Home Blog Page 158

आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत ‘इंडिया’च्या खेळाडूंची छाप वरुण चक्रवर्तीचा धमाका 16 स्थानांची उडी घेत या क्रमांकावर विराजमान

0

आयसीसीने बुधवारी 12 मार्चला नवी रँकिंग जाहीर केली आहे. या एकदिवसीय क्रमवारीत कर्णधार रोहित शर्माला फायदा झाला आहे. तर विराट कोहली याची एका स्थानाने घसरण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला मिस्ट्री स्पिनर म्हणून गेल्या काही महिन्यात आपली छाप सोडणाऱ्या वरुण चक्रवर्ती याने तर धमाका करत आपला दबदबा कायम ठेवला आहे. वरुणला रँकिंगमध्ये तगडा फायदा झाला आहे. वरुणने नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. वरुणने गेल्या आठवड्यात तब्बल 100 स्थानांपेक्षा अधिक मोठी झेप घेतली होती. वरुण आता ताज्या आकडेवारीनुसार कुठे आहे? हे जाणून घेऊयात.

वरुणचा धमाका

वरुण चक्रवर्ती आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे.वरुण आणि वेगवान गोलंदाज मोहम्मदशमी या दोघांनी भारतासाठी प्रत्येकी 9-9 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वरुणने शमीच्या तुलनेत कमी इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत साखळी फेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत आणि न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सान्यातही चिवट बॉलिंग केली होती. वरुणला त्याचाच फायदा वनडे रँकिंगमध्ये झालाय.

वरुण कितव्या स्थानी?

वरुण आता आयसीसी वनडे रँकिंगमध्ये 402 रेटिंग पॉइंट्ससह थेट 80 व्या स्थानी पोहचला आहे. वरुणने 16 स्थानांची झेप घेतली. वरुण आता चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयपीएलमघ्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. वरुण आयपीएलच्या 18 व्या मोसमात कोलकाताकडून खेळणार आहे. वरुणने गेल्या हंगामात 15 सामन्यांमधील 14 डावांमध्ये 21 विकेट्स घेतल्या होत्या.

वरुणची एकदिवसीय कारकीर्द

वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून पदार्पण केलं. त्यानंतर वरुणची अखेरच्या क्षणी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झाली. वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफीत मिळालेल्या संधीचं सोनं करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वरुणने आतापर्यंत 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 10 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे वरुणने एकदा 5 विकेट्सही घेतल्या. तसेच वरुणने 18 टी 20i सामन्यांमध्ये 33 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवलाय.

संतोष देशमुख प्रकरणाची पहिली सुनावणी; वाल्मिकचा उतरला माज, कोर्टात आकाला पाहून चेलेही हादरले

0

बीड:  मस्सोजाग गावचे सरपंचसंतोष देशमुख हत्येने संपूर्ण राज्य हादरलंय. या हत्येप्रकरणी आज केज जिल्हा व सत्र न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडली. आता याप्रकरणातील पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे. हत्येप्रकरणी सीआयडीचं दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरची ही महत्वाची सुनावणी पार पडली. सरकारी वकीलांकडून 26 तारखेपर्यंत मुदत देण्याची मागणी करण्यात आली. 15 दिवसानंतर पुन्हा ही सुनावणी होणार आहे. यावेळी या प्रकरणातील वाल्मिक कराडसह सर्व आरोपी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणीसाठी उपस्थित होते. सुनावणीच्या वेळी वाल्मिक कराडने हात जोडून उभा होता.

आरोपपत्रात पू्र्ण कागदपत्र दिले नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. आरोपींचा जबाब दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींचे जबाब हे बंद लिफाफ्यात आहेत. तो लिफाफा उघडून आरोपींना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली. त्याशिवाय, या प्रकरणातील डिजीटल पुरावे, व्हिडीओ, सीडीआर, ऑडिओ कॉल याची मागणी करण्यात आली.

कोर्टाचा प्रश्न आणि वाल्मिकचे उत्तर

दरम्यान या प्रकरणी सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उभे होते. ओळख परेडसाठी सर्वं आरोपीना व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायाल्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी या हत्या प्रकरणातील मास्टरमईंड वाल्मिक कराड हा हात जोडून उभा होता. यावेळी कोर्टाने आरोपपत्र मिळाले का, वकिल देण्यात आला का, याची विचारणा केली. त्यावर आरोपींनी हो असे उत्तर दिले.

कागदपत्राची पूर्तता करण्याचे आदेश

सरकारी वकिलांनी 26 मार्चपर्यंत मुदत देण्याची मागणी केली. खंडणी प्रकरणतील आरोपी ज्ञानेश्वर मुळे संदर्भांत काही आक्षेप असेल तर कोर्टात लेखी म्हणणे सादर करा अशी सूचना कोर्टाने केली. आरोपीच्या वकिलांनी कोर्टातअर्जाद्वारे सरकारी पक्षाच्या वकिलांकडून कागदपत्रांची मागणी केली. न्यायाधीशांनी तो अर्ज सरकारी वकिलांकडे देत कागदपत्राची पूर्तता करण्याचे आदेश दिले.

खटला फास्ट ट्रॅक मध्येच चालेल : धनंजय देशमुख

दरम्यान हा खटला फास्ट ट्रॅक मध्येच चालेल आणि या खटल्याच्या शेवटी मला जजच्या तोंडून या सर्व आरोपींना फाशी दिली जाणार आहे हेच ऐकायचं आहे असं मत धनंजय देशमुखांनी व्यक्त केलं.

संतोष देशमुखांचे सिंहगडाच्या पायथ्याच पुणे कनेक्शन; पत्नीने सांगितली पंचरंगी धाग्याची आठवण या मंदिराशी खास नातं!

0

बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र हादरला आहे. तीन महिने झाले तरी या प्रकरणत रोज नवे दावे, खुलासे होत आहे. नुकतीच तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये फोटो, व्हिडीओ, आरोपींचे, कुटुंबियांचे, साक्षीदारांचे जबाब आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख आणि लेक वैभवी देशमुखचा यांनी पोलिसांना दिलेला जबाब समोर समोर आला आहे. या जबाबात दोघींनीही संतोष देशमुखांचे पुण्याशी असलेले खास नाते सांगितले आहे.

मस्साजोग गावात असलेल्या आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातून संतोष देशमुखांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनी बंद पडू नये गावात रोजगार चालू राहावा, अशी सरपंच संतोष देशमुखांची इच्छा होती. त्यामुळे आरोपी ज्यावेळी खंडणी मागायला आले आणि मस्साजोगच्या वॉचमनला मारहाण केली.मारहाण करणाऱ्यांना मस्साजोग च्या तरुणांनी मारहाण केली आणि व्हिडिओ व्हायरल झाला. मारहाण झालेल्या तरुणांना बदला घ्यायचा म्हणून सरपंच संतोष यांचे अपहरण केले. संतोष देशमुख हे कायमच गावच्या भल्यासाठी झटत असे. पत्नी आणि लेकीच्या जबाबनुसार संतोष देशमुख हे गावातील दारुचे व्यसन सोडवण्यासाठी देखील प्रयत्न करत होते. गावातील ज्या लोकांना दारुचे व्यसन आहे त्यांना ते पुण्याला घेऊन जात असे.

संतोष देशमुखांच्या गळ्यात कायम पंचरंगी जाड धागा

पत्नी आश्विनी देशमुखने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, माझे पती गावातील व आजुबाजुच्या गावातील दारुचे व्यसन असलेल्या लोकांना दारु सोडवण्याकरीता पुण्यातील डोणजे येथील निळकंठेश्वर मंदिरात घेऊन जात असे. त्याठिकाणी तेथील पुजारी लोकांच्या गळ्यात पंचरंगी जाड धागा बांधत असतं. माझे पतीनेही त्याठिकाणी असा पंचरंगी जाड धागा गळ्यात घातला होता. ज्यावेळी मी माझ्या पतीचे प्रेत पाहिले त्यावेळी त्यांच्या गळ्यात पंचरंगी धागा नव्हता.p

संतोष देशमुख पत्नीला काय म्हणाले?

संतोष देशमुखांच्या हत्येच्या एक दिवस पत्नीला त्यांनी आपल्याला टेन्शन आल्याचं सांगितलं. “विष्णू चाटेचा फोन होता. वाल्मिक कराडच्या लोकांना मी त्या दिवशी कंपनीत जाताना अडवले म्हणून विष्णु चाटेने आज पुन्हा फोन केला होता. तुला आमच्या आणि कंपनीच्यामध्ये पडायची काय गरज होती. आम्ही, वाल्मिक अण्णा आणि कंपनीवाले आमचं आम्ही बघून घेतलं असतं. तुला आता हे लई जड जाईल. तुला वाल्मिक अण्णा आणि आम्ही जिवंत सोडणार नाही असे तो म्हणत होता. त्यामुळे मला टेन्शन आलय.” असे माझ्या पतीनी मला सांगितले.

अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी; मंत्री आदिती तटकरेंकडून महत्त्वाची घोषणा

0

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली असून निधी वितरणाची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य रोहित पवार आणि वरूण सरदेसाई यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षिका यांनी पात्र उमेदवारांचे अर्ज भरले होते. त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी ३१.३३ कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे.

दरम्यान, या भत्त्याच्या वितरणाची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे आणि लवकरच अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना लाभ मिळेल असे मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले.

संतोष देशमुख प्रकरणात ट्विस्ट, कृष्णा आंधळेचा साथीदार कोण?ओळख पटवल्यानंतर ज्या प्रमाणे बाईक पळवली, त्यानुसार त्याला…

0

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृ्ष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून जवळपास 90 दिवसांपासून कृष्णा आंधळे फरार आहे. कृष्णा आंधळेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. या सीसीटीव्ही फूटेजमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची एकच लाट उसळली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. तर, कृष्णा आंधळे हा फरार आहे. कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख हत्याकांडातील नववा आरोपी आहे. सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर कृष्णाने आरोपींच्या मोकारपंती ग्रुपवर व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल केल्याचे समोर आले. आता कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. कृष्णा आंधळेचा घातपात झाल्याची भीती, संशय काही राजकीय नेत्यांनी व्यक्त केला होता.

संतोष देशमुख हत्या प्रकरण तपासात नवा ट्विस्ट…

समोर आलेल्या माहितीनुसार, एका मोटरसायकलवर कृष्ण आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास दिसल्याचा दावा करण्यात आला. कृष्णा आंधळेने कपाळी टिळा लावला होता. स्थानिकाने हटकल्यानंतर तो दुचाकीवरून पळून गेला असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

कृष्णा आंधळेचा साथीदार कोण?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळे नाशिक मध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. नाशिकमधील गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याचा काही लोकांनी दावा केला आहे. याची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून तपास सुरू केला आहे. कृष्णा आंधळेसोबत असणारा साथीदार कोण, याचीही चर्चा सुरू झाली आहे. कृष्णा आंधळेला हटकल्यानंतर त्याने बाईकवरून पोबारा केला. त्यावेळी कृष्णा आंधळेसोबत असलेला साथीदार हा स्थानिक असल्याची शक्यता आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाशिक कनेक्शन समोर आले होते. त्यामुळे वाल्मिक कराडशी संबंधित कोणीतरी कृष्णाला मदत करत असल्याचा संशय आहे. स्थानिकांनी कृष्णाची ओळख पटवल्यानंतर ज्या प्रमाणे बाईक पळवली, त्यानुसार हा त्याला स्थानिक रस्त्यांची अधिक माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृष्णासोबत आता त्याच्या साथीदाराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

‘राष्ट्रवादी’चा स्ट्राईक रेट जास्त बक्षीस म्हणून फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीला हे ‘मानाचंपान’ हे गिफ्ट मिळणार

0

मुबई : लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये महायुती बॅकफूटवर पडली. पण महायुतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार कमबॅक केलं. महाविकास आघाडीची मोठी गच्छंती झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक दिग्गजांना पराभव पचवावा लागला. विक्रमी बहुमत घेत महायुती सरकारने राज्यात सत्ता स्थापन केली. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. भाजप सर्वाधिक जागा मिळवून क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपचे वर्चस्व असणार आहे. विधानसभेत भाजपचे मोठे संख्याबळ असल्याने भाजप नेते राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. यानंतर आता विधानसभा उपाध्यक्ष पद देखील रिक्त असल्याने या पदावर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे पद शिवसेनेला की राष्ट्रवादीला मिळणार? यावरुन चर्चा रंगल्या आहेत. यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे. या पदावर राष्ट्रवादीच्या नेत्याची वर्णी लागण्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांच्या म्हणण्याप्रमाणे, निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त आहे. याचंच बक्षीस म्हणून की काय भाजप आता राष्ट्रवादीला विधानसभा उपाध्यक्ष पद देणार आहे. विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या कार्यकाळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांनी विधानसभा उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर आताचे राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहता पक्षाला भाजपकडून उपाध्यक्षपदाचा मान पुन्हा राष्ट्रवादीलाच देणार असल्याचे समजते. विधीमंडळ कामकाजाच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेचे उपाध्यक्ष पदावर निर्णय होणार असल्याची माहिती आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. धनंजय मुंडे बैठकीला हजेरी लावतील. या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागांसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच इतरही महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याचे समजते.

धंगेकर अजित पवारांबद्दल बोलले अन् महायुतीत भडका?; दिपक मानकरांनी इशारा देत अनेक गोष्टींचा खुलासा सगळंच काढलं

0

पुणे : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. धंगेकर यांनी शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केल्यानंतर महायुतीत वादाचा भडका उडाला आहे. आधी चंद्रकांत पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा रवींद्र धंगेकर यांना फैलावर घेतलं आहे.

‘अजित पवार ज्या दिवशी डोक्यावर पाय देतील त्यावेळी कळेल. दादांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. नाही तर एक दिवस तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही’, असं म्हणतं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांनी रवींद्र धंगेकर यांना इशारा दिला आहे.

‘आपल्याला वाटत होतं का? अजित पवार आणि भाजप एकत्रित येतील. मात्र, राजकारणात काहीही होऊ शकतं. अजितदादांना तर त्यांनी जेलच्या दारात नेऊन बसवलं होतं. अजित पवारांविरोधात ट्रकभर कागदपत्रं आहेत, असेही सांगितले जात होते. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अजित पवारांना सोबत घेऊन अर्थ खातंही देण्यात आलं आहे, त्यामुळे राजकारणात असं काही नसतं’, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी अजित पवार यांच्यावर केली होती. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने धंगेकर यांच्या टिकेचा समाचार घेतला आहे.

‘रविंद्र धंगेकर यांनी स्वतः चार दरवाजे फिरून शिंदे गटात प्रवेश केला. अजितदादांबद्दल बोलण्याची त्यांची लायकी आहे का? आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले, त्यावेळी अजितदादांच्या पाया पडून विनंती करून राष्ट्रवादीची मदत घेऊन गद्दार निवडून आल, नंतर सरड्यासारखे रंग बदलायला लागले. पुण्यातील पब संदर्भात आंदोलन करायची, हप्ते वसूल करून नंतर आंदोलन स्थगित करायची. कॉर्पोरेशनच्या कामांमध्ये बिल्डर लोकांची कामं अडवून खंडणी वसूल करायची. लक्ष्मीरोडच्या सराफांकडून घर दुरुस्तीच्या नावाने कॉर्पोरेशनकडून बांधकामाला परवानगी घेवून सगळी सोन्या मारुती चौकातील बांधकामे बेकायदेशीर करून पैसे वसूल करायचे, वक्फ बोर्डाची मुसलमान समाजाची गणेश पेठेतील जमीन गिळंकृत केली’, असा घणाघात दिपक मानकर यांनी धंगेकर यांच्यावर केला आहे.

‘लाचलुचपत खात्यात त्यांच्या विरोधात १५० कोटी रुपयांची प्रॉपर्टी कुठून आली याची चौकशी सुरु आहे. क्राईम ब्रांच युनिट १ ला खंडणीचा गुन्हा प्रलंबित आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा या पडीक आमदारास दादांनी केलेल्या उपकाराची जाणीव नाही. वाटेल ते स्टेटमेंट करतात. दादांनी त्यांना दाखवले आहे. ज्या दिवशी बडगा दाखवतील त्यावेळी या बांडगुळाला त्याची लायकी समजेल. शिंदे गटात जाऊन स्वतःला भविष्यात पोलिसांकडून होणारा त्रास कमी होणार नाही. गृह खाते देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. याची जाणीव ठेवा. केलेली पापे इथेच फेडायची आहेत,’ असं देखील मानकर म्हणाले आहेत.

‘मुस्लीम समाजाला वापरून त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे. शिक्षण मंडळाच्या बालवाडी शिक्षिका, सेविका यांना कायम करण्यासाठी करोडो रुपये वसूल केले. त्या गरीब महिलांनी स्वतःचे दागीने मोडून पैसे दिलेत. काही महिला एजंट, काही कार्यकर्ते पैसे वसुलीसाठी नेमले होते. याची गृहमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी म्हणजे या भुरट्यांचे सत्य समोर येईल. ज्या काँग्रेस पक्षाने लोकसभा, विधानसभेला अनेकांना डावलून या धंगेकरांना उमेदवारी दिली. त्यांनी फक्त काँग्रेस कार्यकर्त्यांना वापरून आपला रंग दाखवला. हे कोणाचे होवू शकत नाही. मा. शिंदे साहेबांना यांचा अनुभव येईल. त्यावेळी बराच उशीर झालेला असेल. हे Who is Dhangekar नाही, तर He is Real Criminal Dhangekar हे सत्य तुमच्या समोर लवकरच येईल.’ असा समाचार मानकर यांनी घेतला आहे.

संतोष देशमुख हत्या फरार कृष्णा आंधळेचा ठावठिकाणा लागला; नाशिकमधील सीसीटीव्ही फूटेज आले समोर…

0

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या विषयी मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून जवळपास 90 दिवासांपासून कृष्णा आंधळे फरार आहे. कृष्णा आंधळेचा ठावठिकाणा लागला असल्याची माहिती समोर आली आहे. कृष्णा आंधळेचा सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची एकच लाट उसळली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. तर, कृष्णा आंधळे हा फरार आहे. कृष्णा आंधळे हा संतोष देशमुख हत्याकांडातील नववा आरोपी आहे. सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर कृष्णाने आरोपींच्या मोकारपंती ग्रुपवर व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल केल्याचे समोर आले. आता कृष्णा आंधळेंचा ठावठिकाणा लागला असल्याचे समोर आले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळे नाशिक मध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. नाशिकमधील गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याचा काही लोकांनी दावा केला आहे. याची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून तपास सुरू केला आहे.

बाईकस्वारासोबत आला कृष्णा आंधळे…

एका मोटरसायकलवर कृष्ण आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. कृष्णा आंधळेने कपाळी टिळा लावला होता. स्थानिकाने हटकल्यानंतर तो दुचाकीवरून पळून गेला असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

”एक लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या दहा योजना सुरु करता येतील”, शिंदे गटाच्या नेत्याचं विधान चर्चेत!

0

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडकी बहीण योजनेचा निधी १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र, अर्थसंकल्पात सरकारने यासंदर्भातील कोणतीही घोषणा केलेली नाहीये. त्यामुळे विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे.

रामदास कदम यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी लाडकी बहीण योजने बाबतही भाष्य केलं. एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना पण चालू करता येतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नेमकं काय म्हणाले रामदास कदम?q

”लाडकी बहीण योजनेचे बजेट पाहिले, तर ते ३० हजार कोटींपेक्षा जास्त आहे. या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला विकासाची वाटचाल करावी लागते. एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना पण चालू करता येतील”, असं ते म्हणाले.

पुढे बोलताना बोलताना, बजेट डोळ्यासमोर ठेऊन सगळ्या योजना सुरू कराव्या लागतात. अंथरुन पाहूनच पाय पसरावे लागतात, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. विरोधक यावर कशाप्रकारे व्यक्त होतात, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, आतापर्यंत कोट्यवधी महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच योजनेतील निकषांचे उल्लंघन करीत गैरफायदा घेणाऱ्या पाच लाख बहिणींना सरकारने अपात्रही ठरवले आहेत. महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. त्यामुळे आणखी काही महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

संतोष देशमुख पत्नीच्या जबाबातून धक्कादायक दावा उघड; हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुख पत्नीला काय बोलले?

0

संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे उघड होत आहेत. या हत्येतील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये दिसून आल्याचं समोर आले. त्यानंतर आता संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पोलीस जबाब समोर आला आहे. हत्येच्या आदल्या दिवशी पती संतोष देशमुख यांनी पत्नीशी काय संवाद साधला हे पत्नीने पोलिसांना सांगितले.

पोलीस जबाबात संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी म्हटलं की, वाल्मीक कराड आणि त्याचे लोक गुंड प्रवृत्तीचे असून ते आपल्याला मारून टाकतील असं संतोष यांनी सांगितले होते. विष्णू चाटेचा फोन आल्यानंतर संतोष देशमुख आणि पत्नी अश्विनी यांच्यात चर्चा झाली. वाल्मीक अण्णा, जिवंत सोडणार नाही असं चाटे म्हणाल्याचं संतोष देशमुखांनी पत्नीला सांगितले होते. ६ तारखेला अवादा कंपनीला खंडणी मागण्यासाठी कराड यांचे लोक सुदर्शन घुले गावात आले असताना त्यांच्याशी संतोष देशमुख यांचा वाद झाला. तेव्हापासून ते अस्वस्थ होते. त्यावेळी पत्नीने पती संतोष देशमुख यांना विचारले तेव्हा त्यांनी या विषयावर पत्नीशी संवाद साधला.

जी भांडणे झाली, ज्यांच्यासोबत भांडण झाले ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. वाल्मीक कराड हा विष्णू चाटेच्या माध्यमातून खंडणीसाठी धमकी देत होता. संतोष देशमुख यांनाही धमकी दिली होती. त्यातून संतोष देशमुख तणावात होते. त्यानंतर पुढच्या ३ दिवसात ९ तारखेला संतोष देशमुख यांचं अपहरण झाले. अपहरणानंतर त्यांच्यासोबत क्रूरपणे अमानुष छळ करून हत्या करण्यात आली. मात्र ६ ते ९ या ३ दिवसांच्या काळात संतोष देशमुख आणि पत्नीचे या विषयावर बोलणे झाले होते. विष्णू चाटेचा फोन पत्नीसमोर संतोष देशमुख यांना आला होता असं जबाबात पुढे आले आहे.

आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांचाही जबाब, ६ वेळा मागितली खंडणी

आवादा एनर्जी प्रा.लि या कंपनीच्या मस्साजोग येथील पवन ऊर्जा प्रकल्पाचे अधिकारी म्हणून सुनील शिंदे काम पाहतात. त्यांचाही सीआयडीकडून जबाब घेतला आहे. त्यात वाल्मीक कराडने एक दोन नव्हे तर तब्बल ६ वेळा खंडणी मागितली. फोनवरून न ऐकल्याने ६ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुलेसह गुंडांना तिथे पाठवले. परंतु संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केली. याचाच राग मनात धरून देशमुख यांची हत्या झाली असं त्यांनी जबाबात सांगितले आहे.