Home Blog Page 182

पालघर मुख्यध्यापकानंच दारूच्या नशेत 8 वाहनांना उडवलं; भीषण अपघात, वसईतील या शाळेचा मुख्याध्यापक

0

पालघर जिल्ह्यातल्या वसईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वसईत एका कार चालकानं दारूच्या नशेत भरधाव वेगात येऊन सात ते आठ वाहनांना उडवलं आहे. वसईच्या फादरवाडी सिग्नलवर आज 4 वाजता ही घटना घडली आहे, या अपघातामध्ये एक महिला जखमी झाली आहे, तर इतर वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार  कारचालक हा वसईमध्ये असलेल्या विद्याविकासनी शाळेचा मुख्याध्यापक असल्याचं  स्थानिक नागरिकांनी सांगितले असून, मारिया दासो असे दारूच्या नशेत अपघात करणाऱ्या या मुख्यध्यापकाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. टोयोटा कंपनीची कार हा मुख्याध्यापक चालवत होता, त्याने भरधाव वेगात येऊन सात ते आठ वाहनांना उडवलं. त्याच्या गाडीमध्ये बियरच्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत.

वसईच्या फादरवाडी सिग्नलवर या कार चालकाने प्रथम एका रिक्षाचालकाला उडविले, त्यानंतर एका वडापावच्या हातगाडीला उडविले, त्याठिकाणी वडापाव खात असलेल्या महिलेच्या अंगावर गरम तेल पडल्याने ती या घटनेत जखमी झाली आहे. हा कारचालक एवढ्यावरच थांबला नाही तर  त्यानंतर त्याने एकामागून एक आणखी काही वाहनांना धडक दिली.

त्यानंतर  घटनास्थळावरील अन्य काही  वाहनचालकांनी याबाबत वाहतूक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वेळीच येऊन या मुख्यध्यापकाला ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. त्याची गाडी देखील ताब्यात घेण्यात आली आहे. मुख्याध्यापक असूनही हा व्यक्ती दारूच्या नशेत गाडी चालवत होता. यामुळे परिसरातून संताप व्यक्त होत होत आहे. पोलिसांनी याविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

आठवडा उलटला, ‘छावा’ रेकॉर्डवर रेकॉर्ड मोडत निघालाय; आता 2025 मध्ये सर्वाधिक कमाईचा चित्रपट किताबही

0

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.विकी कौशलच्या अभिनयाचंही मोठं कौतुक होतंय. बॉक्स ऑफिसवर कमाई सुद्धा जोरात सुरूय. चित्रपटाचं कलेक्शन दिवसेंदिवस वाढत असतानाच, आता या चित्रपटाने एक नवा विक्रम केलाय. या चित्रपटानं 7 दिवसांत 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे, तर आता 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा किताबही छावाने पटकावलाय.

बॉक्स ऑफिस ट्रॅकर सकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, छावाने सातव्या दिवशी 22 कोटी रुपये कमावले आहेत. तर भारतातील चित्रपटाच्या कमाईचा आकडा 219.75 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर जगभरात या चित्रपटानं 270 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर चित्रपटाचं बजेट फक्त 130 कोटी रुपये आहे. जो आकडा पहिल्या काही दिवसातच ओलांडलं आहे.

‘छावा’च्या 6 दिवसांच्या कमाईवर नजर टाकल्यास, पहिल्या दिवशी 31 कोटींची ओपनिंग केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 37 कोटी रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी हा आकडा 48.5 कोटी रुपयांवर पोहोचला. चौथ्या दिवशी 24 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 25.25 कोटी रुपये कमावले. तर सहाव्या दिवशी हा आकडा 32 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

विकी कौशल व्यतिरिक्त, रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईच्या भूमिकेत, अक्षय खन्ना औरंगजेबच्या भूमिकेत, आशुतोष राणा सरसेनापती हंबीराव मोहितेच्या भूमिकेत, दिव्या दत्ता सोयराबाईच्या भूमिकेत आणि डायना पेंटी औरंगजेबची मुलगी झीनत-उन-निसा बेगमच्या भूमिकेत आहे.

MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांची अखेर नियुक्ती, शासन आदेशही जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली

0

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा (MPSC) परीक्षेतील गट-अ आणि गट-ब वर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यात गट-अ च्या 229 तर गट-ब च्या 269 नियुक्त्या असून अशा एकूण 498 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आल्या आहेत. शासन निर्णय आज जारी झाला असून मिळालेल्या सर्व उमेदवारांचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं आहे. एमपीएससी स्पर्धा परीक्षेतून या उमेदवारांची निवड झाली होती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव त्यांच्या नियुक्त्या अडकून पडल्य होत्या. अखेर, आज या 498 उमेदवारांच्या नियुक्तीचा आदेश पारीत झाल्याने वेटींगवर असलेल्या भावी अधिकाऱ्यांना पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच संबंधित निवड झालेले उमेदवार आपला पदभार स्वीकारतील, त्यामुळे पात्र निवड झालेल्या उमेदवारांना आनंद झाला आहे. एपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून क्लास 2 च्या पोस्टसाठी उमेदवारांच्या निवडी झाल्या आहेत. त्यामध्ये, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस उपअधीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त, सहाय्यक राज्यकर आयुक्त, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, बालविकास अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहाय्यक गट अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदींचा समावेश आहे. या पदांवर हे 498 उमेदवार लवकरच पदभार स्वीकारुन शासनाच्या सेवेत कार्यरत होतील.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 25 ऑक्टोबर 2024 च्या पत्रान्वये राज्यसेवा परीक्षा-2022 च्या अंतिम निकालानुसार गट-अ संवर्गात एकूण 244 उमेदवारांची शिफारस केली आहे. सदर 244 उमेदवार तसेच राज्यसेवा परीक्षा-2021 च्या निकालान्वये मुदतवाढ घेतलेला 1 उमेदवार अशा एकूण 245 उमेदवारांची कागदपत्र तपासणी दिनांक 9 डिसेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये यशदा, पुणे या प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित करण्यात आली होती.

सदर कागदपत्र तपासणीस 239 उमेदवार उपस्थित होते व 6 उमेदवार अनुपस्थित होते. कागदपत्र तपासणीस उपस्थित 239 उमेदवारांपैकी एका उमेदवाराने प्रशिक्षणास रुजू होण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे 238 उमेदवारांचे अहवाल तपासून देण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानुसार 238 उमेदवारांपैकी 229 उमेदवारांची चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय तपासणी, जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी, NCL प्रमाणपत्र पडताळणी, EWS, सत्यता पडताळणी, क्रिडा प्रमाणपत्र पडताळणी, अनाथ प्रमाणपत्र पडताळणी इ. बाबींचा अहवाल संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाला आहे. उर्वरित 9उमेदवारांचे अहवाल संबंधित यंत्रणांकडून अप्राप्त आहेत, असे शासकीय आदेशात म्हटलं आहे.

2 एप्रिल रोजी प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होणार

प्राप्त अहवाल विचारात घेऊन खालील 229 उमेदवारांना त्यांच्या नावासमोरील रकाना क्रमांक 4 येथे नमूद पदावर दिनांक 2 एप्रिल 2025 पासून एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) अंतर्गत सीपीटीपी-10 या तुकडीअंतर्गत दोन वर्षाच्या प्रशिक्षणासाठी या आदेशामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येत आहे.

2022 च्या निकालानुसार 269 उमेदवारांना नियुक्ती

महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा-2022 च्या अंतिम निकालानुसार गट-ब संवर्गात एकूण 370 उमेदवारांची शिफारस केली आहे. सदर 370 उमेदवार तसेच राज्यसेवा परीक्षा-2021 च्या निकालान्वये मुदतवाढ घेतलेले 10 उमेदवार तसेच शहीदांचे पाल्य 2 अशा एकूण 382 उमेदवारांची कागदपत्र तपासणी वनामती, नागपूर या प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित करण्यात आली होती. सदर कागदपत्र तपासणीस 332 उमेदवार उपस्थित होते व 50 उमेदवार अनुपस्थित होते. सदर उपस्थित 332 उमेदवारांचे अहवाल तपासून देण्यासाठी संबंधीत यंत्रणांकडे पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानुसार 332 उमेदवारांपैकी 269 उमेदवारांची चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय तपासणी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी, NCL प्रमाणपत्र पडताळणी, EWS, सत्यता पडताळणी, क्रिडा प्रमाणपत्र पडताळणी अनाथ प्रमाणपत्र पडताळणी इ. बाबींचा अहवाल संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाला आहे. उर्वरित 63 उमेदवारांचे अहवाल संबंधित यंत्रणांकडून अप्राप्त आहेत. प्राप्त अहवाल विचारात घेऊन खालील 269 उमेदवारांना त्यांच्या नावासमोरील रकाना क्रमांक 4 येथे नमूद पदावर 02 एप्रिल 2025 पासून एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) अंतर्गत सीपीटीपी-10 या तुकडीअंतर्गत दोन वर्षाच्या प्रशिक्षणासाठी या आदेशामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येत आहे. सदर परिविक्षाधीन अधिकारी यांनी दिनांक 02 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता वनामती प्रशिक्षण संस्था, नागपूर येथे प्रशिक्षणासाठी रुजू व्हावे, असे शासन आदेशात म्हटले आहे.

भारत-पाकिस्तान सामना अन् त्यात कर्णधारावर बंदीची टांगती तलवार; ICC कडून मोहम्मद रिझवानला हा इशारा! काय आहे प्रकरण?

0

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत-पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. पाकिस्तानसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यांना पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून मार खावा लागला आहे. त्यात आयसीसीने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे आणि भारताविरुद्धच्या सामन्यात चूक झाल्यास कर्णधार मोहम्मद रिझवानवर बंदीची कारवाई होऊ शकते.

पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने सहज पराभूत केले. ३२० धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ २६० धावांत तंबूत पाठवून न्यूझीलंडने ६० धावांनी विजय मिळवला. त्यात सामन्याच्या दुसऱ्याच षटकात सलामीवीर फखर झमान क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला. त्याने कशीबशी फलंदाजी केली, परंतु त्याला स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यात आयसीसीने पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंवर कारवाई केली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात निर्धारित वेळेत षटकं पूर्ण न केल्यामुळे आयसीसीने पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना दंड सुनावला आहे. त्यांना त्यांच्या मॅच फीमधील पाच टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. पंच रिचर्ड केटलबर्घ आणइ सरफुदौला यांच्यासह तिसरे पंच जोएल विल्सन व चौथे पंच अॅलेक्स वार्फ यांनी हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने चूक मान्य केली आहे.

आयसीसीच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठीच्या आचारसंहितेतील कलम 2.22 नुसार, किमान षटकगतीच्या उल्लंघनासंदर्भात, जर संघ ठरलेल्या वेळेत षटके पूर्ण करण्यात अपयशी ठरला, तर प्रत्येक षटकासाठी खेळाडूंवर त्यांच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड आकारला जातो.

१९९६ नंतर प्रथमच आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवणाऱ्या पाकिस्तानला ग्रुप ए च्या सलामी सामन्यात न्यूझीलंडने सहज पराभूत केले. रिझवान आणि त्याचा संघ आता रविवारी दुबईत भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

अण्णा पुन्हा सक्रीय या 2 मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ; राज्याचे, देशाचे समाजाचे नुकसान तोच विचार गरजेचा

0

समाजसेवक अण्णा हजारे वयाच्या ९० व्या दिवशी पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. अण्णा हजारे यांनी आरोप होणाऱ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी अण्णा हजार यांनी कोणाचे नाव घेतले नाही, परंतु त्यांचा रोख आरोप होणाऱ्या धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडे असल्याचे दिसून येत आहे.  मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे कृषीमंत्री असलेले शशिकांत सुतार, सिंचन खात्याचे मंत्री असलेले महादेव शिवणकर, बबनराव घोलप, शोभा फडणवीस यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

राज्य सरकारमध्ये असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एक ना अनेक आरोप होत आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच माणिकराव कोकाटे यांना देखील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, राज्यातील मंत्र्यांवर बोलताना अण्णा हजारे यांनी नाव न घेता माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेवर एक प्रकारे प्रहार केल्याचे पाहायला मिळाले.

काय म्हणाले अण्णा हजारे

माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे यांनी म्हटले की, मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून पहिले त्यांनी सर्वात प्रथम राजीनामा दिला पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्तीची प्रतिमा चांगली होते. कारण जनता हे आपल्याला बघून अनुकरण करत असते. आरोप असणाऱ्या लोकांना मंत्रीमंडळात घेण्याआधी विचार करणे गरजेचे आहे. मंत्रिमंडळात घेताना कोणाला घेवू नये, हे सुद्धा ठरवले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

अण्णा हजारे मंत्र्यांना उद्देशून म्हणाले, तुम्हीच जर वाट सोडून चालला तर जनता कुठे जाणार? देश कुठे जाणार आहे. मंत्रिमंडळात असताना आरोप झाल्यावर एक क्षणसुद्धा पदावर राहू नये. लगेच राजीनामा दिला पाहिजे. आरोप होताच मंत्र्यांनी प्रथम राजीनामा देवून बाहेर पडले पाहिजे. माझे वय ९० वर्ष झाले आहे. या ९० वर्षांचा वयात एकसुद्धा डाग नाही. तसेच जीवन मंत्रिमंडळातील लोकांनी जगले पाहिजे. त्यामुळे राज्याचे आणि देशाचे नुकसान होते. सार्वजनिक जीवनात असणाऱ्या लोकांना त्यांचे नेहमी आचार विचार शुद्ध ठेवले पाहिजे. सुरवातीला हे चुकत आणि नंतर अशा घटना घडतात. त्यामुळे राज्याचे, देशाचे आणि समाजाचे नुकसान होते, त्याचा विचार करणे गरजेच असल्याची प्रतिकिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.

ही बाब राज्य सरकारची नाचक्कीच धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार? आता मनोज जरांगेंची मोठी मागणी

0

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.तसेच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधत मोठी मागणी केली आहे. गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली, ही बाब राज्य सरकारची नाचक्की करणारी आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली, ही बाब राज्य सरकारची नाचक्की करणारी आहे. एखादी मागणी सांगितली की ते म्हणतात चौकशी करू, त्यांना सत्तेसाठी काही गोष्टी लागल्या तर त्यांची स्पष्ट भूमिका असते, तू आमच्यासोबत येत नाही तर तुला आम्ही जेलमध्ये टाकू अशी यांची भूमिका असते. त्याला वेठीस धरून सरकारच्या बाजुनं घेतलं जातं असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे .

पुढे बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणात कमीत कमी 200 नावं समोर येतील. गेवराईला आरोपीला रगा पुरवण्यात आल्या. चार्ज सीटमध्ये 100 टक्के छेडछाड होण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणेला शंभर टक्के मुभा देण्यात आली नाही. तपास यंत्रणेला मुभा दिली असती तर अर्ध जेल भरलं असतं. धनंजय मुंडे हे देखील याच्यातच आहेत. हे सर्व त्यांचेच लोक आहेत. मग त्यांना का सहआरोपी करण्यात येत नाही, मंत्री आहेत म्हणून का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

आमचे साखळी उपोषण करणारे आरोपी होतात. जे कॅमेऱ्यामध्ये दिसले ते सहआरोपी होतात. मार आम्ही खाल्ला, डोकं आमचं फुटलं, या प्रकरणात जे पोलीस निलंबित व्हायला पाहिजे होते, त्यांना उलट बढती मिळाली असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. खंडणीतून खून झाला, खून करणाऱ्या पेक्षा खंडणी मागणाऱ्या पेक्षा, सामूहिक कट करणारा मोठा असतो. असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

छावा चित्रपट शिर्के कुटुंबीय आक्रमक, दिग्दर्शकाला राज्यात फिरु न देण्याचा इशारा

0

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयु्ष्यावर आधारित छावा हा सिनेमा सध्या देशभर तुफान गाजतोय. या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण, त्याचवेळी या चित्रपटाला वादाचं ग्रहण लागलं आहे. या चित्रपटातील प्रसंगावर शिर्के कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे.

पुण्यात शिर्केंच्या वंशजांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रकाशकांना पुरावे दाखवण्याची नोटीस बजावली आहे. चित्रपट दाखवायच्या आधी यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. याबाबत आमचं मत विचारायला हवं होतं. पण, त्यांनी आमचा सल्ला घेतला नाही. दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर द्यावं अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरु देणार नाही, असा इशारा दीपक शिर्के यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर या विषयावर राज्यभर आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.

या चित्रपटात इतिहास जाणीवपूर्वक बदलला आहे. आमच्या घराण्याला बदनाम केलं जात आहे. षडयंत्र करत आमची बदनामी केली जातीय. आमच्या राजे शिर्के घराण्याला टार्गेट करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला.

राजे शिर्के घराण्याचं खूप मोठं योगदान आहे.आम्ही गद्दारी केली असे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यानंतरही हे आरोप कसे केले जात आहेत? इतिहास गायब केला जात आहे. आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही, मात्र खलनायक चुकीचा दाखवला आहे. समाजात तेढ निर्माण केली जात आहे. गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा ठावठिकाणा सांगितला नाही, असा दावा त्यांनी केला. छावा चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवलाय, असा आरोप शिर्के यांनी या पत्रकार परिषदेत केला.

लाडक्या बहिणींस ‘छावा’ चित्रपटाची मोफत भेट! दादांच्या या खास आमदाराचा पुढाकार कधी अन् कुठे? जाणून घ्या…

0

अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य सुंदरी रश्मिका मंदानाच्या मुख्य भूमिका असलेला छावा चित्रपट सध्या सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. स्वराज्यरक्षक संभाजीराजेंचा संघर्ष अन् पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या छावा चित्रपटाला देशभरात मोठा प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. छावा चित्रपटाच्या हाऊसफूल शोमुळे तिकीट मिळवणे अवघड झाले आहे. त्यामुळे अनेकांना इच्छा असतानाही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा सिनेमा पाहता आला नाही. अशातच महिलांना आता हा चित्रपट मोफत पाहता येणार आहे. अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी छावा चित्रपटाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अहिल्यानगरमधील प्रत्येक भगिनीला छावा चित्रपट मोफत पाहता यावा यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी या चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन केले आहे. 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास पाहण्यासाठी छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. धर्मरक्षक संभाजी राजेंचा हा चित्रपट महिलांना मोफत पाहता यावा. यासाठी खास शोचे आयोजन केले आहे. त्यासाठी आम्ही एक नंबर जाहीर करणार आहोत ,असे म्हणत संग्राम जगताप यांनी इंस्टाग्राम पेजवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

कधी आणि कुठे पाहाल मोफत छावा चित्रपट?

हे शोज आजपासून म्हणजेच दि. 17 फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार पर्यंत कॉनप्लेक्स थिएटर, कोहिनूर मॉल येथे ( दुपारी 4.30 वाजता) आणि सिनेलाइफ थिएटर, नगर कॉलेज जवळ, जुडीओच्या वरती अहिल्यानगर येथे ( दुपारी 3.30 वाजता) असणार आहेत. या कार्यक्रमाचे मोफत तिकीट मिळवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा.. ( (हॉटेल राजयोग शेजारी, स्टेशन रोड, अहिल्यानगर) असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासातुन महिला भगिनींना प्रेरणा मिळावी यासाठी आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी अहिल्यानगर मधील महिलांसाठी बहुचर्चित ‘छावा’ चित्रपटाचे मोफत शोज आयोजित केले आहेत, तरी सर्व महिला भगिनींनी छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नक्की अनुभवावा, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.

‘वाजपेयी सरकार अवघ्या एका मतानं मीच पाडलं’, त्यामुळे पुन्हा लोकसभेेची निवडणुक झाली: पवारांचा मोठा गौप्यस्फोट

0

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. 1999 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकार संसदेतील विश्वासदर्शक ठरावात पराभूत झाले होते. अवघ्या एका मतानं वाजपेयी सरकारला राजीनामा द्यावा लागला होता. ते सरकार मी पाडल्याचा गौप्यस्फोट पवार यांनी केला आहे. दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी 26 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा गौप्यस्फोट केला.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला निलेशकुमार कुलकर्णी यांच्या ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये झाले. शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

शरद पवारांनी जुन्या संसद भवनाच्या आठवणी सांगताना 1999 साली घडलेल्या घटनेचा गौप्यस्फोट केला. त्यावेळी तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारवर लोकसभेत अविश्वासदर्शक ठाराव दाखल करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवार हे काँग्रेसमध्ये होते. त्याचबरोबर लोकसभेत विरोधी पक्षनेते होते.

शरद पवार यावेळी म्हणाले की, ‘मी त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो, हे अनेकांना आठवणार नाही. आम्ही वाजपेयी सरकाच्या विरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावावर मोठी चर्चा झाली. अविश्वासदर्शक ठरावच्या मतदानापूर्वी आठ ते दहा मिनिटं ब्रेक होता. मी त्यावेळी संसदेच्या बाहेर ‘चर्चेसाठी’ गेलो.

आम्ही परत आल्यानंतर मतदान झाले. त्यावेळी सत्ताधारी पक्षाच्या एका खासदारानं विरोधकांच्या बाजूनं मतदानं केलं. वाजपेयी सरकार फक्त एका मतानं पडले. आम्ही हे कसं केलं हे सांगणार नाही, असं पवार यावेळी म्हणाले.

17 एप्रिल 1999 रोजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या विरोधातील अविश्वास ठरावावर लोकसभेत मतदान झाले. त्या मतदानात वाजपेयी सरकारच्या बाजूनं 269 तर विरोधात 270 मतं पडली होती. त्यामुळे अवघ्या एका मतानं वाजपेयी सरकार पडलं. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर विरोधी पक्षाला सरकार जुळवण्यासाठी आवश्यक खासदारांची संख्या जुळवता आलेली नाही. त्यामुळे 1999 साली पुन्हा एकदा लोकसभेेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या.

राष्ट्रवादी शप’ निर्णायक वळणावर? अनेक संधीच्या शोधात; तर ज्यांच्याकडून लढाईच्या अपेक्षा, त्यांच्याही ‘तलवारी म्यान’च

0

फुटीनंतर लगेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या अनुकूल भावनिक वातावरण झाले. अन् त्याचा फायदा झाला. मात्र, हे वातावरण कायम राहात नाही, हे त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी दिसले.या पराभवातून शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस सावरलेला नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी’ निर्णायक वळणावर असल्याचे चित्र आहे.

शरद पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय वाटचालीत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. काँग्रेस, रेड्डी काँग्रेस, बंडखोरी आणि समाजवादी काँग्रेस, पुलोद स्थापना, पुन्हा काँग्रेस आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना असा त्यांनी दीर्घ राजकीय प्रवास केला आहे. राज्यासह देशाच्या राजकारणातील एक दिग्गज नेते अशी त्यांची ओळख आहे. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभा निकालाने राज्यातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे.

राजकीय कोंडी

महायुती प्रचंड बहुमत मिळवून सत्तेत आली आहे. महायुतीचे संपूर्ण लक्ष आता मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर केंद्रित झाले आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप सरसावला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ते या निवडणुकीत धोबीपछाड देण्याच्या तयारीला लागले आहेत. मनसेला सोबत घेण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न हा त्याच रणनीतीचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिंदे सेना तर ठाकरे गटाला आणखी कसे खिंडार पाडता येईल, यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचा ‘राष्ट्रवादी’ शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ला कवेत घेण्यासाठी केव्हाच सरसावला आहे. सत्तेच्या जोरावर पक्ष अधिक मजबूत करण्याची रणनीती सर्वच सत्ताधारी पक्ष आखताना दिसत आहेत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन् उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मोठीच कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

परिस्थितीत बदल

शरद पवार यांचा सर्वात मोठा करिष्मा आणि राजकीय धाक १९८५ मधील विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला होता. १९८० मध्ये पवार यांच्या पक्षाचे ६० आमदार निवडून आले. मात्र, त्यावेळी पवार हे १५ दिवसांसाठी परदेशी काय गेले आणि इकडे पक्षच रिकामा झाला. एक-दोन नव्हे तर तब्बल ५४ आमदारांनी त्यांची साथ सोडली. केवळ ६ आमदारच राहिल्याने त्यांना आपले विरोधी पक्षनेते पदही गमवावे लागले होते. मात्र, हार मानतील ते पवार कसले.

पुन्हा झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ६ आमदारांवरून ५४ आमदार निवडून आणले. त्यांना सोडून गेलेल्या ५२ आमदारांना पराभूत करून घरात बसवले. तेव्हापासून शरद पवार यांच्या राजकीय वाट्याला जाण्याचा फारसा कोणी प्रयत्न केला नाही. कोणीही त्यांना दुखवून, डावलून भूमिका घेतली तर राजकीय पानिपत कसे होते, ते अनेकांनी याची देही, याची डोळा अनुभवले आहे. मात्र, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.

अजित पवार यांच्यासोबत आणि शरद पवार यांना सोडून गेलेल्या आमदारांना असाच धडा शिकवला जाईल, अशी चर्चा विधानसभा निवडणुकीत झाली. मात्र, राज्यातील मतदारांनी ही चर्चा फोल ठरवली. अजित पवार यांच्यासोबत गेलेले बहुतांश आमदार पुन्हा निवडून आले. अनेकांनी मंत्रिपद देण्यात आले. पवार यांनी ठरवून ज्यांना विरोध केला, ते तर सर्वजण चांगल्या मताधिक्याने विधानसभेत पोहोचले आहेत.

पवारांना साथ मिळेल का?

निवडणुकीची रणनीती, लोकांच्या अपेक्षा, नवमतदार, राष्ट्रीय राजकारण बदलत चालले आहे. सत्ताधारी विरोधकांना वाव देण्यास अजिबात तयार नाहीत. प्रस्थापित सत्तेच्या विरोधात लढण्याची घोषणा जरी शरद पवार जरी करत असतील तरी, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची किंवा कार्यकर्त्यांची तशी मानसिकता आहे का, याचाही विचार करणे आवश्यक आहे. मुळात पवार यांच्या पक्षावर ‘साखर कारखानदार, उद्योजक आणि मोठ्या शेतकऱ्यांचा पक्ष’ असा आरोप अन्‌ टीका होते. मात्र यातील बहुतांश नेत्यांना सत्तेशिवाय राहणे केवळ अशक्य आहे. त्यामुळेच अर्ध्यापेक्षा अधिक नेत्यांनी अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर उर्वरित अनेक जण मुहूर्ताची वाट पाहत आहेत.

यातच शरद पवार यांना वयोमानानुसार असणाऱ्या मर्यादा आता स्पष्ट होऊ लागल्या आहेत. त्याचाही विचार होणे आवश्यक आहे. पूर्वीसारखे दौरे करणे, सभा – बैठका घेणे त्यांना खरेच शक्य आहे का, याचाही विचार करणे आवश्यक आहे. मुळात ज्यांच्यासाठी त्यांची ही धडपड सुरू आहे, त्यांना या सर्व गोष्टी कितपत मान्य आहेत हाही एक प्रश्नच आहे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास, राष्ट्रवादी एका निर्णायक वळणावर येऊन ठेपल्याचेच स्पष्ट होत आहे हे मात्र निश्चित.

अनेक योग्य संधीच्या शोधात…

राष्ट्रवादीतील बहुतांश मोठ्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. जे नेते सध्या पक्षात आहेत, त्यातील अपवाद वगळता अन्य सर्वजण योग्य संधीच्या शोधात आहेत. अभ्यासू आणि पक्षासाठी आश्वासक असणारे अनिल देशमुख, राजेश टोपे या दोन नेत्यांना निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागले आहे. निवडणुकीच्या तोंडावर ‘राष्ट्रवादी’त आलेले बहुतांश पुन्हा स्वगृही जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांची उपयुक्तता पाहून प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाईल. नव्याने पक्षात येण्यास कोणी तयार नाही. तर जिल्हा-जिल्ह्यात जे शिल्लक आहेत, ते स्वबळावर कितपत निवडणूक लढू शकतील, हा देखील प्रश्न आहे.

आव्हाड एकाकी शिलेदार

पक्षात जो काही बुलंद आवाज आहे तो फक्त आमदार जितेंद्र आव्हाड यांचाच. सतत भूमिका, मुद्दे घेऊन ते सरकारच्या विरोधात उभे ठाकले आहेत. एकाकी किल्ला लढवण्याचे काम ते पक्षासाठी करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांना हवी तशी साथ मिळत नसतानाही ते लढत आहेत. तर ज्यांच्याकडून लढण्याच्या अपेक्षा आहेत, त्यांनी केव्हाच ‘तलवारी म्यान’ केल्या आहेत.