Home Blog Page 178

गाडी धडकताच सीएनजीचा पेट; आग विझवण्यापर्यंत दोघांचा जळून मृत्यू; पोलिसासह दोघांचा जळून कोळसा

0

दुभाजकाला चारचाकी गाडी धडकल्यानंतर वाहनातील सीएनजी गॅसने पेट घेतला आणि गाडीला आग लागली. या भीषण अपघातात दोघा जणांचा जळून अक्षरशः कोळसा झाला. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याही समावेश आहे. अहिल्यानगर येथील बीड रोडवर हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. फायर ब्रिगेडच्या सहाय्याने आग विझवण्यात आली, परंतु तोपर्यंत दोघांचा जळून मृत्यू झाला होता.

कसा झाला अपघात?

बीडकडून जामखेडच्या दिशेने आलेली अर्टिगा कार क्रमांक MH 16 DM 5893 ही राऊत मैदानाजवळ कावेरी हॉटेलपाशी डिव्हायडरला धडकली आणि कारला आग लागली. आगीमध्ये २८ वर्षीय महादेव दत्ताराम काळे आणि ३५ वर्षीय धनंजय नरेश गुडवाल हे दोघे जळून मृत्युमुखी पावले आहेत. गुडवाल हे जामखेड पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल होते.

दोघा जणांचा जळून अक्षरशः कोळसा

नगर जिल्ह्यात जामखेड शहरातील बीड रोडवरील नवले पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. रस्त्यावरील दुभाजकाला चारचाकी वाहन धडकले. त्यामुळे गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतला. गाडीतील दोघा जणांचा जळून अक्षरशः कोळसा झाला.

ही दुर्दैवी घटना आज, सोमवार २४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

जामखेड नगर परिषदेच्या आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तास पाणी मारले, मात्र तोपर्यंत गाडीने पूर्ण पेट घेतला होता.

‘किंग’ कोहलीचं वादळी शतक; पाकिस्तान संघाला चोपचोप चोपलं, भारताचा 6 गडी राखून शानदार विजय

0

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईमध्ये खेळला गेला. पाकिस्ताननं भारताला विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतान हा सामना 6 गडी राखत जिंकला आहे. ‘किंग’ कोहलीनं या सामन्यात दमदार फलंदाजी करत शतक ठोकलं.

भारताकडून फलंदाजी करताना पहिला धक्का पाचव्या षटकात 31 धावांवर असताना बसला. शाहीन आफ्रिदीने रोहितला फुलर लेन्थ बॉलने क्लीन बोल्ड केले. त्यानंतर 18 व्या षटकात 100 धावसंख्येवर दुसरा धक्का बसला आहे. फिरकी गोलंदाज अबरार अहमदने शुभमन गिलला क्लीन बोल्ड करत तंबूत पाठवलं. गिल 52 चेंडूत 7 चौकारांसह फक्त 46 धावा करू शकला. त्यानंतर अय्यरनंही त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र यानंतर तो आक्रमक फटका मारण्याच्या नादात बाद झाला.

पाकिस्तानची फलंदाजी

पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत 49.4 षटकांत 241 धावांची मजल मारली. मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी रचलेल्या शतकी भागिदारीनंतरही, भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या डावाला ब्रेक लावला. या सामन्यात मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी रचली. अक्षर पटेलनं रिझवानचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. रिझवानचं अर्धशतक चार धावांनी हुकलं. मग हार्दिक पांड्याने सौद शकीलला 62 धावांवर माघारी धाडलं. त्यामुळं 2 बाद 151 धावांवरून पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान ऑलआऊट झाली.

भारताची गोलंदाजी

गोलंदाजीत भारतीय संघासाठी मधल्या षटकांमध्ये कुलदीप यादवने वर्चस्व गाजवले. यादवने 9 षटकांच्या स्पेलमध्ये 40 धावा देत 3 विकेट घेतल्या. त्याने प्रथम फॉर्ममध्ये असलेल्या सलमान आगाची विकेट घेतली, जो फक्त 19 धावा करून बाद झाला. त्याने शाहीन आफ्रिदीलाही गोल्डन डकवर बाद केले आणि कुलदीपने नसीम शाहचा तिसरा बळी घेतला, ज्याने 14 धावा केल्या. त्याच्याशिवाय भारताकडून हार्दिक पंड्याने दोन विकेट घेतल्या. तर हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

छत्रपतींच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळावा राज्याचा युनेस्कोला प्रस्ताव; राज्य शिष्टमंडळ चार दिवसांच्या पॅरिस दौऱ्यावर

0

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली केल्या जात आहेत. यासाठी राज्याचं शिष्टमंडळ आज पॅरिसला रवाना झालंय. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ रवाना झालं असून त्यांना मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेत किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश व्हावा यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थलात समावेश करण्यासाठी प्रस्ताव दिलाय. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडुतल्या जिंजी किल्ल्याचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक पातळीवर सन्मान व्हावा यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय.

किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये व्हावा यासाठी प्रभावी आणि पूर्ण क्षमतेनं सादरीकरण राज्य सरकारकडून केलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्याचं शिष्टमंडळ पॅरिसला गेलं आहे. राज्य शासनाचा हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोकडे पाठवला. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंत्री आशिष शेलार यांनी आभार मानले आहेत.

राज्याचं शिष्टमंडळ २२ ते २६ फेब्रुवारी असे चार दिवसांच्या पॅरिस दौऱ्यावर गेले आहे. मंत्री आशिष शेलार यांच्यासह अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी, वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन यांचाही शिष्टमंडळात समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी सादरीकरण केलं जाईल. यामुळे किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होईळ. तसंच राज्यातील सांस्कृतिक वारशाचं महत्त्वही अधोरेखित होईल. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत गडकिल्ल्यांचा समावेश झाल्यास किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी संधी निर्माण होतील. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं आशिष शेलार म्हणाले.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उद्या मोठ्या घडामोडींचे संकेत; मुंबईत पडद्यामागे नेमके काय घडतंय ?

0

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे काँग्रेस चांगलीच बॅकफुटवर आल्याचे पाहावयास मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले होते, मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेसने या पराभवाला कारणीभूत असलेल्याना घरचा रस्ता दाखवला आहे. आता त्यांच्या जागी आलेल्या नव्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीदेखील स्वीकारली आहे. यानंतर आता सपकाळ यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून सोमवारी आणि मंगळवारी दिग्गज नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक बोलवली असून ही बैठक पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला उभारी यावी यासाठी मोठे निर्णय पक्षात घेतले जात आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आता मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसच्या हायकमांडकडच्या दिग्गज नेत्यांसोबत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत पक्ष कार्यालयात येत्या सोमवारी आणि मंगळवारी महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती समोर येत आहे. ही बैठक पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी महत्त्वाची आहे.

येत्या काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला आणि कार्यकर्त्यांना उभारी देणं हे काँग्रेसपुढे मोठं आव्हान असणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अपेक्षेपेक्षा फार विरुद्ध लागलेला आहे. त्यामुळे पक्ष संघटनेला आता पुन्हा उभं करण्याचं आव्हान महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नव्या नेतृत्वाकडे असणार आहे.

सलग दोन दिवस होणार बैठका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटना बांधणीला सर्वप्रथम प्राधान्य दिलं आहे. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बनताच आढावा बैठकांचे आयोजन केले आहे. राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची बैठक सोमवारी 24 फेब्रुवारी २०२५ ला दुपारी तर मंगळवारी 25 फेब्रुवारीला देखील दुपारी बैठक बोलावण्यात आली आहे.

या बैठकांमध्ये संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. पुढील कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे उद्या हॊणाऱ्या या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उद्या मोठ्या घडामोडींचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे या बैठकीवेळी सोमवारी मुंबईत पडद्यामागे नेमके काय घडतंय? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

धमक्या देऊन पैसे उकळणाऱ्या मर्सिडीज काय देणार?; गोऱ्हेंविरोधात आता ‘तात्या’ ही मैदानात!

0

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमादरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली लागली आहे. ठाकरे यांच्या पक्षात मर्सिडीज दिल्याशिवाय पद मिळत नव्हतं, असा गौप्यस्फोट गोऱ्हे यांनी केला आहे. त्यानंतर ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून नीलम गोऱ्हे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. ठाकरे गटाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी देखील नीलम गोऱ्हे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. पुण्यात देखील ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने नीलम गोऱ्हे यांच्या घरावर आक्रमकपणे निदर्शने व आंदोलन करण्यात आली.

यावेळी ”नीलम गोऱ्हे यांनी स्वतःची इनोवा गाडी आमच्या गट नेत्याकडून घेतली आहे आणि दोन वर्षानंतर त्यागाडीचे टायर आमच्या पदाधिकाऱ्याकडून घेतलेले आहेत. तसेच पक्षातील महिलांना कायम निलम गोऱ्हे यांना साड्या द्याव्या लागतात. त्यामुळे कायम मागणाऱ्याना कधी काही द्यायची सवय नाही आणि या काय मर्सिडीज देणार?” असं सवाल या आंदोलनकर्त्या महिलांनी उपस्थित केला.

तसेच नीलम गोऱ्हे यांना चारवेळा आमदारकी दिली उपसभापतीपद दिले. मग यांनी पाचवेळा मर्सिडीज दिली असेल तर पावत्या दाखवाव्या. बेछूट आरोप करून सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी बेताल बडबड करू नये. शिंदे गटात कोणी विचारत नाही. पुढील आमदारकी मिळवण्यासाठी काहीतरी बोलले पाहिजे म्हणून बोलताय का ? असा सवाल महिलांनी विचारला.

या आक्रमक आंदोलनानंतर ठाकरे गटाचे शहरातील नेते वसंत मोरे देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नीलम गोर्हे यांच्यावर टीका केली. वसंत मोरे म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विधानपरिषदेत “लक्षवेधी” मांडण्याच्या धमक्या देऊन पैसे उकळणाऱ्या तुम्ही उद्धव साहेबांना मर्सिडीज काय देणार? असा उपरोधक सवाल वसंत मोरे यांनी केला. तसेच, २०१२ पासून ते २०१७ पर्यंत शिवसेना नेत्याने तोंड उघडले तर ताई तुम्ही कुठे असाल?… असा सूचक इशारा देखील वसंत मोरे यांनी दिला.

विधानसभेची मिनी निवडणूक स्वबळास बाह्या सरसावल्या, पालिका निवडणूक स्वबळावर? महायुती पुन्हा झुंजणार?

0

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून महायुतीमध्ये आतापासूनच खटके उडायला सुरूवात झालीय. भाजप स्वबळावर लढणार असेल तर आम्हीही स्वबळावर लढायला तयार असल्याची डरकाळी शिवसेनेकडून फोडण्यात आलीय. बीएमसी आणि स्थानिक स्वराज्य संस्था भाजप स्वबळावर लढेल असं वाटत नाही, असे शिवसेना नेते मंत्री उदय सामंत म्हणाले. तर भाजप स्वबळावर लढले तर आम्हीही स्वबळावर लढू, असे संजय शिरसाट म्हणाले.

… तर आम्हीही स्वबळावर लढू, शिंदे शिवसेनेची घोषणा

सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांना महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे वेध लागलेत. महायुतीतील काही नेत्यांनी तर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर स्वबळावर लढू असं स्पष्ट केलंय. भाजप जर स्वबळावर लढणार असेल तर आम्हीही स्वबळावर लढू असं शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय. सगळ्याच महायुतीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांवर जोर देत ‘कार्यकर्त्यांचं म्हणणं आम्हाला मान्य करावं लागेल’ असे सांगितले आहे.

शिवसेनेच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा ताकदीनं दिलाय. तर महायुतीनं एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जावं, यावर भर देणार असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेकदा स्वबळाची भाषा वापरली जाते, असा टोला भाजपच्या नेत्यांनी मित्रपक्षांना लगावला.

निवडणुकीची घोषणा होण्या आधीच महायुतीत स्वबळाच्या बाह्या सरसावणं सुरू

मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. तर 22 जिल्हा परिषदांच्याही निवडणुका झालेल्या नाहीत. महापालिका निवडणुका कधी होणार? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र निवडणुकीची घोषणा होण्या आधीच महायुतीतील घटक पक्षांनी स्वबळाच्या बाह्या सरसावणं सुरू केलंय. या पार्श्वभूमीवर राज्यातील किती महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत.

कोणकोणत्या महापालिकांच्या निवडणुका रखडल्या?

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण – डोंबिवली, उल्हासनगर , भिवंडी-निजामपूर, वसई- विरार, मिरा-भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत.

एकंदरीतच महापालिकेच्या या निवडणुका म्हणजे एक प्रकारे विधानसभेची मिनी निवडणूकच मानली जातेय. आता ही निवडणूक स्वबळावर लढवली जाते की महायुती एकत्रितपणे लढते, हे लवकरच स्पष्ट होईल.

मराठा आंदोलनात उभी फूट, मनोज जरांगे पाटील एकाकी पडले, मराठ्यांचा कोल्हापुरातून नवा एल्गार

0

मराठा आरक्षणाच्या लढाईत आता मनोज जरांगे पाटील यांना एकटे पाडले जाणार आहे. राज्यभरातील जवळपास 42 संघटनांनी आज कोल्हापुरात राज्यस्तरीय परिषद घेत एकत्रितरित्या ही लढाई पुढे घेऊन जाण्याचा निर्धार केलाय. तर जरांगे यांच्या मराठवाड्यात दुसरी मोठी परिषद घेण्याची घोषणा आज करण्यात आली असून जरांगे पाटील यांना हा शह मनाला जात आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आता नव्याने ठिणगी पडली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांची ताकद एकवटली त्यातून सरकारवर दबावही निर्माण झाला. मात्र त्यांच्या बदलणाऱ्या भूमिकांमुळे नेमके हाती काय लागले? हा सवाल मराठ्यांना पडत आहे. त्यामुळे ज्या संघटनांनी एकत्र येत मराठा क्रांती मोर्चा सारखे आंदोलन उभे करून मराठी मनात हुंकार आणि स्फूर्ती भरली.

कोल्हापुरात 42 संघटनांची राज्यव्यापी बैठक

त्या संघटना आता पुन्हा एकवटल्या आहेत. शिवसंग्राम, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, राष्ट्रीय मराठा महासंघ, मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती ठोक मोर्चा अशा 42 संघटनांनी आज कोल्हापुरात राज्यव्यापी बैठक घेऊन पुन्हा एल्गार पुकारला आहे. त्यानुसार 10 मार्चपर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे.

मनोज जरांगे आणि आमच्या मागण्या वेगळ्या

जरांगे पाटील यांना सोडून इतर संघटना एकवटल्याने मराठा समाजात फूट पडल्याची चर्चा आहे. मात्र जरांगे आणि आमच्या मागण्या वेगळ्या असून आम्ही त्या पूर्ण करण्यासाठी लढणार असल्याचे ज्योती मेटे यांनी स्पष्ट केलंय.

परभणीत मोठी महापरिषद घेण्यात येणार

आजच्या बैठकीत आरक्षण,सारथी,अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्यासह दहा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यासाठी परभणीत मोठी महापरिषद घेण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांनी तिथे येऊन मराठा समाजाला काय देणार याचे उत्तर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

एकूणच पाहायला गेले तर जरांगे पाटील यांना बाजूला ठेऊन मराठा समाज आता आंदोलनात उतरताना दिसत आहे. त्यातून जरांगेंची समाजावरील पकड आता कमी होताना दिसत आहे. जरांगे यांना शह देण्यासाठी दुसरी परिषद परभणीमध्ये घेण्याचा निर्धार यात झाला आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाचे पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन तारीख ठरली, १० मार्चला अजित पवार अर्थसंकल्प मांडणार

0

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि. ३ ते २६ मार्च २०२५ या कालावधीत मुंबईत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्चला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

विधानभवन, मुंबई येथे झालेल्या विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार दि. ८ मार्च २०२५ रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर दि. १३ मार्च २०२५ रोजी होळीनिमित्त कामकाजास सुटी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस मंत्री गिरीष महाजन, शंभुराज देसाई, आमदार सर्वश्री प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, ॲड.अनिल परब, हेमंत पाटील, श्रीकांत भारतीय, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, डॉ.नितीन राऊत, रणधीर सावरकर, अमिन पटेल, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.

भारतीय तगड्या गोलंदाजी समोर पाकिस्तानची अडखळत सुरुवात चढउतारांच्या शर्यतीत 240 ची मजल

0

भारत पाकिस्तान सामना म्हटलं की सर्वत्र एकच चर्चा आणि तो माहोल हे अंगवळणी पडलेले असतानाच आज चॅम्पियन ट्रॉफी च्या निमित्ताने हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी दुबईतील मैदानात भिडत असताना सुरुवातीलाच दोन फलंदाज बाद करत भारतीय गोलंदाजांनी आपली पकड सामन्यावरती घट्ट रोवून ठेवली. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या विकेटसाठी पाकिस्तान संघातील दोन अनुभवी खेळाडू झगडत संघाला सावरण्याचे काम केलं परंतु अचानक भारतीय संघाच्या गोलंदाजांना लय मिळाला आणि जनार्दन पत्त्याचा बंगला कोसळावा तशी पाकिस्तानची फलंदाजांची फळी कोसळत गेली. भारत-पाकिस्तान सामन्यात तगडी लढत होण्याची शक्यता लक्षात घेता 240 चा आव्हान भारतासाठी तितकसं मोठं नाही. पाकिस्तान संघाचा कर्णधार रिझवान आणि शकील यांनी पाकिस्तानसाठी चांगले धावा जमा करण्याचं मोठं काम केलं असलं तरी शेवटी अन्य फलंदाजांनी योग्य साथ न दिल्याने पाकिस्तानला समाधानकारक आव्हान देणे अवघड झाले आहे.

भारतीय संघाचा विचार करता सलामीवीर शुभमन गील रोहित शर्मा विराट कोहली यांच्यासह दुसऱ्या फळीतील हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा के एल राहुल अक्षर पटेल अशी तगडी फलंदाजाची फळे लक्षात घेता काही क्षणांमध्ये भारतीय संघ पाकिस्तानला दारूण पराभव देऊ शकतो. ज्या उत्सुकतेने भारतीय क्रीडा रसिक या सामन्याचे आतुरतेने वाट पाहत होती त्या तुलनेत पाकिस्तान संघाची अडखळत झालेली सुरुवात कदाचित क्रीडाप्रेमींचे निराशा करणारे आहे. भारताचे सलामीचे फलंदाज आणि त्यांचा सध्याचा फॉर्म लक्षात घेता भारतासाठी हे आव्हान पार करणे म्हणावे तसे अवघड नाही.

पाकिस्तानच्या रिझवान-शकील जोडीने भारताला सतावलं, हार्षित राणाने केली चूक; हार्दिक भडकला

भारताने पाकिस्तानच्या धावगतीला काही अंशी खिळ लावली होती. पाकिस्तानच्या दोन विकेट स्वस्तात बाद झाल्या. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढला होता. पण तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सउद शकील यांनी सावध खेळी केली. धावांची गती भले कमी होती. पण पाकिस्तानने खेळ लांबवण्यात यश मिळवलं. रिझवान आणि सउद शकीलने तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. मोहम्मद रिझवानने या भागीदारीत 46 धावांचं योगदान दिलं. तर सउद शकीलने अर्धशतकी खेळी केली. एक क्षण असा आला की ही जोडी फोडली नाही तर टीम इंडियाचं टेन्शन वाढू शकतं. त्यामुळे रोहित शर्माने 33 वं षटक हार्दिक पांड्याच्या हाती सोपवलं. पण या षटकात हार्षित राणाने चूक केली.

मोहम्मद रिझवान आणि सउद शकील ही जोडी फोडण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न सुरु होता. दुसरीकडे, धावगती वाढवण्यासाठी मोहम्मद रिझवानने संधी घेण्याचा निर्णय केला. हार्दिक पांड्याच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानने उत्तुंग फटका मारला. हा चेंडू इतका वर चढला की सहज झेल असं वाटलं. या चेंडूखाली हार्षित राणा पोहोचलाही. पण झेल काही पकडू शकला नाही. यामुळे हार्दिक पांड्या चांगलाच संतापला. तसेच दोन धावा फुटकच्या आल्या.

रिझवान आणि शकील जोडी शेवटच्या षटकात तोडफोड करतील अशी धास्ती क्रीडाप्रेमींना वाटत होती. पण अक्षर पटेलने ही भीती दूर केली. 34 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद रिझवानला क्लिन बोल्ड केलं. यामुळे हार्षित राणाचा जीव भांड्यात पडला. कारण मोहम्मद रिझवानने आक्रमक खेळी करत धावा केल्या असत्या तर हार्षित राणावर सर्वच स्तरावरून टीकेचा भडिमार झाला असता.

अक्षर पटेलचा डायरेक्ट थ्रो! डोळ्याची पापणी लवण्याच्या आत इमामचा ‘करेक्ट कार्यक्रम’

भारताविरुद्ध दुबईच्या मैदानात रंगलेल्या हायहोल्टेज सामन्यात पाकिस्तानच्या संघाच्या सलामी जोडीनं संयमी सुरुवात केली. इमाम उल हक आणि बाबर आझम ही जोडी सेट झालीये असं वाटत असताना हार्दिक पांड्यानं पाकला पहिला धक्का दिला.बाबर आझमची विकेट घेत पांड्यानं सलामी जोडी फोडली. धावफलकावर ४१ धावा असताना पाकिस्तानच्या संघाला हा पहिला धक्का बसला. त्यानंतर फखर झमानच्या जागी संघात स्थान मिळालेल्या सलामीवीर इमाम उल हक याने मोठी चूक केली अन् आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. अक्षर पटेलनं क्षेत्ररक्षणाचा अद्भूत नजराणा पेश करत भारतीय संघाला त्याच्या रुपात दुसरी विकेट मिळवून दिली.

अक्षर पटेलची चपळाई, इमान उल हकचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’बाबर आझमची विकेट घेत पांड्यानं सलामी जोडी फोडली. धावफलकावर ४१ धावा असताना पाकिस्तानच्या संघाला हा पहिला धक्का बसला. त्यानंतर फखर झमानच्या जागी संघात स्थान मिळालेल्या सलामीवीर इमाम उल हक याने मोठी चूक केली अन् आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. अक्षर पटेलनं क्षेत्ररक्षणाचा अद्भूत नजराणा पेश करत भारतीय संघाला त्याच्या रुपात दुसरी विकेट मिळवून दिली.

अक्षर पटेलची चपळाई, इमान उल हकचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’बाबर आउट झाल्यावर एकेरी धाव घेण्याच्या नादात इमाम उल हकनं आपली विकेट गमावली. अक्षर पटेलनं डायरेक्ट थ्रो करत पाकिस्तानच्या दुसऱ्या सलामीवीराचा खेळ खल्लास केला. अक्षर पटेल हा एक ऑल राउंडर खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंगसह फिल्डिंगमध्ये तो कमालीच्या कामगिरीनं लक्षवेधून घेताना पाहायला मिळते. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याचा फिल्डिंगमधील तोरा अगदी पुन्हा पुन्हा पाहण्याजोगा होता. पाकिस्तानी खेळाडूच्या कुलदीप यावदच्या गोलंदाजीवर डायरेक्ट स्टंप टिपत त्याने इमामचा करेक्ट कार्यक्रम केला.

दहाव्या षटकात अक्षर पटेलनं साधला डाव, पाकला बसला दुसरा धक्का

अक्षर पटेल पाकिस्तानच्या डावातील दहव्या षटकात आपल्या क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम दर्जा दाखवून दिला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर इमामनं पुढे येऊन मिड ऑनच्या दिशेनं फटका खेळला. त्यानंतर त्याने लगेच एकेरी धाव घेण्यासाठी मैदान सोडले. पण बापू अर्थात अक्षर पटेल एकदम वेगाने चेंडूवर आला अन् त्याने स्टंपवर अचूक निशाणा साधत पाकिस्तानच्या संघाला दुसरा धक्का देत भारतीय संघाला मोठा दिलासा दिला. इमाम उल हक २६ चेंडूचा सामना करून अवघ्या १० धावांवर बाद झाला. त्याला एकही चौकार किंवा षटकार मारता आला नाही.

ठरलं पुन्हा भगव वादळ? कोल्हापुरात संघटनांची बैठक 42 मराठा संघटना एकत्र; 10 मागण्या अन् 10 दिवसांची मुदत

0

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील अद्यापही ठाम आहेत.तर दुसरीकडे आता मराठा समाज देखील चांगलाच आक्रमक झाला आहे. कोल्हापुरात मराठा समाज संघटनांची बैठक पार पडली, या बैठकीला मराठा समाजाचे अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर पुन्हा एकदा सरकारला इशारा देण्यात आला आहे. या बैठकीमध्ये राज्यातील तब्बल 42 मराठा संघटना सहभागी झाल्या होत्या.

मराठा समाजाच्या परिषदेसाठी दहा मार्चपर्यंत मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा, अन्यथा अधिवेशन काळातच आंदोलन छेडू, असा इशारा मराठा संघटनांच्या वतीनं राज्य सरकारला देण्यात आला आहे. लवकरच परभणीमध्ये मराठा समाजाची परिषद होणार आहे. सुरवातीच्या टप्प्यात सरकारसोबत चर्चेला प्राधान्य दिलं जाईल, मात्र दखल न घेतल्यास रस्त्यावरच्या लढाईचा मार्ग मोकळा असेल, असा इशारा यावेळी आंदोलक सुरेश पाटील यांनी दिला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आणि आमचं आंदोलन एकच असेल, मात्र आरक्षणाशिवाय अन्य काही मागण्या आम्ही करणार आहोत, मागण्या सरकारनं मान्य केल्याच पाहिजे अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलक ज्योती मेटे यांनी दिली आहे.

सरकारची डोकेदुखी वाढणार?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र तरी देखील हा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये, आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं आहे, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजातून या मागणीला मोठा विरोध होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा गुंता वाढला आहे. दुसरीकडे आता मराठा समाजानं पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशन काळात आंदोलन करू असं म्हटलं आहे. तसेच रस्त्यावर देखील उतरू असाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

काय आहेत मागण्या?

1) महाराष्ट्र शासनाने ओ. बी. सी समाजाला ज्या ज्या सोयी सवलती लागू केल्या आहेत. त्या जशाच्या तशा मराठा समाजाला सरसकट लागू करण्यात याव्यात.

2) हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गॅझेटनुसार महाराष्ट्र शासनाने आरक्षणाची अमंलबजावणी करावी

3) महाराष्ट्रामध्ये ओ. बी सी प्रमाणे एस. ई. बी. सी (मराठा समाज) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रतिपुर्ती करावयाच्या इतर शुल्काबाबतची सवलत द्यावी

4) महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालूका पातळीवर समिती गठण करून या समितीमध्ये मराठा समाजाच्या दोन प्रतिनिधींना समाविष्ट करून घ्यावे.

5) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या ओ बी सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्ती योजना मराठा समाजाला लागू करणे बाबत

6) महाराष्ट्रात ओ.बी.सी प्रमाणे एस. ई. बी. सी प्रवर्गातील युवक युवती करीता मोटर वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना लागू करणेबाबत

7) मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच शासन निर्णय यानुसार तपासून मागे घेण्यात यावेत

8) मराठा समाजाला एस. ई. बी. सी प्रवर्गा अंर्तगत 10% आरक्षण लागू केले आहे. सद्या ते न्यायप्रविष्ट आहे. ते राज्य शासनाने न्यायालयामध्ये आपली बाजू भक्कम मांडून आरक्षण टिकवावे

9) मराठा भुषण आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे फक्त मराठा समाजाला लागू करावे. तसेच व्याज परतावा व इतर कर्ज प्रकरणे वेळेत पुर्ण करण्यात यावेत.

10) अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम तातडीने चालू करावे.

11) महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे सवंर्धन करण्यात यावे.