दिल्लीतील आंदोलनाचे महाराष्ट्रात जोरदार पडसाद, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो तरुण जमले

0
5

दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचे जोरदार पडसाद महाराष्ट्रातही पडताना दिसत आहेत. महाराष्ट्रात मुंबईत दादर येथील चैत्यभूमी परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी आंदोलक तरुणांना ताब्यात घेतलं. तर याचवेळी पुण्यात शेकडो तरुण एकत्र जमले. या तरुणांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीजेपीच्या समर्थनार्थ जोरदार आंदोलन केलं.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विद्यार्थी एकत्र झाले. विविध विद्यार्थी संघटना या आंदोलनात सहभागी झाले. विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

अधिक वाचा  कोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे यांची ही तयारी अन् मुंबईतील आंदोलनाबाबत घेतला ”हा” मोठा निर्णय

शेकडो विद्यार्थ्यांचा आंदोलनात सहभाग

शेकडो विद्यार्थी या आंदोलनाला जमले आहेत. या आंदोलनाबाबत सोशल मीडियावर एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने विद्यार्थी जमले आहेत. तसेच विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान वाढताना दिसत आहे.

पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसही जमले आहेत. कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. दुसरीकडे आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. आंदोलकांकडून टाळ्या वाजवून गाणीदेखील गायली जात आहेत. अनेकांच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर आहेत. या बॅनरमधून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि सीजेपीला पाठिंबा देण्याबाबत उल्लेख आहे.

अधिक वाचा  शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात ८३ तालुक्यांत २० दिवसांहून दीर्घकालीन पर्जन्यखंड; पुण्यातही या भागात ३८ दिवस पर्जन्यखंड

आंदोलक काय म्हणाले?

“शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन झालं पाहिजे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं माध्यम आहे. त्या माध्यमावर कुणी घाला घालत असेल तर आम्ही विद्यार्थी म्हणून हे कदापी सहन करणार नाहीत. कारण शिक्षणाने आपला विवेक जागृत होतो. शिक्षणाने राष्ट्राचं भलं आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्था मजबूत, पारदर्शक असली पाहिजे, अशी आमची मागणी आहे”, अशी प्रतिक्रिया एका आंदोलकाने प्रसारमाध्यमांना दिली.

“वारंवार पेपरफुटी होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन शिक्षण व्यवस्था पारदर्शक करावी, अशीदेखील आमची मागणी आहे”, असंदेखील आंदोलक यावेळी म्हणाले.

अधिक वाचा  मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नवं राजकीय वळण मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

राज्यभरात आंदोलनाचे पडसाद

केवळ पुणेच नाही तर मुंबई, नागपूर, जळगाव अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनी सीजेपीच्या समर्थनार्थ जोरदार आंदोलन केलं. तसेच दिल्लीत जोरदार घडामोडी घडत आहेत. सीजेपीचा मोर्चा हा संसद भवन परिसरात दाखल झाला आहे. तसेच दिल्लीत जंतरमंतर मैदानाचा परिसर पोलिसांनी खाली केला आहे. आजच्या आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.