Home Blog Page 114

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेला मोठी भेट; स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच हस्ते होणार लोकार्पण

0

१ मे ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेला मोठी भेट मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला होणार असून लोकांच्या सेवेत येणार आहे.

आनंदाची गोष्ट म्हणजे समृद्दी महामार्गाच्या तिसऱ्या व शेवटच्या इगतपुरी ते आमणे 76 किलोमीटरच्या टप्प्याचे लोकार्पण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे नाशिक ते मुंबई प्रवास अवघ्या तीन तासांवर येणार आहे. तर मुंबई नागपूर अंतर आठ तासांत गाठता येईल.

एमएसआरडीसीने 701 किमी लांबीचा आणि 55 हजार कोटी रुपयांचा निधी खर्चून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. यापैकी ६२५ किलोमीटरचा महामार्ग हा या अगोदरच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता इगतपुरी-आमणे, भिवंडी या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्याच्या लोकार्पणाचा मुहुर्त ठरला आहे. त्यामुळे नाशिक ते मुंबई व नागपूर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

एमएसआरडीसी तर्फे उभारण्यात येणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम या अगोदरच पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र यासाठी मोठा विलंब झाला. अखेरीस इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महाराष्ट्र दिनी खुला होत आहे. 35 मीटर रुंद आणि 6 लेन दुहेरी बोगद्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. इगतपुरी-आमणे, भिवंडी हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबईकरांना केवळ आठ तासांत नागपूर गाठणे शक्य होणार आहे.

समृद्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण हे ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण २६ मे २०२३ ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. आता समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या व अत्यंत आव्हानात्मक अशा टप्प्याचे लोकार्पण १ मेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

समृद्धी महामार्ग बाबत सांगायचे झाले तर हा सहा पदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. या महामार्गाची लांबी 701 किमी आहे व याची रुंदी 120 मीटर इतकी आहे. या महामार्गावरून वाहने तब्बल 150 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावू शकणार आहेत. तसेच या महामार्गावर 65 फ्लायओव्हर, 24 इंटरचेंज, 6 बोगदे आणि अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास सुद्धा विकसित करण्यात आले आहेत.

या महामार्गावर जुळे बोगदे देखील तयार करण्यात आले आहेत. इगतपुरी ते मुंबईदरम्यान कसारा जवळ 8 किलोमीटर लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे, जो अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टमने सुसज्ज आहे.

हिंदीला विरोध अन् इंग्रजीला पालख्या आश्चर्य वाटते; देवेंद्र फडणवीसांनी काय दिला हा इशारा?

0

महाराष्ट्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यम शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा तिसऱ्या भाषेच्या रूपात सक्तीने शिकवली जाणार आहे.यामुळे संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापले असून, सरकारवर विरोधकांनी टीकास्त्र चालवले आहे.

फडणवीसांचा स्पष्ट इशारा – “मराठीचा अपमान सहन होणार नाही”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर भाष्य करत स्पष्टपणे सांगितले की, “मराठी ही राज्याची अभिमानाची भाषा आहे. ती शिकवणे सक्तीचे असले पाहिजे, पण हिंदी शिकविणे म्हणजे हिंदी लादणे नाही. मात्र, हिंदीला विरोध अन् इंग्रजीला पालख्या घालणे हेच आश्चर्य वाटते.” तसेच, “मराठीचा कोणीही अपमान केला तर आम्ही गप्प बसणार नाही,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.

राज ठाकरे आक्रमक; “हिंदीकरण थोपवू नका”

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, “आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही! महाराष्ट्रावर हिंदीकरण थोपवण्याचा प्रयत्न झाल्यास संघर्ष अटळ आहे.” तसेच, “हे सर्व पाहता, सरकार मुद्दामहून वाद निर्माण करत आहे. हे आगामी निवडणुकीसाठी मराठी-विरुद्ध-मराठी संघर्षाचे राजकारण आहे,” अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेस, राष्ट्रवादीचाही विरोध

या निर्णयाला काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार विरोध केला आहे. त्यांच्या मते, मराठी विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती लादणे म्हणजे त्यांच्या भाषिक अभिमानावर घाला घालण्यासारखे आहे. विरोधकांनी सरकारवर “हिंदी थोपण्याचा कट” रचल्याचा आरोप केला आहे.

शैक्षणिक धोरणाचे गोंधळात स्वागत?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या पार्श्वभूमीवर त्रिभाषा सूत्र राबवले जात आहे. याअंतर्गत, विद्यार्थ्यांना मातृभाषेसोबत दोन अतिरिक्त भाषा शिकवण्याचा उद्देश आहे. परंतु, प्राथमिक स्तरावरच हिंदीची सक्ती केली जाणे हा मुद्दा वादग्रस्त ठरत आहे.

इंग्रजीला मान, हिंदीला तिरस्कार?

फडणवीसांनी उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. राज्यात इंग्रजी शिकवण्याबाबत कुणीही आक्षेप घेत नाही, पण हिंदीची सक्ती आली की विरोध वाढतो. त्यामुळे, हा विरोध भाषेच्या आधारावर आहे की राजकारणासाठी आहे, असा सवालही उपस्थित होतो.

विद्यार्थ्यांवर परिणाम?

या निर्णयामुळे मराठी आणि इंग्रजी माध्यम शाळांमध्ये अभ्यासक्रमात मोठा बदल अपेक्षित आहे. शिक्षकांची पुनर्रचना, नवीन पुस्तके आणि अध्यापन पद्धती यांचीही आवश्यकता भासणार आहे. पालकांमध्येही यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

काय पुढे होईल?

सरकार आपला निर्णय मागे घेणार का, की विरोधकांचा विरोध वाढत जाईल? याचे उत्तर आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना चांगल्याच पेटल्या आहेत.

मोठी बातमी महाराष्ट्रात बदलाची हवा! राज ठाकरेंचे उद्धव यांच्यासोबत युतीचे संकेत; म्हणाले, आमचे वाद किरकोळ

0

राज्याचं राजकारण गेल्या काही काळापासून प्रचंड अस्थिर झालं आहे. यापार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात पुन्हा बदलाची हवा वाहू लागली आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीचे संकेत दिले आहेत. निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव मे ट्रुथ’ या पॉडकास्टमध्ये याबाबतच विधान केलं आहे. आपली सविस्तर भूमिका मांडताना आम्हा दोघांमधील वाद किरकोळ आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं?

राज ठाकरे यांना महेश मांजरेकर यांनी थेट प्रश्न विचारला की, शिवसेना फुटली किंवा नाही फुटली, तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? यावर राज ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी म्हटलं की, मी कधी आयत्या पिठावर रेघोट्या मारत नाही. मुळात शिंदेंचं बाहेर, त्यांचं फुटणं आमदार घेऊन बाहेर जाणं हे वेगळ्या राजकारणाचा भाग झाला. मी शिवसेनेतून बाहेर पडणं हे वेगळं आहे.

माझ्यासोबत आमदार, खासदार सर्वजण यायला तयार होते. माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती की बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. मी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा माझी मनस्थिती अशी होती की, बाळासाहेब असोत किंवा उद्धव असोत त्याच्याबरोबर मला काम करायला काहीच हरकत नव्हती.

पण समोरच्याची इच्छा आहे का? मी त्याच्यासोबत काम करावं? यावर मांजरेकरांनी विचारलं की, पण महाराष्ट्राची इच्छा आहे ना! यावर राज ठाकरे म्हणाले, “मग महाराष्ट्रान जाऊन सांगावं तिकडं. प्रश्न असा आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी कधी माझा इगो मध्ये आणत नाही”

अण्णाभाऊ साठेंना “लोकशाहीर” ही उपाधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली – प्रबुद्ध साठे

0

मुंबई दि. १८ (रामदास धो. गमरे) “गिरणी कामगारांच्या प्रश्नांकरता अण्णाभाऊ साठे आणि मोरे हे निवेदन घेऊन राजगृहवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी गेले असता नेहमीप्रमाणे बाबासाहेब लिखाण करीत बसले होते काहीवेळांने त्यांचे लक्ष प्रतीक्षा करीत असलेल्या साठे आणि मोरेंकडे गेले आणि बाबासाहेबांनी त्यांना नजरेनेच सूचना करीत बसण्यास सांगितले तेव्हा ते खुर्चीवर स्थानापन्न झाले त्यांनी लिखित निवेदनपत्र बाबासाहेबांच्या हाती सुपूर्द केले, निवेदन वाचून बाबासाहेबांनी त्यांना तिथेच गिरणी कामगारांच्या सर्वच प्रश्नांना मंजुरी देण्याचा शब्द देत कायदेशीर प्रक्रियेसाठी निवेदन पुढे पाठवून दिले, त्यावेळी मोरे यांनी अण्णाभाऊंची ओळख करून देताना बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब हे अण्णाभाऊ साठे त्यावेळी बाबासाहेब हसून म्हटले ही मी त्यांचं लिखाण वाचलं आहे त्यांचं लिखाण माझ्या परिचयाचे असून हे नुसते अण्णाभाऊ नाहीत तर ते खऱ्या अर्थाने “लोकशाहीर” आहेत व त्यावेळीच त्यांना बाबासाहेबांनी अण्णाभाऊना “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे” या उपधीने अलंकृत केले” असे प्रतिपादन प्रबुद्ध साठे यांनी अण्णाभाऊ साठे नगर शिवडी येथे बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने आयोजित भीम महोत्सव – २०२५ या कार्यक्रमात प्रमुख वक्ता या नात्याने बोलत असताना केले.

बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ५७८, माता रमाई महिला मंडळ, पंचशील मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव अर्थात भीम महोत्सव – २०२५ शाखाध्यक्ष श्रीधर मोरे यांच्या अधिपत्याखाली अण्णाभाऊ साठे नगर, गृहनिर्माण हौसिंग सोसायटी, मुंबई – १४ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी १३ एप्रिल २०२५ रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमास प्रारंभ झाला, पहिल्या सत्रात मुलांकरता धावण्याची स्पर्धा तर दुसऱ्या सत्रात मुलांकरता चित्रकला स्पर्धा तर रात्री तिसऱ्या सत्रात मुलांचा नृत्य कलाविष्कार स्पर्धा हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले, धावण्याच्या स्पर्धेचे परीक्षक हर्ष सिंग तर चित्रकला स्पर्धेचे परीक्षक विशाल गमरे, नितेश मोरे, सागर मोहिते तर नृत्य कलाविष्कार स्पर्धेचे परीक्षक विशाल कांबळे होते सर्व परीक्षकांनी पारदर्शक पद्धतीने परीक्षण केले, मध्यरात्री १२ वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

दि. १४ एप्रिल २०२५ रोजी जैतवन बुद्ध विहार याठिकाणी महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करून मानवंदना देण्यात आली तद्नंतर योगिता उल्हास मोरे, अनंत गोविंद मोहिते, राजाभाऊ तथा रामदास धोंडू गमरे यांनी धार्मिक पूजापाठ सुमधुर वाणीने पार पाडला, त्यानंतर अनेक वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले, सर्व वसाहतीमधील नागरिकांना वैद्यकीय तपासणी साठी मोफत वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले सदर शिबीराचे उद्घाटन माजी कार्यसम्राट नगरसेवक सुनील मोरे, अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक वंजारी साहेब, मुंबई अध्यक्ष संदीप मोहिते या तिघांच्या शुभहस्ते करण्यात आले सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० यावेळेत अनेक रहिवाश्यांनी आवर्जून हजेरी लावून सदर शिबिराचा लाभ घेतला, शिवडी गटक्रमांक १३ च्या वतीने निघणाऱ्या भव्यदिव्य मिरवणुकीत सर्वांनी सहभागी होऊन मिरवणुकीचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिले त्या घटनेस ७५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्यदिव्य संविधान प्रतिकृती बनवली होती त्याचे उद्घाटन माजी नगरसेवक सुनील मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

दि. १५ एप्रिल २०२५ रोजी महिलांसाठी पैठणीचा खेळ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दि. १६ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण खेळांच्या बक्षीस वितरण व प्रमुख वक्ते प्रबुद्ध साठे यांच व्याख्यान आयोजित करण्यात आले होते सदर व्याख्यान सुरू असताना कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर साहेब आले त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपल्या व्याख्यानात प्रबुद्ध साठे पुढे म्हणाले की “मातंग, चर्मकार आणि बौद्ध हे तीन भाऊ एकत्र आले आणि एक समाज निर्माण झाला तर विकासाची कवाडे आपोआप खुली होतील आणि बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने गतिमान करण्यासाठी आपला हातभार लागेल, बाबासाहेबांनी मातंग समाजसाठी अनेक परिषदा घेतल्या आणि अण्णाभाऊंनी ही बाबासाहेब आंबेडकरांना आपला गुरू मानून त्यांचे विचार आत्मसात करून आपल्या लेखणीतून त्यांनी बाबासाहेब व बाबासाहेबांचे विचार मांडले, त्यांनी लिहिलेली फकिरा ही कादंबरी ही त्यांनी बाबासाहेबांना समर्पित केली आहे, आज बाबासाहेबांना अनुसरून बौद्ध समाज सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहे, मातंग समाज आज ही अंधश्रद्धा रूढी-परंपरा यात अडकलेला आहे म्हणून अण्णाभाऊंचा आदर्श घेत जर बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून समाज चालला तर जास्तीत जास्त लेखक, विचारवंत समाजातून घडू शकतात” असे विचार व्यक्त केले.

सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे गटक्रमांक १३ चे व अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानचे सरचिटणीस मोहिते, मातंग युवा संघटनेचे शिंदे, लोकरे, बाळ अडसूळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश जाधव व उपेंद्र लोखंडे यांनी केले तर प्रस्ताविक राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी सादर केले. सदर प्रसंगी विजेत्यांना ट्रॉफी, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. चार दिवसीय भीम महोत्सव – २०२५ भूतो न भविष्यती असा संपन्न झाला, सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पंचशील मंडळाच्या तरुण कार्यकर्ते, महिला मंडळ यांनी तसेच अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून सरचिटणीस अनंत मोहिते यांनी भीम महोत्सव – २०२५ या चार दिवसीय कार्यक्रमाची सांगता केली.

मुंबईतील दिगंबर जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा; मंदिराच्या पुनबांधणीची कारवाई करा सकल जैन समाजाची मागणी

0

पुणे- ता. १८ मुंबई येथील विलेपार्ले (पुर्व) श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर हे ३० वर्षाहून जुने मंदिर आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही, घाईघाईने मुंबई महापालिका प्रशासनाने मंदिर जमीनदोस्त केल्याने जैन समाजाच्या नावना दुखावल्याच्या निषेधार्थ पुण्यातील एच. एन. डी जैन बोर्डिंग येथे सकल जैन समाजाने मिटिंग घेऊन निषेधाचा ठराव करण्यात आला व शासनाने लक्ष वेधण्यासाठी निषेध मोर्चा काढून मा. कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात यावे असे ठरले.

ही एक छोटीशी घटना असे कोणास वाटत असले तरी हा जैन धार्मियांसाठी धोक्याचा मोठा इशारा आहे. सत्ता बल यांच्या ताकदीवर जैन समाजाचे श्रध्दास्थान ताब्यात घेतले जातील. जैन समाज शांतताप्रिय आहे. त्यामुळे तो आपलं काही वाकडंकरू शकत नाही. हा समज केल्याने सातत्याने जैन समाजाला टार्गेट केले जात आहे. ज्या पध्दतीने हे मंदिर पाडण्यात आले ते अत्यंत निषेधार्ह आहे आणि त्यामुळे जैन समुदायात संताप निर्माण झाला आहे. या कारवाईमुळे देशभरातील जैन समाज आणि इतर शांतता प्रिय समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे. याबाबत सकल जैन समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथील विलेपार्ले (पुर्व) येथील जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची आणि मंदिराच्या पुनबांधणीची कारवाई करावी यासाठी चिंचवड येथे निवेदन देण्यात आले. कृपया ही बाब गांभीर्याने घेत आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.

यावेळी अभय छाजेड, अचल जैन, मिलिंद फडे, सुरेंद्र गांधी, चंद्रकांत पाटील, अजीत पाटील, अण्णासाहेब पाटील, अशोक पगारीया, राजेंद्र सुराणा, अंड घोगेश पांडे, अंड शितल लोहाडे, उदय लेंगडे, प्रितम मेहता, सी.ए. सुर्यकांत शहा, मनीष बडजाते, अनय जैन, किरण शहा, पद्म अजमेरा, सुजाता शहा, महावीर शहा, सुनिल कटारिया अनेक जैन समाजाचे प्रतिनीधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप नेता ६० व्या वर्षी पहिल्या विवाहबंधनात; वधूच्या बाजूनेच प्रस्ताव फक्तं यामुळे लग्नाचा निर्णय: दिलीप घोष

0

प. बंगालचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष शुक्रवारी संध्याकाळी वयाच्या साठाव्या वर्षी पक्षातील सहकारी रिंकू मजुमदार यांच्याशी विवाह करणार आहेत. हे दोघेही एकमेकांना २०२१ पासून ओळखत असल्याची माहिती त्यांच्या नजीकच्या लोकांनी दिली. सकाळच्या फेरफटक्यादरम्यान त्यांची एकमेकांशी ओळख झाली. त्यानंतर हळूहळू ही ओळख वाढत गेली. कोलकत्यातील न्यू टाऊन येथील समारंभात हे जोडपे एकमेकांशी विवाहबद्ध होईल. भाजपचे प. बंगालचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी घोष यांच्या घरी जात त्यांना शुभेच्छा दिल्या. वधूच्या बाजूने विवाहाचा प्रस्ताव दिल्या गेल्याचेही समजते. नुकत्याच झालेल्या आयपीएल सामन्याला घोष यांनी मजुमदार यांच्याबरोबर हजेरी लावली होती. त्याचवेळी दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. घोष अविवाहित असून मजुमदार यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांना एक मुलगाही आहे.

घोष हे तरूणपणापासून रा. स्व. संघाचे सदस्य आहेत. भाजपमध्ये २०१५ ला सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी देशभरात विविध पदांवर सेवा बजावली आहे. भाजपचे प. बंगालचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या कार्यकाळात भाजप राज्यात माकपची जागा घेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला.

आईच्या इच्छेमुळे लग्नाचा निर्णय

वयाच्या ६० व्या वर्षी लग्न करण्याबाबत वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिलीप घोष म्हणाले, की मी विवाह करावा, अशी माझ्या आईची इच्छा होती. त्यामुळे, तिच्या इच्छेचा मान राखण्यासाठी मी विवाहबद्ध होत आहे. मी राजकारणात पूर्वीसारखाच सक्रिय राहणार असून माझ्या वैयक्तिक आयुष्याचा राजकीय कारकिर्दीवर कोणताही परिणाम होणार नाही.

पूर्वी शरद पवारांचे मोठे छत्र होते; ‘महाब्रॅंड’च्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे 5 वर्षांचे ‘नागरी व्हीजन’ सादर

0

‘शिक्षण, आरोग्य, दळणवळणाच्या सुविधा याचबरोबर राज्यात परकीय गुंतवणूक वाढवून रोजगारनिर्मिती करणे, कष्टकरी समाजासाठी स्वस्तात घरे बांधणे यावरच राज्य सरकारचा भर राहणार आहे. शेतीबरोबरच प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे. ‘शिक्षण, आरोग्य, दळणवळणाच्या सुविधा याचबरोबर राज्यात परकीय गुंतवणूक वाढवून रोजगारनिर्मिती करणे, कष्टकरी समाजासाठी स्वस्तात घरे बांधणे यावरच राज्य सरकारचा भर राहणार आहे. शेतीबरोबरच प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे.त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे.

राज्य सरकारच्या पहिल्या १०० दिवसांत याच गोष्टींना प्राधान्य देण्यात आले होते. पुढील पाच वर्षांत याच दिशेने राज्य सरकारचा कारभार करून नागरिकांच्या स्वप्नांची पूर्तता करू,’ असा विश्‍वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. विकास करायचा असेल तर सत्तेत असणे आवश्‍यक आहे, विरोधात बसून, आंदोलने करून आपण नागरिकांची स्वप्ने साकारू शकत नाहीत, असेही पवार यांनी स्पष्ट केले. पुण्यात शुक्रवारी महाब्रॅंड कार्यक्रमात ‘सकाळ’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत घेतली. पवार यांच्या खास शैलीत रंगलेल्या मुलाखतीत त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर परखड मत व्यक्त करत पाच वर्षांचे व्हीजन मांडले.

‘एआय’शिवाय गत्यंतर नाही

राज्याची प्रगती करताना प्रशासनात सुधारणा होणे आवश्‍यक आहे, त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करणे ही काळाची गरज आहे. पूर्वी वाचता येणे, लिहिता येणे याला साक्षर समजले जात होते. त्यानंतर जो संगणक साक्षर आहे, त्याला महत्त्व आले. तसेच आता ‘एआय’चा वापर करणे शिकलेच पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही. राज्यातील अनेक कंपन्या ‘एआय’चा वापर करत असून, त्यांचे प्रयोग यशस्वी झाले आहेत.

‘एआय’च्या वापरासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतीसाठी ‘एआय’चा वापर फायदेशीर ठरला असून, पाण्याचा वापर कमी होणे, उत्पन्न वाढणे, तसेच खताची बचत होत आहे. शेतीमध्ये ‘एआय’चा वापर वाढावा, यासाठी आवश्‍यकता भासल्यास पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद उपलब्ध करून दिली जाईल. आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक तरी निर्णय हा ‘एआय’च्या संदर्भात होतो.

आर्थिक शिस्तीसाठी आग्रही

राज्याचा अर्थसंकल्प ७ लाख २० कोटी रुपयांचा आहे, त्यातील साडेतीन लाख कोटी रुपये पगार, निवृत्तिवेतन, कर्जाचे व्याज यासाठी खर्च होतात. उर्वरित उत्पन्न हे विकासकामांसाठी आहे. राज्याचे स्थूल उत्पन्न हे ८५ लाख कोटी रुपयांचे आहे, केंद्र सरकारने काही नियम ठरवून दिले आहेत, त्याच्या बाहेर कोणालाही जाता येत नाही.

यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश राज्यात आणला, तेव्हापासून प्रत्येक सरकारने व्यवस्थित कामे केले. आता राज्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे असे आम्ही तिघेही आर्थिक शिस्तीसाठी आग्रही आहोत.

ज्यांना मराठी येते, त्यांना हिंदीची अडचण नाही

भारतातील अनेक राज्यांत हिंदी भाषा बोलली जाते, ती आपल्या मुलांना आली पाहिजे, यासाठी पहिलीपासून हिंदी शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येकाला मातृभाषा बोलता, लिहिता आणि वाचता आलीच पाहिजे. इंग्रजीही आली पाहिजे. स्पर्धेच्या युगात आपली मुले टिकली पाहिजेत, यासाठी जास्त भाषा शिकल्या पाहिजेत. ज्यांना मराठी भाषा येते, त्यांना हिंदी भाषा शिकताना अडचण येत नाही, ही समस्या कर्नाटक व अन्य राज्यांमध्ये आहे.

खुट्टा हलवून बघू नका

महायुतीच्या पूर्वीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुमची ट्युनिंग चांगली होती की आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ट्युनिंग चांगली आहे, असा प्रश्‍न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मिस्कीलपणे माझे ट्युनिंग कोणासोबत जुळते ते सर्वांना माहिती आहे, उगीच हा प्रश्‍न विचारून खुट्टा हलवून मजबूत करू नका, असे उत्तर दिले. त्यावर सभागृहात हास्याचे फवारे उडाले, टाळ्या वाजवून त्याला उपस्थितांनी प्रतिसादही दिला.

विरोधकांवर नाराजी

विकासासाठी सत्ता हा ट्रेंड झालाय का? असा प्रश्‍न विचारताच अजित पवार म्हणाले, ‘हे योग्य की अयोग्य यावर विचार करण्याचे दिवस आता निघून गेले आहेत. तुमच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्तेत असणे महत्त्वाचे आहे.

विरोधी पक्षात बसून नुसती आंदोलने करून काही होत नाही. आताचे विरोधक रोज सकाळी उठून काहीही बोलतात, त्यामुळे ते समोर आले तरी त्यांच्याशी बोलायची इच्छा होत नाही. विरोधकांना आता कोणी महत्त्वही देत नाही.

टाटांनी मुळशीचे पाणी दिले पाहिजे

पुणे, पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. खडकवासला धरण प्रकल्पातील २२ टीएमसी पाणी पुणे शहरासाठी लागते. त्यामुळे शेतीसाठीचे पाणी कमी झाले. पण धरणातील पाण्यावर पहिले प्राधान्य हे पिण्यासाठीच आहे, त्यानंतर शेती व उद्योगाला दिले जाते.

मुळशी धरणाचे पाणी हे पुणे व पिंपरी-चिंचवडला मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू असून, टाटा कंपनीने हे पाणी दिले पाहिजे. उद्योगांनी ‘एसटीपी’चे पाणी घेतले पाहिजे.

माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठवड्यातून एकदा होणाऱ्या बैठकीबद्दल पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. आमच्यावर पूर्वी शरद पवार यांचे छत्र होते; पण ते आता नाही. त्यामुळे आमच्या पक्षात संवाद राहिला पाहिजे, यासाठी आठवड्यातून एकदा मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी पक्षाची बैठक होते.

त्याला आमदार, मंत्री, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असतात. आमच्यातील कोणी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असेल तर शेतकरी नाराज होतात. त्याचा फटका आपल्याला बसतो. त्यामुळे पक्षातील नेते त्यांचे कान टोचतात, अशा शब्‍दांत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव न घेता त्यांनी भाष्य केले.

म्हणून तरुणांना मंत्रिमंडळात संधी

राजकारणात तरुणांना संधी दिली पाहिजे. पुणे, पिपंरी-चिंचवडमध्ये अनेक तरुणांना महापालिकेत संधी दिली, त्यातूनच ते आमदार, खासदार झाले. शरद पवार यांनी १९९९ ला मला, सुनील तटकरे, जयंत पाटील यांना संधी दिली, त्यामुळेच आमचे नेतृत्व तयार झाले.

आता आम्ही वरिष्ठ झालो आहोत, त्यामुळे पक्षात तरुणांना संधी देणे आवश्‍यक आहे. महायुतीत आमच्याकडे विधानसभा उपाध्यक्षासह दहाच मंत्रिपद आहेत; पण त्यातही तरुणांना मुद्दाम संधी देऊन मंत्री केले आहे.

कष्टकऱ्यांसाठी ६० हजार घरे

कष्टकरी नागरिकांना घरे मिळत नसल्याने शहरात झोपडपट्ट्या वाढत आहेत. वाहनचालक, घरकाम करणाऱ्या महिला, मजूर यासह अन्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना घरे मिळाली पाहिजेत, यासाठी आम्ही आग्रही आहोत.

यासाठी पुणे जिल्ह्यात शासनाच्या जागेवर आम्ही ६० ते ७० हजार घरे बांधणार आहोत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतून महाराष्ट्रासाठी २० लाख घरे मंजूर झाली आहेत. त्याचाही लाभ मोठ्या प्रमाणात नागरिकांना होईल.

नदी सुधार पर्यावरणाचा विचार करूनच

नदीकाठ सुधारचे काम करताना नागरिकांनी पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित करून न्यायालयात धाव घेतली होती. पाटबंधारे विभागाने गेल्या १०० वर्षांत आलेल्या पुराचा अभ्यास करून त्याला मान्यता दिली आहे. काही आक्षेप असतील तर त्यांनी मला पुण्यात येऊन भेटावे.

खरोखरच नदीचे प्रदूषण होत असेल तर महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाने कडक कारवाई केली पाहिजे. पण चिरीमिरी देऊन किंवा दबाव आणून अशी कारवाई करू दिली जाणार नाही. मीदेखील पर्यावरणवादी आहे, अनेक झाडे लावलेली आहेत.

‘लाडकी बहीण’ बंद होणार नाही

लाकडी बहीण योजनेसाठी वर्षाला सुमारे ४५ हजार कोटींचा निधी लागणार आहे. पण कारण नसताना ही योजना बंद होणार, अशी चर्चा केली जात आहे. आम्ही तिघांनीही ही योजना सुरूच ठेवण्याचे ठरवले आहे.

यासाठी राज्य उत्पादन शुल्क, महसूल विभाग, जीएसटी यातून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभेला आमचा पराभव झाला; पण विधानसभा निवडणूक आम्ही लाडक्या बहिणींमुळे जिंकलो आहोत. त्यामुळे ही योजना बंद होणार नाही, हा माझा शब्द आहे.

म्हणून लोकसभा निवडणुकीत त्रास

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने नागरिकांमध्ये राग आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नागरिकांनी त्याचा राग आमच्यावर काढला आणि पराभव झाला होता. खरे तर गटारी, रस्ते अशा प्रश्‍नांचा आमदार, खासदारांचा संबंध नसतो. हे काम नगरसेवक बघत असतो. पण २०२२ पासून महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला होता. पण ओबीसी समाजाचे आरक्षण नसल्याने त्यांच्यावर अन्याय होणार होता. या आरक्षणासाठी काही जणांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत, या मताचा मी आहे.

टेस्ला भारतात एन्ट्री पक्की! उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर पुढील आठवड्यात महाराष्ट्र या 2 शहरांत कार तयार?

0

जगप्रसिद्ध टेस्ला कारचं भारतात उत्पादन करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून एलॉन मस्क यांचा आटापीटा सुरू आहे.भारतीयांनाही टेस्लाचं मोठं आकर्षण आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलॉन मस्क यांच्याशी संवाद साधला आहे. त्यामुळे भारतात टेस्लाचं उत्पादन सुरू होण्यासाठी ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. जर भारतात टेस्लाचा मार्ग मोकळा झाला तर महाराष्ट्रातील चाकण आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये टेस्लाचे प्लांट उभारण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांनी अमेरिकेचे अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क यांच्याशी संवाद साधला असून, तंत्रज्ञान आणि नवीन उपमक्रम क्षेत्रात सहकार्याबाबत चर्चा केली. पुढील आठवड्यात अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्स भारत दौऱ्यावर येत आहेत, त्याआधी ही बैठक झाली आहे. त्यामुळे या भेटीला आणखी महत्त्व आलं आहे. यासोबतच भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारासाठी सुरू असलेल्या वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवरही ही चर्चा महत्त्वाची ठरणार आहे.

या संवादानंतर पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट लिहिली आहे, यात नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे की, एलॉन मस्क यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, ज्यात यापूर्वी वॉशिंग्टन डी.सी. येथे झालेल्या भेटीत विचारले गेलेले विषयही होते. तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात सहकार्याची अफाट शक्यता यावर चर्चा झाली. या क्षेत्रांमध्ये अमेरिकेसोबतची भागीदारी मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.”

मोदी आणि मस्क यांची फ्रेब्रुवारी महिन्यात भेट झाली होती. पंतप्रधान मोदी यांनी वॉशिंग्टन डी.सी. येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी गेले होते. त्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी सांगितले होते की, त्यांनी “अंतराळ, गतिशीलता, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम” याबाबत चर्चा केली होती.

एलॉन मस्क, टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्सचे मालक आहेत. तसंच सध्या ते अमेरिकेच्या ‘Department of Government Efficiency’ (DOGE) चे नेतृत्व करत आहेत, त्यांनी आपल्या कुटुंबासह मोदींची भेट घेतली होती. अमेरिकेतील अनावश्यक खर्च कमी करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या मोहिमेचे नेतृत्व मस्क करत आहेत, तरीही या मोहिमेवर टीका होत असून अनेकांनी त्यातील विसंगती दाखवून दिल्या आहेत. तरीदेखील मस्क यांचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. मस्क यांनी व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांच्यासोबत काही संयुक्त पत्रकार परिषदही घेतल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्णी एलॉन मस्क भारत भेटीवर येणार होते. त्यावेळी भारतात कार उत्पादन प्रकल्पासाठी २ अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणुकीची घोषणा करण्याची शक्यता होती. मात्र टेस्लाचे विक्रीसंबंधीचे आकडे समाधानकारक नसल्यामुळे आणि कंपनीच्या शेअर बाजारातील मूल्यात घट झाल्यामुळे ही भेट पुढे ढकलण्यात आली. भारतात इलेक्ट्रिक कार विक्री वाढत असली तरी एकंदर प्रमाण अद्याप कमी आहे. भारत सरकारने टेस्लासाठी खास धोरण आणले असून, त्याअंतर्गत वर्षाला ८,००० इलेक्ट्रिक कार कमी म्हणजेच केवळ १५ टक्के आयात शुल्कात देशात आणता येणार आहेत.

देशभरातील ३९०० स्टार्टअपमध्ये बारामतीच्या उद्योजकाचा अव्वल स्टार्टअप ठरला; १० लाख रुपयांचे अनुदानही मंजूर

0

युवा उद्योजक अनिकेत गोरख मिंड यास राष्ट्रीय स्तरावरील स्टार्टअप महारथी चॅलेंज स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. ॲग्रिटेक विभागात राष्ट्रीय स्तरावर त्याच्या स्टार्टअपने केलेल्या कामगिरीचे कौतुक झाले असून, त्याच्या कामासाठी १० लाख रुपयांचे अनुदानही मंजूर झाले आहे.दिल्लीत आयोजित या स्पर्धेत देशभरातून ३९०० स्टार्टअप यात सहभागी झाले होते. दिल्लीतील कार्यक्रमात वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले.

शेतकरी कुटुंबातून आलेला व मजुरीमध्ये अधिक खर्च होतो, हे अनुभवलेल्या अनिकेतने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कमी किमतीची अवजारे बनविण्याचा निर्णय घेतला. अनिकेतने स्पार्क ॲग्रो या नावाने बारामती एमआयडीसीमध्ये वर्ष २०१९मध्ये मिंड याने स्टार्ट अप सुरू केला होता.

ही कंपनी पॉवर टिलर, पॉवर वीडर, स्प्रे पंप्स आणि विविध शेती उपयोगी यंत्रांचे उत्पादन व वितरण करते. कंपनीने अल्पावधीतच शॉपिफाय स्टोअरच्या माध्यमातून भारतभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची किमया साध्य केली आहे.

स्टार्टअप सुरू केला आणि कोविडचे संकट आले. त्या काळात त्यालाही अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र चिकाटी आणि नवसंकल्पनांच्या जोरावर आणि ग्रामीण भागातच बालपण गेले असल्याने शेतीचा अभ्यास खोलवर होता.

त्यामुळे त्याने शेती अवजारांच्या क्षेत्रात स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला व यामध्ये त्याला चांगले यश मिळाले. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार व टिकाऊ यंत्र उपलब्ध करून देण्याचे त्याचे ध्येय आहे.

यामुळे स्पार्क ॲग्रोची स्थापना

बारामती तालुक्यातील होळ गावचा हा सुपुत्र, पुण्यात मॅकेनिकल इंजिनिअर झाल्यानंतर मोटर स्पोर्ट्स कंपनी सुरू केली; पण शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची ऊर्मी असल्याने कालांतराने त्याने स्पार्क ॲग्रोची स्थापना केली. आज त्याच्या स्टार्टअपमधून डझनभर युवकांनाही रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे.

”वकिलीचा दुरुपयोग, गावकऱ्यांनी मारहाण केलीच नाही” बीड प्रकरणात गावच्या महिला सरसावल्या

0

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील एका गावामध्ये वकील असलेल्या महिलेला अमानुषपणे मारहाण झाल्याची घटना घडली. पीडितेने केलेल्या आरोपांनुसार गावातल्या १० जणांनी तिला शेतात मारहाण केली.मात्र गावातील काही महिला आणि पुरुषांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला तिच्या वकील असण्याचा दुरुपयोग करते आहे.

नेमकं घडलं काय?

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील महिला सरपंच आणि कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण केली आहे. महिला सरपंच आणि त्यांच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जबर मारहाण केली, असा पीडितेचा आरोप आहे. ही मारहाण इतकी बेदम होती की, वकील महिलेच्या पाठीवर अन् अंगावर काळे-निळे व्रण पडले आहेत.

पीडितेने गावातील ध्वनी प्रदूषणामुळं मायग्रेनचा त्रास होत असल्यानं आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लाऊ नयेत, तसंच आपल्या घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. त्याचाच राग मनात धरून ही मारहाण करण्यात आली, अशी प्राथमिक माहिती आहे. सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळून एका वकील असलेल्या महिलेला मारहाण केल्यानं याप्रकरणी आरोपींवर कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी होत आहे.

”गावकऱ्यांनी मारहाण केलीच नाही”

सरपंच आणि इतर दहा जणांनी मारहाण केल्याचा आरोप असला तरी गावातल्या काही महिला आणि पुरुष मंडळींनी आरोप फेटाळून लावले आहेत. गावातल्या महिला म्हणतात, ही महिला वकिली शिकून आल्याने कायद्याचा गैरवापर करते आहेत. गिरणी बंद करावी म्हणून तक्रारी देते. गावात धार्मिक कार्यक्रम करु देत नाही.

काही पुरुष मंडळींनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, गावात अनेकांवर या महिलेने खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. कायद्याचा अभ्यास असल्याने वाट्टेल तसं ती वागत आहे. तिला गावातल्या लोकांनी मारहाण केलेली नाही. त्यांच्या घरातल्या भांडणामुळे तिला मारहाण झाली असेल. परंतु तिने केलेले सगळे आरोप खोटे आहेत. अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना व्यक्त केली.