Home Blog Page 131

“शासनाची सवलत, टॅक्स नाही तरीही ते…”; दीनानाथ रुग्णालय प्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्र्या ची ही प्रतिक्रिया

0

धर्मादाय आयुक्त अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांना शासनाची सवलत आहे. त्यांना कोणताही टॅक्स नाही, असं असताना देखील ते गरिबांची सेवा करत नाहीत म्हणून अशा पद्धतीचा रोष या रुग्णालयांविरोधात वाढत आहेत, असं म्हणत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावर भाष्य केलं आहे. मंत्री मुश्रीफ म्हणाले, या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना देखील लागू करत नाहीत. माझी विनंती आहे की, त्यांनी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू करून घ्यावी. जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत. मीच समिती नेमणार मीच चौकशी करणार तर दोषी कसं होणार?

अशा शब्दात हॉस्पिटलच्या समितीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त करत संशय व्यक्त केला. त्या महिलेला दाखल करून उपचार केले असते तर काय झालं असतं? त्यांनी माणुसकीच्या भूमिकेतून बघणं आवश्यक आहे. मुंबईतल्या कोणत्याही दवाखान्यामध्ये आयुष्यमान भारत जीवनदायी योजना नाही, असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया मी ऐकली नाही. मात्र अजितदादा याबाबत बोलले आहेत. सध्याची आर्थिक परिस्थिती बघता आता कर्जमाफी शक्य नाही. पण त्यांनी कधीट कर्जमाफी करणार नाही असं म्हटलं नाही. आर्थिक परिस्थिती वर्ष दोन वर्षांमध्ये आमची नक्की सुधारणार, सगळ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण होणार असल्याचा विश्वास यावेळी मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि आणि मंत्री उदय सामंत यांच्या भेटीवर मुश्रीफ म्हणाले, राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देणार असतील तर चांगलंच आहे. तसंच यावेळी शक्तिपीठ महामार्गाबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. शक्तिपीठ महामार्गाबद्दल एकनाथ शिंदेंनी अधिसूचना रद्द केली होती.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्हाला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे. पण लादायचा नाही त्यामुळे शेतकऱ्यांची संमती घेऊनच शासन शक्तीपीठ महामार्ग करेल असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान, राजू शेट्टी अजित पवारांच्या बाबत धादांत खोटे बोलत आहेत.

मी देखील त्या गाडीमध्ये होतो. अजितदादांनी केवळ विचारलं ही गाडी कुणाची ही गाडी पालकमंत्र्यांची असेल तर त्यांना कोणती गाडी दिली. चुकीचं वक्तव्य करून गैरसमज तयार करणे हे काही बरोबर नाही. या शब्दात राजू शेट्टी यांना मुश्रीफ यांनी सुनावलं.

शिवसेनेच्या फुटीत तुमची भूमिका होती का? तुम्ही शिंदेंना मदत केली की नाही; गडकरींनी दिले हे संकेतात्मक उत्तर

0

महाराष्ट्राचे राजकारण ज्या घटनेमुळे बदलून गेलं. त्यानंतर जे राजकीय भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात झाले, त्या शिवसेनेच्या फुटीबद्दल केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला. शिवसेना फुटणार याची थोडी माहिती मला होती, असे नितीन गडकरींनी एका मुलाखतीत सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एपीबी लाईव्ह वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत नितीन गडकरींनी शिवसेना फुटीसंदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले.

‘एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सोडणार, पक्ष फुटणार याची तुम्हाला आधीपासूनच माहिती होती का?’, असा प्रश्न नितीन गडकरींना विचारण्यात आला.

शिवसेनेच्या फुटीची गडकरींना माहिती होती का?

नितीन गडकरी म्हणाले, ‘या सगळ्या गोष्टींबद्दल थोडी माहिती तर होती. पण, मी यावर काही बोलणार नाही.’

‘महाराष्ट्रातील नेते म्हणून तुमची यात काही भूमिका होती का?’, असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला.

नितीन गडकरी म्हणाले, ‘बघा, पक्षामध्ये आम्ही काय बोललो आणि काय केलं, हे मुलाखतीमध्ये बोलणे; हे पक्षशिस्तीला धरून नाहीये.’

या उत्तरानंतर गडकरींना ‘पक्ष फोडायला तुम्ही एकनाथ शिंदेंना मदत केली की नाही, हे सांगा’, असं विचारण्यात आलं.

नितीन गडकरी म्हणाले, ‘आता मी याबद्दल कोणतीही टिप्पणी करणार नाही’, असे उत्तर नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या फुटीबद्दल दिले.

पुण्यात खळबळ! हात-पाय कापले, डोकंही धडावेगळं, भोसरीत हादरवून टाकणारा खून

0

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरामध्ये एका दगडखाणीत एका हात पाय आणि मुंडके कापून टाकलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. गोडाऊन चौक येथून काहीशा अंतरावर असलेल्या दगड खाणीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच दिघी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत व्यक्तीजवळ एक मोबाईल आढळून आल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवली आहे.

सिताराम ढाले राहणार नांदगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव वय 42 वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती सध्या भोसरीतच राहात होती. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सिताराम प्रभू ढाले हा गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह दगडखाणीत आढळून आला आहे. सिताराम प्रभू ढाले या व्यक्तीचा खून कुणी व का केला? हे अद्याप समजू शकलेले नाही. दिघी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अजित पवारांकडून स्वतःच्याच संचालकांचे वाभाडे गैरकृत्य उदाहरणे अन् विरोधक या जाचकांनाच अध्यक्ष म्हणून जाहीर

0

इंदापूर तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः सभासद असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर असलेल्या संचालकांनी कशा पद्धतीने गैर कारभार केला, याची उदाहरणे खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी देत स्वतःच्याच नेतृत्वाखालील संचालकांचे वाभाडे सर्व सभासदांसमोर काढले. एवढेच नाही तर आत्ता सत्तेवर असलेल्या एकाही संचालकाला संधी मिळणार नाही, असे स्पष्ट करत कारखान्याचे विरोधक असलेले पृथ्वीराज जाचक हेच पुढील पाच वर्षे कारखान्याचे अध्यक्ष असतील, असे जाहीरही करून टाकले.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक १० वर्षानंतर सोमवारी ७ तारखेपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर अचानक घडामोडी घडल्या आणि कारखान्यातील विरोधक असलेले शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष तथा कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यासोबत शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकी घेतली. या बैठकीमध्ये पृथ्वीराज जाचक यांच्याकडे संपूर्ण पाच वर्ष कारखान्याची सूत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी पृथ्वीराज जाचक यांनी रविवारी म्हणजे आज आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यास आपण स्वतः उपस्थित राहून हा निर्णय जाहीर करू असे अजित पवारांनी सांगितले. आणि त्यानंतर आज अजित पवार हे या मेळाव्यासाठी भवानीनगर येथे आपला नियोजित दौऱ्यातील इतर काही कार्यक्रम रद्द करून पोहोचले.

ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार कालवश ; ‘पद्मश्री’ने सन्मानित दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरव

0

देशभक्तिपर चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवत ‘भारतकुमार’ अशी उपाधी मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक मनोजकुमार (वय ८७) यांचे गुरुवारी पहाटे कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले. अभिनेते मनोजकुमार यांनी आपल्या चित्रपटातून विविध ज्वलंत समस्या प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता. ५) विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हृदयविकाराच्या तक्रारी आणि यकृताच्या समस्यांमुळे मनोजकुमार गेले काही काळ आजारी होते. त्यांच्यावर कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मनोरंजन क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात आला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली. सध्याच्या पाकिस्तानमध्ये असलेल्या अबोटाबाद येथे मनोजकुमार यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी होते. फाळणीनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय दिल्लीला स्थायिक झाले. तिथेच त्यांनी शिक्षण घेतले आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

१९६५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शहीद’ चित्रपटाबरोबरच हिमालय की गोद में (१९६५), गुमनाम (१९६५), उपकार (१९६७), पत्थर के सनम (१९६७) पूरब और पश्चिम (१९७०), बेईमान (१९७२), शोर (१९७२), रोटी, कपडा और मकान (१९७४), संन्यासी (१९७५), क्रांती (१९८१) असे काही त्यांचे गाजलेले चित्रपट. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि अशोक कुमार यांचे ते निस्सीम चाहते होते. दिलीप कुमार यांचा ‘शबनम’ हा चित्रपट त्यांनी पाहिला आणि तेव्हाच त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये येण्याचा निर्णय घेतला.

‘शबनम’ चित्रपटामध्ये दिलीप कुमार यांचे नाव मनोज होते. त्यामुळे त्यांनी आपले नाव मनोजकुमार असेच ठेवले. देशभक्तिपर चित्रपटांची अधिक निर्मिती केल्याने त्यांना ‘भारतकुमार’ ही उपाधी देण्यात आली आणि त्यानंतर ते भारतकुमार म्हणूनही प्रसिद्ध झाले. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील जया भादुरी, हेमामालिनी, वहिदा रेहमान, आशा पारेख, वैजयंती माला अशा आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर काम केले. ‘उपकार’ या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचा हा चित्रपट कमालीचा सुपरहिट ठरला. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. भारतीय चित्रपटसृष्टीत अमूल्य योगदानासाठी त्यांना १९९२ मध्ये ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले, तर २०१५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंभर हेक्टर पर्यंत नुकसानीचा प्राथमिक अंदाज; कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येणार

0

पुणे जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारेभर हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला, गहू यांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या जिल्हा अधिक्षक संजय काचोळे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील द्राक्ष बागांचा हंगाम जवळपास साठ टक्के संपला आहे, शेतात द्राक्ष आहेत. शेतात असलेल्या द्राक्षांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यावर्षी द्राक्षाचा सुरुवातीचा हंगाम चांगला झाला. रोगांचा प्रादुर्भावही कमी झाला आणि बाजारभाव देखील समाधानकारक मिळाला. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी द्राक्षाची छाटणी उशिरा केली, त्यांच्या बागा अवकाळी पावसात सापडल्या आहेत.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या काढणी सुरू असलेल्या कांदा, गहू आणि कोथिंबिरीसह इतर पालेभाजी, फळभाजीला या पावसामुळे फटका बसला आहे. शेतीच्या मशागतीच्या काळात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची कामे काही दिवस खोळंबणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचा कृषी विभागाकडून आढावा घेण्यात आला.

त्यामध्ये अंदाजे शंभर हेक्टर नुकसान झाले असू शकते असा अंदाज काचोळे यांनी व्यक्त करून पुढील काही दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची आकडेवारी समोर येईल. पंचनामे तातडीने केले जातील, असेही काचोळे यांनी सांगितले.

राज्यातील ‘या’ भागात अवकळीचा यलो अलर्ट जारी; वाचा सविस्तर IMD रिपोर्ट

0

मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यावर अवकाळीचं संकट घोंगावत आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल होताना दिसतो आहे. होळीनंतर अवकाळी पाऊस बरसत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र, मध्य विभाग आणि मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात IMD ने ‘यलो अलर्ट’  जारी केला आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश आणि कर्नाटकदरम्यान कमी हवामानाचा पट्टा निर्माण झालाय. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात बाष्प होत असल्याने राज्यात पावसाला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरमध्ये आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पाऊस होत असल्याने उष्णतेचा पारा कमी झाला आहे. त्यामुळे उष्णतेच्या दाहातून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मागील काही दिवसांपासून हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. होळीनंतर उष्णता वाढणार असा अंदाज होता. मात्र, तसेच न होता होळीनंतर अवकाळी पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झाले त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळीच्या सरी बरसत आहेत.

राज्यातील काही भागात शुक्रवारी तर वादळी वाऱ्यासह अवकाळीने हजेरी लावली. यावेळी वाऱ्याचा वेग वाढलेला होता. अवकाळी पावसाने पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले.

अनेक भागांमध्ये गारपिट देखील मोठ्या प्रमाणात झाली असून फळ बागांचे नुकसान झाले आहे. अजूनही अवकाळीचे ढग हे राज्यात पाहायला मिळत आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. IMD ने या भागात यलो अलर्ट  जारी केला आहे.

मराठवाड्यात या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होताना दिसत आहेत. दुसरीकडे आज कोकणात उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा हा देण्यात आला आहे. काल मुंबईच्या उपनगरांमध्ये वातावरण बदलल्याचे चित्र बघायला मिळाले. मोठ्या प्रमाणात वारे सुटले आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले.

शेतकऱ्यांना सल्ला

* पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी व मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

‘दूध का दूध, पानी का पानी’ समोर येईल., गर्भवती महिलेच्या मृत्यूबाबत आमदार गोरखे काय म्हणाले?

0

पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहे. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. त्या प्रकारावरुन मंगेशकर रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. या प्रकरणावर आमदार अमित गोखले यांनी रुग्णालयाच्या अहवालात स्वत:वर बचाव करण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणात डॉ. घैसास आणि केळकर यांचे सीडीआर तपासा मग ‘दूध का दूध पानी का पानी’ समोर येईल, असे म्हटले आहे.

आमदार गोरखे काय म्हणाले?

अमित गोरखे म्हणाले, मी आता रुग्णालयाचा अहवाल पाहिला. त्यांची चूक झाली आहे पण स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांनी अहवाल दिला आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी अहवाल दिला आहे. रुग्णाला कॅन्सर होता असे म्हटले तर एखादी महिला आठ महिन्यांची गर्भवती कशी राहू शकते? या सर्व प्रकारात IBF द्वारे गर्भधारणा झालेली आहे. रुग्णालयाने दहा लाख मागितले हे स्पष्ट आहे. त्याची पावती आहे.

महाराष्ट्रातून अनेक फोन येत आहेत. रुग्णालयाची अनेक प्रकरणे समोर येऊ शकतात. माझा घैसास यांचा विरोध नाही, त्यांच्या वृत्तीला विरोध असल्याचे आमदार अमित गोरखे म्हणाले. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार जणांची समिती गठीत केली आहे. त्यातून सत्य समोर येणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून या समितीची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात समितीची घोषणा केली आहे. पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी करण्यात येईल. या समितीत उपसचिव, सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी, मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय समूहाचे अधीक्षक, तसेच विधि व न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव असतील.

महाराष्ट्रातील हॉस्पिटलची बैठक घेणार

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रकार घडला आहे. तो अत्यंत गंभीर आहे. पैशांच्या अभावी त्यांच्यावर उपचार न करता रुग्णाला बाहेर काढण्यात आले. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. या प्रकरणात धर्मादाय आयुक्तांना आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्रात अशा घडू नयेत म्हणून याची दखल घेतली पाहिजे. मुंबई गेल्यानंतर चॅरिटी कमिशनर महाराष्ट्रातील हॉस्पिटल मालकांची बैठक घेणार आहे, असे अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

2 बलात्कार, 14 विविध गुन्हे. प्रसिद्ध रिल्स स्टार सुरेंद्र पाटीलला अटक, नाशिकमध्ये पोलिसांनी अशाप्रकारे रचला सापळा

0

डोंबिवलीतील दोन बलात्कार प्रकरणांमध्ये फरार असलेला आणि सोशल मीडियावर ‘रिल्स स्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेला सुरेंद्र पाटीलला अखेर पोलिसांनी अट केली आहे. सुरेंद्र पाटील याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नाशिकमधून अटक केली आहे. मानपाडा आणि टिळकनगर पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल होते. तब्बल पाच तपास पथके त्याच्या शोधात होती.

दोन वेगवेगळे बलात्काराचे गुन्हे दाखल

सोशल मिडिया ‘रिल्स स्टार’ सुरेंद्र पांडुरंग पाटील याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नाशिकमधून अटक केली आहे. डोंबिवलीतील मानपाडा आणि टिळकनगर पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरोधात दोन वेगवेगळ्या बलात्काराचे गुन्हे दाखल होते. गुन्हे दाखल झाल्यापासून तो फरार होता. मानपाडा पोलीस ठाण्यात एका तरुणीला मुंबई एअरपोर्टमध्ये एअर होस्टेस म्हणून नोकरीला लावतो असे सांगत बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.

मशीन परत देण्याच्या बहाण्याने वारंवार बलात्कार

तर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात एका घटस्फोटीत महिलेने सुरेंद्र पाटीलविरोधात तक्रार केली होती. त्या पीडित महिलेला व्यवसायात नुकसान झाले होते. ती सुरेंद्र पाटील यांच्या गाळ्यात व्यवसाय करत होती. त्याने त्याच्या गाळ्याचे थकवलेले भाडे माफ केले होते. यानंतर त्याने त्या महिलेला द्रोण व कागदाचे प्लेट बनवण्याची मशीन परत देण्याच्या बहाण्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. अशा स्वरुपाचा एक गुन्हा दाखल होता.

हे दोन गुन्हे दाखल होताच सुरेंद्र पाटील हा डोंबिवलीमधून फरार होता. मात्र तो नाशिकमधील हॉटेल सेलिब्रेशनमध्ये लपून बसल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या खबऱ्याकडून खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून खंडणी पथकाने इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने त्याला काल रात्री ८ वाजता बेड्या ठोकण्यात आल्या. त्याला पुढील तपासासाठी मानपाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

तब्बल 14 गुन्हे दाखल

विशेष म्हणजे सुरेंद्र पाटील यांच्या विरोधात याआधी देखील कल्याण डोंबिवलीतील विविध पोलीस ठाण्यात फसवणूक, वीज चोरी, अवैधरित्या घातक शस्त्र, बंदूक बाळगणे असे तब्बल 14 गुन्हे दाखल आहेत. इतकेच नाही तर या आधी पोलिसांनी त्याला दीड वर्षांसाठी तडीपार देखील केले होते मात्र तो न्यायालयमधून तडीपारी रद्द करत पुन्हा या ठिकाणी वावरत होता. सध्या त्याच्या अटकेने पोलिसांना मोठे यश आले आहे. या नराधमाने किती महिलांवर अत्याचार केले याचा तपास पोलीस करत आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिशय असंवेदनशिलतेनं महिलेचा मृत्यू, देवेंद्र फडणवीसांनी घेतला हा मोठा निर्णय

0

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर स्वरुपाचा आरोप करण्यात येत आहे. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबाकडे दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली, पैसे न भरल्यानं या महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही, योग्यवेळी उपचार न मिळाल्यानं या महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप रुग्णालयावर करण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. तनिषा सुशांत भिसे असं मृत्यू झालेल्या या महिलेचं नाव आहे. दरम्यान यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, असवेंदनशिलतेचा परिचय या घटनेतून आपल्याला पाहायला मिळतो. खरं म्हणजे दीनानाथ मंगेशकर हे अतिशय रेप्युटेड अशा पद्धतीचं हॉस्पिटल आहे. स्वत: लता दीदींनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आणि मंगेशकर कुटुंबीयांनी हे रुग्णालय उभं केलं. तिथल्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशिलतेनं प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला त्या ठिकाणी दाखल करून घेण्यास नकार दिला. किंवा अधिकचे पैसे मागितले अशाप्रकारचा जो विषय आलेला आहे,

ही बातमी समोर आल्यानंतर लोकांमध्ये अतिशय चिड आहे. किमान धर्मादाय रुग्णालयांनी तरी आपली भूमिका योग्य पद्धतीनं निभावली पाहिजे, अशा प्रकारची आपल्या सर्वांची अपेक्षा आहे आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेव्हल कमिटी तयार केलेली आहे. जी या घटनेचा तर तपास करेलच त्यासोबतच अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, म्हणून धर्मादाय रुग्णालयावर आपल्याला कशाप्रकारे नियंत्रण ठेवता येईल, विशेष: मेडिकल इथिक्स पैशांची चिंता न करता कशाप्रकारे आपल्याला त्यांना दाखल करून घेणं हे गरजेचं होतं. त्यामुळे इथिक्सचं पालन होतं की नाही यावर आपण लक्ष ठेवणार आहोत, आमचा मुख्यमंत्री कक्ष आहे, त्यांनी सुद्धा स्वत: या प्रकरणात लक्ष घातलं होतं, परंतु दुर्दैवानं योग्य प्रतिसाद हा त्या ठिकाणी रुग्णालयाकडून मिळालेला नाही. त्यामुळे पुढील काळात अशा घटना घडू नये, यासाठी अतिशय कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.