Home Blog Page 160

आजची स्त्री निर्भयपणे व आत्मविश्वासाने जगते ही बाबासाहेबांची देणं आहे – प्राचार्या यशोधरा वराळे

0

मुंबई दि. ९ (रामदास धो. गमरे) “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील सर्वच स्तरातील महिलांच्या न्यायहक्कांसाठी हिंदू कोड बिल ११ एप्रिल १९४८ आणले होते परंतु नेहरू सरकारने त्या बिलास विरोध करून ते नाकारले म्हणून महिलांच्या न्यायहक्कांसाठी बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आज महिलांना मॅटरनिटी लिव्ह (प्रसूती रजा),वारसाहक्क, मतदानाचा अधिकार, ओळखहक्क, बारा तासांऐवजी आठ तासाची ड्युटी, बोनस, घटस्फोट घेण्याचा अधिकार, घटस्फोटानंतर पोडगी मिळण्याचा अधिकार, स्वतःच्या शरीरावर व पोटातील गर्भावर अधिकार तसेच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे सर्वच अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने मिळाले आहेत, अनिष्ट रूढी-परंपरांच्या बेड्या तोडून आपल्याला गुलामगिरीतून मुक्त केले म्हणूनच आजची स्त्री निर्भयपणे व आत्मविश्वासाने जगते ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची देणं आहे” असे प्रतिपादन प्राचार्या यशोधरा वराळे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्यक्ता या नात्याने बोलत असताना केले.

बौद्धजन पंचायत समिती संलग्न मध्यवर्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने जागतिक महिला दिन सुशीलाताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर प्रसंगी सूत्रसंचालन सरचिटणीस राजेश घाडगे व महिला मंडळ सरचिटणीस अंजलीताई मोहिते यांनी अत्यंत प्रभावीपणे व लाघवी शैलीत केले तसेच कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी प्रास्ताविक सादर करताना कार्यक्रमाचे ध्येय व उद्देश व त्यामागील बौद्धजन पंचायत समितीची भूमिका नमूद केली. प्रथमच रफी अहमद कीडवाई मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी योगायोगाने कार्यक्रमास उपस्थिती लावून त्यांनी आजकाल होणारे ऑनलाईन फ्रॉड, डिजिटल ब्लॅकमेलिंग, ऑनलाइन गेम्स, लोन याद्वारे होणारे सायबर क्राईम, आपण क्षणाक्षणाला सोशल मीडियावर पोष्ट, रिल्स, स्टोरी, स्टेटस अपलोड करत असल्याने सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेऊन घरफोडी, प्रवासात लूटमार, स्कीम-ऑफर देऊन फसवणूक कशी करतात याची माहिती, फोनचा अतिरेकी वापर यामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम म्हणून मुलं किती आणि कशाकरीता मोबाईल वापरतात याकरता पालकांनी घ्यायची खबरदारी, रात्री उशिरापर्यंत आपली मुलं जर का घराच्या बाहेर वावरत असतील.

वाईट संगत, गुन्हेगारी मित्रपरिवारात रमत असतील तर आपल्या मुलांची नावे भविष्यात पोलीस रेकॉर्डवर येऊ नये म्हणून पालकांनी वेळीच लक्ष राहून घ्यायची काळजी, माय भगिनींनी दागिने घालून बाहेर जाताना घ्यायची योग्य ती काळजी व काही वाईट प्रसंग घडलाच तर न भिता पोलीस स्टेशनमध्ये कश्या पद्धतीने तक्रार दाखल करायची, अनोळखी फोनवर कोणतीही माहिती, ओटीपी देऊ नये, सायबर गुन्हा झाल्याचे लक्षात आल्यास तात्काळ १९३० या नंबरवर संपर्क साधुन तक्रार करणे या सर्वांची तपशीलवार माहिती देऊन उपस्थितांना व अखिल महिलावर्गाला जगतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तद्नंतर प्रमुख पाहुण्या मनिषाताई आनंदराज आंबेडकर या मार्गदर्शनपर भाषणात “पुण्यातील स्वारगेट येथे घडलेला प्रसंग पुन्हा कुठे घडू नये याकरिता महिलांनी अबला न बनता सबला बनणे आवश्यक आहे स्वतःच्या मुलींना स्वसंरक्षणासाठी ज्यूडो, कराटे, मार्शल आर्टस् शिकवून निर्भयपणे प्रतिकार करण्यास शिकवले पाहिजे” असे सूचित केले.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणारे बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे यांनी ही शुभेच्छापर विचार मांडत असताना “आनंदराज आंबेडकर साहेब दिल्लीस असल्याने हजर राहू शकले नाही परंतु त्यांनी निश्चित केले आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतातील पहिले सात मजली स्मारक जे आता पूर्णत्वास येत आहे त्यातील एक संपूर्ण दालन हे महिलांना उद्योगाकरता उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तसेच शासकीय पातळीवर राबविण्यात येणाऱ्या योजना, GR यांचा महिलांना लाभ घेता यावा अधिकाधिक महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून उद्योजिका म्हणून नावारूपास यावयात याकरता प्रयत्न केला जाईल, एक शिष्टमंडळान अनेक उद्योजकांकडे जाऊन माहिती गोळा करून महिलांना सक्षम करण्यासाठी पुढील कामकाज करतील व त्यादृष्टीने कामास सुरवात ही करण्यात आली आहे” अशी माहिती देत सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या, सोबतच सुशीलाताई जाधव व काका खंडाळकर यांनी ही शुभेच्छापर विचार व्यक्त करून सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती मध्यवर्ती महिला मंडळाच्या सर्व कार्यकारिणी, व्यवस्थापन मंडळ, त्यांचे सदस्य, सभासद, विभागीय कार्यकारिणी, कार्यकर्ते, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या, विविध शाखांचे पंचपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून अंजलीताई मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

बचतगट प्रभागातून उत्कृष्ट सी.आर.पी. पुरस्काराने शुभांगी मोहिते सन्मानित

0

गुहागर दि. ९ (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ विमवी विभाग क्र. ३ या विभागाचे अध्यक्ष राजू मोहिते यांच्या सुविद्य पत्नी सौ. शुभांगी राजू मोहिते (विभाग क्र. ३ च्या मध्यवर्ती महिला मंडळाच्या कोषाध्यक्षा) यांना पंचायत समितीच्या वतीने बचतगट प्रभागातून उत्कृष्ट सी.आर.पी. पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गिमवी विभाग क्र. ३ मधून सौ. शुभांगी राजू मोहिते यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

माझगाव विभागातील विविध सामाजिक, धार्मिक बौद्ध संघटनांचा बोधगया मुक्ती आंदोलनास जाहीर पाठींबा

0

माझगाव दि. १० (रामदास धो. गमरे) बौद्ध धम्मियांचे श्रद्धास्थान महाबोधी महाविहाराचे (बोधगया, बिहार) संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात हवे परंतु अधिनियम बी.टी. १९४९ मुळे सदर महाविहार बौद्ध व हिंदू अश्या उभय धर्मियांच्या ताब्यात आहे, जे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १३, १४, १५, २५, २६ चे पूर्णतः उल्लंघन करणारे आहे तसेच अनुचित पद्धतीने बौद्धांच्या धार्मिक हक्कांवर अतिक्रमण करणारे आहे तरी असे अतिरेकी अधिनियम रद्द करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा (झोन – १), बौद्धजन पंचायत समिती गट क्र. ३, दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ, संयुक्त माझगाव, बौद्ध विकास तथा सामाजिक संघटना तसेच माझगाव विभागातील विविध सामाजिक व धार्मिक बौद्ध संघटनांच्या तसेच तमाम बौद्ध बंधू-भगिनींच्या वतीने दि. ९ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४:०० वाजता संविधान चौक, माझगाव येथे दक्षिण मुंबई अध्यक्ष भगवान तांबे, माझगाव सामाजिक संघटना अध्यक्ष यशवंत ओव्हाळ, सरचिटणीस सुरेश कांबळे, संदेश कांबळे, दीपक तांबे यांच्या नेतृत्वाखाली बोधगया मुक्ती आंदोलनाला जाहीर पाठींबा देत धरणा आंदोलन करण्यात आले.

सदर प्रसंगी भगवान तांबे व उपस्थित मान्यवरांनी बोधगया मंदिर कायदा – १९४९ हा अनुचित कायदा कश्याप्रकारे बौद्धांच्या माथी मारून बौद्ध धम्माचे खच्चीकरण करण्यात येत आहे यावर प्रकाश टाकीत सरकारने लवकरात लवकर अन्यायकारक अधिनियम बी.टी. १९४९ हटवून महाबोधी महाविहाराचा संपूर्ण ताबा बौद्घ धम्मास द्यावा असे सरकारला सूचित केले.

सरतेशेवटी सर्व आंदोलनकर्त्यांनी बोधगया मुक्ती आंदोलनास आपला जाहीर पाठिंबा दर्शवून सभा तहकूब करून सरकारी नियमानुसार शांततेत आपापल्या गंतव्यस्थानी प्रस्थान केले.

मोठी बातमी! आनंदाचा शिधा योजना अखेर बंद

0

राज्य सरकारची लोकप्रिय योजना आनंदाचा शिक्षा योजना आता बंद करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आली होती. त्या माध्यमातून सणाच्या दिवशी राज्यातील 1 कोटी 63 लाख लोकांना याचा लाभ मिळत होता.

आनंदाचा शिधाच्या माध्यमातून रेशनकार्डधारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होतं. ही योजना आता बंद करण्यात आली आहे.

 

पुण्यात 18 पालकांवर गुन्हा दाखल, शिक्षण विभागाची कारवाई; जाणून घ्या नेमकं घडलंय काय

0

RTE हा शिक्षणाचा हक्क कायदा आहे. या कायद्यांतर्गत पाल्याला शाळेत प्रवेश घेता येतो. यामध्ये खोटी माहिती दिल्यांतर्गत 18 पालकांवर कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून ही कारवाई झाली असून बावधन पोलीस स्टेशन गुन्हे नोंदवले आहेत.

हा प्रकार जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत माताळवाडी भुगाव येथे घडला होता. आरोपी पालकांनी त्यांच्या पाल्यांना आरटीई मधील प्रवेश घेण्यासाठी खोटा रहिवासी पुरावा सादर केल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागाने केलेल्या छाननीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

RTE म्हणजे काय? विद्यार्थ्यांना काय फायदा होतो?

RTE म्हणजे शिक्षणाचा अधिकार (Right To Education) कायदा आहे. हा कायदा 4 ऑगस्ट 2009 रोजी भारतीय संसदेने पारित केला होता. हा कायदा, बालकांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण मिळण्याची हमी दिली जाते. या अंतर्गत अनेक मान्यवर आणि मोठ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं.

RTE कायद्याची वैशिष्ट्ये काय?

हा कायदा, भारतीय संविधानाच्या कलम 21a अंतर्गत लागू करण्यात आला आहे.
या कायद्यानुसार, 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळते.
या कायद्यानुसार, वंचित गटातील आणि कमकुवत घटकातील 25% मुलांना इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश दिला जातो.
या कायद्यानुसार, कोणत्याही मुलाला कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा खर्च देण्यास जबाबदार असणार नाही.
या कायद्यानुसार, सरकार सर्व शाळांना आर्थिक सहाय्य देत आहे.

RTE कायद्याचे फायदे काय?

या कायद्यामुळे मुलांना मोफत शिक्षण मिळते.
या कायद्यामुळे मुलांना शाळेचा पोशाख, वाहतूक इत्यादी सुविधा मिळतात.
या कायद्यामुळे मुलांचे करिअर घडवता येते.

‘वाल्मिक अण्णांना…’, 6 वेळा ‘आवादा’कडे मागितली 2 कोटींची खंडणी

0

वाल्मिक कराडने आवादा कंपनीकडे एक वेळा नाही तर तब्बल सहा वेळा खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. दोषारोपपत्रात कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या जबाबामधून ही माहिती समोर आली आहे. आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या जबाबात वाल्मिक कराडने सहा वेळा खंडणी मागतिल्याचा उल्लेख आहे. सुनील शिंदे यांचा जबाब हाती आला आहे.

‘जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली

वाल्मिक कराडबरोबरच सुनील शिंदेंना त्यांच्या टोळीतील इतर गुंडांनीही धमकावलं होतं. सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांना, ‘तुला बघून घेईन. जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे. वाल्मिक कराडने आवादा कंपनीचे अधिकारी असलेल्या सुनील शिंदेंना कितीवेळा आणि कधी कधी धमकी दिलेली याचा तपशील खालीलप्रमाणे –

पहिल्यांदा खंडणी कधी मागितली?

पहिल्यांदा वाल्मिक कराडने 28 ऑगस्ट 2024 रोजी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून खंडणी मागितली होती. फोनवरून वाल्मिक कराडने, “तुम्ही परळीत येवून भेटा नाही तर काम बंद करा,” अशा शब्दांमध्ये अधिकाऱ्यांना धमकावलं होतं.

दुसरी खंडणी फोनवरुन मागितली

दुसऱ्यांदा वाल्मिक कराडने 11 सप्टेंबर 2024 फोनवरून खंडणी मागितली. यावेळी, “तुमचे बीड जिल्ह्यात कुठे कुठे काम चालू आहे. याची मला माहिती आहे. तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या,” असे वाल्मिक कराड फोनवरून म्हणाला होता.

ऑफिसमध्ये धमकावत तिसऱ्यांदा केली खंडणीची मागणी

तिसऱ्यांदा खंडणी 8 ऑक्टोबर 2024 रोजी परळी येथे वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि माझे सहकारी शिवाजी थोपटे यांची परळीतील जगमित्र कार्यालयात भेट झाली होती. “प्लांट सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी रुपये द्या. नाहीतर जिल्ह्यात कुठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही,” अशी धमकी यावेळी देण्यात आल्याचं शिंदेंनी जबाबामध्ये सांगितलं आहे.

सुदर्शन घुलेच्या माध्यमातून चौथ्यांदा केली मागणी

सुदर्शन घुलेच्या माध्यमातून चौथ्यांदा खंडणी मागण्यात आल्याचं शिंदेंनी सांगितलं आहे. 26 नोव्हेंबर 2024 रोजी कंपनीत येवून सुदर्शन घुलेने, “वाल्मिक अण्णांनी सांगितलेले दोन कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही,” अशा शब्दांमध्ये धमकावलं होतं.

पाचव्यांदा खंडणी मागताना वाल्मिक म्हणाला, ‘चालू ठेवलं तर…’

पाचव्यांदा खंडणी मागताना काय झालेलं याबद्दलचा घटनाक्रम शिंदेंनी सांगितला. “29 नोव्हेंबर 2024 रोजी विष्णू चाटेला 11:30 च्या सुमारास कॉल केला होता. त्यावेळी वाल्मिक अण्णा बोलणार आहेत. कराड म्हणाला, “अरे ते काम बंद करा. चालू ठेवलं तर वातावरण गढूळ होऊन बसलं. ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितले आहे. त्या परिस्थितीत काम बंद करा आणि तुम्ही पण तिथून निघून जा काम चालू कराल तर याद राखा,” असं म्हटलं होतं.

29 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी एक वाजता सुदर्शन घुले मसाजोग येथे कंपनी ऑफिसमध्ये आला होता, असं शिंदेंनी सांगितलं. “वाल्मिक अण्णांनी ठेवलेली डिमांड तुम्ही लवकर पूर्ण करा. अण्णा आज केजमध्ये येणार आहेत. त्यावेळी त्यांची भेट घ्या, असे धमकावून ऑफिसमधून निघून गेला होता,” अशी माहिती शिंदेंनी दिली.

सहाव्यांदा खंडणी मागताना थेट संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी

सहाव्यांदा खंडणी मागताना 06 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले कंपनी ऑफिसमध्ये आला. सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करून मारहाण केली. थोपटे यांना दोन कोटी रुपये खंडणी द्या नाहीतर कंपनी बंद करा धमकी दिली. यावेळी संतोष देशमुख यांनी कंपनी बंद करू नका असे येऊन सांगितले. त्यावेळी, “तुला बघून घेतो. तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली,” असं शिवाजी थोपटे यांनी सुनील शिंदे यांना सांगितलं होतं.

2100 रूपयांच्या प्रश्नावर अजितदादा भडकले; म्हणाले, ‘माझ्याशी वाद घालू नका, जाहीरनामा दाखवा’, व्हिडिओ व्हायरल

0

महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प काल (सोमवारी) अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या 2025-26 च्या खर्चासाठी अर्थसंकल्पामध्ये 36000 कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजनेतून मिळाणाऱ्या रक्कम वाढीच्या घोषणेची प्रतीक्षा राज्यातील लाडक्या बहिणींना होती. ती घोषणा मात्र अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्यासंदर्भातील घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अजित पवारांना पत्रकारांनी योजनेमधील रकमेत वाढ करण्याबाबत केलेल्या प्रश्नांवर अर्थमंत्री भडकल्याचं दिसून आलं.

नेमकं काय घडलं?

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला विजय मिळाल्यानंतर लाडकी बहिण योजनेच्या हप्त्यात 1500 रुपयांवरून 2100 रुपये वाढ करण्याबाबत जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाबाबत अर्थसंकल्पानंतर पत्रकारांनी विचारले असता अजित पवार पत्रकारांवरतीच भडकल्याचे दिसून आले. मला जाहीरनामा दाखवा असं म्हणत अजित पवारांनी थेट पत्रकारांना आव्हान दिले आहे. त्यानंतर आता 6 नोव्हेंबर 2024 रोजी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत केलेल्या घोषणेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावरती व्हायरल होताना दिसत आहे.

विधानभवनाच्या आवारात पत्रकार आणि अजिदादांची प्रश्न, उत्तर

पत्रकार : सत्तेत आलो तर 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते.
अजित पवार : हो, आम्ही सत्तेत आलोय ना. आम्ही 2100 रुपये देण्यासंदर्भात आम्ही नाही म्हटलेलं नाहीये.
पत्रकार : जाहीरनाम्यात सत्तेत आल्यानंतर लगेच देऊ असे म्हटले होते.
अजित पवार : लगेच देऊ असे म्हटलेले नव्हते. आहो माझं, एक उदाहरण दाखवा, दाखवा जाहीरनामा. वाद घालू नका, आम्ही सांगितले होते, पुढं आमचं सरकार आल्यावर , आम्ही त्याच्यामध्ये वाढ करू. आत्ता आमचं सरकार आलेलं आहे. पहिल्यांदा आम्हाला आर्थिक शिस्त लावायची होती. ती आर्थित शिस्त लावण्याचं काम आम्ही करत आहोत. ज्या योजना आम्ही दिलेल्या होत्या, वीज माफीची आणि लाडक्या बहिणींची त्या योजनांना भरीव अशा प्रकारची तरतुद आम्ही अर्थसंकल्पात केलेली आहे.
पत्रकार : विरोधक म्हणत आहेत, दादांनी वादा पाळला नाही.
अजित पवार : माझे एक विधान दाखवा की, मी हा वादा केला होता.

सुनील तटकरेंनी पत्रकार परिषदेत वाचलेला जाहीरनामा

6 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा घोषित केला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, आम्ही लाडक्या बहिणींना सध्या 1500 रुपये देत आहोत. सत्ता आल्यास त्यामध्ये 600 रुपयांची वाढ करून ते आम्ही 2100 रुपये करू, त्यामुळे आता यावरून विरोधक देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी किती तरतूद?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना 33 हजार 232 कोटी रुपये निधीचे वाटप करण्यात आले. सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनुदानाचा उपयोग करणाऱ्या महिला गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेणार असं सरकारनं म्हटलंय.

इंजमाम उल हक आणि सकलैन मुश्ताक तर ‘हिंदू’! स्वतः सांगितले भारतात कुठे राहत होते पूर्वज, कपिल शर्मासोबत असे आहे खास कनेक्शन

0

पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इंजमाम ऊल हक आणि दिग्गज फिरकीपटू सकलैन मुश्ताक या दोघांनी त्यांच्या संघासाठी जीवाचे रान केले आहे. त्यांनी अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. इंजमामची खेळी नेहमी स्मरणात राहण्यासारखी आहे. तर दुसरीकडे सकलैन मुश्ताकच्या फिरकीने दिग्गज फलंदाजांना रडकुंडीला आणले होते. निवृत्तीनंतर दोघांच्या वक्तव्याने सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा झडत आहे. दोघांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात या दोघांनी भारताशी असलेला संबंध जाहीर केला आहे. त्यांनी त्यांचे पूर्वज भारतीय असल्याचे सांगितले . तर कपिल शर्माशी त्यांचे कनेक्शन काय हे पण सांगितले.

सकलैन मुश्ताक हिंदू?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत सकलैन मुश्ताक याने मुलाखतीत त्याचे कुटुंबिय हे मुळचे भारतीय असल्याचा दावा केला आहे. त्याचे कुटुंबिय हे अमृतसर येथील असल्याचे तो सांगतो. त्याच्या आजोबाचे नाव रूड सिंह होते, अशी माहिती तो देतो. आपण पूर्वी हिंदू होतो. त्यानंतर मुसलमान झालो. लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा हा सुद्धा आपल्याच गावचा असल्याचे सकलैन म्हणाले. कपिल शर्मा याचे आणि आपले गाव एकच आहे. दुबईत कपिलला भेटलो, तेव्हा आपण ही गोष्ट त्याला सांगितल्याचे सकलैन याने या मुलाखतीत सांगितले.

इंजमाम तर हरियाणातील हिस्सारचा

याच व्हिडिओत इंजमाम ऊल हक यांने पण त्याच्या कुटुंबियाचे भारतीय कनेक्शन समोर आणले. हरियाणातील हिस्सार हे त्यांच्या पूर्वजांचे गाव असल्याचे तो म्हणाला. 2004-05 दरम्यान आपण भारतात आलो होतो. आपले वडील हे हिस्सार येथूनच पाकिस्तानमध्ये आले होते. हांसी हे आमचे मूळ गाव आहे. मला या गावी जाण्याची इच्छा होती. पण कामाची व्यस्तता म्हणा अथवा सुरक्षेचे कारण मला तिथे जाता आले नाही, असे ही तो म्हणाला.

माझ्या कुटुंबातील काही लोक तिथे गेले होते. तिथल्या लोकांनी त्यांचे अभूतपूर्व असे स्वागत केले. आम्ही ज्या घरी राहायचो, तो अजूनही शाबूत आहे. चांगल्या स्थितीत आहे. आमचा मोठा वाडा होतो. तो ही आहे, थोडा लहान झाला आहे, पण सुस्थितीत आहे. गावातील लोकांनी माझ्या कुटुंबातील सदस्यांना प्रेमाची वागणूक दिल्याचे इंजमाम याने आवर्जून सांगितले.

PM नरेंद्र मोदी मॉरिशसच्या भेटीवर, 1998 रोजीच्या दौर्‍याची का होतेय चर्चा, पंतप्रधानांनी जागवल्या खास आठवणी

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून मॉरीशस दौर्‍यावर आहेत. भारत आणि मॉरीशस या दोन देशात ऐतिहासिक, सांस्कृतिक, भाषिक संबंध आहेत. मॉरीशसला मिनी इंडिया असे पण म्हटले जाते. मॉरीशस आणि भारताचे खास आणि जुने संबंध आहेत. पंतप्रधानांनी 1998 मध्ये पहिल्यांदा मॉरीशसचा दौरा केला होता. या खास दौऱ्याची छायाचित्र समाज माध्यमांवर पुन्हा प्रकटली आहे. मोदी आर्काईव्हच्या माध्यमातून एक पोस्ट पण समोर आली आहे. एक शतकापूर्वी आपले पूर्वज, मजूर म्हणून मॉरीशसमध्ये आले होते. ते आपल्यासोबत तुलसीदास यांचे रामायण, हनुमान चालीसा आणि हिंदी भाषा घेऊन गेले होते, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यात अजून एक 27 वर्ष जुना अध्याय जोडला गेला आहे. 1998 मध्ये पीएम नरेंद्र मोदी पहिल्यांदा मॉरीशसमध्ये गेले होते.

काय आहेत आठवणी

पंतप्रधान मोदी हे मॉरीशस दौऱ्यावर पहिल्यांदा गेले, त्यावेळी ते कोणत्याही सार्वजनिक पदावर नव्हते. ते तेव्हा भाजपासाठी कार्यरत होते. 2 ते 8 ऑक्टोबर 1998 दरम्यान मोदी हे जागतिक रामायण संमेलनासाठी मॉरीशस येथे गेले होते. त्यावेळी ते भाजपचे राष्ट्रीय महासचिव म्हणून कार्यरत होते. त्यांनी तिथे प्रभू श्रीरामांचा आदर्श, मूल्य आणि जीवनकार्यावर प्रकाश टाकला होता. रामायण, भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांना एका सांस्कृतिक धाग्यात बांधते, याचे त्यांना सदोहरण स्पष्ट केले होते.

पहिल्याच दौऱ्यात लोकांची जिंकली मनं

1998 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या लोकांची मनं जिंकली. त्यांनी स्थानिक नेते, लोकं यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या इच्छा, आकांक्षा समजून घेतल्या. त्यांनी त्यावेळी मित्र जमवले. तेव्हाचे राष्ट्रपती कासम उतीम, पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम आणि विरोधी पक्षनेते अनिरुद्ध जगन्नाथ यांच्यासह अनेक मुख्य नेत्यांशी त्यांची पक्की मैत्री झाली. नंतरचे पंतप्रधान पॉल रेमेंड बेरेन्झर यांच्याशी सुद्धा त्यांची भेट झाली होती.

महात्मा गांधीचा मोठा प्रभाव

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातून प्रेरणा घेत मॉरिशस स्वतंत्र झाले. या दौऱ्या दरम्यान मोदी यांनी सर शिवसागर रामगुलाम वनस्पती उद्यानात राष्ट्रपिता सर शिवसागर रामगुलाम यांना आदरांजली वाहिली. 12 मार्च 2015 रोजी मॉरिशस येथील जागतिक हिंदी सचिवालय भवनाच्या उद्धघटनावेळी मोदी यांनी विचार मांडले. त्यांनी महात्मा गांधी आणि मॉरिशस यांच्या दृढ संबंधांवर प्रकाश टाकला. त्यांनी महात्मा गांधी यांचा प्रभाव देशाबाहेर सुद्धा असल्याचे म्हटले.

त्यांनी मॉरिशस येथील हिंदुस्थानी या दैनिकाचे हे संबंध मजबूत ठेवण्याविषयी कौतुक केले. या दैनिकांनी मॉरिशसला एकता आणि भाषांमधील सौदार्ह जपण्यासाठी मदत केल्याचे ते म्हणाले. महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत गुजराती, हिंदी आणि इंग्रजी या त्रिसूत्रीवर हे दैनिक प्रकाशित होत असल्याचे त्यांनी भरभरून कौतुक केले. त्यामुळे मॉरिशसमध्ये सर्व भाषीय समूह, गट यांच्यामध्ये एकजिनसीपण आल्याचे मोदी म्हणाले.

आपल्या पहिल्या दौर्‍यात 17 वर्षांपूर्वी मोदी यांनी 12 मार्च 2015 रोजी गंगा तलाव येथे गंगा मातेला अर्घ्य अर्पण केले. 2015 मध्ये मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त त्यांनी या राष्ट्राला संबोधित केले. आंब्याचे उत्पादन चांगले झाले की नाही पाहण्यासाठी अडीतील सर्वच आंबे तपासण्याची गरज नाही. त्यातील दोन-चार आंबे चाखून पाहिले तरी कळते, तसेच मॉरिशस पाहिल्यानंतर भारताची झलक दिसते असे ते म्हणाले. मॉरिशसवरूनच भारताचा परिचय, ओळख दिसून येते, अशी स्तूतीसुमनं त्यांनी उधळली.

पूर्णत्वाची कडी लागलेल्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध की चुरशीची? उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका महत्त्वाची

0

मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूर भागातील शेतकरी वर्गांसाठी एकमेव सुरू असलेला अन अत्याधुनिक अद्ययावत तंत्रज्ञानाची पूर्णत्वाची कडी (को-जन इथेनॉल) लागलेल्या श्री संत तुकाराम साखर कारखान्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे परंतु महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार प्रचंड मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात आलेल्या अर्जामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल की चुरशीची होईल ही सध्या चर्चा पाचही तालुक्यांमध्ये सुरू झाले आहे. श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विद्यमान अध्यक्ष यांनी कारखान्याची स्थापना केल्यापासून कायमच सर्वपक्षीय नेतृत्वांना संधी देत या कारखान्याची वाटचाल उल्लेखनीय स्तरावर ती नेण्याचे काम केले आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये सर्व संचालकांनी अर्ज दाखल केल्याने अन त्यातच विद्यमान 3 आमदारांपैकी पात्र सुनील शेळके यांच्यासह अन्य दोन उमेदवारांच्या प्रतिनिधींनी या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यामुळे यंदाच्या निवडणुकीकडे नव्याने लक्ष लागले आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा ऊर्फ नानासाहेब नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांच्यासह बहुतांश विद्यमान संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध की चुरशीची होणार? अशी चर्चा सुरू झाली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये विद्यमान अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान संचालकांनी सलग पाच वर्षे केलेल्या कामगिरी वरती शेतकरीवर्ग खुश असला तरी सुद्धा नव्या बदलत्या राजकीय समीकरणांनुसार या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूरचा अंतर्भाव आहे. मावळमध्ये आमदार सुनील शेळके, मुळशीमध्ये शंकर मांडेकर तर शिरूरमध्ये माऊली कटके असे तीन आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आहेत. त्यांच्या वतीने नव्या समीकरणांची जुळवणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच श्री.संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाल्यापासून संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांच्या वतीने कायमच निवडणुकीमध्ये 70- 30 असा फॉर्मुला राबवण्यात आला आहे आणि आजपर्यंत तो यशस्वीही झाला असल्याची जाणीव सर्व शेतकरी वर्गांना आहे; परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र याबद्दल त्या समीकरणाचा कस लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अतितटीच्या लढतीमध्ये चिंचवडचे आमदार शंकर जगताप व खेडचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाबासाहेब काळे यांच्या भूमिकाही महत्वाच्या आहेत. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे वर्चस्व असल्याने स्वतः अजित पवार यांनी या निवडणुकीत गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून, तीनही आमदारांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोन आमदार नियमात बसत नसल्याने त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे अर्ज दाखल केले आहेत.

तब्बल २२ हजार मतदारसंख्या

मावळ तालुक्यात तळेगाव-वडगाव मतदार संघ २ हजार २१५, सोमाटणे-पवनानगर मतदार संघात ३ हजार २१ असे एकूण ५ हजार २३६ मतदार आहेत. पौड-पिरंगुट ३ हजार ५४६, हिंजवडी-ताथवडे ३ हजार ३०८ असे एकूण ६ हजार ८५४ मतदार आहेत व अन्य असे एकूण २२ हजार ९१७ सभासद आहेत.

गटक्रमांक -1.                 -23

गट क्रमांक -2                  -18

गट क्रमांक -3                  -29

गट क्रमांक – 4                 -41

गट क्रमांक -5                  – 37

महिला राखीव                    -23

अनुसूचित जाती जमाती       -9

इ मा व                            – 37

भ. वि. जाती जमाती            -9.                                   एकूण अर्ज                       230

 

अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

राज्यातील सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मावळ, मुळशी, शिरूर तीन ठिकाणी त्यांचे आमदार असून हवेली तालुक्यात (चिंचवड) मित्र पक्ष भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे निवडणूक लावायची किंवा बिनविरोध करायची, यासाठी अजित पवार यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विकास कामांना प्राधान्य देण्याची हातोटी आहे.सहकार क्षेत्रात त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांच्या आदेशाने मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कारखान्याच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी अजित पवार जो निर्णय घेतील तो आमच्या तीनही आमदारांसह सर्व पदाधिकाऱ्यांना मान्य राहील.

 – सुनील शेळके, आमदार, मावळ