Home Blog Page 107

अरबी समुद्रात हालचालींना वेग, पाकिस्तानी युद्धनौकांकाडून क्षेपणास्त्र डागण्याचा सराव, भारतीय नौदलही सज्ज

0

काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलल्यानंतर पाकिस्तान कमालीचा सावध झाला आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबारात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. देशभरात याचे संतप्त पडसाद उमटले होते. यानंतर दिल्लीत पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि संरक्षण मंत्रालयांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. संरक्षण दलाने भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करणार का, या भीतीने पाकिस्तान प्रचंड घाबरला आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याने हाय अलर्ट जारी केला आहे.

पाकिस्तानी वायूदलाची लढाऊ विमाने कालपासून सीमारेषेवर गस्त घालत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानी नौदलाने अरबी समुद्रात लष्करी कवायत सुरु केली आहे. पाकिस्तानी नौदलाच्या ताफ्यातील युद्धनौकांवरुन क्षेपणास्त्रे डागण्याचा सराव सुरु आहे. अरबी समुद्राच्या उत्तर भागात या लष्करी कवायती सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नौदलाकडून व्यापारी जहाजांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्यापारी जहाजांनी लष्करी कवायती सुरु असलेल्या भागात येऊ नये. या लष्करी कवायती 24 एप्रिल ते 25 एप्रिल या काळात सुरु असतील, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक केला जाऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. दिल्लीत बुधवारी संरक्षण मंत्रालयात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर भारतीय नौदल आणि वायूदल कमालीचे सक्रिय झाले आहे. त्यामुळे भारताकडून कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानला आहे. त्यामुळे पाकिस्तानने पहलगाम हल्यानंतर लगेचच वायूदलाला अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले होते. त्यामुळए पाकिस्तानची टेहळणी विमाने ही भारतीय सीमारेषेलगत गस्त घालताना दिसत आहेत.

पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून परत येताना विमानाचा मार्ग बदलला

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच मोदी हा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले होते. पंतप्रधान मोदी यांनी सौदीला जाताना पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर केला होता. परंतु, भारतात परत येताना मोदींनी पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर केला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात उच्चपदस्थीय बैठक बोलावली आहे.

भारताचा पाकिस्तानला आणखी एक धक्का, डिजिटल स्ट्राईकला सुरुवात, X अकाऊंटला बंदी

0

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले .यात भारताने पाकिस्तान विरुद्ध आता आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे .पाकिस्तान वर आता डिजिटल स्ट्राइक सुरू झालाय .भारताने पाकिस्तान सरकारच्या सोशल अकाउंट वर बंदी घातली आहे . बुधवारी सायंकाळी झालेला बैठकीत भारताने पाच मोठे निर्णय घेतले होते यामध्ये अटारी सीमा बंद करण्यासह इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते आता भारताने पाकिस्तानच्या सोशल मीडिया बाबत मोठी कारवाई केली आहे .

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण 26 जणांना गोळ्या घालून ठार करण्यात आले .यात 25 भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकांचा समावेश आहे .या हल्ल्यानंतर ए एन आय चे पथक बुधवारी श्रीनगर आणि नंतर पहलगाम येथे पोहोचले .एन आय ए च्या पथकाचा सध्या कसून तपास सुरू आहे .जम्मू आणि काश्मीर पोलीस ही त्यांच्यासोबत आहेत .बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीसीएस बैठकीत पाकिस्तान विरुद्ध पाच मोठे निर्णय घेतले .

पाकिस्तानच्या x अकाउंटवर बंदी

देशाच्या आयटी मंत्रालयाने एक्स कंपनीला भारतातील पाकिस्तानी सरकारचे खाते ब्लॉक करण्यास सांगितले होते .पहलगामा मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हे पाऊल उचलले आहे भारताने पाकिस्तानच्या अधिकृत X अकाउंट वर भारतात बंदी घातली आहे .

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालया बाहेरील पोलीस सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे .पहलगाम हल्ल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था पाकिस्तान आणि उच्चायुक्तालयाबाहेर वाढवली होती .मात्र दिल्ली पोलिसांनी आता सर्व बारिकेट झटवले आहेत .त्यांना एका आठवड्याच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे .अनेक लोक पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शनेही करत आहेत . पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानशी असलेले सर्व राजनैतिक संबंध संपवणे भारतातील पाकिस्तानच्या फेसबुक आणि youtube चॅनलवर बंदी घालणे. असे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. जेणेकरून पाकिस्तानला त्याच्या दहशतवादी कारवायांविरुद्ध ठोस पावले उचलण्यास भाग पाडता येईल.

पहलगाम दहशतवादी हल्याचं दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात सेलिब्रेशन? धक्कादायक Video

0

काश्मीरच्या पहलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन येथे बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे देशभरामध्ये पडदास उमटत असून या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताने पाच धोरणात्मक निर्णय घेत सिंधू जल करार रद्द केला असून पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारताने काही कठोर निर्णय घेण्याबरोबर दिल्लीतील उच्चायुक्तालयाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. एकीकडे असं असतानाच दुसरीकडे नवी दिल्लीमधील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये चक्क केक मागवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

उच्चायुक्तालयामध्ये केक

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाबाहेर एक कर्मचारी चक्क केकचं बॉक्स घेऊन जाताना दिसला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी हे सारं सेलीब्रेशन कशासाठी असा प्रश्न या केक घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला विचारला असता त्याने काहीही उत्तर दिलं नाही. ही व्यक्ती हातातील बॉक्स घेऊन उच्चायुक्तालयाच्या मुख्य द्वारातून आतामध्ये शिरली.

मात्र एकीकडे भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील कट कारस्थान पाकिस्तानामध्ये शिजल्याची दाट शक्यता असतानाच दुसरीकडे पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक मागवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नेमकं कोणत्या गोष्टीचं पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये सेलीब्रेशन झालं हा कुतूहलाचा प्रश्न आहे.

दूतावासाबाहेर निदर्शने

नवी दिल्लीमधील भाजपाच्या अल्पसंख्याक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने केली आहेत. पाकिस्तान मुर्दा बादाच्या घोषणा यावेळेस कार्यकर्त्यांनी दिल्या. काही मुस्लिम कार्यकर्तेही दूतावासाबाहेर पाकिस्तानचा निषेध करत आहेत. सरकारने पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला योग्य उत्तर द्यावे, अशी मागणी आंदोलन करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी केली आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीतून घोषणा करून शोकसभा आयोजित केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

मोदींना हलक्यात घेऊ नका

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या 27 पर्यटकांमध्ये डोंबिवलीमधील तीन पर्यटकांचा समावेश आहे. या तिन्ही पर्यटकांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी शहरातील स्मशानभूमीममध्ये शोकाकूल वातावरणामध्ये अत्यंसंस्कार करण्यात आले. दरम्यान, डोंबिवलीमध्ये बुधवारी सायंकाळी रस्त्यावर उतरून भाजपाने निदर्शने केली. काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला हल्ल्याच्या निषेधार्थ आज म्हणजेच 24 एप्रिल रोजी डोंबिवली बंदची हाक देण्यात आली. नरेंद्र मोदींना तुम्ही हलक्यात घेऊ नका. काही दिवसातच तुमचे डोळे पांढरे होतील असा इशारा आंदोलकांनी पाकिस्तानला दिला. रस्त्यावर उतरून भाजपा कार्यकर्त्यांनी आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली.

सरकारी बाबूंचे लाड बंद! आता पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास मोठी कारवाई, महसूलमंत्र्यांच्या त्या आदेशाने प्रशासनात खळबळ

0

सध्या सरकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार लटकत आहे. पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास कर्मचार्‍यांचे थेट निलंबन करण्यात येईल असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. मुख्यालयात अनुपस्थित राहणार्‍या अधिकार्‍यांना बावनकुळेंनी मोठा इशारा दिला आहे. जनसेवेत कसूर करणाऱ्या अधिकार्‍यांची गय करणार नाही. त्यांच्यावर निलंबनासह अन्य शिस्तभंगात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.

महसूलमंत्र्यांच्या आदेशाने एकच खळबळ

राज्यात जनसेवेत कसूर करणाऱ्या अधिकार्‍यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दम महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भरला आहे. महसूल अधिकार्‍यांनी वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास निलंबन करण्यासह अन्य शिस्तभंगात्मक कारवाई करण्याच्या सूचना मंत्री बावनकुळेंनी दिल्या आहेत. महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांतील तहसीलदार ते निवडश्रेणीतील अप्पर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक तसेच जमाबंदी आयुक्त व संचालक (भूमी अभिलेख) यांच्या अधिनस्थ काही अधिकारी वारंवार विनापरवानगी मुख्यालयात गैरहजर राहत असल्याचे आढळून आले. यासंदर्भात मंत्री बावनकुळे यांच्याकडे आलेल्या तक्रारींची पडताळणीत केल्यावर तथ्य आढळून आल्याने तातडीने हे कारवाईचे आदेश दिले आहेत.

आता कारवाईचा बडगा

सरकारी काम आणि चार दिवस थांब असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. सामान्यांना साध्या कामासाठी पण वाट पाहावी लागत असल्याने त्यांनी तक्रारीचा पाढा वाचला होता. महसूल विभागाच्या महत्त्वाच्या बैठका किंवा आकस्मिक परिस्थितीत प्रशासनास अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा जनता कामानिमित्त ताटकळत बसते, अशा स्थितीत काही अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले.

शासकीय सुट्ट्या किंवा शासकीय दौऱ्यावर अधिकारी व कर्मचारी असतील तर गैरहजरी मान्य करण्यात येईल. मात्र, इतर वेळी मुख्यालयात उपस्थित राहणे परिपत्रकातून बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या अखत्यारीतील कोणताही अधिकारी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाही. असे आढळून आल्यास वरिष्ठ अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाईल. ही कारवाई शिस्त, कार्यक्षमता व लोकाभिमुख प्रशासन अबाधित ठेवण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहून पंतप्रधान मोदींचं भाषण सुरू, म्हणाले..

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये पोहोचले. मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त एका जाहीर सभेला त्यांनी संबोधित केलं. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी त्यांचं स्वागत केलं. आजच्या भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी पंतप्रधानांनी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.

स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतर संसदेची नवी इमारत मिळाली. तसेच 30 हजार पंचायत भवन निर्माण केले. पंचायतीला फंड देण्यावर प्राधान्य दिलं आहे. गेल्या दशकात दोन लाख कोटीचा फंड पंचायतीला दिला आहे. हा संपूर्ण पैसा गावाच्या विकासासाठी वापरण्यात आला असं त्यांनी सांगितलं. गावातील एक मोठी समस्या जमीनच्या वादाची राहिली आहे. पंचायतीची जमीन कोणती, सरकारी जमीन कोणती आहे. आणि शेतीची जमीन कोणती आहे यावरून वाद होत होता. त्यामुळे जमिनीचं डिजीटलीकरण केलं जात आहे. त्यामुळे अनावश्यक वाद सोडवण्यात मदत मिळाली आहे.

पंचायतीत महिलांना 50 टक्के आरक्षण देणारं बिहार पहिलं राज्य

पंचायतीने सामाजिक भागिदारीला कसं सशक्त केलं आहे हे आपण पाहिलं. बिहार देशातील पहिलं राज्य होतं , ज्या पंचायतीत महिलांना 50 टक्के आरक्षण दिलं आहे असं पंतप्रधानांनी नमूद केलं. महिलांचं उत्पन्न वाढवण्यासाठी रोजगार आणि स्वयं रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार मिशन मोडमध्ये काम करत आहे. बिहारमधील जिविका दीदी योजना सुरू आहे. बिहारच्या बहिणींच्या बचत गटाला १ हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे. त्यामुळे बहिणींच्या आर्थिक सशक्तीकरणाला बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचं टार्गेट ठेवलं आहे. त्यासाठी फायदा होणार आहे,असं मोदी म्हणाले.

आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या अन् अल्लाहू अकबर म्हणायला लागलो… गणबोटेंच्या पत्नीने पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

0

काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी पर्यटक निसर्गाचा आनंद घेत असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज आला आणि हे खोरं किंकाळ्यांनी भरून गेलं. निरपराध पर्यटकांना घेरून, त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पेक्षा जास्त लोक ठार झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या नृशंस हल्ल्यात बळी पडलेल्यांपैकी एक म्हणजे पुण्यातील कौस्तुभ गनबोटे. कुटुंब आणि मित्रासह काश्मीर फिरायला गेलेले कौस्तुभ आणि त्यांचा मित्र संतोष जगदाळे या दोघांनाही दहशतवाद्यांनी गोळी मारून ठार केलं.

आज पहाटे जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा मृतदेह पुण्यातील निवासस्थानी आणण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी गनबोटे यांच्या घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतलं. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केलं. त्यावेळी कौस्तुभ यांच्या पत्नीने शरद पवार यांच्या समोर दहशतवागी हल्ल्याचा भयानक अनुभव सांगितला. आपल्या पतीची आपल्याच डोळ्यांसमोर हत्या झाली हे सांगताना त्यांना शब्दच फुटत नव्हते. तिथे नेमकं काय घडलं हे त्यांच्या तोंडून ऐकताना सगळ्यांच्यांच अंगावर काटा आला. दहशतवाद्यांच्या क्रूरपणामुळे गणबोटे यांच्या घरातील आधार हरवला, सर्वांच्या हुंदक्यांनी तो परिसर अक्षरश: सुन्न झाला होता.

आम्ही टिकल्या काढून फेकल्या आणि अल्लाह हू अकबर म्हणायला लागलो

शरद पवार यांनी गणबोटे कुटुंबियाची भेट घेऊन त्यांच सांत्वन केलं. सर्व घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवार यांच्या समोर अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितला.

आम्ही पहलागामला फिरायला गेलो होतो, तेवढ्यात तिथे हे बंदुकधार दहशतवादी आले. माझ्यासमोर माझ्या पतीला गोळ्या घातल्या गेल्या. आम्हाला अजान म्हणा असं सांगण्यात आलं होतं. ते ऐकून तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्या अजान म्हणायला सुरूवात केली, पण अतिरेक्यांनी तिथे उभ्या असलेल्या सगळ्या पुरूषांना मारू टाकलं. आमच्या देखतंच त्यांना गोळ्या घातल्या.

माझे मिस्टर तिथे उभे होते, त्यांचा मित्र बाजूला होता, त्यालाही पुढे बोलाववून घेतलं आणि विचारलं ‘अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ?’ त्यांच बोलणं ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि आम्ही सगळे अल्लाह हू अकबर म्हणायला लागलो, पण तरीही त्यांनी,सर्वांना मारून टाकलं असं गणबोटे यांच्या पत्नीने सांगितलं. तिथे गेटवर एक मुस्लिम होता तो म्हणत होता तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता त्यांनी काय चुकी केली आहे? असं विचारलं. दहशतवाद्यांनी त्याला सुद्धा पुढे बोलावलं आणि गोळ्या घातल्या, असं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

ते गेल्यावर आम्ही तिथून पळत सुटलो, आम्ही तिथं घोड्यावर बसून गेलो तरी आम्हाला भीती वाटत होती. खाली येताना आमचे गुडघ्यापर्यंतचे पाय चिखलात रुतत होते, पण आम्ही पळत सुटलो तिकडून कसेबसे. पण आमचे घोडेवाले खूप मुस्लिम होते, पण ते खूप चांगले होते. हल्ला झाल्यानंतर ते आम्हाला घ्यायला आले परत, आम्ही जो ड्रायव्हर केला होता, त्यानेही आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली. तो पण ढसाढसा रडला. गणबोटे यांच्या पत्नीचे हे शब्द ऐकून उपस्थितांच्या डोळ्यातील पाणी खळत नव्हतं.

महाराष्ट्रातील मृतांची नावे –

या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

1) अतुल मोने – डोंबिवली

2) संजय लेले – डोंबिवली

3) हेमंत जोशी- डोंबिवली

4) संतोष जगदाळे- पुणे

5) कौस्तुभ गणबोटे- पुणे

6) दिलीप देसले- पनवेल

काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी 2 विमानांची सोय, 100 पर्यटकांची यादी जाहीर

0

काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये मगळवारी दुपारी झालेल्या नृशंस दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत गोळ्या घातल्या आणि गदारोळ माजला. यामध्ये देशातील आणि परदेशातील एकूण 26 जमांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 नागरिकांचाही समावेश आहे. पहलगाममधील या हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे आणि भीतीचे वातावरण असून जोरदार निषेध करण्यात येत आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील अनेक पर्यटक सध्या काश्मीरला फिरायला गेले असून या हल्ल्यानंतर शेकडो लोकं तिथे अडकले आहेत. सगळीकडे दहशतीचं वाततावरण असून लोकांना लवकरचा लवकर घरी परतण्याचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रातील अनेक नागरिकही तेथे अडकले असून त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष व्यवस्था केली आहे. काश्मीरामधील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. त्या 100 पर्यटकांच्या नावांची यादी जहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे.

कालही सरकारने जम्मू-काश्मीरमधून महाराष्ट्रात परत आणल्या जाणाऱ्या 83 पर्यटकांची यादी जाहीर केली होती. त्यामुळे आता एकूण 2 विशेष विमानांनी महाराष्ट्रातील पर्यटक राज्यात परत येऊन आपापल्या घरी सुखरूप पोहोचतील.

एअर इंडियाच्या विशेष विमानाची सोय

मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात X वरील अधिकृत अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करून माहिती देण्यात आली आहे. ” काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे.” असे त्यात लिहीण्यात आले आहे.

आज संध्याकाळी मुंबईत येणार विमाने

या पोस्टमध्ये पुढे असे लिहीण्यात आले आहे की, ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज 2 विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. इंडिगोचे विमान 83 पर्यटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने 100, असे महाराष्ट्रातील एकूण 183 पर्यटक आज मुंबईत परततील. ही दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार आहे.” असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील 6 पर्यटकांनी गमावला जीव

काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. त्यापैकी डोंबिवलीचे 3, पुण्याचे 2 तर पनवेलचे एक गृहस्थ होते. अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी हे तिघे डोंबिवलीचे रहिवासी होते. तर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे पुण्यात रहायचे. मृत दिलीप देसले हे पनवेलचे रहिवासी होते. त्यांच्यावर शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. पहलगाममधील हल्ल्यानंतर संतापाचे वातावरण असून त्या निषेधार्थ आज डोंबिवली, अमरावती, मालेगाव, परभणीत बंद पुकारण्यात आला आहे.

सुरक्षा दलाची दहशतवाद्यांसोबत चकमक, उधमपूर भागात जोरदार धुमश्चक्री, एका जवानाला वीर मरण, सर्च ऑपरेशन सुरू

0

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्च ऑपरेशन गतिमान करण्यात आले आहे. उधमपूर येथील डुडू -बसंतगड भागात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांसोबत धुमश्चक्री उडाली आहे. त्यात एक जवान शहीद झाला आहे. तर त्यापूर्वी बारामुल्ला परिसरात सैन्य दलाने दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि आयईडी हस्तगत करण्यात आला. पोलिस आणि सुरक्षा दल या संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन करत आहे. जम्मू पोलीस सुद्धा सुरक्षा दलांसह या परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.

या परिसरात चकमक सुरू

जम्मू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उधमपूरच्या डुडु-बसंतगड परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या कारवाईत एक जवान शहीद झाला आहे. सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर सेनाने प्रत्युत्तर दिले. या ठिकाणी लष्कराने दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे पाकिस्तानचे तीन दहशतवादी असू शकतात. त्यांनी रामनगर क्षेत्रात यापूर्वी गोळीबार केला होता.

थोड्या थोड्या वेळाने या गोळीबार होत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात आहे. तर अनेक पोलीसही त्यांच्यासोबत या मोहिमेत सहभागी आहेत.. सध्या काश्मीर खोऱ्यात 100 पेक्षा अधिक दहशतवादी सक्रिय असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळेच पहेलगाम घटनेनंतर सातत्याने चकमक उडत आहे.

लष्कराची जोरदार कारवाई

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने मोठी कारवाई सुरू केली आहे. बुधवारी सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून दोन एके सीरीजमधील रायफल्स, चिनी बनावटीचे पिस्तूल, 10 किलोग्रॅम आयईडीसह इतर सामान हस्तगत करण्यात आले आहे. हे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. पण त्यापूर्वीच त्यांचा खात्मा करण्यात आला.

काल दहशतवाद्यांनी पहलेगाव येथे पर्यटकांना लक्ष्य केले. त्यांनी त्यांचा धर्म विचारला. हिंदू पर्यटक त्यांच्या निशाण्यावर होते. तर त्यांच्या मदतीला आलेल्या एका स्थानिक मुस्लिमावर ही त्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात देशभरातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला.

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान आयोजित १३४ व्या भीमजयंती महोत्सवानिमित्त विनामूल्य लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

0

मुंबई दि. २४ (रामदास धो. गमरे) शैक्षणिक, सामाजिक, लघुउद्योग क्षेत्रात अग्रगण्य कार्य करून समाजातील सर्वच स्तरातील लोकांच्या उत्कर्षासाठी अविरत झटणाऱ्या अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंती पर्वाचे औचित्य साधून १३४ विनामूल्य लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते सदर लकी ड्रॉ चा सोडत कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल वंजारे यांच्या अध्यक्षतेखाली आरंभ बँक्वेट हॉल, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक मुंबई अध्यक्ष संदीप मोहिते यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष अमोल वंजारे यांनी केले तद्नंतर पाहुण्यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात झाली. सदर कार्यक्रमास प्रवासी ॲप चे श्री.विजय रेड्डी, माजी नगरसेवक व सोलापूर विभागाचे संपर्कप्रमुख अनिल कोकिळ, युवासेना महाराष्ट्र संघटक पवन जाधव, बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे, अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानचे विश्वस्त सुजीत माटे, शिवडी विभाग १३ चे गटप्रमुख राजभाऊ तथा रामदास धो. गमरे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून बाबासाहेबांच्या जीवनपटाचा आढावा घेत आपले मौलिक असे विचार व्यक्त केले तसेच जयंतीप्रीत्यर्थ सामाजिक उपक्रम राबवित लकी ड्रॉ चे आयोजन केल्याबद्दल कोडकौतुक ही केले.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना संबोधित करत असताना माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी “महिलांना चूल आणि मूल यापलीकडे जाता येत नव्हत परंतु बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून महिलांना पुरुषांच्या जोडीला स्वतंत्र अधिकार व हिंदूकोड बिलच्या माध्यमातून वारसाहक्काचा अधिकार देऊन खऱ्या अर्थाने महिलांना गुलामीच्या जोखडातून सोडवायचे काम बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून केल्याने महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अंतराळात ही पोहचत आहेत, म्हणून देशातील सर्वच जाती-धर्म-पंथाच्या महिलांवर बाबासाहेबांचे ऋण आहेत, या ऋणातून उतराई व्हायचे असेल तर सर्व जाती-धर्म-पंथाच्या महिलांनी- बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करायला हवेत” असे प्रतिपादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १३४ स्पर्धकांना अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने भरघोस बक्षिसे देण्यात आली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही १४ एप्रिल ला असल्याकारणाने १४ विशेष बक्षिसे व १३४ वी जयंती असल्याकारणाने आकर्षक अशी एकूण १३४ बक्षिसे ठेवण्यात आली होती, सदर लकी ड्रॉ मध्ये प्रथम बक्षीस श्वेता बाळकृष्ण पवार यांना २ व्यक्तींसाठी वर्षातून ३ वेळा L D रिसोर्टची सहल, द्वितीय बक्षीस लोकमन देवाडिगा यांना २ व्यक्तींसाठी वर्षातून २ वेळा L D रिसोर्टची सहल, तृतीय बक्षीस मालती दवे यांना २ व्यक्तींसाठी वर्षातून १ वेळा L D रिसोर्टची सहल व इतर १३१ आकर्षक बक्षिसे देण्यात आले, तसेच सहभागी स्पर्धकांना ५ लाखाचा मोफत अपघात विमा प्रवासी ॲप विजय रेड्डी यांच्या वतीने अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानच्या सहकार्याने देण्यात आला, सामाजिक कार्यात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल संजीव जाधव व सावंत मॅडम यांना सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून अध्यक्ष अमोल वंजारे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

अजून Action झालीच नाही, त्याआधी पाकिस्तानने काल रात्री काय-काय केलं जाणून घ्या

0

पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान जाम टेन्शनमध्ये आहे. भारत पेहेलगाम हल्ल्याचा कसा बदला घेणार? ही चिंता त्यांना सतावत आहे. पाकिस्तानने घाबरलच पाहिजे, त्यांनी घाबरुन जाणं सुद्धा स्वाभाविक आहे. कारण बुधवारी संध्याकाळी भारताने ट्रेलर दाखवलाय. दारुगोळ्याशिवाय पहिला स्ट्राइक असा केलाय की, ते दीर्घकाळ लक्षात ठेवतील. पाकिस्तानला पाण्याच्या थेंबा-थेंबाला तरसवण्यासाठी भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. सोबतच अटारी बॉर्डर बंद केली आहे. त्याशिवाय भारताने पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध सुद्धा कमी केले आहेत. बुधवारी रात्री 10 वाजता परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी प्रेस कॉन्फरन्स केली. त्यांनी यावेळी भारत सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. भारताच्या Action नंतर पाकिस्तानला धक्का बसला आहे.

भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानात बैठका आणि वक्तव्य सुरु झाली आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा समिति (एनएससी) आपातकालीन बैठक बोलवली आहे. एनएससीच्या बैठकीनंतर इस्लामाबाद कठोर प्रतिक्रिया देईल असं पाकिस्तानने म्हटलं आहे.

पाकिस्तानी नेवी अलर्टवर

भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होईल या भितीने पाकिस्तानने आपल्या नेवीला अलर्ट केलं आहे. पाकिस्तानला ही भिती सतावतेय की, पेहेलगाम हल्ल्यानंतर भारत एखाद्या ऑपरेशनमध्ये नेवीचा वापर करु शकतो. हेच पाहून पाकिस्तानात दोन दिवसांची फायरिंग वॉर्निंग जारी करण्यात आली आहे.

फायटर जेट स्क्वाड्रन्सना हाय अलर्टवर

23 एप्रिलला लाइव्ह फायरिंग वॉर्निंग जारी करण्यात आली आहे. ही वॉर्निंग 24 ते 25 एप्रिलसाठी आहे. वॉर्निंगमुळे कराची आणि ग्वादरजवळ एअरक्राफ्ट आणि मर्चेंट वेसेलला अभ्यास भागापासून दूर राहण्यास सांगितलं आहे. पाकिस्तान नेवी या सरावात सर्फेस आणि सब सर्फेल लाइव्ह फायरिंगच प्रात्यक्षिक दाखवेल. पाकिस्तानच्या सर्व 20 फायटर जेट स्क्वाड्रन्सना हाय अलर्टवर ठेवण्यात आलय. आर्मी चीफ मुनीर यांनी बुधवारी कमांडर्सची बैठक घेतली.

नोटिफिकेशन जारी

पाकिस्तान 24-25 एप्रिल रोजी कराचीच्या किनाऱ्यावर जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी करेल. त्यासाठी त्यांनी नोटिफिकेशन जारी केलं आहे.

पुरावा दिलेला नाही

पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार म्हणाले की, “अशा प्रकारच्या दहशतवादी घटनांवर संताप व्यक्त करणं योग्य नाही. भारताने दहशतवादी हल्ल्याचा कोणताही पुरावा दिलेला नाही. भारत नेहमी आपल्या समस्यांसाठी पाकिस्तानला जबाबदार धरतो. भारताची ही राजकीय चाल आहे, त्यापेक्षा काही नाही. पाकिस्तान सडतोड प्रत्युत्तर देईल” पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित म्हणाले की, “काही दिवसांनी बालाकोटमध्ये मोठा एअर स्ट्राइक होईल. ही गोष्ट इथेच थांबणार नाही. भारत पाकिस्तान विरुद्ध काही ना काही कारवाई करेलच”

नवाज शरीफ पाकिस्तानात येणार

एक्सप्रेस न्यूजच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे अध्यक्ष नवाज शरीफ यांनी लंडनहून पाकिस्तानात परतण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नवाज शरीफ यांना 25 एप्रिलच्या आपातकालीन ब्रीफिंगसाठी बोलावलं आहे. शहबाज शरीफ यांच्यासोबत बैठक करण्याशिवाय नवाज शरीफ शुक्रवार ते रविवारपर्यंत पीएमएल-एनच्या वरिष्ठ नेत्यांसोबत उच्चस्तरीय बैठक करतील.