Home Blog Page 113

मी राम नव्हे, दशरथाच्या मार्गावर…; 2 लग्न, एका अफेयरवर कमल हासन स्पष्टीकरण देत म्हणाले, ‘मी देवाला मानत नाही’

0

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन, त्रिशा कृष्णन आणि सिलंबरासन टी. आर. उर्फ सिम्बू हे त्यांचा आगामी चित्रपट ‘ठग लाइफ’ ला घेऊन चर्चेत आहे. या चित्रपटाचं ते प्रमोशन करत आहेत. अशात एका मुलाखतीत सुत्रसंचालकानं सगळ्यांना लग्नाविषयी त्यांना काय वाटतं याविषयी विचारलं. त्रिशानं उत्तर दिलं की माझा लग्नावर विश्वास आहे. जर लग्न झालं तर ठीक आहे, जर नाही झाली तरी ठीक आहे. तर हाच प्रश्न कमल हासन यांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी जवळपास 10 वर्षांपूर्वी एमपी जॉन ब्रिटास यांच्यासोबत झालेल्या घटनेचा उल्लेख केला.

कमल हासन यावेळी म्हणाले की, “ही 10-15 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझा एक चांगला मित्र आहे, खासदार जॉन ब्रिटास. त्यानं एकदा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर मला विचारलं, ‘तू एका चांगल्या ब्राह्मण कुटुंबातून आला आहेस, तरी तू दोनदा लग्न कसं केलंस? मी म्हणालो, चांगल्या कुटुंबातून असणं आणि लग्नाचा काय संबंध आहे? त्यानं सांगितलं की नाही, पण तू प्रभू रामची पूजा करतोस. त्यामुळे त्यांच्या मार्गावरच चालायला हवं. त्यावर उत्तर देत मी म्हणालो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कोणत्याही देवाची पूजा करत नाही. मी रामाच्या वाटेवर नाही चाललो, कदाचित त्याच्या वडिलांच्या म्हणजे राजा दशरथ यांच्या मार्गावर चाललो असेन.

कमल हासन यांची दोन लग्न

1978 मध्ये कमल हासन यांनी डान्सर वाणी यांच्याशी लग्न केलं. तर 1988 मध्ये ते दोघं विभक्त झाले आणि त्याचवर्षी कमल हासन यांनी अभिनेत्री सारिकासोबत दुसरं लग्न केलं. पण त्याआधी पासून अर्थात 1986 पासून कमल हासन आणि सारिका हे लिव्हिन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्याचवर्षी त्यांची मोठी मुलगी आणि अभिनेत्री श्रूती हासनचा जन्म झाला आणि तिच्या जन्माच्या दोन वर्षानंतर कमल हासन आणि सारिका यांनी लग्न केलं. तर 1991 मध्ये त्यांची दुसरी मुलगी अक्षरा हासनचा जन्म झाला. लग्नाच्या काही वर्षांनंतर कमल हासन आणि सारिका या दोघांचा देखील घटस्फोट झाला. त्यांनी 2002 मध्ये घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दिला होता तर 2004 मध्ये त्यांच्या घटस्फोटाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर 2005 पासून 2016 पर्यंत कमल हासन हे गौतमीसोबत रिलेशनशिपमध्ये होते.

‘बेहरामपाड्यात जाऊन तिथे…’, उद्धव-राज ठाकरे संभाव्य युतीवर राणेंची जळजळीत प्रतिक्रिया

0

“महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, यात कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण विषय फक्त इच्छेचा आहे” असं राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या मुद्यावर म्हणाले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मनसेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘मी सुद्धा भांडण बाजूला ठेवायला तयार आहे’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. दोन्ही बाजूंकडून आलेल्या या वक्तव्यानंतर आता ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावर आता नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मला एक कळत नाही याने काय फरक पडणार? दोघे एकत्र आले काय, किंवा नाही आले काय? महाराष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी कोणी एकत्र येतय का?. हा स्वत:च्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याचा कार्यक्रम आहे” अशी टीका नितेश राणे यांनी केली. “उद्धव ठाकरे आतापर्यंत जिहाद्यांची बाजू घेत आलेत. आम्ही त्यांना जिहादीह्दयसम्राट बोलतो. म्हणूनच महाकुंभवर टीका करायची आणि उद्धव ठाकरे सारख्या जिहाद्याला खूश करायचं. हिंदुत्वाच्या विरोधात जेवढे जिहादी विचारांचे लोक आहेत. ते एकत्र येऊन हिंदुत्वाला आव्हान देत असतील, तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही भाजप, हिंदुत्ववादी विचारांचे सगळे कार्यकर्ते सज्ज आहोत” असं नितेश राणे म्हणाले.

‘मराठी माणसाची फार लवकर आठवण झाली’

“एकत्र येण्याचा कार्यक्रम हिंदुत्व, मराठी माणसासाठी आहे की, जिहाद्यांना ताकत देण्यासाठी आहे, जे जोर जबरदस्तीने इस्लामीकरण करतात त्यांना ताकत देण्यासाठी आहे. त्या बद्दल स्पष्ट भूमिका असली पाहिजे” असं नितेश राणे म्हणाले.

नळबाजार, मोहम्मद अली रोडवर जा

“हिंदू समाजाच्या विविध घटकांना मारुन हिंदुत्व बळकट होणार आहे का?. एवढा हिंदीच्या सक्तीला विरोध असेल, तर नळबाजार, मोहम्मद अली रोडवर जा. तिथे ऊर्दुची सक्ती बंद करुन मराठीची सक्ती करा. हिंदू समाजाच्या लोकांवर हात उचलता. हिंदू समाजाच्या लोकांवर का हात उचलता. बेहरामपाड्यात जाऊन सांगा. मराठीची सक्ती करा तिथे. हिंदू समाजाच्या लोकांना का मारताय? हिंदूंमध्ये का फूट पाडता? जिहाद्यांना मदत करण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी” असे प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केले. हे दोन्ही भाऊ एकत्र येतील का? यावर नितेश राणे म्हणाले की, ‘एकत्र येवो किंवा न येवो, आम्हाला फरक पडत नाही’

गुजरात टायटन्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, शुबमन गिल गोलंदाजी घेत दिली गूड न्यूज

0

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 35 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आले आहेत. नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. खूप गरम आहे. खेळपट्टी खूप चांगली दिसते. जर तुम्ही जास्त गवत ठेवले नाही तर ते फुटेल. गोष्टी चांगल्या चालल्या आहेत. आपण भूतकाळाबद्दल जास्त विचार करत नाही. हे दिवस परत आणण्याबद्दल आहे. संघाला स्पर्धेत येण्यासाठी काही आठवडे लागतात. आम्ही त्याच संघासह जात आहोत. आशा आहे की, रबाडा दहा दिवसांत परत येईल.’ शुबमन गिलने रबाडा परत येणार असल्याचे सांगितल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कारण दुसऱ्या टप्प्यात गुजरातच्या गोलंदाजीची धार आणखी वाढणार आहे. त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल.

अक्षर पटेल म्हणाला की, ‘मलाही क्षेत्ररक्षण करायचे होते. खूप उष्णतेमुळे मी गोंधळलो होतो. हवामानामुळे मी थोडासा संशयी होतो. गोलंदाज उन्हात थकू शकतात. आम्हाला चांगले धावा करण्याचा आणि बचाव करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आम्हाला चांगली सुरुवात हवी होती. आम्हाला प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करायचे होते. आम्ही आमच्या प्रक्रियेवर आणि अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही सुधारणांबद्दल बोलत राहतो. ड्रेसिंग रूमचे वातावरण चांगले राहिले आहे. तुमच्या कल्पनांमध्ये स्पष्ट असणे महत्त्वाचे आहे. आम्ही त्यांना स्पष्ट भूमिका दिल्या आहेत. तुम्हाला कधीकधी यश मिळू शकते आणि कधीकधी तुम्हाला ते मिळणार नाही.’

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ 5 वेळा आमनेसामने आले आहेत. यावेळी गुजरातने दोन तर दिल्ली कॅपटिल्सने तीन सामन्यात विजय मिळवला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दोन वेळा भिडले आहेत. यात दोन्ही वेळेस दिल्लीने बाजी मारली आहे. तर गुजरातने या मैदानावर 19 सामने खेळले आहेत. त्यापैकी 11 सामन्यात विजय, तर 8 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा.

‘ब्राह्मणांनो महिलांना सोडा, इतकी सभ्यता…,’ अनुराग कश्यपने शेअर केली पोस्ट, म्हणाला ‘तुमचे संस्कार…’

0

‘फुले’ चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मणांबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीबद्दल चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपने जाहीर माफी मागितली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा अनुराग कश्यपने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट शेअर केली. यामध्ये त्याने आपल्या कुटुंबाला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचं उघड केलं आहे. “कोणतीही कृती किंवा भाषण तुमच्या मुलगी, कुटुंब किंवा मित्र यांच्यापेक्षा महत्त्वाचं नाही,” असं अनुराग कश्यपने म्हटलं आहे. अनुराग कश्यपने एका कमेंटवर व्यक्त होताना “मी ब्राह्मणांवर लघवी करतो” असं म्हटलं होतं. त्यानंतर सगळा वाद पेटला होता.

त्याने आपल्या माफीनाम्यात लिहिलं आहे की, “ही माझी माफी आहे, माझ्या पोस्टसाठी नाही, तर संदर्भाबाहेर काढलेल्या एका ओळीसाठी आणि द्वेष निर्माण करणाऱ्यांसाठी. तुमच्या मुलीला, कुटुंबाला, मित्रांना आणि सहकाऱ्यांना संस्काराच्या प्रमुखांकडून बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळण्याइतकी कोणतीही कृती किंवा भाषण महत्वाचं नाही. म्हणून, जे बोललं गेलं आहे ते परत घेता येणार नाही आणि मी ते परत घेणार नाही. पण जर तुम्हाला कोणाला शिवीगाळ करायची असेल तर ते मला करा, माझ्या कुटुंबाने काहीही म्हटलेलं नाही आणि ते कधीही बोलत नाहीत.”

तो पुढे म्हणाला, “जर तुम्ही माफी मागण्याची अपेक्षा करत असाल तर तर तर ही माझी माफी आहे. ब्राह्मणांनो, कृपया महिलांना सोडा, धर्मग्रंथ देखील इतकी सभ्यता शिकवतात, फक्त मनुस्मृतीच नाही. तुम्ही खरोखर कोणत्या प्रकारचे ब्राह्मण आहात ते तुम्हीच ठरवा. माझ्याबद्दल बोलायचं झाल्यास मी माझी माफी मागतो”.

नेमका वाद कशावरुन?

“ब्राह्मण तुम्हारे बाप हैं. जितना तुम्हारी उनसे सुलगेगी उतना तुम्हारी सुलगाएंगे (ब्राह्मण तुमचे बाप आहेत. तुम्ही जितके त्यांच्याशी पंगा घ्याल, तितके जास्त त्यात पोळले जाल)” असं म्हणणाऱ्या एका सोशल मीडिया युजरला उत्तर देताना कश्यप म्हणाला, “ब्राह्मण पे मैं मुतुंगा.. कोई प्रॉब्लेम? (मी ब्राह्मणांवर लघवी करेन… काही समस्या आहे का?)”

अनुराग कश्यपच्या या कमेंटवरुन मोठा वाद निर्माण झाला. केंद्रीय मंत्री सतीश चंद्र दुबे यांनी अनुराग कश्यपला “नीच बदमाश” म्हटलेंआणि जोपर्यंत तो जाहीरपणे माफी मागत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असं म्हटलं.

“हा नीच बदमाश (अनुराग कश्यप) विचार करतो की तो संपूर्ण ब्राह्मण समुदायावर घाण थुंकू शकतो आणि त्यातून सुटू शकतो? जर त्याने ताबडतोब जाहीर माफी मागितली नाही, तर मी शपथ घेतो की त्याला कुठेही शांती मिळणार नाही. या बदमाशाच्या द्वेषाची आता पुरे झाली, आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला होता. मुंबईत उच्च न्यायालयात एका वकिलाने तक्रार देखील दाखल केली आहे.

प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘फुले’ चित्रपटात 19 व्या शतकातील भारतातील जात आणि लिंग असमानतेला आव्हान देण्यासाठी फुले दाम्पत्याने केलेल्या क्रांतिकारी कार्याची कथा उलगडण्यात आली आहे. हा चित्रपट 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. अखिल भारतीय ब्राह्मण समाज आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ या संघटनांनी चित्रपटाच्या आशयावर आक्षेप घेतला आहे. सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) काही बदल सुचवले होते, जे निर्मात्यांनी समाविष्ट केले. निर्मात्यांनी चित्रपट दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून ते लोकांशी संवाद साधू शकतील की चित्रपटात आक्षेपार्ह आशय नाही. हा चित्रपट आता 25 एप्रिलला रिलीज होणार आहे.

‘तू मला रोखू शकत नाहीस,’ धोनीचा उल्लेख करताच अश्विनने पॅनलिस्टला केलं गप्प; म्हणाला ‘CSK च्या…’

0

भारताचा माजी क्रिकेटर आर अश्विनने स्वत:ला क्रिकेटपुरतं मर्यादित ठेवलं नसून, सोशल मीडियावरही सहजपणे वावर करत असतो. आर अश्विन सध्या आयपीएलमध्ये खेळत असून दुसरीकडे युट्यूबच्या माध्यमातून चाहत्यांशी संवादही साधत आहे. आर अश्विनंचं युट्यूब चॅनेल चांगलंच प्रसिद्ध झालं असून, त्याच्या करिअरला यामुळे आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. आर अश्विनचं युट्यूब चॅनेल प्रसिद्ध होण्यामागे त्याचा आयपीएल संघ चेन्नईशी संबंधित झालेले काही वाद कारणीभूत आहेत. यादरम्यान सध्या त्याने एका व्हिडीओत पॅनेलवरील सदस्याला महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई संघाबद्दल बोलण्यापासून रोखलं.

“तू सामना जिंकलास याचा मला खूप आनंद आहे. अश्विन, फक्त एकच गोष्ट आहे की तू संघाचं बऱ्याचदा नेतृत्व केलं आहेस. तू ज्या संघाचे नेतृत्व केलं आहेस त्याने टीएनपीएल जिंकली आहे. मला वाटतं की नेतृत्व खूप महत्वाचे आहे. संजू सॅसमन, श्रेयस अय्यर, थाला धोनीसारखं नेतृत्व करणारं कोणीतरी आहे,” असं पॅनेलच्या सदस्याने अश्विनला सांगितलं. यावेळी अश्विनला पॅनेल सदस्याय एक छोटीशी आठवण करून द्यावी लागली.

पॅनेल सदस्याचं बोलणं ऐकताच आर अश्विन त्याला, ‘शू शू’ असं सांगत शांत राहण्यास सांगतो. “नाही, तू यासंदर्भात बोलू शकत नाहीस. मी बोलू शकतो. मी ऑडिअन्स सदस्य आहे,” असं सांगत पॅनेल सदस्य स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. यावर चेन्नई संघातून आपल्या आयपीएल करिअरला सुरुवात करणारा आर अश्विन सांगतो की, जेव्हा तो राजस्थाना रॉयल्समध्ये होता तेव्हा त्यांच्याबद्दलही भाष्य केलं होतं.

“मी कधीही माझा संघ राजस्थान रॉयल्स संदर्भातही बोललेलो नाही,” असं सांगत अश्विनने हे फक्त चेन्नईच्या वादासंदर्भात नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला.

अश्विनच्या युट्यूब अकाउंटवरून वाद सुरू झाला जेव्हा दक्षिण आफ्रिका आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे (RCB) माजी विश्लेषक प्रसन्ना अगोरम यांनी रवींद्र जडेजा आणि अश्विनसारखे खेळाडू असतानाही अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज नूर अहमदला संघात समाविष्ट करण्याच्या सीएसकेच्या निर्णयावर आक्षेप घेतला. सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनाही या वादावर त्यांचे मत विचारण्यात आले. “मला काहीच माहिती नाही. हे त्याचं चॅनेल असल्याचं मला माहिती नव्हतं. ते अप्रासंगिक आहे,” असं फ्लेमिंगने पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.

पण यावरुन निर्माण झालेला वाद अश्विनला रोखता आला नाही. ज्यामुळे अश्विनने त्याचं चॅनेल आयपीएल 2025 पूर्ण होईपर्यंत सीएसकेचे कोणतेही सामने किंवा कंटेंट कव्हर करणार नाही असं स्पष्ट केलं.

वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण

0

संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डाबाबत भूमिका स्पष्ट केली. वक्फ बोर्डातील विधेयकास विरोध करण्याबाबतची कारणे सांगितली. आपली जी भूमिका होती, ती भूमिका सर्वोच्च न्यायालयाने मांडल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

भारतीय कामगार सेना ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वक्फ बोर्डाच्या विधेयकाबाबत म्हणाले, विधेयकात गैर मुस्लीम व्यक्ती वक्फ बोर्डावर नियुक्ती करण्याची तरतूद होती. त्या तरतुदीला आमचा विरोध होता. आम्ही जो प्रश्न विचारला तोच प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. गैर मुस्लीम लोक वक्फ बोर्डावर आज घेतले जातील, मग उद्या मंदिरांमध्ये गैर हिंदूंच्या नियुक्ती करणार नाही, याची काय खात्री आहे. आंधळेपणे आम्ही पाठिंबा देणार नाही. हिंदी बोलले म्हणजे हिंदू नाही. आम्ही मराठी बोलणारे कट्टर तुमच्यापेक्षा जास्त देशाभिमानी हिंदू आहोत, असे रोखठोकपणे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

वक्फ बोर्ड, भाषा सक्ती यावरुन भांडणे लावायची आणि विधेयके संमत करावी, अशी कामे सरकार करत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ते पुढे म्हणाले, ‘ज्या प्रमाणे शेतकरी रस्त्यावर उतरला, त्याप्रमाणे कामगार रस्त्यावर उतरला नाही. कोणीही एकत्र येता कामा नये हेच त्यांचे मिशन आहे. कोणालाही संघटीत होऊ द्यायचे नाही, दबावाखाली ठेवायच, चिंताग्रस्त ठेवायच अन् आपले हित साध्य करुन घ्यावे, अशी त्यांची रणनीती सुरू आहे.’

उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्यास हात घातला. राज्य शासनाच्या हिंदी सक्तीच्या निर्णयास विरोध करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही प्रेमाने सगळे ऐकून घेऊ. पण सक्ती कराल तर सगळे उखडून फेकू. येथे अमराठी पिढ्यान पिढ्या राहत आहेत. आम्ही सुरु केलेल्या मराठी शिकण्याचा वर्गावर ते येत आहेत. हिंदीची सक्ती आम्ही होऊ देणार नाही. येथील मीठ खातात आणि मराठीला विरोध करता? आपले सरकार असताना असे धाडस करण्याची कोणाची हिंमत नव्हती, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

‘मुंडे साहेबांचे नाव लहान होऊ देणार नाही जरी नाव मोठे करण्याची…’ पंकजा मुंडे भगवान गडावर काय म्हणाल्या?

0

बीडच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथे श्रीक्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्ताहाचा समारोप झाला. या अध्यात्मिक व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस एकत्र आले. त्यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या भगवान गडाशी संबंधित आठवणी सांगितल्या. त्या म्हणाले, गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव मोठे करण्याची माझी ऐपत नाही. परंतु हे नाव लहान होऊ देणार नाही. जीवनात कोणाला दुखवणार नाही. इतकेच मागणे मी भगवान बाबांकडे करते, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी पाच वर्ष सत्तेत नसताना गडाच्या विकासासाठी सहकार्य केले. मी पालकमंत्री होते तेव्हासुद्धा मदत केली. गडासाठी मदत करावी म्हणजे काय? गडावर येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. त्यांना कोणताही त्रास होऊ नये, ही काळजी घेतली पाहिजे. २००६ मध्ये काही कामांमुळे साहेबांना गडावर येता आले नाही. त्यांनी त्यावेळी मला पाठवले. मी भगवान गडावर पहिल्यांदा २००६ मध्ये येऊन भाषण केले होते. त्यानंतर मी भगवान गडावर नेहमी येत राहिले.

नारळी सप्ताहाची थोर परंपरा आहे. येथून सर्व वारकरी संप्रदायचा जन्म होतो. वामन भाऊंचा आदरयुक्त धाक आहे. भगवान बाबांच्या जीवनात सर्व वैभव आणि संपत्ती होती. त्यानंतर त्यांनी सर्व सुखाचा त्याग करुन ईश्वराच्या मार्गाने जाण्याची वैभवशाली परंपरा सुरु केली. ज्याच्या कार्मात वैभव आहे, तोच जीवनात पुढे जाऊ शकतो, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

पंकजा मुंडे यांच्या भाषणातील धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात काम केल्यामुळे आमचे वेगळ नाते तयार झाले आहे. केवळ गडाचा विकास नाही, तर गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे. संत वामनभाऊ यांनी मार्ग दाखवला आहे. कितीही दुष्काळ असला तरीही सप्ताह होतात. लोक एकत्रीत येतात, सर्व समाजाचे लोक एकत्र येत असतात, वारकरी समाजात कधी जात पात नसते. प्रत्येक व्यक्ती गहनीनाथ गडाचा असतो. ही परंपरा समाज बनवणारी परंपरा आहे, समाज तोडणारी नाही. मुस्लिम बांधव देखील या परंपरेत सहभागी होतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पाण्यात काठी मारल्याने पाणी तुटत नाही, राज-उद्धव भाऊ भाऊ, कुटुंब म्हणून एकत्र यावं, पण.. : सुषमा अंधारे

0

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक उद्धव ठाकरेंच्या शिवसेना सोबतच्या युतीवर मोठं वक्तव्य केलं आहे. आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे, त्यामुळे आता राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. यावरती आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी हे दोघे भाऊ एकत्र येत असतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी मनाला ते आवडेलच असं अंधारे म्हणाल्या आहेत.

राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघे भाऊ भाऊ

महाराष्ट्राच्या हितापुढे कोणाच्याही महत्वकांक्षा इतक्या नाहीत हे राज ठाकरेंनी केलेले विधान मला तंतोतंत पटलेलं आहे. किंबहुना राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघे भाऊ भाऊ आहेत कुटुंब म्हणून दोघांनीही एकत्र राहिला पाहिजे, पाण्यात काठी मारल्याने पाणी कधी तुटत नाही असं मानणारे पैकी मी आहे. मात्र या दोघांचा राजकारण एकत्रित राहिला पाहिजे का याबाबत चर्चा होऊ शकते. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी हे दोघे भाऊ एकत्र येत असतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी मनाला ते आवडेलच, मात्र ते एकत्रित येणे हे ज्या भाजपाने महाराष्ट्रात अस्मिता काय पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला, महापुरुषांचा अपमान केला, उद्योगधंदे पळवले, त्या भाजपाच्या विरोधात बिगुलवाजवीत, विचारांची स्पष्टता ठेवत स्वतंत्र राजकारण करण्यासाठी राज ठाकरे सिद्ध होणार आहेत का? त्यांना प्रश्न विचारायला हवं होतं स्वतंत्र अस्मितेच्यासाठी एकत्रित येणार की भाजपचे मांडलिकत्व पत्करण्यासाठी एकत्र येणार हे विचारायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे.

नेमकं काय म्हणालेत राज ठाकरे?

महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखती घेतली. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहाणं, यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही. मला असं वाटतं, लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे, असं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, असं विधानही राज ठाकरेंनी केलं आहे.

उध्दव ठाकरे काय म्हणाले?

किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे,मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रसाठी एकत्र येण्याचं आवाहन आहे.. पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही चालणार. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचं आगत स्वागत करणार नाही, हे पहिलं ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच, ती मी मिटवून टाकली चला, पण पहिलं हे ठरवा.

मी सुद्धा तयार, पण माझी एकच अट असेल ती म्हणजे; उद्धव ठाकरेंकडूनही जाहीर कार्यक्रमात थेट ‘मनसे’ संकेत!

0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा टाळी देण्याचे संकेत दिल्यानंतर आज (19 एप्रिल) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा थेट जाहीरपणे टाळी देत एक प्रकारे मनसे युतीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात उद्धव आणि राज्य ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्मासाठी एकत्र यावं यासाठी मराठी माणसाकडून स्वप्न पाहिलं जात आहे ते पुन्हा एकदा वास्तवात येणार का? याची उत्सुकता आहे. उद्धव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना माझ्याकडून जी भांडणं असतील (ती नव्हतीच असेही त्यांनी नमूद केले) मिटवली चला असे म्हणत एक प्रकारे राज ठाकरे यांनी दिलेल्या टाळीला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे या भांडणाचा संदर्भ ते तुम्हाला चर्चा सुरु आहे त्यावरून लक्षात येईल म्हणत राज यांच्या भूमिकेवर जाहीर भाष्य केलं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले की, किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे. मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रसाठी एकत्र येण्याचं आवाहन आहे, पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही चालणार. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचं आगत स्वागत करणार नाही, हे पहिलं ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच, ती मी मिटवून टाकली चला, पण पहिलं हे ठरवा.

हिंदी सक्ती कराल तर उखडून फेकू

उद्धव ठाकरे यांनी हिंदीवरूनही महायुती सरकारला जाहीर इशारा दिला. ते म्हणाले की, हिंदी सक्ती कराल तर उखडून फेकू. हिंदीची सक्ती पहिलीपासून याचा काय करायचं? अशी विचारणा त्यांनी केली. त्यांनी सांगितले की, आम्ही प्रेमाने सर्व ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उखडून फेकून देऊ. अनेक ठिकाणी मराठी शिकण्यासाठी उत्साह वाढत आहे. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये मराठी सक्ती करण्याचा निर्णय हा माझ्या मंत्रिमंडळाने घेतला. जो महाराष्ट्रात राहणार त्याला मराठी ही आलीच पाहिजे. इथं राहता, आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता अशी टीका त्यांनी केली.

सुपारी घेऊन हे सत्ताधारी बसले आहेत का?

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे मारेकऱ्यांची सुपारी घेऊन हे सत्ताधारी बसले आहेत का?जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर जय महाराष्ट्र बोलावत लागेल यांना हिंदीची सक्ती करायची असेलच तर फडणवीस यांना सांगतो. तुमचे जे जोशी आले होते ना माशी जिंकली तसे बोलून गेले, त्याच घाटकोपरमध्ये आधी मराठी सक्ती करून दाखवा. घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा. प्रत्येकाला मराठी बोलता येत का ते दाखवा, असे आव्हान दिले.

आता जाहीरनाम्यावर काहीच कोणीच बोलत नाही

उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईत सुद्धा काही गोष्टी अदानीच्या घशात घातल्या. आणि तुम्ही त्यावर बोलू नये म्हणून तुम्हाला भांडणात व्यस्त ठेवायचं असा प्रकार आहे. आता काय दुर्दैवाने सरकार आलं आहे ते जाहीरनाम्यावर काहीच कोणीच बोलत नाही. तुम्ही मारलेल्या थापा ऐकून मतदान केलं असं आपण एक वेळ म्हणू, पण त्यावर आता कोणीच बोलत नाही. अजित पवार म्हणतात की माझ्या भाषणात कर्जमाफी कधी बोललो ते तुम्ही मला दाखवा? हे कोणतं राजकारण आहे, अशी विचारणा त्यांनी केली.

मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना

उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. प्रत्येक कामगाराचा शाखेसोबत समन्वय झालाच पाहिजे. खूप जणांना काही देता नाही आला तरीसुद्धा ते हिंदुत्वासाठी आणि पक्षासाठी माझ्यासोबत राहिले. कामगार कायद्यांना आपण विरोध केला पाहिजे, पण निवडणुकीवेळी आपण विस्कळीत असतो. कारण आपल्या डोक्यावर काहीतरी टाकलेलं असते. आता वक्फ बोर्ड आणला गेला, त्यामध्ये सुद्धा आपण जो प्रश्न विचारला तोच सुप्रीम कोर्टाने त्यांना विचारला. वक्फ बोर्डावर जर तुम्ही कायद्यानं गैर मुस्लिम माणूस ठेवताय तर आमच्या हिंदूमध्ये सुद्धा तुम्ही उद्या काही करू शकता, असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही महाराष्ट्राचे मराठी कडवट आहोत. शेतकऱ्यांचे काळे कायदे आले तेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरला तसा कामगार रस्त्यावर उतरला नाही त्यांचा मिशन हेच आहे की कोणी एकत्र आलं नाही पाहिजे. आपल्याला भांडणात गुंतवून ठेवून यांचे काय चाळे चालले आहेत ते पहा.

कोल्हापूरवाले निर्णय घेणार ‘भाजप पुणे’चा कारभारी कोण होणार! शहराध्यक्षपदी ब्राह्मण, मराठा की ओबीसी माळी चेहरा?

0

भारतीय जनता पक्षाकडून राज्यातील शहर आणि जिल्हाध्यक्ष बदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दृष्टिकोनातून राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या निरीक्षकांची शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. कोल्हापूरच्या खासदारांना पुणे शहर आणि जिल्हाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुण्यातील आमदाराला कोल्हापूरचा निरीक्षक करण्यात आले आहे.

सध्या भाजपमध्ये केंद्रापासून राज्यापर्यंत संघटनात्मक बदलाचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. भाजपकडून लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जाणार आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष देखील निवड होणार आहे. मात्र त्यापूर्वी मंडल अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

पुणे शहर, मावळ, बारामती आणि पिंपरी-चिंचवडची जबाबदार भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे देण्यात आली आहे. तर पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्याकडे कोल्हापूर शहर, हातकणंगले आणि करवीरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजेश पांडे हे देखील सोलापूरची निरीक्षकपदाची जबाबदारी पार पाडणार आहेत.

शहराध्यक्ष ब्राह्मण, मराठा की माळी

पुणे शहरातील विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ अद्याप संपलेला नाही. तसेच या कार्यकाळामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आल्याने सध्याच्या कार्यकारणीला अधिकचा वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे मागील काळामध्ये ब्राह्मण आणि मराठा समाजातच प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा ओबीसी नेता शहराध्यक्ष व्हावा, अशी देखील मागणी करण्यात येत आहे. तसेच जवळपास ओबीसी नेताच शहराध्यक्ष होईल अशा चर्चा भाजपाच्या वर्तुळात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सध्या शहरातील आमदार हेमंत रासने, योगेश टिळेकर, श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर या ओबीसी नेत्यांची नावे शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत.

महाडिक बजावणार महत्त्वाची भूमिका

धीरज घाटेंना कार्यकाळ वाढून मिळणार की ओबीसी नेतृत्वाच्या हाती शहराची कमान सोपवण्यात येणार की मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याला भाजप शहराध्यक्ष होण्याचा मान मिळणार हे निश्चित करण्यात निरीक्षक म्हणून धनंजय महाडिक यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे पुणे शहराच्या शहराध्यक्ष पदाच्या चाव्या कोल्हापूरकराच्या हातात आहेत, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.