Home Blog Page 132

प्रदूषण कमी करण्यासाठी आता पुण्यातही फॉग कॅनॉन मशिनद्वारे फवारणी; या पाच प्रमुख रस्त्या केला जाणार वापर

0

दिल्ली, चंदीगड, पिंपरी चिंचवडच्या पाठोपाठ आता पुण्यातील रस्त्यांवरही हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी फॉग कॅनॉन मशिनद्वारे पाण्याची फवारणी केली जाणार आहे. पाणी फवारणीमुळे हवेतील धुलीकणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी महापालिकेने पाच फॉग कॅनॉन मशिन खरेदी केल्या असून शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर त्याचा वापर केला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या नॅशनल क्‍लीन एअर प्रोग्रॅम (एनसीएपी) अंतर्गत देशातील प्रदूषणाचे प्रमाण अधिक असणाऱ्या शहरांमधील प्रदूषण कमी करण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार, महापालिकेने पाच फॉग कॅनॉन मशिन नुकत्याच खरेदी केल्या आहेत. शहरातील पाच परिमंडळांसाठी प्रत्येकी एका मशिनचा वापर प्रदूषण कमी करण्यासाठी केला जाणार आहे. दिल्ली, चंदीगड, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड या शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी मागील काही वर्षांपासून संबंधित मशिनचा वापर केला जात आहे. त्याच धर्तीवर पुण्यात देखील हा उपक्रम राबविला जात आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी.. यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना महापालिकेच्या आवारामध्ये फॉग कॅनॉन मशिनचे प्रात्यक्षिक नुकतेच दाखविण्यात आले.

अशी होणार फवारणी

फॉग कॅनॉन मशीनसाठी एका ट्रकवर ६ हजार लिटर पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. ट्रकच्या मागील बाजूस नोझल असलेले उच्च दाबाचे पंप बसविण्यात आले आहेत. या नोझलद्वारे पाण्याचे अतिसुक्ष्म कण बाहेर फेकले जातात. त्यामुळे हवेच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणारे धुलीकणांचे हवेतील प्रमाण कमी करण्यास मदत होते. शहरातील महापालिका भवन ते वारजे (कर्वे रस्ता), स्वारगेट-कात्रज-कोंढवा (सातारा रोड), स्वारगेट शेवाळेवाडी (सोलापूर रोड), संगमवाडी-येरवडा-केसनंद फाटा, दांडेकर पूल ते धायरी फाटा (सिंहगड रोड) या रस्त्यांवर फवारणी केली जाणार आहे.

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आनंदराज आंबेडकरांचा महामोर्चा मंत्रालयावर धडकणार

0

मुंबई दि. ४ (रामदास धो. गमरे) ज्याठिकाणी तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्याठिकाणी सम्राट अशोकाने महाबोधी महाविहाराची निर्मिती केली व पुढे जाऊन ते वैश्विक समता, बंधुता, मानवतेचे केंद्रबिंदू झाले असे जगभरातील बौद्धांचे श्रद्धस्थान असलेले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात हवे परंतु अधिनियम बी.टी.एम.सी. ऍक्ट १९४९ या जुलमी कायद्यामुळे महाबोधी महाविहारावर सध्या ब्राम्हणांनी अतिक्रमण केले असून तेथे बौद्धधम्माची व बौद्ध मूर्तींची अवहेलना होत असून तिथे बौद्ध धम्मास अमान्य अशी वैदिक कर्मकांड होतात म्हणून अधिनियम बी.टी.एम.सी. ऍक्ट १९४९ चा अमानवी कायदा रद्द करून सदर महाबोधी महाविहार मुक्त व्हावे आणि ते बौद्धांच्या ताब्यात यावे याकरता भारत व जगभरातील भन्तेजींच महाआंदोलन सुरू आहे.

सदर महाआंदोलनास पाठिंबा देण्यासाठी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तमाम बौद्ध अनुयायांचा महामोर्चा शनिवार दि. ५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक ११:०० राणीची बाग येथून आझाद मैदान, मंत्रालय आगेकूच करीत निळे वादळ सरळ मंत्रालयावर धडक देणार आहे.

सदर महामोर्चास महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बांधवांनी, धार्मिक, सामाजिक, राजकीय, विविध संघटनांनी आणि बौद्ध अनुयायांनी आपले परस्परातील मतभेद बाजूला सारून बौद्ध म्हणून लाखोंच्या संख्येने या महामोर्चास सहभागी होऊन महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आणि महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केले आहे.

महाबोधी महाविहार मुक्तीमोर्चात सम्यक कोकण कला संस्थेचे महाराष्ट्रातील कलावंत मोठ्या संख्येने सहभागी होणार

0

मुंबई दि. ३१ (रामदास धो. गमरे) “बौद्ध धम्मियांचे श्रद्धास्थान महाबोधी महाविहाराचे (बोधगया, बिहार) संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या ताब्यात हवे परंतु अधिनियम बी.टी. १९४९ मुळे सदर महाविहार बौद्ध व हिंदू अश्या उभय धर्मियांच्या ताब्यात आहे, जे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १३, १४, १५, २५, २६ चे पूर्णतः उल्लंघन करणारे आहे तसेच अनुचित पद्धतीने बौद्धांच्या धार्मिक हक्कांवर अतिक्रमण करणारे आहे.

हिंदूंच्या मंदिरात हिंदूच पुजारी आणि त्यांचे व्यवस्थापन, ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये ख्रिश्चन फादर आणि त्यांचे व्यवस्थापन, मुसलमानांच्या मस्जिद, दर्ग्यामध्ये मुस्लिम मौलवी आणि त्यांचेच व्यवस्थापन असताना बौद्ध विहारात ब्राम्हणांच अतिक्रमण का ? सरकारने निर्माण केलेला बी. टी. १९४९ हा काळा कायदा रद्द करून महाबोधी महाविहारात ब्राम्हणी कर्मकांडामुळे बुद्धाची जी अवहेलना होते. ती थांबावी व आंदोलनासाठी आलेल्या बौद्ध भिख्खू संघावर जो अन्याय होत त्यांची उपेक्षा करीत त्यांना घाणीत बसवले जात आहे. हे अन्याय बंद होऊन जागतिक स्तरावर बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले महाबोधी महाविहार बिहार बौद्ध व्यवस्थापनाच्या ताब्यात दयावे याकरता बौद्धजन पंचायत समितीचे सभापती सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी ९८वा चवदार तळे सत्याग्रह महाड क्रांतीदिनी महाड येथे बौद्ध बांधवांनी महाबोधी महाविहार मुक्ती महामोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले होते.

सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र, या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम कलावंत सदर महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतील त्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कलावंतांनी सदर मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष मंदार कवाडे, नरेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सम्यक कोकण कला संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केले आहे.

न्यू आम्रपाली को. हौ. सोसायटी आणि जयंती उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इफ्तार पार्टी संपन्न

0

मुंबई दि. ३० (रामदास धो. गमरे) समाजा-समाजात सर्वधर्मसमभावाची भावना अबाधित राहून सर्व जात, धर्म, पंथ एकत्रित येऊन त्यांमध्ये आपुलकी, बंधुता वाढून एकमेकांच्या आस्थेला, श्रद्धेला सन्मान देऊन गुण्यागोविंदाने शांततेने सर्व एकत्र राहिले पाहिजे या उदात्त उद्देशाने आम्रपाली को. ऑप. हौसिंग सोसायटी आणि सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ, ६ नंबर गेट, शिवडी यांच्या संयुक्त विद्यमाने इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

सदर इफ्तार पार्टीला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्थानिक आमदार अजय चौधरी, ए १ – एंटरप्रायझेस (बिल्डर आणि डेव्हलपर) यांचे सन्नान भाई, माजी नगरसेवक सुनील दादा मोरे, मुंबई काँग्रेसचे सचिव महेंद्र मुणगेकर, उबाठा नायगाव विधानसभा संघटक सुरेश साळे, शिवसेनेचे राजेश देशमुख, मारुती मंदिराचे पुजारी महाराज, आम्रपाली को. ऑप. हौसिंग सोसायटीचे चेअरमन व आर. पी. आय. नेते दिपकभाई गमरे, सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय कसबे, मंडळाचे कार्यकर्ते दत्तात्रय वाघमारे, अमोल सोनावणे, संतोष लोखंडे, प्रताप तांबे, रुपचंद मोहिते, प्रविण तांबे, कामरान खान वली, दत्तात्रय वाघमारे, अमोल सोनवणे, संतोष लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर इफ्तारमध्ये समाजातील सर्वच जात-धर्म-पंथाचे, सर्वच स्तरातील, विविध क्षेत्रातील लोक बंधुभाव नात्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर पार्टीचे सुनियोजित आयोजन करून सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अस्लम खान ,कामरान खान,रिजवान शेख, मुशर्रफ शेख, प्रवीण तांबे, रेखा आगाने, हमीद शेख ह्यांनी अथक परिश्रम घेऊन सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

Symbiosis University, School of Retail Students Gain Valuable Insights- Industry Visit to SANCHI

0

A Learning Experience Beyond the Classroom

Pune, 3 April 25 – The School of Retail at Symbiosis University, MBA Marketing Semester II students recently embarked on an enriching industry visit to Indore Sahakari Dugdh Sangh Maryadit (SANCHI).  Indore Sahakari Dugdh Sangh Maryadit, affiliated to MP State Cooperative Dairy Federation. It Covers 9 districts and deal with 4 Mini Dairy Plant and 11 Milk Chilling Centers.
The students had the unique opportunity to witness SANCHI’s legacy and cutting-edge processing plant, which handles more than 4 lakh liters of milk daily. This visit provided them with invaluable insights into the various processes involved in the dairy industry, which are integral to the production of high-quality milk and dairy products.
Student Observed the intricate processes of pasteurization, cooling, and evaporation, all while adhering to strict hygiene and quality standards, including certifications such as FDA, AGMARK, ISO, BIS, and FSSAI. Explored a diverse range of products, including Milk, Ghee, Butter, Skimmed Milk Powder, Ice Creams, Bakery Items, and Traditional Indian Sweets. efficient packaging and supply chain management, all this process ensure on-time delivery of fresh products every day.

Hicathon 1.0 – A Grand Success at Symbiosis Skills and Professional University!

0

Pune, 3 April 2025 – Hicathon 1.0 concluded successfully at Symbiosis Skills and Professional University (SSPU). The 8-hour Capture the Flag (CTF) challenge, with over 400 enthusiastic participants, saw SSPU students performing exceptionally well, SSPU winners taking home prizes of ₹25,000 for the winner, ₹15,000 for the first runner-up, and ₹10,000 for the second runner-up. The event brought together experts, sponsors, and participants in an atmosphere filled with technology and excitement.

The event featured renowned speakers including Arun Mane, Rishika D., Aditya Shende, Shifa Cyclewala, Rohit Gautam, Yash Chavhan, Abhishek Bhaskar, and Omkar Mali, who conducted highly inspirational and thought-provoking sessions. Their sessions provided rich insights into various topics.

“We are extremely proud to host Hicathon 1.0, as such events enhance the skills of our students. These events not only highlight the importance of education but also emphasize the value of collaboration,” said Dr. Aradhana Deshmukh, Director, SSPU.

नांदेडमध्ये महिला मजुरांना ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, 8 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

0

महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे ग्रहण लागले आहे. त्यात आता नांदेडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. यामुळे तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड परिसरातील आलेगावमधील कांचननगर या ठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली. हिंगोली जिल्ह्यातील काही महिला मजूर यांना हळद काढणीसाठी एक ट्रॅक्टर जात होतं. मात्र त्या ट्रॅक्टर चालकाला विहिरीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ट्रॅक्टर थेट विहिरीत जाऊन कोसळला. या विहिरीत पाणी असल्याने अनेक महिला यात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

घटनेनंतर परिसरात खळबळ
या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. या बचाव कार्यादरम्यान काही महिलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

यातील दोन महिलांना पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र ट्रॅक्टर ट्रॉली आणि काही महिला या विहिरीतच आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व महिला हिंगोलीतील वसमत तालुक्यातील भुज गावात राहणाऱ्या आहेत.

कशी घडली घटना?
यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 7 ते 7.30 या दरम्यान घडली. सध्या या भागात पाऊस सुरु आहे. यामुळे ट्रॅक्टरचे टायर स्लीप झाल्याने ही घटना घडली. यानंतर आम्ही लगेचच यातील काही महिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यातील दोन महिलांना वाचवण्यात आम्हाला यश आलं. त्या महिला विहिरीतून बाहेर आल्यानंतर इतरांना बाहेर काढा, असे सांगत होत्या. पाऊस पडल्याने ट्रॅक्टर स्लीप झाला. यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर विहिरीत पडला.

“वक्फ संपत्तीचे विधेयक म्हणजे हिंदूंच्या डोळ्यात धूळफेक आणि मुस्लिमांचे…” ‘सामना’तून हल्लाबोल

0

लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाले आहे. ठाकरे गटाने या विधेयकावर तीव्र टीका केली आहे, याला हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक आणि मुस्लिमांचे लांगूलचालन असे म्हटले आहे. विधेयकाच्या समर्थनात २८८ तर विरोधात २३२ मतं पडली. सरकारने या विधेयकाचा दावा मुसलमान समाजाच्या हितासाठी असल्याचा केला आहे. मात्र, विरोधी पक्षांनी या विधेयकाचा निषेध केला आहे.

वक्फ संपत्तीचे विधेयक म्हणजे हिंदूंच्या डोळ्यात धूळफेक आणि मुस्लिमांचे… ‘सामना’तून हल्लाबोल सुरूच

लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. बुधवारी दुपारी 12 वाजता सादर केलेल्या या बिलावर रात्री उशीरापर्यंत मोठा गोंधळ सुरु होता. या विधेयकाच्या समर्थनात 288 मतं पडली. तर विरोधात 232 मतं पडली. यानंतर वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केलं. आता यावर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली आहे. वक्फ संपत्तीचे विधेयक ही हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक आणि मतांसाठी सरळ मुस्लिमांचे लांगूलचालन आहे, अशा शब्दात सामना अग्रलेखातून घणाघात करण्यात आला.

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून वक्फ दुरुस्ती विधेयकावर जोरदार टीका करण्यात आली. मोदी-शहांना आज मुसलमानांची चिंता वाटते व मुस्लिमांच्या हक्कांचे आम्ही रक्षण करू असे ते म्हणतात आणि त्या बदल्यात वक्फ बोर्डाच्या ताब्यातील अडीच लाख कोटी किमतीच्या संपत्तीवर त्यांचा डोळा आहे. या संपत्तीचे रक्षण करू असे ते म्हणतात. म्हणजे नक्की काय? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.

अडीच लाख कोटी किंमतीच्या संपत्तीवर त्यांचा डोळा

वक्फ सुधारणा विधेयक सरकारने मंजूर करून घेतले. लोकसभेत विधेयकाच्या बाजूने 288 आणि विरोधात 232 मते पडली. बहुमताचा आकडा 273 आहे. त्यामुळे फार मोठ्या फरकाने सरकारने विजय मिळवला असे नाही. सरकारने हर तऱहेचे प्रयत्न करूनही त्यांचा बहुमताचा आकडा 300 पार होत नाही. नितीश कुमार हे पूर्णपणे बधिर अवस्थेत पोहोचले आहेत व चंद्राबाबू यांना केंद्राकडून बऱ्यापैकी निधी मिळत असल्याने सरकार उभे आहे. 232 विरोधकांची एकजूट लोकसभेत दिसली ही बाब सरकारसाठी चिंताजनक आहे. वक्फ सुधारणा विधेयक हे मुसलमानांच्या हितासाठी आणल्याचा दावा गृहमंत्री अमित शहा यांनी केला. विरोधी पक्ष मुस्लिमांचे तुष्टीकरण करीत आहेत व त्यामुळे समाजात दुफळी माजेल असे ते म्हणाले. लोकसभेत अमित शहांचे भाषण ज्यांनी ऐकले त्यांनाच समजेल की, सध्या मुस्लिमांचे लांगूलचालन कोण करीत आहे? शहा यांचे संपूर्ण भाषण म्हणजे, ‘‘आम्हीच आता मुस्लिमांचे एकमेव मसिहा आहोत. काँगेस, मुस्लिम लीगची जागा आम्ही घेतली आहे,’’ असेच दर्शविणारे होते. मोदी-शहांना आज मुसलमानांची चिंता वाटते व मुस्लिमांच्या हक्कांचे आम्ही रक्षण करू असे ते म्हणतात आणि त्या बदल्यात वक्फ बोर्डाच्या ताब्यातील अडीच लाख कोटी किमतीच्या संपत्तीवर त्यांचा डोळा आहे. या संपत्तीचे रक्षण करू असे ते म्हणतात. म्हणजे नक्की काय? शहा यांनी सांगितले, 2025 पर्यंतच्या कोणत्याही मशिदी, दर्गे, मदरसे वगैरेंना सरकार हात लावणार नाही, पण ज्या मोकळय़ा जमिनी आहेत त्या विकून तो पैसा गरीब मुसलमान महिलांना वाटू. म्हणजे अखेर सत्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेच, असे सामनात म्हटले आहे.

हिंदू पंडितांची चिंता करा

खरेदी-विक्रीची बात निघालीच. जमिनी विकणार हे त्यांनी सांगितले. आता हे व्यापारी जमिनी विकणार कोणाला? याचे उत्तर जनतेला हवे आहे. देशात विकणारे आणि विकत घेणारे दोन-चार लोक आहेत. व्यापारी मंडळाचे असे धोरण असते की, 500 कोटींची लूट करायची असेल तर त्या लुटीतले पाच-दहा कोटी गरीबांच्या तोंडावर मारायचे. वक्फ बोर्डाचा सारा खेळ हा हिंदुत्व, गरीब मुसलमानांना न्याय मिळावा यासाठी नसून तो वक्फ बोर्डाच्या रिकाम्या जमिनींसाठी सुरू आहे. वक्फ बोर्डाच्या संपत्तीचे रक्षण करणाऱ्यांनी देशाची संपत्ती लाडक्या उद्योगपतींना विकली. विमानतळांपासून धारावीपर्यंत सगळे विकल्यावर हे आता वक्फ मंडळाच्या जमिनींचा धंदा करायला निघाले आहेत. वक्फच्या जमिनीचा विषय राष्ट्रहितासाठी घेतला असे मोदी सरकार सांगत आहे, पण लडाखमध्ये घुसून चीनने आपल्या 40 हजार वर्ग मैल जमिनीवर ताबा मिळवला आहे, त्याचे काय? आधी त्या जमिनीची चिंता करा. कश्मीर खोऱयातील ‘पंडित’ मंडळींची घरवापसी अद्यापि झालेली नाही. त्यांचा जमीन-जुमला, घरे त्यांना मिळत नाहीत. त्या हिंदू पंडितांची चिंता करा, पण हिंदू समाजाची चिंता न करता हे लोक मुसलमान लांगूलचालनाच्या मार्गाने निघाले आहेत व दुसऱयांना हिंदुत्व वगैरे पाठ शिकवत आहेत. सगळा मामला हा लाखो कोटींच्या संपत्तीचा आहे व कायदा बदलून ती संपत्ती विकण्याचा हा डाव आहे. वक्फ बोर्डात आता दोन गैर मुसलमान असतील. मात्र गृहमंत्री म्हणतात तसे होणार नाही, असेही त्यांनी यात नमूद केले.

मग हिंदू मंदिरांच्या बोर्डातही दोन-चार गैर हिंदू असतील काय? मुंबईतील मराठी माणसांच्या जमिनी मुसलमान नव्हे, तर वेगळेच गैर हिंदू हडपत आहेत व हे लोक भाजपला आर्थिक पाठबळ देतात. हे लोक बांधकाम क्षेत्रात आहेत व त्यांच्या गृहसंकुलात मांस-मच्छी खाणाऱ्या हिंदूंना जागा देत नाहीत. हे हिंदूंच्या अधिकाराचे आक्रमण नाही काय? संपूर्ण देश शाकाहारी करायचा व त्याच वेळी जमिनी, पैशांची लूट करून खायचे हे अमानवी धोरण आहे. वक्फच्या जमिनीच्या बिर्याणीची शिते त्यांच्या गालफटात अडकली तरी अल्लाचा प्रसाद म्हणून ते मान्य करतील व बाहेर येऊन हिंदुत्वाच्या चिपळ्या वाजवतील. वक्फ बोर्डाची संपत्ती ही दानधर्मातून जमा झाली आहे. लोक अल्लाच्या नावाने दान देतात व अनंत काळापासून ही संपत्ती जमा होत आहे. आता या सर्व संपत्तीची ‘डिजिटल नोंद’ होईल. इतर बऱ्याच गोष्टी नव्या कायद्यात समाविष्ट आहेत. कोणत्याही नव्या विधेयकात अशा सुधारणा केल्या जातात, पण हे वक्फ संपत्तीचे विधेयक संसदेत आणायचा मुहूर्त निवडला तो मजेशीर आहे. अमेरिकेचे प्रे. ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के आयात शुल्क लादले या विषयावरून लोकांचे लक्ष हटविण्यासाठी मोदी सरकारने वक्फ संपत्तीचे विधेयक आणले. प्रे. ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्काचा भारताच्या उद्योगावर परिणाम झाला आहे. शेअर बाजार आणि रुपया कोसळून पडला. त्यामुळे महागाई, बेरोजगारीचा प्रश्न उफाळून येईल. त्यामुळे हे विधेयक आणून मोदी सरकारने त्यांचा आवडता हिंदू-मुसलमानांचा खेळ सुरू केला आहे. वक्फ संपत्तीचे विधेयक ही हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक आणि मतांसाठी सरळ मुस्लिमांचे लांगूलचालन आहे. भ्रष्टाचाराला कायद्याचा मुलामा देण्याचा हा धार्मिक खेळ आहे., असेही सामनात म्हटले आहे.

अंजली दमानिया, जरांगे आणि धनंजय देशमुख पहिल्यांदाच एकत्र अर्धा तास खलबतं; ते कर्तेकर्वीते थेट ही मोठी मागणी

0

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. हे प्रकरण सध्या राज्यभर गाजत असून, वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात सुरुवातीपासून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान आज अंजली दमानिया या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, यावेळी तिथे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील उपस्थित होते. तिघेही एकत्र भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे, तिघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. आपण मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये आल्याचं दमानिया यांनी यावेळी म्हटलं.

नेमकं काय म्हणाल्या दमानिया?

गेल्या दोन महिन्यांमध्ये जालन्याचे शेतकरी मला दोनदा येऊन भेटून गेले होते. त्यांना मी अश्वासन दिलं होतं की मी तिथे येते. काय सत्य परिस्थिती आहे त्याची पाहाणी करते. आणि तुमच्याकडून माहिती घेते, कारण मुंबईपर्यंत सर्वांनाच पोहोचता येत नाही. म्हणून मी इथे येण्याचं ठरवलं होतं आणि जालन्यात आले म्हणून मी दादांची देखील भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, असं अंजली दमानिया यांनी यावेळी म्हटलं आहे.

जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपीला पकडण्याच्या मागणीसाठी जे आक्रोश मोर्चे निघाले त्या प्रत्येक मोर्चाला मनोज जरांगे पाटील उपस्थित होते. दरम्यान आजच्या या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोठी मागणी केली आहे. संतोष देशमुख प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करायल हवे. कारण तेच कर्तेकर्वीते आहेत, असा आरोप यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.