बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा आणि अचानक बदल घडून आला आहे. राज्यावर मान्सूनचे ढग पुन्हा घोंघावू लागले असून आगामी 31 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
किनारपट्टीचा परिसर आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक तीव्र राहणार आहे. वाढत्या हवामान बदलांमुळे प्रशासनाकडून राज्यातील एकूण 33 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. यामध्ये 1 जिल्ह्याला रेड अलर्ट, 15 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट घोषित केला आहे.
वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता
बुधवार, 30 जुलै रोजी कोकण आणि गोव्यात विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अत्यंत तीव्र असेल, जिथे ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्यावरही मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसणार आहेत.
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणता अलर्ट?
रेड अलर्ट (अतिवृष्टीचा इशारा): जळगाव
ऑरेन्ज अलर्ट (अतिमुसळधार पाऊस): रायगड, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.
यलो अलर्ट (मुसळधार पाऊस): मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ.
शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण
प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय असल्यामुळे यंदाच्या मान्सूनवर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्याने बळीराजा आणि नागरिक चिंतेत सापडले होते. परंतु, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काही दिवस राज्यात हा पाऊस असाच कायम राहण्याचा अंदाज आहे.
मुंबईत दोन दिवस पावसाचा जोर
मुंबई महानगर क्षेत्रातही पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. संभाव्य पूरपरिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत.
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे.काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार सुरू आहे. तर काही ठिकाणी अधुनमधून पाऊस पडत आहे. अशामध्ये आता हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढचे ३ दिवस महत्वाचे असणार असल्याचे सांगितले आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुण्यातील हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येणारे ३ दिवस पावसाचे असणार आहे. विदर्भासाठी आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भासह राज्यातील अनेक भागात पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे.
पुण्यात जुलै महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शनिवारनंतर पाऊस उघडीप घेणार आहे. राज्यात पुढील तीन दिवस काही भागात रेड तर काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अजुनही पावसाची प्रतीक्षा आहे. या भागातील शेतकरी चिंतेत आहेत.
दरम्यान, आज हवामान खात्याने पुणे आणि रायगडमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज पुणे घाटमाथा, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर घाटमाथा, परभणी, हिंगोली आणि जालना येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, बीड, अहिल्यानगर, धाराशिव, संभाजीनगर, लातूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, नागपूर, अहिल्यानगर, वाशिम आणि यवतमाळमध्ये या जिल्हयांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.











