Home Blog Page 192

पुनर्विकासाठी 3000 स्थानिक धारावीकर रस्त्यावर उतरले, खोडा घालणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची केली मागणी

0

‘गरिबी और गंदगी से दूर,धारावी का विकास जरूर’, ‘धारावी का विकास, अभी नहीं – तो कभी नहीं’ , ‘घर घर में बोले नारी, अब धारावी के सुधार की बारी’, ‘मेरे बच्चो का पक्का घर, मेरा सपना’ अशा विविध संदेशांचे फलक घेत सायन स्थानकाबाहेर आज एक मोर्चा निघाला होता. धारावीतील सुमारे 3000 स्थानिकांनी शनिवारी मोर्चा काढला होता. या मोर्चाने धारावीतील रहिवाशांनी आपला पाठींबा विकासाला असून प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना थेट चपराक लगावली असल्याचे म्हटले जात आहे.

केवल स्वार्थासाठी अनेक वर्षांपासून रखडवलेला धारावीचा पुनर्विकास आता एकदाचा मार्गी लागणार आहे. धारावी पुनर्विकासाच्या बाजूने आता नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आणि या प्रकल्पात खोडा घालणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. शनिवारी धारावीकरांनी प्रकल्पाच्या बाजूने मोर्चा काढला होता. या मोर्चाची सांगता महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (म्हाडा) कार्यालयाबाहेर झाली. सोमवारी, या मोर्चातील शिष्टमंडळ धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करणार आहेत. दि साऊथ इंडियन नाडार महाजन संघम, प्रगती महिला सेवा मंडळ यांसह अन्य संस्थांच्या पुढाकाराने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

पहिल्यांदाच धारावी पुनर्विकास प्रकल्पाला समर्थन देण्यासाठी अशा प्रकारे मोर्चा काढण्यात आला होता. या जनमोर्चाला, सकाळी 11.30 वाजता शीव रेल्वे स्थानकाबाहेरील सिग्नल जवळून सुरुवात झाली. सर्व वयोगटांतील रहिवाशांनी पुनर्विकास प्रकल्पाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. धारावी पुनर्विकास प्रकल्प लवकर पूर्ण करावा, या मागणीसाठी रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे काढलेल्या या मोर्चामुळे संपूर्ण धारावीत एक वेगळा संदेश गेला असून यामुळे या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.

”गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या नव्या हक्काच्या घरांच्या प्रतीक्षेत आहोत. या नव्या घरांमध्ये स्वच्छतागृह आणि इतर सुविधा असतील. मात्र काही राजकारणी विशेषतः गायकवाड भगिनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी धारावी पुनर्विकासाला विरोध करत आहेत. अशा सर्व लोकांना धारावीकरांच्या मनातली भावना जाहीरपणे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आमच्या हक्कांच्या घरासाठी आम्ही शासनाच्या मागे ठामपणे उभे राहून हा प्रकल्प पूर्णत्वास नेऊ, याची मला खात्री आहे”

– एम नाडेश्वरन, स्थानिक रहिवासी

“देशाची आर्थिक राजधानी उभी करण्यात मोलाचे योगदान असणाऱ्या कामगार आणि कष्टकऱ्यांची धारावी आहे. आजवर गप्प बसून पुनर्विकासाचा तमाशा बघणाऱ्या धारावीकरांना आता जाग आली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प रोखणाऱ्या लोकांवर शासनाने कठोर कारवाई केली नाही, तर धारावीची जनता पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल”

– संजय गुप्ता, स्थानिक रहिवासी

छावाच्या प्रदर्शनानंतर विकीची खास पोस्ट! आभार मानत म्हणाला… ‘विश्वास साथ हो, तो युद्ध लगे त्योहार!’ “‘छावा’ला खऱ्या अर्थाने…”

0

विकी कौशलच्या मुख्य भूमिकेत असलेला ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाचे तिकीट हाऊसफूल्ल झाले होते. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने जवळपास 17 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई तब्बल 31 कोटी रुपये इतकी होती.

दरम्यान विकी कौशल याने चित्रपट प्रदर्शनानंतर चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. इन्टाग्रामवर पोस्ट लिहित त्याने सर्वांचे आभार मानलेत. तसंच ‘छावा’ चित्रपट कसा आयुष्याला कलाटणी देणारा ठरला याबद्दल तो व्यक्त झाला आहे.

विकी कौशलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये लिहिलय की, ‘तुमच्या प्रेमाने ‘छावा’ला खऱ्या अर्थाने जिवंत केलय. सर्वांचे येणारे मॅसेज, फोन, चित्रपट पाहताना शेअर केलेले व्हिडिओ हे सगळं पाहून मी भारावलो आहे. तुमचं इतकं भरभरुन प्रेम दिलं त्यासाठी सर्वाचे आभार..’ असं कॅप्शन लिहीत ‘विश्वास आपका साथ हो, तोयुद्ध लगे त्योहार!’ असं पोस्टमध्ये विकीने म्हटलं आहे.

पहिल्याच दिवशी छावाची रेकॉर्डब्रेक कमाई

‘छावा’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 31 कोटींची कमाई केली आहे. 2025 मध्ये पहिल्या दिवशी एवढी कमाई करणारा विकी कौशलचा पहिला चित्रपट ठरला आहे. पहिल्या दिवसाची कमाई बघता काही दिवस हा चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडेल अशी शक्यता आहे.

अशुद्ध तेल शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज? देवस्थानने घेतला हा मोठा निर्णय; भाविकांची लूट होण्याची शक्यता

0

महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनि शिंगणापूर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हजारो भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात. शनि देवाचा कोप होऊ नये म्हणून येथील शिळेवर तेल वाहण्याची प्रथा आहे.दररोज लाखो भाविक तेल अर्पण करतात. मात्र, अलीकडेच संस्थानाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.. शनि शिंगणापूर येथील शनी देवाला तेल वाहताना आता फक्त शुद्ध तेलाचाच अभिषेक करावा, असा निर्णय़ विश्वस्त मंडळानं घेतलाय.

सुटं आणि मिश्रीत तेल भेसळयुक्त असतं. त्यामुळे शनिदेवाच्या शिळेवर परिणाम होऊन शिळेची झिज होत असते, असा अहवाल अन्न आणि भेसळ समितीनं दिलाय. त्यामुळे शुद्ध आणि ब्रँडेड तेलच शनी देवाला वाहण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाकडून घेण्यात आलाय….

ब्रँडेड तेलानेच शनिदेव प्रसन्न?

शनि शिंगणापुरात चौथऱ्यावर तैलाभिषेकाची परंपरा

शनिदेवाला सुट्या तेलाचा अभिषेक चालणार नाही

ब्रँडेड कंपनीचं, शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणं बंधनकारक

तेलातल्या भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याचा दावा

भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते स्वीकारलं जाणार नाही.

दरम्यान, विश्वस समितीनं आणि भाविकांनी याबाबत काय प्रतिक्रीया दिलीये ते पाहूयात….

शनिदेवाच्या शीळेची झिज होऊ नये यासाठी हा निर्णय़ घेतला असला तरी ब्रँडेड आणि शुद्ध तेलाच्या नावाखाली बाजार मांडून भाविकांची लूट होणार नाही याची विश्वस्त आणि देवस्थानानं खबरदारी घेण्याची गरज आहे.

या 7 महापालिकांची निवडणूक तात्काळ लागण्याची शक्यता; ‘मातोश्री’त दीड तास बैठक, डॅमेज कंट्रोलसाठी काय ठरलं? 

0

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कोकणातील निकटवर्तीय नेते राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे आणखी एक कोकणातील जवळचे नेते भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा आहे. भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे भास्कर जाधव हे शिंदेंच्या शिवसेनेत जातील की काय? अशी चर्चा सुरु झाली. याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या गोटातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राजन साळवी यांच्यानंतर आता आणखी कोणता नेता सोडून जावू नये यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती आहे.

शिवसेनेची आज दीड तास बैठक पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, खासदार अनिल परब, संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत उपस्थित होते. पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे. पक्षाची गळती रोखण्यासाठी ठाकरेंनी ही बैठक घेतल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर अंबादास दानवे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

अंबादास दानवे बैठकीनंतर काय म्हणाले?

“ही बैठक संघटनेच्या नियमित कामकाजांसाठी होती. कारण लोकसभा निवडणुका झाल्या, त्यानंतर विधानसभा निवडणुका देखील झाल्या आहेत. आमची सदस्य नोंदणी मोहीम सुरु झालेली आहे. यानंतर येणाऱ्या काळात राज्यात संघटनेचं काम मजबूत करण्यासाठी नेत्यांच्या टीमने कशाप्रकारे सक्रीय व्हावं, कशापद्धतीने संघटन व्हावं, या हेतून विचार करण्यासाठी आज संघटनात्मक बैठक होती”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.

दरम्यान, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांची घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ठाकरे गळाला पक्षगळती ही झेपणारी नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे ड्रॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी होतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

मंत्रीसाहेब सत्तेचा एवढा माज बरा नव्हे: राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे कोथरूडमध्ये फलक लाऊन मंत्री नितेश राणेंचा निषेध

0

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आगामी काळामध्ये सर्व पक्षांना एकत्र घेऊन निष्पक्ष प्रगती कडे वाटचाल करत जाण्याचे संकेत दिले असतानाच काल मंत्री नितेशजी राणे यांनी एका कार्यक्रमामध्ये असे वक्तव्य केले की सरकारचा कोणता ही निधी हा फक्त्त महायुतीच्या कार्यकर्त्याला मिळेल. अशी वल्गना करत गरळ ओकली आहे. महाविकास आघाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा सरपंचला निधी मिळणार नाही. विकास होणार नाही. विकास करायचा असेल तर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करावा. असे निषेधार्य वक्तव्य करताना माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय त्यामुळे मला काही फरक पडत नाही. अशी पुष्टी देणे म्हणजे सध्या सत्ताधारी पक्षाचे धोरण असल्याची कुणकुण वाटत आहे. राष्ट्रवादी युवक शरदचंद्र पवार कोथरूड अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या वतीने कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये ठिक-ठिकाणी फलक लाऊन मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

यावेळी गिरीश गुरनानी म्हणाले सत्ता येते जाते पण सत्तेचा ऐवढा माज कधी कोणी केला नाही. एखादा विरोधी पक्षाचा आमदार किंवा सरपंच स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी मंत्र्यांना निधी मागत नाही तो आपल्या गावाच्या किंवा विभागाच्या लोकांच्या विकासासाठी निधी मागत असतो. महाराष्ट्रात बहुसंख्य बहुमताची अनेक सरकारने सत्ताधारी झाली परंतु असले गलिच्छ राजकारण कधीही महाराष्ट्रात झाला नाही पण आज एक जवाबदार मंत्री भर सभेत असले वक्तव्य करतो हे नींदनीय आहे. आगामी काळातील वाटचाल योग्य दिशेने होण्यासाठी अशा वाचाळ वीरांना वेळीच आवर घालण्याची ही गरज निर्माण झाली आहे.

१०७ कोटींचे 5 साखर कारखान्यांना होणार वितरण; सहकार विभागाचा आदेश, घोडगंगा बाबतही आठवड्यांत निर्णय शक्य

0

राष्ट्रीय सहकार प्राधिकरणाकडून (एनसीडीसी) देण्यात येणाऱ्या थकहमी पोटी रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी राखून ठेवण्यात आलेली १०७ कोटी ६८ लाख रुपयांची रक्कम अखेर पाच सहकारी साखर कारखान्यांना देण्याचा आदेश सहकार सहकार विभागाने दिला आहे. माजी आमदार अशोक पवार यांच्या घोडगंगा कारखान्याबाबत आठ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिल्याने थकहमीचा मार्ग मोकळा झाल्याचे ही स्पष्ट झाले आहे.

‘एनसीडीसी’च्या थकहमीसाठी पात्र असूनही डावलल्याचा दावा करत रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर सुनावणी सुरू होती. या कारखान्यासाठी प्रस्तावित मंजूर होणारी रक्कम १०७ कोटी ६९ लाख रुपये राखून ठेवावी. तसेच पाच कारखान्यांना मंजूर केलेली ५९४ कोटी ७६ लाख रुपयांपैकी उर्वरित मंजूर रक्कम वितरित करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होते.

मात्र या विरोधात विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना (यशवंत नगर, सांगली), पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथ नाईकवाडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना (वाळवे), अशोक सहकारी साखर कारखाना (अशोक नगर, अहिल्यानहर), श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना (पंढरपूर), शेतकरी सहकारी साखर कारखाना (किल्लारी, लातूर) या कारखान्यांनी न्यायालयात दाद मागितली होती.

हंगाम वाया जाण्याची भीती असल्याने सरकारने सकारात्मक भूमिका घेत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला पुढील हंगामासाठी मदत करण्याची आश्वासन दिले होते. त्यानुसार कारखान्याच्या वकिलांनी न्यायालयासमोर ही माहिती देत सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे.

त्यामुळे अन्य कारखान्यांची राखून ठेवलेली १०७ कोटी ६९ लाख रुपयांची रक्कम देण्यास हरकत नसल्याचे न्यायालयासमोर सांगितले. त्यानंतर उच्च न्यायालयाने पाच सहकारी साखर कारखान्याबाबात चार आठवडे तर रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासंदर्भात आठ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचा आदेश दिला होता.

राज्य सरकारनेही याबाबत सकारात्मक बाजू मांडल्यानंतर संबंधित कारखान्यांचे उर्वरित पैसे वितरित करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर सहकार विभागाने तसा शासन आदेश काढला आहे.

कॉपीमुक्त 0रुपये खर्च अभियानाचा ‘विशाल नरवाडे’ पॅटर्न राज्यभर वापरणार; तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर नेमकं काय.. जाणून घ्या

0

शिराळा येथील २०२२ ला आयएएस अधिकारी विशाल नरवाडे हे प्रशिक्षणार्थी तहसीलदार काम पाहताना त्यांनी शून्य रुपये खर्चात पहिल्यांदाच कॉपी मुक्त अभियानचा “विशाल नरवाडे” पॅटर्न तालुक्यातील परिक्षा केंद्रावर राबविला होता.याची दखल घेऊन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक झाली. यात यावर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘विशाल नरवाडे’ पॅटर्न राज्यभर राबविण्याचे आदेश दिले आहेत.

गतवर्षी विशाल नरवाडे बुलढाणा येथेही जिल्ह्यात प्रथमच जिल्हा प्रशासनाने बारावी आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी अभिनव कॉपीमुक्ती अभियान राबवले होते. याची दखल घेऊन महाराष्ट्रामध्ये कॉपी मुक्त अभियानचा “विशाल नरवाडे” पॅटर्न राज्यभर राबविण्याचा आदेश मुख्य सचिवांनी दिला आहे.

१० वी व १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा मार्चपर्यंत राज्यभर चालणार आहेत. बहुतांश ठिकाणी राज्यभर परीक्षेदरम्यान गैरमार्गाने काॅपी करणे सर्वत्र कमी जास्त प्रमाणात दिसून येते. या संदर्भात ‘ कॉपीमुक्त परीक्षा’ घेणे प्रशासनासमोर नेहमीच आव्हान असते. कॉपीच्या प्रकरणांवर कारवाई करण्यासाठी महसूल पथक, पोलिस पथक, बैठे पथक, भरारी पथके अशी यंत्रणा सध्या कार्यरत आहे. परंतु परीक्षा एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी असल्याने सर्व विभागांचे इतके मनुष्यबळ उपलब्ध करून देणे प्रशासनासाठी आव्हानात्मक बनले आहे.

या संदर्भात विशाल नरवाडे यांनी कॉपीमुक्त परीक्षा आयोजित करण्यासाठी नवीन मॉडेल तयार केले आहे. यासाठी मुख्य सचिव सौनिक यांची बैठक झाली यावेळी राज्यातील क्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून सूचना आणि सर्वोत्तम पद्धती विचारल्या गेल्या. त्यानुसार मुख्य सचिवांनी तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक करत यंदाच्या वर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘विशाल नरवाडे’ पॅटर्न राज्यभर राबविण्याचे आदेश दिले.

काय आहे विशाल नरवाडे पॅटर्न

या मॉडेलमध्ये झूम तंत्रज्ञानाचा प्लॅटफॉर्म ऑडिओ-व्हिडिओ मोडमध्ये वापरला जातो. जिल्हा स्तरावर, केंद्रीकृत झूम बैठक तयार केली जाते. लिंकद्वारे प्रत्येक पर्यवेक्षकाने त्यांच्या मोबाईलवरून कॅमेरा चालू ठेवला जातो. परीक्षा लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मोबाईल सायलेंट आणि म्यूट ठेवण्यात येतात. या मोबाईलद्वारे परीक्षा लिहिणारे सर्व विद्यार्थी दिसावेत. अशा प्रकारे सर्व परीक्षा केंद्रे आणि सर्व परीक्षा केंद्रांमधील सर्व ब्लॉक, वर्ग लाइव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग मोडमध्ये कव्हर केले जातात. परीक्षा-संदर्भात कोणीही काॅपी करतांना आढळल्यास, जिल्हास्तरीय होस्ट अनम्यूट करतात आणि संपूर्ण जिल्ह्याला ऐकू येतील अशा सूचना देतात. राज्यात आणि कदाचित देशात पहिल्यांदाच, कोणत्याही प्रशासकीय कार्यालयाकडून राज्य मंडळाच्या परीक्षेचे पर्यवेक्षण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतका साधा, नाविन्यपूर्ण वापर केला.

मराठा समाजाचे सुरेश धसांना दार बंद? धसांच्या विश्वासार्हतेला तडा…..ही अपेक्षा नव्हती; जरांगेंचा हा मोठा निर्णय

0

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोपाचा धुरळा उडवणारे भाजप आमदार सुरेश धस आता राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या गुप्त भेटीमुळे अडचणीत सापडले आहे. सुरेश धसांच्या या खेळीमुळे मनोज जरांगे कमालीचे संतापले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांना भेटच नाकारली आहे.

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दोन दिवसांपूर्वी ज्यांच्यावर आरोपाचे वार केले, त्याच राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी जाऊन सुरेश धस यांनी भेट घेतल्याचं उघड होताच सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सुरेश धस यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर ते मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. पण मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांना भेट नाकारली आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटीवर मनोज जरांगे कमालीचे नाराज झाले आहे.

मनोज जरांगे संतापले

मनोज जरांगे पाटील यांनी या मुद्द्यावरून सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘हे तर नवीन ऐकालाच मिळालं आहे, अवघड आहे. हे धक्कादायक आहे. गोरगरिब समाज न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. एखाद्याकडून अपेक्षा करतोय, फालतूचं राजकारण व्हावं, हे अपेक्षित नाही. गोरगरिबांचं घर उन्हात पडलं आहे. हे बरोबर नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. धसांच्या विश्वासार्हतेला तडा केला, धसांवर राजकीय दबाव आला असेल. सुरेश धसांकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांचं त्यांना लखलाभ. काय काय घडलं ते सगळं जनतेला सांगतील. परिस्थिती अशी आहे, सुरेश धस यांनी हे टाळायला हवं होतं’ असं म्हणत मनोज जरांगे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.

काय म्हणाले सुरेश धस?

मनोज दादा हे आमचे दैवत आहे, ते काही बोलले असतील. रागावले असतील पण मी त्यांच्याशी बोलून घेईन. त्यांची नाराजी दूर करेल, असं सुरेश धस म्हणाले.

मीटरचा अवाजवी रुपये 500 दंड अखेर माफ; केंद्रीयमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या शिष्टाईला अखेर यश

0

खासदार तथा नागरी विमान उड्डाण व सहकार मंत्री माननीय श्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या शिष्टाईला अखेर यश मीटरचा अवाजवी रुपये 500 दंड अखेर माफ करण्यात आला माननीय खासदार तथा नागरी विमान उड्डाण व सहकार मंत्री माननीय श्री मुरलीधर मोहोळ साहेबांच्या सूचनेनुसार माननीय जिल्हाधिकारी पुणे यांनी सर्व रिक्षा संघटनांची आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंग आयोजित केलेली होती, बेकायदेशीर चालणाऱ्या ओला उबर तसेच सीएनजी हायड्रो टेस्ट फी मनमानी पद्धतीने आकारणारे रेट्रो फिटर बेकायदेशीर रित्या पर जिल्ह्यात व परराज्यात बजाज फायनान्सने विकलेल्या 35 ते 40 हजार रिक्षा बाबतची यांच्या तक्रारीचे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले.

त्याचप्रमाणे रिक्षा पासिंग साठी परवानाधारकांची सक्ती रद्द करण्यात यावी, मीटरची रोड टेस्ट रद्द करण्यात यावी, नवीन रिक्षा स्टॅन्ड ला मंजुरी देण्यात यावे व इतर रिक्षा व्यवसायातील अनेक अडचणींच्या वर चर्चा कलेक्टर साहेबांच्या समोर समर्थ सेवा रीक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद तांबे व इतर संघटनांच्या सर्व प्रतिनिधी सोबत करण्यात आली. जिल्हाधिकारी पुणे आरटीओ पुणे डेप्युटी आरटीओ पुणे यांनी एकमताने रिक्षा मीटर पासिंगचा दंड रद्द करण्यात यावा ही मागणी तातडीने मंजूर करण्यात आली.

सुरेश धस-धनंजय मुंडेंची भेट, 4.5 तास चर्चाही पूर्ण? बावनकुळे आणि धस काय म्हणाले? भेट लपवण्यामागे नेमकं कारण?

0

“संतोष देशमुखांचा लढा आणि तब्बेतीची चौकशी या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहे. भरणे मामांनी रात्री उशिरा त्यांना दवाखान्यात नेलं होतं, त्यामुळे मी चौकशी केली. मी धनंजय मुंडे यांना परवा त्यांच्या निवासस्थानी भेटलो” असं सुरेश धस म्हणाले. दुसरी कुठलीही चर्चा आमच्यात झाली नसल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं. तसंच धनंजय मुंडे यांचा राजीनामा मी अजून मागितलेला नाही, त्यांच्याच पक्षाचे लोक राजीनामा मागत होते. राजीनामा घेणं, न घेणं त्यांच्या नेत्यांचा विषय आहे, तसंच आमचा लढा आरोपी फासावर जाईपर्यंत सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे.

बावनकुळे म्हणाले, चार-साडेचार तास सोबत होतो…

“धनंजय मुंडे, सुरेश धस आणि आम्ही चार-साडेचार तास होतो. धनंजय मुंडे-सुरेश धस या दोघांमध्येही मतभेद आह, मनभेद नाही. दोघंही फार इमोशनल आहेत. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, आमचे जुने संबंध आहे. सुरेश धस, धनंजय मुंडेंची पारिवारिक भेट झाली असं बावनकुळे म्हणाले.

सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ सुरू झाली आहे. या भेटीमागे खरंच प्रकृतीची चौकशी करण्याचं कारण होतं की इतर राजकीय चर्चा झाल्या असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी वेगवेगळ्या मोर्चांमध्ये जोरदार भाषणं करत आपली आक्रमक भूमिका मांडली होती. मात्र, आता या भेटीनंतर सुरेश धस यांच्या भूमिकेवरही संशय घेतला जातोय.

मनोज जरांगे यांनीही या भेटीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. ही माहिती मिळताच आम्हाला धक्का बसला, अजूनही यावर विश्वास बसत नाही. एखाद्या राजकारण्यावर लोक विश्वास ठेवत नाही, पण टाकला होता. मात्र, आता यांनाच सगळ्यांना मिळवून संतोष देशमुख यांचं प्रकरण पचवायचं दिसतंय असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. मात्र, या सर्व प्रकरणाला मी दबू देणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले.