Home Blog Page 116

कॅशलेस उपचार आणि बरंच काही; राज्याच्या आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय 5 मुद्द्यांमध्ये

0

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं नागरिकांचं हित लक्षात घेत रुग्णालयांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणारे काही महत्त्वाचे निर्णय घेतले. अतिशय महत्त्वाचा निर्णय घेच राज्याच्या आरोग्य विभागानं अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचारांचा निर्मय घेतला.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि आयुष्यमान भारत समिती प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत यासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये घेण्यात आलेले काही महत्त्वाचे निर्णय आणि त्यातील लक्षवेधी मुद्दे खालीलप्रमाणे

अपघातग्रस्त रुग्णांसाठी कॅशलेस उपचार

अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार
रूग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता व तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप तयार करण्यात येणार.
दर महिन्याला प्रत्येक रुग्णालयाने आरोग्य शिबिर घेऊन किमान 5 रुग्णांवर कॅशलेस उपचार करणं बंधनकारक
योजनेतील विविध सुधारणांसाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली असून एक महिन्यात अहवाल सादर करावा लागणार
आयुष्मान कार्ड वाटप मोहिमेस गती देण्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार व सेवा केंद्रांची मदत घेणार
सदर योजनेत कोणताही गैरप्रकार आढळल्यास हे गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य योजनांचा थेट लाभ

दरम्यान, इथं राज्यात हा महत्त्वाचा निर्णय होण्यापूर्वी भारत सरकारने ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ अंतर्गतसुद्धा असाच एक निर्णय घेण्यात आला. ज्यानुसार 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना थेट लाभ घेता येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या वयोगटातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक-आर्थिक स्थितीची अट न लावता योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. या नव्या नियमानुसार, 70 वर्षे आणि त्यावरील सर्व ज्येष्ठ स्त्री-पुरुषांना स्वतंत्र ‘आयुष्मान भारत वय वंदन कार्ड’ आवश्यक असेल.

आधारकार्डवर नमूद वयानुसार पात्रता ठरवली जाईल. ई-केवायसी ही प्रक्रिया अनिवार्य असून, यानंतरच कार्ड जारी होणार आहे. नोंदणीसाठी वर्षभर अर्ज करता येणार असून, ‘आयुष्मान अॅप’ व संकेतस्थळावरून प्रक्रिया करता येईल. स्थानिक सेतू केंद्र, आशा सेविका, ग्रामपंचायत केंद्रचालक, अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्र तसंच स्वस्त धान्य दुकानदार ई-केवायसीसाठी अधिकृत आहेत.

अनुराग कश्यप का भडकला, म्हणाला… भारतात जातीवाद आहे की नाही? एकदाच काय ते ठरवा’

0

अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटाच्या वादात दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी उडी घेतली आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला होता. त्यावरून अनुरागने आता देशातील जात व्यवस्थेवर जळजळीत टीका केली आहे. ‘आता ब्राह्मणांना ‘फुले’ चित्रपटाचा त्रास होतोय. भाऊ, जर जात व्यवस्थाच नाही तर तुम्ही ब्राह्मण का म्हणवता? जर जात व्यवस्थाच नव्हती तर ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले का होते?,’ असा सवाल त्याने केला आहे. अनुरागच्या या पोस्टवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

अनुराग कश्यपची पोस्ट-
‘धडक 2 च्या स्क्रिनिंगदरम्यान सेन्सॉर बोर्डाने म्हटलं की मोदींनी भारतातील जात व्यवस्था संपवली आहे. त्याच आधारे तर ‘संतोष’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नाही. आता ब्राह्मणांना ‘फुले’ चित्रपटाचा त्रास होतोय. भाऊ, जर जात व्यवस्थाच नाही तर तुम्ही ब्राह्मण का म्हणवता? जर जात व्यवस्थाच नव्हती तर ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले का होते? एकतर मग तुमचा ब्राह्मणवादच अस्तित्वात नाही, कारण मोदीजींच्या मते भारतात जात व्यवस्थाच नाही? किंवा सर्वजण मिळून लोकांना मूर्ख बनवतायत. भाऊ, तुम्ही सर्वांनी भेटून एकदाच काय ते ठरवा ना.. भारतात जातीवाद आहे की नाही? लोक मूर्ख नाहीत. तुम्ही ब्राह्मण आहात किंवा वर बसलेले तुमचे बाप ब्राह्मण आहे, ते ठरवा’, अशी संतप्त पोस्ट त्याने लिहिली आहे.

‘माझ्या आयुष्यातील पहिलं नाटक ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित होता. भावा, जर या देशात जातीयवाद नसता तर त्यांना लढण्याची काय गरज होती? आता या ब्राह्मण लोकांना लाज वाटतेय किंवा लाजेनं ते मरतायत किंवा वेगळेच ब्राह्मण भारतात जगतायत ज्यांना आपण पाहू शकत नाहीये, चु*** कोण आहे कोणी तरी समजवावं.’ अशी संतप्त पोस्ट त्याने याआधी लिहिली होती.

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठीचं कार्य यावर ‘फुले’ हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये अभिनेता प्रतीक गांधी हा ज्योतिराव फुलेंच्या आणि पत्रलेखा ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट येत्या 25 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील ‘महार’, ‘मांग’, ‘पेशवाई’ आणि ‘मनू यांची जातीव्यवस्था’ यांसारखे काही जातीवाचक शब्द बदलण्यास किंवा काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत.

‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले?

0

“तुम्ही तुमच्या मंदिराच्या ट्रस्टमध्ये बिगर हिंदूला सदस्य बनवणार का? हा सुप्रीम कोर्टाचा प्रश्नच एकदम चुकीचा आहे. कारण असं आहे की, वक्फ बोर्डमध्ये कुठल्या प्रकारचा पॅनल नाही. वक्फ ही धार्मिक संस्था नाही, तर एक सरकारी संस्था आहे” असं शिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले. हिंदी भाषा शिकण्याविषयी सुद्धा संजय निरुपम बोलले. “हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना मराठी शिकणे अनिवार्य आहे. मूलभूत हिंदी शिकण्यात काहीही गैर नाही” असं संजय निरुपम बोलले. “जे हिंदीला विरोध करतात, ते इंग्रजीला विरोध करत नाहीत. त्यांची मुले इंग्रजीत शिकतात, ते चुकीचे नाही, पण ते हिंदीला विरोध करत आहेत” असं संजय निरुपम म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या AI भाषणावरुन त्यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली. “मी ठाकरे शिवसेनेच्या लोकांना सांगू इच्छितो की, ठाकरे गट स्वतःच कृत्रिम झाला आहे, तो बाळासाहेबांच्या विचारसरणीपासून दूर गेला आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात झाला आहे. ठाकरे यांची शिवसेना वक्फला पाठिंबा देते”

‘हिंदी ही देशाची भाषा आहे’

हिंदीच्या सक्तीवरून संजय राऊत यांनी टीका केली, त्यावर निरुपम म्हणाले की, “इंग्रजी हा परदेशी विषय आहे. पण हिंदी ही देशाची भाषा आहे आणि आपण ती शिकली पाहिजे. ठाकरे गटाचे नेते बाळासाहेबांचे विचार विसरले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे विचार घेऊन पुढे जात आहेत आणि त्यावर काम करत आहेत” “काही मनसे नेत्यांची मुले जर्मन आणि इंग्रजी शिकत आहेत. पण ते हिंदीला विरोध करतात” असं निरुपम म्हणाले.

केएल राहुलच्या ‘त्या’ कृत्यामुळे आईने बोलणंच केलं होतं बंद; नेमकं काय घडलं?

0

क्रिकेटर केएल राहुल सध्या आयपीएल 2025 मध्ये व्यस्त आहे. यंदा राहुल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या वतीने खेळतोय. नव्या सिझनमध्ये नव्या फ्रँचाइजीसाठी तो चांगलीच कामगिरी करताना दिसतोय. त्याच्या कामगिरीवर कुटुंबीयांनाही प्रचंड अभिमान आहे. परंतु एक काळ असा होता, जेव्हा केएल राहुलच्या आईने त्याच्याशी बोलणंच बंद केलं होतं. ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा राहुल क्रिकेटविषयी शिकत होता. वयाच्या 15 व्या वर्षी राहुलने असं काम केलं होतं, ज्यामुळे त्याची आई त्याच्यावर फार चिडली होती. राहुलच्या या कृत्यामुळे त्याच्या आईने काही दिवस त्याच्याशी अबोला धरला होता.

केएल राहुलला लहानपणापासूनच खेळाची विशेष आवड होती. फक्त क्रिकेटच नाही तर तो विविध प्रकारचे खेळ खेळायचा. राहुलचे वडील केएन लोकेश आणि आई राजेश्वरी हे दोघं अकॅडमिक फिल्डशी जोडलेले आहेत. त्याचे वडील सुनील गावस्कर यांचे मोठे चाहते आहेत. त्यामुळे राहुलच्या क्रिकेट खेळण्याबद्दल त्यांना काहीच समस्या नव्हती. परंतु त्यांची एक अट होती. त्यांना राहुलला सक्त ताकिद दिली होती की त्याच्या खेळाचा परिणाम अभ्यासावर होता कामा नये. तर अभ्यासावर त्याचा फटका बसला तर राहुलला खेळ बंद करावा लागेल. त्यानेसुद्धा आईवडिलांची ही अट स्वीकारली आणि आपल्या आयुष्यात खेळासोबतच अभ्यासाचा समतोल साधला.

जेव्हा मुलगा खेळ आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींमध्ये चांगला समतोल साधत असेल, तर मग कॉलेजमध्ये इतिहास शिकवणाऱ्या त्याच्या आईला कोणती समस्या असेल? परंतु वयाच्या 15 व्या वर्षी राहुलकडून झालेल्या एका चुकीमुळे त्याची आई त्याच्यावर खूप रागावली होती. क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला आपला आदर्श मानणारा केएल राहुल लहानपणापासूनच वेगवेगळ्या स्टाइल्सचा खूप शौकीन होता. त्याच्यासाठी क्रिकेटमध्ये जसा राहुल द्रविड हिरो होता, तसाच स्टाइलच्या बाबतीत इंग्लंडचा महान फुटबॉलपटू डेविड बेकहम हिरो होता.

केएल राहुलच्या शरीरावर तुम्हाला जे टॅटू पहायला मिळतात, ते डेविड बेकहमच्या क्रेझमुळेच आहेत. राहुलने वयाच्या 15 व्या वर्षीच शरीरावर टॅटू बनवण्यास सुरुवात केली होती. त्याच वयात त्याने घरात कोणालाच न सांगता पहिला टॅटू बनवला होता. ही गोष्ट जेव्हा त्याच्या आईला समजली, तेव्हा त्या त्याच्यावर खूप चिडल्या होत्या. राहुलवर त्या इतक्या नाराज झाल्या होत्या, की काही दिवसांकरिता त्यांनी त्याच्याशी बोलणंच बंद केलं होतं.

बीडमध्ये चाललंय काय? महिला वकिलाला सरपंचासह इतरांची पाईप, काठ्यांनी बेदम मारहाण, अंग काळंनिळं पडलं

0

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या, खोक्याची दादागिरी, इतर अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मारहाणीचे व्हिडिओंनी बीडमधील राजकीय गुन्हेगारी, दादागिरी समोर आली आहे. एकमेकांविरोदात व्हिडिओची राळ आपण सोशल मीडियावर अनुभवली आहे. आता बीडमध्ये पुन्हा एकदा गुंडाराज दिसून आला. एका महिला वकिलाला गावातीलच सरपंचासह इतर आरोपींनी काठ्या, पाईपने बेदम मारहाण केली. या मारहाणीने अंग काळंनिळं पडलं आहे.

किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण

घरासमोरील गिरणी आणि लाऊड स्पीकर बंद करा अशी विनंती या महिलेने गावातील सरपंचाकडे केली होती. त्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. त्यानंतर तिला तू पोलिसांकडे तक्रार कर, असे सांगितले. मदत दूरच सतत त्रास होत असल्याने मग महिला वकिलाने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर संतापलेल्या सरपंचासह गावातील 10 पुरूषांनी या महिला वकिलाला बेदम मारहाण केली. काठ्या आणि जेसीबी पाईपाने एका शेतात नेत रिंगण करून अमानुष मारले. यात तिचे अंग काळंनिळं पडलं. या घटनेने पुन्हा एकदा बीडमध्ये चाललंय काय? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. महिलेला अशी वागणूक देण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.

महिला वकिलाची बाजू काय?

अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथे ही घटना घडली. पीडित महिला वकिलाने तिची आपबिती टीव्ही ९ मराठीशी बोलताना मांडली. मंदिरावरील लाऊड स्पीकर, गावातील गिरणी यामुळे ध्वनी प्रदूषण होते. लाऊड स्पीकर बंद करण्याची विनंती तिने सरपंचाकडे केली होती. पण त्यांनी टाळाटाळ केली. संबंधित व्यक्तीने सुद्धा तिची बाजू ऐकली नाही. महिला वकिलाला डोकेदुखीचा त्रास होत होता. तिने लाऊड स्पीकरचा आवाज कमी करण्याची विनंती केली होती. तिने मग पोलिसांना याविषयीची तक्रार दिली.

पोलिसांकडे तक्रार दिल्याने सरपंचासह त्याचे कार्यकर्ते महिला वकिलाच्या घरी आले. त्यांनी तिच्या आई-वडिलांना माफी मागायला लावली. पण हे प्रकरण तेवढ्यावर मिटले नाही. आरोपींनी महिला वकिलाला एका शेतात नेत काठ्या आणि जेसीबी पाईपने गोल रिंगण करत बेदम मारहाण केली. यात ती महिला वकील बेशुद्ध पडली. तिला दवाखान्यात नेण्यात आले. रात्री उपचार करून घरी पाठवून देण्यात आले. या मारहाणीमुळे तिला चालणे आणि बोलणे सुद्धा कठीण जात आहे. गावकऱ्यांनी याप्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

‘फुले’ हिंदी चित्रपट ट्रेलर पाहून अंदाज लावू नका, चित्रपट पाहा”, ‘फुले’ चित्रपटाच्या वादावर दिग्दर्शक अनंत महादेवन यांची प्रतिक्रिया

0

महात्मा जोतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित येऊ घातलेल्या ‘फुले’ या हिंदी चित्रपटामुळे वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटातील काही दृश्ये वगळावीत, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली होती. यानंतर सेन्सॉर बोर्डानेही यातील काही दृष्यांवर आक्षेप घेतला आहे. यानंतर राजकीय नेतेमंडळी, सामाजिक क्षेत्रातून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. महात्मा फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून येत्या २५ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटावर दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांनी घाई करून चित्रपटाबद्दल चुकीचा अर्थ काढला, असे अनंत महादेवन म्हणाले.

अनंत महादेवन यांनी नुकतंच एक पत्रक काढलं आहे. या पत्रकाद्वारे अनंत महादेवन यांनी चित्रपटाबद्दल लोक चुकीचा अर्थ काढत आहेत. “अनेक लोक ट्रेलर पाहून चित्रपट समाजाविरुद्ध आहे, योग्य प्रतिनिधित्व करत नाही असे अनुमान काढत आहे. पण त्यांनी संपूर्ण चित्रपट पाहावा. मग तुम्हाला यात दाखवण्यात आलेल्या सर्व बाजू समजतील”, असे अनंत महादेवन म्हणाले.

केवळ ट्रेलरवर अवलंबून न राहता संपूर्ण चित्रपट पाहावा. चित्रपट पाहिल्यावर लोकांना समजेल की यात सर्व बाजू संतुलितपणे दाखवण्यात आल्या आहेत. जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्या सकारात्मक दृष्टिकोनातून समाजाकडे पाहिले, त्याच दृष्टिकोनातून या चित्रपटाकडे पाहावे. हा चित्रपट दलित आणि अन्याय सहन करणाऱ्या वर्गाला वर आणण्यासाठी बनवला आहे. कोणत्याही उच्च वर्गाला खाली दाखवण्यासाठी नाही, असेही अनंत महादेवन यांनी म्हटले.

सेन्सॉर बोर्डाने काय बदल सुचवले?

फुले दाम्पत्याने केलेल्या रक्तरंजित क्रांतीचा उद्देश एकसंध भारत आणि वर्गांमध्ये समानता आणणे हा होता. जेणेकरून आपण ब्रिटिशांविरुद्ध लढू शकू. सेन्सॉर बोर्डाने काही बदल सुचवताना अधिक संवेदनशीलता दाखवली, ज्याची गरज नव्हती. बोर्डाने चित्रपटात इतिहासाचे योग्य चित्रण असल्याचे मान्य केले होते. त्यांनी केवळ एका विशिष्ट समाजाचे नाव न घेता ‘मागासलेले वर्ग’ असा उल्लेख करण्यास सांगितले. तसेच, एका संवादात ‘3000 वर्षांपूर्वी’ हे वाक्य बदलून ‘अनेक वर्षांपूर्वी’ करण्यास सांगितले. हे बदल फार महत्त्वाचे नव्हते आणि जरी ते तसेच ठेवले असते तरी कोणालाही आक्षेप आला नसता, असेही महादेवन यांनी नमूद केले.

जर कोणी या चित्रपटाचा वापर राजकीय साधन म्हणून करू इच्छित असेल, तर ते त्यांच्या अधिकार क्षेत्रात नाही. मात्र, सर्व राजकीय पक्षांनी या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे, ही चांगली गोष्ट आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना संपर्क साधून चित्रपटासाठी समर्थन दर्शवले आहे, असेही अनंत महादेवन म्हणाले.

विशेष स्क्रीनिंगचे आयोजन नाही

इतर चित्रपट आधुनिक समाजाचे दिग्दर्शकांचे मत दर्शवतात आणि त्यात काल्पनिक गोष्टींचा वापर केला जातो. ‘फुले’ मात्र इतिहासाचे प्रामाणिक चित्रण आहे. यात कोणतीही काल्पनिक गोष्ट नाही. त्यामुळे यात काहीही वाढवून सांगितले आहे किंवा हेतुपुरस्सरपणे काही अजेंडा चालवला आहे, असे म्हणण्याची गरज नाही, असे महादेवन यांनी स्पष्ट केले. जर काही चूक केली असेल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तरच त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्याची गरज आहे. अन्यथा, कोणासाठीही विशेष स्क्रीनिंग आयोजित केली जाणार नाही, असेही महादेवन यांनी स्पष्ट केले.

मोदी सरकारला झटका.. वक्फ कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; सरकारला 7 दिवस वेळ तोपर्यंत नव्या कायद्याला स्थगिती

0

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या वक्फ कायद्यावरून विरोध सुरू असताना आता सुप्रीम कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि केंद्र सरकारला झटका देणारा निर्णय दिला आहे. आज (17 एप्रिल) झालेल्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायद्यावर केंद्र सरकारला 7 दिवसांचा वेळ दिला. केंद्राला एका आठवड्यात यावर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. तोपर्यंत कोर्टाने वक्फच्या नव्या कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे.

केंद्राचा प्रतिसाद येईपर्यंत वक्फ मालमत्तेची स्थिती बदलणार नाही. सरकार प्रतिसाद देत नाही तोपर्यंत हीच स्थिती राहील. यासोबतच, पुढील आदेश येईपर्यंत नवीन नियुक्त्या होणार नाहीत. असंही कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे.

सुप्रीम कोर्टाकडून वक्फ कायद्याला अंतरिम स्थगिती

गुरुवारी, सलग दुसऱ्या दिवशी, सर्वोच्च न्यायालयात वक्फ कायद्याच्या संवैधानिक वैधतेवर सुनावणी सुरू होताच, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आपला युक्तिवाद सुरू केला आणि म्हटले की, स्थगिती लादण्याचा कोणताही आधार नाही.

वक्फ कायद्यात केलेल्या दुरुस्तीविरुद्ध देशभरातील अनेक राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुख्य याचिकाकर्त्यांमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीआय, वायएसआरसीपी यासह अनेक पक्षांचा समावेश आहे. याशिवाय, त्यात अभिनेता विजयचा पक्ष टीव्हीके, आरजेडी, जेडीयूचे मुस्लिम खासदार, एआयएमआयएम आणि आप यासारख्या पक्षांचे प्रतिनिधी देखील समाविष्ट आहेत.

वक्फ कायदा म्हणजे काय?

लोकसभा आणि राज्यसभेतून मंजूर झाल्यानंतर, 5 एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयकाला मान्यता दिली. यानंतर, 8 एप्रिल रोजी केंद्र सरकारनेही अधिसूचना जारी केली आणि आता हा कायदा लागू झाला होता. ज्याला आता अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे.

वक्फ (दुरुस्ती) कायद्यात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नवीन कायद्यात केंद्रीय वक्फ परिषद आणि वक्फ बोर्डात दोन बिगर मुस्लिम आणि दोन महिला सदस्यांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. यासोबतच ‘वापरकर्त्याद्वारे वक्फ’ ची तरतूद देखील रद्द करण्यात आली आहे. नव्या कायद्यानुसार, आता जर कोणतीही इस्लामिक इमारत अनेक वर्षांपासून एखाद्या मालमत्तेवर बांधली गेली असेल तर ती वक्फ मालमत्ता घोषित करता येणार नाही. आता कोणतीही मालमत्ता वैध आणि कायदेशीर कागदपत्रे असतील तरच ती वक्फ मालमत्ता मानली जाईल.

वक्फ कायद्यात एक मोठा बदल करण्यात आला आहे की, आता कोणताही मुस्लिम व्यक्ती किमान 5 वर्षांपासून इस्लाम धर्माचे पालन करत असेल तरच त्याची मालमत्ता वक्फसाठी देऊ शकतो. याशिवाय सर्वेक्षणाचे अधिकारही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे आतापर्यंत कोणत्याही मालमत्तेबाबत वाद असल्यास त्याला फक्त न्यायाधिकरणात आव्हान देता येत होते आणि न्यायाधिकरणाचा निर्णय अंतिम असायचा. परंतु नवीन कायद्यानंतर, त्याला वरच्या कोर्टात किंवा उच्च न्यायालयातही आव्हान दिले जाऊ शकते.

महाराष्ट्रात शहांच्या प्लानवर काम सुरु भाजपनं गियर बदलला; दोन्ही DCMचे होमग्राऊंड ताब्यात घेण्यासाठी टीम देवेंद्रचे शिलेदार सक्रिय

0

मुंबई: ज्यावेळी सत्ताधाऱ्यांचं बळ प्रचंड असतं. विरोधकांची ताकद नाममात्र असते. तेव्हा सत्तेतले वाटेकरीच एकमेकांचे विरोधक होतात. राज्याच्या राजकारणात याचा प्रत्यय देणाऱ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महायुतीनं पुन्हा सत्ता स्थापन केली. महायुतीकडे मिळालेला जनादेश त्यांच्या सरकारला कोणताच धोका नाही. पण महायुतीमधील मित्रपक्षच आता एकमेकांसाठी धोकादायक ठरु लागले आहेत.

सत्ता स्थापना, मंत्रिपदांचं वाटप, पालकमंत्रिपद यावरुन भाजप, शिवसेनेत धुसफूस पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली, तर काही निर्णय रद्द करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याची चर्चा रंगली. नागपुरात गेल्याच आठवड्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि राज्यपालांचं भाषण झालं. पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. त्यावेळीही शिंदे नाराज झाल्याची चर्चा रंगली होती.

दुसरीकडे भाजपनं एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जोर मारला आहे. मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ असलेले गणेश नाईक ठाण्यात सक्रिय झाले आहेत. वनमंत्री असलेले नाईक ठाण्यात जनता दरबार घेत ओन्ली कमळचा नारा देत आहेत. ठाणे शहरचे भाजप आमदार संजय केळकर सातत्यानं पालिकेतील भ्रष्टाचार समोर आणत आहेत. ठाणे पालिकेवर कित्येक वर्षे शिंदे यांचं वर्चस्व राहिलं आहे. विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, गणेश नाईक अशी तगडी फळी ठाण्यात सक्रिय झाली आहे. शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात अडचणीत आणण्याची खेळी भाजपनं सुरु केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं उत्तम जमतं, अशी चर्चा कायम होते. पण आता भाजपनं अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्येही विस्तार सुरु केला आहे. भोर मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे निष्ठावंत संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर आहेत. गेल्या ५२ वर्षांपैकी ४५ वर्षे भोरची आमदारकी थोपटेंच्या घरात आहे. यंदाच्या विधानसभेत थोपटेंचा राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर यांनी पराभव केला. भोर मतदारसंघ बारामतीत येतो. थोपटे कुटुंबानं कायम पवार कुटुंबाविरोधात राजकारण केलं आहे. त्यामुळे थोपटे भाजपमध्ये आल्यास बारामतीत पक्षाचं बळ वाढेल.

२०२९ मध्ये भाजप स्वबळावर लढेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आधीच केलेली आहे. भाजपनं विधानसभेला १३२ जागा जिंकताच पक्षानं पुढील विधानसभेच्या दृष्टीकोनातून तयारी सुरु केली आहे. भाजपनं टाकलेला पुढचा गियर त्यांच्याच मित्रपक्षांसाठी अडचणीचा आहे. शिंदे आणि पवारांच्या बालेकिल्ल्यातच भाजपनं ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. भाजपचं वाढतं वर्चस्व त्यांना पुढील निवडणुकीत उपयोगी ठरेल. पण भाजपचं शतप्रतिशत मिशन त्यांच्या मित्रपक्षांना गोत्यात आणणारं ठरणार आहे. बालेकिल्ल्यांमध्ये पडझड झाल्यास शिंदे आणि अजित पवारांसाठी पुढील राजकारण अवघड असेल.

काँग्रेसला मोठा धक्का! संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशाची तयारी? प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक…  22 एप्रिलचा मुहुर्त!

0

काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. ते काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपा प्रवेशासंदर्भात थोपटे यांची केंद्रीय गृहमंत्री अमिता शाहा यांच्यासोबत बैठक झाल्याचेही म्हटले जात आहे.

रविवारी देणार काँग्रेसचा राजीनामा?

काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे हे एकूण तीन वेळा भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत. या मतदारसंघात त्यांचे मोठे प्रस्थ आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराकडून पराभूत झाले. थोपटे यांनी भोरमध्ये त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. याच बैठकीत कदाचीत त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय होऊ शकतो. येत्या रविवारी ते काँग्रेस सदस्यत्व पदाचा राजीनामा देऊ शकतात.

मुंबईत होणार भाजपाप्रवेश?

रविवारी राजीनामा दिल्यानंतर ते लवकरच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. येत्या 22 एप्रिल रोजी ते भाजपात प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. मुंबईत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होईल, असेही सांगितले जात आहे.

काँग्रेसला पुण्यात मोठा फटका बसणार?

दुसरीकडे संग्राम थोपटे हे भाजपात जाणार असल्याची चर्चा चालू झाल्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातही हाचलाची सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे पुण्याच्या जिल्हाध्यक्षांनी पुण्यातील काँग्रेस भवनात एक तातडीची बैठक बोलावली आहे. संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केला तर काँग्रेसचे पुण्यात मोठे राजकीय नुकसान होऊ शकते. कारण संग्राम थोपटे यांचे वडील जवळपास सहा वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार राहिलेले आहेत. संग्राम थोपटे हेदेखील तीन वेळा भोरमधून आमदार राहिलेले आहेत. यंदा त्यांचा पराभव झाला मात्र त्यांचे राजकीय वजन अजूनही कायम आहे. त्यामुळेच थोपटेंच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान होऊ शकते.

दरम्यान, थोपटे यांचा भाजपा प्रवेश निश्चित मानला जात असल्याने आता काँग्रेस नेमकं काय करणार? थोपटे यांच्या रुपात होणारे नुकसान काँग्रेस कसे भरून काढणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महेश मांजरेकरांना जीवनगौरव विशेष पुरस्कार जाहीर

0

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, व्ही.शांताराम जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची घोषणा केली आहे.

कोणाला कोणते पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात…..

कोणाला कोणता पुरस्कार?

संगीत क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा 2025 सालाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मराठीतील जेष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 2024 सालाचा चित्रपती कै.व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने महेश मांजरेकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर, चित्रपती कै.व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मुक्ता बर्वेला देण्यात येणार आहे. तर स्व.राजकपूर जीवन गौरव पुरस्कार अनुपम खेर यांना जाहीर करण्यात आला आहे. या नावांची आणि पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केली आहे. या पुरस्कारांचे वितरण येत्या 25 एप्रिल 2025 रोजी होणार आहे.

पुरस्काराचे स्वरुप कसं असणार

‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’

या सर्व कलाकारांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे स्वरुप नक्की कसे असणार आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जेष्ठ कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे रोख रक्कम दहा लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र आणि शाल. लता मंगेशकर पुरस्कार्थिची निवड करण्याकरता शासन स्तरावर एका समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्य मंत्री असून यामध्ये पाच अशासकीय सदस्य आहेत. पं ब्रिजनारायण, अशोक पत्की, सत्यशील देशपांडे, पं उल्हास कशाळकर आणि अंबरीश मिश्र यांचा या समितीमध्ये समावेश होता.

‘चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार’

मराठी चित्रपट क्षेत्रात अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा कलाकारांना चित्रपती. व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. तसेच या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरास चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. 2024 सालाचा चित्रपती कै.व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार श्री. महेश मांजरेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुर असणार आहे 10 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र तसचे चांदीचे मेडल.

‘चित्रपती कै.व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार’

2024 सालाचा चित्रपती कै.व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मुक्ता बर्वेला जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरुप असणार आहे 6 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र , चांदीचे मेडल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार’

हिंदी चित्रपट क्षेत्रात अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा मान्यवरास स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तसेच या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरास स्व. राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. 2024चा स्व.राजकपूर जीवन गौरव पुरस्कार अनुपम खेर यांना जाहीर करण्यात येत आहे. या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे 10 लक्ष, स्मृतिचिन्ह व मानपत्र , चांदीचे मेडल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.