Home Blog Page 33

भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे कार्यालय १३ वर्ष ‘वीजचोरी’ महावितरणकडूनच कलम १३५ चा भंग; ॲड. असीम सरोदेंची नोटिस

0

पुणे: पुणे महापालिकेच्या सानेगुरुजी नगर येथील मालकीच्या मालमत्तेवर २०११ पासून माजी नगरसेवक व भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे खासगी पक्ष कार्यालय. या कार्यालयात २०१२ पासून बेकायदेशीर थेट कनेक्शनद्वारे ‘वीजवापर’ स्थळ पाहणी अहवालातून स्पष्ट झाले ले असतानाही महावितरण कडूनच सत्ताधारी पक्षाच्या शहराध्यक्षांना पाठीशी घालण्यासाठी महावितरण कलम 2003 नुसार च्या 135 चा भंग करत पाठ राखण करण्याची भूमिका अडचणीत आली आहे. पुण्यातील नामांकित वकील ॲड. असीम सरोदे यांच्या वतीने पुणे पोलीस महावितरण व पुणे महापालिका यांना या संदर्भात कायदेशीर नोटीस बजावली असल्याने या प्रकरणात मोठमोठे खुलासे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते सागर धाडवे यांच्या वतीने संबंधित प्रकाराला वाचा फोडण्यासाठी माहिती अधिकार अधिनियम व दैनंदिन पाठपुरावा या सर्व गोष्टींमुळे सदर प्रकार उघडकीस आला असला तरी सुद्धा महावितरणच्या वतीने ‘पाठराखण’ हीच भूमिका घेतली जात असल्याने ॲड. असीम सरोदे यांच्या मार्फत सत्ताधारी पदाचा गैरवापर करत असल्याने महावितरण, पुणे मनपा अधिकारी, व पोलिस आयुक्त यांस कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष व माजी नगरसेवक धीरज घाटे, माजी नगरसेविका मनीषा घाटे, व मनपा , वीज वितरण आणि मालमत्ता विभागातील संबंधित अधिकारी यांनी संगनमताने शासकीय मालमत्तेचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे. महावितरणने फक्त २०२४-२५ साठीच रु. ९५,३३०/- चा दंड आकारला. मात्र १३ वर्षांच्या वीज वापराचे मूल्यांकन केले गेले नाही, २०१२पासून वीज चोरी करून सार्वजनिक पैशाचा अपव्यय करण्यात आला. तसेच विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत कलम १३५ नुसार गुन्हा दाखल न करता निष्क्रीय राहणे, हे कायद्याचे उल्लंघन ठरते. माहिती अधिकार कायद्या अंतर्गत मिळालेल्या माहिती, गूगल इमेजेस, स्थळ पाहणी अहवाल, वीज बिलाच्या पावत्या, व नकाशा अशा विविध दस्तऐवजांच्या आधारे सदर वीजचोरी सिद्ध झाली आहे. संबंधित कार्यालय, व्यायामशाळेतील एयर कंडीशनर, ट्रेड मिल व विविध उपकरणांमुळे लोड १० किलोवॅटहून अधिक असूनही अहवालात कमी लोड दाखवून कारवाई टाळण्यात आली आहे. धीरज घाटे व मनीषा घाटे यांच्याविरोधात विद्युत कायदा १३५ नुसार गुन्हा नोंदवण्याची व २०१२ पासूनचा वीज वापराचा दंड वसूल करण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार विरोधी कायद्यानुसारही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

सामान्य माणसाने ५०० रुपये  वेळेवर नाही भरले तर वीज तोडणारे महावितरणचे अधिकारी १२ वर्षे शांत?, भ्रष्टाचाराचा काही वाटा त्यांनाही जातो? नुकत्याच नाना पेठ येथील वीजचोरी प्रकरणी शिवम आंदेकर याच्यावर कलम १३५ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मग तोच नियम भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना का लागू नाही ? वीजचोरी करणाऱ्या स्थानिक भाजप नगरसेवकांवर तत्परतेने गुन्हा दाखल करण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते सागर धाडवे यांनी केली आहे.

मुख्य अभियंता काकडे यांनी या वीजचोरी विषयात कडक कारवाई करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांना दिल्याचे धाडवे यांनी सांगितले. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी पोलिसांत तक्रार केली आहे. दरम्यान, या भ्रष्टाचाराची माहिती सागर धाडवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी यांना मेलद्वारे कळवली आहे.

विद्युत अधिनियम २००३ चे कलम १३५ म्हणजे काय?

कलम १३५ हे विद्युत अधिनियम, २००३ मधील सर्वात महत्त्वाचे आणि कठोर कलम असून, वीजचोरी किंवा बेकायदेशीर वीज वापरास प्रतिबंध करणारे आहे. या कलमानुसार, कोणतीही व्यक्ती पुढीलप्रमाणे वीजचोरी करत असेल, तर ती गंभीर फौजदारी गुन्ह्याची पात्र ठरते:

वीज मीटरशिवाय किंवा अधिकृत कनेक्शनशिवाय वीज वापरणे

वीज मोजमापात फेरफार करणे किंवा मीटरमध्ये छेडछाड करणे

वीज वितरणाच्या यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करणे

चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे वीज मिळवणे

चोरी केलेल्या वीजेसाठी भाडेवाढ न करता वापर चालू ठेवणे

कलम १३५ नुसार शिक्षा: या कलमाचे उल्लंघन केल्यास:

पहिल्या दोषाबद्दल – ३ वर्ष तुरुंगवास किंवा रु. १०,०००/- पेक्षा अधिक दंड, किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते

 ⁠२४ तासाच्या आत संबंधित वीजचोरणाऱ्या विरोधात एफ आय आर करून गुन्हा नोंद करणे बंधनकारक आहे .

पुनरावृत्ती झाल्यास – जास्तीत जास्त ५ वर्षांची शिक्षा आणि रु. १ लाखांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.

याशिवाय, दोष सिद्ध झाल्यास संबंधित मालमत्ता ताब्यात घेणे, विद्युत पुरवठा खंडित करणे, वीज वापराची थकबाकी व दंड वसूल करणे हे देखील कायदेशीर उपाय आहेत.

सानेगुरुजीनगर भाजपा पुणे शहराध्यक्ष यांचे खासगी पक्ष कार्यालय प्रकरणात कलम १३५ चा भंग कसा?

धीरज घाटे यांच्या पक्ष कार्यालयात २०१२ पासून वीजमीटर शिवाय थेट वीजवापर आला हे महावितरणच्या स्थळ पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामुळे हे प्रकरण थेट कलम १३५ च्या उल्लंघनात मोडते.

महावितरणने देखील २०२४-२५ या कालावधीसाठीच दंड आकारलेला असून, उर्वरित १२ वर्षांच्या वीजचोरीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे या नोटीसमधून निदर्शनास येते.

या प्रकरणात केवळ धीरज घाटेच नव्हे तर संबंधित महावितरण अधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांविरोधातही कलम १३५ अंतर्गत फौजदारी कारवाई आवश्यक आहे.

महावितरण कलम 2003 नुसार च्या 135 या कलमाची अंमलबजावणी न करणे हे केवळ कायद्याचे उल्लंघनच नव्हे, तर शासनाच्या व जनतेच्या विश्वासाचा भंग देखील ठरतो.?

कलम १३५ हे विद्युत अधिनियम, २००३ मधील सर्वात महत्त्वाचे आणि कठोर कलम असून, वीजचोरी किंवा बेकायदेशीर वीज वापरास प्रतिबंध करणारे आहे. या कलमानुसार, कोणतीही व्यक्ती पुढीलप्रमाणे वीजचोरी करत असेल, तर ती गंभीर फौजदारी गुन्ह्याची पात्र ठरते:

  • वीज मीटरशिवाय किंवा अधिकृत कनेक्शनशिवाय वीज वापरणे
  • वीज मोजमापात फेरफार करणे किंवा मीटरमध्ये छेडछाड करणे
  • वीज वितरणाच्या यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करणे
  • चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे वीज मिळवणे
  • चोरी केलेल्या वीजेसाठी भाडेवाढ न करता वापर चालू ठेवणे

कलम १३५ नुसार शिक्षा: या कलमाचे उल्लंघन केल्यास:

  1. पहिल्या दोषाबद्दल – ३ वर्ष तुरुंगवास किंवा रु. १०,०००/- पेक्षा अधिक दंड, किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते
  2.  ⁠२४ तासाच्या आत संबंधित वीजचोरणाऱ्या विरोधात एफ आय आर करून गुन्हा नोंद करणे बंधनकारक आहे .
  3. पुनरावृत्ती झाल्यास – जास्तीत जास्त ५ वर्षांची शिक्षा आणि रु. १ लाखांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.
  4. याशिवाय, दोष सिद्ध झाल्यास संबंधित मालमत्ता ताब्यात घेणे, विद्युत पुरवठा खंडित करणे, वीज वापराची थकबाकी व दंड वसूल करणे हे देखील कायदेशीर उपाय आहेत.

‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

0

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह शहरातील विविध शाळेत जागतिक योगादिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवक आदींनी सहभागी कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करुन यशस्वीपणे करण्याकरीता पुढाकार घ्यावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रशासनास दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जागतिक योग दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रमाचे सकाळी ७.३० वाजता आयोजन करण्यात येणार आहे. योग कार्यक्रमास विविध मान्यवरांसह वारकरी सहभागी होऊन योग करणार आहेत. विद्यापीठ प्रशासनाने पूर्व तयारी करावी.

शहरातील विविध शाळांमध्येदेखील वारकरी भक्तीयोगाचे आयोजन करण्यात येणार आहे, यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनासहित स्वयंसेवकांना बसण्याच्या जागेसह, ओळखपत्र, एकसारखे टीशर्ट, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी उपलब्ध करुन द्यावेत. शाळेत योगाकरीता लागणाऱ्या लागणाऱ्या सर्व सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करुन द्याव्यात.

वारकरी भक्तीयोग कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, याकरीता क्युआर कोड, फेसबुक लाईव्ह, अधिकाधिक वारकऱ्यांचा सहभागी होतील याकरीता अधिकाधिक जनजागृती करावी. यामध्ये शहरातील विविध भागात विशेषत: दिंडीचा मुक्कामाचे ठिकाण, मार्गावार महानगरपालिकेने जाहिरात फलके लावावीत. एकंदरीत वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

कार्यक्रमाचे संयोजक व संकल्पक राजेश पांडे यांनी ‘वारकरी भक्तीयोग’ नियोजनाबाबत माहिती दिली.

शाळेतच मिळणार एसटी बस पास – विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय

0

नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदापासून एसटी बस पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एसटी डेपोमध्ये जायची गरज नाही, तर थेट शाळेतच त्यांना पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना १६ जून २०२५ पासून राज्यभर लागू झाली आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, “विद्यार्थ्यांना एसटी प्रवासात ६६.६६% इतकी सवलत दिली जाते. म्हणजेच ते फक्त ३३.३३% रक्कम भरून मासिक पास घेऊ शकतात. ही योजना यापूर्वीही अस्तित्वात होती, पण पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना रांगेत उभे राहावे लागत होते. यामुळे त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जात होता.”

इयत्ता १२ वीपर्यंत शिकणाऱ्या मुलींना मोफत एसटी पास देण्यात येतो. याही योजनेचा लाभ यापुढे शाळेतच मिळणार आहे.

विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा आणि पास सहज मिळावा म्हणून MSRTC (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) ने विशेष मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत एसटी कर्मचाऱ्यांची टीम शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पास देणार आहे.

शाळांनी विद्यार्थ्यांची यादी आधीच एसटी प्रशासनाला द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार आहे.

राज्य शिक्षण विभागानेही या उपक्रमाचे स्वागत केले असून, यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल आणि वेळेवर शाळेत पोहोचता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उपयुक्त मुद्दे:

  • पाससाठी डेपोला जाण्याची गरज नाही
  • थेट शाळेतच एसटी पास मिळणार
  • १६ जून २०२५ पासून अंमलबजावणी
  • ६६.६६% सवलत, मुलींना मोफत पास
  • MSRTC कडून विशेष मोहीम
  • वेळ वाचणार, गैरसोय टळणार

विद्यार्थ्यांसाठी ही योजना केवळ प्रवासात सवलत नाही, तर शिक्षणात सातत्य टिकवण्यासही मदत करणार आहे. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी याचे स्वागत केले असून, प्रशासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुणे पोलिसांची अवजड वाहनांवर कारवाई – ४८ तासांत २८ गुन्हे दाखल

0

मार्केटयार्ड परिसरातील गंगाधाम चौक येथे झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर पुणे शहर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या ४८ तासांत जड वाहनांच्या चालक व मालकांवर २८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व गुन्हे निषिद्ध वेळेत “नो-एंट्री” क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे दाखल झाले.

११ जून रोजी गंगाधाम चौकात एक ट्रक स्कूटरला धडकला, त्यात दिपाली युवराज सोनी या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे सासरे जगदीश सोनी (६१) जखमी झाले. या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज शहरभर व्हायरल झाले आणि नागरिकांनी सोशल मीडियावर पुणे पोलिसांवर टीका केली.

पोलिसांनी यापूर्वीच पुणे शहरातील मध्यवर्ती भाग, म्हणजे शिवाजीनगर, डेक्कन, टिळक रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, पेठ क्षेत्र, परनाकुटी, ब्रेमेन चौक, कोरेगाव पार्क आदी ठिकाणी जड वाहनांवर बंदी लागू केली आहे. मात्र तरीही गंगाधाम, सातारा रोड, वारजे मलवाडी, पौड फाटा आदी ठिकाणी ट्रक सर्रास फिरताना दिसून येत आहेत.

स्वारगेट, वारजे, खडकी, विमानतळ, येरवडा, बाणेर, वानवडी, लोणी काळभोर, मार्केटयार्ड या १० पेक्षा अधिक पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदवले गेले आहेत.

भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१ (जीविताला धोका पोहचवणारे यंत्र किंवा वाहन चालवणे) आणि कलम २२३ (निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील म्हणाले, “गंगाधाम चौकालाही आता रेड झोनमध्ये समाविष्ट करण्यात येईल. बंदी असूनही वाहनचालक कायद्याचे उल्लंघन करत आहेत, म्हणून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.”

वाहतूक उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले, “आम्ही फक्त चालकांवरच नव्हे तर मालकांवरही गुन्हे दाखल करतो. दंडाऐवजी एफआयआर दाखल केल्याने कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल. हे प्रकरण वाहतूक सुरक्षेसाठी आणि भविष्यातील धोरणांसाठी महत्त्वाचे ठरेल.”

अपघातानंतर पुणे पोलिसांचे मोठे पाऊल

  • २८ अवजड वाहनचालकांवर गुन्हे दाखल
  • ट्रक, टँकर, कंटेनर यांना शहराच्या मध्यवर्ती भागात प्रवेशबंदी
  • सीसीटीव्ही फुटेजने जनमत चळवळ केली
  • अवजड वाहनांच्या निष्काळजीपणावर कठोर कारवाईचा इशारा

पोलिसांनी असा इशारा दिला आहे की ही मोहिम पुढेही चालूच राहणार आहे आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर शून्य सहनशीलता बाळगली जाईल.

मांजरी खुर्द परिसरात गुन्हेगारी वाढ आणि सुविधांचा अभाव; नागरिक त्रस्त, पोलिस गप्प

0

मांजरी खुर्द परिसरातील नागरिक सध्या वाढत्या असुरक्षिततेमुळे चिंतेत आहेत. रात्री उशिरा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, अश्लील वर्तन, धिंगाणा घालणारे युवक, वेगाने वाहने चालवून व्हिडिओ शूट करणारे गट, आणि निष्क्रिय पोलिस यंत्रणा यामुळे नागरिक अक्षरश: वैतागले आहेत.

स्थानिक रहिवासी, म्हणाल्या, “रोज रात्री दारू पिणारे टोळके, असभ्य वर्तन करणाऱ्या टोळ्या, मोठ्या आवाजात सायलेंसर फोडणारे तरुण, भरधाव बाईकवर व्हिडिओ शूट करणारे लोक दिसतात. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीवर दगडफेकही झाली. महिलांसाठी व लहान मुलांसाठी हा परिसर अत्यंत असुरक्षित झालाय. आम्हाला नियमित पोलीस गस्त आणि पुरेशा सुविधा – जसे की रस्त्यांवर लाईट्स आणि योग्य रस्ते – यांची तातडीने गरज आहे.”

“आम्हाला घर घेताना नद्याजवळ सुंदर रस्ता असेल असे सांगितले गेले होते, पण आत्ता तो रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे आणि एकही स्ट्रीट लाइट चालू नाही. आम्ही वारंवार तक्रारी केल्या तरी पोलिसांचा कोणताही वावर जाणवत नाही,” असेही नागरिकाने स्पष्ट केले.

स्वप्निल दांडे, VTP Cygnus सोसायटीतील रहिवासी, रात्री उशिरा कामावरून घरी येत असताना, त्यांच्यावर अज्ञात इसमाने दगडफेक केली. “हेल्मेट घातल्यामुळे मी वाचलो, नाहीतर डोळा किंवा डोक्याला गंभीर इजा झाली असती. त्या भागात लाईट नसल्याने मी दगडफेक कोण करत आहे ते ओळखू शकलो नाही.”

घटनेनंतर ते वाघोली पोलीस ठाण्यात गेले असता, पोलीसांनी केवळ “हा प्रकार जीवघेणा नाही, आणि आरोपी ओळखता आला नाही” म्हणून तक्रार घ्यायला नकार दिला.

दांडे म्हणाले, “ही घटना ५ दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर मी पोलिसांकडे गेलो, त्यांनी तक्रार घेण्याचे टाळले. त्यांनी म्हटले की असे लोक नेहमी येथे येतात आणि जातात. काही होणार नाही. मग आम्ही सुरक्षिततेची अपेक्षा कुणाकडून करायची?” “रात्री उशिरा बेकायदेशीर पार्ट्या, अश्लील कृत्ये, उशिरा सुरू असलेले बांधकाम यामुळे ध्वनीप्रदूषण, असुरक्षितता आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो,” असे दांडे म्हणाले.

नागरिकांची मागणी:

  • नियमित पोलीस गस्त
  • बंद पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती
  • अपुरे रस्ते, फुटपाथ्स यांचे नुतनीकरण
  • पोलिसांकडून तक्रारींवर तत्काळ कारवाई

आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचे तिघे जेरबंद; IT प्रोफेशनलची 1.55 कोटींची फसवणूक

0

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून एक IT प्रोफेशनलची तब्बल ₹1.55 कोटींची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीतील तिघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली आहे.

अटकेतील आरोपींची नावे शुभम चंद्रकांत म्हनता (२५), स्वप्नील चंदूलाल बहेटी (३५) – पत्रकार असल्याचा दावा, प्रशिक उत्तम नवघरे (२६) – वकील असल्याचा दावा अशी असून हे तिघेही सोलापूरचे रहिवासी आहेत.

मार्च २०२५ मध्ये एक शेअर मार्केट फसवणूक प्रकरण नोंदवले गेले होते, ज्यामध्ये एका IT क्षेत्रातील व्यावसायिकाला उच्च परताव्याचे आमिष दाखवून ₹1.55 कोटींची फसवणूक करण्यात आली.

पोलिस तपासात उघड झाले की, बहेटी आणि म्हनता हे चीनमधील सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात होते. शुभम म्हनता एका चायनीज कंपनीसाठी काम करत होता आणि OTP फॉरवर्ड करून सायबर फसवणुकीत मदत करत होता. नेपाळमार्गे पलायन करण्याचा प्रयत्न करताना प्रशिक व म्हनता यांना पुणे विमानतळावर अटक करण्यात आली.

फसवणुकीची रक्कम सोलापूरच्या अमित अशोक एकबोटे यांच्या खात्यावर जमा झाली होती. एकबोटेने पोलिसांना सांगितले की, गेमिंगसाठी या आरोपींनी त्याच्याकडून बँक तपशील घेतले होते.

प्रविण स्वामी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर सेल यांनी सांगितले की “आरोपींनी पत्रकार आणि वकील असल्याचा दावा केला आहे. त्याची सखोल तपासणी सुरू आहे. गेल्या पाच दिवसांत पिंपरी-चिंचवड सायबर सेलने सिलवासा, दादरा नगर हवेली, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर व पुणे येथे छापे टाकून ३ प्रकरणांमध्ये एकूण ११ आरोपींना अटक केली आहे, ज्यात एकूण ₹२.११ कोटींची फसवणूक झाली होती.

सातारा रस्त्यावर चव्हाणनगरजवळ कोयत्याने हल्ला; एकाची प्रकृती चिंताजनक

0

सातारा रस्त्यावरील चव्हाणनगर भागात सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला, यामध्ये एकाचा गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती सहकारनगर पोलिसांनी दिली.

पीडित दोघेही (वय १६ आणि १७) अण्णा भाऊ साठे चौकातील एका स्टेशनरी दुकानात काम करतात. कामावरून घरी जात असताना अज्ञात आरोपींनी त्यांना अडवले. त्यांच्यात शाब्दिक वाद झाल्यानंतर कोयत्याने दोघांवर हल्ला करण्यात आला.

हल्ल्यानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सहकारनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले, “आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लवकरच आरोपींचा शोध घेऊन अटक केली जाईल.”

१५० घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक; कोथरूड पोलिसांची मोठी कामगिरी

0

शहरात १५० पेक्षा अधिक घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका गुन्हेगाराला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेमुळे शहरातील अनेक प्रलंबित गुन्ह्यांची उकल झाली आहे. अटक आरोपीचे नाव अर्जुनसिंग राजपूतसिंग दुधानी (वय ४७), रा. मांजरीगाव, हडपसर असून त्याने ३ जून ते ४ जून दरम्यान कोथरूडमधील बंद फ्लॅटमध्ये घुसून २१ तोळे सोन्याचे दागिने व सीसीटीव्ही DVR चोरी केली होती.

कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त (झोन ५) यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके तयार केली गेली. १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज पाच दिवस तपासले. माहितीच्या आधारे पोलिसांनी मांजरीगाव भागात सापळा रचून आरोपीला अटक केली.

जप्त मालमत्ता:

  • ४० ग्रॅम सोन्याचे नेकलेस
  • २० ग्रॅम सोन्याची साखळी
  • गुन्ह्यात वापरलेली दुचाकी

एकूण किमतीची मालमत्ता – ₹३.४० लाख

अर्जुनसिंगने पुणे शहर व परिसरात १५० पेक्षा अधिक घरफोड्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली आहे. कोथरूड पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही अटक पुणे पोलिसांसाठी मोठे यश मानले जात आहे, कारण यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घरफोड्यांच्या साखळीला मोठा धक्का बसला आहे.

पुणे मेट्रोच्या प्रवाशांमध्ये मोठी वाढ; PMPML दरवाढीनंतर मेट्रोला पसंती

0

पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने १ जूनपासून बस तिकीट दरात वाढ केल्यानंतर हजारो प्रवाशांनी PMPML बसऐवजी पुणे मेट्रोकडे वळले आहेत. स्वस्त भाडे, जलद आणि आरामदायक प्रवास यामुळे प्रवाशांनी मेट्रोला अधिक पसंती दिली असून, त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

१६ दिवसांत ११% ने वाढली मेट्रोची प्रवासी संख्या
अधिकृत आकडेवारीनुसार, जूनच्या पहिल्या १६ दिवसांत मेट्रोचे प्रवासी संख्येत ११ टक्के वाढ झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या १६ दिवसांच्या तुलनेत, दररोज सरासरी १६,००० प्रवाशांनी मेट्रोचा वापर वाढवला, ज्यामुळे एकूण १.१३ लाख अतिरिक्त प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहेत.

बसपेक्षा मेट्रो स्वस्त आणि आरामदायक
विशेषतः ज्या मार्गांवर PMPML बस आणि मेट्रो दरांमध्ये मोठा फरक आहे, तिथे मेट्रोकडे झुकण्याचे प्रमाण अधिक आहे.

  • पिंपरी ते रामवाडी PMPML बसभाडे ₹५०, तर मेट्रो भाडे ₹३५
  • पिंपरी ते स्वारगेट मेट्रो ₹१० ने स्वस्त

हिंजवडीच्या वैशाली मोरे म्हणाल्या, “पूर्वी मी दररोज PMPML बसने प्रवास करत होते. पण दरवाढीमुळे आता ते परवडत नाही. मेट्रोमध्ये भाडे कमी आहे, प्रवास जलद आहे आणि गर्दीही नाही. ट्रॅफिकचा त्रास न घेता वेळेवर ऑफिसला पोहोचते.”

वाढत्या मेट्रो प्रवासामागची कारणे:

  • वातानुकूलित डबे
  • वेळेचे काटेकोर पालन
  • सुलभ, धक्कामुक्कीरहित प्रवास
  • बसपेक्षा स्वस्त दर

PMPML चा यावर खुलासा
PMPML ने मात्र फक्त दरवाढीमुळे प्रवाशांनी मेट्रोकडे वळ घेतल्याचा दावा फेटाळला आहे. PMPML चे ट्रॅफिक प्लानर एन. गराडे म्हणाले, “फक्त दरवाढीमुळे प्रवासी कमी झाले, असे ठामपणे सांगता येणार नाही.” प्रशासन व जनसंपर्क संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, “मेट्रोचा वापर वाढत आहे, पण त्यासाठी फक्त आमची दरवाढ जबाबदार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. पावसाळा आणि कॉलेज पुन्हा सुरू होणे यामुळेही प्रवासाची गरज वाढली आहे.”

PMPML ने दरवाढीचे कारण सांगितले:

  • वाढते ऑपरेशनल खर्च
  • जुन्या पास योजना बंद
  • नवीन आठवड्याचे पास – ₹७० आणि ₹१५०
  • मासिक पासचे दर वाढले

MHT-CET परीक्षेत 3 पुणेकर मुलींनी मारली बाजी

0

फार्मसी व कृषी शाखेसाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र तांत्रिक सामाईक प्रवेश परीक्षा (MHT-CET) च्या निकालात राज्यभरातील १४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. या यादीत पुण्यातील तिघा मुलींनी टॉप रँक मिळवत राज्याचा गौरव वाढवला आहे.

श्रेया यादव, सिद्धी मंजाबापू बधे आणि स्नेहल निवृत्ती दिवटे या तीन पुणेकर विद्यार्थिनींचा समावेश १०० टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये झाला आहे. MHT-CET चा PCB (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) गटातील हा निकाल मंगळवारी जाहीर झाला.

निकालानंतर आता विद्यार्थ्यांसाठी पुढचे पाऊल म्हणजे प्रवेशासाठी समुपदेशन प्रक्रिया, जी जून अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेत तीन फेऱ्या असणार असून त्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या गुण, निवड, व श्रेणीनुसार जागा मिळणार आहेत.

काही CET टॉपर विद्यार्थ्यांनी NEET परीक्षेतही उल्लेखनीय कामगिरी केली असून वैद्यकीय शिक्षणाचा पर्याय निवडण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबईतील अंशिका शहा ही विद्यार्थिनी CET मध्ये १०० टक्के मिळवूनही मेडिकल क्षेत्रात करिअर करू इच्छित आहे, कारण तिची मावशी व काका वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

या वर्षीची परीक्षा आणि आकडेवारी

  • परीक्षा कालावधी: २२ ते ३० एप्रिल
  • नोंदणीकृत विद्यार्थी: ३,०१,०७२
  • परीक्षा दिलेली संख्या: २,८२,७३४

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ९० ते १०० टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १,३९० ने घटली आहे. १०० टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही गेल्या वर्षीच्या १७ वरून यंदा १४ वर आली आहे. ८० ते ८९.९९ पर्सेंटाइल मिळवणाऱ्यांची संख्या देखील १,४५१ ने कमी झाली आहे.