Home Blog Page 80

पुण्यात भाजपचं महापालिका ‘मिशन’ ठरलं! एवढ्या जागा लढणार? युतीत निवडणूक लढविणे अशक्य: घाटे

0

महापालिकेच्या निवडणुका येत्या चार-पाच महिन्यात होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुका या महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढल्या जाणार की स्वबळाचा याचा ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. पण कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी पु्ण्यात मुक्कामाला होते. पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी पदाधिकाऱ्यांसह आज त्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना कामाला लागा, अशा सूचना दिली आहे. महानगरपालिका निवडणुकांची पार्टीने जोरात तयार केली पाहिजे, आपला महापौर महापालिकेत बसला पाहिजे अशा पद्धतीने कामाला लागा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

“आमचे 105 नगरसेवक आहेत त्या जागा पुन्हा निवडून येणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कोण किती जागा लढवणार याचा फॉर्म्युला प्रदेश स्तरावर ठरणार आहे. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ज्या जागा आम्ही निवडून आलोय त्या सगळ्या लढवणार आहोत, असे घाटे म्हणाले. पुण्यात रविवारी सांयकाळी 4 वाजता आम्ही तिरंगा रॅली काढणार असल्याचे घाटे यांनी सांगितले.

स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढाव्यात, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात फॉर्म्युला देखील सांगितला. सरसकट युती न करता ज्या ठिकाणी स्वाभाविक युती होऊ शकते त्या ठिकाणी युती करण्यात येणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यात महायुती म्हणून निवडणूक लढविणे अशक्य असल्याचे चित्र आहे. जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही घटक पक्षामध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच होईल, हे स्पष्ट आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये स्वबळावरच निवडणुका लढवाव्या लागतील, असे दिसते. 2017 च्या महापालिका निवडणुकीत 164 पैकी 99 जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 42 जागा जिंकून दुसर्‍या क्रमाकाचा पक्ष होता.

बाळासाहेबांनी मोदींना मदत केली होती का? भुजबळांनी एकाच वाक्यात काय ते सांगितलं…

0

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी लिहलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचा उद्या मुंबईत प्रकाशन सोहळा होणार आहे. या पुस्तकात संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यांवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी व अमित शाह यांना कशाप्रकारे मदत केली याविषयी पुस्तकात दावा केला आहे. यासंदर्भात पत्रकारांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना विचारले असता भुजबळांनी मोजक्या शब्दात उत्तर देत विषय संपवला. भुजबळ म्हणाले, मी आजून राऊतांनी लिहलेलं पुस्तक वाचलेलं नाही. पण, पीएम नरेंद्र मोदी हे दोन हजार सालानंतर मुख्यमंत्री झाले. मी मात्र, १९९२ मध्येच शिवसेना सोडली आहे. त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेबांनी नरेंद्र मोदी यांना मदत केली याविषयी मला काहीही अधिकृत माहिती नाही. दुर्देवाने बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत. त्यामुळे शरद पवार साहेबच याविषयी काय ते सांगू शकतात असं सांगून भुजबळांनी अधिक बोलणं टाळलं.

त्याकाळी बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी या नेत्यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली होती. त्यामुळे कदाचित काहीतरी मदत झाली पण असेल असेही भुजबळ यावेळी म्हटले. कुणी काय लिहावं, काय बोलावं यावर आपण कसं काय बंधन टाकणार असं भुजबळ म्हणाले.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असे बोलले जात आहे. त्याविषयी विचारले असता भुजबळ म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असे मला वाटत नाही. अजित पवार यांनीच तसे स्पष्ट केल्याचे भुजबळ म्हणाले. त्यामुळे या चर्चेत काही तथ्य आहे असे मला वाटत नाही. काही लोकांची तशी इच्छा असू शकते परंतु तसा प्रस्ताव किंवा चर्चा वैगेरे काही नाही असं भुजबळ म्हणाले. अजित पवारांनी या सगळ्या उडवून लावलेल्या आहेत असं भुजबळ म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणून एकत्रित लढणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आधीच सांगितलं आहे. परंतु या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे काही ठिकाणी त्याला अपवाद म्हणून स्वतंत्र निवडणुका लढवल्या जाऊ शकतात असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मागच्या विधानसभेला सुद्धा अनेक ठिकाणी महायुतीच्या दोन पक्षांनी महाविकास आघाडीच्या विरोधात फॉर्म भरले होते. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये ते मोठ्या प्रमाणावर आहे. कारण शेवटी कार्यकर्त्यांनाही पुढे यावं लढावं अशी अपेक्षा असते असं भुजबळ म्हणाले.

मराठा आरक्षण ‘वैद्यकीय प्रवेश’ साठी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या आदेशाने 24 तासांतच अंमलबजावणी

0

सुप्रीम कोर्टाचे नवनियुक्त सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी दिलेल्या आदेशानंतर 24 तासांतच मराठा आरक्षण संदर्भातील याचिकांवरील सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्देश दिल्यानंतर नव्याने विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आल्याने येत्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीसाठी न्या. रवींद्र घुगे, न्या. संदीप मारणे, न्या. निजामुद्दीन जमादार यांचे विशेष पूर्णपीठ स्थापन करण्यात आले आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबाबत आदेश दिल्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी खंडपीठाची स्थापना केली आहे. खंडपीठाची स्थापना करण्यात आल्याने येत्या काळात लवकरच सुनावणीला सुरुवात होणार असल्याने हा मुद्दा लवकरच निकाली लागण्याची शक्यता असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

या बाबतची नोटीस सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोटिशीत या प्रकरणाची सुनावणी कधी सुरु होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, येत्या काळात लवकरच याबाबत घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी कथी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SCBC प्रवर्गातंर्गत वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देण्यात आलेल्या याचिकांवर तत्काळ नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या द्विपीठासमोर ही सुनावणी झाली होती. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देताना नवीन खंडपीठाची निर्मिती करण्याचे सांगितले आहे.

‘यशवंत बँक 140 कोटी घोटाळा लक्ष घालू नका नाहीतर व्यवस्था करु’, भाजप खासदार मेधा कुलकर्णींना धमकी

0

बँकेच्या प्रकरणात थेट भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. खासदार कुलकर्णी यांनी ठेवीदारांची बाजू घेतल्याने काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना धमकी दिली.”मेधा कुलकर्णी यांनी या प्रकरणात पडू नये नाहीतर त्यांची व्यवस्था करू.. मागे त्यांच तिकीट कापलं होतं हे त्यांना माहिती आहे.” अशा पद्धतीची धमकी यशवंत सहकारी बँकेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दिली.

कराड येथील यशवंत बँकेच्या 140 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मेधा कुलकर्णी या सातत्याने आवाज उठवत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन ठेवीदारांची बाजू मांडली होती. यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी यशवंत बँकेकडून जवळपास 120 हून अधिक जणांची 140 कोटी रुपयांची फसणूक केल्याचा आरोप ठेवीदारांचा आहे आणि ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी या ठेवेदारांच्या बाजूने लढत आहेत.

यापूर्वीही मेधा कुलकर्णी यांनी सहकार आयुक्तांकडे याचा पाठपुरावा केला होता. मात्र अद्यापही यामध्ये प्रशासन आणि पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाहीये. त्यामुळे लवकरच अमित शाह यांना भेटून या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी करणार असल्याचं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. 120 ठेवीदारांची फसवणूक केल्यानंतरही तसेच आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्यानंतरही यशवंत बँकेच्या पदाधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, त्यांना कोण वाचवत आहे? असा प्रश्न मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा

0

जमिनीच्या वादात आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. वाघोलीत १० एकर जमीन प्रकरणात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लांडगे यांच्यासह चार जणांच्या विरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील वाघोली येथील 10 एकर जमिन हडपण्याचे उद्देशाने संगनमत करून फौजदारीपात्र रचून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता बनावट महिला उभी करून ती मूळ जमिनीची मालक असल्याच्या भासविण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यवसायाशी देखील हे प्रकरण संबंधित असल्याचे बोलले जाते आहे. आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे, राजेंद्र लांडगे, अपर्णा यशपाल वर्मा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चंदननगर पोलिसांचे एक तपास पथक आता या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत आहे. या प्रकरणात वरीष्ठ पोलिसाचा संबंध आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. वाघोली येथील 10 एकर जमिन हडपण्याच्या उद्देशाने कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, 2022-23 मध्ये वाघोली येथील 10 एकर जमीन हडपण्यासाठी लांडगे यांच्या नेतृत्वात कट रचण्यात आला. अर्चना पटेकर या महिलेला अर्पणा यशपाल वर्मा असे नाव धारण करायला सांगून तीच मूळ जागा मालक आहे, असे भासवण्यात आले. वर्मा हिच्या नावाचे बनावट दस्त नोंदणीसाठी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार करुन जमिनीचे खरेदी खताचे दस्त तयार केले.

हा प्रकार समोर आल्यानंतर लांडगे यांनी जमिन हडपण्याचे उद्देशाने संगनमत करून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता बनावट महिला उभी केली असल्याचे समोर आले. यात पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यवसायाचाही संबंध असल्याचे सांगितले जाते. मात्र याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. या प्रकरणात आतापर्यंत आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे, राजेंद्र लांडगे, अपर्णा यशपाल वर्मा या चौघांवर चंदननगर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदननगर पोलिसांचे एक तपास पथक आता या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत आहेत. पुणे पोलिसांची प्रतिमा डागाळणारे एकापेक्षा एक प्रकरण मागील काही दिवसांपासून बाहेर येत आहेत. यात अगदी पोर्श कार अपघात प्रकरणापासून ते गजा मारणेसोबत मटण पार्टी करण्याच्या प्रकरणांचा समावेश आहे. अशात पोलीस जमीन विक्री रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले आहे.

चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी तपास पथक स्थापन केले असून, गुन्ह्याच्या मुळाशी जाण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. बनावट कागदपत्रे, संगनमत आणि आर्थिक व्यवहार यांचा तपास करण्यावर पोलिसांचा भर आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा अशा प्रकरणात सहभाग असल्याने पुणे पोलिस दलाची प्रतिमा डागाळल्याची चर्चा आहे. नागरिकांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणात पारदर्शक तपासाचे आश्वासन दिले आहे, तर लांडगे आणि इतर आरोपींवरील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सपकाळ मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला; ऐनवेळी काही गडबड झाली तर काँग्रेस व ठाकरे गटाचा बॅकप्लॅन तयार!

0

आगामी काळात राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील हालचालींना देखील आता चांगलाच वेग आला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट मातोश्री गाठत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यातच गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चेनंतर हर्षवर्धन सकपाळ व उद्धव ठाकरे यांच्या भेटीतच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर भविष्यात एकत्रित आल्या तर आघाडीचा यावेळी बॅकप्लॅन ठरल्याची चर्चा रंगली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ हे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटत आहेत. त्यांनी दोन दिवसापूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटींनंतर चर्चेला उधाण आले आहे.

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर आता येत्या काळात पवार कुटुंब देखील एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. शरद पवार यांनी पवार कुटुंब एकत्र येण्याच्या शक्यतेवर भाष्य करताना, त्याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा असे सांगितल्याने राजकीय वर्तुळात याबाबत चर्चेला उधाण आले आहे. हे विधान केवळ कौटुंबिक नव्हे, तर राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जात आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांमध्ये विभागल्यानंतर पवार कुटुंबात राजकीय दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे भविष्यात जर शरद पवार यांच्या गटाने अजित पवार यांच्या पक्षाशी जुळवून घेतले तर सत्तेबाहेर असलेला हा शरद पवार यांचा गट भविष्यात महायुतीसोबत येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच सकपाळ यांनी ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

सकपाळ-ठाकरे भेटीत या दोघांमध्ये गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट व अजित पवार गट भविष्यात एकत्रित येतील, यावर चर्चा झाली, असल्याची माहिती सूत्राने दिली. त्यामुळे दोन्ही गटाच्या एकत्र येण्याच्या भूमिकेवरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष सावध भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. ऐनवेळी काही गडबड झाली तर काँग्रेस व ठाकरे गटाने त्यांचा बॅकप्लॅन तयार ठेवला आहे.

दुसरीकडे भविष्यात उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र आले तर आघाडीतील काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ठ्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या अडचणीत भर पडू नये याची दक्षता सपकाळ हे घेताना दिसत आहे. या बॅकप्लॅनवर देखील सपकाळ व शरद पवार भेटीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्राने दिली. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीत राजकीय भूकंप आल्यांनतर जर डॅमेज कंट्रोल झालेच तर बॅकप्लॅन तयार ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर लोकशाहीला वाचविण्यासाठी आम्ही इंडिया आघाडीच्या रुपात एकत्र आलो आहोत. जोपर्यंत हा मुद्दा आहे, तोपर्यंत महाविकास आघाडी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत स्थानिक पातळीवर चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सपकाळ यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गट, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पुणे भाजप शहरध्यक्ष व्यायामशाळा कार्यालयात वीजचोरी; सत्तेमुळे दंडात 12 वर्षाची सूट? प्रकार माहिती अधिकारात उघड

0

पुणे:- भारतीय जनता पक्ष गल्ली ते दिल्ली सत्ता… त्याच पक्षातील शहरातील मुख्य पद आणि सभागृहातील ही मानाचे पद मग काय ‘हम सब करे सो कायदा!’ च की एवढं सगळं असल्यावर प्रशासन तरी काय करणार. असाच एक प्रकार पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याबाबतीत समोर आला आहे. विशेष म्हणजे सानेगुरुजी नगर, आंबील ओढा येथील वापरात असलेली इमारत ही स्व- मालकीची नसून पुणे महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेली आहे. , भ्रष्टाचारात अडकलेली भाजप संचलित व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र वीजचोरी उघड झाल्याने कांग्रेस- शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आज कांग्रेस- शिवसेना एकत्र शिष्टमंडळाने महावितरण पुणे परिमंडळचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांची भेट घेऊन त्यांना घेराव घातला. यावेळी शिष्टमंडळात किशोर मारणे शहर अध्यक्ष- राजीव गांधी पंचायत राज संघटन पुणे, अक्षय जैन – जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस, अनंत घरत शिवसेना प्रसिद्धी प्रमुख, सागर धाडवे सरचिटणीस युवक कॉंग्रेस पुणे, कुणाल काळे- युवक काँग्रेस उपाध्यक्ष पुणे, अविनाश अडसूळ – पुणे शहर सचिव, हनुमंत गायकवाड उपाध्यक्ष कोथरूड विभाग हे उपस्थित होते.

सामान्य माणसाला वेगळा न्याय आणि पुणे भाजप च्या शहराध्यक्षाला वेगळा न्याय का ? वीजचोरी उघड होऊनही कारवाई का नाही? गेले अनेक वर्ष सदर प्रकरण का दाबण्यात आले? ह्या भ्रष्टाचारात महावितरणच्या पेशवे पार्क उपविभागचा महत्वाचा वाटा सिद्ध झाला आहे असा आरोपही निवेदन देताना करण्यात आला आहे.   माहिती अधिकारात माहिती मागविली असता २६/०४/२५ च्या महावितरण पेशवे पार्क उपविभाग कार्यालयातील स्थळ पाहणी अहवालात असे वीजचोरीचे प्रकार निदर्शनास आले. महावितरण पेशवे पार्क विभाग ने त्यांना फक्त १ वर्षाचा दंड ९५,३३०/-₹ आकारला आहे पण मागील १२ वर्षाची थकबाकी का वसूल केली जात नाही. स्थळपाहणी अहवालात मुद्दाम अनेक त्रुटी महावितरण अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या जेणेकरून स्थानिक भाजप नगरसेवक, शहराध्यक्षाला वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. स्थळपाहणीत वीज दंडाची रक्कम कमी करण्यासाठी व्यायामशाळेतील काही मशीन आणि एयर कंडीशनरचा उल्लेखही टाळण्यात आला आहे. अहवालात भाजप कार्यालय तसेच स्थानिक नगरसेवक नाव गाळून फक्त कार्यालय” शब्दाचा उल्लेख केला आहे. शेकडो मुलांकडून व्यायामासाठी पैसे घेत व्यावसायिक वापर असतानाही वीज वापरामध्ये ‘पब्लिक’ सर्व्हिस असे नमूद केले आहे. पुन्हा स्थानिक सत्ताधारी नगरसेवकाला वाचवण्यासाठी कोणत्यातरी त्रयस्थ व्यक्तीचे नाव चालक म्हणून टाकण्यात आले आहे.

संबंधित सानेगुरुजी नगर, आंबील ओढा कॉलनी येथील पुणे शहरातील नामवंत भाजप शहरअध्यक्ष , माजी नगरसेवक ह्यांचे कार्यालय, व अंदाजे ३००० प्रति चौरसफूट असणारी भव्य दुमजली कै भानुदास गेजगे व्यामशाळा, तसेच विरंगुळा केंद्र अश्या पुणे मनपाच्या वास्तू सन २०१२ पासून असून सदर वास्तू पुणे मनपा क्रीडा व मालमत्ता  विभागाकडे ९ एप्रिल २०२५ पर्यंत  हस्तांतरित करण्यात आल्याच नाहीत. सन २०१२ पासून सदर तीनही वास्तूंना विजपुरवठा होत आहे. व्यायामशाळा ही नगरसेवक स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत चालवत आहेत तसेच सानेगुरुजी नगर मधील भाजप कार्यालय हे स्वतः नगरसेवक अनेक वर्ष वापरत आहेत तसे त्या वास्तूवर त्यांचे नावही आहे, तिथेही अनेक अद्यावत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आहेत असे असताना त्यांचा उल्लेख महावितरण अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली जात असून भ्रष्टाचारास महावितरण विभाग ही तितकाच जबाबदार आहे असा आरोप काँग्रेस कार्यकर्ते सागर धाडवे यांनी निवेदनात केला आहे.

कै भानुदास गेजगे व्यायामशाळा सानेगुरुजी नगर , लोकमान्य नगर व्यायामशाळा, आणि कै चंद्रकांत बोत्रे व्यायामशाळा, शाळा क्रमांक १७, नवी पेठ पुणे ३०, या पुणे मनपाच्या व्यायामशाळा मालमत्तेची विज मीटरची बिले १६/०४/२५ च्या माहिती अधिकारात मागवली असताना महावितरणकडून माहिती अधिकारात मयत व्यक्तींची बिले देण्यात आली अश्या प्रकारे माहिती अधिकारात माहिती घेणाऱ्याची फसवणूक पेशवे पार्क उपविभाग कार्यालय कडून केली गेली आहे. सामान्य माणसाला ५००/-₹ नाही वेळेवर भरले तर विज तोडणारे महावितरण चे अधिकारी ह्या विषयात गेले १३ वर्ष शांत का आहेत? त्यांनाही भ्रष्टाचाराचा काही वाटा जातो का? त्यामुळे सदर भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग पुणे पोलिस आयुक्त यांस तक्रार करणार असल्याचेही तक्रारदार सागर धाडवे यांनी सांगितले आहे. महावितरणने अश्या भ्रष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करावी, कठोर कारवाई करावी, मागील १२ वर्षाची थकबाकी वसूल करून स्थानिक भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखलची कारवाई करावी असे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळाकडून कळविण्यात आले.

आज दाखल झालेल्या निवेदनाची योग्य ती शहनिशा करून योग्य कारवाई करण्यात येईल असे महावितरण अधीक्षक अभियंता यांनी सांगितले. सदर भ्रष्टाचाराची माहिती कांग्रेस कार्यकर्ते तक्रारदार सागर धाडवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी यांस ह मेल द्वारे पाठविली आहे.

अजितदादांचा धडाका, ४५ दिवसांतच मराठवाड्यात दोन CIIIT मंजूर

0

पवारांच्या धडाकेबाज पुढाकारामुळे बीड, नांदेड, संभाजीनगरमध्ये ‘सीट्रिपलआयटी’ना मंजूरी
मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांच्याच पुढाकारामुळे बीड जिल्ह्यानंतर आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनींग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पाठविलेल्या पत्राला कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला असून नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसाठी दोन प्रशिक्षण केंद्रे मंजूर केल्याचे पत्राद्वारे कळवले आहे. अजित पवार यांनी घोषणा केल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात मराठवाड्यातील बीड, नांदेड, संभाजीनगर या तीन जिल्ह्यांसाठी तीन ‘सीट्रीपलआयटी’ मंजूर झाल्याने ‘बोलेन ते करेन…’ ही अजित पवार यांची ओळख अधिक ठळक झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रयत्न आणि टाटा टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने महिन्यापूर्वी बीडसाठी ‘सीट्रीपलआयटी’ मंजूर झाले आहे. त्यानंतर आता नांदेड व छत्रपती संभाजीनगरसाठी दोन ‘सीट्रीपलआयटी’ मंजूर झाल्याने, मराठवाड्यातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण, उद्योगक्षेत्राला कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. मराठवाड्यात नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासह अनेक उद्दीष्टांची यानिमित्ताने पूर्ती होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याचा विकासावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांचे सातत्याने मराठवाडा दौरे सुरु आहेत. दि. 23 एप्रिल 2025 रोजीच्या मराठवाडा दौऱ्यात नांदेड येथे बोलताना त्यांनी बीड, नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथे ‘सीट्रीपलआयटी’ उभारण्याची घोषणा केली होती. दौऱ्यावरुन मुंबईत परतल्यानंतर दि. 25 मार्च 2025 रोजी तात्काळ टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पत्र लिहून या तीन जिल्ह्यांसाठी ‘सीट्रीपलआयटी’ उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. कंपनीने दीड महिन्यात तिन्ही जिल्ह्यांसाठी ‘सीट्रीपलआयटी’ मंजूर केल्याची पत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या ‘सीट्रीपलआयटी’मुळे मराठवाड्यातील युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, ‘एआय’ वापरासह तांत्रिक कौशल्यविकासाची संधी मिळेल.युवकांना उद्योगक्षम बनविणे, रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात ‘सीट्रीपलआयटी’ महत्वाची भूमिका बजावणार आहेत.

‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या पत्रात, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी प्रत्येकी 191 कोटी रुपये खर्चून नवीन ‘सीट्रिपलआयटी’ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे कळविले आहे. यापैकी 162 कोटी 62 लाख रुपये टाटा टेक्नॉलॉजी तर, उर्वरीत रक्कम राज्य शासन आणि संबंधित जिल्हा प्रशासन देणार आहे. नव्या सेंटरमधून दरवर्षी 7 हजार युवकांना प्रशिक्षित केले जाईल, त्यातून मराठवाड्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने ‘सीट्रिपलआयटी’ स्थापन केल्यानंतर दरवर्षी प्रत्येकी 7 हजार प्रमाणे मराठवाड्यातील 21 हजार युवकांना उद्योगांच्या (4.0) गरजेनुसार आवश्यक जागतिक दर्जाचे औद्योगिक, तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल तसेच युवकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे रोजगार मिळवणे, स्वयंरोजगार करणे शक्य होणार आहे.

‘सीट्रिपलआयटी’च्या स्थापनेनंतर पहिल्या तीन वर्षांसाठी प्रशिक्षण खर्च ‘टाटा टेक्नॉलॉजी’ उचलणार आहे. त्यानंतर प्रशिक्षणाचा खर्च ‘टाटा टेक्नॉलॉजी’ आणि जिल्हा प्रशासन दरवर्षी प्रत्येकी पन्नास टक्क्यांप्रमाणे विभागून करणार आहेत. यामुळे नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यांसह मराठवाड्यातील हजारो युवकांना उद्योगक्षेत्राच्या गरजेप्रमाणे औद्योगिक, तांत्रिक प्रशिक्षण मिळेल. त्यांची कौशल्यवृद्धी होईल. उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल. यातून जिल्ह्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धडाकेबाज, निर्णयक्षम कार्यपद्धतीबद्दल मराठवाड्यातील नागरिकांकडून आनंद, समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

खेलो इंडिया- विजेत्या युवांचे उपमुख्यमंत्री अजितदादांची अभिनंदन

0

मुंबई, दि. १६ मे – महाराष्ट्राने ५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकांची लयलूट करत ‘खेलो इंडिया युवा स्पर्धे’त सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान मिळविले. स्पर्धेच्या विजेते पदाची हॅटट्रिक ही राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पथकातील खेळाडू व सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आहे. सर्व पदक विजेत्या खेळाडूंच्या कामगिरीत उत्तरोत्तर प्रगती होत राहील, असा विश्वास व्यक्त करीत त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘खेलो इंडिया युवा स्पर्धे’तील यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, बिहारमध्ये झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने केलेली नऊ स्पर्धा विक्रमांची नोंद कौतुकास्पद आहे. स्पर्धेतल्या २७ पैकी २२ खेळांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदके जिंकली. अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक दहा सुवर्णपदके मिळाली. जलतरण स्पर्धेत सात सुवर्ण पदकांसह महाराष्ट्राने २९ पदके जिंकली. राज्याला जिम्नॅस्टिक्स आणि नेमबाजीत प्रत्येकी सहा, वेटलिफ्टिंगमध्ये पाच तसेच कुस्ती, सायकलिंग, नेमबाजीचीही सुवर्णपदके मिळाली. या युवा खेळाडूंच्या कामगिरीतून प्रेरणा घेऊन अधिकाधिक युवक खेळांकडे वळतील. परिश्रमाने उत्तम खेळाडू बनतील. राज्याच्या क्रीडा संस्कृतीला समृद्ध आणि राज्याला निरोगी, सुदृढ ठेवण्यासाठी ही कामगिरी मदत करेल, असा विश्वास व्यक्त करीत सर्व खेळाडूंना त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवकालीन युद्ध कला दानपट्टा सादरीकरणाने ‘शिवतीर्थ फाऊंडेशन’ची छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

0

कोथरुड परिसरातील शिवतीर्थनगर मध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. शिवतीर्थ फाऊंडेशन तर्फे विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शिवकालीन मर्दानी खेळ, शिवकालीन शस्त्रे, शिवकालीन युद्ध कला, दानपट्टा इत्यादी आयोजित कार्यक्रमामुळे उपस्थिती जनसमुदायास प्रेरक उर्जा मिळाली. कोथरूड परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी उत्साहाने सहभागी झाल्याने कार्यक्रमाला वेगळ्या प्रकारची उंची मिळाली.

आपल्या मातृभूमीला जाज्वल्य इतिहास असला तरी नव्या पिढीला या पारंपारिक युद्धकलेची माहिती होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते; परंतु सर्वपक्षीय नेते अन् कार्यकर्त्यांनी दिलेल्या भक्कम साथीमुळे एक मोठी उर्जा मिळाली असल्याचे आयोजक मनसे शाखाध्यक्ष किरण उभे यांनी सांगितले.

आयोजन समितीत मंगेश कानगुडे, अनंता उभे, सुशांत आंबेकर, सौरभ पवार, संदेश जोरी, अमित मोहोळ, गौरव कंधारे, विकास मोहोळ, साहिल उभे , प्रथमेश तोंडे , धीरज गावडे, अभिजित खोपटकर, लकी मराडे, प्रथमेश उभे, रोहित लोखंडे , मयूरेश चव्हाण प्रशंसनीय काम केले.