Home Blog Page 172

अत्याचार करून गावी गेला, कीर्तनात दंग झाला, पण TV वर स्वत:चा फोटो पाहिला अन्…. गाडेने धूम ठोकली

0

पुणे : परगावी जाणाऱ्या एका युवतीवर पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसराच्या आवारात तेथीलच एका बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना बुधवारी समोर आली. आरोपीने क्रूर कृत्य करून लगोलग त्याचे शिरूर तालुक्यातील गुणाट हे गाव गाठले. गुन्हा घडल्यानंतर जवळपास ४० तासांहून अधिक वेळ पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र अजूनही नराधम मोकाटच आहे.

साताऱ्यातील फलटण तालुक्यातील एका गावात संबंधित तरुणी जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली होती. सकाळची साडे पाचची वेळ होती. गाडीची वाट पाहत असलेल्या मुलीला गोड बोलून दत्ता नामक नराधमाने फसवले आणि इतर प्रवासी झोपले असल्याचे सांगून निर्मनुष्य एसटी गाडीत बसवले. मुलगी गाडीत बसताच आरोपीने गाडीचा दरवाजा लॉक केला आणि नको ते कृत्य केले. घटनेनंतर आरोपी लगोलग पसार झाला. घटनेच्या काही तासांतच पीडितने स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्ह्यांची नोंद केली.

बलात्कार करून घरी आला, दुपारपर्यंत निवांत, नंतर कीर्तनात सहभागी

साडे पाच वाजण्याच्या सुमारास आरोपीने तरुणीवर अतिप्रसंग करून शिरुर तालुक्यातील गुणाट गाव गाठले. दुपारपर्यंत तो घरातच होता. त्यानंतर त्याने कीर्तनातही सहभाग नोंदवला. पण टीव्हीवर जशाही बातम्या सुरू झाल्या आणि बातम्यांमधून स्वत:चा फोटो त्याने पाहिले, त्यावेळेपासून त्याने घरातून पोबारा केला.

आरोपी दत्ता गाडे हा गावातल्याच ऊसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली आहे. त्यानंतर पुणे शहर पोलीस आणि ग्रामीण पोलिसांचे १०० जणांचे पथक गावात दाखल झाले आहे. पोलीस पथकाने ऊसाच्या शेतात दत्तासाठी शोधमोहीम राबवली. ऊसाच्या फडात बिबट्याचे वास्तव असल्याने जिथे जाता येत नाही, तिथे पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून शोधकार्य केले.

पोलिसांसोबत श्वान पथकही दत्ताचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहे. पोलिसांकडून दत्ताचा कसून शोध सुरू आहे. गुणाट गावातील संपूर्ण परिसर पोलिसांनी पालथा घातला, ऊसाच्या फडात शोधकार्य राबवले पण तरीही दत्ता पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. त्यामुळे दत्ता नेमका गेला कुठे? तो पोलिसांच्या हाती कधी लागणार? कसा लागणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

आरोपी हाताला लागत नसल्याने पोलिसांनी दत्ताचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास एक लाख रुपये इनाम देण्याची घोषणा केली आहे. गावातील नागरिक, सरपंच पुणे पोलिसांना सहकार्य करीत आहेत.

दत्ताची गुन्हेगारी कुंडली

-स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे

-शिक्रापूर आणि शिरुर तालुक्यात त्याच्या नावावर गुन्हे दाखल आहेत

-महिलांना लिफ्ट देऊन त्यांचे सोन्याचे दागिने हिसकवायचा

-दत्ता सराईत गुन्हेगार होता, त्याच्या नावावर एकूण सहा गुन्हे दाखल आहेत

100 पोलिसांनी 25 एकरात सगळीकडे पाहिलं, पण दत्ता गाडे लपला कुठे? पोलीस पथक आणि ग्रामस्थांना परतण्याच्या सुचना

0

पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारामध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून फरार झालेला दत्ता गावडे अजूनही पोलिसांच्या हातात लागला नाही. दत्ता गावडेचं लोकेशन सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा फौजफाटा, डॉग स्कॉड पथक आणि संपूर्ण यंत्रणेनं त्याच्या गावात शोध घेतला पण संध्याकाळपर्यंत तो काही हाती लागला नाही. त्यामुळे दत्ता गाडेचा शोध सुरूच राहणार आहे. पण, इतका मोठा फौजफाटा घेऊन शोधण्यासाठी निघालेल्या पोलिसांच्या शोधमोहिमेचा मात्र फज्जा उडाला आहे.

स्वारगेट बस आगारमध्ये एका २६ तरुणीवर बलात्कार प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरून गेला. या प्रकरणाला नराधम दत्ता गाडे आपल्या गावी पळून गेला होता. त्याच्याबद्दल धक्कादायक खुलासे झाले. मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी त्याचा माग काढला. आज सकाळपासून शिरुर तालुक्यातील गुणाट गावातील शेतशिवारात आरोपी मुक्कामी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर १०० पोलीस, ड्रोन कॅमेरे आणि डॉग स्कॉडसह पोलीस दल गावात पोहोचलं.

गाडे दिवसभर ज्या घरात थांबला तिथे पोलीस पोहोचले पण पसार झाला होता. त्यानंतर गाडे हा रात्रीच्या मुक्कामाला शेतात गेला, याच शेतात आरामाचे कपडे झाडाखाली सापडले होते. पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने संपूर्ण २५ एकरचा परिसर शोधून काढला. पण तो कुठेच आढळला नाही. अखेरीस दत्ता गाडेच्या शोधमोहिमेला गेलेला पोलीस पथक आणि ग्रामस्थांच्या पथकाला परत येण्याच्या सुचना देण्यात आली. २५ एकर परिसरातील शेतशिवाराची पाहणी करुनही दत्ता गाडेचा शोध लागला नसल्याने शोध पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले. त्यामुळे त्याचा शोध कधी लागणार हे प्रश्न आताही कायम आहे.

पुणे पोलिसांचं आवाहन

गुणाट गावातील आरोपी दत्ता गाडेला शोधण्याची आजच्या दिवसाची शोध मोहीम राबविण्यात येत होती. ती थांबविण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहिमेला सुरुवात होणार आहे. पुणे पोलिसांनी ग्रामस्थांना देखील रात्रीच्या वेळी आरोपी दिसला तर कळवण्याचे आवाहन केले आहे.

दत्ता गाडेवर अनेक गुन्हे दाखल

दरम्यान, दत्तात्रय गाडे याच्यावर शिरूर, शिक्रापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात जबरी लुटीचे गुन्हे दाखल आहेत. एकट्या वयस्कर महिलांना चारचाकीमध्ये लिफ्ट देऊन त्यांना लुबाडण्याचे उद्योग गाडे करत होता. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडेवर 2020 मध्ये जबरी लूट, दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे 2, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा, केडगाव आणि कोतवाली पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 असे पाच गुन्हे गाडेवर दाखल आहेत. याशिवाय शिरूरच्या गुन्ह्यात दत्तात्रय गाडे शिक्षा भोगून तीन वर्षांपूर्वी कारागृहातून बाहेर आला होता.

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कोण वाचणार अन् कोणाला शिक्षा? ‘यामुळे’ सगळं होणार क्लिअर सीआयडीचे तब्बल 1500 पानी दोषारोप

0

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्येने महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. राज्यभर आंदोलने झाली, संतोष देशमुख कुटुंबाने आक्रमक भूमिका घेतली. आता मात्र, या हत्येचा संपूर्ण तपशील या दोषारोप पत्रातून उलगडणार आहे. सीआयडीच्या तपासानुसार, खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचा सहभाग आहे का? हे तपासातून स्पष्ट होईल. “या प्रकरणात सात आरोपींनी कशा प्रकारे कट रचला, हत्या केली आणि त्याचा गुन्हेगारी इतिहास काय आहे, यासंबंधी पुरावे चौकशीतून समोर  येणार आहे..

आरोपींनी हत्येसाठी वापरलेली शस्त्रे कोणती? हल्ला कसा झाला? हत्येची वेळ आणि ठिकाण कोणते? हे ही दोषारोप पत्रातून उघड होईल. तसेच, आरोपी फरार होण्यात कोणाच्या मदतीने यशस्वी झाले आणि त्यानंतर ते कुठे लपले होते? याचाही तपास करण्यात आला आहे. याशिवाय, कुठल्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला? याचाही तपास सीआयडीने केला आहे.

याच प्रकरणाशी संबंधित खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांमध्ये काही संबंध आहे का? याचाही तपास करण्यात आला आहे.

‘डिजिटल पुराव्यांमधून (CDR डेटा) कोणाशी संपर्क झाला? वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्या संघटित गुन्हेगारीतील आणखी काही बाबी समोर येणार का? आरोपींनी खंडणीमधून मिळवलेल्या संपत्तीचा तपास कोणत्या टप्प्यावर आहे? आम्हाला न्याय हवा! हा गुन्हा फक्त एका व्यक्तीने नाही, तर एका मोठ्या टोळीने केला आहे. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे.’ अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

‘कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही’; इकडे पन्नास खोके आणि तिकडे डुबकी मारायची, उद्धव ठाकरे पुन्हा कडाडले

0

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. एकनाथ शिंदे हे नुकतेच महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाऊन आले, यावरून उद्धव ठाकरे यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे. ‘मला आता गंगेचं पाणी दिलं मला मान आहे सन्मान आहे, इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारायची याला काय अर्थ? कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही,’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधुनो आणि मातांनो, उद्या पेपरला येईल की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. त्यामुळे  आजपासूनच सुरु करा की गर्व से कहो हम हिंदू है आणि अभिमानाने म्हणा मी मराठी आहे. एक ठिणगी पडली आणि उपऱ्याचं आक्रमन बाजूला केलं ती म्हणजे शिवसेना. शिवजयंती झाली, महाशिवरात्री झाली, गुढीपाढवा येईल व्हाटसअप वर तुम्ही जे मेसेज पाठवतात ते पण मराठीतच केले पाहिजेत, कारण  पंतप्रधान म्हटले अमृताशी पैजा जिंके तुम्ही हसताय काय? तुम्ही हसताय त्यामुळे मी पुढचं विसरतोय, असं म्हणत त्यांनी यावेळी हल्लाबोल केला.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला.  ‘मला आता गंगेचं पाणी दिलं मला मान आहे सन्मान आहे, इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारायची याला काय अर्थ? कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, काल परवा साहित्य संमेलन झालं, कसलं संमेलन झालं माहिती नही. विशेष म्हणजे अध्यक्ष यांनी जे विचार मांडले त्यावर चर्चा झाली पाहिजे होती. दिशा दाखवणारे भाषण होत.  यावर देशात चर्चा झाली पाहिजे. माझे आजोबा जे विचार मांडायचे त्यांचे आणि त्यांचे विचार मिळते जुळते आहेत. आपल्या देशाचे यान मंगळावर गेलं म्हणून आपण फटाके फोडतो पण दुसरीकडे माणसाच्या पत्रिकेत आपण मंगळ शोधतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

टीम इंडियात दिग्गजाचं कमबॅक, टीम इंडियाची ताकद दुप्पटीने वाढली; न्यूझीलंडविरुद्ध सामन्याआधी बॉलिंगची धार वाढली

0

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. टीम इंडियाने साखळी फेरीत बांगलादेश आणि पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. टीम इंडियाने हे दोन्ही सामने 6 विकेट्सने जिंकले. त्यानंतर आता टीम इंडिया साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी मिळाली आहे. टीम इंडियात दिग्गजाचं अखेर कमबॅक झालं आहे. या दिग्गजाला काही दिवसांपूर्वी वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतावं लागलं होतं.

दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज आणि टीम इंडियाचा बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कल भारतीय संघात परतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोर्ने मोर्कल हा काही दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणामुळे मायदेशी परतला होता. मात्र आता मोर्ने मोर्कल टीम इंडियाच्या कॅम्पसह जोडला गेलाय. मोर्कल परतल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंना बॉलिंगचे धडे मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या बॉलिंगची धार वाढणार, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

टीम इंडियाचं मिशन नंबर 1

दरम्यान ए ग्रुपमधून न्यूझीलंड आणि टीम इंडिया दोन्ही संघ अजिंक्य आहेत. दोन्ही संघांनी खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. तर दोन्ही संघांचा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना 2 मार्चला होणार आहे. आता हा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्याची संधी दोन्ही संघांना आहे. तसेच विजयी हॅटट्रिकसह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहचण्याची संधीही टीम इंडियाकडे आहे. त्यामुळे आता टीम इंडिया विजयी हॅटट्रिकसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेते? की किवी ते स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड क्रिकेट टीम : मिचेल सँटनर (कॅप्टन), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनव्हे, जेकब डफी, मॅट हेन्री, कायल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, विल ओरुर्के, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन आणि विल यंग.

राज्यात पुन्हा वादंग? आशा भोसले मराठी भाषा दिनानिमित्त मोठे वक्तव्य आपण खरा इतिहास वाचावा जो पुरंदरेंनी वैगरे लिहलाय…

0

‘छावा’ या सिनेमामुळे सध्या खरा इतिहास आणि खोटा इतिहास यावरून सध्या बराच वाद सुरू आहे. दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप होत असताना शिवकालीन इतिहास आणि वाद मिटण्यापेक्षा वाढण्याचे संकेत दिवसेंदिवस मिळत आहेत. विभिन्न इतिहासकार वेगवेगळी मते मांडत असताना त्यांचे संदर्भही विभिन्नच मिळत आहेत. इतिहासकार इंद्रजीत भालेराव यांचे प्रकरण ताजे असतानाच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी एक मोठं विधान केलं आहे. ‘आपण खरा इतिहास वाचला पाहिजे…… इंग्रजांनी लिहिलेला नाही आपला खरा इतिहास ……जो पुरंदरेंनी वैगरे लिहलेला आहे. तसा इतिहास वाचला पाहिजे.’ असं विधान आशा भोसले यांनी केलं आहे.

मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ज्यासाठी सिनेक्षेत्रातील अनेक दिग्गजांना बोलवण्यात आलं होतं. ज्यामध्ये आशा भोसले यांचा समावेश होता. या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी मराठी भाषेबाबत आपली मतं व्यक्त केली. तर आशा भोसले यांनीही आपल्या भाषणातून मराठी भाषेविषयी बऱ्याच गोष्टी सांगितलं. पण याचवेळी त्यांनी इतिहासाबाबातही भाष्य केलं आहे.

‘खरा इतिहास जो पुरंदरेंनी वैगरे लिहलेला आहे, तो वाचला पाहिजे…’, आशा भोसले नेमकं काय म्हणाल्या?

इंग्रजी हे खरंच महत्त्वाचं आहे. पण आपली मातृभाषा राखून इंग्रजी शिकलं पाहिजे. तर मी असं सांगते की, आजकाल मराठी लोकं घरात बोलताना इंग्रजीच बोलतात. आता आई मुलीला गुड मार्निंग म्हणाली आणि मुलगी आईला गुड मॉर्निंग म्हणाली तर… अरे सुप्रभात म्हणा ना..

 ‘मला आणखी एक वाटतं की, मराठी शाळांमधून एक तास मराठी पुस्तक चांगलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र एक पान रोज वाचायचं. असं करावं असं मला वाटतं. ते पुस्तक आईकडे पण पोहचतं करावं.. कारण आईने पण वाचलं पाहिजे की, आपला खरा इतिहास काय आहे, इंग्रजांनी लिहिलेला नाही आपला खरा इतिहास जो पुरंदरेंनी वैगरे लिहलेला आहे. तसा इतिहास वाचला पाहिजे.’ असं विधान आशा भोसले यांनी यावेळी केलं आहे.’

‘या भाषेला दुधारी तलवार पण आहे आणि या भाषेचं अवधान नाही ठेवलं तर कुठल्या कुठे अर्थ निघून जातो. ऱ्हस्व, दीर्घ सगळं पाहावं लागतं. चार-पाच दिवसांपूर्वी मला राज ठाकरेंचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की, ते एकदम उत्साहात होते की, ते मला म्हणाले की, आशाताई.. आशाताई.. त्यांचा तो ठाकरी आवाज.. ‘आशाताई 27 तारखेला संध्याकाळी काही झालं तरी तुम्ही मला हव्या आहात.’

‘मी आजारी होते तरी राज साहेबांना नाही कसं म्हणायचं.. तो दोस्त आहे आणि दोस्ताला कोणी नाही म्हणतं का?’ असं आशा भोसले यावेळी म्हणाल्या.

मंत्र्यांचे PA आणि OSD ठरतात 25-30 वर्षांपूर्वी OSD पद तयार: PA आणि OSD ठरतात कसे? नेमकं काय करतात काम?

0

माणिकराव कोकाटेंनी जी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती ती मंत्री जाहीरपणे बोलून दाखवल्याने मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिस्तीवर मंत्री काही खूष नसल्याचं स्पष्ट दिसून आलं. आता आमचे पीए आणि osd ठरवणंही आमच्या हातात नाही राहिलं, ते ही CM ठरवतायत, असं म्हणालेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे. शिवसेना मंत्र्यांचीही हीच तक्रार असल्याची खुसपूस सुरू होती. पण मंत्र्यांना आपल्याच मर्जीतले PA आणि OSD का हवे? कोण ठरवतं PA आणि OSD? मुळात PA आणि OSD असतात कोण? हे आपण सविस्तर समजून घेऊया…….

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले 5 डिसेंबर, 2024 ला. त्यानंतर दोन-अडीच महिने उलटून गेले तरी मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंत्र्यांनी पाठवलेल्या PA आणि OSD च्या नावांच्या शिफारसीची फाईल काही मंजूर होईना. दोन अडीच महिने दाखवलेल्या संयमाचा बांध शेवटी फुटला आणि नेते कधी कुजबुजत तर कधी थेट बोलू लागले.

सरतेशेवटी मुख्यमंत्री कार्यालयाकडून 109 नावांना मंजुरी मिळाली. एकूण 125 जणांची नावं PA आणि OSD साठी पाठवण्यात आलेली, त्यापैकी 109 जण मंजूर झाले. सुमार कामगिरी, सुरू असलेल्या चौकशा, किंवा फिक्सर म्हणून असलेला शिक्का या कारणांस्तव 16 जणांची नावं मंजूर झालेली नाहीत. यावरच्या राजकीय मुद्द्यावर आपण नंतर बोलू पण मूळ मुद्दा हे PA आणि OSD असतात कोण?

PA आणि OSD असतात तरी कोण?

2-3 प्रकार असतात जे अधिकारी पातळीवर नेत्यांच्या अवतीभोवती तुम्हाला पाहायला मिळतात, किंवा त्यांच्या क्लोज कॉन्टॅक्टमधले असतात ते म्हणजे PA, PS आणि OSD.

PA- personal assistant, स्वीय्य सहाय्यक

PS- Personal Secretary, खाजगी सचिव

OSD- officer on special duty म्हणजेच विशेष कार्यकारी अधिकारी.

एका मंत्र्याला त्याचा 35 जणांचा स्टाफ ठेवता येतो. PA आणि OSD हे मुख्यमंत्री कार्यालयाकडून नियुक्त होतात. मुख्यमंत्री कार्यभार सांभाळत असलेल्या सामान्य प्रशासन विभागाकडे हा सगळा कामकाज सुरू असतो. इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार ज्यांना  PA आणि OSD म्हणून नियुक्त केलं जातं ते सरकारी कर्मचारी असायला हवे. या PA आणि OSD चं किमान पदवीपर्यंतच शिक्षण झालेलं असावं. तसंच त्याची कारकिर्द चांगली असायला हवी. PA आणि OSD म्हणून ज्यांची नियुक्ती होणार त्यांनी प्रशासकीय पातळीवर काम केलेलं अपेक्षित आहे. त्याचबरोबर उत्तम संवाद कौशल्य हवं.

या सगळ्या निकषांच्या आधारावर PA आणि OSD नियुक्त केले जातात. ज्यात देवेंद्र फडणवीस ह्यांनी PA आणि OSD ह्यांची नावं मंजूर करताना आणि आणखी निकष वाढवलेले आहेत. जसं की त्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप नसावेत, तो स्वच्छ चारित्र्याचा असावा. त्याच्याविरोधात कोणतीही चौकशी नको.

OSD हे नेमकं असतं काय? कुठून आली ही भानगड?

एका माजी अधिकाऱ्याने जे OSD सुद्धा राहिले आहेत, त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेला माहितीनुसार,  PA हे पहिल्यापासूनच मंत्र्यांना असायचे. OSD हे काही वर्षांपूर्वी आलेले आहेत. PA हे क्लास 1 ऑफीसर असतात आणि ते एकापेक्षा जास्तही असू शकतात पण मंत्र्यांना 1 व्यक्ती अशीही PA म्हणून ठेवता येते जी शासकीय कर्मचारी नाही.

बऱ्याचदा आमदारांचे पीए असतात ते काही शासकीय कर्मचारी नसतात. पण मग तोच आमदार मंत्री झाल्यावर आपल्या या PA ला सोडत नाही, कारण सगळे छक्के-पंजे त्याला माहिती असतात. त्यामुळे अटीतील ही शिथिलता आपला पहिल्यापासूनचा PA मंत्री झाल्यावरही PA म्हणून कायम ठेवण्यात फायदा होतो.

पीए या शब्दाला तेवढा मान नाही असा एक साधारण समज तयार झाला आणि त्यातून OSD officer on special duty हे पद जन्माला आले. पीए पेक्षा Officer म्हटलं गेल्याने मान उंचावलेली राहते. जसं मगाशी म्हटलं हे पद पहिल्यापासून नव्हतं. पण माजी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 95 च्या काळात हे पद तयार झालं. पण 99 नंतर तर OSD पाहायला मिळालेले त्यामुळे एक ढोबळमानाने आपण सांगू शकतो की 25-30 वर्षांपूर्वी OSD पद तयार झालं.

आता हे PA, OSD जे असतात त्यांना असं कुठलं नेमकं काम ठरवून दिलेलं नसतं. जे मंत्र्यांच्या मनात येईल तो, त्यांना जे सोयीचं पडेल ती कामं ह्यांना वाटून दिली जातात. एकापेक्षा अनेक PA OSD असल्याने जी फाईल सांभाळण्यात ज्याची खूबी तशा पद्धतीने त्यांना ती वाटून दिली जातात. पण ही विभागणीही काटेकोरपणे केली जाते, जेणेकरून ढवळाढवळ होऊ नये. काही फाईल्स पाहायची जबाबदारी ही PS खाजगी सचिवाकडे असते तर काही फाईल्स हे फक्त OSD च पाहतात.

सर्वात मोठी BREAKING: स्वारगेट अत्याचारातील आरोपीचा गेम ओव्हर, 48 तासानंतर लोकेशन सापडलं

0

मंगळवारी पहाटे पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. दत्तात्रय गाडे नावाच्या आरोपीनं पीडित तरुणीला मदत करण्याचा बहाणा करत तिला शिवशाही बसजवळ नेलं.याठिकाणी पीडित तरुणी बसमध्ये चढताच आरोपीनं बसचा दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केला आहे. अत्याचाराच्या या घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आणि त्याच्या मागावर १३ पोलीस पथकं सोडली. ही घटना घडून 48 तास उलटल्यानंतरही पोलिसांना नराधमाचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर आता पोलिसांना आरोपीचं लोकेशन सापडल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गुणाट गावातील रहिवासी आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे गुणाट गावापर्यंत आरोपीचा माग काढला होता. मात्र त्यानंतर आरोपीचं लोकेशन पोलिसांना स्ट्रेस करता आलं नाही. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आरोपीवर बक्षीसही जाहीर केलं. आरोपीची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपये दिले जातील, शिवाय माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल, अशी घोषणा पोलिसांनी केली. आता 48 तासांनंतर पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.

आरोपी दत्तात्रय गाडे हा गुणाट गावाजवळील एका उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. एका खबऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारे आता पोलीस उसाच्या शेतात आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध घेत आहेत. पुणे शहर पोलिसांकडून ड्रोनद्वारे उसाचा फड पिंजून काढला जातोय. याच परिसरातील एका घरात आरोपी दत्तात्रय गाडे हा पाणी पिण्यासाठी आला होता, अशी माहिती समोर आली आहे. यानंतर आता पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे.

भाजपचा जोरदार धक्का, मुंडेंच्या विश्वासूला महत्वाचं पद पण आमदार सुरेश धस यांना भाजपने पुन्हा डावलले…

0

राज्य विधीमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्षपदी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आमदार सुरेश धस यांना भाजपने पुन्हा डावलले आहे. या अगोदरही जिल्हा नियोजन समितीवर आमदार सुरेश धस यांना डावण्यात आले होते.

राज्य विधीमंडळात विविध प्रकारच्या समित्या असतात. यात महायुतीत भाजपच्या वाट्याला ११ समित्या आल्या आहेत. या समित्यांवरील अध्यक्षांची निवड भाजपकडून करण्यात आली आहे. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या समित्यांची घोषणा बाकी आहे. दरम्यान, भाजपला मिळालेल्या समित्यांपैकी धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्ष म्हणून केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची वर्णी लागली आहे. दुसऱ्यांदा आमदार झालेल्या नमिता मुंदडा यांना स्थान देण्यात आले आहे.

यापूर्वीही समितीवर सदस्यांमधून जिल्हा नियोजन विधीमंडळ होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये आमदार सुरेश धस यांच्याऐवजी नमिता मुंदडा यांनाच संधी दिली गेली होती. नियोजन समितीवर धस यांना डावलल्याने त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार आहेत. आष्टीचे आमदार सुरेश धस ४ वेळा विधानसभा आणि १ वेळा विधानपरिषदेवर आमदार राहिले आहेत. सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणात थेट भूमिका घेतल्यामुळे ते राज्यभरात चर्चेत आहेत. मात्र भाजपने त्यांना विधीमंडळ समितीवर अध्यक्षपदी स्थान दिलेले नाही.

आमदार नमिता मुंदडा या मंत्री पंकजा मुंडे यांच्या विश्वासू आहेत. तर सुरेश धस यांनी निवडून आल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेत मुंडेंवर आरोप केले होते. याचाच फटका कुठे तरी आमदार सुरेश धस यांना बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आमदार सुरेश धस यांना डावलत आमदार नमिता मुंदडा यांची विधिमंडळ रुग्णालय समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सुरेश धस यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

स्वारगेट प्रकरण : पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू; दत्तात्रय गाडे ऊसाच्या शेतात लपला असल्याची शक्यता

0

स्वारगेट बसस्थानकातील धक्कादायक प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याच्या शोधासाठी पुणे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. शिरूर येथील ऊसाच्या शेतात तो लपल्याची शक्यता असल्याने, पोलिसांनी तेथे ड्रोनद्वारे इमेजिंग सुरू केले आहे.

गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून शोधमोहीम

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकांनी शिरूरमध्ये गाडेचा शोध सुरू केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तो ऊसाच्या शेतात लपल्याची शक्यता असल्याने, त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

आरोपीचा फोन घटना घडल्यापासून बंद

घटना घडल्यानंतर दुपारी २ वाजल्यापासून गाडे याचा फोन बंद आहे. त्याने थेट आपल्या गावाकडे, शिरूरकडे पळ काढल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, दत्ता गाडे आणि त्याचा सख्खा भाऊ दिसायला सारखे असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.

आरोपीवर आधीपासून गंभीर गुन्हे दाखल

दत्तात्रय गाडे याच्यावर यापूर्वी शिक्रापूर येथे २ गुन्हे तसेच शिरूर, कोतवाली, सुपा आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शिरूरमध्ये पोलिसांकडून वेगाने शोधमोहीम सुरू असून, लवकरच आरोपी गाडेला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.