Home Blog Page 206

नव्या आयकर विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, काय होणार बदल?

0

केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी नव्या आय़कर विधेयकाला मंजुरी दिली. सहा दशके जुन्या आयकर कायद्या ऐवजी हे विधेयक लागू होईल. नव्या विधेयकात कालबाह्य झालेले संशोधन आणि कलमे काढून टाकण्यात आली आहेत. यासोबतच कर तज्ज्ञांच्या मदतीशिवाय सहज समजेल सोपी भाषा असणार आहे. या विधेयकात तरतूद आणि स्पष्टीकरण किंवा कठीण वाक्ये नाहीत. यामुळे वादग्रस्त टॅक्स डिमांड कमी होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने नव्या विधेयकाला मंजुरी दिलीय. आता हे विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर केलं जाईल. यानंतर संसदेच्या आर्थिक स्थायी समितीकडे विधेयक पाठण्यात येणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीला संपणार आहे. तर दुसरा टप्पा १० मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत असणार आहे.

आयकर कायदा ६० वर्षांपूर्वी १९६१ मध्ये लागू करण्यात आला होता. तेव्हापासून लोकांची पैसे कमावण्याची पद्धत, कंपन्यांच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक बदल झाले आहेत. वेळोवेळी गरजेनुसार या कायद्यात अनेक बदल करण्यात आले. देशातील सामाजिक-आर्थिक बदल, तांत्रिक प्रगती या पार्श्वभूमीवर जुन्या आयकर कायद्यात पूर्ण बदलाची गरज असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं.

नवं आयकर विधेयक लागू करण्याचा उद्देश भाषा आणि अंमलबजावणीची प्रक्रिया सोपी करणं हा आहे. नव्या कायद्यात आयकर स्लॅबमध्ये बदलाची शक्यता नाही. कारण सर्वसामान्यपणे वित्त कायद्याच्या माध्यमातून हे केलं जातं. २०१० मध्ये प्रत्यक्ष कर कायदा विधेयक संसदेत सादर केलं होतं. ते स्थायी समितीकडे पाठवण्यात आलं होतं. मात्र २०१४ मध्ये सरकार बदलल्यानंतर हे विधेयक रद्द करण्यात आलं होतं.

मुस्लिम मते कुणाच्या पारड्यात? तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्नावर पॉकेट एरियात कसे फेरले पाणी, भाजपाने कशी घेतली आघाडी

0

दिल्लीतील मुस्लिम मतदार कुणाच्या बाजूने आहे, याची मोठी चर्चा या निवडणुकीत रंगली होती. तर मुस्लिमांनी या निवडणुकीत आपची बाजू घेतली की भाजपाची कड घेतली याचा अंदाज बांधण्यात येत आहे.देशाची राजधानी दिल्लीमध्ये भाजपाने 27 वर्षानंतर मोठी मुसंडी मारली. आपच्या झाडूला धूळ चाटवली. अरविंद केजरीवाल यांचे स्वप्न धुळीस मिळवले. या निवडणुकीत मुस्लिम मतदारांवर आपची मोठी भिस्त होती. मुस्लिम मतदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी आपने अनेक घोषणा केल्या होत्या. तर अवैध रोहिंग्या आणि बांगलादेशांची घुसखोरी दिल्लीत वाढल्याचा आरोप भाजपाने सातत्याने केला होता. वोट बँक पक्की करण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण निकाल पाहता आपला मुस्लिम मतदारांनी पण हात दाखवल्याचे चित्र समोर येत आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 चे निकाल सकाळपासूनच हाती यायला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत 70 जागांवर आप, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, एआयएमआयएम आणि इतर पक्षांनी नशीब आजमावलं. दिल्लीत जवळपास 13 टक्के मुस्लिम मतदार आहेत. आतापर्यंत पाच जागांवर मुस्लिम उमेदवार निवडून येण्याची परंपरा आहे. यापूर्वी आपचा वरचष्मा असलेल्या मुस्लिम बहुल भागात यावेळी भाजपाने सुरूंग लावल्याचे दिसून येत आहे.

या भागात जादा मतदान

दिल्लीतील मुस्लिम बहुल भागात सर्वाधिक मतदान झाले होते. त्यामुळे आपला आपला विजय निश्चित मानण्यात येत होता. पण जे कल येत आहे, त्यात भाजपा आघाडीवर असल्याचे समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. मुस्तफाबाद, बल्लीमारान, सीलमपुर, मटिया महल, चांदणी चौक आणि ओखला या मतदारसंघात भाजपाचा वरचष्मा दिसत असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यापूर्वीच्या इतर राज्यांच्या निवडणुकीत सुद्धा मुस्लिम मतदार, विशेषतः महिला मतदारांनी भाजपाच्या बाजूने मतदान केल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यापूर्वी यासर्व मतदारसंघात भाजपासोडून इतर पक्षाचे मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत.

मुस्तफाबाद मतदारसंघात AIMIM चे ताहिर हुसैन, आम आदमी पक्षाचे आदिल खान, काँग्रेसचे अली मेंहदी आणि भाजपाकडून मोहन सिंह बिष्ट निवडणूक लढवत आहेत. बल्लीमारान मतदारसंघात आम आदमी पक्षाचे इमरान हुसैन, काँग्रेसचे हारून यूसुफ आणि भाजपाकडून कमल बांगड़ी निवडणूक लढवत आहेत. मटिया महल विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाचे मोहम्मद इकबाल आणि काँग्रेसचे आसिम मोहम्मद खान तर भाजपाकून दीप्ति इंदौरा निवडणूक लढवत आहेत. या प्रमुख मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात समोर येतील. त्यानंतर मुस्लीम मतदारांची भूमिका स्पष्ट होईल.

शिवेंद्रराजेंकडून राहुल सोलापूरकरांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध; म्हणाले, अशोभनीय आणि निंदनीय ‘ आत्ता एक उदाहरण घडविले पाहिजे’

0

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी माफी मागितली असली तरी त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई केली पाहिजे, असे स्पष्ट मत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.

तसेच या वक्तव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा या लोकांचा डाव आहे का? हे तपासले पाहिजे. त्यासाठी सरकारने पहिली कारवाई करणे आवश्यक आहे, म्हणजे पुन्हा छत्रपतींविषयी वादग्रस्त बोलण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

ते म्हणाले, ”त्यांनी हे वक्तव्य का केले, कुठल्या कारणांसाठी केले? याच्या खोलात गेलं पाहिजे. ते स्वत: कलाकार असून, त्यांना वाटतं की आम्हालाच समाजातील सगळं कळतं. तुम्हाला एवढे कळत असले तरी छत्रपतींच्या इतिहासाविषयी त्यांनी भाष्य करायला नको होते. त्यांचे स्क्रीनवर बिनधास्तपणे बोलणं म्हणजे अति झाले आहे. त्यांनी माफी मागितली असली तरी त्याचा काहीही उपयोग नाही. मराठी माणूस व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.”

महापुरुषांवर वादग्रस्त विधान करणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकविणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितलेल्या संदर्भाविषयी इतिहासात कुठेही असा उल्लेख दाखविलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आले यामध्ये त्यांचा मुत्सद्दीपणा होता, हे दिसून येतो. त्यामुळे सोलापूरकर यांचे हे बोलणे अशोभनीय आणि निंदनीय आहे. काहीतरी बोलायचे आणि राज्य अशांत करायचे, हा सगळा खेळ चाललेला आहे, असे मला वाटते, असेही मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.

सरकारने एकदा तरी कुणावर कारवाई करून एक उदाहरण घडविले पाहिजे. म्हणजे उद्या छत्रपतींविषयी वादग्रस्त बोलण्याचे कोणी धाडस करणार नाही.

-शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्‍ट्र राज्‍य

भाजपकडून दिल्ली काबीज मुख्यमंत्री कोण? या पाच नावांची चर्चा

0

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपच्या बाजूने कौल लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपचे सरकार सत्तेत आले तर मुख्यमंत्री कोण? या चर्चेला उधाण आले आहे. या स्पर्धेत तूर्तास जी नावे आघाडीवर आहेत, त्यात दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता, खा. मनोज तिवारी, प्रवेश वर्मा आणि रमेश बिधुडी यांची नावे आघाडीवर दिसत आहेत.

दिल्लीमध्ये २८ वर्षांपासून भाजप सत्तेतून बाहेर आहे. अडीच दशकानंतर पहिल्यांदा सत्तेचा दुष्काळ संपण्याची चिन्हे असल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. भाजपच्या शेवटच्या मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांना अवघ्या ५२ दिवसांचा कार्यकाळ मिळाला होता. निवडणुकीचा निकाल अद्याप जाहीर व्हायचा असला तरी भाजपकडून मुख्यमंत्री कोण? याच्या चर्चा मात्र झडत आहेत. फारशा वाद-विवादात नसणारे प्रदेश भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागू शकते, अशी चर्चा आहे.

विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता हेही डार्क हॉर्स ठरू शकतात. रोहिणी मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात असलेल्या गुप्ता यांची लढत यावेळी ‘आप’चे प्रदीप मित्तल आणि काँग्रेसच्या सुमेश गुप्ता यांच्याशी होत आहे. पूर्वांचल समाजाचा मोठा चेहरा असलेल्या खा. मनोज तिवारी यांना संधी दिली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

बिधुडी, वर्मांवरही विचार होण्याची शक्यता

भाजपचे नेते आणि उमेदवार प्रवेश वर्मा आणि रमेश बिधुडी हे दोघेही माजी खासदार आहेत. वादग्रस्त विधानांसाठी हे नेते प्रसिद्ध आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी या नेत्यांना तिकीट देण्यास पक्षाने नकार दिला होता. मात्र मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक चेहरा देण्याचा विचार पक्षाने केल्यास, वरीलपैकी एका नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते, असे मानले जात आहे.

तुम्ही सर्वांना आत टाकाल आणि निवडणुका जिंकाल हा महाराष्ट्र पॅटर्नच! भाजपच्या दिल्ली विजयावर राऊतांची प्रतिक्रिया

0

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. दिल्लीत भाजप सत्तेत येणार असं चित्र सध्या दिसत आहे. आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसची वाताहत झालीय. काँग्रेसला एका जागेवर आघाडी मिळालीय. इंडिया आघाडीच्या नेत्यांकडूनच काँग्रेसवर टीका केली जातेय. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अजून लढा एकमेकांशी असं म्हणत टीकास्र सोडलंय. तर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार भाजपने बहुमताचा आकडा पार केल्याचं दिसतंय.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, भाजपला हरवण्यासाठी आप आणि काँग्रेससुद्धा लढत आहे. पण वेगवेगळे लढत आहेत. जर ते एकत्र असते तर दिल्लीच्या निकालाच्या पहिल्या तासातच भाजपचा पराभव निश्चित झाला असता. काँग्रेसच्या स्थितीवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, काँग्रसने खातं उघडलं. खातं उघडण्यासाठीच सगळे मैदानात उतरतात. त्यातून शिकायला पाहिजे.

पाच वर्षे केजरीवालांना काम करू दिलं नाही. नायब राज्यपालांच्या हाती ताककद दिली. केजरीवालांच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्याचाच हा परिणाम आहे. तुम्ही सर्वांना आत टाकाल आणि तुम्ही निवडणुका जिंकाल. महाराष्ट्रात हाच फॉर्म्युला झाला. दिल्लीत झाला. बिहारमध्येही दिसत आहे. महाराष्ट्रात मोठे नेते पिछाडीवर होते, ते पराभूत झाले. हा महाराष्ट्र पॅटर्न आहे. नेतृत्वाला संपवून टाका. त्यांचा पराभव करा हा पॅटर्न होता असंही राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विचार करावा. ते अजूनही राष्ट्रीय नेते झाले नाहीत. राहुल गांधी हे राष्ट्रीय नेते आहेत. तुम्ही बोगस मतदान करून जिंकलात आणि नेते झालात. राज्यात ३९ लाख मतदार वाढले, सगळी मते भाजपलाच कशी मिळाली? ही कोणती जादू? हे अघोरी कृत्य आहे? फडणवीसांनी हे सांगावं. एकनाथ शिंदेंकडे अघोरी विद्या आहे. जादू टोणा आहे. बोगस मतदान करता आणि आम्हाला ज्ञान देता अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सुनावलं.

अपात्र महिलांचं पुढे काय? कायदेशीर कारवाई? पैसे परत करावे लागणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट

0

राज्य सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. या पडताळणीत आतापर्यंत ५ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे या अपात्र महिलांचे पुढं काय होणार?या महिलांवर कारवाई होणार? की या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार? याची चर्चा महिलांसमध्ये सुरु आहे. दरम्यान, यासंदर्भात आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

https://x.com/iAditiTatkare/status/1887868997875470704?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1887868997875470704%7Ctwgr%5E9b34d0e87c50d789599c805fda790a6e4e23639c%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

आदिती तटकरे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

पुढे बोलताना, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दिल्ली कुणाची? मतमोजणीत भाजप-आपमध्ये काँटे की टक्करच, निकालाचं काऊंटडाऊन सुरु

0

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपचं डबलसीट सरकार दाखल झाले. त्यानंतर आज दिल्लीचा आखाडा कोण गाजवणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. देशाच्या राजधानीत भाजपचे कमबॅक होणार, असा दावा एक्झिट पोलने केला आहे. तर आप सुद्धा मोठी मुसंडी मारण्याचा दावा करण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेसला निदान एक तरी जागा निवडून आणता येईल की नाही, हे आज स्पष्ट होईल. त्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वातील INDIA आघाडीत त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. सध्या पोस्टल मतमोजणीत भाजपने आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ आप आहे. तर काँग्रेसचा जागांचा दुष्काळ संपलेला नाही.

कल सांगतो काय?

सध्या पोस्टल मतमोजणी पूर्ण झाली आहे. लवकरच प्रत्यक्ष मतमोजणीला आता सुरुवात होईल. तर सुरुवातीच्या कौलमधील 42 जागांचे कल समोर आले आहेत. त्यात 15 जागांवर आप तर 26 जागांवर भाजप आघाडीवर आहेत. काँग्रेस एका जागेवर आघाडीवर दिसत आहे. कलामध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे अस्तित्व दिसत नाही. शीला दीक्षित यांच्यानंतर काँग्रेसचा दुष्काळ संपलेला नाही. त्यातच आपचे अनेक दिग्गज पिछाडीवर दिसत आहेत.

एक्झिट पोलचे मत कुणाच्या पारड्यात?

डीव्ही रिसर्च करून जारी करण्यात आलेल्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपच्या पारड्यात मतं टाकले आहे. दिल्लीमध्ये भाजपला 40 ते 44 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आपला 25 ते 29 जागेचा कौल देण्यात आला आहे. तर काँग्रेसचा जागांचा दुष्काळ संपताना दिसत नाही. या एक्झिट पोलनुसार, काँग्रेसला केवळ एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

सर्व एक्झिट पोलने दिल्लीमध्ये भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे. आपला मोठा धक्का बसू शकतो. काँग्रेस विधानसभेत असेल की नाही, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. भाजप तब्बल 25 वर्षांनी पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकते. तुम्ही टीव्ही 9 वृत्त वाहिनीवर निकालाबाबत याविषयीची अपडेट पाहू शकतात.

‘ऑपरेशन टायगर’ उद्धव ठाकरे भडकले; भरसभेतच दिलं ओपन चॅलेंज, तूम्ही मर्दाची अवलाद असाल तर एकतरी…

0

शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा जोरदास सुरू आहे. ठाकरेंचे 6 खासदार संपर्कात असल्याचा दावा शिवसेनने केला आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधत शिवसेनेला खुले आवाहन दिले आहे. हिंमत असेल तर खासदार फोडून दाखवा… आता आमचा अंत बघू नका, आता फोडाफोडी केली तर तुमची डोकी फुटतील असे म्हणत उद्धव ठाकरेंचं शिवसेनेला खुलं आव्हान दिले आहे. तसेच ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवून समोर या असे म्हणत शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर उद्धव ठाकरेंनी हा प्रहार केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या कार्यअहवालाचं प्रकाशन कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी हे आव्हान दिलं आहे.

आपल्याला पराजय पचवत नाही त्यांना जय पचवत नाही. मुख्यमंत्री कोण हे ठरवायला त्यांना एक महिना लागला. डोकं नाही म्हणून दाढी खाजवतात.रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू… ⁠आता संयम बघू नका.. मर्दाची अवलाद असाल तर एकतरी खासदार फोडून दाखवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी भाजपला सोडले आहे हिंदुत्वाला नाही. हिंदुत्वाचे सोंग पांघरून जर कोणी देश लुटत असतील तर मी कट्टर हिंदू आण् राष्ट्रप्रेमी म्हणून मी तुम्हाला सोडणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईला भिकेचे डोहाळे लावले : उद्धव ठाकरे

आर्थिक राजधानीला भिकेचे डोहाळे लावले. सगळ्यात जास्त कर देणारी एकटी मुंबई आहे. कोस्टल रोड हा देवेंद्र फडणवीसांचा नाही ना मोदींचा आहे ना गद्दांराचा आहे. हा मुंबई महापालिकेचा आहे. 2 लाख 30 हजार कोटीचे कर्ज करून ठेवालं आहे. मी तुम्हाला मुंबई गिळू देणार नाही. बटेंगे तो कटेंगे हे मराठी माणसासाठी होते. उद्या महापालिका नाही चालली तर ती उद्योगपतींना देऊन टाकणार का? असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी केला आहे.

रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू… शिंदेंना टोला

उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीला टॉर्च बंद पडला की काळोख पसरेल तेव्हा यांची चेंगराचेंगरी होईल. नगरविकास खात्यात जो धेंड बसविला आहे त्याला विचारा? काही नाही मिळाले की रूसूबाई रूसू जनता येत्या काळात म्हणेल घरात घूसू…. तलवार आहे पण चालवण्यासाठी मनगट पाहिजे यांचे मन मेले फक्त गट राहिले.

अमृता फडणवीसांचंही #मी पुन्हा येत आहे… बंजारा समाजाचे स्पेशल सरप्राइज, खास दिनी नवे गाणं रिलीज

0

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचं नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. अमृता फडणवीस नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. आजवर त्यांनी अनेक गाण्यांना त्यांचा आवाज दिला आहे. अशातच त्यांनी बंजारा समाजासाठी खास गाणं तयार केलं आहे. हे गाणं काही तासांपूर्वीच यूट्यूबवर प्रदर्शित झालं आहे.

अमृता फडणवीस त्यांच्या गायनामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. नुकतंच त्यांनी श्री संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त बंजारा समाजासाठी हे गाणं तयार केलं आहे. या गाण्याचं श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, “#मी पुन्हा येत आहे…आपली संस्कृती आणि धरोहर तुमच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी…संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक गीत घेऊन…संपर्कात रहा.”

अमृता फडणवीस यांना आधीपासूनच गायनाची आवड आहे. ही आवड जपत त्यांनी अनेक गाण्यांना त्यांचा आवाज दिला आहे. दरम्यान, त्यांच्या गाण्यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात. अनेकदा त्यांना प्रोत्साहन दिले जाते, त्यांच्या गाण्यांचं कौतुकही केलं जातं. पण दुसरीकडे अनेकदा त्यांच्यावर टीकाही केली जाते. त्यांचं हे नवं गाणं बंजारा समाजासाठी तयार करण्यात आलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळत आहे.

व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी अमृता यांचे आभार मानले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे, “अप्रतिम गायन व सादरीकरण, आपली बंजारा समाजाबद्दल आपुलकी आपल्या गायनातून दिसते. धन्यवाद मॅम. जय सेवालाल.” तर दुसऱ्याने म्हटलं आहे, “फडणवीस मॅडम तुमचे खूप खूप आभार, बंजारा समाजाशी तुमचं जवळचं नातं आहे आणि आमचा समाज हे गाणं कधी विसरणार नाही. खूप खूप धन्यवाद. जय सेवालाल.” या गाण्याला तीन तासांमध्येच ६५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत; पुणे जिल्हा आघाडीवर, ७५ हजार महिलांनी नाकारला लाभ

0

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ मध्ये अपात्र ठरणाऱ्या महिलांनी आता मिळालेले लाभाचे पैसे परत देण्यास सुरुवात केली असून पुणे जिल्ह्यातील महिला पैसे परत करण्यात आघाडीवर असून, त्याखालोखाल कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा क्रमांक आहे. या योजनेचा लाभ मिळालेल्या दोन कोटी ४७ लाख महिलांपैकी सुमारे पाच लाख महिला या विविध कारणांमुळे या योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरत आहेत. या अपात्र ठरलेल्या अनेक महिला आता पैसे परत करत आहेत. पुण्यातून जवळपास ७५ हजार महिलांनी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महिलांनी पैसे परत केलेले पैसे शासनाच्या तिजोरीत जमा करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून नवीन लेखाशीर्ष तयार करण्यात आले असून या महिलांनी सरकारी बँकेत जाऊन या लेखाशीर्षच्या खात्यामध्ये एका चलनाद्वारे पैसे परत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत, अशा महिला या योजनेतून अपात्र ठरत आहेत. या अपात्र ठरलेल्या अनेक महिलांनी स्वेच्छेने पैसे परत करण्यात सुरुवात केली आहे.

अपात्र बहिणी

वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या एक लाख १० हजार

‘नमो शक्ती’ चा लाभ घेणाऱ्या, चारचाकी वाहन तसेच स्वेच्छेने पैसे परत करणाऱ्या एक लाख ६० हजार

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या २ लाख ३० हजार

राज्य सरकारने २८ जून २०२४ व ३ जुलै २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात येत आहे. सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.

– आदिती तटकरे, महिला व बालविकासमंत्री