Home Blog Page 211

दिलगिरी नाही नाक घासून छत्रपतींची माफी मागितली पाहिजे अन्यथा कडेलोट ; राहुल सोलापूरकर विरोधात शिवसेना आक्रमक

0

पुणे- मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एका मुलाखती मधे बोलताना महाराजांची बदनामी करणारे व महाराजांच्या पराक्रमाची व्याप्ती व शौर्य कमी करणारे वक्तव्य केले होते, त्याविरोधात शिवसेना पुणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा स्मारक, कोथरूड गावठाण येथे अभिनेता राहुल सोलापूरकरच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राहुल सोलापूरकरच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले, त्याला पायदळी तुडवला. त्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच आंदोलन स्थळावरून सर्व शिवसैनिकांनी राहुल सोलापूरकरच्या घराच्या दिशेने मोर्चा वळविला आणि त्याच्या घरापर्यंत शिरून त्याच तोंड रंगवण्याचा प्रयत्न केला, यावेळी पोलिस प्रशासनाने ताकदीने अडविल्यामुळे शिवसेना पक्षाच्या वतीने त्याच्या घराखालीच ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सदर प्रकरणात अभिनेता राहुल सोलापूरकर वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. सरकार त्याला पोलीस संरक्षण का देत आहे ? तसेच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख न करता त्यांच्या पायावर नाक घासून माफी मागावी अशी मागणी केली. तरच माफी मिळेल अन्यथा शिवसेना पुन्हा तीव्र आंदोलन करून त्याचा कडेलोट करणार असल्याचे सांगितले.

आंदोलनामध्ये पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख राजेश पळसकर, प्रशांत राणे, भरत कुंभारकर, मा नगरसेवक योगेश मोकाटे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, शहरसंघटक राजेंद्र शिंदे , संतोष गोपाळ, विलास सोनवणे, पराग थोरात, दिलीप पोमन, नितीन पवार, शिव आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, सनी गवते, महिला सहसंपर्क संघटिका कल्पना थोरवे, छायाताई भोसले, जोती चांदेरे, करुणा घाडगे, सुनिता खंडाळकर, सोनाली जुनवणे, प्रज्ञा लोणकर, भारती भोपळे, युवासेनेचे परेश खांडके, गणेश काकडे, सोहम जाधव, वैभव दिघे, नीरज नभी, चिंतामण मुंगी, मयूर कोंडे, वैभव कदम, शिवसेना विभाग प्रमुख सुरज लोखंडे, संतोष तोंडे, भरत सुतार, हेमंत यादव, चंदन साळुंके, दिलीप व्यवहारे, अजय परदेशी, नंदू येवले, पुरुषोत्तम विटेकर, संतोष भुतकर, प्रसाद काकडे, अमित जगताप, मकरंद पेठकर, अनिल माझिरे, जगदीश दिघे, शिवाजी गाढवे, गिरीश गायकवाड, दिलीप जानवरकर, नागेश गायकवाड, संजय कोंडके, श्रीपाद चिकणे, प्रकाश चौरे, संजय साळवी, नितीन रावळेकर, बकुळ डाखवे, आकाश बालवडकर, नागेश खडके, ओंकार मारणे, राहुल शेडगे, संजय कोंडके, गणेश पोकळे, प्रणव आडकर इतर शिवसैनिक, शिवप्रेमी उपस्थित होते.

राहुल सोलापूरकराला गोळ्या घालूनच मारलं पाहिजे, दिसेल तिथे ठेचा आणि गाडा; उदयनराजे भोसले संतप्त 

0

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटका करताना औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिल्याचा जावाईशोध लावला. त्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यात संतापाची लाट उसळली. छत्रपतींचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. राहुल सोलापूरकर यांना गोळ्या घालूनच मारलं पाहिजे असे टोकाचं विधान त्यांनी केलं. तर सोलापूरकर जिथे दिसेल तिथे ठेचा आणि त्याला गाडा असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

यांना वेचून ठेचलं पाहिजे

केवळ मलाच नाही शिवभक्तांना वेदना होतात. काय असं विधान केलं. हा राहुल सोलापूरकर कोण आहे. तो जो म्हणाला लाच. जे लाच घेतात यांना लाचपलिकडे काही समजत नाही. असं बोलतांना जिभेला हाड नसतं माहीत आहे. लावली जीभ टाळूला काहीही बोलायचं. अशा लोकांच्या जीभा हासडल्या गेल्या पाहिजे. महापुरुषांबद्दल अशी विधानं करतात अशा लोकांना दिसेल तिथे ठेचलं पाहिजे. वेचून ठेचलं पाहिजे, असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला. ही विकृतीची वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. वेगवेगळ्या जातीधर्मात अशा विकृतांमुळे तेढ निर्माण होते, असे ते म्हणाले.

अमित शाह यांच्याकडे करणार तक्रार

फडणवीस यांना भेटणार आहे. अमित शाह यांनाही भेटणार आहे. अशी विधाने करणार्‍यांवर कडक कारवाई करावी. देशद्रोहाचा कायदा त्यांच्यावर लागू केला पाहिजे, अशी मागणी उदयनराजे यांनी केली. शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही. विकृत विधाने करणार्‍यांना थांबवलं पाहिजे. त्यांचे सिनेमे बंद केले पाहिजे. निर्माते, दिग्दर्शकांनीही अशा लोकांनाही थारा देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

अशा लोकांना गाडलं पाहिजे

या लोकांना गाडलं पाहिजे. त्यांना गाडलं नाही तर देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे. कठोर शब्दात मी निषेध करतो. मला विचारलं तर त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे जे लोकं असतील त्या सर्वांना गोळ्या घातल्या पाहिजे. कुणीही बेताल विधानं करायचं. जीवाची पर्वा न करता शिवाजी महाराज पुढे गेले. अशा महापुरुषांबद्दल अशी विधाने होत असतील तर दुसरा काही पर्याय नाही. तो जिथे दिसेल त्याचा ठेचा आणि गाडा, असा संताप राजेंनी व्यक्त केला.

सोलापूरकरांना तुरुंगात टाका

आपला जो इतिहास आहे. वेळीच आळा घातला नाही तर इतिहासाला वेगळं वळण देतील. कालांतराने शिवाजी महाराजांना वेगळं दाखवतील. आज आपण शिवाजी महाराजांची प्रतिमा देव्हाऱ्यात ठेवतो. का तर, बाकीच्यांनी साम्राज्य वाढवण्यासाठी लढाया केल्या. पण शिवाजी महाराज गोरगरीबांसाठी लढले. स्त्रीयांचं संरक्षण केलं. परकीय आक्रमण थोपवलं.

त्यांच्यावर कारवाई करा. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. तुरुंगात टाका. एक दोन दिवसात अमित शाह यांची भेट घेणार. आधीही त्यांना भेटलो होतो. खासदार असो की मंत्री असो शोधून गाडलं पाहिजे. ठेचलं पाहिजे. ही चूक नाही तर घोडचूक आहे. औरंगजेबच्या भेटीला जाताना लाच दिली म्हणून भेटीला गेले. तसे नव्हते. त्यांच्या शौर्याचं प्रतिक होतं. लाच कशाला देतील. राहुल्याची लायकी काय आहे. राहुल तसं विधान केलं तर औरंगजेबाची औलादच म्हणायला पाहिजे त्याला. त्याच्यावर किती चर्चा करायची. त्याला ठेचा ना. किती वेळ लागतोय, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

सोलापूरकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आमदार अमोल मिटकरींनी राज्यपालांकडे केली आहे. राज्यापालांना आमदार अमोल मिटकरींनी पत्र पाठवलं आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात हे पत्र त्यांनी दिलं. सोलापुरकरने माफी मागीतली असली तरी त्याला माफ करू नये अशी पत्रात मागणी करण्यात आली आहे.

सुरेश धस मागे लागले की डोकंही खाऊन टाकतात; आधुनिक भगीरथ म्हणत  फडणवीसांकडून कौतुक

0

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी लावून धरलं आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी सुरेश धस यांनी अनेक मोर्चे देखील काढले होते. या प्रकरणात सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरेश धस यांना आवर घालण्याची मागणी करण्यात येत होती. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना सुरेश धस यांचे जोरदार कौतुक केलं आहे. आमदार सुरेश धस हे आधुनिक भगीरथ असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.

बीडच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे आणि मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरेश धस यांच्या कामाचे कौतुक केले. या कामामुळे आमदार सुरेश धस यांचा उल्लेख या तालुक्यामध्ये आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं.

“या प्रकल्पाला २०२२ मध्ये आमच्या सरकारने सुप्रमा दिली. या प्रकल्पाला ११ हजार कोटी रुपयांची सुप्रमा दिली आहे. कारण सुरेश धस एकदा मागे लागले तर ते डोके खाऊन टाकतात, हा शब्द चुकीचा असला तरी त्यांच्यामुळे आता हे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. धाराशिव जिल्हा आणि आष्टी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार आहोत. या भागातला दुष्काळ आता भूतकाळ होणार आहे, संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भाजपा पुणे जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड

0

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान राज्यभरात उत्साहात सुरू असून राज्यातील लाखो कार्यकर्ते या अभियानाच्या माध्यमातून सदस्यता नोंदणी करत आहेत. यानिमित्ताने काल श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृह, मुंबई येथे संघटन पर्व अभियानांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मंत्रिमंडळातील मंत्री, भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते उपस्थित होते.

या कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पुणे जिल्ह्याच्या संपर्क मंत्री पदी निवड करण्यात आली आहे. सदस्यता नोंदणी अभियानात कोथरूड मतदारसंघाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक नोंदणी केली असून राज्यात सदस्य नोंदणीमध्ये कोथरूड मतदारसंघ महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अभिनंदन केले

यावेळी सक्रिय सदस्य म्हणून फॉर्म भरून पाटील यांनी नोंदणी देखील केली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, माहिती-तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंचं टोकाचं पाऊल, हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून देहूतील घरात आयुष्य संपवलं

0

संत तुकाराम महाराजांचे वंशज, शिरीष महाराज मोरे (वय-30) यांनी आज सकाळी राहत्या घरात आपलं जीवन संपवलं आहे. घरामध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात आणि वारकरी सांप्रदायात एकच खळबळ उडाली आहे. देहू परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण समोर आलं आहे.शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता. त्यांचा नुकताच त्यांचा विवाह ठरला होता. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता.वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

देहूतील त्यांच्या राहत्या घरी शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली आहे. ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज होते. काल रात्री जेवण केल्यानंतर ते झोपायला गेले, मात्र सकाळी खोलीचे दार उघडले नाही. त्यामुळं दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या साह्यानं गळफास घेतल्याचं समोर आलं आहे. आर्थिक विवंचनेतुन हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोट मध्ये नमूद करण्यात आलं आहे. वीस दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता, तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. ते प्रवचन आणि कीर्तन करायचे.

देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरी टोकाचं पाऊत उचलत आपलं जीवन संपवलं आहे. आर्थिक विवंचनेतून त्याने हा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचा नुकताच साखरपुडा झाला होता, तर 20 फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता. मात्र, त्याआधीच ही घटना घडली आहे.

शिरीष महाराज मोरे यांनी नुकतेच नवीन घर बांधलेले होते. खालच्या मजल्यावर आई-वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहतात. काल (मंगळवारी) रात्री मोरे वरील खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी साडे आठ वाजल्यानंतरही ते खाली आले नाहीत. म्हणून घरातील लोकांनी वरती रूमजवळ जाऊन दरवाजा वाजवला पण दार उघडले नाही. आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे दार तोडलं. मात्र, मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

प्राथमिक माहितीनुसार आर्थिक विवंचेनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचं कळतय. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी याबाबतची माहिती दिली. अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत. दरम्यान, हभप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिरीष महाराज यांनी आपलं जीवन संपवण्यापुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील आहे. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे.

”फडणवीस स्वतःच्या मुलीची काळजी, पण मराठ्यांच्या मुलांसाठी…”; आरक्षणावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, दिला ‘हा’ इशारा!

0

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. मुलीची परीक्षा असल्याने देवेंद्र फडणवीस ५०० मीटरवर राहायला जात नाही.मग त्यांना मराठ्यांच्या मुलांबाबत ही माया येत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. ”देवेंद्र फडणवीस यांची नियत चांगली नाही. त्यांची जशी स्वत:च्या लेकीसाठी तळमळ आहे, तशी तळम त्यांना मराठा समाजाच्या मुलांसाठीही असायला हवी. आमचं EWS त्यांनी घालवल आणि खापर आमच्यावर फोडत आहेत. मराठा समाजाच्या चार विद्यार्थ्यांनी काल आत्महत्या केल्या मात्र. मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने आमच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय घेतला नाही?” हा भेदभाव आहे, अशी टीका त्यांनी केली.

”देवेंद्र फडणवीस स्वतःच्या मुलीची परीक्षा असल्याने ५०० मीटरवर असलेल्या वर्षा बंगल्यावर राहायला जात नाही. मग मराठ्यांच्या मुलांबाबत ही माया का नाही? ते मराठ्यांच्या विद्यार्थांना आरक्षण का देत नाही? ५०० मीटर राहायला गेलं तर काय बिघडतं? पण शिक्षणाला फडणवीस महत्व देतात. स्वतःच लेकरु मोठं करायचं हा फडणवीस यांचा संदेश आहे. मराठ्यांनी यातून बोध घ्यावा”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

”देवेंद्र फडणवीस स्वतःच्या मुलांसाठी वेगळी आणि दुसऱ्यांच्या मुलांबाबत वेगळी भूमिका घेत असतील तर वेगळं आंदोलन करावे लागेल, लवकरच मी मुंबईत शिवाजीपार्क किंवा आझाद मैदानाची पाहणी करायला जाणार आहे. आरक्षणासाठी आम्ही लवकरच मुंबईत आंदोलन करणार आहोत”, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

”आम्ही लवकरच आंदोलनाची तारीख जाहीर करू, एकदा आंदोलन सुरु केलं की आम्ही उठणार नाही. आता कायम मुंबईत बसणार. मुंबईत जाऊन उपोषण करणार नाही. आमची शक्ती दाखवू. आंदोलनाच स्वरूप आम्ही सांगणार नाही, गनिमी कावा आंदोलन करणार आहोत”, असंही त्यांनी सांगितलं.

”माझी प्रकृती आता बरी आहे. मला लवकरच रुग्णालयातून सुट्टी मिळणार आहे. मराठा समाजाच्या एकाही विद्यार्थ्यांने आत्महत्या करू नये. एका टक्क्याहून हुकलात तरी पुन्हा लढून जिंकू पण आत्महत्या कुणीही करू नये. सगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही,” असंही ते म्हणाले.

…तर ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा भेटलीच नसती! असं का म्हणाला Prithviraj Mohol? निकालावरून गालबोट लागलं अन्…

0

उपांत्य फेरीच्या लढतीत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व पृथ्वीराज यांच्यात झालेल्या लढतीच्या निकालावरून गालबोट लागले.अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने मानाची गदा पटकावली.मात्र, तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या लढतीत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व पृथ्वीराज यांच्यात झालेल्या लढतीच्या निकालावरून गालबोट लागले. तसेच अंतिम सामन्यातही प्रतिस्पर्धी महेंद्र गायकवाड याने शेवटच्या क्षणी मैदान सोडले. या पार्श्‍वभूमीवर पृथ्वीराज याच्याशी त्याच्या कुस्ती कारकिर्दीबाबत, ‘महाराष्ट्र केसरी’तील वादाबाबत आणि पुढील वाटचालीबाबत साधलेला संवाद…

प्रश्‍न : राजकीय दबावातून कुस्ती खेळली गेली, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तेथे उपस्थित होते, असे आक्षेप घेतले गेले. काका पवार यांनीही टीका केली की, ‘या पुढचा महाराष्ट्र केसरी राजकीय व्यक्तीच ठरवतील…’?

पृथ्वीराज मोहोळ : असे काही नाही. मी माझे कुस्तीतील योगदान दिलेले आहे. ते पाहायला संपूर्ण महाराष्ट्र होता. तेथे पंचांनी शिट्टी मारल्यानंतर मी कुस्ती पूर्ण केली आणि पुढच्या कुस्तीसाठी निघून गेलो. तसेच, सगळ्यांना माहिती आहे की, कोथरूडमधील अधिवेशन मुरलीधर मोहोळ यांनीच घेतले होते. तेथे मी कुस्ती हरलेलो आहे. नाहीतर मी त्याच ठिकाणी ‘महाराष्ट्र केसरी’ झालो असतो. आरोप करणाऱ्यांनाही माहिती आहे की, असा काही पक्षपातीपणा नसतो. सगळ्यात कमी वयात मी महाराष्ट्र केसरी झालेलो आहे, त्यामुळे हे सुरू असेल.

प्रश्‍न : तुझाही यापूर्वी पराभव झालेला आहे. त्या निकालाबाबत तुझेही आक्षेप होते. मात्र तुझा प्रतिस्पर्धी असलेल्या शिवराज राक्षे याने पराभवानंतर पंचाला लाथ मारली. याकडे तू कसे पाहतो?

– खिलाडूवृत्तीनुसार ते चुकीचे आहे. कुस्ती क्षेत्रात हे निषेधाचे आहे. असे कधीच होऊ नये. तसेच घरातले माझ्यासोबत असल्यामुळे मला पराभव झाल्याचे त्यावेळी वाटलेच नाही. मी एका चांगल्या पहिलवानाकडून हरलो होतो आणि तेही चांगली कुस्ती करून हरलो होतो. मला घरातल्यांनी सांगितले, की ‘आपण कुठेच कमी नाही. आपण मेहनत केली तर ते आपल्याला भेटू शकते.’ त्यानुसार वर्षभर सराव केला. दिल्लीत महाबली सतपाल यांच्याकडे छत्रसाल मैदानात तयारी केली. त्याचे फळ मला आता मिळाले आहे.

प्रश्‍न : विजय मिळविल्यानंतर निकालाच्या आक्षेपाबाबत चर्चा होत आहे, याचे वाईट वाटते का?

– वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. निर्णय चुकीचा असता तर गदा भेटलीच नसती. एक पहिलवान मैदान सोडून गेला. दुसऱ्या कुस्तीत मी माझे काम केले. पंचांनी त्यांचे काम आहे. पंचांनी शिट्टी वाजविल्यामुळे मी पोझिशन सोडली. त्यांनी शिट्टी नसती वाजवली तर कुस्ती माझ्याच बाजूने झाली असती. लॉट्स काढताना पक्षपातीपणा होतो, असे म्हणतात. पण सर्व पहिलवानांना माहिती आहे की, असे काही नसते. वजनापासून पहिलवानांवर कॅमेरा असतो. त्यानुसार टोकन निघते. आता जे टीका करत आहेत, त्यातील एकही टीका मी ‘महाराष्ट्र केसरी’ झाल्याची नाही. कारण, मी माझे काम केलेले आहे. त्यांचा आक्षेप पंचांबद्दल आहे. ते त्यांच्याबद्दल बोलत आहेत.

प्रश्न : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मात्र शिवराज यांची बाजू घेतली आहे. त्यांनी तर थेट पंचाला गोळी घातली पाहिजे होती, असे म्हणाले आहेत?

– पण ते असेही म्हणालेत की, पृथ्वीराज त्याचे काम करून महाराष्ट्र केसरी झालेला आहे. त्यांचा आक्षेप फक्त त्या पंचांवर आहे.

प्रश्‍न : एक चर्चा अशीही आहे की, तुमच्यातील हा सामना पुन्हा झाला पाहिजे. त्यासाठी तू तयार आहेस का?

पृथ्वीराज मोहोळ- नक्कीच माझी तयारी आहे. कधीपण आणि कोठे पण घ्या. मातीवर घ्या किंवा मॅटवर घ्या…

प्रश्‍न : कुस्ती आणि वाद हे गणित झाले आहे. त्यामुळे नियमात काही बदल झाले पाहिजेत, असे वाटते का?

– माझ्यावरही अन्याय झाला. पण मी कधी कोणाला बोललो नाही. सात सेकंदांत पंच पॉइंट देईल, असा नियम नाही. मात्र, माझ्याविरोधात तो दिला होता. तरीही आपण कोणाला काही बोललो नाही. फक्त आक्षेप दाखवून चर्चा केली.

प्रश्‍न : दोन संघटनांमुळे खेळाचे आणि खेळाडूंचे नुकसान होत आहे का?

तसे पाहिल्यास खेळाडूंचे नुकसान होत आहे आणि नाही पण. आता दुसरी पण महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. त्यातही भरपूर बक्षिसे आहेत. येथे पण भरपूर बक्षिसे आहेत.

प्रश्‍न : पंचांच्या कामगिरीबीबत काय वाटते?

– पंचांच्या समितीने फेडरेनशच्या नियमांची माहिती पहिलवानांना दिली पाहिजे. कारण, बऱ्याच वेळा ते म्हणातत की, आमचा नियम हा आहे. पण तो पहिलवानांना कळला पहिजे. पहिलवानांना बसवून सांगितले पाहिजे की, असा असा नियम आहे. नियम बदलत असतात. ते पहिलवानांपर्यंत पोहोचले पाहिजेत व सांगितले पाहिजेत.

प्रश्‍न : महाराष्ट्र केसरी मिळविल्यानंतर तू म्हणालास की ही माझी सुरुवात आहे. तुझे ध्येय काय आहे?

– महाराष्ट्रातील प्रत्येक पहिलवानाचे ‘महाराष्ट्र केसरी’चे स्वप्न असते. जेवढे ‘महाराष्ट्र केसरी’ झाले आहेत, त्यात सर्वांत कमी वय माझे आहे. ही फक्त सुरुवात आहे. आपल्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव मोठे करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी भरपूर प्रयत्न करणार आहे. दिल्लीत महाबली सत्पाल यांच्या तालमीत पाच ऑलिंपिक पदक विजेते घडलेले आहेत. तेथे आम्हाला मार्गदर्शन मिळते. त्या तालमीत तयारी करत असल्याने ऑलिंपिक पदक मिळवायचे आहे. स्वतः महाबली सत्पाल यांचे महाराष्ट्रातील मुलांकडे लक्ष असते. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक मल्ल होते. त्यांची इच्छा होती की, त्यांच्याकडील मल्लाने महाराष्ट्र केसरी व्हावे. असे आतापर्यंत झाले नव्हते. त्यांची इच्छा मी पूर्ण केली. त्यांनी तसे बोलून दाखवले.

प्रश्‍न : महाराष्ट्रातील मल्ल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठे कमी पडतात?

– महाराष्ट्रातील मल्ल मातीतील असतात. गरिबीमुळे आपले मॅट कुस्तीकडे थोडे दुर्लक्ष होते. दिल्ली व हरियानातील मल्ल मॅटवरील सराव कधीच सोडत नाहीत. आपल्याकडे मैदानी कुस्तीला मोठेपणा आहे. तेथे कुस्ती करून गरिबाचा पहिलवान त्याचा खुराकाच खर्च भागवत असतो. त्यामुळे त्याच्या डोक्यात असते की आपल्याला महाराष्ट्रातील मोठ्यातल्या मोठ्या कुस्त्या करायच्या आहेत. त्यामुळे त्याचे स्वप्न पुढे जात नाही. त्यामुळे मॅटवरील कुस्तीकडे लक्ष दिले पिहाजे.

प्रश्‍न : तुझा कुस्तीतील आवडता डाव कोणता?

– सर्वांनी पाहिले असेल की ‘महाराष्ट्र केसरी’च्या उपांत्य लढतीत शिवराज राक्षे याच्यावर टाकलेला ढाक डाव हा माझा आवडता आहे. कुस्ती हा टेक्निकचा खेळ आहे. सर्व म्हणतात की पहिलवानाकडे टेक्निक नसते. पण कुस्ती एवढे टेक्निक कुढेच नाही. माझ्या घरातूनच हा डाव शिकवण्यात आला आहे. आमच्या घराण्यात चालत आलेला तो डाव आहे. आमच्या घरात जेवढे पहिलवान आहेत, ते हाच डाव करायचे.

प्रश्‍न : घरातल्यांनी कशाप्रकारे मार्गदर्शन केले.

– चुलत आजोबा अमृता मोहोळ १९८९ मध्ये वर्धा येथे झालेल्या ‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम लढतीत विजयी झाले होते. मात्र त्या वेळी झालेल्या वादामुळे त्या लढतीचा निकाल अनिर्णित ठेवण्यात आला. तेव्हापासून मोहोळ कुटुंबाला ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची आस होती. आजोबा विठ्ठल मोहोळ हे वयाच्या ८०व्या वर्षी पण माझी तयारी करून घेत होते. तसा खुराक ते खाऊ घात होते. वडील राजेंद्र, चुलते सचिन व सागर यांनी प्रयत्न केले. कुस्तीतील सर्व धडे वडिलांकडूनच मिळाले. चुलत्यांनी मार्गदर्शन केले. आपण बाहेर कुस्तीसाठी जाताना काय करावे.

महाराष्ट्र केसरीसाठी वर्षभर काय तयारी करावी, याचे मार्गदर्शन केले. त्यामुळे बाहेर जाऊन प्रशिक्षण घेण्याची गरजच पडली नाही. खालकर तालमीत आंग्रे वस्ताद आमच्या आजोबांपासून आहेत. मला लंगोट लावण्यापासून त्यांनी तयारी करून घेतली. ते म्हणाले, की तीन पठ्ठे होते. चौथ्याने केले. त्याचे सार्थक झाले. घरात सर्व मोठे पहिलवान असल्यामुळे त्यांनी मला मार्गदर्शन केले. मागच्या वर्षी मी फुलगाव आणि धाराशिव येथे हरलो होतो. त्यानंतर दोनच दिवसांनी मी दिल्लीला गेलो होतो. मला माहिती होते की मी हरलेलो आहे. त्यामुळे मी दुसऱ्या दिवसीपासूनच तयारी सुरू केली. साडेतीनला उठून तयारी सुरू व्हायची. त्याचेच हे फळ आहे.

राष्ट्रवादीच्या आमदाराने आमदार झाल्याच्या आनंदात हत्तीवरून काढली मिरवणूक; या कायद्याचे उल्लंघन गुन्हा दाखल

0

विधानसभा निवडणुकीतील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी अजित पवार गटाचे भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची मिरवणूक काढत हत्तीवरून पेढे वाटले होते. या मिरवणुकीचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, आता हत्तीवरून पेढे वाटणं त्यांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. वनविभागाने आता मिरवणुकीच्या आयोजकांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत मिरवणुकीचे संयोजक राहुल बलकवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय या मिरवणुकीसाठी हत्ती देणाऱ्या तासगाव गणपती पंचायतन संस्थांनच्या अध्यक्षांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी रविवारी पिरंगुट येथे आमदार शंकर मांडेकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. तसेच हत्तीवरून १२५ किलो पेढे वाटले होते. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर आता पुण्याचे वन्यजीवसंरक्षक आदित्य परांजपे यांनी याची गांभीर्याने दखल घेत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार शंकर मांडेकर यांनी या मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. भोर – राजगड – मुळशी मतदार संघाच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल उरवडे,आंबेगाव, बोतरवाडी, मारणेवाडी, गाडेवाडी, कांजणेनगर, शेलारवाडी, काळभोरवाडी, चोरघेवाडी, बलकवडेवाडी, गवळीवाडा व पंचक्रोशीतील मधील ग्रामस्थ मंडळींनी माझी अभूतपूर्व अशी हत्तीवरून मिरवणूक काढत सुमारे १२५ किलो पेढे वाटले. ह्या सर्व ग्रामस्थांनी माझ्यावर व्यक्त केलेले प्रेम मी कदापि विसरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती

माझ्या वर नागरिकांनी टाकलेला विश्वास हा माझ्या कामातून सिद्ध करून दाखवीन हा विश्वास मी देतो. या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या पंचक्रोशीतील माझ्या माय-बाप जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, असेही ते म्हणाले होते.

नामदेवशास्त्रींचं देहूतील किर्तन अखेर रद्द! धनंजय मुंडेंची पाठराखण करणं भोवलं

0

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींमुळं सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकेलेले मंत्री धनंजय मुंडे यांची भगवान गडाकडून पाठराखण करण्यात आली होती. भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आपण आहोत असं त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं होतं. त्यांच्या या भूमिकेनंतर महाराष्ट्रात एक प्रकारे वादळचं निर्माण झालं.

वारकरी संप्रादयाच्या एका गटाकडून नामदेवशास्त्रींविरोधात उघडपणे भूमिका घेण्यात आली. त्यामुळं देहू इथं आयोजित कर्तनाचा कार्यक्रम अखेर नामदेवशास्त्री यांना रद्द करावा लागला आहे. त्यामुळं मुंडेंना पाठिंबा देणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे.

नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांचं समर्थन करताना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचंही समर्थन केलं होतं. या आरोपींनी हा गुन्हा करण्यापूर्वी त्यांना मारहाण झाली होती, याचाही मीडियानं विचार करावा, असं नामदेवशास्त्रींनी म्हटलं होतं. त्यामुळं त्यांच्या नेमक्या या भूमिकेवरुनच सध्या ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गुन्हेगारीचं समर्थन करणारी भूमिका मांडली असून याचा आम्ही निषेध करतो, याप्रकरणी नामदेवशास्त्रींनी त्वरीत वारकरी संप्रदायाची माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आध्यात्मिक व वारकरी आघाडीनं पत्रकार परिषदेत दिला होता.

यावेळी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल मोरे यांनी म्हटलं होतं की, शास्त्री असं म्हणतात की माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला आहे. पण मी माझं विधान मागे घेतो आणि माफी मागतो असं सर्वांसमोर सांगावं. येत्या आठ दिवसांत हे झालं नाहीतर राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

यापार्श्वभूमीवर संभाव्य विरोधाचं वातावरण पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नामदेवशास्त्री यांनी देहू येथील भंडारा डोंगरावर होणाऱ्या आपल्या किर्तनाचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करण्यापूर्वीच मोठ्या नेत्याच्या घरावर इन्कम टॅक्सचा छापा

0

“आजच्या कारवाईचा फलटण तालुका कार्यकर्ता संघातून निषेध करतो. ज्या संस्थानने सुरुवातीला 65 लाख रुपये आणि हजारो एकर जमीन शेतकऱ्यांना दिली. त्या घराण्याचा आज इन्कम टॅक्स छापा टाकून अपमान करत आहे. फलटण तालुका हे अजिबात सहन करणार नाही. आजची कारवाई घाणेरडी आणि राजकीय दृष्टीने झाली आहे. संजीवबाब निष्कलंक असून ते निर्दोष सुटणारच आहेत. लोकांचा असा अपमान करत असतील, तर फलटणची जनता निषेध करेल” अशी प्रतिक्रिया निंबाळकर यांच्या एका कार्यकर्त्याने दिली.

“ज्या राजघराण्यावर ही कारवाई सुरु आहे, त्या राजघराण्याला 900 वर्षांचा इतिहास आहे. भारताच्या जडणघडणीसाठी 1000 एकर जमीन आणि कित्येक किलो सोनं या घराण्याने दिलं. हा इतिहास आहे. देशाला स्वातंत्र्याकाळात मदत केली. अशा राजघराण्यावर राजकीय आकसापोटी कारवाई होत असेल, तर आम्ही कार्यकर्ते म्हणून निषेध करतो” असं एका कार्यकर्त्याने सांगितलं.