नवनीत राणा आणखी एक कडवे आव्हान? थेट आंबेडकर यांच्या घरातील उमेदवार अमरावतीतून निवडणूक रिंगणात

0
46

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत लोकसभेचा बिगुल वाजला आहे. काही जागांचा तिढा अजून सुटलेला नाही. पण सध्या सर्वाधिक चर्चा सुरु आहे ती अमरावती लोकसभा मतदारसंघाची. अनेकांचा विरोध डावलून भारतीय जनता पक्षाने नवनीत राणा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पण या विजयासाठी मोठी आव्हानं त्यांच्यासमोर दिसत आहेत. बच्चू कडू यांनी त्यांची नाराजी व्यक्तं केली आहे. तर आता प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख यांनी पण अमरावती मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होणार अशीच चिन्हं आहेत.

2 एप्रिल रोजी अर्ज भरणार

अधिक वाचा  लालबागचा राजा 2026 चं प्रथम दर्शन; पहा मोहक रूप

आपण स्वतः अमरावती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली आहे. 2 एप्रिल रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत, त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीचं लक्ष नसल्याचा टोला त्यांनी हाणला. अमरावती हा विदर्भातील सर्वात महत्वाचा जिल्हा आहे. पण त्याचा विकास रखडला आहे. त्यामुळेच आपण लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचा दावा त्यांनी केला.

अमरावती राज्याच्या केंद्रस्थानी

गेल्या तीन ते चार वर्षांपासून अमरावती सातत्याने राज्याच्या केंद्रस्थानी आलेला आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात महाविकास आघाडी असा सामना खूप रंगला. त्यात हनुमान चालीसापासून ते बच्चू कडू यांच्याशी वादापर्यंत ही चर्चा कायम होती. नवनीत राणा या भाजपच्या तिकिटावर लढणार हा अंदाज पण वर्तविण्यात येत होता. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी पण वंचितचा उमेदवार जाहीर केल्याने अमरावतीत बहुरंगी निवडणूक होणार हे आता निश्चित झाले आहे.

अधिक वाचा  महापालिकेत पुन्हा ५०० सुरक्षा रक्षक भरती संख्या थेट २४१५ ; ‘वाट्या’साठी सत्ताधाऱ्यांत जुंपली; १३६ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च

वंचित विरुद्ध आनंदराज

वंचितने अमरावती लोकसभा मतदारसंघातून कु. प्राजक्ता पिल्लेवान यांचे नाव यापूर्वीच जाहीर केले आहे. तरस्थानिक लोकांची तसेच आंबेडकर चळवळीतील लोकांची ईच्छा होती मी निवडणुक तिथून लढावी म्हणून आपण निवडणूक लढवत आहोत. स्वतः वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की मी अमरावती मधून निवडणूक लढावी, जरी तिथं वंचितचा उमेदवार असला तरी मी अमरावती मधूनच निवडणूक लढणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.

बाळासाहेबांची अनेकदा भेट

बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी अनेकदा भेट झाली. मणिपूरच्या घटनेनंतर भेटलो होतो. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक माहिती हवी असल्याने त्यांची भेट घेतल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितेल. आता मतपेटीतून काय होईल, ते कळेल असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्यावर निशाणा साधला. १९९० साली ओबीसीसंदर्भात तुम्ही कोणाबरोबर होता? मंडल बरोबर होता किंवा कमंडल बरोबर होता? असा सवाल त्यांनी केला.

अधिक वाचा  काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! राज्य प्रभारींनंतर आणखी १०० नेत्यांची यादी तयार; नेत्यांच्या दिल्लीत मुलाखती घेतल्या जाणार