Home Blog Page 209

ठरलं पृथ्वीराज मोहोळ-शिवराज राक्षे पुन्हा भिडणार? मल्लही तयार एवढं बक्षीस; महाराष्ट्र केसरीतील वाद संपवण्यासाठी यांचा पुढाकार

0

अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत निर्माण झालेल्या वादात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उडी घेतली. तर शिवराज राक्षे यांने पंचाला लाथ न घालता गोळ्या घालायच्या पाहिजे होत्या अशी संतप्त टीका केली होती. ज्यानंतर चंद्रहार पाटलांनी पुन्हा एकदा यावरून भाष्य करताना, शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यावरील निलंबन रद्द करा अन्यथा आपण मानाच्या गदा परत करू असा इशारा दिला होता. यामुळे महाराष्ट्र केसरीचा वाद आणखीन चिघळला होता.

यानंतर आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांच्या चुकीच्या निकालामुळे निर्माण झालेला वादावर पडदा टाकण्यासाठी चंद्रहार पाटलांनीच पुढाकार घेतला आहे. यासाठी सांगलीच्या मातीत पै. पृथ्वीराज मोहोळ आणि वादाच्या केंद्रस्थानी असलेला मल्ल पै. शिवराज राक्षे यांच्यात लढत निश्चित करण्यात आली आहे. या लढतीला दोन्ही मल्लांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यातील वाद सांगलीत संपेल, असा विश्वास चंद्रहार यांनी व्यक्त केला आहे.

चंद्रहार पाटील म्हणाले, ”सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर हे मल्लयुद्ध होईल. त्यादृष्टीने आम्ही तयारीला सुरवात केली आहे. शिवराज लढायला तयार होताच, आज पृथ्वीराज मोहोळ यानेदेखील होकार दिला आहे. कुस्ती शौकिनांच्या मनात महाराष्ट्र केसरी आखाड्यात चुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या वादातून जी सल आहे, ती दूर होईल. शौकिनांना एक चांगली कुस्ती पहायला मिळेल आणि वाद बाजूला ठेवून मल्ल नेहमी पुढे जात असतात, हा संदेश महाराष्ट्रभर जाईल.

एका पंचाच्या पाच सेकंदाच्या चुकीच्या निकालाने शिवराज राक्षे यांच्या करिअरला मोठा धक्का बसला आहे. मात्र या घटनेने महाराष्ट्रातील कुस्ती बदनाम होऊ नये, याची काळजी घेणे आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी हे मल्लयुद्ध आवश्यक होते. त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे.”

ते म्हणाले, दोन्ही मल्लांनी अत्यंत सकारात्मक विचाराने या कुस्तीसाठी होकार दिला आहे. त्यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचे मानधन आम्ही देणार आहोत. वाद या दोन मल्लांचा नव्हता आणि नसेल. दोघांनीही कुस्तीची सेवा केली आहे, पुढेही करणार आहेत. त्यांच्यातील या लढतीमुळे त्यांच्या मनावरील दडपणदेखील दूर होईल. सध्या निर्माण झालेले मतभेद, मनभेद दूर होतील, अशी अपेक्षा आहे.”

चंद्रहार पाटील यांनी ‘महाराष्ट्र केसरी’ ही अत्यंत मानाची स्पर्धा असून राजकीय वाद, श्रेयवादातून दोन-दोन स्पर्धा होणे योग्य नाही, अशी भूमिका मांडली आहे. कुस्ती क्षेत्रातील राजकीय वाद बाजूला ठेवून महनिय नेत्यांनी एकविचाराने किमान या मानाच्या स्पर्धेचे सर्वोच्च स्थान अबाधित ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

…म्हणून छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार नाहीत; नरहरी झिरवळांचा मोठा दावा

0

नाराज असलेले माजी मंत्री छगन भुजबळ हे लवकरच राष्टवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसापासून रंगल्या आहेत. नाराज असल्याने त्यांची भाजपशी जवळीकता वाढत असल्याची चर्चा असतानाच आता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्न औषध व प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मोठे विधान केले.नाराज असलेले छगन भुजबळ हे खूप मोठ्या मनाचे नेते आहेत. त्यामुळे ते कदापि राष्ट्रवादी सोडून येत्या काळात भाजपसोबत जाणार नाहीत, असे सांगत या सुरु असलेल्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.

मंत्री नरहरी झिरवळ यांनी बोलताना हे मोठे विधान केले. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. नुकत्याच शिर्डी येथे पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीला छगन भुजबळ काही वेळ उपस्थित हॊते. शिर्डीत ते काही वेळ थांबून निघून गेले होते. त्यामुळे भुजबळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना त्यांनी मोठे विधान केले आहे.

यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही ? यावर बोलताना झिरवळ म्हणाले, ‘धनंजय मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणाशी त्यांचे कसलेच लागेबांधे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यासोबतच या हत्या प्रकरणाशी संबंध आढळला तर त्यांनी फासावर जाण्याची तयारी देखील दर्शवली आहे. जोपर्यंत कोर्ट त्यांना दोषी ठरवत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, असेही झिरवळ यांनी स्पष्ट केले.

राज्य मंत्रिमंडळात माझ्याकडे सध्या तीन खात्याचा कारभार आहे. या तीन खात्याच्या माध्यमातून नागरिकांना लोकोपयोगी सुविधा पोहचविण्याचा माझा प्रयत्न आहे. येत्या काळात अन्न व दुधातील भेसळ टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दुधामध्ये भेसळ केली जात असल्याचे काही ठिकाणी तपासणी केल्यानंतर पुढे आले आहे. काही ठिकाणी सॅम्पल घेऊन तपासणी केल्यानंतर हा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे दोषी आढळलेल्या मंडळींवर कारवाई केली जात असल्याचे झिरवळ यांनी स्पष्ट केले.

महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्र्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये कसलाच समन्वयाचा अभाव नसल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीमधील तीन पक्ष एकत्रित मिळून निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

एक्झिट पोलमध्ये सर्वाधिक जागा दाखवूनही भाजपला टेन्शन; हे आहे मोठं कारण…

0

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडलं. दिल्लीतील 70 विधानसभा जागांसाठी मतदान झालं आहे. मतदानाची प्रक्रिया एकदा पार पडल्यानंतर सर्वांना उत्सुकता असते ती एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात याची.

दिल्ली निवडणुकीचा अंतिम निकाल 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.

दिल्लीत 70 जागांसाठी एकूण 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अंतिम आकडेवारी समोर आली नसली तरी आता एक्झिट पोलचे कौल समोर आले आहेत. वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये भाजपने (BJP) जोरदार मुसंडी मारताना अरविंद केजरीवालांच्या आपला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एक्झिट पोल यावेळेस खरे ठरणार का?

2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आणि नंतर झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विविध वृत्तवाहिन्या आणि कंपन्यांचे अंदाज मात्र साफ चुकले होते. 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होण्याचे भाकित करण्यात आले होते, फक्त जागांचा फरक होता. यावेळेस मात्र, एक्झिट पोलमध्ये सर्वाधिक जागा दाखवण्यात आला आहे, पण भाजपला टेन्शन आहे की एक्झिट पोलने सांगितलेला अंदाज खरा ठरतो का?.

गेल्या तीन- चार महिन्यापासूनच दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे वेध लागले होते. दिल्लीतील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकींसाठी कंबर कसून प्रचार केला. एकीकडे भाजप आपला 27 वर्षाचा वनवास संपवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर काँग्रेसने दिल्ली पुन्हा काबीज करण्यासाठी रणनीती आखली आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने चौथ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. सत्ताधाऱ्यांनी सत्ता राखण्यासाठी तर विरोधकांनी सत्ता स्थापनेसाठी जोरदार तयारी सुरू केली होती. काल मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर राजकीय पटलावर वावरणाऱ्या आपल्या नेतेमंडळींचं भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त झालं आहे.

आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत दिल्ली विधानसभा निवडणुकीत होत असताना. मतदानाच्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये आपसाठी तिसऱ्यांदा सत्तेची वाट खडतर असल्याचे दिसून येत आहे. तर भाजप दहा वर्षांनंतर जोरदार कमबॅक करण्याची शक्यता विविध पोलमधून समोर आली आहे.

धनंजय मुंडे यांची प्रॉपर्टी किती? करुणा मुंडे यांनी आकडाच सांगितला! राजश्री मुंडेंबाबत मोठा दावा

0

मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत न्यायालयात गेलेल्या करुणा शर्मा यांना मोठे यश आलेले आहे. करुणा शर्मा यांनी केलेले आरोप वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने अंशतः मान्य केले आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचे करुणा शर्मा यांनी स्वागत केले परंतु न्यायालयाच्या निर्णयावर पूर्णपणे समाधानी नसल्याचे त्या म्हणाल्या.

मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारात दोषी आढळल्यानंतर करुणा शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली. धनंजय मुंडे यांची करोडोंची संपत्ती आहे. परंतु त्यातील एक रुपयांची संपत्तीही माझ्या किंवा माझ्या मुलांच्या नावावर नाही, असे सांगत महिन्यांनी त्यांनी १५ लाख रुपये म्हणून पोटगी द्यावी, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली.

धनंजय मुंडे यांची प्रॉपर्टी किती?

धनंजय मुंडे यांची ५०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न ६५ कोटी रुपये आहे. आधी राजश्री धनंजय मुंडे यांच्या नावावर संपत्ती नव्हती. पण जेव्हापासून माझे आणि धनंजय यांचे भांडण सुरू झाले, तेव्हा त्यांनी राजश्री यांच्या नावावर संपत्ती केली. राजश्री यांच्या नावावर संपत्ती करताना त्यांनी मला किंवा आमच्या मुलांना अजिबात विचारले नव्हते. आमच्या नावावर त्यांची एकही रुपयांची प्रॉपर्टी नाही, असे करुणा मुंडे म्हणाल्या.

करुणा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी माझ्याशी १९९८ साली लग्न केले. त्यानंतर त्यांनी राजश्री यांच्याशी लग्न केले. किंबहुना राजश्री मुंडे यांच्याबरोबर लग्न करताना माझी त्यांनी परवानगीही घेतली नव्हती. मी त्यावेळी इंदौरला होते. त्यांच्या दोघांच्या लग्नाला मी याआधीच न्यायालयात चॅलेंज केले आहे. अर्थात मी त्यांची पहिली पत्नी आहे.

धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात माझ्या नावाचा उल्लेख केलेला नाही

धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात माझ्या नावाचा उल्लेख केलेला नाहीये. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे मी तक्रार दाखल केली आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांनी आमदार राजीनामा द्यायला हवा, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त धनंजय मुंडे यांच्यावर पूर्वापार आहे, असा गंभीर आरोपही करुणा मुंडे यांनी केला.

वांद्रे न्यायालयाच्या निर्देशाविरोधात मी उच्च न्यायालयात जाणार

प्रति महिना १५ लाख पोटगी मिळावी, अशी माझी मागणी होती परंतु न्यायालयाने दोन लाख पोटगी देण्याचे निर्देश दिले आहेत. वांद्रे न्यायालयाच्या निर्देशाविरोधात मी उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वाढीव पोटगी करुणा मुंडे आणि त्यांच्या मुलीला वाटून देण्यात येणार आहे.

शपथपत्रात किती संपत्तीचा उल्लेख?

दुसरीकडे २०२४ विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र दिले होते. त्यानुसार धनंजय मुंडे यांच्याकडे ५३ कोटी ८० लाख रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी नमूद केले, हे नमूद करण्यासारखी बाब आहे.

धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी काय स्पष्टीकरण दिलं?

कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा

धनंजय मुंडे यांनी काही चुकीचं केलंय असं कोर्टाला आढळलं नाही.

करुणा शर्मा यांच्यासोबत राहत होतो, हे धनंजय मुंडे यांनी आधीच मान्य केलंय हे ग्राह्य धरूनच कोर्टाने आजचे आदेश दिले आहेत

त्याला पोटगी म्हणू शकत नाही ‘करुणा शर्मा पत्नीही नाहीत’ मेंटेनस पिटीशन….निकालात काय म्हटलं? नवी माहिती समोर

0

मोठी बातमी समोर येत आहे, वांद्रे कौटुंबीक न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये द्यावेत असे आदेश दिले आहेत. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला होता. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा आदेश दिला आहे. त्यानंतर आता न्यायालयात झालेला युक्तिवाद आणि न्यायालयाचा निकाल याबाबत धनंजय मुंडे यांचे वकील शार्दुल सिंग यांनी मोठा खुलासा केला आहे.

नेमकं काय म्हणाले वकील? 

4 फेब्रुवारी रोजी हा अंतरिम निकाल आलेला आहे. युक्तिवाद गेल्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये झाला होता. करुणा शर्मा नावाच्या महिलेनं धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध पिटीशन दाखल केलेली आहे. डोमेस्टिक व्हायलंस प्रमाणे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. नियम असा आहे की, कुठलीही महिला कुठल्याही पुरुषाबरोबर राहिली असेल तर ती भविष्यात किंवा भूतकाळात आपल्या उदरनिर्वाहासाठी मेंटेनस पिटीशन दाखल करू शकते.

2022 मध्ये करुणा शर्मा यांनी मुंडे यांच्या विरोधामध्ये त्यांच्याकडे पैसे नाहीयेत, घर व बँकेचे ईएमआय भरण्यासाठी पैसे नाहीत असे वेगवेगळे आरोप करून पिटीशन दाखल केली होती. मात्र यात शारिरीक छळ केल्याचा कुठलाही आरोप लावलेला नव्हता. धनंजय मुंडे माझ्याबरोबर राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांनी मला पैसे द्यावे अशी ती पिटीशन होती. त्यांच्या केसमध्ये युक्तिवाद झाल्यानंतर अंतरिम आदेश म्हणजे जोपर्यंत केस संपत नाही तोपर्यंत उदरनिर्वाहसाठी किती पैसे द्यावे यावरून युक्तिवाद झाला. या प्रकरणात कोर्टानं असं सांगितल की करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये देण्यास हरकत नसावी. लिव्ह इन रिलेशनशिप मान्य केल्यानं हे आदेश देण्यात आले आहेत, त्याला आपण पोटगी म्हणू शकत नाही, असं वकिलांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना शार्दुल सिंग यांनी म्हटलं की, करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या पत्नीचा दर्जा कुठल्याही कोर्टाने दिला नाही, त्या पहिल्या पत्नी ऑन रेकॉर्ड कुठेच नाहीत, त्यांच्याबरोबर कधी लग्नही झालेलं नाही. हायकोर्टात जो खटला धनंजय मुंडे ययांच्यावर दाखल केला होता त्या खटल्यासह इतर खटल्यात त्यांनी कुठेच असा क्लेम केलेला नाही. 25 पानाची कोर्टाची ऑर्डर आहे कुठल्याच लाईन मध्ये कोर्टाने पत्नी हा शब्द वापरला नाही वापरला असेल तर त्यांनी दाखवावा, कोर्टाने देखील असं काही सांगितलं नाही.

करुणा शर्मा प्रकरणी मोठा ट्विस्ट, गुणरत्न सदावर्ते धनंजय मुंडेंची बाजू लढणार? 

0

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा दावा करुणा शर्मा यांनी केला होता. यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्या कायदेशीर लढाई लढत आहेत. आता करुणा शर्मा यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात दाद मागितली होती. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतला. फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना दर महिना पोटगीपोटी करुणा शर्मा यांना 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी करुणा शर्मा धनंजय मुंडे यांच्याप्रकरणी कोर्टाने नक्की काय ऑर्डर दिली, याबद्दल सविस्तर माहिती दिली.

 वकील गुणरत्न सदावर्ते यांनी  करुणा शर्मा प्रकरणी कोर्टाने दिलेल्या ऑर्डरबद्दल विचारणा केली. त्यावर त्यांनी याप्रकरणाचे संदर्भासह स्पष्टीकरण दिले. कुणीही निर्णायला स्वत:चे अर्थ लावू नये. मुलामा लावू नये. कोर्टाच्या पुढे कुणी जाऊ नये, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

“निकालाचे अनेक अर्थ काढण्याऐवजी एकच अर्थ”

“केस लढण्याबाबत मी काही बोलणार नाही. हा निकाल अंतरिम आहे. या निकालात ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ ऑर्डर आहे. त्यात कुठेही हिंसा केलीय असं म्हटलं नाही. बायको किंवा नवरा आहे, असंही नमूद केलं नाही. या निकालात मेंटेनन्स पोटगी दिलेली आहे. त्यामुळे निकालाचे अनेक अर्थ काढण्याऐवजी एकच अर्थ आहे. हे पहिलं न्यायालय आहे. त्यावर रिव्हिजन आहे. अपील आहे. रिट आहे. नंतर सुप्रीम कोर्ट आहे. त्यामुळे एखाद्या निकालावर खोलात पाय गेला, अडचणी वाढल्या, राजीनामा दिला पाहिजे, हे निकालाचं राजकारणी करण करत आहोत. त्यामुळे या निकालाचे अनेक अर्थ काढू नये”, असे गुणरत्न सदावर्तेंनी सांगितले.

निकालाचं राजकारणीकरण किंवा सामाजीकरण करू नये

“पॉइंट्स आणि फायडिंग हे निकालाचा ऑपरेटिव्ह पार्ट नाही. युक्तिवादाचे मुद्दे आहेत. ते चॅलेंज होत नसतात. ऑर्डर शेवटी आहे. त्यात कोर्टाने अत्याचार केला असं नमूद केलं नाही. यापुढे तुम्ही अत्याचार करू नका, असं म्हटलंय. केलंय असं म्हटलं नाही. ऑब्सर्व्हेशन येतात. पण ते मान्य केलंच पाहिजे असं नाही. कोर्टाच्या निकालाचं राजकारणीकरण किंवा सामाजिकरण करू नये. हे दुखद आहे. कोर्टाच्या पावित्र्याच्या पुढे जाऊन काही सामाजिक कार्यकर्ता वागत आहेत”, असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

“कुणीही निर्णायला स्वत:चे अर्थ लावू नये. मुलामा लावू नये. कोर्टाच्या पुढे कुणी जाऊ नये. करुणा शर्मांना निकाल मान्य नसेल तर मग त्याचा अर्थ काय काढायचा? मग निकालावर राजकारण का होतंय?” असा प्रश्न गुणरत्न सदावर्तेंनी उपस्थित केला.

“धनंजय मुंडे पोटगीला स्थगिती मागू शकतात”

“या प्रकरणात मुंडेंच्या बाजूने निकाल लागला तर पोटगीचे पैसे परत द्यावे लागतील. आता कायदा खूप डेव्हल्प झाला आहे. बायकांनी नवऱ्याला पोटगी दिल्याचीही प्रकरणं आहेत. सासू सूनेवर किंवा सून सासूवरही कौटुंबिक हिंसाचाराची केस करू शकते. धनंजय मुंडे हे वरच्या कोर्टात जाऊन पोटगीला स्थगिती मागू शकतात”, असेही गुणरत्न सदावर्तेंनी म्हटले.

अख्ख्या पिंपरी-चिंचवडला माहीतय २५ वर्षे काम करतोय; एवढा कंजूषपणा मी दिलदार आहे: अजित पवारांनी स्पष्ट सांगितले

0

“कुणीतरी अफवा उठवतो, २६ जानेवारीला २१ जिल्हे जाहीर केले जाणार… मात्र, आता एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही. आता जे चाललेय ते चांगले चाललेले आहे. ज्यावेळेस वाटेल, त्यावेळेस सरकार निर्णय घेईल. आतातरी कोणताच जिल्हा निर्माण करण्यात येणार नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्याचेही विभाजन होणार नाही,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा विभाजनाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (दि.६) चिखलीतील जाधववाडी येथे झाले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.

तत्पूर्वी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाषणात पुणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यास नवीन जिल्ह्यास ‘शिवनेरी’ नाव द्यावे, भविष्याचा विचार करता पिंपरी-चिंचवड शहरासाठी नवीन जलस्रोत निर्माण करावेत, अशा मागण्या केल्या. तोच धागा पकडून पवार म्हणाले की, आतातरी कोणताच जिल्हा निर्माण करण्यात येणार नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्याचेही विभाजन होणार नाही. २०५४ ला पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या पुण्यापेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. सध्याच्या पाण्याचा पुरवठा कमी पडणार आहे. भविष्याचा विचार करता शेजारील टाटांच्या धरणातील पाणी घ्यावे लागेल. समुद्राचे पाणी प्रक्रिया करून पिण्यासाठी वापरता येईल का, असाही विचार सुरू आहे.

ज्याचे क्रेडिट त्याला द्यायला शिका : महेश लांडगेंना सुनावले

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय उभारणीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे विधान आ. महेश लांडगे यांनी केल्यानंतर पवार यांनी सुनावले की, महेश लांडगे यांना माझे नाव घ्यायला का वाईट वाटले, हे मला माहीत नाही. परंतु, अख्ख्या पिंपरी-चिंचवडला माहीत आहे की, १९९२ला मी तुमचा खासदार झालो. १९९२ ते २०१७ पर्यंत कोणी पिंपरी-चिंचवड सुधारणा केल्या? आज २५ वर्षे झाली. प्रत्येक गोष्ट मी पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष देऊन करत असतो. येथील अधिकाऱ्यांना विचारा, या इमारतींमध्ये मी किती वेळा येतो, किती वेळा चौकशी करतो आणि किती वेळा बसतो. शेवटी आपण महायुतीमध्ये आहोत. एवढाही कंजूषपणा दाखवू नका, मी दिलदार आहे. ज्याने केले, त्याला त्याचे क्रेडिट देत असतो. ज्याने चांगले काम केले आहे, त्याला चांगले म्हणायला शिका.

माझे जरी अनधिकृत होर्डिंग असले तरी काढा : फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यासह विविध शहरांमध्ये अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्जचे प्रमाण वाढले आहे. त्यावर उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून सुरू केलेला होर्डिंग्जचा शोध आणि सर्वेक्षण प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे अनधिकृत होर्डिंगवर सहज कारवाई करणे शक्य होणार आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंग कोणाचेही असो काढून टाका, त्यावर माझा फोटो अथवा नाव असले तरीही कारवाई थांबवू नका!

साहित्यिक कट्टा वारजेचे ९ फेब्रुवारी २०२५ रोजी एक दिवसीय 2 रे मराठी साहित्य संमेलन: स्वागत अध्यक्ष बाबा धुमाळ यांची माहिती

0

१९८०च्या दशकानंतर वारजे उपनगर पुणे शहराची छोटी प्रतिकृती म्हणून उदयास आली. मोठ्या संख्येने विविध क्षेत्रांमध्ये अद्वितीय करता करणारे लेखक, कलावंत, विचारवंत वारजे परिसरामध्ये स्थायिक झाले. प्रदीप उर्फ बाबा धुमाळ मा. अध्यक्ष, शिक्षण मंडळ / नगरसेवक पुणे मनपा यांनी या उपनगराचा भौगोलिक विकास करीत सामाजिक सांस्कृतिक व कलाक्षेत्रात एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करावे या प्रमुख हेतूने वारजे साहित्य कट्ट्याची स्थापना करण्यात आली. पुणे महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समिती अंतर्गत साहित्यिक कट्टा वारजेच्या वतीने दुसरे एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते रात्री १० पर्यंत डॉ. मणिभाई देसाई सभागृह, बाएफ संस्था वारजे, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी आज पत्रकार परिषदेत प्रदीप (बाबा) धुमाळ, डी. के. जोशी, शरद जतकर, सुरेश जाधव, अशोक शहा, महेश कुलकर्णी, जयंत मोहिते, चंद्रशेखर धर्माधिकारी, महादेव गायकवाड यांनी आज माहिती दिली.

वारजे उपनगरातील साहित्यिक लेखक कवी कलाकार तसेच सर्व घरातील मुलांसाठी व्यक्तीसाठी कार्यक्रम आयोजित करून या नवसाहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात साहित्यिक कट्टा वारजे यशस्वी झाला. पुणे शहराला अतिशय समृद्ध साहित्य, संस्कृती, कला व शिक्षणाचा वारसा लाभलेला आहे. वारजे साहित्यिक क‌ट्ट्याचे वतीने वर्षभर मराठी भाषा संवर्धन व प्रसार तसेच व्यक्तींच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी कट्ट्यातर्फे दरवर्षी तीन दिवसांची शब्द ब्रह्म व्याख्यानमाला, राज्यस्तरीय कथा कविता स्पर्धा, बाल चित्रपट महोत्सव, चित्र रेखाटन स्पर्धा तसेच विविध लेखन प्रशिक्षण शिबिर, अभिनय प्रशिक्षण शिबिर, कविता रसग्रहण शिबिर यांचे यशस्वी आयोजन केले जाते.

वारजे उपनगरातील विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक युवती, जेष्ठ नागरिक, नवोदित लेखक, कवी व समाजातील सर्व थरातील लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. परिणामी पुणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या विविध साहित्यिक कट्ट्यामध्ये वारजे साहित्य कट्ट्याचे कार्य अद्वितीय व नेत्रदीपक आहे अशी प्रतिक्रिया विविध क्षेत्रातील तज्ञांनी, व्यक्तींनी नमूद केल्यामुळे साहित्यिक कट्टा वारजे या संस्थेस सातत्याने प्रेरणा मिळत आहे.

या संमेलनात ग्रंथ महोत्सव, ग्रंथ दिंडी, परिसंवाद, मुलाखत, कवी संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या साहित्यिक कट्ट्या तर्फे कै. रामचंद्र देखणे थोर साहित्यिक यांचे स्मरणार्थ ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. एक अतिशय आनंदाचा व प्रत्येक मराठी भाषा प्रेमिकास अभिमान वाटावा असा निर्णय नुकताच भारत सरकारने जाहीर केला आहे तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषा व संस्कृतीचा एक प्रकारे गौरवच केला आहे.

वारजे साहित्यिक कट्ट्याचे यशस्वी संचालन करीत असताना मला वारजे नगरातील ज्येष्ठ, श्रेष्ठ साहित्यिक कलावंत विचारवंत यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत असते. हे मी विनम्रपणे नमूद करीत आहे. साहित्यिक कट्ट्याचे विकास प्रक्रियेमध्ये ज्येष्ठ लेखिका व कवियत्री माननीय श्रीमती माधवीताई वैद्य यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे. तसेच संस्थेचे सचिव श्री दिगंबर जोशी व सर्व सन्माननीय सदस्यांचे वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याने आम्हाला प्रेरणा व उत्साह मिळत आहे. असे स्वागत अध्यक्ष श्री. प्रदीप बाबा धुमाळ यांनी यावेळी बोलताना सांगितले.

-सविस्तर कार्यक्रम पत्रिका-

पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती व साहित्यिक कट्टा वारजे आयोजित

एक दिवसीय 2 रे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते रात्री १० पर्यंत

स्थळ : डॉ. मणिभाई देसाई सभागृह, बाएफ संस्था वारजे, पुणे

* स्वागताध्यक्ष *

प्रदीप उर्फ बाबा धुमाळ (मा. अध्यक्ष, शिक्षण मंडळ / नगरसेवक, पुणे पुणे मनपा)

(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला विधानसभा मतदार संघ)

* निमंत्रक

सौ. दिपाली प्रदीप धुमाळ (मा.विरोधी पक्षनेत्या, पुणे मनपा) डॉ. माधवी वैद्य (ज्येष्ठ साहित्यिका)

श्री. डी. के. जोशी (सचिव, साहित्यिक कट्टा वारजे)

* कार्यक्रमाची रूपरेषा *

रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी

सकाळी : ९.३० वा

ग्रंथदिंडी शुभारंभ (बाएफ संस्था मुख्य प्रवेशद्वार ते सभागृह)

शुभहस्ते : ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे (शिवचरित्रकार)

सकाळी : १०.०० वा

चित्र प्रदर्शन उद्घाटन शुभहस्ते : मा. रूपेश पवार

(प्रसिध्द चित्रकार, उपप्राचार्य, भा.वि.कॉ. ऑफ फा. आर्टस्)

सकाळी : १०.३० वा.

ग्रंथमहोत्सव उद्घाटन शुभहस्ते : मा. श्री. शंकर मांडेकर (आमदार, भोर-वेल्हा-मुळशी)

।। संमेलन उ‌द्घाटन समारंभ ।।

* पुरस्कार वितरण पुरस्कार प्राप्त सभासद सन्मान

* लेखकांचे पुस्तक प्रकाशन समारंभ

* स्मरणिका प्रकाशन समारंभ

संमेलन उद्घाटक

मा.ना. अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) पालकमंत्री पुणे जिल्हा

* पुरस्कार प्रदान शुभहस्ते

मा.ना. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) संपर्क मंत्री पुणे जिल्हा

प्रमुख उपस्थिती

मा.सौ. रूपालीताई चाकणकर (अध्यक्षा, महिला आयोग महा. राज्य) संमेलनाध्यक्ष मा.डॉ. सदानंदजी मोरे (ज्येष्ठ साहित्यिक)

मा. श्री. भिमराव तापकीर (आमदार, खडकवासला मतदार संघ)  मा.श्री. दिपक मानकर (शहराध्यक्ष, रा.कॉ. पार्टी, पुणे)

मा.श्री. प्रदिप देशमुख (कार्याध्यक्ष, रा. का. पार्टी, पुणे)        मा.श्री. दिलीप बराटे (अध्यक्ष, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान)

मा.डॉ. राजेंद्र भोसले (आयुक्त, पुणे मनपा)    मा.श्री. भरत काकडे (अध्यक्ष, बाएफ संस्था)

उद्योगरत्न पुरस्कार मा.श्री. संजय भोर

साहित्यरत्न पुरस्कार मा.श्री. राजीव तांबे

समाजरत्न पुरस्कार मा.श्री. सतिशभाऊ बोडके

(मा. उपसरपंच वारजे)

दुपारी : १ ते २ वा

व्याख्यान डॉ. संजय उपाध्ये (विषय-मातृभाषा व मनशांती)

दुपारी : ३ ते ४ वा

प्रकट मुलाखत

सहभाग : मा. मृणाल देव कुलकर्णी (सुप्रसिध्द अभिनेत्री)

मुलाखतकार : वि.दा. पिंगळे (कार्यवाह, म.सा.प. पुणे)

दुपारी : ४ ते ६ वा

परिसंवाद विषय : अभिजात मराठी भाषेसमोरील आव्हाने

अध्यक्षा डॉ. मंगला गोडबोले प्रमुख वक्ते : प्रा. मिलिंद जोशी व संजय आवटे

सायंकाळी ६ ते ७ वा

मान्यवरांचे कविसंमेलन

अध्यक्ष : म. भा. चव्हाण (सुप्रसिध्द कवी व गझलकार)

सुत्रसंचालन : चंद्रशेखर धर्माधिकारी

मान्यवर कवी : ज्योत्स्ना चांदगुडे, संदिप अवचट, दिगंबर जोशी, स्वाती यादव, वैशाली माळी, ऋचा कर्वे, डॉ. मंदार खरे, योगेश काळे, उमा व्यास, स्मिता जोहरे जोशी, अशोक शहा, नंदकुमार बोधाई, साधना कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर, राजेंद्र वाघ, किसन म्हसे.

सायंकाळी : ७ ते ९ वा ‘सांजधारा’ सांस्कृतिक कार्यक्रम

स्वर संगीत वारजे प्रस्तुत “सांजधारा” सुमधुर मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम सादरकर्ते : सौ. संगिता कुलकर्णी, श्री. अजय दाते, श्री. दिपक पाटील व सहकारी

संयोजक समिती

ज्योत्स्ना चांदगुडे, वि.दा. पिंगळे, गोपाळ कुलकर्णी, उदय कुलकर्णी, संगीता कुलकर्णी, महेश कुलकर्णी, शरद जतकर, साधना कुलकर्णी, निवृत्ती येनपुरे, जयंत मोहिते, सुरेश जाधव, अशोक शहा, मानसी नलावडे, महादेव गायकवाड, नंदकिशोर बोधाई, अतुल घटवाई, अरूण पाटील.

संयोजन समिती

अनिल गायकवाड, शिवाजी भोईन, राजेंद्र ढोबळे, ज्ञानेश्वर हांडे, दिवाकर पोफळे, राजु धोत्रे, पांडुरंग पाटील, ज्ञानेश्वर मारणे, संजय पवार, कैलास बारवे, धनंजय म्हसे, सुरेश काळे, अरूण पाटील, मनिष धुमाळ, मोहित वेलाणी, सुरेश गोपाळघरे, विजय नावंदर, मनोज बराटे, डॉ. ऋषिकेश गार्डी, संदिप पवार सर, अशोक अडुळकर, अलम पठाण, विजय खिलारे, विश्वास जाधव, माणिक लवांडे, अंकुश भगत, रमेश व्यास, राजु ताकवले, विठ्ठल पासलकर, दिपक बागुल, संतोष बोडके, संपत पवार, तानाजी शिंदे, मनिष नलावडे, बबन वाघद्रे, नंदकिशोर बडदे, संतोष देशमुख, समिर मरकळे, सुनिल देशमुख, चंद्रकांत कोंडेकर, समिर तिखे, विष्णु कुंभार, वसंत कुल, किशोर तटकरे, किसन म्हसे, गुलाब सुर्यवंशी, देवेंद सुर्यवंशी, नितीन पाटील, संजय हिंगे, संतोष घोसाळे, नितीन उरिट, शंकर (पप्पू) बोडके, दिलीप नाईक, दिलीप पोकळे, दिलीप सातपुते, कमलाकर गलांडे, नवनाथ गुंडाळ, निलेश धानापुने, संतोष वन्हाडे, विशाल सोत्रीस, भोलाशेठ बराटे, राजकुमार शिंदे, चंद्रकांत पंडित, रामभाऊ बराटे, पोपट हिमगुडे, अनिल शंकर कुलकर्णी, बाळासाहेब पानसे, चंद्रशेखर लंगडे, दत्तात्रय पायगुडे, अगय्या जक्कन, तुफेल शेख, विवेक धुमाळे, वसंत पाटील, अजित कुलकर्णी, सुनिल क्षिरसागर, श्रीकांत ठुसे, सुहास शिद्धिकर, सोमकांत ओडारकर, निलम डोळसकर, भावना पाटील, शांता नेवसे, सविता साष्ठे, प्रभावती कानगुडे, प्रतिक्षा हांडे, नेहा धुमाळ, सविता मिरेकर, वैशाली बनकर, हेमलता देशमुख, धनश्री कानेगांवकर, श्रीमती आशा डोके, श्रीमती अंजली देशपांडे, दया देशपांडे व राजयोग प्रतिष्ठान, श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळ, सम्राट मित्र मंडळ,

आझाद हिंद मित्र मंडळ, राजयोग भजनी मंडळ, मराठा वॉरिअर्स, वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठान, वारजे हायवे परिसर ज्येष्ठ नागरिक संघ, ज्येष्ठ नागरिक सामाजिक प्रतिष्ठान, वारजे माळवाडी ज्येष्ठ नागरिक संघ, श्री पावश्या गणपती ज्येष्ठ नागरिक संघ प्रभाग क्र. ३१ व ३२ मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते.

* निमंत्रक *

सौ. दिपाली प्रदीप धुमाळ (विरोधी पक्षनेत्या, पुणे मनपा)

* स्वागताध्यक्ष*

प्रदीप उर्फ बाबा धुमाळ (मा. अध्यक्ष, शिक्षण मंडळ/नगरसेवक, पुणे मनपा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ख.वि.म.संघ)

ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजाराने निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

0

क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. द्वारकानाथ संझगिरी यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. द्वारकानाथ संझगिरी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. ते लवकरच या आजारातून कमबॅक करत घरी परततील, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र त्यांची प्राणज्योत माळवली. द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक क्रिकेट चाहत्यांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

समालोचक हर्षा भोगले यांची पोस्ट

द्वारकानाथ संझरगिरी यांच्या निधनाचं वृत्त समजताच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रिकेट मराठमोळे समालोचक हर्षा भोगले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. भोगले यांनी द्वारकानाथ संझगिरी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हर्षा भोगले आणि द्वारकानाथ संझगिरी हे गेल्या अनेक दशकांपासूनचे मित्र होते. मात्र आपल्या मित्राच्या निधनानंतर हर्षा भोगले यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्याबाबतच्या आठवणी या जगासमोर मांडल्या आहेत.

क्रिकेट आणि सिनेमा

द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रिकेट आणि सिनेमा या विषयांवर अनेक पुस्तकं लिहिली होती.’ क्रिकेट कॉकटेल’, ‘क्रिकेटर्स मनातले’, अश्रू आणि षटकार, अफलातून अवलिये, फिल्मी कट्टा या आणि अशा अनेक पुस्तकांचं लेखन द्वारकानाथ संझगिरी यांनी केलं होतं. संझगिरी फेसबूकवर सातत्याने क्रिकेट आणि सिनेमा या विषयांवर विस्तृत आणि माहितीपूर्ण लिहायचे. त्यांच्या या लेखाचा एक वाचक आणि चाहतावर्ग होता. मात्र आता त्यांच्या निधनामुळे क्रिकेट आणि सिनेचाहत्यांना या अशा माहितीपूर्ण लेखाला मुकावं लागणार आहे.

अंत्यसंस्कार केव्हा?

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी 7 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

‘करुण शर्मा नको, मला करुणा धनंजय मुंडे म्हणा’, निकालानंतर पहिली प्रतिक्रिया

0

“पहिली पत्नी म्हणून कोर्टाने मला मान्य केलं आहे. करुण शर्मा नको, मला करुणा मुंडे म्हणा. हा माझा अधिकार आहे, मी लढा दिला आहे. मी मोठी किंमत चुकवली आहे. त्यामुळे मला करुणा धनंजय मुंडे म्हणा” अशी निकालानंतर पहिली प्रतिक्रिया करुणा शर्मा यांनी दिली. “तीन वर्षापासून मी लढाई लढत आहे. 33 महिन्यापासून मी खूप कष्ट घेतलेत. मी न्यायाधीश, न्यायालय आणि माझी वकील गणेश कोल्हे यांचे मनापासून आभार मानते. त्यांनी एक रुपया न घेता माझा खटला लढला. बीडपासून मुंबईत ते येत होते. खटला दाखल केला, आज जिंकलो यासाठी मी सर्वांचे आभार मानते” असं करुणा शर्मा म्हणाल्या.

2 लाख रुपये पोटगीवर समाधानी आहात का? यावर करुणा शर्मा म्हणाल्या की, “मी अजिबात समाधानी नाही. कारण महिन्याचा खर्च 1 लाख 70 हजार आहे. 30 हजार रुपये मेन्टेन्स आहे. एका नोकराकडे चार हजार कोटीची प्रॉपर्टी निघाली. माझ्या आणि मुलांच्या नावावर काही नाहीय” “मुलगा 21 वर्षांचा असून बेरोजगार आहे. आम्हाला महिन्याच्या खर्चासाठी 15 लाख रुपये हवेत. त्यासाठी कोर्टात खटला दाखल केलेला. मी कोर्टाच्या ऑर्डरवर समाधानी नाही. मी हायकोर्टात दाद मागणार” असं करुणा शर्मा म्हणाल्या.

वाल्मिक कराडने मला मारहाण केली

धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या आरोपावर करुणा शर्मा म्हणाल्या की, “माझ्या आईचे प्राण गेले. माझ्या आईने आत्महत्या केली. मला दोनवेळा जेलमध्ये टाकलं. त्यांनी प्रतारणा केली. माझा छळ सुरु आहे. येरवडा जेलमध्ये 45 दिवस होती. बीडमध्ये 16 दिवस होती. जिल्हाधिकारी कलेक्टर कार्यालयात वाल्मिक कराडने मारहाण केली. गाडी फोडली. हिंसाचार सरु आहे. माझी बहिण 40 वर्षांची आहे. तिचं शारीरिक शोषण केलं. मी या ऑर्डरविरोधात हायकोर्टात दाद मागणार” असं करुणा शर्मा म्हणाल्या.

‘मी आत्महत्या केली, तर माझ्या मुलांच काय होईल’

तीन वर्षात तुमचं धनंजय मुंडेंशी बोलणं झालं का? “हो बोलणं झालं, भेट झाली. कुठेतरी सेटलमेंट करा असा विषय झालं. मुला-मुलींच शिक्षण थांबलेलं आहे. मुलांवर याचा परिणाम होतोय. कोणीतरी महिला घाणेरड बोलत आहे. पैसे देऊन तिला घाणेरड बोलायला लावतायत. पण मी घाबरत नाही. आत्महत्येचा विचार माझ्याही मनात आला. माझ्या आईने आत्महत्या केल्यानंतर माझं जगणं मुश्किल झालं. आज माझी आई असती, तर पतीने मला सोडलं नसतं. मी आत्महत्या केली, तर माझ्या मुलांच काय होईल म्हणून मी जिवंत आहे”