Home Blog Page 155

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली PM मोदी यांची भेट, ‘या’ तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

0

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर होते.

मोदींसोबत कोणत्या तीन मुद्द्यांवर चर्चा?

राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला असून, गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे. यादृष्टीने गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

नागपूर विमानतळाच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली असून, त्यात केंद्र सरकारसंदर्भातील काही विषयांबाबत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चर्चा केली. यामुळे विमानतळ कामातील अडसर आता लवकरच दूर होतील.

स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा, असाही एक विषय या चर्चेत होता. या सर्व बाबतीत सकारात्मक प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

वर्ल्ड ऑडिओ, व्हीज्युअल अँड एन्टरटेंटमेंट समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. 1 ते 4 मे या कालावधीत मुंबईत ही समिट होणार आहे. याचनिमित्ताने मुंबईत आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) सुद्धा स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी सुद्धा केंद्र सरकार निधी देणार आहे, त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

जयंत पाटील खरंच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार? स्वत:च माहिती देत म्हणाले….

0

विधानसभा निवडणुकीतील मविआच्या पराभवानंतर जयंत पाटील हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार अशी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे…अशातच जयंत पाटलांनी बुधवारी केलेल्या केलेल्या वक्तव्यामुळं जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय अशा चर्चांना उधाण आलंय…त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सारवासारव केली असली तरी सत्ताधाऱ्यांनी यावरून आपले अंदाज व्यक्त केलेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळं चर्चांना उधाण आलंय. शक्तिपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर विरोधकांकडून काढण्यात आलेल्या मोर्चात जयंत पाटील बोलत होते. यावेळी,मागील लोकसभा निवडणुकीवेळी राजू शेट्टींबाबत सदर्भ देत त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

माझी गॅरंटी घेऊ नका,माझं काही खरं नाही. तुम्हाला माझ्याबाबत शंका असल्यानं हमी देणं धोक्याचं आहे. राजू शेट्टींना आघाडीकडून उभं राहा असं त्यांना सांगत होतो. पण माझ्याबद्दल शंका होती, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले.

नाराज जयंत पाटील निर्णयाप्रत आलेत?

राष्ट्रवादीत 2023मध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटीलांनी मात्र शरद पवारांची साथ सोडली नाही. त्यामुळेच शरद पवार यांनी जयंत पाटलांकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद कायम ठेवलं. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचे 8 खासदारही निवडून आले. मात्र विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारली. तर शरद पवारांच्या पक्षाचं पानिपत झालं. त्यातच जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष असल्याचंही बोललं जातंय. या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या चर्चाही अधूनमधून सुरू असतात. आता जयंत पाटलांनी केलेल्या वक्तव्याची री ओढत सत्ताधाऱ्यांनी आपले अंदाज वर्तवलेत.

पक्ष सोडणार का? अखेर जयंत पाटील यांनी उत्तर दिले

परवाच्या कार्यक्रमात मी राजू शेट्टी यांना उद्देशून एक विधान केले. आमच्याबरोबर राहिला असतात तर लोकसभेत दिसला असतात. शक्तिपीठ महामार्गाचा प्रश्न तुम्ही देशाच्या संसदेत मांडला असतात. पण त्यांचेच पूर्वीचे वक्तव्य पाहता माझ्यावर विश्वास ठेवू नका, असे मी म्हणालो, याचा अर्थ मी कुठे प्रवेश करणार, राष्ट्रवादी सोडणार असा होत नाही. तसे अर्थ काढण्याची काहीही आवश्यकता नाहीये, असे जयंत पाटील म्हणाले.

संजय शिरसाट यांचाही सेम टोन, जयंतराव पक्ष बदलणार

दुसरीकडे शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांनीही जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची शक्यता वर्तवली आहे. जयंत पाटील तिकडे नाराज आहेत. ते लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा दावाच शिरसाट यांनी केला आहे.

खासदार आत्या सुप्रिया सुळेंनी ‘जोडीचे’ फोटो शेअर केले! अजित पवार यांच्या धाकट्या लेकाचं लग्न ठरलं….

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. जय यांच्या आत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोडीचे फोटो शेअर केले आहेत. नव्या जोडीने शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले.

अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे राजकारणापासून काहीसे बाजूला आहेत. परंतु राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी स्थानिक राजकारणात जातीने लक्ष घालायला सुरुवात केली. त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांनी लोकसभा लढवली तसेच पाठोपाठ राज्यसभेवर त्यांची निवड झाल्याने बारामतीमधील जनतेचे प्रश्न जाणून घेण्याकरिता जय पवार यांना नाईलाजास्तव का होईना, पण राजकारणात पाऊल ठेवावे लागले.

उद्योग क्षेत्रात जय पवार यांना विशेष गती आहे. काही वर्षे दुबईत त्यांनी व्यवसाय केल्याचे सांगितले जाते. परंतु गेले काही वर्षे ते मुंबई आणि बारामतीतच असतात. सध्याही ते व्यवसाय सांभाळत असल्याचे सांगितले जाते.

सुप्रिया सुळेंकडून ‘जोडीचे’ फोटो शेअर

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कुटुंबातही काहीसा दुरावा आलेले होता. परंतु आनंदाच्या क्षणी सगळे रुसवे फुगवे, मतभेद बाजूला ठेवून पवार कुटुंब एकत्र येण्याची परंपरा आहे. आताही जय पवार यांचे लग्न ठरलेले असताना नवी जोडी आजोबा शरद पवार आणि आजी प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेण्याकरिता त्यांच्या निवासस्थानी गेली. दोघांनीही आजी-आजोबांचे आशीर्वाद घेतले.

जय आणि ऋतुजा तुम्हा दोघांचेही खूप खूप अभिनंदन… आनंदी राहा, तुम्हाला खूप खूप आशीर्वाद असे कॅप्शन लिहित खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबासमवेतची काही खास क्षणचित्रे शेअर केली आहेत. लवकरच दोघांचा साखरपुडा समारंभ होणार असल्याचे कळते.

जय पवार यांच्याबद्दल माहिती, कोण आहेत जय पवार?

-पार्थ पवार हे अजित पवार यांचे थोरले चिरंजीव तर जय पवार हे धाकटे चिरंजीव

-जय पवार यांना सुरुवातीच्या काळात राजकारणात फारसा रस नव्हता

-उद्योग व्यवसायाकडे त्यांचा कल होता, दुबईत काही वर्षे त्यांनी व्यवसाय केला

-परंतु घरातच राजकारण असल्याने तसेच आई-वडील दोघेही लोकप्रतिनिधी असल्याने सामान्यांच्या प्रश्नांची -सोडवणूक करण्याकरिता ते ही राजकारणात आले

-बारामतीमधील स्थानिक प्रश्नांमध्ये जय पवार आवर्जून लक्ष देतात

-कमी पण नेमके आणि गरजेचे बोलणे ही जय पवार यांच्या स्वभावाची खासियत

वन विभागाने पाडलेलं सतीश भोसलेचं घर अज्ञातांनी पेटवलं

0

वन विभागाने सतीश भोसले उर्फ खोक्याच्या ग्लास हाऊस नावाच्या घरावर बुलडोझर चालवला होता. अशातच आता या पाडलेल्या घराला कोणतीरी आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.अज्ञातांकडून सतीश भोसलेच्या घराचा परिसर पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये जनावरांचा चाऱ्यासह काही पशूंचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जळगाव जिल्ह्यातील बोडवड रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी पहाटे धक्कादायक अपघात घडला आहे. मुंबई-अमरावती एक्सप्रेसला एका भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. मात्र, रेल्वेच्या धीम्या गतीमुळे मोठा अनर्थ टळल. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी गडचिरोली मायनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्त आयोगाचा निधी या संदर्भात त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. यावेळी फडणवीस यांनी गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, अशी मागणी केल्याचं माध्यमांना सांगितलं.

सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलिस बीडकडे रवाना

सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन बीड पोलिस छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी सतीश भोसलेला प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर काल रात्री बीड पोलीस भोसलेला ताब्यात घेऊन आज पहाटे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले. तिथून आता पोलिस त्याला बीडला घेऊन निघाले आहेत. शिवाय आजच त्याला न्यायालयात हजर देखील केलं जाणार आहे.

संजय शिंदेंनी पुन्हा शड्डू ठोकला; म्हणाले ‘करमाळा सोडून कुठेही जाणार नाही, माझी आयुष्यभराची कर्मभूमी…’

0

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने घेतलेल्या पहिल्याच बैठकीत माजी आमदार संजय शिंदे यांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला. माढा तालुक्यातील 36 गावं पुन्हा माढ्याला जोडली गेल्यानंतर मी करमाळ्यात येणार नाही, असं बोललं गेल. पण ‘माझी जन्मभूमी माढा असली, तरी माझी आयुष्यभराची कर्मभूमी ही करमाळा असणार आहे आणि मी लय दमदार आहे,’ असे सांगून आपण करमाळा सोडून कुठेही जाणार नसल्याचे संजय शिंदे यांनी स्पष्ट केले.

करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय शिंदे यांनी कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत बोलताना विधानसभा निवडणुकीतील पराभव, कारखाना निवडणुकीच्या रणनीती आणि पुढील राजकीय वाटचाल यावर शिंदे यांनी भाष्य केले.

ते म्हणाले, निवडणुकीत (Election) जय पराजय चालूच असतो. तो काय मला नवीन नाही. जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा, जिल्हा बॅंक आदींच्या निवडणुकीचा अनुभव पाठीशी आहे. पण, पराभवाच्या ब्रेकनंतर आपल्याला एक चांगली संधी निर्माण होते. चार पावले पुढे जाण्यासाठी हा वेळ महत्वाचा ठरतो. आपल्या चुका लक्षात येतात. वाहत्या गंगेत सगळेच हात धुतात. पदावर असताना लोक ओळखायला येत नाहीत. पण, आपण अडचणीत असतो, त्या वेळी त्या माणसाची परीक्षा असते, त्यामुळे माणसाला राजकारणातसुद्धा ब्रेक मिळालाच पाहिजे.

आपण सर्व डोळे झाकूनच सर्व करायला गेलो, तर आपण कुठे आहोत, हे आपल्यालाच कळत नाही. विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित घटना घडत केल्या, त्याचा उहापोह आता करत बसायची गरज नाही. जे झालं ते झालं. आपण कुठेही कमी पडलो नाही, कोणताही पक्ष बरोबर नसताना, कुठलंही तिकिट नसताना मागच्या निवडणुकीपेक्षा आपण चार मतं जास्तीचीच मिळविली आहेत. अपक्ष म्हणून आपण 80 हजारांपेक्षा अधिक मतं घेतली आहे, असेही संजय शिंदे यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार शिंदे म्हणाले, राजकारणात मी तीस वर्षे काम करताना मी जिथं जातो, मतं घेतो, त्या लोकांच्या उपकराची जाणीव आयुष्यभर ठेवतो. आपल्याकडे गप्पा भरपूर मारतात, कुणी म्हटलं, आता माढा तालुक्यातील 36 गावं तुटायची आहेत, त्यामुळे आता मी करमाळ्यात येणार नाही. पण, अजिबात काळजी करू नका. माझी जन्मभूमी माढा असली तरी माझी आयुष्यभराची कर्मभूमी ही करमाळाच असणार आहे. मी लय दमदार आहे.

माढा तालुक्यातील 36 गावे तुटली तरी तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझी कर्मभूमी आयुष्यभरासाठी करमाळाच ठेवणार आहे, त्यामुळे थोडक्यासाठी कोणी सुखाच्या झोपी काढत बसू नका. क्षणिक समाधानासाठी कोणी आनंद मानून घेऊ नये, असा टोलाही संजय शिंदे यांनी आपल्या विरोधकांना लगावला.

‘स्थानिक’च्या निवडणुका लांबल्या ‘या’ पदासाठी जोरदार लावली फिल्डिंग; 2025-26 चे 1200 कोटींचे अंदाजपत्रक

0

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत आहेत. या निवडणुका आता 2026 मध्येच होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाच्या इच्छुक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे आपला मोर्चा वळवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्या वेळी होतील, मात्र सध्या नियोजन समितीचे सदस्यपद मिळावे यासाठी महायुतीच्या मित्र पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी पालकमंत्री, मंत्री आणि पक्षांच्या वरिष्ठांकडे साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.

इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने भाजप, शिंदे ची शिवसेना आणि अजित पवारांनची राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीनही पक्षांच्या नेत्यांना सदस्य नेमण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. राज्य सरकारकडून जिल्हा नियोजन समितीवर ‘नामनिर्देशित सदस्य’ म्हणून नियुक्‍त्या करण्यात येत. पुणे जिल्हा नियोजन समितीचा विचार केल्यास याठिकाणी नामनिर्देशित सदस्यांची संख्या 4 तर विशेष निमंत्रित सदस्यांची संख्या 14 इतकी आहे. त्यामुळे 18 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची या ठिकाणी वर्णी लागणार आहे.

पुणे जिल्हा नियोजन समितीचे 2025-26 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक हे सुमारे 1 हजार 200 कोटींचे आहे. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील रस्ते, गावातील पाणीपुरवठ्याची कामे, वीज यंत्रणा उभारणे, समाज मंदिर बांधणे, पूल, शाळा दुरुस्ती अथवा नवीन बांधणे, आरोग्य विषयक सुविधा देणे यासारख्या गोष्टींसाठी निधी मिळतो.

जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून वर्णी लागलीस त्या माध्यमातून आपण आपापल्या मतदारसंघामध्ये निधी आणून कामे करू शकतो. आणि त्याचे श्रेय घेता घेऊ कमी निवडणुकांमध्ये त्याचा फायदा करून घेता येईल . त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन समितीचे सदस्य पद मिळावे, यासाठी इच्छुकांची मोठी संख्या सध्या पाहायला मिळत आहे.

भाजप त्यांना जगूच देत नाही काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून एकनाथ शिंदे, अजित पवारांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर, म्हणाले “आम्ही दोघांनाही.”

0

या पत्रकार परिषदेवेळी झालेल्या खुर्च्यांच्या अदलाबदली आणि एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली. आता या विधानवरुन चर्चांना उधाण आलेले असताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक मोठे विधान केले. नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, असे नाना पटोलेंनी म्हटले. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

नाना पटोले यांनी धुलिवंदनाच्या निमित्ताने नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नेत्यांना बुरा न मानो होली है म्हणत खास शैलीत शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत त्यांची प्रकृती ठीक व्हावी, असे म्हटले. आजकाल ते खूप फेकतात त्यांनी मोदींप्रमाणे खोटं बोलू नये, असा सल्ला दिला. आधी जे देवेंद्र फडणवीस होते, राज्यासाठी त्यांची लढाई चालायची. ते त्यांनी करावं अश्या शुभेच्छा देतो, असे नाना पटोले म्हणाले.

तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर देत त्यांची अवस्था फार वाईट आहे. पुढच्या काळात त्यांचा पक्ष टिकेल की नाही माहीत नाही. भाजप त्यांना जगू देत नाही. अजित पवार यांनी सादर केलेले बजेट त्यांच्या मनातील बजेट नाही. हे बजेट बिना-पैशाचे आहे, असे नाना पटोलेंनी म्हटले.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (१० मार्च) राज्याचा अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प मांडल्यानतंर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे यांची अवस्था फार वाईट झाली, त्यांच्या सगळ्या योजना बंद केल्या जात आहे. त्यांच्या लोकांची सुरक्षा काढली गेली. पण भाजपच्या लोकांची आहे. त्यामुळे त्यांनी त्यातून शिकावं. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांनी आमच्यासोबत यावं, आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आम्ही त्यांची काळजी घेऊ. त्याच्यात मुख्यमंत्री पदासाठी ओढ लागली आहे. आम्ही दोघांनाही काही दिवस मुख्यमंत्री बनवू. अजित पवार यांना काही दिवस आणि एकनाथ शिंदे यांना काही दिवस मुख्यमंत्री बनवू, असे मोठे विधान नाना पटोलेंनी केले.

महाविकासआघाडीतील संजय राऊत यांना शुभेच्छा देत नाना पटोले म्हणाले, अति विद्वान व्यक्तीमत्त्व महाराष्ट्राला लाभलं आहे. ते वेगवान नेते असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. विजय वडेट्टीवार मोठे नेते आहेत. सुपरफास्ट आहेत त्यांनी आणख मोठं होत, सुसाट पळावे, असेही नाना पटोले म्हणाले.

वाढवण बंदर खडक रचनेमुळे परिसर मत्स्यबीज उत्पादनास अनुकूल विरोध पेटला, स्थानिक सर्वेक्षण मच्छिमारांनी रोखलं

0

पालघरमधील वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे. या विरोधानंतरही सरकारकडून वाढवण बंदराचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वाढवण बंदराच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे वाढवण बंदराचे सर्वेक्षण मच्छिमारांनी बंद पाडले आहे.

वाढवण बंदराला स्थानिक, पर्यावरणवाद्यांसह मच्छिमारांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.पालघरच्या वाढवण येथे समुद्रात सुरू असलेल सर्वेक्षण मच्छीमारांनी रोखले असल्याचे समोर आले आहे. वाढवण बंदर संदर्भात हे सर्वेक्षण सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र सर्वेक्षण करताना कंपनीने कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. त्यामुळे मच्छिमार आणखीच आक्रमक झाले. समुद्रात सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती मिळताच मच्छीमार सर्वेक्षण ठिकाणी धडकले. परवानगी असल्याशिवाय कोणतही सर्वेक्षण करू दिलं जाणार नसल्याचा इशारा मच्छीमारांनी दिला.

पोलिसांनी बजावली नोटीस…

सर्वेक्षण सुरू असल्याचे समजाच मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊन या सर्वेक्षणाला विरोध केला आणि सर्वेक्षण बंद पाडले. तर, कोस्टल मरीन कन्स्ट्रक्शन अँड इंजिनियरिंग लिमिटेड या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीला पालघर पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली.

वाढवण बंदराला विरोध का होतोय?

वाढवण बंदराची जागा ही समुद्रातील खडकाच्या रचनेमुळे परिसर मत्स्यबीज उत्पादनासाठी अनुकूल मानला जातो. मात्र बंदर उभा राहिला तर मासेमारीत अडचणी येतील. मुंबई ते दक्षिण गुजरात असा हा पट्टा मत्स्यबीज उत्पादनासाठी सुवर्णपट्टा म्हणून ओळखला जातो. हा पट्टा वाढवण बंदरामुळे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाढवण बंदरामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढेल, गावांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे.

वाढवण बंदर ठिकाण हे डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणा अंतर्गत येते. त्यामुळे पर्यावरणवादीदेखील विरोधाच्या भूमिकेत आहेत.

सध्या धार्मिक उन्माद देशाचा माहौल आता मशिदी झाकून… हा संकुचितपणा… संजय राऊतांचा खरमरीत इशारा

0

देशातील सध्याच्या धार्मिक उन्मादावर खासदार संजय राऊत यांनी कठोर टीका केली. देशात होळीला मशिदी झाकून ठेवण्याची, त्यावर अच्छादन टाकण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. इतकेच नाहीतर हा संकुचितपणा देशाला आणि धर्माला परवडणारा नसल्याची चपराक सुद्धा त्यांनी सरकारला लगावली. त्यांनी गेल्या दहा वर्षातील देशातील बदलेल्या मानसिकेतवर आसूड ओढला. सहिष्णुतेचा नारा देणार्‍या भारतीय संस्कृतीची ओळख मिटत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. राजकीय धुळवडीवर सुद्धा त्यांनी मंथन केले. आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशाचा माहौल बिघडल्याचा गंभीर आरोप सरकारवर केला.

आता दिल्लीत ती प्रथा बंद

आम्ही कोणालाही विरोधक समजत नाही. नक्कीच आज होळी आहे. रंगपंचमी आहे एक महत्त्वाचा सण आहे. अनेक वर्ष हा सण सगळे एकत्र येऊन आम्ही साजरा करतो. आता काल दिल्लीत होतो दिल्लीमध्ये मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, वाजपेयी असे प्रमुख नेते त्यांच्या घरी होळी व्हायची आणि सर्व राजकीय पक्षाचे आणि धर्माचे लोक त्या होळीमध्ये सहभागी होत असत. पण गेल्या काळी काळापासून ही प्रथा बंद झाली, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली.

ही संकुचितपणा परवडणारा नाही

आम्ही फार संकुचित होत आहोत आणि हा संकुचित पणा या देशाला आणि आपल्या समाजाला आले हिंदू धर्मालाही परवडणारा नाही आमची प्रतिमा जगभरात लिबरल सहिष्णू अशी आहे, म्हणून हिंदू धर्माला जगामध्ये मान आहे. आमच्या धर्माचा रक्षण करून आम्ही आमच्या सांस्कृतिक सर्वांना सामावून घेतो दुर्दैवाने गेल्या दहा वर्षात मोकळेपणा आमच्या संस्कृतीला संपला नष्ट केला आणि आपण दिवसेंदिवस अधिक संकुचित आणि धर्मांध होण्यासाठी विशिष्ट गट आपल्याला प्रवृत्त करतो, असा घणाघात संजय राऊत यांनी घातला.

होळी हा सर्वांनी एकत्र येऊन रंग उधळण्याचा सुख दु:खामध्ये एकत्र येण्याचा सण आहे उत्सव आहे आज देशांमध्ये काय चालू आहे महाराष्ट्रात काय चालू आहे कुठे मशि‍दीवरती झाकून ठेवण्याची वेळ येते कुठे होळी एका बाजूला आणि नमाज दुसर्‍या बाजूला ठीक आहे हे सुद्धा दिवस निघून जातील, असा आशावाद त्यांनी मांडला.

जन सुरक्षा अधिनियमावर गंभीर आरोप

यावेळी संजय राऊत यांनी जन सुरक्षा अधिनियमावर गंभीर आरोप केले. पण आम्ही व्यक्ती स्वातंत्र्यासाठी आवाज उठवू असे ते म्हणाले. आमच्यासारखी लोक सतत लढा देत आली आहेत. तुम्ही आमच्या हक्काचे आणि स्वातंत्र्याची गळचेपी करणारा असाल तर या देशांमध्ये लोक स्वस्त बसणार नाही. धर्माच्या अफूची भांग देऊन तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावरती गदा आणू शकत नाही आणि सरकारला वाटत असेल तुमच्या विरुद्ध कोण उभा राहील. आम्ही आहोत. आमच्या सारखे लाखो लोक आहेत, असे ते म्हणाले. सरकारच्या दडपशाही विरुद्ध ताकदीने उभे राहू. आम्हाला परवा नाही. देशाचे स्वातंत्र्य महत्वाचे आहे. भाजपचे स्वातंत्र्य महत्त्वाचे नाही आमचे आणि जनतेचे स्वातंत्र्य महत्वाचे आहे, असे त्यांनी ठणकावले.

देशमुख हत्या प्रकरणातील न्यायाधीशांची निलंबित अन् रजेवर पाठवलेल्या पोलिसांसोबत धुळवड?

0

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी याच प्रकरणात निलंबित आणि रजेवर पाठवलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत धुळवडीचा आनंद लुटल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी काही फोटो ‘एक्स’वर शेअर केले आहेत. दमानियांच्या दाव्याने देशमुख यांच्या हत्येच्या सुनावणीवर संशय व्यक्त केला जात आहे.

‘एक्स’वर पोस्ट करत अंजली दमानिया म्हणाल्या, “संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुळवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत. पण कोणाबरोबर? संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत.”

“आता यांचे जर आरोपीला वाचणारे हे निलंबित आधिकाऱ्यांसोबत केस चालू असताना, न्यायाधीश होळी खेळत असतील, तर हे खूप चुकीचे आहे,” असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.