Home Blog Page 54

सदाशिव पेठ दुर्घटनेतील जखमींची ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून विचारपूस; लवकर आरामासाठी डॉक्टरांना या सूचना

0

पुण्यातील सदाशिव पेठेत शनिवारी रात्रीच्या सुमारास एका भरधाव कारने दिलेल्या धडकेतील १२ पैकी तिघांची नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करुन; लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली. तसेच डॉक्टरांना ही तिघांवर उत्तमोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

शनिवारी रात्रीच्या सुमारास पुण्यातील मध्यवर्ती सदाशिव पेठेतील एका चहा दुकानात भरधाव कार घुसली.‌ या अपघातात १२ जण जखमी झाले असून; तीनजणांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज तिघांचीही रुग्णालयात भेट घेऊन; तब्येतीची विचारपूस केली. तसेच, तिघांना लवकर आराम मिळावा, यासाठी आवश्यक ते सर्व उपचार करावेत, अशा सूचना दिल्या.

दरम्यान, यावेळी नामदार पाटील यांनी सदर घटनेच्या कारवाईचा आढावा पोलिसांकडून घेतला. कारमालक, चालक आणि त्याच्या सोबतच्या सहप्रवाशाला ताब्यात घेतलं असून, कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे यांनी दिली. यावेळी भाजपचे प्रमोद कोंढरे, सुनील पांडे, रमाकांत कापसे उपस्थित होते.

मुठा खोऱ्यात मुलींच्या शिक्षणास बसचे लोकार्पण; मुळशीचे चित्र बदलण्यासाठी सर्वतोपरी मदत; ना. चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

0

मुळशी हा अतिशय समृद्ध तालुका आहे. तालुक्याचे रंगवले जाणारे चित्र अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी महिलांना आर्थिक सक्षम बनवणे गरजेचे आहे. त्यामुळे खोऱ्यातील महिलांनी एकत्रित येऊन एखादा उद्योग सुरु केल्यास त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून मुठा खोऱ्यातील दुर्गम भागातील मुली आणि शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात आली. त्याचे लोकार्पण ना‌. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी म्हसोबा ट्रस्टच्या अध्यक्षा मधुराताई भेलके, सचिव उमाताई माने, भाजपा पुणे शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे, खरावडे गावचे सरपंच शंकरराव मारणे, दिनेश जोगावडे, माऊली ढेबे, राहुल मारणे, हभप रामचंद्र भरेकर, एन. डी. मारणे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मुळशी तालुका अतिशय समृद्ध तालुका आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी लखपती दिदी उपक्रमाअंतर्गत; देशातील ग्रामीण भागातील महिलांना उद्योग होण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. मुळशी तालुक्याचे चित्र बदलण्यासाठी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. त्यामुळे मुठा खोऱ्यातील महिलांनी एकत्रित येऊन एखादा उद्योग सुरु करण्याची तयारी दर्शवल्यास; त्यांना उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले की, एमपीएससी-युपीएससीतील आपला टक्का वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी सारथी, पार्टी, महाज्योती सारख्या संस्थांच्या माध्यमातून यूपीएससीची तयारी करणाऱ्यांना फेलोशीप दिली जाते. त्यामुळे तालुक्यातील मुलं-मुलींनी एमपीएससी-युपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षांकडे वळले पाहिजे. त्यासाठी आवश्यक मदत करु, असेही त्यांनी यावेळी आश्वस्त केले‌.

दरम्यान, यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील दुर्गम भागातील गरजू मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली.

नवनियुक्त आयुक्त नवलकिशोर यांचे ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून अभिनंदन; शिवप्रतिमा देऊन शुभेच्छा

0

पुणे महापालिकेचे 38 वे आयुक्त म्हणून नवलकिशोर राम यांनी आज पदभार स्वीकारला. त्याबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. महापालिका क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासोबत; समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक धोरण ठेवण्याबाबत सूचित केले.

यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी., ओमप्रकाश दिवटे, भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, आ. भीमराव तापकीर, हेमंत रासने, माजी नगरसेवक गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, राजू शिळीमकर, वर्षाताई तापकीर, दीपक पोटे, गणेश कळमकर, प्रमोद कोंढरे, राहुल भंडारे, रविंद्र साळेगावकर, महेश पुंडे, सुभाष जंगले आदी उपस्थित होते.

पुणेकरांनो कोरोनाचा धोका वाढला; सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात, काळजी घ्या ! 24 तासात इतकी लागण

0

देशभरात कोरानो रुग्णांची संख्या वाढत असताना महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवडाभरात सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असून मुंबई, पिंपरी चिंचवड सह इतर ठिकाणी संसर्गात मोठी वाढ झाली आहे.राज्यात आता सर्वात जास्त सक्रिय रुग्ण हे पुण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 65 रुग्णांपैकी सर्वाधिक पंचवीस रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. या एकूण 65 रुग्णांपैकी 25 पुणे महापालिका, मुंबईत 22, ठाण्यात 9, पिंपरी चिंचवड मध्ये 6, कोल्हापूर मध्ये 2 तर नागपूर मध्ये एक अशी सक्रिय रुग्णंची संख्या आहे.

राज्यात 1 जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत एकूण 11501 एवढ्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 814 जण कोरोनाबाधित आढळून आले, त्यातील आता 300 पेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर सध्या राज्यात एकूण 506 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान मागील आठवड्यात कोल्हापूरमधील एका महिलेचा तर वसईतील एका पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आला आहे. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य आणि आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्र कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकार कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे असंही जाधव यांनी म्हटले आहे.

कार्यकर्त्यांनो तयारीला लागा! ‘स्थानिक’च्या हालचाली सुरू; प्रभाग रचनेची प्राथमिक प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात

0

मुंबई: राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची प्रतीक्षा अखेर संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चार आठवड्यांत अधिसूचना जारी करण्याच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या असून, प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचनाही दिली आहे.

राज्यात सध्या बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवट लागू आहे. यामुळे लोकप्रतिनिधींचा सहभाग नसेलली ही यंत्रणा केवळ अधिकारी वर्गाच्या ताब्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात स्पष्ट आदेश देत, 4 महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्याआधी चार आठवड्यांत अधिसूचना जाहीर करावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यासाठीच्या हालचालींना वेग आणला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रभाग रचनेचा अधिकार राज्य सरकारने स्वत:कडे घेतला होता. परिणामी, आता निवडणूक आयोगाने प्रभाग रचना पूर्ण करण्याची जबाबदारी पुन्हा राज्य सरकारवर सोपवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रभाग रचनेची प्राथमिक प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून, याच आठवड्यात ती माहिती आयोगाकडे सादर होण्याची शक्यता आहे.

प्रभाग रचनेनंतर हालचाली होणार सुरू…

राज्य सरकारकडून माहिती मिळताच, त्या आधारे प्रभागांचे आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होईल. प्रभाग रचना, आरक्षण व मतदार याद्या हे तीन महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष निवडणुकांची घोषणा होणार आहे.

निवडणुका कधी होणार?

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला निवडणूक प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची मुभा दिली आहे. सध्याच्या परिस्थितीत ही संपूर्ण प्रक्रिया सप्टेंबरच्या आत पूर्ण करणे कठीण असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आयोग ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्यासाठी न्यायालयाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव सादर करू शकतो.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये दोन टप्प्यांत घेतल्या जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय पुढील आठवड्यांत अपेक्षित आहे.

राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या निवडणुकांकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर या निवडणुका होणार आहेत. त्याशिवाय जवळपास सगळ्याच महत्त्वाच्या महापालिका, नगरपालिकांसह जिल्हा परिषदांच्याही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुका ‘मिनी विधानसभा’ निवडणुका असणार आहेत.

देशभर ‘वैष्णवी’ राजकीय बळीच? भाजप प्रदेशाध्यक्षांच्या लेकाचा प्रताप सिगारेटचे चटके, उपाशी खोलीत बंद; तब्बल 130 पॉर्न व्हिडिओज्…

0

महाराष्ट्रात वैष्णवी हगवण्याचे प्रकरण ताजे अन् महाराष्ट्रमध्ये विभिन्न राजकीय दबावांमध्ये बळी पडलेल्या महिलांची प्रलंबित प्रकरणे असतानाच भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलाचे अनेक न्यूड व्हिडिओज् सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सत्य देशातील प्रशासकीय यंत्रणा कायमच सत्ताधारी पक्षाला मदत करत असल्याने नुकतेच महाराष्ट्र मध्ये वैष्णवी हगवणे, मयुरी हगवणे-जगताप या महिलांचे आपबीती सर्व महाराष्ट्रांना माहीत आहे. त्यातच आता भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष यांच्या मुलाच्या क्रू- कृत्याची भर पडलेली आहे. यामध्ये विशेष म्हणजे या प्रदेशाध्यक्षाच्या मुलाच्या पत्नी व पीडितेने  एकत्र तक्रार केली नंतरही त्याची दखल घेतली नाही. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षांच्या लेकाचा प्रताप समोर आला आहे. त्याचे अनेक पॉर्न व्हिडिओज् समोर आले आहेत. पॉर्न व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाचे नाव हे शुभम गुप्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

शुभम गुप्ताची पत्नी शीतल गुप्ताने आपल्याच नवऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. शीतलचं म्हणणं आहे की, शुभम तिचा मानसिक आणि शारिरीक छळ करायचा. त्याने एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर करुन एका तरुणीसोबत संबंध ठेवले होते. तो मला तरुणीचे अश्लील व्हिडिओ दाखवत होता. नवऱ्याने आपल्या मला अनेकदा त्रासही दिला होता. एवढंच नाहीतर शुभमने मला सिगारेटचे चटके दिले, एका खोलीत बंद करुन उपाशी ठेवले होते.

नवऱ्याच्या अशा वागणुकीने पीडित बायकोने पोलीस स्टेशन गाठून नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यावेळी तिने आपला नवरा नेहमी धमक्या देत असल्याची तक्रारीत नोंद केली. ‘आई भाजप महिला मोर्चाची अध्यक्षा असल्याने तु माझं काहीही एक वाकडं करु शकत नाही’, असे म्हणत तो मला धमकी देत होता. अशातच याच व्हायरल व्हिडिओमागील सत्य समोर आलं आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणीने शुभमवर गंभीर आरोप केले आहेत.

व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओमुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. व्हिडिओत शुभम गुप्तासोबत दिसणाऱ्या तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तरुणीने आरोप केला की, शुभमनेच जाणुनबुजून हे अश्लील व्हिडिओ व्हायरल केले आहेत. त्याने माझी इज्जत लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तरुणीने केला.

130 अश्लील व्हिडिओ व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम गुप्ताचे एक दोन नाही, तर तब्बल 130 अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचे बोलले जात आहे. हे व्हिडिओज् वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. त्यापैकी तुफान व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा मैनपुरी येथील आहे. या प्रकरणात पोलीस खोलवर तपास करत आहेत.

फक्त जेवणातच नाही, तर या ६ प्रकारे वापरा मीठ, घरातील कामे होतील त्वरित

0

मीठ प्रत्येक घरात वापरले जाते, कारण ते जेवणातील सर्वात मूलभूत घटक आहे, ज्याशिवाय सर्वोत्तम मसालेदार पदार्थ देखील निरुपयोगी ठरतो. मीठ हे अन्नातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणून आवश्यक आहे, याशिवाय, निरोगी राहण्यासाठी तुमच्या शरीराला मर्यादित प्रमाणात मीठाची आवश्यकता असते. जर मीठ पूर्णपणे बंद केले, तर ते आरोग्याच्या समस्या देखील निर्माण करते. सध्या, अन्नात मीठ घालण्याव्यतिरिक्त, इतर अनेक गोष्टींमध्ये मीठ वापरले जाऊ शकते. सर्व घरांमध्ये सहज उपलब्ध असलेले मीठ तुमची अनेक त्रासदायक कामे सोपी करू शकते.

घराची साफसफाई करणे, बुटांचा वास दूर करणे किंवा घरात येणारा वास दूर करणे यासारख्या दैनंदिन कामांमध्ये तुम्ही मीठ वापरू शकता, पितळी भांड्यांवर जमा झालेला काळेपणा दूर करण्यासाठी देखील मीठ तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. चला जाणून घेऊया तुम्ही ते या कामांमध्ये कसे वापरू शकता.

साफसफाईमध्ये अशा प्रकारे मीठ वापरा
मीठ नैसर्गिक क्लिनर म्हणून वापरता येते. यासाठी, लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घ्या आणि त्यात मीठ मिसळून पेस्ट तयार करा. तुम्ही याने सिंक स्वच्छ करू शकता. कटिंग बोर्ड स्वच्छ करता येतात आणि ते काउंटरटॉप्स आणि मार्बल फ्लोअर्सवरील डाग काढून टाकण्यासाठी देखील उपयुक्त आहे. जर तुम्हाला जळलेली भांडी किंवा हट्टी ग्रीस स्वच्छ करायचे असेल, तर मीठाच्या या मिश्रणाचा वापर केल्याने तुमचे काम सोपे होईल.

क्षणार्धात स्वच्छ होतील पितळेची भांडी
घरात ठेवलेली पितळेची भांडी काळी पडतात, ज्यामुळे ती खूप जुनी दिसू लागतात. ती स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मीठ आणि लिंबू वापरू शकता किंवा मीठ आणि बेकिंग सोडा मिसळून भांडी स्वच्छ करू शकता. याने तांब्याची भांडी देखील सहज स्वच्छ करता येतात.

निघून जाईल रेफ्रिजरेटरमधील वास
कधीकधी फ्रिजमध्ये एक विचित्र वास येऊ लागतो आणि जर त्याकडे लक्ष दिले नाही, तर फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तू देखील खराब होऊ शकतात. यासाठी, एका भांड्यात लिंबू आणि मीठाचे मिश्रण ठेवा आणि ते फ्रिजमध्ये ठेवा. तुम्ही घराच्या कोपऱ्यात आणि कपाटात एका भांड्यात देखील मीठ ठेवू शकता.

शूजच्या वासापासून मिळवा मुक्तता
शूजमधून येणाऱ्या वासामुळे काही लोक खूप अस्वस्थ असतात. यामुळे त्यांना लाजही वाटू शकते. जर तुम्हाला यापासून मुक्ती मिळवायची असेल तर मीठ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. शूजमध्ये मीठ घाला आणि सकाळी ते स्वच्छ करा. यामुळे तुमच्या शूजचा वास कमी होण्यास मदत होईल.

बंद पाईप उघडण्यासाठी मीठ
सिंक पाईप्समध्ये चोक होण्याची समस्या बहुतेक घरांमध्ये आढळते. यासाठी, काही चमचे मीठ आणि बेकिंग सोडा मिसळा आणि ते पाईपमध्ये टाका आणि नंतर त्यात उकळलेले पाणी घाला. यामुळे काही वेळात पाईपमध्ये साचलेली घाण निघून जाईल आणि पाणी सहजपणे वाहू लागेल.

भाज्या धुण्यासाठी मीठ
बाजारातून आणलेल्या भाज्यांवर साचलेली घाण आणि बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी, त्यांना काही काळ मिठाच्या पाण्यात बुडवावे. जर भाज्यांमध्ये कीटक असतील, तर ते देखील निघून जातील आणि बॅक्टेरियाची घाण देखील साफ होईल. जर तुम्ही भाज्या मिठाच्या पाण्यातून काढल्या आणि ओलावा सुकल्यानंतर साठवल्या, तर शेल्फ लाइफ देखील चांगली राहते.

BPCL Recruitment 2025: बीपीसीएलमध्ये नोकर भरती, वार्षिक मिळेल १६ लाखांपेक्षा जास्त पगार, पहा तपशील

0

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच बीपीसीएलने अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे, ज्यामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, असोसिएट एक्झिक्युटिव्ह आणि सेक्रेटरीसह अनेक पदांचा समावेश आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, जी २७ जून २०२५ पर्यंत चालेल. पात्र आणि इच्छुक उमेदवार बीपीसीएलच्या अधिकृत वेबसाइट bharatpetroleum.in द्वारे या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

काय आहेत पात्रता निकष ?

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी): मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल किंवा केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा

असोसिएट एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी): संबंधित प्रवाहात बी.टेक/बी.ई./बी.एससी. (अभियांत्रिकी)

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (अकाउंट्स): पदवीधर पदवीसह इंटर सीए किंवा इंटर सीएमए

असोसिएट एक्झिक्युटिव्ह (क्वालिटी अ‍ॅश्युरन्स): एम.एससी. (रसायनशास्त्र) पदवी ज्यामध्ये सेंद्रिय, भौतिक, अजैविक किंवा विश्लेषणात्मक रसायनशास्त्र या विषयात विशेषीकरण आहे

सचिव: १० वी आणि १२ वी उत्तीर्ण आणि तीन वर्षांची पदवीधर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

किती आहे वयोमर्यादा ?
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान ३० वर्षे असावे, तर सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या उमेदवारांचे कमाल वय ३५ वर्षे असावे. त्याच वेळी, ओबीसी, एससी आणि एसटीसह राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम बीपीसीएल bharatpetroleum.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर होमपेजवरील ‘बीपीसीएल भरती २०२५’ या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक तपशील भरा.
  • आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.
  • पुढील गरजांसाठी पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा आणि प्रिंट करा.

BPCL Recruitment 2025 for Junior Executive Associate Executive & other posts Official Notification

काय आहे निवड प्रक्रिया?
सर्वप्रथम, अर्जदारांच्या कामाच्या अनुभवाच्या आणि पात्रतेच्या आधारावर अर्जांची छाननी केली जाईल आणि त्यांची निवड केली जाईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना लेखी/संगणक आधारित चाचणी द्यावी लागेल. त्यानंतर केस-आधारित चर्चा, गट कार्य आणि वैयक्तिक मुलाखत होईल. शेवटी उमेदवारांची निवड त्यांच्या एकूण कामगिरी तसेच कामाच्या अनुभवाच्या आणि कामगिरीच्या आधारावर केली जाईल.

किती मिळेल तुम्हाला पगार ?

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह: ३०,००० ते १,२०,००० रुपये (अंदाजे सीटीसी: ११.८६ लाख रुपये वार्षिक)

असोसिएट एक्झिक्युटिव्ह: ४०,००० ते १,४०,००० रुपये (अंदाजे सीटीसी: १६.६४ लाख रुपये वार्षिक)

स्कॉच सोडून ‘देशी’च्या मागे लागला भारत, अशा प्रकारे वाढली भारतीय व्हिस्कीची ताकद

0

भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस ती जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि सरकारच्या उत्पन्नाला चालना देण्यात दारूवरील कर महत्त्वाची भूमिका बजावतात. पण आज आपण अशा कोणत्याही गोष्टीबद्दल बोलणार नाही. आज आपण परदेशी स्कॉच आणि भारतात बनवलेल्या व्हिस्की यांच्यात सुरू असलेल्या शर्यतीबद्दल बोलू. मोठी बातमी अशी आहे की भारतीय व्हिस्की ही शर्यत जिंकत आहे. याचा अर्थ असा की भारतातील स्थानिक ब्रँडचा परिणाम आता संपूर्ण बाजारपेठेत दिसून येत आहे.

विक्रीच्या बाबतीत देशात बनवलेल्या सिंगल माल्ट व्हिस्कीने परदेशी स्कॉचला मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०२४ मध्ये देशातील लोकांनी स्कॉचपेक्षा भारतात बनवलेल्या सिंगल माल्ट पिण्यास जास्त पसंती दिली आहे, ज्यामुळे देशी ब्रँडची विक्रीही वाढली आहे आणि स्कॉचची विक्री कमी झाली आहे. कोणता अहवाल समोर आला आहे हे देखील आम्ही सांगतो, ज्यामध्ये अशी माहिती देण्यात आली आहे.

ईटीच्या अहवालानुसार, दारू बाजारावरील संशोधनावर आधारित कंपनी आयडब्ल्यूएसआर म्हणते की २०२३ मध्ये भारतात बनवल्या जाणाऱ्या सिंगल माल्टच्या विक्रीत ७५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. तेव्हा स्कॉच व्हिस्कीच्या विक्रीपेक्षा फक्त ९००० नऊ लिटर केस मागे होते. २०२४ मध्ये, केवळ अंतर संपले नाही, तर सिंगल माल्ट व्हिस्की स्कॉचपेक्षा खूप पुढे गेली आहे. आयडब्ल्यूएसआरच्या मते, २०२४ मध्ये, भारतीय ब्रँडच्या विक्रीत २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. यामुळे, ती स्कॉच व्हिस्कीच्या खूप पुढे गेली. दुसरीकडे, २०२४ मध्ये, स्कॉसच्या विक्रीत प्रचंड घट झाली आहे. माहितीनुसार, २०२० मध्ये जेव्हा कोविड देशात शिखरावर होता, त्यापेक्षा ही घट जास्त दिसून आली. अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की आता लोक स्कॉचपेक्षा भारतीय सिंगल माल्टकडे अधिक वळत आहेत.

एकाच डिस्टिलरीत बनवलेल्या व्हिस्कीला सिंगल माल्ट म्हणतात. या व्हिस्कीची चव खूपच वेगळी आहे. खास गोष्ट म्हणजे ती वेगवेगळ्या ब्रँड्सचे मिश्रण करून बनवली जात नाही. भारतातील पहिले सिंगल माल्ट ब्रँड अमृत आणि पॉल जॉन आहेत. जे सुमारे अडीच दशकांपूर्वी म्हणजेच २००० मध्ये लाँच झाले होते. गेल्या ३ वर्षांत अनेक सिंगल माल्ट बनवणाऱ्या कंपन्या उदयास आल्या आहेत. ज्यामध्ये पिकाडिली अ‍ॅग्रोचे नाव प्रमुखपणे घेता येईल. या कंपनीने इंद्री आणि कॉमेट सारखे ब्रँड लाँच केले आहेत. दुसरीकडे, रेडिको खेतान हे देखील एक अनोळखी नाव नाही. ज्याने रामपूर सिंगल माल्ट लाँच केले आहे.

अमृत डिस्टिलरीचे एमडी रक्षित जगदाळे यांनी ईटीच्या अहवालात म्हटले आहे की आता लोकांना भारतात बनवलेले सिंगल माल्ट आवडत आहे. भारतीय सिंगल माल्ट व्हिस्कीची गुणवत्ता, पॅकेजिंग आणि किंमत परदेशी स्कॉचपेक्षा खूपच चांगली आहे. हेच कारण आहे की आता लोकांना भारतात बनवलेली व्हिस्की जास्त आवडत आहे. आता लोकांना असे वाटू लागले आहे की सिंगल माल्ट स्कॉचपेक्षा चांगले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आता लोकांकडे अधिक पर्याय आहेत. दुकानांमध्ये विक्री वाढत आहे आणि ती लष्करी कॅन्टीनपर्यंत पोहोचली आहे.

विराट कोहलीचा अपमान! आता या खेळाडूला देण्यात आली १८ क्रमांकाची जर्सी

0

भारत अ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे ते इंग्लंड लायन्सविरुद्ध २ अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या काळात भारताचा वरिष्ठ संघ ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला जाणार आहे. या दौऱ्यात विराट कोहली संघाचा भाग असणार नाही. त्याने कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. दरम्यान, कॅन्टरबरी येथे खेळल्या जाणाऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारतीय जलदगती गोलंदाज मुकेश कुमार १८ क्रमांकाच्या जर्सीमध्ये दिसला आहे, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

हा जर्सी क्रमांक बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीशी जोडला जात आहे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याचा वापर केल्याने चाहत्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इतक्या लवकर दुसऱ्या खेळाडूला हा जर्सी क्रमांक दिल्याबद्दल सोशल मीडियावरील चाहते संतापले आहेत. अनेक चाहत्यांचा असा विश्वास आहे की कोहलीचे योगदान पाहता, बीसीसीआयने कसोटी क्रिकेटमध्ये १८ क्रमांकाची जर्सी निवृत्त करावी. अशा परिस्थितीत, मुकेश कुमारला १८ क्रमांकाच्या जर्सीमध्ये पाहून चाहते खूप संतापले आहेत. तथापि, मुकेश कुमार भविष्यात १८ क्रमांकाची जर्सी घालेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

छवि

काही चाहत्यांचा असाही विश्वास आहे की मुकेश कुमारने विराट कोहलीच्या प्रेमापोटी १८ क्रमांकाची जर्सी घातली आहे. दुसरीकडे, बीसीसीआयने यापूर्वीही काही दिग्गज खेळाडूंचे जर्सी क्रमांक निवृत्त केले आहेत. सचिन तेंडुलकरची जर्सी क्रमांक १० आणि महेंद्रसिंग धोनीची जर्सी क्रमांक ७ सर्व फॉरमॅटमध्ये निवृत्त झाली आहे. परंतु रोहित आणि विराट अजूनही एकदिवसीय फॉरमॅटचा भाग आहेत, त्यामुळे सध्या त्यांची जर्सी निवृत्त करणे कठीण आहे.

विराट कोहलीचे १८ क्रमांकाच्या जर्सीशी खोल वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध आहेत. हा नंबर त्याच्यासाठी फक्त एक नंबर नाही, तर त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांचे प्रतीक आहे. कोहलीने १८ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय कारकिर्द सुरू केली आणि १८ डिसेंबर २००६ रोजी त्याच्या वडिलांचे निधन झाले. यामुळे, हा नंबर त्याच्यासाठी भावनिकदृष्ट्या खास आहे.