Home Blog Page 31

मुंबई-पुणे महामार्गावर ६ लाख २४ हजार ३४ टक्के चुकीचे चलन; १२४ कोटी २४ लाख रुपयांचे १२ लाख चलनापैकी केवळ १२ टक्के दंड वसूल

0

राज्य परिवहन विभागाच्या इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सीस्टिम (आयटीएमएस) अंतर्गत मुंबई-पुणे महामार्गावर जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १८ लाख २५ हजार ई-चलन जारी करण्यात आले. त्यापैकी सहा लाख २४ हजार चलान चुकीचे असल्याचे वाहतूकदार के. व्ही. शेट्टी यांना माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या तपशीलात उघडकीस आले आहे. त्यामुळे ‘आयटीएमएस’च्या कार्यक्षमतेवर वाहनचालक आणि वाहतूकदार शंका उपस्थित करत आहेत.

मुंबई-पुणे महामार्गावर जुलै २०२४ पासून ‘आयटीएमएस’चा वापर सुरू झाला. राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) द्वारे आरटीओ आणि महामार्ग पोलिसांच्या सहकार्याने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून हा प्रकल्प राबविला जात आहे. १०० कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या या प्रकल्पासाठी परिवहन विभागाने ४५ कोटी दिले आहेत. ‘एमएसआरटीसी’ने ‘आयटीएमएस’चा भाग म्हणून ४० गॅन्ट्री आणि शेकडो सीसीटीव्ही या महामार्गावर कॅमेरे बसवले आहेत.

१७ प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास चलन

‘आयटीएमएस’मुळे महामार्गावरील अपघात रोखण्यास मदत झाली असली तरी, चुकीच्या ई-चलानची संख्या मोठी आहे. ओव्हर स्पीडिंग, सीटबेल्ट न लावणे, लेन कापणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे आणि मोबाइलचा वापर यांसारख्या १७ प्रकारच्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी ई-चलान जारी होतात. मात्र, ओव्हर स्पीडिंगव्यतिरिक्त इतर नियमांच्या उल्लंघनाबाबत अनेकवेळा चुकीचे चलान झाल्याने काही चलान रद्द केले आहेत.

१२ टक्के दंड वसूल

‘आयटीएमएस’द्वारे वाहतूक उल्लंघनाचा अहवाल तयार केला जातो आणि ऑपरेटरचे कर्मचारी कमांड कंट्रोल सेंटर (सीसीसी) येथे त्याची पडताळणी करतात. त्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी चलान मंजूर करावे लागते. या महामार्गावर जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १८ लाख २५ हजार ई-चलान जारी केले. त्यापैकी सहा लाख २४ हजार चलान चुकीचे असल्याने रद्द झाले. उर्वरित १२४ कोटी २४ लाख रुपयांचे १२ लाख चलान होते. त्यापैकी जानेवारी २०२५ पर्यंत केवळ १२ टक्के चलानचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मराठीचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ, राज यांचे सरकारला १० प्रश्न: राज ठाकरेंचा इशारा

0

सुसंस्कृत महाराष्ट्र उत्तरेतील लोकांना काबीज करायचा असल्याने आयएएस अधिकाऱ्यांची लॉबी हिंदी सक्तीचा दबाव आणत आहे. पण राज्यात हिंदी सक्ती होऊ देणार नाही. आमच्याच राज्यात आमच्या भाषेचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ आहे, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दिला. शाळांमध्ये हिंदी कसे शिकवले जाते ते आम्ही बघू. सरकार याला आव्हान समजत असेल तर समजावे, असेही राज म्हणाले.

सरकारच्या छुप्या मार्गाने भाषा शिकविण्याला बळी पडू नका, अन्यथा हा महाराष्ट्रद्रोह समजू. सरकारकडून जबरदस्ती झाली तरी हे मनसुबे उधळून लावल्यास शाळांच्या मागे पहाडासारखे उभे राहू. पण सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणाऱ्यांकडे महाराष्ट्र सैनिक (चर्चेला) येतील, असे शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून सांगू, असे राज यांनी पत्रपरिषदेत सांगितले. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी ठिकठिकाणी हिंदी भाषेच्या शालेय पुस्तकांची होळी केली.

हिंदी शिकल्याने विद्यार्थ्यांना फायदा होईल. हिंदी शिकणे महत्त्वाचे आहे, कारण ती सार्वजनिक जीवनात संवादासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. तसेच बारावीनंतर केंद्र सरकारने तिसऱ्या भाषेतील गुणांना महत्त्व दिले आहे. अशा धोरणात, महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे पडू नये, हिंदी शिकल्याने विद्यार्थ्यांना दीर्घकाळ फायदा होईल, म्हणूनच त्रिभाषा धोरण स्वीकारले आहे, असे राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी म्हटले.

मुंबईत मनसे आक्रमक; हिंदी पुस्तकाची होळी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात हिंदी भाषेची सक्ती करू देणार नाही, असा इशारा दिल्यानंतर लगेचच त्याचे पडसाद मुंबईत उमटले. आक्रमक मनसैनिकांनी हिंदी भाषा पुस्तकाची होळी केली. तर, विभाग अध्यक्षांनी त्यांच्या विभागातील शाळांच्या मुख्याध्यापकांची भेट घेऊन राज ठाकरे यांचे पत्र त्यांना दिले. भांडूप व कांजूरमार्ग येथे मनसैनिकांनी पुस्तक विक्री करणाऱ्या दुकानात जाऊन हिंदी भाषेच्या शालेय शिक्षणाची पुस्तकांची होळी केली.

राज ठाकरे यांचे सरकारला १० प्रश्न

१) गुजरातसह इतर राज्यात हिंदीची सक्ती नाही. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटकमध्ये नाही, मग महाराष्ट्रात हे धोरण का?

२) केंद्रीय शैक्षणिक धोरणात राज्य सरकारने संस्कृती पाहून निर्णय घ्यावा, असे म्हटले असताना राज्यातच ही सक्ती का?

३) एक जागतिक भाषा आणि राज्य भाषा शिकविली जात असताना अन्य भाषांची गरज का?

४) त्रिभाषा सूत्र सरकारचा विषय आहे. त्याचा शैक्षणिक धोरणाशी संबंध काय?

५) आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा दबाव आहे का?

६) उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमध्ये तिसरी कोणती भाषा शिकवणार आहात?

७) हिंदी राष्ट्रभाषा नाही, ती आम्ही पहिलीपासून का शिकायची? हिंदी भाषेच्या पुस्तकांची छपाई का केली?

८) पहिलीपासून दोनच भाषा शिकविल्या जातील, असे सरकारने सांगितले. त्याचा लेखी आदेश आला आहे का?

९) कॉलेजमध्येही विद्यार्थ्याला हवी ती भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य असताना हिंदी भाषा का लादता?

१०) जाणीवपूर्वक सरकार हिंदी, मराठी हा मुद्दा करत आहे का?

काँग्रेसचा सरकारला इशारा

हिंदी शिकल्याने विद्यार्थ्यांना फायदा होईल. हिंदी शिकणे महत्त्वाचे आहे, कारण ती सार्वजनिक जीवनात संवादासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. तसेच बारावीनंतर केंद्र सरकारने तिसऱ्या भाषेतील गुणांना महत्त्व दिले आहे. अशा धोरणात, महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे पडू नये, हिंदी शिकल्याने विद्यार्थ्यांना दीर्घकाळ फायदा होईल, म्हणूनच त्रिभाषा धोरण स्वीकारले आहे, असे राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी म्हटले.

पालखी मार्गावर मद्यविक्री व मांसविक्रीला बंदी; पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग यांची माहिती

0

आषाढी वारी निमित्त संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पालखी मार्गावरील हॉटेल्स, ढाब्यांवर वारी काळात मद्यविक्री व मांसविक्रीला पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग यांनी पत्रकार परिषदेची माहिती दिली.

संदीप गिल म्हणाले, वारीच्या मार्गक्रमणादरम्यान कोणत्याही प्रकारची अपवित्रता होऊ नये आणि वारीची पारंपरिक भक्तीभावना कायम राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर स्थानिक पोलीस व संबंधित विभागांना या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील विविध ठिकाणी तपासणी मोहिमा राबवण्यात येणार असून, नियम भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

देहू व आळंदी येथून निघालेल्या संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाने विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. वाहनांची व नागरिकांची सुरक्षितता, माहितीचा गोपनीय वापर, तसेच वारीदरम्यान होणाऱ्या गर्दीचा नियोजनबद्ध कारभार करण्यासाठी पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत:

१. ट्रॅफिक डायव्हर्जन (वाहतूक वळवण):

पालखी मार्गांवर जड व अनावश्यक वाहनांची ये-जा थांबवण्यासाठी एकूण १२ ठिकाणी विशेष पोलिस अधिकारी व वाहतूक अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. हे उपाय वारीकर, नागरिक व इतर वाहनचालकांना अडथळा होऊ नये म्हणून करण्यात आले असून, सुगम वाहतूक सुनिश्चित केली जाणार आहे.

२. मद्यविक्री व मासविक्रीवर नियंत्रण:

पालखी मार्गावरील हॉटेल्स व ढाब्यांवर मद्यविक्री व मासविक्री होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशाने विशेष निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात दक्षतेसाठी कारवाई केली जाणार आहे.

३. गुप्त माहिती काढण्यासाठी विशेष पथके:

सुरक्षा आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी १५ अंमलदारांच्या ३० संयुक्त पथकांची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक पोलीस स्टेशन आणि जिल्हा विशेष शाखांच्या समन्वयाने कार्यरत राहणार आहे.

४. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी बंदोबस्त:

वारीच्या मुक्कामस्थळी चोरी, गुन्हेगारी घटना टाळण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांच्या अधिपत्याखाली विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

वरील सर्व उपाययोजना संतांची परंपरा, वारीचा भक्तिभाव व यात्रेची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी करण्यात आले असून, प्रशासन नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करत आहे.

पुण्यात मुसळधार पावसाने मुठा ओसंडून वाहू लागली, भिडे पूल पाण्याखाली, खडकवासल्यातून विसर्ग सुरु

0

पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. काल रात्रीपासून पावसाची हजेरी सुरूच असून पावसाची रिपरिप सुरू आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागाबरोबरच, खडकवासला धरण क्षेत्र परिसर, सिंहगड रोड, धायरी, कात्रज, धनकवडी, आंबेगाव या उपनगरात पाणी साचल्याचे आढळून आले आहे. काही भागात घरात पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

पुणे महापालिकेने खडकवासला धरणातून दुपारी १ वाजता सुमारे २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी विशेष सतर्क राहावे. अनावश्यक प्रवास व नदीकाठी फिरणे टाळावे. कृपया नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात आकाश ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या रिपरिपीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने प्रमुख मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

तीन महिन्यांत सहा पोलिस निलंबित; जबरदस्ती व खंडणीप्रकरणी कायद्याचा गैरवापर उघड

0

गेल्या तीन महिन्यांत सहा पोलिस कर्मचाऱ्यांना नागरिकांना धमकावून खंडणी उकळल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले असून, यामधून कायद्याच्या रक्षकांकडून होत असलेला अधिकारांचा गैरवापर समोर आला आहे.

अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे म्हणाले, “संबंधित पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून, कोणताही पोलिस कर्मचारी अधिकारांचा गैरवापर करत असल्याचे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.”

कोथरुड, येरवडा, पाषाणसह विविध प्रकरणे उघड

  • ५ मे: कोंढवा पोलीस ठाण्याचे हवालदार विक्रम वडतिले यांनी चेन्नईहून आलेल्या १९ वर्षीय अदमान राजा याला बापदेव घाट येथे कुटुंबीयांसोबत फिरताना अडवले. त्यांच्याकडील हुक्का जबरदस्तीने काढून घेतला आणि अंमली पदार्थ सेवनाचा खोटा आरोप करत वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले. त्यानंतर प्रत्येकी ₹२५,००० अशी खंडणी मागितली; मात्र नंतर एकूण ₹२०,००० वर समझोता केला. ही रक्कम GPay द्वारे वडतिलेंच्या मित्राच्या खात्यावर वर्ग केली गेली. नंतर राजाने तक्रार दाखल केल्यानंतर ७ जून रोजी वडतिले निलंबित झाले आणि रक्कम परत करण्यात आली.
  • १३ एप्रिल: कोप २४ टीमचे बीट मार्शल संतोष शिंदे, प्रतीक त्रिंबके व दिनेश इंगळे यांनी पाषाणमधील एका स्थानिक रहिवाशाकडून पैसे मागितल्याच्या आरोपावरून निलंबनाची कारवाई करण्यात आली.
  • २४ एप्रिल: येरवडा पोलीस ठाण्याचे हवालदार दयानंद कदम व अश्विन देठे यांनी कारमध्ये मुलीसोबत बोलत असलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला “अविनीत वर्तनाचा” आरोप करत धमकावले आणि ₹५०,००० खंडणी मागितली. विद्यार्थ्याने तक्रार दाखल केल्यानंतर दोघांवर कारवाई करण्यात आली.

एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याने सांगितले, “ही प्रकरणं म्हणजे केवळ पृष्ठभागावरचे बर्फ आहेत. आतून समस्या खूप खोलवर आहे. नागरिकांना सुरक्षा देणाऱ्या यंत्रणेकडूनच जर अशी वागणूक मिळत असेल, तर विश्वास कसा राहील?”

झोन ५ चे उपायुक्त राजकुमार शिंदे म्हणाले, “पोलिस कर्मचारी कायद्याचा गैरवापर करत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यास त्यांच्यावर आवश्यक ती कठोर कारवाई केली जाईल.”

पोलिस खात्यातील काही कर्मचारी अधिकारांचा गैरवापर करत नागरिकांना धमकावून पैसे उकळत असल्याच्या घटना समोर येत असून, यावर तात्काळ आणि कठोर कारवाईची गरज आहे. प्रशासनाने या प्रकरणांत “शून्य सहनशीलतेची” भूमिका घेतली असून, समाजात पोलिस यंत्रणेवरील विश्वास परत मिळवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

आंबेगाव पोलिसांची कारवाई; खून करून मध्य प्रदेशात पळालेल्या आरोपीला अटक

0

आंबेगाव पोलिसांनी खून करून मध्य प्रदेशात फरार झालेल्या आरोपीला अटक केली आहे. ही घटना १५ जून रोजी जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द परिसरात घडली होती. या प्रकरणात २१ वर्षीय रोहित धामल याचा खून झाल्याची नोंद करण्यात आली होती. रोहित हा योग मुद्रा बिल्डिंगमधील रहिवासी असून एका प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीत डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता.

या प्रकरणात आंबेगाव पोलिस ठाण्यात १६ जून रोजी खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत तांत्रिक पाळत आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. पोलिसांनी इंदोर, मध्य प्रदेश येथे आरोपी सूरज सूर्यवंशी (वय २२, रा. गणेश पेठ, पुणे) याला अटक केली. सूरज देखील रोहितप्रमाणेच त्या ई-कॉमर्स कंपनीत डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता.

या प्रकरणाबाबत माहिती देताना सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रियांका गोरे म्हणाल्या, “आरोपी व मयत यांच्यात पूर्वीपासून ओळख होती. आरोपीने आपल्या मित्राच्या बहिणीच्या नावाने खोटा सोशल मीडिया अकाउंट तयार केले होते, यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. हाच वाद पुढे खुनात रूपांतरित झाला.”

गोरे यांनी सांगितले की, तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीचा आधार घेत आरोपीला इंदोरमधून शोधून काढले, आणि घटनेनंतर अवघ्या २४ तासांत त्याला अटक करण्यात आली.

सामाजिक माध्यमांवरील खोट्या अकाउंटमधून सुरू झालेल्या वादाने थेट एका युवकाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना आंबेगाव खुर्द येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला अटक केल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

जलजन्य आजार टाळण्यासाठी उच्च धोका असलेल्या भागातील पाण्याची तपासणी करा; आरोग्य विभागाचा पालिकेला आदेश

0

पावसाळ्यात संभाव्य जलजन्य रोगांची साथ टाळण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य विभागाने पुणे महापालिकेला (PMC) उच्च-धोका भागांमधून पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

१२ जून रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर १६ जूनला महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणीपुरवठा विभागाला पत्र पाठवून नमुने त्वरित पाठवण्यास सांगितले आहे.

बैठकीत मंत्री आंबिटकर म्हणाले की, “धोका असलेल्या भागांत वेळेत पाण्याची तपासणी केल्यास नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळण्यास मदत होईल. तसेच, पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याबाबतचा अहवाल तातडीने आरोग्य विभागाकडे पाठवावा.”

PMC आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, अलीकडे शहरात गिलियन-बारे सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजाराची साथ पसरली होती. यामध्ये १४१ रुग्णांची पुष्टी झाली होती आणि ९ संशयित मृत्यू नोंदवले गेले. ही साथ २ एप्रिल २०२५ रोजी अधिकृतरीत्या संपल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही काही सहज नोंदवल्या जाणाऱ्या प्रकरणांप्रमाणे GBS चे विखुरलेले रुग्ण आढळत असल्याचे PMC च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

PMC च्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे म्हणाल्या, “साथ संपल्याची घोषणा झाल्यानंतरही काही GBS रुग्ण नोंदले गेले आहेत. हे वर्षभर होणारे प्रमाणिक रुग्ण आहेत. या नव्या प्रकरणांचा तपशील आम्ही गोळा करत आहोत.”

आरोग्यमंत्र्यांनी पाणी शुद्धीकरण प्रक्रियेशी संबंधित कर्मचाऱ्यांना रिफ्रेशर प्रशिक्षण देण्याचेही आदेश दिले आहेत, जेणेकरून सर्व सुरक्षा प्रक्रिया काटेकोरपणे पाळल्या जातील याची खात्री करता येईल.

PMC च्या पाणीपुरवठा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “आम्हाला पत्र प्राप्त झाले आहे आणि उच्च-धोका क्षेत्रांतून पाण्याचे नमुने गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. अहवाल लवकरच आरोग्य विभागाकडे पाठवला जाईल. तथापि, PMC नियमितपणे पाण्याची तपासणी करत असते.”

गेल्या काही महिन्यांत GBS साथीच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी पावसाळ्याचा विचार करून, पुणेकरांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी महानगरपालिका आता अधिक काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पाण्याची तपासणी करणार आहे. प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि कुठलाही त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.

पुणे जिल्ह्यातील २५ पुलांची तातडीने दुरुस्ती गरजेची; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्ट्रकचलर ऑडिटमध्ये उघड

0

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अलीकडील स्ट्रकचलर ऑडिटमध्ये पुणे जिल्ह्यातील २५ पूल तातडीने दुरुस्त करणे आवश्यक असल्याचे समोर आले आहे. या पुलांमध्ये काहींमध्ये मोठ्या प्रमाणावर मजबुतीकरणाची गरज असून, काही पुलांची स्थिती गंभीर असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित कामांची योजना आणि मंजुरी प्रक्रिया सुरू असून लवकरच दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

PWD मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले, “या तपासणीच्या शिफारशी सरकारकडे सादर करण्यात आल्या असून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच दुरुस्ती सुरू होईल.”

अधिकृत आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात एकूण ८३० पूल असून त्यापैकी ११५ मोठे आणि ७१५ लहान पूल आहेत. २०२४ मध्ये त्यापैकी ३१ पुलांचे स्ट्रकचलर ऑडिट करण्यात आले. त्यात जुन्नर तालुक्यातील ९ पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे समोर आले. तसेच भिगवण, इंदापूर, शिरूर, बारामती आणि दौंड परिसरातील १६ पुलांना किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचे निदर्शनास आले आहे.

याशिवाय, इंद्रायणी नदीवरील तुळापुर येथील राज्य महामार्ग क्रमांक ११६ वरील मोठा पूल जड वाहनांसाठी असुरक्षित असल्याचे आढळले आहे. त्यामुळे PCMC (पिंपरी-चिंचवड महापालिका) यांना या पुलावरून जड वाहनांना बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे.

PWD चे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर यांनी सांगितले, “बहुतेक पुलांची किरकोळ दुरुस्ती पूर्ण झाली आहे. जुन्नर तालुक्यात काही पुलांवर मोठी दुरुस्ती आणि मजबुतीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, काही मोठ्या कामांना निधीची प्रतीक्षा आहे. निधी उपलब्ध होताच उर्वरित कामे सुरू केली जातील.”

PWD नुसार, पुणे जिल्ह्यातील सर्व पुलांची तपासणी दरवर्षी एप्रिल-मे (मान्सूनपूर्व) आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर (मान्सूननंतर) केली जाते. यावेळी जी पूल कमकुवत किंवा धोकादायक स्थितीत आढळतात, त्यांना पुढील तपासणीसाठी किंवा दुरुस्तीसाठी शिफारस केली जाते. स्ट्रकचलर ऑडिट झाल्यावरच पूल पाडावा लागेल की दुरुस्ती करावी लागेल, हे ठरवले जाते.

या तपासणी प्रक्रियेत पूलांतील साहित्याचे नमुने घेऊन टिकाऊपणा आणि वय याची चाचणी केली जाते. यात ध्वंसात्मक (destructive) व अ-ध्वंसात्मक (non-destructive) चाचण्या, तसेच विविध वैज्ञानिक उपकरणांद्वारे तपासणी केली जाते.

फुले दांपत्याच्या खानवडी गावात शाळा सुरू होण्यास सज्ज; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवी आशा

0

ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या मूळगावी, खानवडी येथे उभारण्यात आलेली ‘ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल’ (JSIS) आता विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सज्ज झाली आहे. ही शाळा एप्रिल २०२६ पासून सुरू होणार असून, ग्रामीण भागातील मुलींना आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची नवी संधी मिळणार आहे.

ही शाळा ‘क्रिस्टल हाऊस’ मॉडेलवर आधारित असून, शिक्षणाबरोबरच पोषण, आरोग्यसेवा, वाहतूक, शालेय साहित्य आणि करिअर मार्गदर्शन अशा सर्व बाबी एकत्रितपणे पुरवली जाणार आहेत. शाळा सीबीएसई पद्धतीची, धर्मनिरपेक्ष आणि पूर्णपणे मोफत असेल. पुणे जिल्हा परिषद, महाराष्ट्र शासन आणि Christel House India यांच्या संयुक्त भागीदारीत ही शाळा चालवली जाणार आहे.

या उपक्रमाची कल्पना पेनसिव आर्किटेक्चरचे मुख्य वास्तुविशारद ऋषिकेश हुळी यांनी मांडली होती. ग्रामस्थांनी फुले दांपत्याच्या स्मारकाचे नुतनीकरण करण्याची विनंती केली होती, पण हुळी यांनी स्मारकाऐवजी त्यांच्या कार्याची खरी आठवण म्हणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळेचा प्रस्ताव मांडला आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला.

ग्रामपंचायतीने १२ एकर जागा दान केली, तर FIAPL (Fiat India Automobiles) यांच्या CSR निधीतून बांधकाम सुरू झाले. २४ वर्गखोल्या, विज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, कार्यालयीन विभाग, आधुनिक स्वच्छतागृहे आणि उपक्रम क्षेत्र या सुविधांसह शाळेचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. इयत्ता ५ वीपासून गरजू मुलींसाठी निवासी सुविधा देखील प्रस्तावित आहे.

यावर्षीच्या सुरुवातीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषद, Christel House India, व उद्योग व समुदाय भागीदारांमध्ये सामंजस्य करार झाला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, “ही भागीदारी ग्रामीण भागात समतेवर आधारित शिक्षणासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. फुले दांपत्याच्या कार्याला मानवंदना म्हणून ही शाळा उभी राहणार असून, गरीब व वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पूर्णपणे मोफत मिळणार आहे.”

Christel House India चे CEO जेसन सी. मॅथ्यू म्हणाले, “ही भागीदारी म्हणजे महाराष्ट्राच्या बालदृष्टीकोनाशी सुसंगत असा ऐतिहासिक निर्णय आहे. आम्ही मुलांना केवळ शिक्षण नव्हे, तर आयुष्य घडवण्याची संधी देण्यास कटिबद्ध आहोत.”

संशोधनानुसार, खानवडी परिसरात १३,००० पेक्षा अधिक शालेय वयोगटातील मुले असूनही इंग्रजी माध्यम व सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या शाळा अत्यंत कमी आहेत. त्यामुळे JSIS सारखी शाळा ही त्या गरजेला सडेतोड उत्तर आहे.

Christel House International चे CEO डेव्हिड हॅरिस म्हणाले, “या शाळेमुळे परिवर्तनाची बीजे पेरली जात आहेत. ज्याप्रमाणे फुले दांपत्याने शिक्षणाच्या अडथळ्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले होते, त्याच आदर्शावर हे काम उभे आहे.”

वेगात असलेल्या कारचा अपघात: ६ वर्षीय बालकासह नऊ जण ठार, दोन जखमी

0

पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोठगाव रस्त्यावर बुधवारी सायंकाळी एका वेगात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप मिनी ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका ६ वर्षीय बालकासह नऊ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्घटना श्रीराम ढाब्याजवळील किर्लोस्कर कंपनीच्या समोर घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, जेजुरीहून बारामतीकडे जाणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला इलेक्ट्रॉनिक सामान (फ्रिजसह) उतरवण्यासाठी उभ्या असलेल्या पिकअप ट्रकला धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की कार जवळच उभ्या असलेल्या दुसऱ्या वाहनावर आदळली. अपघातामुळे पिकअप उलटून पडली.

मृतांमध्ये कारमधील चार प्रवासी, पिकअपवरील दोन कामगार, ढाब्याचा मालक आणि दोन पादचारी यांचा समावेश आहे.

मृतांमध्ये सोमनाथ रामचंद्र वायसे (पुरंदर, ढाब्याचे मालक), रामु संजीवन यादव (नाझरे, पुरंदर), अजयकुमार चव्हाण (कुशीनगर, उत्तर प्रदेश), अजित अशोक जाधव (कंजळे, भोर), किरण भारत राऊत (पवारवाडी, इंदापूर), अश्विनी संतोष ऐसर (नांगनापूर, सोलापूर), अक्षय शंकर राऊत (झरगडवाडी, बारामती), सार्थक किरण राऊत (वय ६), एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.

जखमींना तात्काळ जेजुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू आहे.

पोलिस उपअधीक्षक तानाजी बाराडे यांच्या माहितीनुसार, “कार अतिवेगात होती आणि चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. कारचालकास अचानक काही त्रास झाल्यामुळेही अपघात झाला असावा, अशी शक्यता आहे. नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होईल.”

जेजुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाघचौरे म्हणाले, “कारमधील तीन आणि पिकअपशी संबंधित पाच जण जागीच ठार झाले. ढाब्याजवळील कर्मचारी देखील माल खाली उतरवण्यात मदत करत होते. धडकेचा जोर इतका होता की पिकअप गाडी उलटली.”

अपघातानंतर पोलीस आणि बचावपथक घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी नुकसानग्रस्त वाहने हटवण्यात आली. सध्या घटनास्थळी साक्षीदारांचे जबाब घेतले जात आहेत आणि आजूबाजूच्या परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू आहे.

पुरंदर, इंदापूर आणि बारामती भागात या घटनेने हळहळ व्यक्त होत असून, स्थानिक नागरिकांत शोककळा पसरली आहे. प्रशासनाने वाहनचालकांना ग्रामीण भागातील अरुंद रस्त्यांवर वेग मर्यादा पाळण्याचे आवाहन केले आहे.