Home Blog Page 93

ही फाईल चुकूनही क्लिक करू नका.. आधी ड्रोन हल्ले आणि आता व्हायरस, पाकच्या कुरापती थांबेनात !

0

भारतात शांतता नांदत असली ती पाकड्यांच्या हमखास पोटात दुखतंच. गेल्या महिन्यात पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा पाकपुरस्कृतच होता, हे भारताने वेळोवेली स्पष्ट करूनही पाकचा कांगावा सुरूच आहे. आधी दहशतवादी मग भारताने हल्ला केल्यावर पाकचा जळफळाट झाल्यावर त्यांनी भारतावर थेट ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने तो हाणून पाडल्यावरही पाकची अक्कल काही ठिकाणावर येत नाही. त्यांच्या नव्.ा कुरापती सुरूच असून एका व्हायरसचा वापर करत पाकने सायबर अटॅकचा प्रयत्न केला आहे. या व्हायरसला त्यांनी नवं शस्त्र बनवून भारतीयांना त्रास देण्याचा नवा मार्ग शोधला आहे.

भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले, आता पाकिस्तान इंटरनेटच्या माध्यमातून भारतीयांना हानी पोहोचवण्याचा एक नवीन कट रचत आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तान आता भारतावर सायबर हल्ल्याची तयारी करत आहे आणि त्यासाठी डान्स ऑफ द हिलरी नावाचा धोकादायक व्हायरस एका फाईलमध्ये टाकून सोशल मीडियावर सर्क्युलेट केला जात आहे.

जर तुम्हाला व्हॉट्सॲप, फेसबूक, टेलिग्राम किंवा ईमेलवरही एखादी अनोळखी फआील किंवा लिंक आली तर त्यावर चुकूनही क्लिक करू नका, कारण तुमची ही छोटीशी चूक फारच महागात पडू शकते. या फाइलमध्ये असे मालवेअर आहे जे तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकते आणि आर्थिक नुकसानही करू शकते.

Dance of the Hillary म्हणजे काय ?

हा एक धोकादायक मालवेअर आहे जो व्हिडिओ फाइल्स आणि कागदपत्रांच्या स्वरूपात प्रसारित केला जात आहे. एकदा का हे मालवेअर तुमच्या डिव्हाइसमध्ये शिरले की ते सक्रिय होईल आणि तुमचे बँकिंग तपशील चोरीला जाण्याचा धोका वाढू शकतो, असा इशारा सुरक्षा तज्ञांनी दिला आहे. हा व्हायरस तुमच्यापर्यंत अज्ञात लिंक किंवा अटॅचमेंटच्या स्वरूपात पोहोचू शकतो, जर तुम्हाला tasksche.exe नावाची फाइल आढळली तर या फाईलवर क्लिक करण्याची चूक करू नका.

Malware Attack पासून कसा कराल बचाव ?

अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा.

तुमची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ठेवा.

संशयास्पद लिंक्स आणि अटॅचमेंटवर क्लिक करणे टाळा.

मजबूत पासवर्ड वापरा.

कोणतेही ॲप डाउनलोड करताना काळजी घ्या.

Cyber Crime Helpline Number

जर तुम्ही चुकून एखाद्या अज्ञात फाईलवर क्लिक केले आणि योगायोगाने तुमचे नुकसान झाले, तर वेळ न दवडता न करता 1930 (नॅशनल सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर) वर कॉल करा आणि तुमच्यासोबत जे घडलं त्याची सविस्तर माहिती देऊन तक्रार नोंदवा.

दक्षिणेकडून देखील सायक्लोनिक सर्क्युलेशन अरबी समुद्रावरुन आलंय अस्मानी संकट, पुढचे पाच दिवस 25 जिल्ह्यांत हवामान विभागाचा अलर्ट

0

मुंबई: महाराष्ट्रात हवापालट झाली असून उष्ण वातावरण गायब झालं आहे. पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे महाराष्ट्रावर पावसाचं आणि गारपिटीचं संकट आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांना हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. दक्षिणेकडून देखील सायक्लोनिक सर्क्युलेशन सारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे हवेत वेगानं बदल होत आहेत.

अर्ध्यापेक्षा जास्त ठिकाणी महाराष्ट्रात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस महत्त्वाचे असणार आहेत. दिवसा 4 दिवस हळूहळू तापमान वाढ होणार आहे. तर संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा असल्याने कमाल तापमानात घट होऊ शकते.

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि धुळे जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढचे चार दिवस असंच हवामान राहील यामध्ये विशेष बदल होणार नाही. धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील किंवा हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दुसरीकडे जळगाव, नाशिक, घाट परिसर, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, अकोला, बुलढाणा, चंद्रूपर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या भागात ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा इशारा दिला आहे.

भारताने प्रत्युत्तर दिल्यानंतर बाबर आझमचा थरथराट, मोहम्मद अली जिन्नाची आली आठवण

0

दहशतवाद्यांचं आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानवर भारताने हल्लाबोल केला आहे. पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला होता. या हल्ल्याचं भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याचं जशाच तसं उत्तर दिलं आहे. भारताचं दहशतवाद्यांविरोधातील आक्रमक रूप पाहून पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमची बोबडी वळाली आहे. त्याने भारताच्या कारवाईचा इतका धसका घेतला की, स्वत:ला सावरण्यासाठी त्याला मोहम्मद अली जिन्नाची आठवण पडली आहे. त्याने भीती लपवण्यासाठी मोहम्मद अली जिन्नांचे शब्द पोस्ट केले आहेत. एखादी व्यक्ती खूपच धास्तावली की भीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशी कृती अवलंबते. तसंच काहीसं क्रिकेटपटू बाबर आझमने केली आहे. पण मोठ्या गोष्टी करून प्रत्यक्षात त्याचा अवलंब न केल्याने काहीच फरत पडत नाही. भारत कशासाठी प्रत्युत्तर देत आहे याकडे बाबर आझम दुर्लक्ष करत आहे. देशात दहशतवाद फोफावत असताना मूग गिळून बसलेला बाबर आझम अचानक जागा झाला आहे. भारत आता प्रत्येक हल्ल्याचं उत्तर देणार आहे.

भारताने पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले निष्फळ केले. त्यानंतर प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या काही शहरांना लक्ष्य केलं. यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. त्यामुळे बाबर आझमने मोहम्मद अली जिन्नाच्या वक्तव्याचा आसरा घेत पोस्ट केली आहे. यात त्याने लिहिलं की, ‘जगात अशी कोणतीच ताकद नाही, जी पाकिस्तानला पराभूत करू शकेल.’ या माध्यमातून भारताने किती हल्ले चढवले तरी काही फरक पडत नाही असं सांगत आहे. पण पाकिस्तान भारतापुढे टिकणार नाही हे स्पष्ट आहे. कारण पाकिस्तानच्या तुलनेत भारताची युद्ध सामुग्री आणि सैन्य दल तिप्पट आहे. त्यामुळे बाबर आझम असून सांगून फार तर मनाला दिलासा देऊ शकतो. या व्यतिरिक्त काहीच नाही. यामुळे त्याचं घाबरणं सहाजिकच आहे.

22 एप्रिल 2025 रोजी भारतीय नागरिक पहलगाम पर्यटनासाठी गेले होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांना टार्गेट केलं आणि 26 नागरिकांचा बळी घेतला. यानंतर भारताने या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं स्पष्ट केलं. तसेच 7 मे रोजी दहशतवादी ठिकाणांवर हल्ले चढवले. यामुळे दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान खवळलला आणि गुरुवारी भारतावर हल्ले केले. यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामुळे पाकिस्तानला पाकिस्तान प्रीमियर लीग स्पर्धा दुबईत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑपरेशन सिंदूरचे हिरो: एकाची रणनीति, तर दुसऱ्याची गुप्त माहिती, हे आहेत एअर स्ट्राइकचे सुपर कमांडर!

0

नवी दिल्ली: भारताने ऑपरेशन सिंदूर घडवत पाकिस्तानाला मोठा दणका दिला. भारतीय हद्दीतूनच पाकिस्तानमध्ये खोलवर हल्ले चढवत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पण ही गोष्ट करणं तेवढी काही सोप्पी नव्हती. त्यामुळे हे नेमकं कसं घडलं आणि त्याचे नेमके हिरो कोण हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

ऑपरेशन सिंदूर  खरे तर 5 हिरो आहेत. त्यापैकी कोणी रणनिती आखली तर कोणी गुप्त माहिती काढली. त्यामुळे हे हिरो नेमके कोण?

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी: ऑपरेशन सिंदूरचे सर्वोच्च कमांडर

राष्ट्रपती हे तिन्ही सैन्यदलांचे सर्वोच्च कमांडर असले तरी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च कमांडरची भूमिका बजावली आहे. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण ऑपरेशनची सूत्रं स्वतःच्या हाती घेतली.

या हल्ल्यात दहशतवाद्यांनी महिलांच्या आणि मुलांच्या समोर त्यांच्या घरातील कर्त्या लोकांचा जीव घेतला. “जा आणि मोदींना सांगा.” असं म्हणत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये मृत्यूचं तांडवं केलं होतं. दहशतवाद्यांचे हेच शब्द पंतप्रधान मोदींच्या मनाला डागण्या देत होते. त्यामुळेच त्यांनी ठरवलं की, या हल्ल्याचा बदला घेतलाच पाहिजे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की दहशतवाद्यांची उरलेली जमीनही उद्ध्वस्त केली जाईल आणि दहशतवाद्यांसह त्यांच्या मालकांचा कणा मोडला जाईल.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच सुचवले होते. त्यांनी सैन्याला दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईचे नाव “ऑपरेशन सिंदूर” ठेवण्याचा सल्ला दिला, जो सैन्याने स्वीकारला. ऑपरेशनपूर्वी गेल्या 12 दिवसांत पंतप्रधान मोदींनी सुरक्षा यंत्रणा आणि सैन्यदलांसोबत 15 हून अधिक बैठक घेतल्या. ते 7LKM येथून या ऑपरेशनवर सतत लक्ष ठेवत होते. सैन्यदलाच्या प्रमुखांसह रॉ (RAW) चे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) यांच्यासोबत सतत संपर्कात राहून त्यांनी या ऑपरेशनला आकार दिला.

2. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल: मुख्य नियोजक

ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण कमांड राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या हातात होती. डोवाल हे पंतप्रधान मोदींचे सर्वात विश्वासू व्यक्ती मानले जातात. त्यांनीच हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले. लाहोरपासून 409 किलोमीटर अंतरावर बसून डोवाल यांनी मध्यरात्री दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले.

डोवाल यांनी सर्वप्रथम रॉ आणि इतर गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानातील दहशतवादी तळांची संपूर्ण माहिती तयार करण्यास सांगितले. रॉने सैन्य, नौदल आणि वायुसेनेला गुप्त माहिती पुरवली आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांची निवड स्वतः केली. पंतप्रधानांप्रमाणेच डोवाल यांनीही पहलगाम हल्ल्यानंतर 15 हून अधिक बैठक घेतल्या. या हल्ल्याची संपूर्ण योजना डोवाल यांनीच आखली होती.

हल्ल्यादरम्यान पंतप्रधान मोदी रात्रभर जागे होते आणि डोवाल त्यांना प्रत्येक मिनिटाची माहिती देत होते. त्यानंतर सैन्यदलांनी दहशतवादी तळांविरुद्ध वापरण्यासाठी शस्त्रांची निवड केली. वायुसेनेने स्टँड-ऑफ शस्त्रांचा वापर केला, ज्यामध्ये हेरॉन ड्रोन, राफेल विमानांनी SCALP आणि डीप पेनिट्रेशन स्पाइस 2000 मिसाइल्सचा वापर केला. सैन्याने ड्रोन आणि UCAVs द्वारे प्रेसिजन स्पेशल म्युनिशन्सचा वापर केला, तसेच इतर योग्य शस्त्रे आणि प्लॅटफॉर्म्सचा समावेश होता.

या सर्व तयारीनंतर भारतीय सैन्य, नौदल आणि वायुसेनेने संयुक्तपणे हल्ले केले, ज्यामध्ये अनेक लक्ष्यांचा समावेश होता. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटांवर हवाई हल्ले करून त्यांचे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले.

3. रॉ सचिव रवी सिन्हा: गुप्तचर कमांडर

रवी सिन्हा यांनी लष्कर आणि जैशच्या पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांबाबत अचूक माहिती पुरवण्याची जबाबदारी पार पाडली. रॉ आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनने 21 दहशतवादी अड्ड्यांची माहिती दिली, त्यापैकी 9 सर्वात महत्त्वाच्या लक्ष्यांवर मिसाइल हल्ले करण्यात आले.

रवी सिन्हा हे 1988 च्या छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत आणि सध्या ते कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत आहेत. गुप्तचर संकलन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे श्रेय त्यांना जाते. रवी सिन्हा गुप्तचर समुदायात त्यांच्या व्यावसायिक क्षमतेसाठी आदरणीय व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ रॉमध्ये काम केले आहे आणि यापूर्वी ते रॉच्या ऑपरेशनल विंगचे प्रमुख होते.

4. सीडीएस जनरल अनिल चौहान, सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, वायुसेना प्रमुख मार्शल ए.पी. सिंग आणि नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी ऑपरेशनचे सैन्य कमांडर

पहलगाम हल्ल्यानंतर 11 व्या दिवशी, म्हणजेच 3 मे रोजी दिल्लीत एक बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, वायुसेना प्रमुख मार्शल ए.पी. सिंग आणि नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी उपस्थित होते. या बैठकीत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर पुन्हा एकदा हवाई हल्ले करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याच दिवशी आणखी एक बैठक झाली, ज्यामध्ये पाकिस्तानात चालणारे दहशतवादी तळ संपवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे ठरले. त्यानंतर तिन्ही सैन्यदलांमधून निवडक अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली.

यापूर्वी, 26 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान आणि इतर सैन्यदल प्रमुखांसह एक महत्त्वाची बैठक घेतली. या दीड तासाच्या बैठकीत पंतप्रधानांनी तिन्ही सैन्यदलांना पाकिस्तानविरुद्ध कारवाईसाठी मोकळीक दिली.

अखेरीस, 6-7 मे च्या मध्यरात्री 1:05 वाजता भारतीय वायुसेनेने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले केले. अवघ्या 25 मिनिटांच्या ऑपरेशनमध्ये 7 शहरांमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.

5. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री: मुत्सद्देगिरी आणि संवाद कमांडर

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, जे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे विश्वासू सहकारी आहेत, यांना ऑपरेशन सिंदूरसाठी मुत्सद्देगिरी आणि संवाद कमांडरची जबाबदारी देण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने आयोजित केलेल्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेची जबाबदारीही मिस्री यांनी स्वीकारली. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि चीनसारख्या देशांमध्ये भारताची बाजू ठामपणे मांडण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती.

मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “या ठिकाणांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली होती, जेणेकरून कोणत्याही नागरी हानी किंवा गैर-लष्करी पायाभूत सुविधांचे नुकसान होणार नाही.”

मिस्री यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या पाकिस्तान डेस्कवर काम केले आहे. ते पंतप्रधान कार्यालयात संयुक्त सचिव म्हणूनही कार्यरत होते आणि त्यांनी आय.के. गुजराल, डॉ. मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या तीन पंतप्रधानांचे खाजगी सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.

भारतीय Navyकडून कराची बंदर उद्ध्वस्त, पाकिस्तानवर समुद्री हल्ला; थेट INS विक्रांतच्या मदतीने भारताने पाकिस्तानवर सागरी हल्ला सुरू

0

कराची: पाकिस्तानने गुरुवारी (8 मे) रात्री भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर भारताने आता प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाने पाकिस्तानचे कराची बंदर उद्ध्वस्त केले आहे. नौदलाने केलेल्या हल्ल्यात नौदलाने कराची बंदरावर अनेक क्षेपणास्त्रे सोडली. ज्यामुळे हल्ल्यांमध्ये कराची बंदर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे.

पाकिस्तानचं कराची बंदर केलं उद्ध्वस्त

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय नौदलाने आधीच अरबी समुद्रात आयएनएस विक्रांतला तैनात केलं होतं. पण आता पाकिस्तानच्या कुरापती वाढल्यानंतर विक्रांतने पाकिस्तानवर थेट हल्लाच केला.

हे नौदलाचे हे सर्वात घातक जहाज कारवार किनाऱ्याजवळ तैनात करण्यात आलेले. त्यांच्या स्ट्राइक ग्रुपमध्ये विमानवाहू जहाजे, विध्वंसक, फ्रिगेट्स, पाणबुडीविरोधी युद्धनौका आणि इतर सहाय्यक जहाजे समाविष्ट आहेत. भारताच्या तिन्ही सैन्याने एकत्रितपणे प्रथम पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ज्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर हल्ले सुरू झाले आहे. ज्याला भारतीय लष्कर योग्य प्रत्युत्तर देत आहे.

भारताने पाकिस्तानचे 3 जेट फायटर पाडले

सरकारी सूत्रांनी सांगितले की, इस्लामाबादने जम्मू आणि पंजाबमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केल्यानंतर भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने एक पाकिस्तानी F-16 आणि दोन JF-17 विमानं नष्ट केली. सूत्रांनी सांगितले की, भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पाकिस्तानची एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) देखील उद्ध्वस्त केली

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील उधमपूर आणि राजस्थानमधील जैसलमेर येथेही ड्रोन हल्ले उधळण्यात आले आणि अखनूरमध्ये एक ड्रोन पाडण्यात आला. पूंछमध्येही दोन ड्रोनही पाडण्यात आले.

पाकिस्तानकडून पुन्हा हल्ला, कुठे Attack.. कुठे ब्लॅक आऊट? सगळ्यात अचूक माहिती

0

नवी दिल्ली: पाकिस्तानने पुन्हा एकदा हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये जम्मूमधील विमानतळ टार्गेट करण्यात आलं, परंतु भारताने हा हल्ला परतवला आहे. भारताच्या S-400 ने आतापर्यंत 8 पाकिस्तानी ड्रोन आणि मिसाइल निकामी केली आहेत. तसेच  पाकिस्तानचे F-16 जेटही पाडण्यात यश मिळवलंय. एकीकडे मिसाइल हल्ला सुरू असतानाच पाकिस्तानने सांबा येथे गोळीबारही सुरू केला.

पाकिस्तानने पुन्हा केला भारतावर हल्ला

पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर जम्मूतील आरएस पुरा भागात ब्लॅकआउट  करण्यात आला. तसंच हवाई हल्ल्याचा धोका सूचित करणारा सायरन सातत्याने वाजवला जात आहे. जेणेकरून येथील नागरिक हे सुरक्षित स्थळी पोहचू शकतील.

सध्या जम्मू शहरात मोबाइल नेटवर्क देखील ठप्प झालं आहे. दुसरीकडे, कुपवाडामध्येही जोरदार गोळीबार झाला आहे. तंगधारमध्येही पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात तोफगोळे डागण्यात येत आहे. त्याच वेळी, पूंछ आणि राजौरीमध्येही जोरदार गोळीबार सुरू आहे.

भारतीय हवाई संरक्षण दलाने अनेक महत्त्वाच्या ठिकाणांजवळ जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली बसविण्यात आली आहे. हीच प्रणाली आता पाकिस्तानी हल्ल्यांना प्रत्युत्तर देत तेच हल्ले परतवून लावत आहे. ही प्रणाली जम्मू विमानतळाजवळ, पठाणकोटजवळ, अखनूर सेक्टर आणि सांबा परिसरात तैनात करण्यात आली आहे. तर जम्मू विमानतळावरून लढाऊ विमानं ही सातत्याने उड्डाण करत आहेत.

दुसरीकडे पाकिस्तानने राजस्थानमधील जैसलमेरवरही हल्ल्याचा प्रयत्न केल्याचं समजतं आहे. कारण येथे काही स्फोटाचे आवाज देखील ऐकू आले आहेत. यामुळे जैसलमेरमध्येही ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे.

पाकिस्तानकडून भारतात कुठे हल्ला, कुठे ब्लॅकआऊट? संपूर्ण यादी

उधमपूर (ड्रोन हल्ला)

जम्मू (ड्रोन हल्ला)

अखनूर (ड्रोन हल्ला)

पठाणकोट (ड्रोन हल्ला)

अमृतसर (ड्रोन हल्ला)

कुपवाड (ड्रोन हल्ला)

कठुआ (ड्रोन हल्ला)

सांबा सेक्टर (गोळीबार आणि ड्रोन हल्ला)

तंगधार (जोरदार गोळीबार)

गुलमर्ग (ड्रोन हल्ला)

राजौरी (LOC जवळ हल्ला)

पूँछ (जोरदार तोफगोळ्यांचा हल्ला)

आर पुरा (ड्रोन हल्ला)

अर्णिया (ड्रोन हल्ला)

बारामुल्ला (ब्लॅकआऊट)

उरी (ब्लॅकआऊट)

फिरोजपूर (गोळीबार, ब्लॅकआऊट)

जैसलमेर (तोफगोळ्यांचा हल्ला)

जालंधर (ड्रोन हल्ला)

चंदीगड (सायरन वाजण्यास सुरुवात, ब्लॅकआऊट)

कच्छ (ब्लॅक आऊट)

मोहाली (ब्लॅक आऊट)

श्रीनगर (ब्लॅक आऊट)

धरमशाला (मैदानात ब्लॅक आऊट, IPL मॅच थांबवली)

पोखरण (पाकिस्तानचं फायटर पाडलं)

पाकिस्तान दहशतवाद्यांचा आश्रयदाता हे नवीन नाही, सध्याच्या तणावात अमेरिकेचा भारताला उघड पाठिंबा जागतिक शांततेसाठी हे धोकादायक

0

भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव कमालीचा वाढला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारतावर प्रतिहल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परंतु भारताने पाकिस्तानचा हल्ला परतवून लावला. जागतिक पातळीवर पाकिस्तानला पाठिंबा मिळत नाही. आता अमेरिकेनेही पाकिस्तानला उघडे पाडले आहे. अमेरिकेने पाकिस्तानवर दहशतवाद्यांना समर्थन देण्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या हिंसाचार अवैध आणि अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. जागतिक शांततेसाठी हे धोकादायक आहे. अमेरिकेकडून आलेले हे वक्तव्य आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला मिळत असलेला पाठिंबा दाखवत आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित पत्रकार परिषदेत प्रवक्ता टॅमी ब्रूस यांना प्रश्न विचारण्यात आला. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना पाठिंबा अन् प्रोत्साहन दिला जात असल्याचा भारताच्या आरोपाला तुमचा पाठिंबा आहे का? त्यावर टॅमी ब्रूस यांनी म्हटले, होय, हा नवीन मुद्दा नाही. अनेक दशकांपासून हा प्रश्न आहे. हे एक सत्य आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी लोकांचे जीवन अवघड बनवले आहे.

काश्मीरमध्ये जे झाले ते अस्वीकार्य आणि अवैध असल्याचे टॅमी ब्रूस यांनी सांगितले. ते म्हणाले, जगाने या पद्धतीचा हिंसाचार नाकारला आहे. आम्ही पहलगाम हल्ल्यातील पीडित परिवारांसोबत आमच्या संवेदना प्रकट करतो. ब्रूस पुढे म्हणाले की, गेल्या काही आठवड्यांतील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील परिस्थिती खूपच चिंताजनक बनली आहे. परंतु दोन्ही देशांनी संवादाला प्राधान्य दिले पाहिजे, हे महत्त्वाचे आहे. या चर्चेत अमेरिकेची भूमिका मध्यवर्ती राहिली आहे. अमेरिकेने दोन्ही देशांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे.

अमेरिकेकडून हे वक्तव्य भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला असताना आले आहे. त्यामुळे अमेरिका भारताच्या पाठिशी ठामपणे असल्याचे संकेत मिळत आहे.  पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले आहे. भारताचा स्पष्ट आरोप असा आहे की पाकिस्तान आपल्या भूमीवर दहशतवादाला आश्रय देतो आणि भारतावर हल्ला करण्यासाठी त्यांना चिथवणी देतो.

मुरीदकेत मोठा दहशतवादी ठार? अंत्ययात्रेत ‘तो’ लष्कर कमांडर सामील! सैनिक वरिष्ठ पोलीस अधिकारीही सामील

0

भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत दहशतवादाविरोधात मोठी कारवाई केली. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके आणि बहावलपूरसारख्या दहशतवादी ठिकाणांवर टार्गेट केलं. या हल्ल्यात लष्कर-ए-तयब्बाचे अनेक दहशतवादी मारले गेले. पाकिस्तान मीडियाच्या हवाल्याने एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये लष्कर-ए-तयब्बाचा टॉप कमांडर हाफिज अब्दुल रऊफ दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारच्या विधीच्या कार्यक्रमात सामील झाल्याचं समोर आलंय.

दहशतवादांच्या अंत्ययात्रेत लष्कर-ए-तयब्बाचा टॉप कमांडर सामील

लष्कर-ए-तयब्बाचा टॉप कमांडर हाफिज अब्दुल रौफ भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सामील झाला होता. त्याने अंत्यसंस्कारात नमाज वाचलं. यावेळी पाकिस्तानचे सैनिक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारीही सामील झाले होते. लष्कर-ए-तयब्बाचा टॉप कमांडरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

यावरून हे स्पष्ट होतंय की, भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांचं समर्थन करतं, असंही यावरून स्पष्ट होतंय.भारताने अमेरिका, रशिया, फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि चीनसह अनेक देशातील राजकारण्यांना पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे.

भारताने सांगितलं की, सुरक्षेच्या दृष्टीने हा हल्ला महत्त्वपूर्ण होता. या कारवाईत बहावलपूरमध्ये दहशतवादी मसूद अजहरचा उड्डा उद्ध्वस्त झाला आणि मुरीदकेमधील लष्करचं मुख्यालयंही उडवून टाकलं. हा हल्ला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी होता. पाकिस्तानवर हल्ला करण्यात आला नाही. तेथील नागरिकांवर हल्ला करण्यात आला नाही, असं भारतानं म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बने उडवणार, पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर दिली धमकी,14 अन् 18 मे रोजी हे होणार सामने

0

 इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 दरम्यान पाकिस्तानने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिलीय. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने दिलेल्या धमकीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या (GCA) अधिकृत इमेलवर धमकीचा मेल आला आहे. यामध्ये लिहिलंय की, आम्ही तुमच्या स्टेडियमला उडवून टाकू. हा मेल पाकिस्तानच्या नावाने पाठवण्यात आला आहे. यानंतर सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या असून या गंभीर प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर लगेच ही धमकी देण्यात आली आहे. यामुळे याप्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काही दिवसात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) चे दोन महत्त्वाचे सामने खेळवले जाणार आहेत. हे पाहता स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गुजरात पोलीस आणि सायबर क्राईम टीमने तातडीनं कारवाई करत इमेलच्या सोर्सचा तपास केला जात आहे. इमेलचं ट्रेसिंग केलं जात आहे, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. यामुळे इमेल कोणी आणि कुठून पाठवला आहे, हे माहित होईल.

GCA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, ते सतत पोलीस आणि सुरक्षा एजन्सिच्या संपर्कात आहेत. स्टेडियममधील सुरक्षा रक्षकांना याबाबत सतर्क करण्यात आलं आहे. याशिवाय बीसीसीआय आणि आयपीएलची आयोजन समितीलाही याप्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. धमकीच्या सत्यतेबाबत तपास केला जात आहे, कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी शक्य तेव्हढी तयारी केली जात आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

14 आणि 18 मे रोजी होणार सामने

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 14 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सचा सामना होणार आहे. तर 18 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा सामना खेळवला जाणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठा क्रिकेट स्टेडियम आहे. .या स्टेडियमची 1 लाख 32 हजार इतकी प्रेक्षक क्षमता आहे.

भारतीय एअरस्ट्राईकनंतर 24 तासांतच पाकिस्तानवर दुसरा हल्ला, रिमोटनं पाक आर्मी ताफा उडवला, 12 जणांचा मृत्यू

0

दिल्ली: बुधवारी मध्यरात्री भारताने पाकिस्तानात घुसून एअरस्ट्राईक केला आहे. इंडियन एअर फोर्सने ९ दहशतवादी तळांना टार्गेट केलं. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य बिथरलं आहे. त्यांनी भारतीय सीमेवर गोळीबार करायला सुरुवात केली. भारताने पाकिस्तानवर केलेला हल्ला ताजा असताना आता आणखी एक आर्मी पाकिस्तानविरोधात अॅक्टीव्ह झाली आहे. पाकिस्तानमध्ये बीएलए अर्थात बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यासोबत रक्तरंजित होळी खेळली आहे. बलुच लिबरेशन आर्मीने बोलनच्या मच कुंड भागात गस्तीवर असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर रिमोट-कंट्रोलच्या मदतीने आयईडीने हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे १२ सैनिक मृत्युमुखी पडले आहेत.

भारताने केलेला एअरस्ट्राईक ताजा असताना बलुच लिबरेशन आर्मीने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान बिथरलं आहे. खरं तर, गेल्या काही काळापासून बलुचिस्तानमधील बलुच लिबरेशन आर्मी पाकिस्तानसोबत मोठा संघर्ष करत आहे. पाकिस्तानने अनेकदा बीएलएला चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आर्मी अद्याप बलुचिस्तानमध्ये तग धरून आहे. भारताने हल्ला केल्यानंतर या बीएलएने देखील पाकिस्तानवर हल्ला केला. ज्यात पाकिस्तानचे १२ सैनिक मारले गेले.

हा हल्ला कधी झाला?

७ मे २०२५ रोजी शोरकंद परिसरात पाकिस्तानी सैन्याचा ताफा गस्तीवर होता. हा ताफा बोलनच्या मच कुंड भागात आला असता बलुच लिबरेशन आर्मीने या ताफ्याला टार्गेट केलं. हा हल्ला करण्यासाठी बीएलने खास टेक्नॉलॉजीचा वापर केला. रिमोट कन्ट्रोलच्या मदतीने स्फोट घडवून आणला. बीएलएच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने (एसटीओएस) प्रत्यक्षात हा हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि त्यात असलेले सर्व सैनिक ठार झाले.

बलुचिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून अशांतता

गेल्या अनेक वर्षांपासून बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू आहे. बलुच लिबरेशन आर्मी पाकिस्तानी सैन्यावर सतत हल्ले करत आहे आणि त्यांचे मोठे नुकसान करत आहे. मार्चमध्ये, क्वेट्टाहून पेशावरला जाफर एक्सप्रेसचे बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या सदस्यांनी अपहरण केले होते. यामध्ये मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैनिक मारले होते. गेल्या दोन दशकांपासून तिथे अशांतता आहे आणि सतत हल्ले होत आहेत. स्थानिक बलुच नेत्यांचा आरोप आहे की देशाचे संघराज्य सरकार बलुचिस्तानच्या मौल्यवान खनिज संपत्तीचे शोषण करत आहे आणि त्यांना दुय्यम दर्जाचे राष्ट्र म्हणून वागवत आहे.