या प्रयत्नांचा गौरव आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधीची खरी ओळख त्याच्या कृतिशीलतेत असते. पहिल्यांदाच खासदार झालेली असताना संसदरत्न पुरस्कार मिळणे ही जनतेच्या आशीर्वादाची पावती आहे. लोकहितासाठी यापुढे परखडपणे भूमिका मांडत राहील.”

कोथरूड वाहतूक कोंडी मुक्तीसाठी ही त्रिसूत्री वापरा!; आढावा बैठकीत नामदार चंद्रकांतदादा पाटीलांचे निर्देश

0

कोथरूड वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी परिसरातील मुख्य कर्वे रस्ता पौड रस्ता डीपी रोड कर्वेनगर डी मार्ट चौक(आंबेडकर) या ठिकाणी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करा, असे निर्देश आढावा बैठकीत ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. कोथरुड वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेणार असल्याचे ना. पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार आज ना. पाटील यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली.

यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, महापालिका पथ विभागाचे अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण विभागाचे संदीप खलाटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, नवनाथ जाधव, अजय मारणे, डॉ. संदीप बुटाला, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक्तेनुसार सीसीटीव्ही आणि एआय चलानची संख्या वाढवा, अशी सूचनाही त्यांनी आजच्या बैठकीत केली.

बैठकीच्या सुरुवातीला मागील बैठकीतील इतिवृत्तानुसार झालेल्या कारावाईचा आढवा ना. पाटील यांनी घेतला. त्यामध्ये ५० वॅार्डन नियुक्तीबाबत काय कारवाई केली? असा, सवाल ना. पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक शाखेकडून आश्वस्थ करण्यात आले. यासोबत वाहतूक कोंडी होणाऱ्या भागात काय उपाययोजना केल्या याचीही विचारणा ना. पाटील यांनी केली. त्यावर वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांची पाहाणी करून, आवश्यकतेनुसार वाहतूक पोलीसांची नियुक्ती केली असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

या बैठकीत सीसीटीव्हीचा मुद्दा ही चर्चेत आला. त्यावर ना. पाटील यांनी वाहतूक विभागाने कोथरुडमध्ये कुठे कुठे सीसीटीव्ही लावण्याची आवश्यकता आहे, याची पाहणी करावी, लोकसहभागातून सीसीटीव्ही कार्यान्वित करु असे आश्वस्थ केले. त्यासोबतच आवश्यकतेनुसार ‘एआय बेस चलन’ प्रणालीचाही अवलंब करावा, असेही सूचित केले. वाहतूक कोंडीमुक्त कोथरूडसाठी इनस्पेक्शन, ॲक्शन आणि एक्झिक्यूशन या त्रिसूत्रीवर काम करावे, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करु, अशी ग्वाही त्यांनी यावेळी वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांना दिली. दरम्यान, बाणेर-बालेवाडी भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी याच आठवड्यात बैठक घेणार असून, विभागाने मागील बैठकीच्या इतिवृत्तावर कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.

यु-१५ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्वास विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे यश; जळगाव राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

0

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास विद्यानिकेतनच्या मुलांनी सांगली येथे झालेल्या यु-१५ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये यश संपादन केले. या स्पर्धेत जय दशरथ गायकवाड, संस्कार सचिन भरणे, वरूण प्रदीप मुळीक, रविराज आबासाहेब जाधव, स्वस्तिक विलीन महांगडे यांनी सुवर्णपदक, तर शैलेश भीमराव पडघणे, श्रीहर्ष सचिन नलवडे, समर्थ संताजी पाटील, आदित्य विजय चव्हाण, तन्मय देवदास शिंदे, आर्यन सचिन वाघमारे यांनी रौप्य आणि स्वराज किरण इथापे, रुद्र स्वप्नील मारणे यांनी कास्य पदक पटकावले.

यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, रोहित नाईक, विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. आर. वरेकर, वस्तीगृह अधीक्षक जोतिर्लिंग पाटील यांनी केले. या खेळाडूंची जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक उदय पाटील, प्रथमेश मोरे, सुमित खांडेकर, राजेश पाटील, सूरज माने, ऋषिकेश पाटील, यांचे मार्गदर्शन मिळाले.

Symbiosis Centre for Distance Learning (SCDL) Celebrates Silver Jubilee – Seminar by Dr. Arjun Vaidya in Bengaluru

0

“Out-of-classroom experiences enrich individuals” – Guidance from Dr. Arjun Vaidya 

Bengaluru, June 28, 2025 – As part of the silver jubilee celebrations of Symbiosis Centre for Distance Learning (SCDL), a special career growth seminar by Dr. Arjun Vaidya was organized in Bengaluru. Conducted under the guidance of Dr. Swati Mujumdar, Dr. Arjun Vaidya addressed the audience on the topic “Reinventing Yourself for India’s Ever-Changing Job Market.”

Speaking on the occasion, he emphasized, “In the age of social media, it is important to have a digital presence and to keep it updated with relevant information. This creates a digital identity. By staying active on social media, one can open many doors to opportunities. Passion is essential in any work you do—it is this passion that makes the journey smoother. Instead of complaining, one should turn challenges into golden opportunities and build new ventures. Consistency in skills, competence, creativity, persistence, and self-belief can help achieve your goals.”

The event received an overwhelming response in Bengaluru. It saw participation from SCDL alumni, working professionals, graduates, and employees from various sectors who were interested in redefining their careers. Nikhil Vaidya, Ashish Pandita, and Jay Kolhe were also present.

Symbiosis Centre for Distance Learning (SCDL) is one of the largest private distance education institutions in India. Established in 2001, SCDL is a pioneer in providing flexible, high-quality education to thousands of students in India and abroad. As it celebrates its Silver Jubilee (25 years of excellence in online education), the journey has been one of empowering learners and shaping careers through innovative distance education programs. Located in the heart of Pune, SCDL offers cutting-edge infrastructure, dedicated faculty, and advanced digital learning. It has built a strong reputation for offering industry-relevant postgraduate diploma programs across various domains. In addition to its individual learning programs, SCDL also collaborates with leading local, national, and international organizations to offer specialized corporate programs—this seminar being a part of that initiative.

Speaking about opportunities in rural areas, Dr. Vaidya said, “There are tremendous business opportunities in rural India. Even while working globally, one can start a venture by identifying key issues and make progress. By continuously meeting people, your network grows—and this is how you discover the hidden secrets of the market. Out-of-classroom experiences enrich a person. While working in large companies, employees often don’t have the visionary perspective of the company’s owner. So, instead of seeing yourself as just an employee, see the company as your own venture and make decisions accordingly. If you want to start a business, act now. Don’t waste time. In any product or service, the customer is the end user—only through customer feedback can you identify business shortcomings.”

On artificial intelligence (AI), he said, “If you fear AI, you won’t be able to use it. AI can help create strategies, but it cannot implement them—that still requires human involvement. Keep yourself updated with new things. There’s a wealth of learning available. Work in India—there are countless opportunities here. When no one else believes in you, believe in yourself and keep moving forward.”

Speaking about building great teams, he shared, “There’s no fixed formula for building a great team. It’s a continuous and evolving process. To thrive within a team, you must align with its cultural foundation.”

Dr. Vaidya also shared his personal journey—how he overcame illness and started a traditional business. He highlighted the struggles of insufficient income despite spending crores on education, the difficulties faced when launching a start-up after getting accustomed to a job, and shared insights from his experience running an e-commerce business.

After the seminar, an HR Round Table Conference was held, followed by a Dale Carnegie training workshop and an awards ceremony. The event, conducted as part of SCDL’s 25th anniversary, offered a unique free opportunity for young professionals and students across the country.