Home Blog Page 24

भिमसृष्टी मैदानासाठी आरक्षणाचा निर्णय मागे घ्या; स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांची मागणी

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे असलेल्या भिमसृष्टी मैदानाच्या काही भागाचे पोलीस स्टेशन, महापालिकेचा वापर आणि बसथांबा यासाठी आरक्षण ठेवण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय वादात सापडला आहे. या निर्णयावर स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिकेला पत्र लिहून सावळे यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी आणि अनुयायी समाजाच्या भावना दुखावणारा आहे. जर हा निर्णय मागे घेण्यात आला नाही, तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

भिमसृष्टी मैदान हे पिंपरी-चिंचवडमधील मध्यवर्ती आणि आंबेडकरी चळवळीचे प्रतीकात्मक ठिकाण आहे. दरवर्षी आंबेडकर जयंतीचे सप्ताहव्यापी उत्सव, मिरवणुका, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रम येथे मोठ्या प्रमाणात पार पडतात. या मैदानावर अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम देखील आयोजित केले जातात.

सावळे म्हणाल्या, “हे मैदान म्हणजे पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक समतेचे जिवंत प्रतीक आहे. हे डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांसाठी श्रद्धास्थळ आहे. विकास आराखड्यात बदल करून येथे पोलीस स्टेशनचे आरक्षण करणे हे आंबेडकरी जनतेचा अपमान असून जयंती साजरी करण्याच्या अधिकारावर गदा आणण्याचा कट आहे.”

त्यांनी मैदानावरील सर्व आरक्षणे तात्काळ रद्द करून, या जागेला अधिकृतपणे ‘भिमसृष्टी मैदान’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोठ्या जनआंदोलनाची भूमिका घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बावधन शासकीय लालफितीत ६०० विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात; ‘पीएमआरडीए’ अन् महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

0

पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावाच्या समस्या जटील असतानाच शासकीय लालफीतीच्या कारभाराची झळ चिमुकल्यांच्या ही नशिबी आली असून आज मी तिला या शैक्षणिक संस्थेमध्ये शिकणाऱ्या सुमारे 600 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला असून प्रशासन मात्र लाल भीतीच्या कारभारात गुंग असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या वादळी वाऱ्यांचे दिवस असून धोकादायक पद्धतीने मारलेले पत्रे व शेजारील जीर्ण झालेल्या वास्तूमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. खाजगी डेव्हलपरने या ठिकाणी पञ्याचे कुंपण घातलेले असून विद्यालयाचा वहिवाटीचा व विद्यार्थ्यांचा ये-जा करण्याचा रस्ता अडविला असून फक्त ४ फुट रुंदीचा रस्ता शिल्लक राहिला आहे. नामदेवराव मोहोळ विद्या व कीड़ा प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालय बावधन, ता. मुळशी जि. पुणे हे मराठी माध्यमाचे शासनमान्य अनुदानित विद्यालय सन १९९२ पासून गेली १३ वर्ष बावधन परीसरात ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. विद्यालयामध्ये सध्या इयत्ता ८वी ते १० वी चे सहा वर्ग असून ५२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

संस्थेने विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय व्हावी या उद्देशाने खरेदी दस्त क ५३२४/२००६ दि.२४.०७.२००६ अन्वये स्व मालकीची स्वतन्त्र इमारत बांधून दिली आहे. बावधन बु. गामपंचायतीत मिळकत कमांक ९८८ अशी नोंदही असल्याने पुणे म.न.पा. मध्ये समाविष्ठ झाल्याने मिळकत क. P/T/02/09503000 असा बदल होऊन विद्यालयास या प्रमाणे मिळकत करही लावण्यात आले आहे. याबाबत कोणतीही कारवाई व नियमाप्रमाणे अंमलबजावणी न झाल्यास लोकशाही मार्गाने रास्ता रोको, धरणे आंदोलन, उपोषण करण्याचा इशारा संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे. संबंधिताना बांधकाम करावयाचे असल्यास Land Lock जमिनी अंतर्गत रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी तोपर्यंत त्यांना या ठिकाणी बांधकामास परवानगी देण्यात येवू नये अशी विनंतीही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे आयुक्त मा. योगेश म्हसे (भा.प.से.) संस्थेच्या वतीने लेखी अर्जाद्वारे केली आहे.

हडपसर पोलीस स्टेशन आणि शहीद भगतसिंग प्रतिष्ठानच्या सेवेचा हजारो वारकऱ्यांनी घेतला लाभ

0

रुग्णवाहिकेच्या सेवेमुळे वाचले किमान पाच वारकऱ्यांचे प्राण

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात देहभान विसरून भक्ती भावानी पंढरीच्या विठोबारायाच्या दर्शनाची आस घेऊन निघालेल्या वारकऱ्यांना विविध सेवा देण्यासाठी हडपसर पोलीस स्टेशन, शहीद भगतसिंग प्रतिष्ठान आणि प्रणव नलिनी विजय मोरे यांच्या माध्यमातून उन्मेश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्याकडून वारकरी आणि भाविकांसाठी देण्यात आलेल्या वैद्यकीय सेवांचा लाभ हजारो जणांनी घेतला. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना रुग्णवाहिकेची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली. या सेवेमुळे किमान पाच वारकऱ्यांचे प्राण वाचले.

वारकरी आणि भाविकांच्या सेवेसाठी हॉस्पिटलच्या आवारात सर्दी, खोकला, ताप अशा सर्वसामान्य विकारांवर औषध उपचार, कांस्य थाळी मसाज, चरण सेवा अर्थात पायाचा मसाज, व्हायब्रेटर मशीन द्वारे मसाज यासह तातडीची गरज असलेल्या रुग्णांसाठी रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामध्ये एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असता त्यांच्यासाठी रुग्णवाहिकेचा वेळीच उपयोग झाला. तसेच एक वारकरी महिला वाटेतील दुर्घटनेत रक्तबंबाळ झाली. त्यांच्यासह तातडीचे उपचार आवश्यक असलेल्या तीन वारकऱ्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी सदर सेवेचा उपयोग झाला

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या दोन्ही पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी आणि भाविकांपैकी सुमारे 1000 पेक्षा जास्त जणांनी कांस्य थाळी मसाज, 500 जणांनी चरण सेवा मसाज, 600 जणांनी व्हायब्रेटर मशीनद्वारे मसाज या सेवांचा लाभ घेतला.

तातडीची वैद्यकीय सुविधा आवश्यक असलेल्या गाडीतळ ते लोणी काळभोर आणि गाडीतळ ते दिवे घाट दरम्यानच्या अनेको रुग्णांना रुग्णवाहिकेची अद्ययावत सेवा उपलब्ध करून देण्यात आली. वारकरी व भाविक बांधवांबरोबरच पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांनी देखील या सेवेचा लाभ घेतला.

वैद्यकीय सेवांबरोबरच वारीत सहभागी झालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी अल्पोपहार आणि पाण्याची व्यवस्था संयोजकांकडून करण्यात आली होती. या सेवेचा लाभ तब्बल दहा हजार पेक्षा अधिक जणांनी घेतला.

या उपक्रमासाठी मोरे परिवारासह हडपसर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी, शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संदीप मोरे, डॉ. संदीप हंबीर, डॉ. संतोष पंडित व डॉ. शिर्के फिजिओथेरपिस्ट डॉ. पूजा पुंडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि स्थानिक युवकांनी पुढाकार घेतला. या उत्तम उपक्रमाला राजकीय, सामाजिक आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन त्याचे कौतुक केले. त्याचप्रमाणे या उपयुक्त उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल वारकरी आणि भाविकांनी संयोजकांना आशीर्वाद दिले.

वारकरी आणि भाविकांची सेवा करण्याची संधी लाभल्याबद्दल प्रणव नलिनी विजय मोरे यांनी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे यापुढील काळात या सेवांची व्याप्ती वाढविणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

अर्शिन कुलकर्णीच्या फटकेबाजीने नाशिक टायटन्सचा एमपीएल विजेतेपदावर कब्जा

0

महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) 2025 च्या अंतिम सामन्यात अर्शिन कुलकर्णीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्सने रायगड रॉयल्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

अर्शिनने अंतिम सामन्यात 53 चेंडूत 77 धावा केल्या. यामध्ये 4 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत एकूण 279 धावा आणि 18 षटकार ठोकले. ते स्पर्धेतील सर्वाधिक षटकार मारणारे आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च धावसंख्येचे खेळाडू ठरले.

अंतिम सामन्यात रायगड रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 4 बाद 190 धावा केल्या. प्रत्युत्तरात नाशिक टायटन्सने 5 चेंडू शिल्लक ठेवत 4 गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले. अर्शिनने मंदर भंडारीसोबत सलामी दिली आणि दोघांनी मिळून पहिल्या गड्यासाठी 62 धावांची भागीदारी रचली.

अर्शिन IPL 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळला होता. त्याला दोन सामने खेळण्याची संधी मिळाली होती. त्याच संघात असताना त्याने वैभव सूर्यवंशीची बॅट मस्करी करत चोरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

अर्शिन कुलकर्णीला हा क्रिकेटला आपल्या आजोबांकडून वारशाने मिळालेला खेळ मानतो. त्याने स्पर्धेत सिधेश वीरनंतर सर्वाधिक धावा केल्या असून, भविष्यातील महत्वाचा खेळाडू म्हणून त्याची नोंद झाली आहे.

“8 महिन्यांत करिअर संपेल” म्हणणाऱ्यांना बुमराहचे सडेतोड उत्तर

0

भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पुन्हा एकदा मैदानावर जबरदस्त कामगिरी करत आपल्या टीकाकारांना गप्प केलं आहे. इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत त्याने पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत. हे बुमराहच्या कसोटी कारकिर्दीतील 14वे पाच बळीचे यश आहे.

“लोक काय बोलतात, याचा मला फरक पडत नाही”
बुमराहला पूर्वी झालेल्या दुखापतीमुळे काही महत्त्वाच्या मालिकांमधून बाहेर राहावं लागलं होतं. याच गोष्टीवरून अनेकांनी त्याच्या करिअरबाबत शंका व्यक्त केली होती. यावर बुमराहने ट्रोल करणाऱ्यांना ठाम उत्तर दिलं आहे.

“लोक म्हणायचे की मी 8 महिन्यांपेक्षा जास्त क्रिकेट खेळू शकणार नाही. आज माझं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 10 वर्ष पूर्ण झाली आहेत, आणि IPL मध्ये 12 ते 13 वर्ष झाली. लोक काहीही बोलू देत, मी माझं काम करत राहीन.”

“माझ्या नावावर हेडलाइन तयार होतात, लोक पाहतात, पण मला त्याचा काही फरक पडत नाही. जोपर्यंत वरचा (देव) साथ देतो, तोपर्यंत मी खेळत राहीन.”

गोलंदाज म्हणून जबाबदारी निभावताना…
टीम इंडियाने इंग्लंडच्या पहिल्या डावात काही झेल सोडले, यावरही बुमराहने परखड पण समजूतदार प्रतिक्रिया दिली. “हो, थोडा त्रास झाला होता, पण तुम्ही बसून रडत बसू शकत नाही. कधी कधी झेल सुटतात, पण कोणीही मुद्दामून चूक करत नाही. माझं काम मी चोख करत आहे, बाकी गोष्टी नियंत्रणात नाहीत.”

सामन्याची स्थिती:
भारताचा पहिला डाव: 465 धावा
इंग्लंडचा पहिला डाव: 471 धावा
भारताचा दुसरा डाव: 2 बाद 90 धावा (96 धावांची आघाडी)

जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, मैदानावर त्याचं अस्तित्व संपलेलं नाही – तर अजूनही तो भारताचा सर्वात विश्वासार्ह आणि धारदार गोलंदाज आहे.

हानिया आमिरच नाही, तर ‘सरदार जी 3’ मध्ये या ३ पाकिस्तानी कलाकारांचाही समावेश

0

दिलजीत दोसांझच्या बहुचर्चित पंजाबी चित्रपट ‘सरदार जी 3’ चा ट्रेलर नुकताच समोर आला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले, कारण त्यात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर झळकत असल्याचे दिसून आले. मात्र, विशेष गोष्ट म्हणजे हानिया सोबत या चित्रपटात तीन इतर पाकिस्तानी कलाकारांचाही समावेश आहे.

भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली असल्यामुळे हा चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित होणार नाही. त्यामुळे दिलजीतचे अनेक भारतीय चाहते निराश झाले आहेत. इतकेच नव्हे, तर यूट्यूबवरही या चित्रपटाचा ट्रेलर उपलब्ध नाही.

चित्रपटात हानिया आमिर, तसेच नासिर चिन्योती, डेनियल खावर आणि सलीम अलबेला हे पाकिस्तानी कलाकार झळकणार आहेत. या गोष्टीची अधिकृत घोषणा आधी झाली नव्हती, परंतु ट्रेलर आल्यानंतर ही माहिती स्पष्ट झाली आहे. दिलजीतने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्रेलर शेअर केला आहे, त्यामुळे तो तिथे पाहता येतो.

‘सरदार जी 3’ हा एक रोमांस, कॉमेडी, अ‍ॅक्शन आणि थोडासा हॉरर असलेला पूर्ण मसालेदार चित्रपट असून, तो 27 जूनला भारताबाहेरील देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी २२ एप्रिल रोजी पहलगाम (काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लागू करण्यात आली होती. त्या वेळेपर्यंत या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग पूर्ण झाले होते, असे सांगितले जात आहे.

रईसांची पसंती मर्सिडीजला; BMW, Jaguarला टाकले मागे

0

भारतात लक्झरी कार्सची मागणी कायम असून, 2025 या आर्थिक वर्षात सर्वाधिक पसंती मर्सिडीज-बेंझला मिळाल्याचे समोर आले आहे. या कालावधीत एकूण 48,849 लक्झरी कार्सची विक्री झाली असून, 2024 च्या तुलनेत ही वाढ 0.55 टक्क्यांनी झाली आहे.

मर्सिडीज-बेंझने 18,928 युनिट्स विकून पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे. BMW ने 15,995 युनिट्स विकून दुसरा क्रमांक पटकावला. जग्वार लँड रोव्हरने 6,183 युनिट्स विक्रीसह तिसरा क्रमांक मिळवला असून, त्यात तब्बल 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑडीने 5,993 युनिट्स विकल्या असून 15 टक्के घट झाली आहे. वोल्वो इंडियाची विक्री 1,750 युनिट्सवर आली असून, 18.60 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे.

एकूणच, मर्सिडीजने पुन्हा एकदा आपली आघाडी सिद्ध केली असून, वाढीच्या बाबतीत JLR सर्वांना मागे टाकत पुढे सरसावली आहे.

हडपसरमधील कचरा आणि पाण्याच्या साचल्यावरून पुणे महापालिकेवर नागरिकांचा संताप

0

हडपसरमधील डीपी रोड (यश हॉस्पिटलजवळ, माळवाडी) परिसरात कचऱ्याचे ढीग आणि साचलेल्या पाण्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि आजारांचा धोका वाढत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पुणे महापालिकेकडून (PMC) कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची तक्रार आहे.

संदीप नायर, स्थानिक रहिवासी म्हणाले, “यश हॉस्पिटलजवळ डीपी रोडवरील कचरा आणि साचलेल्या पाण्यामुळे हा परिसर अत्यंत अस्वच्छ झाला आहे. पावसाळ्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. दुर्गंधी, डासांची पैदास आणि रोगराईचा धोका वाढत आहे. PMCला वारंवार कळवूनही काहीच उपयोग झालेला नाही.”

कविता राणे, आणखी एक स्थानिक रहिवासी म्हणाल्या, “ग्रीनवूड्स स्कूल आणि युरो स्कूलच्या विद्यार्थ्यांना याच रस्त्याने जावे लागते. लहान मुलांचे आरोग्य लवकर बिघडते. मी PMC च्या ऑनलाइन पोर्टलवर तक्रार केली, तक्रारीचा क्रमांकही मिळाला, पण परिस्थिती तशीच आहे.”

संजना वर्मा, स्थानिक रहिवासी म्हणाल्या, “येथे १५ पेक्षा जास्त हाउसिंग सोसायट्या आहेत. वृद्ध नागरिक येथे चालायला येतात, पण आता साचलेल्या पाण्यामुळे त्यांना चालताही येत नाही. आम्ही लाखो रुपये गुंतवून घर घेतले, पण आता असा त्रास सहन करावा लागतो. PMC काहीच करत नसेल, तर मग नागरिक कुठे जाणार?”

या विषयावर PMC अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर अधिकच तीव्र झाला आहे.

एम्प्रेस गार्डन शेजारील कॅनॉलचे कचराकुंडीत परिवर्तन! नागरिकांमध्ये आरोग्याची चिंता

0

पुण्यातील एम्प्रेस गार्डन परिसरातील कॅनॉल, जो एकेकाळी स्वच्छ पाण्याचा स्रोत होता, तो आता कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी तुंबलेला आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, अन्नपदार्थांचे अवशेष, घरगुती कचरा आणि पिशव्यांनी भरलेला हा कॅनॉल स्थानिक रहिवाशांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.

विदित माने, BT कावडे रोडजवळील रहिवासी सांगतात, “हा कॅनॉल, जो सोलापूर रोड व सोपान बाग परिसराशी जोडलेला आहे, पूर्णतः कचराकुंडीत बदलला आहे. एकेकाळचा हिरवागार मार्ग आज दुर्गंधीयुक्त आणि घाणेरडा झाला आहे. लोक बिनधास्तपणे प्लास्टिक, अन्नकचरा आणि घरगुती कचरा टाकतात. हे वर्तन फक्त पाण्यालाच नव्हे, तर संपूर्ण परिसराच्या पर्यावरणाला नुकसान पोचवत आहे.”

स्वप्नील गायकवाड, दुसरे स्थानिक रहिवासी सांगतात, “एम्प्रेस गार्डन जवळचा हा कॅनॉल शाळा, सोसायट्या आणि दैनंदिन रहदारीच्या जवळ आहे. येथे टाकला जाणारा कचरा साचतो, कुजतो, आणि डासांची पैदास होते. परिणामी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो आहे.” त्यांनी यावर भर दिला की, “जेव्हा आपण एखादी प्लास्टिक बाटली वा रॅपर टाकतो, तेव्हा तो तिथेच राहतो. तो नासून एक सामूहिक आरोग्यधोका बनतो.”

आकाश पाटोळे, आणखी एक रहिवासी, सांगतात, “हा प्रश्न प्रत्येक महिन्याला गंभीर होत आहे. सार्वजनिक बागा आणि गृहनिर्माण सोसायट्यांच्या जवळ हा कॅनॉल दुर्गंधीयुक्त झाला आहे. मुले, वृद्ध यांना यामुळे जास्त धोका आहे. आपण हे दुर्लक्ष करू शकत नाही.”

पुणे महापालिका निवडणूक: जुन्या शहरातील १६ जागा कमी, नव्या गावांसाठी १६ जागा वाढण्याची शक्यता

0

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने सर्व महापालिकांना नवीन प्रभागरचनेचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे महापालिकेत २०१७ मध्ये वापरलेली चार-सदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्यात येणार आहे. मात्र, नव्या गावांचा समावेश झाल्याने, कुठे प्रभाग कमी होतील आणि कुठे नव्या जागा मिळतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य मुद्दे:

  • जुन्या शहरातील १६ प्रभाग कमी होण्याची शक्यता, तर नव्याने समाविष्ट ३२ गावांमध्ये १६ नवीन प्रभाग तयार होण्याची शक्यता.
  • २०१७ मध्ये १६२ नगरसेवक निवडले गेले होते. यावेळी एकूण १६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत.
  • जुन्या हद्दीत सध्या ३१.२४ लाख लोकसंख्या, तर नव्या ३२ गावांत ३.५७ लाख लोकसंख्या आहे. एक प्रभाग साधारण ८५,००० लोकसंख्येसाठी असेल.

संभाव्य राजकीय बदल

  • १६ विद्यमान नगरसेवकांची जागा जाण्याची शक्यता आहे.
  • ३२ गावांमधून १६ नगरसेवक निवडले जाऊ शकतात, म्हणजे सुमारे ४ प्रभाग तिथे तयार होतील.
  • त्यामुळे जुन्या शहरातील प्रभाग संख्या ४१-४२ वरून ३७ वर येऊ शकते.
  • जर नवीन गावांमधून फक्त ४ ते ६ नगरसेवकच निवडले गेले, तर न्याय्य प्रतिनिधित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

माजी नगरसेवक आणि अभ्यासकांचे मत

  • माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केस्कर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बडगे यांनी सांगितले की, प्रभाग पुनर्रचनेमुळे राजकीय गणित मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे.
  • नवीन गावांना न्याय मिळतो का, किंवा जुन्या शहरातील वर्चस्व टिकते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
  • जर नव्या गावांमध्ये अपेक्षेप्रमाणे जागा दिल्या गेल्या नाहीत, तर न्याय न झाल्याची भावना प्रबळ होऊ शकते. महापालिकेने पारदर्शक आणि लोकसंख्येनुसार संतुलित रचना करणे आवश्यक आहे.