डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जातीच्या जंजाळातून मुक्त होणे म्हणजे सुखी जीवन होय : प्रा. संदेश वाघ

0
3

मुंबई दि. ३० (रामदास धो. गमरे) “कावळ्याला माणसाचा स्पर्श झाला की इतर कावळे त्याला वाळीत टाकतात कारण त्याला माणसाचा गंध येतो पण इथे मात्र उलट आहे शूद्र, दलीत, मागासवर्गीय, तळागाळातील माणसाचा माणसाला स्पर्श झाला तर त्याचा विटाळ होतो, त्याची सावली पडली तरी माणूस बाटतो, त्याच्या स्पर्शाने पाणी बाटत, त्याने शिक्षण घेतलं किंवा कोणता शब्द जरी उच्चारला तरी उच्चवर्णीय लोकांचा अपमान होतो अशा प्रकारे धर्म हा माणसाचे माणूसपण आणि अस्तित्व नाकारत असेल, पोथ्या पुराणात वेगवेगळ्या कथा घुसवून प्रथा, चालीरीतीच्या नावाखाली माणसावर अन्याय होत असतील तर अश्या माणूसपण नाकारणाऱ्या धर्माचा त्याग करून धर्मांतर करणे आवश्यक आहे अशी मीमांसा करत असताना बाबासाहेबांनी धर्मांतर का आवश्यक आणि गरजेचे आहे यावर आपली भूमिका मांडली” अशी बाबासाहेबांची अनेक उदाहरणे देत प्रा. संदेश वाघ यांनी अनेक विषयात हात घालत उपस्थितांना बाबासाहेबांच्या विचारांचा प्रत्यय आणून देत वरीलप्रमाणे प्रतिपादन केले.

अधिक वाचा  कोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे यांची ही तयारी अन् मुंबईतील आंदोलनाबाबत घेतला ”हा” मोठा निर्णय

बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर प्रवचन मालिकेचे उद्घाटन प्रसंगी कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. तद्नंतर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार आणि सरचिटणीस मनोहर बा. मोरे आपल्या सुमधुर आवाजात धार्मिक विधी पठण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर बा. मोरे यांनी आपल्या पहाडी व भारदस्त आवाजात लाघवी भाषाशैलीत केले तर मंगेश पवार यांनी प्रास्ताविक सादर करीत असताना भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेल्या धम्माची दीक्षा आपणास बाबासाहेबांनी दिली असली तरी बाबासाहेबांचे सुपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी बौद्धचार्यांची निर्मिती करून बौद्ध धम्म खेडोपाडी पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेत बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार केला ते कार्य पुढेही अविरत सुरू राहण्यासाठी आपण दरवर्षी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करीत असतो असे नमूद केले.

अधिक वाचा  भाजप सत्ताधारी तरी प्रशासकीय अंकुश नाही वर्गीकरणाचा वादंग अधिकाऱ्यांची पाठराखण थांबवा मुख्य पदाधिकाऱ्यांवर नाराजी

सदर प्रसंगी संस्कार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या २९ बौद्धाचार्य व बौद्धाचार्या यांना सनद देऊन सन्मानित करण्यात आले, सदर बौद्धचार्य प्रशिक्षणार्थी बॅचने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकरता २९,०००/- रोख रक्कम संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार व उपसभापती विनोद मोरे यांच्याकडे सपूर्द केली त्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले. तसेच आजवर संस्कार समितीकडून एकूण २,२९,००० स्मारक निधी पोच झाला आहे असे संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी जाहीर केले.

सदर कार्यक्रमास सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे, उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, पर्यटन समितीचे अध्यक्ष मुकुंद महाडिक, अतिरिक्त चिटणीस विठ्ठल जाधव, श्रीधर साळवी, चिटणीस यशवंत कदम, श्रीधर जाधव, रवींद्र शिंदे, तुकाराम घाडगे, संदेश खैरे, महेंद्र पवार, विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, प्रकाश कमलाकर जाधव, अतुल साळवी, अरूण मोरे, लवेश तांबे, महाराष्ट्र शासन समाज कल्याण माजी चिटणीस डेंगळे साहेब, सुशीलाताई जाधव, अंजली मोहिते, विविध उपसमित्या, मध्यवर्ती कार्यकारिणी मंडळ, विश्वस्त मंडळ, सर्व शाखा व त्यांचे कार्यकर्ते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून मंगेश पवार यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  पुणे गणेशोत्सव आणखी एक संकट! पुणे रेल्वेचा 15 दिवसांचा ब्लॉक; 42 ट्रेन्स रद्द, 25 गाड्यांचे मार्ग बदलले, नियोजन कसे?