महाराष्ट्रात 12 ऑगस्टनंतर हवामानात मोठे बदल एल निनोचे सावट असतानाच आता IOD सक्रीय, आज 9 जिल्ह्यांना अलर्ट

0
4

राज्यात पावसाने काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. मात्र येत्या काही दिवसांत हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. एल निनोचा प्रभाव असताना महाराष्ट्रात दुष्काळस्थिती होण्याची चिंता व्यक्त करण्यात येत होता.मात्र एल निनोचा प्रभाव वाढत असतानाच आयओडी ( इंडियन ओशिनल डायपोल) सक्रीय होत आहे.

इंडियन ओशिनल डायपोल सक्रीय होत असल्याने मान्सूनला पुन्हा मदत होणार आहे. रायगडसह पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावरील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर व उपनगरात अधून मधून पावसाचा खेळ सुरू असून 12 ऑगस्टपर्यंत पावसाची अशीच स्थिती राहिल. 12 ऑगस्टनंतर मात्र हवामानात बदल होऊ शकतो.

अधिक वाचा  BRICS शिखर परिषद ‘पुणेरी’ मान व्हिएतनामच्या पंतप्रधानांचे भारत सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांनी केले स्वागत

20 ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढणार आहे. मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात पॉझिटिव्ह आयओडीमुळं एल निनोचा प्रभाव कमी होऊ शकतो. पण त्यासाठी हवेतील इतर घटक आणि बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांची साथ मिळणे आवश्यक आहे. सध्या हिंदी महासागरात पॉझिटिव्ह आयओडी सक्रीय होत असून त्यामुळं पावसाला मदत होऊ शकते. हिंदी महासागरात पॉझिटिव्ह आयओडी तयार होत आहे.

मागील आठवड्यात बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यात सर्वदूर पावसाची नोंद झाली. यात मराठवाडा, विदर्भ, तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात चांगला पाऊस नोंदला गेला. सध्या राज्यातील वादळी पावसाचा जोर ओसरला आहे. मंगळवारी काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली, तसेच गुरुवारपर्यंत मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

अधिक वाचा  पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, सुप्रिया सुळेंची मोर्चात एन्ट्री; फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी

रायगड आणि पुणे घाट विभागात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट विभाग, रत्नागिरी, सातारा घाट विभाग, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट विभाग, तसेच विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली आदी भागांत वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दिला आहे. तर नाशिक घाट वादळी पावसाचा प्रभाव होता. राज्यातील काही भागात अजूनही पावसाची तूट कायम असली तरीही मागील आठवड्यात झालेल्या पावसाने बहुतांश भागांना जूनच्या तुलनेत काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शनिवारपर्यंत राज्यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.