भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने अतिशय सुमार कामगिरी केली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.त्यानंतर झालेल्या चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. मालिकेतील पाचवा सामना भारतीय संघाने ५६ धावांनी गमावला आहे. भारतीय संघ या सामन्यात २५८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण भारतीय संघाला २०१ धावांपर्यंत मजल मारता आली आहे. दरम्यान या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
भारतीय संघ २ वेळचा टी-२० वर्ल्ड चॅम्पियन आहे. यासह विराट कोहली, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. गेल्या १६०५ दिवसांपासून भारतीय संघ आयसीसीच्या टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी होता. पण आता भारतीय संघाला नंबर १ स्थान गमवावं लागलं आहे. भारतीय संघाला टी-२० मालिकेत ४-० ने पराभूत करून नंबर १ स्थानी कब्जा केला आहे.इंग्लंडने उभारली विक्रमी धावसंख्या
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय पूर्णपणे फसला. कारण इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला. इंग्लंडकडून हॅरी ब्रुकने नाबाद ९५ धावांची खेळी केली. तर जोस बटलरने १३४ धावा केल्या. दोघांनी मिळून २३३ धावांची विक्रमी भागीदारी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकांअखेर २५७ धावांचा डोंगर उभारला.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २५८ धावांचा डोंगर सर करायचा होता. पण भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. अभिषेक शर्मा ३ तर संजू सॅमसन अवघ्या २७ धावा करून माघारी परतला. त्यानंतर इशान किशनने ५६ धावांची खेळी केली. तर कर्णधार श्रेयस अय्यर २८ धावा करून माघारी परतला. शेवटी उपकर्णधार तिलक वर्माने पूर्ण जोर लावला आणि ५३ धावांची खेळी केली. पण त्याला इतर कुठल्याही फलंदाजाकडून हवी तशी साथ मिळाली नाही. भारतीय संघाला २० षटकांअखेर ८ गडी बाद २०१ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने हा सामना ५६ धावांनी गमावला.











