Home Blog Page 90

कोणतीही युद्धबंदी अद्याप नाही ‘पाकिस्तान ऐकायला तयार नाही हल्ले सुरूच, indian Army लाही कारवाईचे हे आदेश

0

नवी दिल्ली: ‘भारत आणि पाकिस्तान यांनी युद्धबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. ज्यासाठी मी मध्यस्थी केली.’ असं ट्वीट करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाक युद्धबंदी झाल्याचं जाहीर केलं. पण त्यांच्या या ट्विटला 3 तास उलटत नाही तोच पाकिस्तानने भारतावर अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले. तर दुसरीकडे LOC जवळ देखील सातत्याने गोळीबार करण्यात आला.

पाकिस्तानने केलेले हे हल्ले म्हणजे शस्त्रसंधीचं पूर्णपणे उल्लंघन आहे. ज्यामुळे भारताने देखील या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. पाकिस्तानकडून पाठविण्यात आलेले सगळे ड्रोन्स भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीद्वारे नेस्तनाबूत करण्यात आले.p

एकीकडे स्वत: ट्रम्प यांनी युद्धबंदी होत असल्याची घोषणा केलेली असताना दुसरीकडे पाकिस्तानने अवघ्या काही तासात शस्त्रसंधीचं उल्लघंन करत त्यांची नेमकी मानसिकता काय आहे हे दाखवून दिलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराच्या या कृत्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र. या प्रकरणी ठोस आणि कठोर पावलं उचलावेत असे आदेश भारतीय लष्कराला देण्यात आले आहेत.

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्यानंतर याबाबतची माहिती देण्यासाठी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेण्यात आली. ज्यामध्ये परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिसरी यांनी मोजकीच माहिती दिली. पाहा विक्रम मिसरी नेमकं काय म्हणाले.

रात्री उशिरा पत्रकार परिषद, पाकिस्तानच्या शस्त्रसंधीबाबत नेमकं म्हटलं

पत्रकार परिषदेला संबोधित करताना विक्रम मिसरी म्हणाले की, ‘मागील काही तासांपासून पाकिस्तानकडून घोर उल्लंघन होतं आहे. भारतीय लष्कर प्रत्युत्तर देत आहे आणि या सीमरेषा अतिक्रमणाशी लढा देत आहे. हे अतिक्रमण अत्यंत निंदनीय आहे आणि पाकिस्तान यासाठी जबाबादार आहे. आमचं मानणं आहे की, पाकिस्तानने ही स्थिती नीटपणे समजून घेतली पाहिजे.तसंच हे अतिक्रमण रोखण्यासाठी त्यांनी उचित कार्यवाही केली पाहिजे.’

‘लष्कराने या संपूर्ण परिस्थितीवर डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवलं आहे. तसंच कोणतंही अतिक्रमण परतवून लावण्यासाठी ठोस आणि कठोर पावलं उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, पाक लष्कराचं सरकारविरोधी बंड? नेमकं काय घडतंय?

0

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी अधिकृतपणे तसे सांगितले आहे. दरम्यान, दोन्ही देशांतील युद्धजन्य परिस्थिती निवळत आहे, असे सांगितले जात असतानाच भारत-पाकिस्तानने सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. याच कारणामुळे सध्या सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार भारत आणि पाकिस्तान सीमाभागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने काश्मीरमध्ये ड्रोन हल्ले केले आहेत. श्रीनगरमध्ये 50 हून अधिक स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. पंजाब, राजस्थान राज्यातील सीमाभागातही ड्रोन दिसल्याचे वृत्त आहे. याच कारणामुळे पंजाब, राजस्थान, जम्मूत ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. पंजाबच्या एकूण 9 शहरांत संपूर्णपणे ब्लॅकआऊट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाबच्याही भोगा परिसरात ब्लॅकआऊट करण्यात आले आहे.

पाकिस्तानी लष्करांचे बंड?

तसं पाहायचं झालं तर पाकिस्तान सरकारनेच भारताला कॉल करून शस्त्रसंधीच्या चर्चेला सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र अवघ्या काही तासांत पाकिस्तानच्या लष्कराने भारतावर हल्ले केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानी लष्कर आता पाकिस्तानी सरकारच्या विरोधात गेले आहे. त्यामुळेच आता पाकिस्तानी आर्मीने पाकिस्तानी सरकारविरोधात बंड तर केले नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, आता पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यावर भारत सरकार आणि लष्कर नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अखेर युद्धविराम घोषित, 5 वाजल्यानंतर हल्ला नाही, पण…; भारताची मोठी घोषणा काय?

0

सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला आहे, आज पाच वाजेपासून युद्धविराम करण्यावर दोन्ही देशांनी संमती दर्शवली आहे, याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती दिली आहे. भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम केला आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून सीजफायर झाला आहे. परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. आज दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओचा भारताच्या डीजीएमओला फोन आला होता. आता 12 मे रोजी दोन्ही देशाचे डीजीएमओ चर्चा करणार आहेत. एकमेकांवर गोळीबार न करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवल्याचंही परराष्ट्र सचिवांनी सांगितलं. दरम्यान युद्धविरामाला सहमती दर्शवतानाच भारतानं मोठी घोषणा केली आहे, दहशतवाद्यांविरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नाही अशी घोषणा भारताच्या वतीनं यावेळी करण्यात आली आहे.

दोन्हीकडून कोणतीही फायरिंग होणार नाही. मिल्ट्री कारवाई होणार नाही. जमीन, हवा आणि सागरी मार्गाने हल्ला होणार नाही. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांच्या बाजूने शस्त्रसंधी केली जात आहे. १२ तारखेला पुन्हा एकदा पाकिस्तानशी बोलणं होणार आहे.

दरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून या शस्त्रसंधीची माहिती दिली आहे. भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक समझोता केला आहे. भारताने दहशतवादाच्या सर्व प्रकारांप्रती आणि स्वरूपांप्रती कायमच कठोर आणि तडजोड न करणारी भूमिका घेतली आहे. ही भूमिका भारत पुढेही कायम ठेवेल, असं जयशंकर यांनी म्हटलं आहे.

भारतानं पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. भारतानं पीओके आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्याचे अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते, या सर्व पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला होता, अखेर आता युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे.

अमेरिका खरच आपला मित्र असेल तर ती 75 फायटर जेट्स तसा करारही पण…; भारतासाठी फक्त एक छोटीशी गोष्ट करा

0

सध्या भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सदृश्य स्थिती आहे. पाकिस्तान या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहे. भारतावर जळफळाट करणाऱ्या या देशाची आर्थिक स्थिती वाईट आहे. गृह युद्धाच्या उंबरठ्यावर हा देश आहे. पण, तरीही युद्ध लढण्याची पाकिस्तानची खुमखुमी अजून गेलेली नाही. मागचे सलग तीन दिवस त्यांनी भारतावर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताने आपल्या मजबूत एअर डिफेन्स सिस्टिमद्वारे त्यांचे सर्व हल्ले परतवून लावले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या पाकिस्तानने दहशतवाद्यांवरच्या प्रेमाखातर युद्धासारखी स्थिती आणली आहे. भारताने 7 मे रोजी पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये अनेक मोठे दहशतवादी मारले गेले.

या दहशतवाद्यांचे पाकिस्तानने राजकीय इतमामात दफनविधी केले व आपली खरी ओळख जगाला दाखवून दिली. कारण काही जागतिक दहशतवाद्यांसोबत पाकिस्तानातले नेते, लष्करी अधिकारी या दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला हजर होते. त्याचे व्हिडिओ, फोटो समोर आले आहेत. पाकिस्तानने मागच्या तीन दिवसात जम्मू-काश्मीरपासून गुजरातच्या भूजपर्यंत म्हणजे उत्तरेकडून पश्चिमेपर्यंत अनेक हल्ले केले आहेत. यासाठी पाकिस्तानने ड्रोन, मिसाइल आणि त्यांची फायटर विमान वापरली आहे.

तसा करार आहे, पण…

पाकिस्तानने त्यांचं F-16 विमानही भारतावर हल्ल्यासाठी वापरलं आहे. F-16 हे अमेरिकेने पाकिस्तानला दिलेलं फायटर जेट आहे. पाकिस्तानला अमेरिकेने अशी 75 फायटर जेट्स दिली आहेत. फक्त दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी अमेरिकेने ही विमानं दिली आहेत, तसा करार आहे. पण पाकिस्तान भारताविरोधात या विमानांचा वापर करतोय. भारत मूळातच ही सर्व लढाई दहशतवादाविरोधात लढत आहे.

त्यांचीच इज्जत वाचेल

अमेरिकेने दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताला पाठिंबा दिला आहे. अशावेळी पाकिस्तान F-16 विमानासंदर्भात अमेरिकेशी केलेला करार मोडत आहे. अशावेळी अमेरिकेने काहीही करुन, पाकिस्तानला F-16 विमानांचा वापर करायला देऊ नये. तितकी सक्ती अमेरिकेने दाखवावी. एवढीच अमेरिकेकडून माफक अपेक्षा आहे. कारण सध्याच्या घडीला पाकिस्तानकडे जी शस्त्र आहेत, त्यातल्या त्यात हेच एक थोडं चांगलं शस्त्र आहे. मागच्या तीन दिवसात भारताने पाकिस्तानची काही F-16 विमान पाडल्याच्या बातम्या येत आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला या विमानाचा वापर करण्यापासून रोखावं, त्यांचीच इज्जत वाचेल.

शस्त्रसंधी झाली पण अजूनही खेळ संपलेला नाही, 12 मे रोजी घडणार मोठी घडामोड; नेमकं काय होणार?

0

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता निवळण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही देशांत शस्त्रसंधीवर एकमत झाल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे भारताने अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तानने चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. असे असले तरी अजूनही या दोन्ही देशांतील तणाव पूर्णपणे निवळलेला नाही. कारण 12 मे रोजी आणखी एक महत्त्वाची घडामोड घडणार आहे.

12 मे रोजी नेमकं काय होणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्ध छेडलं जाऊ शकतं, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे दोन्ही देशांचे लष्कर आणीबाणीच्या काळाला तोंड देण्यासाठी सज्ज होते. पाकिस्तानकडून भारतावर हल्ले केले जात होते. भारतही या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत होता. असे असताना आता या दोन्ही देशांनी पुढे येत शस्त्रसंधीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला करण्याचे थांबवले आहे. 5 वाजेपासून या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती

भारताने शस्त्रसंधीची अधिकृत घोषणा करण्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी करण्याचे मान्य केले आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यानंतर भारतानेही शस्त्रसंधी झाल्याचं अधिकृतपणे सांगितलं होतं.

12 मे रोजी नेमकं काय होणार?

मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या डीजीएमओंना पाकिस्तानच्या डिजीएमओंचा कॉल आला होता. दुपारी झालेल्या या कॉलमध्ये दोन्ही डिजीओंमध्ये युद्धजन्य स्थिती थांबवण्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर 5 वाजेपासून दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही देशांत सध्या शस्त्रसंधी झालेली असली तरी अद्याप हा तणाव पूर्णपणे संपलेला नाही. याच कारणामुळे येत्या 12 मे रोजी दोन्ही देशांच्या डिजीओंमध्ये चर्चा  होणार आहे. या चर्चेत शस्त्रसंधीच्या अटी आणि इतर गोष्टींवर चर्चा होणार आहे. त्यामुळे 12 मे रोजी होणाऱ्या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ही चर्चा सकारात्मक ठरली तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध टळू शकते अन्यथा भविष्यात काहीही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खुशखबर…मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकणार, २७ मे रोजी आगमन होण्याची शक्यता, महाराष्ट्रात कधी येणार?

0

भारतात यावर्षी मान्सूनचं आगमन वेळेआधीच होणार आहे. येत्या २७ मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. तसेच मान्सून वेळेपूर्वी दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे.

गेल्या काही वर्षांतली दुसरी वेळ

दरवर्षी १ जूनच्या तेवढ्यात मान्सून भारतात दाखल होतो. तसेच ८ जूनपर्यंत संपूर्ण भारतात पसरतो. मात्र, यंदा तीन दिवस आधी म्हणजे २७ मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. जर अपेक्षेप्रमाणे मान्सून तीन आधी भारतात दाखल झाल्यास, वेळेपूर्वीच मान्सून भारतात दाखल होण्याची गेल्या काही वर्षांतली ही दुसरी वेळ असणार आहे. यापूर्वी २००९ मध्ये मान्सून वेळेपूर्वी म्हणजेच २३ मे रोजी दाखल झाला होता.

महाराष्ट्रात कधी येणार मान्सून?

महाराष्ट्रात मान्सून साधारण ७ जूनपर्यंत दाखल होतो. मात्र, मान्सून जर तीन दिवस आधी केरळात दाखल झाला, तर महाराष्ट्रातही मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. त्यानुसार जवळपास ४ ते ६ जूनदरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर २०२५ या काळातला पावसाचा दीर्घकालीन अंदाज आयएमडीने जाहीर केला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंज मोहपात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी सांगितलं की, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात यंदा मान्सूनला पोषक परिस्थिती असणार आहे. त्यामुळे सरासरीच्या तुलनेमध्ये २०२५ मध्ये १०५ टक्के पाऊस कोसळणार आहे.

मॉन्सूनसाठी लाभदायी स्थिती

महत्त्वाचं म्हणजे प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान तटस्थ राहण्याची शक्यता आहे. सरासरीच्या तुलनेमध्ये आयओडीही तटस्थ राहील. यासह उत्तर गोलार्दामध्ये हीम अच्छादनाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल, ही परिस्थिती चांगल्या मॉन्सूनसाठी लाभदायी ठरते. त्यामुळे राज्यातसह देशामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं

यंदा सरासरीपेक्षा १०५ टक्के अधिकचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कृषी विभागाने वेळोवेळी केलेल्या सूचनांनुसार आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणीबाबत निर्णय घ्यावेत, असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे. यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता असली तरी प्रत्यक्षात हंगाम कधी सुरु होतो, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

IPL 2025 चे उर्वरित सामने कुठे? यांची ऑफर, पण BCCI भारतातच ‘या’ ठिकाणांचा विचार; जाणून घ्या अपडेट्स

0

भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावात इंडियन प्रीमिअर लीग २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करावी लागली. आयपीएल २०२५ चे १६ सामने अजून शिल्लक आहेत आणि त्याबाबतचा निर्णय परिस्थितीवर अवलंबून आहे. यापूर्वीही ४ वेळा आयपीएल स्थगित करावी लागली आणि दुसरीकडे हलवली गेली होती. त्यामुळे बीसीसीआयला या परिस्थितीचा अनुभव आहे. बीसीसीआयकडे उर्वरित सामने खेळवण्यासाठी संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका आदी पर्याय आहेत. त्यात इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही ( ECB) मदतीची तयारी दर्शवली आहे. पण, बीसीसीआय ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी भारतातील ४ शहरांची चाचपणी करत आहेत.

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातली धर्मशाला येथे गुरुवारी झालेली लढत भारत-पाकिस्तान युद्धामुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर दोन्ही देशांतील खेळाडूंना विशेष वंदे भारत ट्रेनने दिल्लीत सुखरूप पोहोचवले गेले. परदेशी खेळाडूंनाही त्यांच्या मायदेशात पाठवण्याची सोय बीसीसीआयने केली आहे. BCCI कडे अंतिम निर्णयासाठी आठवड्याचा कालावधी आहे.

ECB चे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गोल्ड सांगितले की.”आम्ही बीसीसीआयला उर्वरित आयपीएलचे सामने खेळवण्यास मदत करण्यात तयार आहोत.

TOI ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय दक्षिण किंवा पूर्व भारतातील शहरांचा विचार करू शकते. बीसीसीआय त्यादृष्टीने काम सुरू आहे. बीसीसीआयला आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने भारतातच खेळवायचे आहेत आणि त्यासाठी कोलकाता, चेन्नई, हैदराबाद व बंगळुरू यांचा विचार करत आहे.

“अशा बाबींसाठी एक आठवडा खूप मोठा कालावधी असतो. बोर्ड योजना आखत आहे. पुढील आठवड्यात लीग पुन्हा सुरू झाल्यास कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरूसारख्या शहरांमध्ये उर्वरित आयपीएल सामने खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. सीमेवरील परिस्थिती सुधारल्यास मूळ ठिकाणे देखील सामने होऊ शकतात,” असे एका सूत्राने सांगितले.

ऑपरेशन सिंदूर नंतर काही तरी मोठं प्लॅनिंग? सीमा भागालगतचे भारताचे 32 Airport राहणार बंद, मुंबई विमानतळाचं काय? पाहा यादी

0

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील विमानतळे बंद करण्यात आली आहेत. भारतातील एकूण 32 विमानतळे बंद करण्याबाबत एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं सूचना जारी केलीय. सर्व नागरी उड्डाणांसाठी विमानतळ तात्पुरते बंद करण्यात येणार असल्याचं घोषित केलंय.

एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं सूचना केली जारी

एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, ही उड्डाणे 9 ते 14 मे 2025 पर्यंत बंद असल्याचं सांगण्यात येतंय. ज्यात बीकानेर, जैसलमेर, जोधपूर, किशनगढ, थोईस, उत्तरलाई यांचा समावेश आहे.

अधपमुर

थॉइस

उत्तरलाई

अंबाला

अमृतसर

शिमला

श्रीनगर

अवंतीपुर

भठिंडा

सरसावा

शिमला

भुज

बीकानेर

पोरबंदर

राजकोट (हीरासर)

चंदीगड

हलवारा

पटियाला

पोरबंदर

हिंडन

जैसलमेर

पठानकोट

पटियाला

जम्मू

जामनगर

जोधपुर

कांडला

केशोद

किशनगढ़

कुल्लू मनाली (भुंतर)

लेह

लुधियाना

मुंद्रा

नलिया

ही विमानतळं सध्या पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.

मुंबई विमानतळ सुरू की बंद?

मुंबई विमानतळ हे राज्यातीलच नाहीतर देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक महत्त्वाचं विमानतळ आहे. तर अशातच इतर 32 ते 34 विमानतळं बंद राहणार आहेत. ज्यात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश नसल्याचं संबंधित ट्विटमध्ये सांगण्यात आलंय. त्यामुळं मुंबई आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांची उड्डाणं सुरूच राहणार आहे. पण येथून केवळ मर्यादित विमानांचंच उड्डाण होईल. मात्र, यासाठी अनेकदा प्रवाशांना जास्त वेळ वाट पाहावी लागू शकते, असं सांगण्यात येतंय.

रेल्वेकडून विशेष गाड्या

भारत पाकिस्तान तणावजन्य परिस्थितीत भारतीय रेल्वेनं विशेष रेल्वे गाड्या सुरू ठेवल्या आहेत. रेल्वेचे सीपीआरओ हिमांशु शेखर उपाध्याय म्हणाले की, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पूर्ण परिस्थितीचा आढावा जाणून घेतला. अशातच त्या ठिकाणी अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी रेल्वे चालू ठेवण्याचे निर्देश जारी केलेत.

जम्मू, उधमपूर आणि कटराद्वारे स्पेशल रेल्वेनं जम्मू, उधमपूर आणि कटारातून दिल्लीतील एकूण पाच विशेष रेल्वे सुरू ठेवण्यात आल्या आहेत. गरूवारी रात्री एक रेल्वे ट्रेन दिल्लीतील सफदरगंज ठाणे येथे पोहोचली. ज्यात आयपीएलचे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटलचे खेळाडू धर्मशाळेतून वंदे भारत रेल्वेच्या माध्यमातून जलांधर येथे पोहोचले.

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराटच्या निवृत्तीची चर्चा, कोहलीच्या जागेसाठी 3 दावेदार, इंग्लंड दौऱ्यासाठी कुणाला संधी?

0

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत चाहत्यांना झटका दिला. त्यानंतर आता आणखी एक दिग्गज कसोटी क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. रोहित शर्मा याच्यानंतर विराट कोहली निवृत्त होणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने विराटला टेस्ट रिटायरमेंटसाठी अल्टीमेंटम दिलं होतं, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. त्यानंतर आता विराटच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. मात्र विराटकडून अजून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया लवकरच इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारत या दौऱ्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे विराटने निवृत्ती घेतली तर त्याच्या जागी कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. विराटच्या जागी खेळण्यासाठी भारताकडे 3 प्रबळ दावेदार आहेत. मात्र त्यापैकी निवड समिती कुणावर विश्वास दाखवणार? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. देवदत्त पडीक्कल, करुण नायर आणि रजत पाटीदार हे तिघे विराटच्या जागेसाठी दावेदार आहेत. या तिघांची रेड बॉल क्रिकेटमधील कामगिरी जाणून घेऊयात.

करुण नायरची उल्लेखनीय कामगिरी

टीम इंडियाकडून कसोटीत दोघांनीच त्रिशतक झळकावलं आहे. त्यापैकी एक म्हणजे करुण नायर. मात्र करुण नायर याला गेली अनेक वर्ष भारतीय संघात संधी मिळालेली नाही. करुण गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आहे.

करुणने 6 कसोटी सामन्यांमधील 7 डावांत 62.33 च्या सरासरीने 374 धावा केल्या आहेत. करुणची 303 ही सर्वोच्च धावसंख्या आहेत. करुणने 2016 साली इंग्लंड विरुद्ध चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये हा कारनामा केला होता. मात्र त्यानंतर निवड समितीने करुणवर विश्वास दाखवला नाहीय. करुणता गेल्या काही महिन्यांमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये दबदबा पाहायला मिळत आहे. त्यामुळे निवड समिती करुणची ही कामगिरी आणि आकडेवारी पाहता इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला संधी देणार का? हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे.

रजत पाटीदार

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार हा देखील विराटच्या जागी खेळण्यासाठी शर्यतीत आहे. देवदत्तने भारताचं आतापर्यंत 3 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय. मात्र रजतला आपली छाप सोडता आलेली नाही. रजतला 3 सामन्यांमध्ये 10.50 च्या सरासरीने 63 धावाच करता आल्यात.

रजत देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचं नेतृत्व करतो. रजतने डोमेस्टिक क्रिकेटमधील 68 सामन्यांमध्ये 13 शतकांच्या मदतीने 43.07 च्या सरासरीने एकूण 4 हजार 738 धावा केल्या आहेत.

देवदत्त पडीक्कल

देवदत्त पडीक्कल टीम इंडियाकडून 2 टेस्ट मॅच खेळला आहे. देवदत्तने 3 डावांत 30 च्या सरासरीने 1 अर्धशतकासह 90 धावा केल्या आहेत. तसेच देवदत्तने रणजी क्रिकेटमध्ये 43 सामन्यांमधील 71 डावात 57.81 च्या सरासरीने 2 हजार 815 धावा केल्या आहेत.देवदत्तने या दरम्यान 6 शतकं झळकावली आहेत.

दरम्यान विराटच्या निवृत्तीबाबत फक्त चर्चाच आहेत. मात्र विराटने तो निर्णय घेतला तर, या तिघांपैकी कुणाला संधी द्यायची? हे आव्हान निवड समितीसमोर असणार आहे.

भारताचा मोठा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावरही मजबूत संदेश यापुढे कोणताही हल्ला…. ; दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला धक्का

0

दिल्ली : भारताच्या सीमारेषेवर उघडपणे शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानने मागील ३ दिवसांपासून ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू केले आहे. भारतीय सैन्याने पाकचे सर्व नापाक हल्ले परतावून लावले आहे. अशातच आता दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला भारताने दणका दिला आहे. यापुढे भारतात कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर तो अॅक्ट ऑफ वॉर समजला जाईल, असा निर्णय भारत सरकारने घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

भारताने आता दहशतवादाविरोधात आपली भूमिका अधिक कठोर केली आहे. सीमारेषेवर पाकिस्तानचे ज्या प्रकारे हल्ले सुरू आहे. आता भारतात कुठेही दहशतवादी हल्ला झाला तर तो “भारताविरुद्ध युद्ध” मानला जाईल आणि त्याला तसाच प्रत्युत्तर दिलं जाईल, असं निर्णय भारत सरकारने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेला मिळालेल्या गंभीर आव्हानांनंतर घेतल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. ही भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावरही मजबूत संदेश देणारी आहे की भारत आपल्याविरुद्धच्या दहशतवादी कारवाया खपवून घेणार नाही, असं भारताने ठणकावून सांगितलं.