Home Blog Page 205

मनोज जरांगे यांच्या मेहुण्याला तडिपारीची नोटीस; जरांगे CM फडणवीसांवर संतापले, ”चुकीचे काम केलं तरी…”

0

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्याला पोलिसांनी तडिपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. पोलिसांच्या कारवाईच्या विरोधात जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. ही कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे.

मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई केली आहे. तडीपारीची कारवाई झालेल्या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल झाले आहेत.

मनोज जरांगेंचा संताप…

या कारवाईबाबत मनोज जरांगे यांनी म्हटले की, तुम्ही अंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस देणार असाल, तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर मी सोडणार नाही फडणवीस साहेब. तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचं काम केलं तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात मराठ्यांशिवाय पान हालू शकत नाही. तुझा भागलं म्हणून जर तू उलटणार असला, हे तुझ्यासाठी घातक असणार आहे, देवेंद्र फडणवीसांनी चूक सुधारावी, त्यांनी दिलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात. आम्ही देवेंद्र फडणवीसला सन्मानाची वागणूक द्यायला तयार आहोत. नाहीतर पुढच्या काळात सन्मान हा शब्द डोक्यातून काढून टाकायचा असा गर्भित इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

फडणवीसांचे षडयंत्र…

मनोज जरांगे यांनी म्हटले की, माझं तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुण्यारावळ्याचं नाव तडीपारीच्या यादीत घुसवले असावे. हे 100 टक्के देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीसला माहीत नाही की, मी समाजापुढे आई-बापाला सुद्धा जवळ केलं नाही. तर, पाहुण्यारावळ्याला देखील जवळ उभं राहू देणार नाही. मी जोपर्यंत आंदोलनात आहे तोपर्यंत मराठा म्हणून आहे. चुकीचं काम केलं तर माझ्या बापावर जरी केस झाली तरी सोडणार नाही. पाहुण्यांचा तर विषय संपला असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

स्वत:च्या मुलीच्या शब्दासाठी ५०० पावले ओलांडून जाऊ शकत नाही. माझ्या लेकरांचे मुडदे पडले आहेत. चार मुलांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. केस मागे घेणार असल्याचे सांगितले. पण, जुन्या केसेस पुन्हा उकरून काढण्यास सुरुवात झाल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. जनतेला सन्मान द्यायला शिका. तरच लोक सन्मान देतील.

राज्यात थंडी झाली कमी, उन्हाचा तडाखा वाढला; हवामान विभागाचा महत्वाचा इशारा

0

महाराष्ट्रातील थंडी कमी होत असून हळहळून तापमानात वाढ होताना दिसत आहे. येत्या काही दिवसांता तापमानात आणखी वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागात थंडी कमी होऊन उकाडा जाणवू लागला आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक 37.2 इतकी तापमानाची नोंद झाली आहे.

फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरु होताच राज्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. अनेक भागांत थंडी गायब झाली असून ऊन वाढले आहे त्यामुळे तापमानातही वाढ झाली आहे. आतापर्यंत 37.2 इतकी तापनाची नोंद राज्यात झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक परिसरातही थंडी कमी होऊन उन्हाचा तडाखा वाढला आहे.

विदर्भातील ब्रह्मपुरी येथे 37.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये पुढील दोन ते तीन दिवस थंडी नाहीशी होत तापमान 37 अंशांचा आकडा गाठत नागरिकांच्या अडचणी वाढवू शकते असाही थेट इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे. अचानक तापमान वाढल्यामुळे मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, पालघर येथील लोकांनी ऐन दुपारच्या वेळी बाहेर पडू नका असाही सल्ला दिला जात आहे.

फेब्रुवारी हा मुंबईसाठी हिवाळ्यातील शेवटचा आल्हाददायक महिना असतो. कारण मार्चपासून तापमान वाढू लागते आणि कधीकधी फेब्रुवारीच्या अखेरीसच उन्हाळ्याची चिन्हे दिसू लागतात. काल, 5 फेब्रुवारी रोजी, मुंबईचे कमाल तापमान 32.8° सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा 2° सेल्सिअस जास्त होते. याव्यतिरिक्त, आर्द्रतेचे प्रमाण जास्त राहिले, ज्यामुळे दमट आणि अस्वस्थता जाणवत होती.

पुण्यात कसे असेल तापमान ?

पुण्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने पुणेकरांना उकाडा सहन करावा लागत आहे.

पुण्यात खळबळ NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनी नोट सापडली; नेमका काय आहे प्रकार? सखोल चौकशीची मागणी

0

पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या (NDA) हद्दीपासून अगदी काही मीटर अंतरावरील एका सोसायटीत पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुळशी तालुक्यातील भुकूम येथील स्काय आय मानस लेक सिटी मधील आयरिस- 3 या सोसायटीच्या लिफ्टबाहेर पाकिस्तानी चलनामधील नोट आढळली आहे. याबाबत सोसायटीचे चेअरमन सहदेव यादव यांनी बावधन पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला असून याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी सोसायटीच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने पोलिसांना केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर ही नोट पडलेली असल्याचे सोसायटीचे चेअरमन सहदेव यादव यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने लगेच बावधन येथील पोलिसांना संपर्क करून त्या ठिकाणी जाऊन अर्ज दिला. पाकिस्तानी चलनातील सापडलेली नोट ही वापरातील असून ती अनेक वेळा वापरली असल्याचे तिच्या एकूण स्थितीवरून दिसते.

ही नोट या सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर कोणाच्या खिशातून पडली की आपल्या देशामध्ये कोणाकडून आली, याचा तपास होण्याची गरज आहे. परिणामी याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी ही आता स्थानिकांनी केली आहे. मात्र हा नेमका प्रकार काय हे तपासानंतर कळणार आहे.

फेरीवाल्यांकडे डोमिसाईल असेल तरच महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करता येणार; मराठी माणसांना रोजगाराची सुवर्ण संधी

0

फेरीवाल्यांकडे डोमिसाईल असेल तरच महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करता येणार आहे. यामुळे महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करणाऱ्या परप्रतांयांना जबरदस्त झटका बसणार आहे. याबाबत उच्च न्यायालयाने आता महापालिकेला चांगलच ठणकावल आहे. त्यामुळे ज्याच्याकडे डोमेसाईल असेल त्यालाच फेरीवाला परवाना मिळेल हे आता स्पष्ट झालं आहे. अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही डोमेसाईल बंधनकारक आहे. मात्र त्याची अमंलबाजवणी केली जात नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत.

शहर फेरीवाला समिती निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर कोर्टात सुनावणी झाली. सुनावणीवेळी खंडपीठाने महापालिकेला चांगलंच सुनावलं. फेरीवाला समितीच्या निवडणुकीसाठी डोमिसाईल नसल्याने फेरिवाल्यांना अपात्र ठरवण्यात आल्याने याचिका दाखल करण्यात आली होती. यावर खंडपीठाने संताप व्यक्त करत काही सवाल उपस्थित केले आहेत.

राज्यात फेरीवाल्यांना डोमिसाईल अनिवार्य का केलं जात नाही? राज्यात एकसमान फेरीवाले धोरण अस्तित्वात आहे का? फेरीवाल्यांची संख्या कमी होण्यामागील कारणं काय? अशा अनेक प्रश्नांचा भडिमारा कोर्टाने मुंबई महापालिका प्रशासनावर केला.
कोर्टाचे भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. या निर्णयाचं स्वागत करायला हवं. यामुळे मराठी माणसांना संधी मिळेल आणि रोहिंग्या, बांगलादेशी घुसखोरांवर आळा बसेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी दिली. हा निर्णय अतिशय चांगला आहे. या निर्णयाचं अभिनंदर करतो असे अजित चव्हाण म्हणाले.

राज्यातील मोठ्या शहरात फेरीवाल्यांची संख्या लक्षणीय आहे. अनेकदा यापैकी अनेक परप्रांतीय पेरीवाले दुसऱ्या देशाचे रहिवासी असल्याचेही उघडकीस आले आहे. त्यामुळे फेरीवाल्यांकडे अधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. कोणीही येणार आणि रस्त्यावर ठेला लावणार याला यामुळे आळा बसणार आहे.

दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा ‘हात’भार; केजरीवाल, सिसोदियांसह ‘आप’च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस

0

गेल्यावर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील काँग्रेसच्या नेतृत्वात प्रादेशिक पक्षांनी एकत्र येत भाजपच्या आव्हानाचा मुकाबला केला होता आणि भाजप लोकसभा निवडणुकीमध्ये 400 चा नारा देत असताना अवघ्या 240 जागांवर येण्याची वेळ आणली होती. बहुमत सुद्धा भाजपला मिळवता आलं नाही. केंद्रामध्ये भाजपची एकहाती सत्ता अपेक्षित असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाली हा इतिहास असताना गेल्या आठ महिन्यांमध्ये मात्र ज्या पद्धतीने इंडिया आघाडीने वज्रमूठ बांधत भाजपला दणका दिला होता तीच वज्रमूछ निखळल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या आठपैकी सहा राज्यांमध्ये भाजपने विजय प्राप्त करत इंडिया आघाडीची हवा काढली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. देशभरामध्ये इंडिया आघाडीमध्ये समन्वय राहिला नसल्याचे दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्येही स्पष्ट झालं आहे.

एकमेकांची कपडे फाडण्यातच इंडिया आघाडीच्या नेत्यांचा वेळ गेला

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि आप आमने-सामने आल्याने त्याचा फायदा भाजपसाठी झाल्याचे दिसून येत आहे. दिल्लीची सत्ता भाजपने पुन्हा एकदा मिळवताना ‘आप’ला सत्तेतून बेदखल केलं आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यासारखे दिग्गज नेते पराभूत झाले. त्यांच्या पराभवासाठी काँग्रेसची मते सुद्धा कारणीभूत ठरली आहेत. ज्या 12 जागांवर आपचा पराभव झाला त्यामध्ये काँग्रेसला मिळालेली मतं ही भाजपच्या विजयी मतांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे कदाचित हे दोन्ही पक्ष समन्वयाने एकत्रित लढले असते तर भाजपला सत्ता मिळवता आली नसती, असे दिसून येत आहे. नवी दिल्ली, छत्रपूर, जंगपुरा बादली, त्रिलोकपुरी, ग्रेटर कैलास, नांगलोई, तिमारपूर मालवीय नगर, राजेंद्र नगर, संगम विहार, दिल्ली केंट या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या विजयी मतांपेक्षा काँग्रेसला मते मिळालेली सर्वाधिक आहे. त्यामुळे कदाचित या जागांवर काँग्रेस आणि आपमध्ये आघाडी असती, तर या जागा आपच्या पदरामध्ये किंवा काँग्रेसच्या पदरात आल्या असत्या हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आप आणि काँग्रेस मधील हे वादामुळेच भाजपचा दिल्लीतील विजय सुकर झाला आहे.

त्यामुळे एक प्रकारे एकमेकांची कपडे फाडण्यातच इंडिया आघाडीच्या नेत्यांचा वेळ जात असल्याने भाजपच्या महाकाय आव्हानाचा मुकाबला करणार तरी कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये कमालीचा वाद निर्माण झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामध्ये फक्त सत्तेत येण्याचीच औपचारिकता अशा पद्धतीनेच भांडणे सुरू होती. या भांडणाचाच फटका तिन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीमध्ये बसला. यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. फक्त झारखंडमध्ये इंडिया आघाडीला सरकार स्थापन करता आलं आहे.

सर्व राजकीय परिस्थिती विपरीत असताना सुद्धा हरियाणामध्ये भाजपची सत्ता

तत्पूर्वी, मध्य प्रदेश निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसचा अहंकार काँग्रेससाठी नढला होता. त्या ठिकाणी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव काही जागांची मागणी करत असताना त्यांना देण्यासाठी काँग्रेसकडून नकार देण्यात आला. त्याचाच परिपाक विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून आला. इतकेच नव्हे तर काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी कोण अखिलेश म्हणून अशी संभावना केली होती. त्यावेळी सुद्धा काँग्रेसला सत्तेत परतणार असल्याचा विश्वास होता. मात्र, मी काँग्रेसचा त्या ठिकाणी सुद्धा पराभव झाला. इतकेच नव्हे तर सर्व राजकीय परिस्थिती विपरीत असताना सुद्धा हरियाणामध्ये भाजपने सत्ता मिळवली. या ठिकाणी सुद्धा काँग्रेसच्या अंतर्गत लाथाळ्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्या.

इंडिया आघाडीमधील मतभेद वाढले

त्यामुळे इंडिया आघाडीमधील मतभेद हे भाजपच्या विजयासाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा फारच बोलकी असल्याचे दिसून आले. अजून आपसात लढा म्हणत इंडिया आघाडीला टोला दिला. अर्थात, जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ता आल्यानंतर अब्दुल्ला यांचा सूर बदलला आहे. त्यानंतर शिवसेना संजय खासदार संजय राऊत यांनी सुद्धा त्यांच्याच सुरात सूर मिसळला. त्यामुळे इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्षातील नेत्यांचे मतभेद आणि काँग्रेसचा अहंकार यामध्ये सत्तेचा महामार्ग रखडला गेला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांनी आम्ही इंडिया आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीत एकत्र होतो, पण आता नाही. आघाडीची स्थापना केल्यापासून ती राज्यांत चालणार नाही, हे स्पष्ट होते. त्याची कार्यप्रणाली राज्यांच्या राजकीय स्वभावावर अवलंबून असेल. त्यामुळे इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून वाचू नये, आणि त्याचा आनंदही साजरा करु नये, असे म्हटले होते.

अनेक IAS, IPS घडवणारे ओझा सर पराभूत, राजकारणात स्वत: ‘राजा’ होऊ शकले नाहीत

0

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना प्रेरणा देणारे, अनेकांना IAS, IPS बनवणारे अवध ओझा यांना राजकारणाच्या पटलावर मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. अवध ओझा हे आम आदमी पक्षाच्या तिकिटावर पटपडगंज मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. पण त्यांना भाजपच्या रवींद्र नेगी यांच्याकडून मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

अवध ओझा हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून नवी दिल्लीमध्ये ते यूपीएससीचा क्लास घेतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. त्यामध्ये ‘राजा बनण्यासाठी काय गरजेचं आहे’ या संदर्भातील त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दुसऱ्यांना राजा बनवणारे अवध ओझा मात्र स्वतः राजकारणात राजा होऊ शकले नाहीत.

पटपडगंज मतदारसंघातून भाजपचे रवींद्र सिंह नेगी 28072 मतांनी विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या एकूण तेरा फेऱ्यांनंतर रवींद्र सिंह नेगी यांना 74,060 मते मिळाली, तर अवध ओझा यांना 45,998 मते मिळाली.

राजकारणात यशस्वी नाहीत

अवध ओझा यांनी 2 डिसेंबर 2024 रोजी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. पक्षात प्रवेश केल्यापासून ते दिल्ली विधानसभा निवडणूक लढवतील अशी अटकळ बांधली जात होती. या निवडणुकीत ‘आप’ने त्यांना पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली होती. या ठिकाणाहून मनिष सिसोदीय निवडणूक लढायचे. ते यावेळी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या दोघांनाही आता पराभवाचा धक्का बसला आहे.

मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी

अवध ओझा हे मूळचे उत्तरप्रदेशातील गोंडा परिसरातील आहेत. अवध ओझा यांचे पूर्ण नाव अवध प्रताप ओझा आहे, परंतु UPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये त्यांना ओझा सर म्हणून ओळखले जाते. अवझ ओझा हे गेल्या 22 वर्षांपासून यूपीएससी आणि इतर नागरी सेवा परीक्षांसाठी क्लास घेत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे.

“…आता कोणी रोखू शकत नाही”, भाजपच्या विजयावर एकनाथ शिंदेंचे ट्वीट

0

राजधानी नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाला आहे. तब्बल २७ वर्षांनी भाजपने दिल्लीत कमबॅक केले. तर आपला पराभवाचा झटका बसला. नवी दिल्लीत भाजपने तब्बल ४८ जागांवर मुसंडी मारली. तर आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या. तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. यामुळे दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिल्लीत आपचा पराभव होणार असल्याचे निश्चित होताच आता महाराष्ट्रातील भाजपचे अनेक नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तसेच भाजपचेही अभिनंदन केले आहे. “खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
यह मोदीजी की गॅरंटी का कमाल है | महाराष्ट्रा पाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनीही पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाची आणि एनडीएची विजयी घौडदौड सुरूच आहे. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

दिल्लीकरांवरचे गेली १० वर्षे असलेलं ‘आप’चे संकट या निमित्ताने दूर झाले आहे. दिल्लीच्या विकासावर आलेली ही ‘आपदा’ टळली. त्याचबरोबर, संविधान, मतदान सगळे संकटात असल्याचा खोटा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी पुन्हा एकदा चारी मुंड्या चित केलं आहे. खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली, त्याबद्दल दिल्लीकर मतदारांना मनापासून धन्यवाद!

घरोघरी लक्ष्मीची पावले उमटावीत म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेल्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही मतदारांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. आपला देश आर्थिक महासत्ता होण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही, यावरही मतदारांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

दिल्लीत भाजपचं कमळ फुललं
दरम्यान नवी दिल्लीत ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान पार पडले. आज दिल्लीत मतमोजणी पार पडली. या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलापासूनच भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. तर आप पोस्टल तसेच ईव्हीएम मतमोजणीतही पिछाडीवर पाहायला मिळाली. दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे. यात भाजपला ४८ जागांवर विजय मिळाला आहे. तर आपला २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी भाजपला संधी देत ‘आप’ला नाकारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

तर उद्धव ठाकरे युतीतून बाहेर पडले नसते, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा; काय दिलं कारण?

0

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजपच्या युतीबाबतचे मोठे खुलासे केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बंददाराआडच्या चर्चेत अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता. उलट उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केल्यानंतर मी अमित शाह यांच्याशी बोललो. तेव्हा अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांचा हा प्रस्ताव सपशेल फेटाळून लावला होता, असा दावा करतानाच उद्धव ठाकरे यांना मी उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोटही केला आहे. तसेच उद्धव ठाकरे युतीतून का बाहेर पडले? याचं कारणही स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत 2019मधील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत असलेले दावे खोडून काढले आहेत. त्या निवडणुकीत भाजपचा आकडा 120 वर गेला असता तर उद्धव ठाकरे कधीच भाजप सोडून गेले नसते. पण जसंही त्यांच्या लक्षात आलं की नंबर गेम फसत आहे. आम्ही सरकार बनवू शकतो. तेव्हा त्यांनी आपला रंग बदलला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

परस्पर निर्णय घेतला
निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सर्व पर्याय खुले असल्याचं सांगितलं. आम्ही दुसऱ्या टोकाला जाऊ शकतो असंही ते म्हणाले. त्यांनी पीसी घेतली तेव्हापासून ते त्यांचं सरकार येईपर्यंतच्या दिवसापर्यंत त्यांनी माझा एकही फोन घेतला नाही. माझ्याशी साधी चर्चाही केली नव्हती. त्यांनी परस्पर निर्णय घेतला होता. त्यांनी पहिल्याच दिवशी दुसरीकडे जाण्याचं ठरवलं होतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

छुप्या पद्धतीने काय ठरलं?
उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका घेतल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली होती. त्यात शिवसेनेची लढत जिथे काँग्रेस विरोधात आहे, तिथे एनसीपीने शिवसेनेला मदत करायची आणि जिथे एनसीपीची लढत भाजपशी आहे, तिथे शिवसेनेने एनसीपीला मदत करायची हे ठरलं होतं. कारण शिवसेनेच्या जागा कमी झाल्या तर भाजप सरकार बनवेल अशी भीती होती. जे काही प्रीपोल होते त्यात भाजपचं सरकार येणार असल्याचं स्पष्टच दिसत होतं, असं फडणवीस म्हणाले.

राहुल गांधी मुन्नाभाई एमबीबीएस
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात पाच महिन्यात मतदानाचा टक्का कसा वाढला? असा सवाल केला होता. त्यालाही फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जनतेने आपली साथ सोडलीय हे जोपर्यंत राहुल गांधी यांना समजणार नाही, तोपर्यंत त्यांची अशाच पद्धतीने हार होणार आहे. कधी कधी तुमच्यासोबत कोण आहेत हे महत्त्वाचं ठरतं. पीसी घेताना संजय राऊत यांना घेऊन बसणार तर असेच विचार येणार. जे पत्र निवडणुकीनंतर आयोगाला महाविकास आघाडीने लिहिलं होतं. त्याला आयोगाने उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांची खासियत म्हणजे त्यांना सत्य कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाही. ते मुन्नाभाई एमबीबीएस आहेत. ते आपल्याच विश्वात असतात, अशी बोचरी टाकी त्यांनी केली.

उत्खनन करताना सापडला अब्जोंचा खजाना, अधिकारी पळत आले घटनास्थळी, काय घडले नेमके? वाचा सविस्तर

0

उत्तरप्रदेशातील बदायू जिल्ह्याचे नशीब चमकले आहे. या जिल्ह्यात आता विकासाची गंगा वाहणार आहे. कारण देखील तसेच घडले आहे. बदायू जिल्ह्यात जमीनीच्या खाली कच्च्या तेलाचे मोठे साठे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. या शोधाचा शास्रीय पद्धतीने धांडोळा करण्यासाठी अल्फाजिओ ( इंडिया ) ही कंपनी कामाला लागली आहे. सध्या या कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी उघैती क्षेत्रातील टिटौली गावात डेरा टाकून आहेत. संभाव्य तेल भांडाराचा सखोल शोध सुरु आहे.

वैज्ञानिक पद्धतीने तपास सुरु
अनेक महिन्यांपासून अल्फाजिओ इंडीया ही कंपनी उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील विविध क्षेत्रात वैज्ञानिक पद्धतीने कच्च्या तेलाचा शोध घेत आहे. कंपनीची विशेष टीम बोरिंग तंत्राने आणि जीपीएस सॅटेलाईटद्वारे या खनिज संपत्तीचा शोध घेत आहे.

बोरिंग प्रक्रिया : संभाव्य क्षेत्रात ट्रायपॉड लावून बोरिंग खणण्याचे काम सुरु आहे.

ब्सास्टींग तंत्रज्ञान : बोरिंगनंतर शुटर मशिनने जमिनीत हल्का ब्लास्ट केला जातो

जीपीएस ट्रॅकींग : सॅटेलाईट सिस्टीम द्वारे डेटा जमा करुन संशोधन सुरु आहे.

काही स्थानांवर डीझेल आणि पेट्रोल असल्याचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे येथे ही प्रक्रीया वेगाने केली जात आहे. संपूर्ण परीक्षण पूर्ण झाल्यानंतर विस्तृत रिपोर्ट भूगर्भ वैज्ञानिकांकडे सोपवला जाणार आहे. त्यानंतरच बदायुच्या जमीनीत नेमके किती कच्चे तेल अस्तित्वात आहे हे समजू शकणार आहेत.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई
तेल शोधण्याच्या प्रक्रीयेत शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कंपनीने शेतकऱ्यांना त्याची भरपाई देण्याची योजना आखली आहे. ज्याची जमीन या प्रभावित भागात मोडते त्यांना एक पावती दिली जात आहे. त्यात त्याचे नाव, गाव, बँकेचे तपशील आणि प्रभावित क्षेत्राची माहिती नमूद केले जात आहे. त्याआधारे नुकसान भरपाईची रक्कम ठरविली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम त्वरित पाठविली जात आहे. जर कोणत्या शेतात तेलाचा साठा सापडला तर स्वतंत्र वेगळी रक्कम दिली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रीयेचा इतर शेतकाऱ्यांच्या शेतीवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांची शेती ते नेहमी प्रमाणे करु शकतात असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

निकालानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; “आम्ही आणखी जोमाने काम करु आणि दिल्लीतील लोकांची…”

0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडल्या. भाजप विरुद्ध आप अशा अटीतटीच्या लढतीत भाजपचा विजय झाला. नवी दिल्लीत भाजपने तब्बल 47 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे तब्बल 27 वर्षानंतर नवी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे. या निकालानंतर दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिल्लीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी आता आम्ही आणखी जोमाने दिल्लीतील लोकांची सेवा करु, असे आश्वासन संपूर्ण दिल्लीतील जनतेला दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
“जनशक्ती सर्वेपरि! विकासाचा विजय झाला. सुशासन जिंकले. दिल्लीतील सगळ्या भावा-बहिणींनी आम्हाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला, त्यासाठी मी त्यांचे वंदन करतो आणि अभिनंदनही. तुम्ही आम्हाला जो आशीर्वाद आणि प्रेम दिले आहे, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. आम्ही दिल्लीचा चौफेर विकास करु. तसेच दिल्लीतील लोकांचे जीवन उत्तम बनवण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. ही आमची गॅरेंटी आहे. यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीत दिल्लीची भूमिका महत्त्वाची असेल, असे आम्ही आश्वस्त करतो.

मला भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांवर गर्व आहे. त्यांनी या विजयासाठी दिवस रात्र मेहनत केली. आता आम्ही आणखी जोमाने आणि मजबुतीने दिल्लीतील लोकांची सेवा करु”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

अनेक दिग्गजांचा पराभव
दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’च्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले आहे. भाजपच्या परवेश वर्मा यांनी 3186 मतांनी केजरीवाल यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आपच्या गोटात मोठा भूकंप झाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला आहे.