Home Blog Page 125

भाजपची आगामी मोहिमेसाठी फौज तयार; भाजपची स्वबळाची तयारी? दीड कोटी सदस्य संख्या! निवडणूकीत सदस्याला या गोष्टी पोहोचवणार!

0

भारतीय जनता पक्षाने नुकताच महाराष्ट्रातील सदस्य नोंदणीचा दीड कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्रात सदस्यसंख्येचा असा विशाल आकडा आतापर्यंत कोणत्याही पक्षाला गाठता आला नव्हता, त्यामुळे ही भाजपची ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.इतकेच नाही तर भाजपला लोकसभेमध्ये मिळालेल्या मतांपेक्षा जास्त सदस्यांची नोंदणी झाली आहे. भाजपला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 1 कोटी 49 लाख 66 हजार 577 मते मिळाली होती. तर आता दीड कोटी सदस्य संख्या पूर्ण झाली आहे.

ही ऐतिहासिक कामगिरी करतानाच भाजपने आगामी निवडणुकांसाठी अगदी बारकाईने प्लॅनिंग केल्याचे दिसून येते. भाजपने महाराष्ट्रातील आता प्रत्येक 7 मतदारांमागे एक सदस्य उभा केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 9.59 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या 4.59 कोटी आणि महिला मतदारांची संख्या 4.64 कोटी आहे. तृतीयपंथीय मतदारांची संख्या 6 हजार आहे.

आता भाजपचे दीड कोटी सदस्य पूर्ण झाले आहेत. म्हणजे प्रत्येक 7 मतदारांमागे भाजपचा एक सदस्य असणार आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्ही आठ जण एकत्र उभे असाल तर त्यातील एक जण भाजपचा सदस्य असणार आहे. या सदस्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर अशा सगळ्या गोष्टी पक्षाकडे आहेत. निवडणूक काळात या सदस्याला धोरणे, प्रचाराचे मुद्दे, नेत्यांची भाषणे अशा गोष्टी पोहोचवल्या जाणार आहेत.

भाजपने सुरु केली स्वबळाची तयारी :

भाजप हा ‘जगातला सर्वांत मोठी सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणवून घेत असतो. चीनच्या कम्युनिस्ट पक्षापेक्षाही ही सदस्य संख्या जास्त असल्याचा दावा पक्षातर्फे केला जातो आहे. महाराष्ट्रात यंदा लोकसभेत कामगिरी असमाधानकारक झाली तरी मागील निवडणुकीतील मतदानापेक्षा 775 मते जास्त मिळाली होती. विधानसभेत मात्र भरभरून यश मिळालेच शिवाय एक कोटी 72 लाख 93 हजार 650 मते झोळीत पडली.

मात्र या मतांमध्ये शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या मतांचाही वाटा होता. त्यामुळे स्वत:ची ताकद वाढविण्यावर भाजपने भर दिला. आधी राज्यात एक कोटी सदस्य संख्या करण्याचे उद्दिष्ट दिले होते. हे उद्दिष्ट टप्प्यात दिसताच भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी 50 लाखांनी वाढवून दीड कोटींवर नेले. आता हेही टार्गेट पूर्ण झाले आहे. नागरिकांना मिस कॉल देणे किंवा ऑनलाइन नोंदणी करून पक्ष सदस्यत्व घ्यायचे होते.

SSPU Logistics and Supply Chain Management Students Visit Brembo Brakes

0

Symbiosis Skills & Professional University Logistics and Supply Chain Management Students Visit Brembo Brakes India Private Limited Pune, 10th April 2025 – The Logistics and Supply Chain Management department of Symbiosis Skills and Professional University (SSPU) recently organized an industrial visit to Brembo Brakes India Private Limited. This company is a global leader in automotive braking systems. The visit provided students with an opportunity to learn about Brembo’s state-of-the-art production facilities. The visit offered students a deep understanding of the complex supply chain processes in the automotive industry.

Brembo Brakes India, known for its high-performance braking systems, allowed students to closely observe these systems. From raw materials to final product distribution, students gained insights into how production, technology, logistics, and supply chain management work together to ensure the performance and excellence of braking systems. They were also exposed to the system implemented at each stage of the supply chain, from procurement to distribution, which ensures effective coordination. Additionally, students learned about inventory management, supply chain optimization, and modern logistics strategies to streamline operations.

The design and production process of high-performance brake systems is tailored for some of the major global automotive brands. Geetanjali Shinde, Head of the Human Resources Department at Brembo Brakes India Private Limited, guided the students. The opportunity for students to interact with industry experts and learn how classroom knowledge can be transformed into practical application proved to be immensely valuable.

#SymbiosisUniversity #LogisticsEducation #IndustrialVisit #SupplyChainManagement #BremboBreaks #PracticalLearning #FutureReady

भारताचे स्पेशल विमान NIAचे अधिकारी अन् कमालीची गुप्तता; १७ वर्षांनंतर 26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात कसं आणलं

0

मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या तहव्वूर राणाला अखेर भारतात आणण्यात आलं आहे. तब्बल १७ वर्षांनी तहव्वूर राणाला भारतात आणले गेले. एनआयएचे आयजी बत्रांच्या नेतृत्वात विशेष पथकाने तहव्वूर राणाला भारतात आणले. आता तहव्वूर राणाची एनआयए मुख्यालयात चौकशी होणार आहे. मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या तहव्वूर राणाला 2009 साली अमेरिकेत अटक करण्यात आली होती. आता त्याला अमेरिकेतून भारतात आणण्यात येणार आहे. तहव्वूर राणाला अमेरिकेहून एका विशेष चार्टर्ड विमानाने नवी दिल्लीत आणण्यात आले. त्याचा अमेरिकेतून भारतात आणण्याचा प्रवास अत्यंत गुप्त ठेवण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, तहव्वूर राणाला अमेरिकेतील मियामी येथून एका बिझनेस जेटमधून नवी दिल्लीला आणण्यात आले. हे विशेष विमान ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील एका विमान चार्टर कंपनीकडून भाड्याने घेण्यात आले होते. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार, बुधवारी पहाटे २:१५ वाजता या विमानाने मियामीहून उड्डाण केले. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता हे विमान रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे पोहोचले. यानंतर सुमारे ११ तासांच्या विश्रांतीनंतर, गुरुवारी सकाळी ६:१५ वाजता हे विमान नवी दिल्लीसाठी रवाना झाले. त्यानंतर आज सायंकाळी ६:२२ वाजता ते दिल्लीतील पालम विमानतळावर लँड झाले.

Gulfstream G550 विमानातील खास सुविधा काय?

या विशेष मोहिमेसाठी Gulfstream G550 हे विमान वापरण्यात आले. हे विमान लांब पल्ल्याच्या आणि आरामदायक इंटीरियरसाठी ओळखले जाते. २०१३ मध्ये तयार झालेले हे विमान अल्ट्रा लाँग रेंज, मिड-साईज श्रेणीतील आहे. या विमानाच्या खिडक्या अंडाकृती असल्याने त्याची वेगळी ओळख आहे. या आलिशान विमानात जास्तीत जास्त १९ प्रवासी बसू शकतात. यामध्ये 9 मोठ्या सोफा-कम-बेड सीट आणि ६ स्लीपिंग बेड्सची सोय आहे. याव्यतिरिक्त, या विमानात वायरलेस इंटरनेट, सॅटेलाइट फोन आणि तसेच आधुनिक मनोरंजन प्रणाली यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

अमेरिकेच्या न्यायालयाने तहव्वुर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. यानंतर भारत सरकारसाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील होती. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित ठेवण्यासाठीच या विशेष चार्टर्ड विमानाचा वापर करण्यात आला. आता भारतात तहव्वुर राणाची चौकशी कशाप्रकारे चौकशी केली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण; काही सीलबंद पुरावेही सादर मारहाणीचा व्हिडिओ न्यायालयात सादर

0

मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाची सुनावणी येथील विशेष मकोका न्यायालयात गुरुवारी (ता. दहा) झाली. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर या प्रकरणातील मारहाणीचा व्हिडिओ सादर केला. पुढील सुनावणी २४ एप्रिलला होणार आहे.

सरपंच संतोष देशमुख यांचे चार महिन्यांपूर्वी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. या प्रकरणी आज विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ॲड. निकम म्हणाले, ”संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ आरोपींनीच रेकॉर्ड केलेला आहे, तो न्यायालयात सादर करण्यात आला.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा व्हिडिओ बाहेर प्रसारित होऊ नये, अशी विनंती करण्यात आली. आरोपी वाल्मीक कराड याच्यामार्फत सुटकेचा (डिस्चार्ज) अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये त्याचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. त्याच्या चल व अचल संपत्तीवर तपास सुरू आहे. आरोपी विष्णू चाटे सध्या लातूर कारागृहात असून, त्याला बीडमध्ये हलविण्याची मागणी त्याचे वकील ॲड. राहुल मुंडे यांनी केली. या खटल्याची पुढील सुनावणी २४ एप्रिलला होणार असून, त्याआधी फॉरेन्सिक पुरावे तपासून आरोपीच्या वकिलांना देण्यात येतील.”

काही सीलबंद पुरावे सादर

सरकारी पक्षातर्फे सादर करण्यात आलेले काही सीलबंद पुरावे न्यायालयात उघडण्यात येणार आहेत. या पुराव्यांमध्ये आरोपींचे जबाब, पंचनामे, शस्त्रे आणि जप्त साहित्याचा समावेश आहे. सीलबंद पुरावे न्यायालयासमोर उघडल्यानंतर ते आरोपींच्या वकिलांना दिले जाणार आहेत.

संपत्तीबाबत कराडकडून खुलासा नाही

आरोपी वाल्मीक कराडची चल-अचल संपत्ती जप्त करण्यात यावी, असा अर्ज सरकारी पक्षाकडून न्यायालयात देण्यात आला आहे. त्यावर वाल्मीककडून खुलासा दाखल करण्यात आला नाही. यावर रीतसर सुनावणी होईल. कराडसोबत इतर आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे. पुढील तपास पूर्ण झाल्यावर संपत्तीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे अॅड. निकम यांनी सांगितले.

जैन धर्माचे सगळेच लोक श्रीमंत? इन्कम टॅक्सच्या एकूण आकडेवारीत सुमारे 24 % इन्कम टॅक्सही भरतात; समुदाय श्रीमंतीचे हे रहस्य काय?

0

सर्वांपासून अलिप्त राहणाऱ्या जैन धर्माचे लोक त्यांच्या श्रीमंतीमुे नेहमीच र्चेतत असतात. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीवर नजर टाकली असता जैन धर्माचे लोक किती श्रीमंत आहेत याचा अंदाज येतो. भारतातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी  अनेक उद्योजक हे जैन धर्मीय आहेत. मात्र, फक्त हे उद्योजकच नाही तर जैन धर्माचे सर्वच लोक श्रीमंत असतात. जैन धर्माचे सगळेच लोक श्रीमंत का असतात? कुणीच गरीब का नसतात? जाणून घेऊया यांच्या श्रीमंतीचे रहस्य काय?

भारतातील सर्वात छोटी कम्युनिटी अर्थात लहान समुदाय असलेल्या जैन धर्मींयांकडे एवढे पैसा कुठून येतो? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मात्र, जैन धर्माच्या लोकांच्या वागण्यात आणि त्याच्या रोजच्या जीवन शैलीतच त्यांच्या गर्भ श्रीमंतीचे रहस्य दडलेले आहे.

भारतात पारसी आणि जैन या दोन समुदयाच्या लोकांची संख्या फारच कमी आहे. जैन धर्मात कुणीही गरिब  नसते. आकडेवारीवर नजर टाकली असता भारतात जैन धर्मीय लोकांची संख्या फक्त 0.3 टक्के इतकी आहे. असे असले तरीही या धर्माचे लोक सर्वाधिक कर भरतात. भारताच्या, इन्कम टॅक्सच्या एकूण आकडेवारीत सुमारे 24 टक्के इन्कम टॅक्स भरणारे लोक हे जैन धर्माचे आहेत.

भारतात पारसी आणि जैन या दोन समुदयाच्या लोकांची संख्या फारच कमी आहे. जैन धर्मात कुणीही गरिब  नसते. आकडेवारीवर नजर टाकली असता भारतात जैन धर्मीय लोकांची संख्या फक्त 0.3 टक्के इतकी आहे. असे असले तरीही या धर्माचे लोक सर्वाधिक कर भरतात. भारताच्या, इन्कम टॅक्सच्या एकूण आकडेवारीत सुमारे 24 टक्के इन्कम टॅक्स भरणारे लोक हे जैन धर्माचे आहेत.

गोल्ड इंडस्ट्री, डायमंड इंडस्ट्री, शेअर मार्केट, कमॉडिटी इंडस्ट्री, एयरलाइन इंडस्ट्री, मीडिया इंडस्ट्री, रीयल इस्टेट सेक्टर अशा अनेक क्षेत्रात  जैन समाजाची लॉबी पाहायला मिळते. या समाजाचे लोक नोकरी न करता पारंपारिक व्यवसाय पुढे नेतात. व्यवसायाच्या बाबतीतलं नियोजन ते खूप लहान वयातच शिकतात. यामुळे त्यांची प्रगती लवकर होते. प्रगती झाल्यावर हाती पैसासुद्धा लवकर येतो. जैन धर्माचे लोक कोणतेही व्यसन करत नाहीत. चैनीच्या गोष्टी, पार्टी, मौज मजा यावर जैन धर्मीचे लोक पैसा खर्च करत नाही. यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होते.  आपल्याकडचा पैसा ते वेगवेगळ्या व्यवसायामध्ये गुंतवतात. यामुळे जैन धर्मीय विविध व्यवसायाच्या माध्यमातून पैशाला पैसा जोडत राहतात.

जैन धर्मीय फक्त पैसे कमवून नाही, तर नाव कमवून, धर्म प्रतिष्ठा आणि स्वास्थ्य जपून सर्व बाजूने श्रीमंत असतात. जैन धर्माचे लोक फक्त स्वत:च्या प्रगतीवर फोकस करत नाहीत. जैन धर्मातील लोक त्यांच्या समाज बांधवांना देखील व्यवसायात प्रगती करण्यासाठी मदत करतात. यामुळेच जैन धर्मात कुणाही गरीब नाही.

मंगेशकर रुग्णालय प्रकरणात भाजप आमदाराचा अपेक्षित यूटर्न! आधी आरोप नंतर प्रशंसा पडद्यामागे काय घडतंय? जयंत पाटील यांचा सवाल

0

भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. असाच आरोप आमदार अमित गोरखे यांनी केला होता. आमदारांनी आरोप केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आणि संबंध महाराष्ट्रात या घटनेबाबत हळूहळू व्यक्त करण्यात आली. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय विरोधात अनेक संघटना आणि पक्षांनी निषेध नोंदवत आंदोलन देखील केली.

या सगळ्या प्रकरणाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले आमदार गोरखे यांचे वेगवेगळे दोन स्टेटमेंट असलेले व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. या प्रकरणात अमित गोरखे हे यूटर्नन का? मारत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

जयंत पाटील यांनी ट्विट केलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आमदार अमित गोरखे हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय पद्धतीने चालवलं जात असताना देखील अत्यावश्य असलेल्या रुग्णाला उपचार न देण्याचा गुन्हा रुग्णालयाने केला असल्याचा आरोप गोरखे यांनी केला होता.

काही दिवसानंतर गोरखे यांनी माध्यमांशी बोलताना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात चांगले असल्याचा दावा करत डॉक्टर घैसास यांना या प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्याचा प्रयत्न गोरखे यांनी केल्याचा पाहायला मिळालं. गोरखे यांच्या या बदललेल्या भूमिकेवरून जयंत पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत

उद्योगात झाली १० टक्क्यांनी वाढ, ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर’ ने केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष

0

पुणे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्र गतिमान होत असून आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये कंपन्यांनी त्यांच्या वृद्धीत सरासरी १०.३६ टक्के वाढ असल्याचे नमूद केले आहे. आर्थिक वर्षात २०२४-२५ हे जिल्ह्याला उद्योग क्षेत्रासाठी कसे होते समजून घेण्यासाठी ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर’ (एमसीसीआयए) कडून नुकतेच एक सर्वेक्षण घेण्यात आले.त्यात उत्पादन, सेवा आणि व्यापार क्षेत्रातील १५२ कंपन्यांनी सहभाग घेतला होता.

सर्वेक्षणानुसार, सहभागी कंपन्यांपैकी ३१ टक्के कंपन्या निर्यात क्षेत्रातील आहेत. यापैकी ७० टक्के कंपन्यांनी निर्यातीत वाढ झाल्याचे सांगितले. संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रांनी वाहन उद्योगाच्या तुलनेत अधिक वाढीची अपेक्षा दर्शवली आहे. उद्योग प्रकारानुसार उत्पादन क्षेत्राला ११.५५ टक्के वाढीची अपेक्षा आहे, तर व्यापार क्षेत्रात ९.७८ टक्के आणि सेवा क्षेत्रात ९.५७ टक्के वाढीचा अंदाज आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी (एमएसएमई) या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रात ‘सावध पण सकारात्मक’ असा दृष्टिकोन दिसून येतो, असे एमसीसीआयएने नमूद केले आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांचे क्षेत्र

– वाहन उद्योग

– संरक्षण

– इलेक्ट्रॉनिक्स

– आयटी

– एआय

– अन्न आणि कृषी

– अभियांत्रिकी

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांचा प्रकार (टक्केवारीत)

सुक्ष्म उद्योग – ४२

लघु उद्योग – २२

मध्यम उद्योग- २६

मोठे उद्योग – १० टक्के

गेल्या आर्थिक वर्षातील प्रगती समाधानकारक असल्याचे उद्योजकांनी नमूद केले आहे. मात्र पुढील काळाची उद्योग क्षेत्राला चिंता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क) जाहीर केले आहे. त्याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. या धोरणांचा उद्योग क्षेत्रावर काय परिमाण होर्इल. परिणाम झाल्यास त्यातून बाहेर कसे पडायचे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम आयोजित करत आहोत.

– प्रशांत गिरबने, महासंचालक, एमसीसीआयए

सरपंच संतोष देशमुख हत्या मास्टरमाईंड ‘आका’च्या आर्थिक नाड्या आवळायची रणनीती, वाल्मिक कराडची संपत्ती कुठे कुठे आणि किती?

0

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरू असलेल्या सुनावणीत मोठ्या घडामोडी घडल्या. वाल्मिक कराडची चल आणि अचल स्थावर मिळकत जप्त करण्यासाठी कोर्टात अर्ज करण्यात आला. त्यावर वाल्मिक कराडकडून कोणताही खुलासा दाखल करण्यात आला नाही. त्यावर कोर्टाच्या कार्यवाहीप्रमाणे सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोर्ट काय आदेश देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

वाल्मिक कराडची नेमकी संपत्ती किती आहे?

  • उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात देखील वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे वाकड मधील पार्क स्ट्रीट सोसायटीमधील आयव्हरी इमारतीच्या 6 व्या मजल्यावर 601 नंबर चा 3.15 करोड पेक्षा अधिक किमतीचा 4 BHK फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे.
  • पुण्यातील जंगली महाराज रस्त्यामागे येणारा दुसरा रस्ता एफसी रस्ता आहे. एफसीरोडला प्रसिद्ध वैशाली हॉटेल आहे आणि वैशाली हॉटेलच्या पलीकडे सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यामध्ये पार्टनर आहे. तिथे एफसी रोडवर कराडने सात दुकानं बुक केली आहेत.
  • पुणे, लातूर, परळी, केजसह इतर ठिकाणी रो हाऊस.
  • केजमध्ये 2500 चौरस फुटांचा प्लॉट आणि एक बंगला – किंमत 1 कोटी 69 लाख रुपये.
  • बीडच्या दगडवाडीमध्ये शेत जमीन – किंमत 48 लाख 26 हजार.
  • मौजे तडोळी इथं 12 एकर शेत जमीन – किंमत 20 लाख 27 हजार.
  • परळी रोडवर अंबाजोगाई इथं 380 चौ.मी. बांधकाम. अंबाजोगाईमध्येच 419 चौ.मी. बांधकाम.
  • बीडच्या दगडवाडीत स्टोन क्रेशर युनिट. दगडवाडी गावात 48 लाखांची शेत जमीन.
  • परळीतील वडगावात साडेच्या सिरसाळा गावात (गट 581) चार एकर शेत जमीन.
  • वडगावातच आणखी एक प्लॉट. आणि बीडला ५०० चौ.मी खुला प्लॉट

अशी प्रचंड माया वाल्मिक कराडनं जमवलीय. तर सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात संबंध नसल्याचा दावा वाल्मिक कराडनं कोर्टात केला असून सुटकेसाठी अर्ज करण्यात आलाय.

खून आणि खंडणी प्रकरणात माझा सहभाग नसल्याने मला दोषमुक्त करा, अशी मागणी वाल्मिक कराडने केली. देशमुख खुनात माझ्या विरोधात पुरावा नाही. सहभाग असल्याचेही सिद्ध होत नाही. त्याशिवाय, मी खंडणी मागितल्याचेही समोर आले नाही असे कराडने आपल्या दोषमुक्तीच्या अर्जात म्हटले आहे. तुरुंगातून बाहेर येण्यासाठी वाल्मिकने ही चाल खेळल्याचे बोलले जाते.

आरोपींच्या चेहऱ्यावर भीती नाही, त्यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट

दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोपींच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसत नाही, यावरून त्यांना जेलमध्ये कशी वागणूक मिळते, हे स्पष्ट होतं असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. तसेच विष्णू चाटे याला लातूर जेलमधून बीडमध्ये शिफ्टिंग हवे आहे. एकत्र येऊन त्यांना पुन्हा दुसरा प्लॅन रचायला असेल, अशी शंकाही धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली.

सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्ह्यातील भयावह दहशतीची धक्कादायक माहिती राज्याला झाली होती. त्यामुळे देशमुख हत्या खटल्याकडे राज्याचं लक्ष लागलंय. खटल्याच्या कार्यवाहीत वाल्मिक कराडची संपत्ती जमा करण्याची मागणी करण्यात आलीय. या मागणीवर काय निर्णय होतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

देशात 7 सायक्लोनिक सर्क्युलेशन्स सक्रीय; बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा पुन्हा महाराष्ट्राला धोका? 8 जिल्ह्यांवर गारपिटीचं संकट

0

गेल्या 24 तासांमध्ये देशभरात हवामानाने वेगवेगळे रंग दाखवले. बिहारसह अनेक भागांत मुसळधार ते अती मुसळधार पावसाची नोंद झाली असून काही ठिकाणी 12 सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडल्याचे हवामान विभागाने सांगितले. वादळी वाऱ्यांमुळे पूर्व आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पाऊस झाला. दरम्यान, उष्णतेच्या लाटांमध्ये थोडीशी घट झाली असली, तरी राजस्थानच्या अनेक भागांत ती कायम राहिली. तसेच, गुजरात, दक्षिण हरियाणा, दिल्ली आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये देखील उष्णतेचे चटके जाणवले. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात उष्ण हवेची स्थिती राहिली.

उत्तर-पश्चिम भारत, पूर्व भारत आणि ईशान्य राज्यांत वादळी वाऱ्यांसह जोरदार मेघगर्जनेसह वीजांचे प्रमाण वाढले. पूर्व उत्तर प्रदेश, दक्षिण हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि मेघालयमध्ये गारपीट झाली. देशाच्या बहुतेक भागांत थंड वाऱ्यांची वीजेसह सक्रियता दिसून आली. सध्या देशात सात सायक्लोनिक सर्क्युलेशन्स सक्रीय आहेत. हे सर्क्युलेशन्स दक्षिण पाकिस्तान, पश्चिम राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, बिहार, बांगलादेश, आसाम आणि अरुणाचल प्रदेशाच्या परिसरात आहेत. याशिवाय, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे, जो पुढील 24 तासांत आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये गारपिटीचं संकट आहे. पुढचे तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 40-50 किमी ताशी वेगाने वारे वाहणार आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. लातूर, धाराशीव जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पावसाच्या या अचानक आगमनामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच विजेच्या गडगडाटामुळे विद्युत पुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकरी, वाहनचालक आणि नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हा सिस्टम पुढील २४ तासांत अधिक कमकुवत होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा परिणाम महाराष्ट्रात काही भागांवर जाणवण्याची दाट शक्यता आहे.

या हवामान प्रणालींच्या परिणामस्वरूप, उत्तर-पश्चिम भारतात आज आणि उद्या वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. यामुळे उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतात देखील पुढील चार ते पाच दिवस विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल गुजरातच्या सौराष्ट्र भागात सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, मध्य महाराष्ट्रात तापमान 42 ते 44 अंशांच्या दरम्यान होते. मात्र, पुढील तीन दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आज जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये गारपीट, वीजा आणि धुळीच्या वादळाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य राज्यांतही वादळी हवामान राहणार आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 14 एप्रिलपासून पश्चिम राजस्थानात उष्णतेच्या लाटेचा नवा स्पेल सुरू होण्याची शक्यता असून 16 तारखेला त्याचा प्रभाव पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात जाणवेल.

वाल्मिक कोर्टात म्हणाला, खून आणि खंडणीशी माझा संबंध नाही, धनंजय देशमुख संतप्त होत म्हणाले…

0

बीड : खून आणि खंडणी प्रकरणात माझा सहभाग नसल्याने मला दोषमुक्त करा, अशी मागणी सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडने केली. देशमुख खुनात माझ्या विरोधात पुरावा नाही. सहभाग असल्याचेही सिद्ध होत नाही. त्याशिवाय, मी खंडणी मागितल्याचेही समोर आले नाही, असे कराडने आपल्या दोषमुक्तीच्या अर्जात म्हटले आहे. तुरुंगातून बाहेर येण्यासाठी वाल्मिकने ही चाल खेळल्याचे बोलले जाते. पुढील सुनावणीत यासंबंधी अधिक विस्तृतपणे न्यायालयात म्हणणे मांडले जाईल, असे वाल्मिक कराडच्या वकिलांनी सांगितले.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुनावणी संपन्न झाली. वाल्मीक कराडचे वकील विकास खाडे न्यायालयात उपस्थित होते तर विशेष सरकारी ॲड.वकील उज्वल निकम आणि त्यांचे सहकारी वकील ॲड. बाळासाहेब कोल्हे हे देखील न्यायालयात दाखल होते. धनंजय देशमुख देखील न्यायालयात युक्तिवाद ऐकण्यासाठी आले होते.

देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट

वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त केला. “गुन्हा केला त्याचा आरोपींना कोणताही पश्चाताप दिसत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरती थोडीही भीती दिसत नाही. यावरून स्पष्ट दिसत आहे की जेलमध्ये त्यांना कशी वागणूक मिळते”, असा आरोप करीत आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याची शंका धनंजय देशमुख यांनी अप्रत्यक्षरित्या व्यक्त केली.

वाल्मिकला वाचविण्यासाठी दुर्दैवाने वकिलांची फौज उभी

वाल्मीक कराड यांच्या वकिलांनी आमचा या गुन्ह्याशी संबंध नाही असे म्हणत डिस्चार्ज अॅप्लिकेशन दिले आहे. त्यावरतीही धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. “वाल्मिक कराडला वाचविण्यासाठी वकिलांची फौज उभी केली जात आहे. मात्र तपासी यंत्रणेकडे वाल्मीक कराडचा या खंडणी आणि खून प्रकरणात काय सहभाग आहे, याचे पुरावे आहेत. हे पुरावे 24 तारखेला दिले जातील. आरोपींना फासावर लटकेपर्यंत आम्ही पाठपुरावा सोडणार नाहीत”, असे देशमुख म्हणाले.

आरोपींना एकत्र येऊन पुन्हा काहीतरी प्लॅनिंग करायचं असेल

“खून प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी विष्णू चाटे हा लातूर जेलमधून बीडमध्ये शिफ्ट करा अशी मागणी करीत आहे. त्यांना एकत्रित येऊन पुन्हा काही प्लॅनिंग करायचे असेल”, असा संशय देखील धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला.