Home Blog Page 181

‘मला हलक्यात घेऊ नका, शिंदेंचा एक्झिट प्लॅन ॲक्टीव्ह? शाहांच्या पुणे दौऱ्यादरम्यान मोठी राजकीय घडामोड

0

मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री पदावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यात दरी निर्माण झाल्याचं बोललं जातंय. यातूनच अलीकडे पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या काही बैठकींना शिंदे गैरहजर राहिले होते. तसेच त्यांनी ‘मला हलक्यात घेऊ नका, मी काय करू शकतो, हे 2022 मध्ये दिसलं’ असं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे.

शिंदेंचं हे वक्तव्य महाविकास आघाडीसाठी असल्याचं सांगितलं जात असलं तरी हा महायुतीलाच इशारा असल्याचं बोललं जातंय. एकीकडे शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा सुरू असताना आता शिंदेंनी महायुतीतून बाहेर पडण्याचा एक्झिट प्लॅन ॲक्टीव्ह केल्याचं बोललं जातंय. याचं कारण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहे. शुक्रवारी उशिरा ते पुण्यात दाखल झाले आहेत. ते पुण्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

अमित शाह यांच्या सर्व कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहेत. मात्र, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शाहांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाहीत. पुण्यातील अमित शहांच्या कार्यक्रमांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवल्याने एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा एक्झिट प्लॅन अॅक्टीव्ह केल्याची चर्चा आहे.

पुण्यामध्ये आज केंद्रीय गृह विभागाची पश्‍चिम विभागीय बैठक पार पडणार आहे. या महत्त्वाच्या बैठकीसाठी शाह पुणे दौऱ्यावर आले आहेत. आजच्या गृह विभागाच्या बैठकीला महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली, दमण दीव येथील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. देशाच्या पश्चिम विभागातील तीन मुख्य राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशातील सर्व ग्रह खात्याचे महत्त्वाचे अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. इतक्या महत्त्वाच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहणार नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

असा असेल अमित शाहांचा दौरा

अमित शाह सकाळी आकरा वाजता कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल वेस्टीनमध्ये पश्चिम विभागीय परीषदच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही सुरक्षा विषयक बैठक असणार आहे. दुपारी तीन वाजता ते जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. हा कार्यक्रम हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात कार्यक्रम होणार आहे. यानंतर पाच वाजता अमित शाह बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रिडा संकुलात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण आणि निधीचे वितरण करणार आहेत.

आत्ता वकिलांवरही सरकारी पाळत? देशभर वकील संपावर जाणार देशभरातील वकील प्रस्तावित अॅडव्होकेट कायद्यातील बदलांच्या विरोधात

0

केंद्र सरकार 1961 च्या वकिल कायद्यात बदल करण्यासाठी एक दुरुस्ती विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. या विधेयकाचा अंतिम मसुदा लोकांच्या सूचनांसाठी समोर आल्यावर देशभरातील वकील या विधेयकाच्या विरोधात उभे ठाकले आहेत.या विधेयकाला विरोध दिल्लीपासून सुरू झाला असून तो देशातील 14 राज्यांमध्ये पसरला आहे. हे विधेयक मागे घेण्याची मागणी बार कौन्सिल ऑफ इंडियाने (बीसीआय) केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्र सरकारने विधेयक मागे न घेतल्यास देशभरात वकील संपावर जाणार आहेत.

निषेधाची 5 कारणे : संपावर बंदी, एक मत धोरण

संप-बहिष्कारावर बंदी

नवीन विधेयकातील कलम 35A वकील किंवा वकिलांच्या संघटनेला न्यायालयावर बहिष्कार घालण्यास, संपावर जाण्यास किंवा कामकाज स्थगित करण्यास प्रतिबंधित करते. याचे उल्लंघन कायदेशीर व्यवसायातील गैरवर्तन मानले जाईल आणि शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.

सध्याची व्यवस्था: संपावर बंदी नाही, ती व्यावसायिक गैरवर्तणूक मानली जाते.

व्यावसायिक गैरवर्तन

व्यावसायिक गैरवर्तणुकीमुळे एखाद्याचे नुकसान झाल्यास, बिलाच्या कलम 45B अंतर्गत, व्यावसायिक गैरवर्तणुकीमुळे वकिलाविरुद्ध कारवाईसाठी बीसीआयकडे तक्रार केली जाऊ शकते.

सध्याची परिस्थिती: तुमच्या क्लायंटची फसवणूक करणे हे व्यावसायिक गैरवर्तन मानले जाते. याबाबत बीसीआयकडे तक्रार केली आहे.

कायदेतज्ज्ञाची व्याख्या

नवीन विधेयक कायदेशीर व्यवसायी (कलम 2) ची व्याख्या अधिक व्यापक करेल. यामध्ये, कोर्टात कायद्याची प्रॅक्टिस करण्याबरोबरच, कॉर्पोरेट वकील, इन-हाउस सल्लागार, वैधानिक संस्था आणि परदेशी कायदा संस्थांमध्ये कायदेशीर कामात गुंतलेले लोक देखील कायदेशीर व्यवसायी म्हणून गणले जातील.

सध्याची व्यवस्था- न्यायालयात कायद्याची प्रॅक्टिस करणाऱ्यांनाच कायदेशीर व्यावसायिक मानले जाते.

वकिलांवर सरकारी पाळत

अधिवक्ता कायदा 1961 च्या कलम 4 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे बीसीआयमध्ये निवडून आलेल्या सदस्यांसह 3 सदस्यांना नामनिर्देशित करण्याचा अधिकार केंद्राला मिळणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार बीसीआयला कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देऊ शकेल.

सद्यस्थिती- BCI चे सदस्य राज्य बार कौन्सिलद्वारे निवडले जातात.

 एक-वेळ-एक-मत धोरण

विधेयकात नवीन कलम 33A समाविष्ट करण्यात आले आहे. यानुसार, न्यायालये, न्यायाधिकरण आणि इतर प्राधिकरणांमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या सर्व वकिलांना ते ज्या बार असोसिएशनमध्ये कायद्याची प्रॅक्टिस करतात तेथे नोंदणी करावी लागेल.

वकिलाने शहर बदलल्यास त्याला 30 दिवसांच्या आत बार असोसिएशनला कळवावे लागेल. कोणताही वकील एकापेक्षा जास्त बार असोसिएशनचा सदस्य होऊ शकत नाही. एका वकिलाला असोसिएशनमध्ये फक्त एकदाच मतदान करण्याची परवानगी असेल. वकील हे त्यांच्या स्वातंत्र्य आणि मतदानाच्या अधिकारात केंद्राचा हस्तक्षेप मानत आहेत.

सद्यस्थिती: अधिवक्ता अनेक वेळा असोसिएशनचे सदस्य होऊ शकतात. निवडणुकीत प्रत्येकजण मतदान करू शकतो.

सुरेश धसांची धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघात एंट्री अन् पोरांनी ताफा अडवला, अन् थेट दगडं उचलली

0

भाजपचे आमदार सुरेश धस हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात पोहोचले आहे. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांच्याच मतदारसंघात धस यांनी एंट्री केल्यामुळे मुंडे समर्थकांनी कडाडून विरोध केला. काही ठिकाणी धस यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाला. पण पोलिसांनी वेळीच अडवला.

आमदार सुरेश धस हे महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी परळीमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेतली. त्यानंतर शिरसाळा इथं पोहोचले असता पुन्हा एकदा सुरेश धस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. आंदोलकांनी सुरेश धस यांचा ताफा अडवून जोरदार विरोध केला.

सुरेश धस यांच्या विरोधात ताफ्यासमोरच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलक आणि धस समर्थक आमने सामने आले होते. परळीत विरोध झाल्यानंतर मुंडेंच्या मतदारसंघात आंदोलक आक्रमक झाले होते. सुरेश धस यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाला होता मात्र पोलिसांनी वेळीच पकडल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, आज सकाळी सुद्धा सुरेश धस यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या मुंडे समर्थक आणि कराड समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरेश धस परळीची बदनामी करत असल्याचा आरोप मुंडे समर्थकांनी केला होता. सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करण्यात आली होती. घोषणाबाजीनंतर काही काळ परळीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घोषणाबाजी करणाऱ्या मुंडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

गुंतवणूकदारांच्या पाच हजार कोटींच्या अर्थकारणासाठी परळी दौरा

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधल्या सोळा लाख ठेवीदारांचा आणि पाच हजार कोटी रुपयांचा प्रश्न आहे. त्यातील दीड लाखापेक्षा जास्त ठेवीदार बीड जिल्ह्यातील आहे. तीनशे कोटींपैकी 250 कोटी परळी शहरातील आहेत. तसेच कर्ज वाटपसुद्धा परळी तालुक्यातील आहे. कोटीचे कर्ज उचलणारेच फडके (झेंडे) दाखवायला आले असतील. जवळपास वीस हजार लोकांचे पैसे अडकले आहेत, असे सुरेश धस यांनी सांगितले.

सुरेश धस-धनंजय मुंडे यांच्या भेटीमागचे राजकारण

मागील आठवड्यात सुरेश धस यांनी गुप्तपणे धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दोन महिने आरोप केल्यानंतर सुरेश धस धनंजय मुंडे यांना बंद दरवाजाआड भेटूच कसे शकतात, असा प्रश्न विचारात अनेकांनी त्यांच्या विश्वार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर मात्र बावनकुळे यांच्या घरी आम्ही भेटलो तसेच ते आजारी असल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली, असे सुरेश धस यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांची मोठी खेळी भाजपच्या गडाला सुरुंग लावणारा शिलेदाराच्या गळ्यात भगवा प्रवेश तयारी पूर्ण?

0

कसबा जिंकण्यासाठी जंग जंग पछाडूनही केवळ वैयक्तिक करिश्म्यातून भाजपला अपयशाची धूळ चाखायला लावणारे काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांच्याकडून धंगेकर यांना पराभूत व्हावे लागले. विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून योग्य मदत मिळाली नसल्यानेच पराभव झाल्याची भावना त्यांच्या मनात आहे. याच भावनेतून पक्षबदलाचा विचार त्यांच्या मनात घोळत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाकडून राज्यात जोरदार पद्धतीने ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. मागील दोन दिवसांपूर्वीच पुण्यात ‘मिशन टायगर’ जोरदार पद्धतीने होणार, असे वक्तव्य शिवसेना नेते, मंत्री उदय सामंत यांनी केल्याने धंगेकर यांच्या सेना प्रवेशाची चर्चा होत आहे.

रवींद्र धंगेकर शिंदे गटाच्या वाटेवर? स्टेटसमधून संकेत दिले

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी स्वत:चा एक फोटो स्टेटसला ठेवला आहे. ज्यात त्यांनी गळ्यात भगवा पंच्या टाकलेल्या फोटोला प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचे तेरे क़दमों के तले मिट्टी हे गीत फोटोला लावले आहे.

रवींद्र धंगेकर शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असून काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्यात धंगेकर भेट घेतात का? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मिशन टायगरमध्ये रवींद्र धंगेकरांचाही नंबर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसचे झुंजार नेते शिंदे गटाचं धनुष्यबाण हाती घेणार?

विधानसभा निवडणुकीत पराजय झाल्यापासून रवींद्र धंगेकर पक्षावर काहीसे नाराज आहेत. ३० डिसेंबर रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने ते शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे झुंजार नेते. मनसेमधून काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी पुण्यातील कसबा मतदारसंघ बांधला. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर निवडणूक लागलेल्या कसब्यात त्यांनी भाजपला अस्मान दाखवून विधानसभेत पाऊल ठेवले. केवळ दीड वर्षे काम करायला मिळाल्यानंतर ते पुन्हा २०२४ च्या विधानसभेला सामोरे गेले. परंतु यंदा विजयाची पुनरावृत्ती झाली नाही. भाजपच्या हेमंत रासने यांनी बाजी मारून धंगेकर यांना पराभूत केले आणि मागील पराजयाचा बदलाही घेतला. विधानसभेतील पराजयापासून धंगेकर पक्षात काहीसे नाराज असल्याची चर्चा आहे.

राजकारणात पुन्हा खळबळ आदित्य ठाकरेंना कोणत्याही क्षणी अटक?, उद्धव ठाकरेंच्या या माजी नेत्याचा ठोस दावा

0

आदित्य ठाकरे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा दावा किशोर तिवारी यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी यांची जेव्हा इच्छा होईल, तेव्हा कोणत्याही क्षणी आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन प्रकरणात अटक होऊ शकते, असा दावा तिवारी यांनी केला आहे. किशोर तिवारी हे याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनामध्ये होते. काही दिवसांपूर्वी किशोर तिवारी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा दावा तिवारी यांनी केला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन यांनी आत्महत्या केली होती. दिशा सालियन प्रकरणासंदर्भात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. दिशा सालियन यांनी आत्महत्या केली नाही, त्यांचा जीव घेतला गेला. यामध्ये आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा दावा राणे यांनी केला होता. आता किशोर तिवारी यांनी याप्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा इच्छा होईल, तेव्हा आदित्य ठाकरे यांना अटक होईल, असे किशोर तिवारी म्हणाले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर किशोर तिवारी यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर गंभीर टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीला काही नेते जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला होता. संजय राउत, विनायक राउत, अरविंद सावंत आणि मिलिंद नार्वेकर यांनी मातोश्री आणि शिवसेना भवनावर कब्जा केल्याचा दावा केला होता. त्यानंतर तिवारी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

पुण्यातील पर्यटकांबाबत मोठी दुर्घटना, अतिआत्मविश्वास दाखवला तारकर्ली समुद्रात 5 जण बुडाले दोघांचा मृत्यू

0

मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले पुणे येथील पाच पर्यटक बुडाले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. 3 जण बचावले आहे, त्यांची प्रकृती गंभीर आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील शुभम सोनवणे आणि रोहित कोळी यांचा मृत्यू झाला. वीकेंडच्या निमित्ताने कोकणात पुन्हा एकदा पर्यटकांनी गर्दी केली आहे. पर्यटकांचा सर्वाधिक कल हा तारकर्ली देवबाग या भागात पाहायला मिळतो. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सुद्धा पर्यटन मोठी गर्दी होत आहे. याच ठिकाणी पुणे येथील पर्यटक आले होते. ते आंघोळीसाठी समुद्रात जात होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना खबरदारी घेत जाण्याचा सल्ला दिला. परंतु अतिआत्मविश्वास दाखवत हे पर्यटक खोल समुद्रात गेले. त्यात पोहत असलेल्या युवकांपैकी ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक पाण्यात ओढले गेले. त्यानंतर स्थानिक लोकांनी बचावासाठी धाव घेतली. परंतु समुद्राच्या लाटांमध्ये बुडाल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

या दोघांचा मृत्यू

रोहित बाळासाहेब कोळी (वय २१), शुभम सुनील सोनवणे (वय २२) या दोघांचा पाण्यात बुडाल्यामुळे मृत्यू झाला आहे. हवेली तालुक्यातील कुश संतोष गदरे (वय २१), रोहन रामदास डोंबाळे (वय २०), ओंकार अशोक भोसले (वय २४) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

समुद्र किनारी जाताना काळजी घेण्याची गरज

पुण्यातील पर्यटकांना पोहता येत होते. त्यानंतर ते पाण्यात बुडाले. पाण्याची खाली आणि वेग नवीन लोकांना माहीत नसतो. यामुळे पाण्याजवळ जाताना नेहमी काळजी घेतली पाहिजे. स्थानिक लोकांनी दिलेले सल्ले ऐकून घेतले पाहिजे. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. पर्यटनाचा आनंद क्षणात नाहीसा होतो.

धाराशिव 2 वेळा टप्प्यात पण इंजेक्शनच चुकलं, शिंदेंच ‘टायगर’ ऑपरेशन फेल: 12 मंत्र्यांवर आहे जबबादारी कबुली

0

मुंबई :  एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या गोटातले नेते गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या मिशनला ऑपरेशन टायगर असे नाव दिलं गेलंय . राजन साळवींच्या प्रवेशानंतर ऑपरेशन टायगरला वेग आल्याचीही चर्चा आहे. पण धाराशिवमध्ये या ऑपरेशन टायगरचं टायमिंग काहीसं चुकल्याच बोललं जातंय. धाराशिवमध्ये तावडीतला वाघ कसा निसटला याची कहाणी स्वतः मंत्रीमहोदय प्रताप सरनाईकांनी सांगितली आहे.

राज्याच्या राजकारणात गेले कही दिवस ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार आपल्या गोटात वळवण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदेंनी सुरु केल्याचं कळतंय. राजन साळवींच्या प्रवेशानं ऑपरेशन टायगरची पहिली झलकही पहायला मिळाली. आता ऑपरेशन टायगरबद्दल बोलताना परीवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी एक मोठा खुलासा केलाय. राज्यातल्या शिवसेनेच्या 12 मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची जबबादारी असल्याचं सरनाईकांनी कबुल केलंय. इतकंच नाही तर तर धाराशिवमधलं ऑपरेशन टायगर अगदी थोडक्यासाठी कसं हुकलं याचीही बिहाईंड द सीन स्टोरीच प्रताप सरनाईकांनी सांगितली.

ऑपरेशन टायगर होणार यशस्वी?

महायुतीचं स्थिर सरकार राज्यात अस्तित्वात असलं तरी तिन्ही पक्ष आपल्या पक्षवाढीसाठी प्रयत्नशील आहे. शिंदेंची सेनाही त्याला अपवाद नाही. संख्याबळ वाढवून राज्यात आणि केंद्रात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न ऑपरेशन टायगरमधून होत असल्याची चर्चा आहे. आता आगामी काळात ऑपरेशन टायगरला मिळणारं यशच ठाकरे आणि शिंदे दोघांच्याही पक्षांची पुढची दिशा स्पष्ट करेल

पुणे काँग्रेस मोठी राजकीय उलथापालथ शक्य, अनेक वर्षे झटूनही संधी मिळत नसल्याची कार्यकर्त्यांची भावना

0

पुणे : राजकारणात करिअर घडवण्यासाठी कार्यकर्ता आपला संपूर्ण वेळ आणि मेहनत झोकून देतो. मात्र, काही नेते कार्यकर्त्यांना मोठं होण्याची संधी देत नाहीत. याच कारणामुळे पुण्यातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील आणि त्यांच्या सोबत काही अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप प्रवेशाची ठोस तारीख निश्चित झालेली नसली, तरी चर्चासत्रे आणि भेटीगाठींचे अंतिम टप्पे पार पडले आहेत.

रोहन सुरवसे पाटील हे काँग्रेसचे आक्रमक युवा नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला आहे. खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाला समर्थन देत त्यांनी सारसबाग येथील सावरकर पुतळ्याजवळ “माफीवीर” असा बॅनर लावला होता. यानंतर त्यांना पोलीस कोठडीला सामोरे जावे लागले आणि 50 हजारांच्या जामिनावर मुक्तता मिळाली. त्यानंतरही त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय राहून पक्षसंघटनासाठी काम केले.

काँग्रेसला मोठा धक्का बसणार?

अनेक वर्षे पक्षासाठी झटूनही संधी मिळत नसल्याची भावना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. याशिवाय, शहरातील वरिष्ठ नेते संघटन कार्यात मदत करत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेसमध्ये जुन्याच पदाधिकाऱ्यांना संधी दिली जात आहे. या सर्व कारणांमुळे रोहन सुरवसे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक पार पडली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला आणखी काही पदाधिकाऱ्यांच्या विभक्त होण्याला सामोरे जावे लागू शकते.

वाल्मिकची जेलमध्येही मजाच?; एक माणूस जातोय रोज भेटायला, मॅटर गुंडाळलं? चार्जशीटमध्ये छेडछाडची भिती

0

जालना : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा संशय देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे. आरोपींना जेलमध्येही कोणीतरी जाऊन भेटत आहे, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. तसंच न्याय मिळाला नाही तर अन्नत्याग आंदोलन करू असा इशाराही देशमुख कुटुंबाकडून देण्यात आला होता.

मनोज जरांगे आमच्या आंदोलनासोबत ते सहभागी होणार आहेत. आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, अशी माहिती आमच्याकडे आली आहे मात्र त्याची खात्री करत आहोत पण संशय आहे. आरोपींना जेलमध्येही कोणीतरी जाऊन भेटत आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले. तसेच अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही सरकारच्या वतीने कोणीही वरिष्ठ अधिकाऱ्याची शिष्टमंडळ भेटायला आले नाही. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भेटायला आले, अशी खंतही धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली

मनोज जरांगे यांनी बीडच्या मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सहकार्य करणाऱ्यांना अटक करण्यात आली नाही असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही तर शांत बसणार नाही असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. याचवेळी त्यांनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला. मंत्री म्हणून धनंजय मुंडेंना आरोपी केलं जात नाही का? असा सवालही जरांगेंनी केलाय.

कृष्णा आंधळेला अटक करा: मनोज जरांगे

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चारशीट मध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे. तपासी यंत्रणाला 100 टक्के मुभा दिलेली नाही. 25 तारखेला उपोषणा ठरला आहे संवेदनशील विषय आहे.. निवेदन असलं नसलं तरी सहकार्य करा. राजेश पाटील आणि प्रशांत महाजन या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करा आणि त्यांची चौकशी करा. कृष्णा आंधळे याला अटक करा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केला आहे.

पंतप्रधान मोदींनी सर्वांचं मन जिंकलं: शरद पवारांना आधी खुर्चीवर बसवलं, आपल्या हातानं पिण्यासाठी पाणी दिलं

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकदा विरोधी पक्षातील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसतात. ते विरोधी पक्षातील नेत्यांनी केलेल्या टिकेला जशासतस प्रत्युत्तर देतात. मात्र त्यासोबतच ते विरोधी पक्षातील नेत्यांचा योग्य तो सन्मान देखील करतात. हे आज पुन्हा एकदा दिसून आलं आहे. आज दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार यांची देखील उपस्थिती होती. शरद पवार यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. याच कार्यक्रमातील हा प्रसंग आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे आज एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची दिली. तसेच त्यांनी स्वत:च्या हातानं बाटलीमधील पाणी शरद पवार यांच्यासमोर ठेवलेल्या ग्लासामध्ये त्यांना पिण्यासाठी ओतलं. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीनं सर्वांचं मन जिकलं आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, आज दिल्लीमध्ये मराठी भाषेचा हा गौरवशाली कार्यक्रम आयोजित होत आहे. संघामुळेच मला मराठी भाषा अवगत झाली. काही दिवसापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. देशात आणि जगात १२ कोटींहून अधिक मराठी भाषिक लोक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही कोट्यवधी मराठी भाषिकांची इच्छा होती. दशकांपासून हे काम अपूर्ण होतं. मला ते पूर्ण करण्याची संधी मिळाली. हे माझं भाग्य आहे. भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही. तर भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. भाषा समाजात जन्म घेत असते. पण भाषा समाजाच्या निर्माणात देखील तेवढीच महत्त्वाची भूमिका निभावते.

केसरी आणि मराठा सारख्या वृत्तपत्रांनी, गोविंदाग्रजांच्या कविता, राम गणेश गडकरींचे नाटक यातून राष्ट्रप्रेमाची धारा निघाली. त्यातून स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा मिळाली. सामाजिक मुक्तीचे द्वार उघडण्याचं काम मराठी भाषेनं केलं, असं यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे.