Home Blog Page 124

पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात राक्षसी गँगरेप! 19 वर्षांची मुलगी, 23 मुलांचा 6 दिवस.., ‘अशी’ घटना मोदीही अस्वस्थ

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (११ एप्रिल) सकाळी वाराणसीला पोहोचले. वाराणसीला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मतदारसंघात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. उत्तर प्रदेश सरकारने एका अधिकृत निवेदनात ही माहिती दिली.

काय म्हणाले पीएम मोदी?

उत्तर प्रदेश सरकारने सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबतपूर विमानतळावर उतरल्यानंतर पोलिस आयुक्त, विभागीय आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना भेटले. शहरातील अलिकडच्या बलात्काराच्या घटनेची त्यांनी माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्याचे आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी योग्य आणि प्रभावी पावले उचलण्याचे निर्देश दिले.”

नेमकं काय घडलं होतं?

युपीतील पांडेपूर परिसरात राहणाऱ्या एक १९ वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचार झाला. ही मुलगी एका क्रिडा महाविद्यालयात प्रवेश घेण्याची तयारी करत होती. २९ मार्चला ती मुलगी एका मित्राच्या घरी गेली. तेथून परत येत असताना राज विश्वकर्मा नावाच्या दुसऱ्या एका मित्राने तिला आपल्यासोबत नेते तेथे तिला मादक पदार्थ खायला देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर एकेक करुन २३ जणांनी सहा दिवस तिच्यावर अत्याचार केला. तिला वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये नेण्यात आले. सहा दिवसानंतर आरोपींची भूक भागल्यावर तिला सोडून देण्यात आले.

आईने दिली होती तक्रार

या प्रकरणानंतर मुलीच्या आईने लालपूर-पांडेपूर पोलिस ठाण्यात २३ जणांविरुद्ध तक्रार दिली. त्यातील १२ जणांची नावे माहिती होती. मात्र ११ जण अज्ञात होते. राज विश्वकर्मा, समीर, आयुष, सोहेल, दानिश, अनमोल, साजिद, जहीर, इम्रान, जैब, अमन, राज खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व आरोपी हुकुलगंज व आसपासच्या परिसरातील आहेत.

१० जणांना केली अटक

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ पावले उचलली. डीसीपी चंद्रकांत मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तीन पथके आरोपींच्या अटकेसाठी रवाना केली. त्यातील १० जणांना अटक करण्यात आले. या आरोपींच्या चौकशीनंतर इतर आरोपींची नावे समोर आली. पोलिसांनी उर्वरीत आरोपींचा शोध सुरु ठेवला आहे. याच प्रकरणाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली.

पुणे पालिकेला फुले वाडा स्मारकासाठी फटकारल्यावर जाग; 3 महिन्यांत ८०१ मागण्या समजून अहवाल करण्याच्या सूचना

0

महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकाच्या भूसंपादन प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनावर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी तातडीने बैठक घेत स्मारकासाठी आवश्यक असलेल्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी उपायुक्त नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मारकाबाबत वारंवार महापालिकेस सूचना करूनही काहीच हालचाल होत नसल्याची नाराजी उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केली.

या बैठकीत पुढील तीन महिन्यांत बाधित जागा मालक व भाडेकरूंशी भेट घेऊन त्यांच्या मागण्या समजून घेऊन अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या प्रकल्पाची जबाबदारी उपायुक्त पातळीवरील अधिकाऱ्यावर असेल, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.

राज्य सरकारने महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक यांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी दोन्ही स्मारकांदरम्यानच्या ५,३१० चौरस मीटर क्षेत्रफळातील ९१ मिळकतींचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या क्षेत्रात ५१६ मालक आणि २८५ भाडेकरू असून, सर्व बाधितांच्या घरी जाऊन त्यांच्या मोबदल्याच्या अपेक्षा जाणून घेण्यात येणार आहेत.

काही मालकांनी रोख मोबदल्याची, तर काहींनी जागेच्या बदल्यात जागा मिळावी, अशी मागणी केली आहे. यामध्ये व्यावसायिक जागा देखील असल्याने त्यांच्या मोबदल्याच्या प्रकाराबाबत महापालिकेने अभ्यास सुरू केला आहे. या स्मारकासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली असून, त्यापैकी १०० कोटींचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे.

अशी आहे स्मारकाची सद्यस्थिती

– महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या एकत्रीकरणासाठी ९१ मिळकती बाधित

– बाधितांमध्ये ५१६ मालक आणि २८५ भाडेकरूंचा समावेश

-राज्य सरकारकडून २०० कोटींचा निधी मंजूर; १०० कोटी महापालिकेला प्राप्त

– भूसंपादनासाठी उपायुक्त पातळीवरील स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती

– बाधितांच्या मागणीनुसार मोबदला देण्याची तयारी

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, तरी शिवद्रोही कोरटकरचा राजेशाही थाट? घरपोच पोलीस सुरक्षा

0

स्पेशल विमान कुठल्या मंत्र्यासाठी नाही तर हा राजेशाही थाट आहे शिवद्रोही प्रशांत कोटरकर याचा…छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणात अखेर कोरटकरला जामीन मिळालाय.. मात्र जामीन मिळाल्यानंतरही त्याच्या बडेजावात पोलिसांनी कुठलीच कसर सोडली नाही.

प्रशांत कोरटकर तुरुंगातून बाहेर येताच कोरटकरच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.. एवढंच नाही तर बंदी असलेल्या काळ्या फिल्मिंगच्या कार कोरटकरच्या दिमतीला उभ्या होत्या…  आधी याच कारमधून आणि त्यानंतर स्पेशल विमानाने कोरटकरला थेट घरपोच पोलीस सुरक्षेत पोहचवण्यात आलं….

मात्र कोरटकरला कोणत्या अटी-शर्तींसह जामीन मिळालाय ते पाहूयात…

महाराजांचा अवमान तरी जामीन

कोरटकरला 50 हजारांचा जातमुचलक्यावर जामीन

पोलीस बोलावतील तेव्हा हजर राहणं बंधनकारक

साक्षीदार, फिर्यादींवर दबाव आणण्याचा प्रयत्न करु नये

महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांचा अवमान करुनही कोरटकरचा एवढा बडेजाव कशासाठी? वादग्रस्त वक्तव्यानंतर पोलीसांची एवढी फौज दिमतीला असेल तर कोरटकरसारखे वाचाळवीर जीभेला लगाम घालतील तरी कसे?

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव चांदणी चौक येथे मोठ्या उत्साहात साजरा

0

कोथरुड ता.११ : कोथरूड येथील चांदणी चौकातील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नित्य अभिषेक, ध्वजारोहण, चढावे, पूजन, महाभिषेक, भगवान महावीरांचा भव्य पालखी सोहळा, महाआरती, सत्कार समारंभ, वार्षिक आढावा वाचन, जन्मोस्तव-पाळणा, महाप्रसाद इ. विविध धार्मिक तर रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर तसेच जैन पाककला स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त मंदिर परिसरात मंडप उभारून नेत्रदीपक विदयुत रोषणाई करण्यात आली होती.
भगवान महावीर यांचा २६२४ वा जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त नित्य अभिषेक झाल्यानंतर ध्वजारोहण चा मान अशोक मगदूम परिवार तर पालखी मिरवणूक चा मान वर्धमान प्रेस चे मेहता परिवार व जिनवाणी शास्त्र चा मान सुषमा दोशी यांना मिळाला.

सकाळी आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये 108 जणांनी रक्तदान केले तर 351 लोकांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला, यासाठी पुणे ब्लड बँक व देशपांडे डोळ्यांचे हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले. यानंतर सकाळी ९ वाजता भगवान महावीर यांची प्रतिमा चांदीच्या पालखीत विराजमान करून पालखी सोहळ्यास सुरवात झाली. यावेळी त्रिशला नंदन वीर की जय बोलो महावीर की, अहिंसा परमो धर्म व नमोकार महामंत्राचा जयघोषात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.

यामध्ये अग्रभागी जैन महिला मंडळ आराधना ग्रुप चे लेझीम पथक सहभागी झाले होते. सुमधुर बँडच्या तालावर जैन युवक-युवतींनी गरबा खेळण्याचा आनंद लुटला. पालखी मिरवणूक मार्गावर बावधन चे ग्रामस्थ नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी स्वागत कमान तर पृथ्वीराज सुतार व अल्पना गणेश वरपे यांनी भव्य होर्डिंग उभारून पालखी मिरवणुकीचे स्वागत केले. यानंतर मुख्य मूर्तीचा अभिषेक, शांतिधारा व महाआरती मंदिर मध्ये संपन्न झाली.

दुपारी १२ वा. भगवान महावीरांचा जन्मोस्तव-पाळणा संपन्न झाला. यावेळी भगवान महावीर यांचा अभिषेक चा मान राजेश सोनी यांना, त्रिशला मातेचा मान प्रांजली सूरज मगदूम यांना तर आत्याचा मान रेणुका बंडी यांना मिळाला.
जैन धर्मातील प्रख्यात स्त्रियांची ओळख या कार्यक्रमाचे सादरीकरण शोभा पोकळे व स्वाध्याय ग्रुप तर्फे करण्यात आले.

यानंतर वार्षिक आढावा वाचन करून जैन पाककला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी मनपाचे आरोग्य विभागाचे अधिकारी, सुपरवायझर यांचे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सर्वांनी वास्तल्य भोजनाचा लाभ घेतला. संध्याकाळी महाआरती संपन्न झाली व नंतर पंडितजी सागर हुक्कीरे यांचे धर्म प्रवचन संपन्न झाले.
जन्मकल्याणक महोत्सव निमित्त आमदार भीमराव तापकीर, नगरसेविका मोनिका मोहोळ, नगरसेवक दिलीप वेडेपाटील , नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेविका वासंती जाधव, नगरसेविका श्रद्धा प्रभुणे पाठक, नवनाथ जाधव, गणेश वरपे, धनंजय दगडे पाटील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी भगवान महावीर मंडळ व जैन मंदिराचे विश्वस्त दिनेश गणेशवाडे, मोहन कुडचे, श्रीकांत पाटील, ज्योती बुरसे, शिरीष बोरगावे, रमेशभाई शहा, उदय लेंगडे, अजित शेट्टी, सुनील बिरनाळे, महावीर पालगौडर, प्रीतम मेहता, प्रकाश कुडचे, तात्यासाहेब खोत, अशोक मगदुम, शोभा पोकळे, प्रकाश कुडचे तसेच सर्व कमिटी सदस्य उपस्थित होते. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित कोथरूड व बावधन परिसरातील जैन समाजातील बांधव मोठ्या संख्येने विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते

सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरु केली उदयनराजेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर हाके आक्रमक…

0

सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. एका दृष्टीकोनातून आपण पाहीलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं. प्रतापसिंह महाराज यांनी आपल्याच राजवाड्यामध्ये स्त्रींयासाठी पहिली शाळा सुरू केली होती. ज्यांनी देशाचं संविधान लिहीलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण देखील तिथेच झालं असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. दरम्यान उदयनराजे यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उदयनराजे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेलती आहे.

नेमकं काय म्हणाले लक्ष्मण हाके? 

महाराष्ट्रातील जनतेचं आणि छत्रपती या शब्दाचं एक वेगळं नातं आहे,  पण कुठलाही अभ्यास न करता, इतिहासकार यांचा सल्ला न घेता अशी बेजबाबदारपणाची वक्तव्य एका खासदाराने करू नयेत, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती असताना त्या जयंतीच्या कार्यक्रमामध्येच असं कसं बेजबाबदारपणे वागू शकतात? असा सवालही यावेळी लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

दरम्यान वाघ्या कुत्र्याची समाधी काढून फेकून द्या, असंही उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्यावरून देखील लक्ष्मण हाके यांनी उदयनराजे यांना सुनावलं आहे. तुमच्या हातामध्ये महाराष्ट्राचा सातबारा आला का? मुख्यमंत्र्याचे अधिकार तुमच्याकडे आहेत का?  तुम्हाला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय असे काही आहे का? असा सवाल यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.   उदयनराजेंचे आजचे वक्तव्य म्हणजे या महाराष्ट्राच्या समाज मनाचा अपमान आहे, त्यामुळे उदयनराजेंनी खासदारकीच्या पदाला शोभेल असे वक्तव्य करावे, असा सल्लाही यावेळी हाके यांनी दिला आहे.

उदयनराजे नेमकं काय म्हणाले?

सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. एका दृष्टीकोनातून आपण पाहीलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं, असं उदययन राजे यांनी म्हटलं आहे, यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

एसटीला फायद्यात आणण्यास अजित पवारांचा हा प्लॅन, कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत म्हणाले…

0

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पूर्ण पगार मिळाला नाही. कर्मचाऱ्यांना केवळ ५६ टक्के रक्कम मिळाली आहे. उर्वरित ४४ टक्के रक्कम देण्याबाबत एसटी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या प्रश्नावर अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगाराची माहिती घेतो. परंतु एसटीला शासनाकडून नेहमी मदत दिली जातो. कोरोना काळातही एसटी महामंडळाला शासनाकडून २५० ते ३०० कोटी रुपये दिले जात होते. तसेच एसटी मोफत प्रवास योजनेसाठी किंवा इतर विविध सवलतीच्या योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. त्या योजनांचा पैसे शासनाकडून एसटीला दिले जातात, असे अजित पवार यांनी सांगितले.

एसटीच्या आगामी योजनांची माहिती देताना अजित पवार म्हणाले, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ई व्हिईकल घेण्याचा प्रस्ताव आणला आहे. तो मंजूर होणार आहे. देशातील कोणतीही सार्वजिनक प्रवाशी संस्था फायद्याची नसते. परंतु सर्वसामान्यांना किफायतीशी भाड्यात प्रवास करता यावा, यासाठी या संस्था महत्वाच्या असतात. एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांवर चर्चा सुरु आहे. एसटीची जागा अनेक शहरांमध्ये मध्यवर्ती ठिकाणी आहे. ती जागा बीओटी तत्वावर देऊन उत्पन्न वाढण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी ६० वर्षांचा करार करण्यात येणार आहे. त्यानंतर तो करार ३० वर्ष वाढवण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

मंगेशकर रुग्णालयाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, रुग्णालयाबाबत तिसरा अहवाल आल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आता राज्यात धर्मादाय हॉस्पिटल असेल तर त्याचा उल्लेख सक्तीचे करण्यात येणा आहे. धर्मादाय रुग्णालयात निधी असतो. तो निधी वापरत का नाही? तो निधी पुजेसाठी असतो का? असेही अजित पवार म्हणाले.

महात्मा फुले यांच्या स्मारकाबाबत अजित पवार म्हणाले, फुले वाड्यात चांगले स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी रहिवाशांचे योग्य पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल. स्मारकाच्या कामात कोणतेही राजकारण आणायचे नाही. याबाबत भुजबळ साहेबांशी मी चर्चा करणार आहे. त्यांना उपोषणास बसण्याची वेळ येणार नाही, अशी काळजी आम्ही घेऊ, असे अजित पवार यांनी म्हटले.

फेकून टाका वाघ्या कुत्रं, इंडियामध्ये लांब कानाचं कुत्रं… ही ब्रिटिश कुत्री नक्की काय म्हणाले उदयनराजे?

0

“छत्रपती शिवाजी महाराजांच राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावं. मुंबईत अरबी समुद्रात पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्मारकाच भूमीपूजन झालं. मी सुद्धा त्यावेळी तिथे होतो. कदाचित पर्यावरणामुळे तिथे करता येत नसेल, तर गर्व्हनर हाऊसची जागा आहे. ही जवळपास 48 एकर जागा आहे. एखाद्या राज्यपालाला रहायला किती जागा लागते?. 48 एकर थोडी जागा नाही. ही जागा अरबी समुद्राला लागून आहे. त्या संदर्भात मी अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे” असं खासदार उदयनराजे म्हणाले.

“छत्रपती शिवाजी महराजांच राज्य हे रयतेच राज्य म्हणून ओळख होती. आज आपण ज्या लोकशाहीच वावरतो, त्याचा ढाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला. आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत, त्याला कुठल्याही पैशाची किंवा बजेटची आवश्यकता नाही” असं उदयनराजे भोसले म्हणाले.

‘फुले’ चित्रपटाच्या वादावर काय म्हणाले?

महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर येणाऱ्या ‘फुले’ चित्रपटाबद्दल सुद्धा उदयनराजे बोलले आहेत. सेन्सॉर बोर्डाने त्यातील काही संवाद आणि दृश्यांवर कात्री चालवली आहे. त्यावर उदयनराजे म्हणाले की, “जे महाराजांना लागू होतं, ते महात्मा फुलेंना सुद्धा. महाराजांपेक्षा कोणी मोठा नाही. ज्यांनी महाराजांच्या विचारांच अनुकरण केलं, त्या सर्वांना लागू होतं. इतिहासकाराचं एक सेन्सॉर बोर्ड निर्माण करा. जे काय कट करायचं ते ठरवतील” असं उदयनराजे म्हणाले. छावा चित्रपटावरुन झालेल्या वादावर सुद्धा त्यांची हीच भूमिका होती.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर काय म्हणाले?

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरुन सुरु असलेल्या वादावरही उदयन राजे बोलले आहेत. “चॅरिटेबल म्हणजे काय, ही शासनाची जागा आहे. किमान 50 ते 70 मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल असतील, किती चॅरिटी करतात ते. त्यांना ही जागा फ्री मध्ये दिली आहे. गरजूंवर मोफत उपचार झाले पाहिजेत. असं कोणी करत नाही, याचं ऑडिट झालं पाहिजे” असं उदयनराजे म्हणाले.

वाघ्या कुत्र्याच्या वादावर काय म्हणाले?

रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरुन सुरु असलेल्या वादावर त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. “वाघ्या ते कुत्र बघा, ते इथलं तरी आहे का? लांब कानाचं कुत्रं इंडियामध्ये बघितलय का? ही ब्रिटिश कुत्री आहे. फेकून टाका, जास्त कौतुक कशाला हवं” असं उदयनराजे म्हणाले.

मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना दादांचं उत्तर, म्हणाले… कुटुंबाचं योगदान हे भारताला नाही तर जगालाही माहिती!

0

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध रूग्णालय दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये तनिषा भिसे यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे भिसे यांना आपली पत्नी गमवावी लागली. मंगेशकर रूग्णालयाला भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार पकडलं असून आता तिसरा अहवाल समोर येणार आहे. या प्रकरणावरून राजकारण तापलं असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर निशाणा साधला आहे. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी असल्याचा घणाघात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मंगेशकर कुटुंबाचं गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही. ज्यांनी ऑटोग्राफसाठी पैसे घ्यावेत त्यांच्याकडून काय योगदानाची ठेवायची. गाणं म्हटलं म्हणजे योगदान नाही, लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल. मला माहित नाही, मी कधी ऐकलं नाही, माझ्या २५-३० वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये ऐकलं नाही, त्यामुळे या कुटंबाप्रती प्रेम आस्था असण्याचं कारण नाही, असं विजय वडेट्टीवरांनी म्हटलं आहे. यावर अजित दादांनी आपली प्रतिक्रिया देताना मंगेशकर कुटुंबाचं योगदान हे भारताला नाही जगाला माहिती असल्याचं म्हटलंय.

मंगेशकर कुटुंबाचं योगदान हे भारताला नाही जगाला माहिती आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर असतील या पाचही भावंडांचं योगदान आहे त्याला तोड नाही. महाराष्ट्रीय जनतेला आपलेपणा आहे, आदर आहे त्याच्यामुळे कोणी बोलू नये असं वाटतं, असं अजित म्हणाले.

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मला खूप आनंद…’ आत्ता कट रचणारा आमच्या ताब्यात

0

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० एप्रिलला २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणाला ताब्यात घेतल्याने समाधान व्यक्त केले आहे. मुंबई हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणाला ताब्यात घेतल्याबद्दल मी समाधानी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तर कट रचणारा आता कोठडीत आहे आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) सक्रियपणे तपास करत आहे. हल्ल्याचा कट रचणाऱ्याला भारतीय न्यायव्यवस्थेला सामोरे जाण्यासाठी भारतात आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचे १० एप्रिलला भारतात यशस्वीरित्या प्रत्यार्पण झाले. त्याला विशेष विमानाने अमेरिकेतून भारतात आणले गेले. एनआयएने राणाला ताब्यात घेतल्याचा फोटो जाहीर केला आहे. गृहमंत्री अमित शहांनी हे पंतप्रधान मोदी सरकारच्या राजनैतिकतेचे मोठे यश असल्याचे नमूद केले होते. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधान मोदींचे याबद्दल आभार मानले आहेत.

शुक्रवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी आणि कट रचणाऱ्यांपैकी एक तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आल्याने मला खूप आनंद झाला आहे. भारतीय न्यायव्यवस्थेला सामोरे जाण्यासाठी कट रचणाऱ्याला भारतात आणल्याबद्दल मी मुंबईकरांच्या वतीने पंतप्रधानांचे आभार मानतो. कायद्यानुसार कसाबला फाशी देण्यात आली हे आमच्यावर ओझे होते, परंतु कट रचणारा आमच्या ताब्यात नव्हता. तो आता एनआयएकडे आहे आणि ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आता, एनआयए तपास आणि कायदेशीर प्रक्रियांबद्दल विचार करेल.’ तसेच ‘आम्हाला जी काही माहिती हवी असेल ती आम्ही एनआयएकडून घेऊ आणि जर त्यांना काही मदत हवी असेल तर आम्ही ती मुंबई पोलिसांमार्फत करू,’ असेही मुख्यमंत्री तथा राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

२६ नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्यात मुंबईतील अनेक इमारतींना तसेच गर्दीच्या स्थळांना लक्ष्य करण्यात आले होते. यात १६६ जणांचा मृत्यू आणि २३८ हून अधिक जण जखमी झाले होते, ज्यासाठी न्याय मिळवण्यासाठी व्यापक प्रयत्न केले गेले. १६ मे २०२३ ला कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने त्याच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली. तथापि, राणाने नवव्या सर्किटमध्ये अनेक कायदेशीरमार्गाने प्रयत्न केले आणि अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या, त्या सर्व फेटाळण्यात आल्या. अखेर तहव्वूर राणाला ताब्यात घेण्यात आले.

महायुती नाराजीनाट्य संपले? दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समान अधिकार प्रदान मुत्सद्दी फडणवीसांनी शिंदेंचे मन नेमके कसे वळवले?

0

राज्यात चार महिन्यापुर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा पराभव सहन करावा लागला. त्यानंतर 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.  त्यानंतरच्या काळात राज्यातील महायुती सरकारमधील मतभेद लपून राहिले नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी लपून राहिलेली नाही. गेल्या चार महिन्याच्या काळात त्यांच्यासोबत दुजाभाव झाल्याने ते नाराज असल्याचे लपून राहिले नव्हते. मात्र, गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

राज्यातील महायुतीमध्ये भाजप (BJP), शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तीन पक्ष या-ना त्या कारणावरून नाराज असल्याचे पुढे येत आहे. या तीन पक्षामध्ये कायम नाराजी दिसून येते. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या सरकारच्या काळात घेतलेल्या काही निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदल केला आहे. त्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद, शालेय गणवेश खरेदीसाठी स्वतंत्र एजन्सी स्थापन करण्याचा निर्णय, एसटी महामंडळासाठी बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय, 900 रुग्णवाहिका खरेदीचा निर्णय त्याशिवाय फायलींना मंजुरी देण्याचा अधिकार. हे सर्व निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर बदलले आहेत. या बदलांमुळे शिंदे गटात गेल्या काही दिवसापासून अस्वस्थता निर्माण झाली होती.

महायुतीची सत्ता राज्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांची नाराजी लपून राहिलेली नाही. महायुतीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर शिंदे यांनी ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदाबाबतचा दावा सोडत या वादावर पडदा टाकला होता. त्यानंतर खातेवाटपावरून नाराजी दर्शवली होती.

शपथविधीच्या काही तास अगोदरपर्यंत भाजप-सेनेतील चर्चा सुरु होती. त्यानंतर महायुतीत पालकमंत्रीपद वाटपाबाबतही दुजाभाव झाल्याची भावना काही शिवसैनिकांकडून व्यक्त केली. नाशिक, रायगडच्या पालकमंत्री पदावरून तर मोठा वाद उफाळून आलेला बघायला मिळाला. त्यामुळे या सगळ्या घडामोडींमधूनच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा जोरात रंगली होती.

त्यानंतर मधल्या काळात एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला आहे. सर्व प्रकारच्या फायली आता उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णयासाठी जाईल. स्वतः फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बळ देणारा हा निर्णय घेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समान अधिकार प्रदान केले आहेत, अशी चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकारांबाबत काहीही स्पष्टता आलेली नव्हती. मात्र, आता या आदेशान्वये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समान बळ असणार आहे. त्यामुळे एकनाथ नाराजी काही अंशी दूर झाली असल्याची चर्चा आहे.

एसटी महामंडळाची एकीकडे आर्थिक कोंडी सुरु असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असताना आता एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे फक्त नावापुरतंच परिवहन खातं राहणार अशी चर्चाही जोर धरू लागली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा निर्णय मागे घेतला होता. आता एसटी महामंडळावर अधिकृतपणे परिवहनमंत्री प्रताप सरनाईकच राहणार असल्याचा शिक्कामोर्तब झाला आहे.

गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या आक्षेपांची दखल घेतली. फडणवीस यांनी शिंदे यांच्याबाबत घेतलेले काही निर्णय त्यांच्या नाराजीनंतर मागे घेतले आहेत. या सर्व घटनांमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद काही प्रमाणात निवळले आहेत, परंतु पूर्णतः संपले आहेत, असे म्हणता येणार नाहीत.