Home Blog Page 2

थेट रोहिणी खडसे वकिली कोट घालून न्यायालयात, ईशा सिंगचा वापर खेवलकरांना अडकवण्यास, वकिलांचा युक्तिवाद

0

पुणे : पुण्यातील एका रुममध्ये सुरु असलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत सात जणांना अटक केली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांचा समावेश होता. पुणे पोलिसांनी ही कारवाई 27 जुलै रोजी केली होती. आज त्या सर्वांची पोलीस कोठडी संपत असल्यानं सर्व आरोपींना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. रोहिणी खडसे या ठिकाणी स्वत: पोलिसाचा कोट घालून न्यायालयात आल्या आहेत. पुणे पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली. तर, प्रांजल खेवलकरांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी खेवलकर यांना अडकवण्यासाठी ईशा सिंगचा वापर केल्याचा युक्तिवाद केला आहे.

रोहिणी खडसे वकिलीचा कोट घालून कोर्टात

प्रांजल खेवलकर यांच्यासह सात आरोपींना पोलीस कोठडी संपल्याने पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात हजर करण्यात आलं आहे‌. या सुनावणीसाठी रोहिणी खडसे या स्वत: वकिलीचा कोट घालून न्यायालयात आल्या आहेत. त्या पती प्रांजल खेवलकर यांच्यासाठी न्यायालयात वकील म्हणून युक्तीवाद करण्याची शक्यता आहे. रोहिणी खडसे यांच्याकडे वकिलीची सनद आहे. रोहिणी खडसे यांच्या सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या रुपाली पाटील देखील वकिलीचा काळा कोट घालून युक्तिवाद करण्यासाठी न्यायालयात आल्या आहेत.

पुरुष आरोपींची  कोठडी वाढवा, तपास अधिकाऱ्यांची मागणी

तपास अधिकारी यांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीप्रमाणे तपासात राहुल नावाचा नवीन व्यक्ती असल्याची माहिती मिळाली आहे. तो हुक्का भरण्याच काम करत होता. त्याचा शोध घ्यायचा आहे. अंमली पदार्थ कोठून आणले याबाबत आरोपी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे चौकशी करायची आहे. सातपैकी अटक असलेल्या दोन महिला आरोपींची पोलीस कोठडी सध्या गरजेची नाही. या दोन महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी. मात्र, पाच पुरुष आरोपींकडे आणखी चौकशी करायची असल्याने त्यांची पोलीस कोठडी मिळावी. आरोपींकडून इलेक्ट्रॉनिक गॅझेटस जप्त करण्यात आली आहेत. त्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी मिळावी.

प्रांजल खेवलकरांनी अंमली पदार्थाचं सेवन केलं नाही: विजयसिंह ठोंबरे

प्रांजल खेवलकरांकडून वकील विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की दोन महिला आरोपींकडे अंमली पदार्थ देऊन प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यात आले आहे. इशा सिंग हिच्या पर्समधे सिगारेटच्या रिकाम्या पाकीटात कोकेन सापडले आहे. इशा सिंगला प्लांट करण्यात आले होते. पोलीस आता त्या दोन महिला आरोपींना पोलीस न्यायालयीन कोठडीची मागणी करतायत आणि प्रांजल खेवलकर यांची मात्र पोलीस कोठडी मागतायत. प्रांजल खेवलकर यांनी अंमली पदार्थांच सेवन केलेले नाही आणि त्यांच्याकडे अंमली पदार्थ सापडलेले देखील नाहीत. अंमली पदार्थांचा फॉरेन्सीक रिपोर्ट मुद्दामहुन लवकर येत नाही.

कोकाटेंनी सर्व आशा सोडल्या, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजितदादांच्या ‘त्या’ अटीने ऐनवेळी संपूर्ण गेम पालटला!

0

अधिवेशन काळात विधानपरिषदेचे कामकाज सुरु असताना ऑनलाईन रमी खेळत असल्याचा ठपका असलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना पुन्हा एकदा अभय मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी होणार, या चर्चेने जोर धरला होता.

माणिकराव कोकाटे हे मंगळवारी सकाळी मंत्रालयात अजित पवार यांना भेटण्यासाठी आले होते. अजितदादांच्या अँटी चेंबरमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 25 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेचे फलित माणिकराव कोकाटे यांच्यासाठी फारसे चांगले नव्हते. त्यामुळे माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्य दालनातून एकही शब्द न बोलता मंत्रिमंडळाच्या बैठकीला निघून गेले होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणारच, अशी वदंता पसरली होती. परंतु, मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका खेळीने सर्व चित्र पालटल्याचे दिसून आले.

अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा विषय येताच सगळ्यांनाच बुचकाळ्यात टाकणारी भूमिका घेतली. शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाई झाली तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांवर कारवाई होणार, असे अजितदादांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कोकाटेंच्या राजीनाम्याविषयी काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माणिकराव कोकाटेंना संधी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. कोकाटे यांच्यावर कारवाई नको तर त्यांना समज देऊयात. कोकाटे यांचे काम चांगले आहे, त्यांना संधी देऊयात, असे मत सर्व मंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे मांडल्याची माहिती समोर येत आहे.

अजितदादा कोकाटेंना मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी काय म्हणाले?

आज माणिकराव कोकाटे आपल्या मुलीसह मंत्रालयात आले होते. त्यांनी अजित पवार यांच्या अँटी चेंबरमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. अँटी चेंबरमध्ये झालेल्या चर्चेवेळी अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवं’, असे अजित पवार यांनी कोकाटे यांना म्हटल्याचे समजते. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी झाल्या प्रकाराबद्दल अजित पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. पुढील काळात अशा बाबी घडणार, असे आश्वासनही कोकाटे यांनी अजितदादांना दिले.

दरवेळी गांधी परिवारावर टीका, 11वर्षे सत्ता स्वत:ची आतातरी जबाबदारी घ्या; प्रियांका गांधींचा भाजपवर हल्लाबोल

0

भाजपला गांधी परिवारावर टीका करण्यासाठी फक्त बहाणा हवा असतात. तो मिळाला की, भाजप गांधी परिवाराचा इतिहास उगाळत बसतो. गेली 11 वर्षे देशावर भाजपची सत्ता आहे.किमान आतातरी नेहरु-गांधींना दोष देण्याऐवजी स्वत:ची जबाबदारी घ्यायला शिका, अशा सडेतोड भाषेत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरबाबत लोकसभेत आयोजित करण्यात आलेल्या चर्चेवेळी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर आगपाखड केली. ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्याच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित करणारे विरोधक कसे पाकिस्तानधर्जिणे आहे, काँग्रेसच्या काळात नेहरुंच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडे कसा केला, चीनने आपला भूभाग कसा बळकावला, असा काँग्रेसच्या चुकांचा पाढा अमित शाह यांनी वाचला. त्यानंतर प्रियांका गांधी भाषणाला उभ्या राहिल्या आणि त्यांनी या सगळ्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. प्रियांका गांधी यांच्या भाषणावेळी भाजपच्या खासदारांकडून काँग्रेस आणि गांधी घराण्याने काय केलं, असा सवाल विचारण्यात आला. त्यावर प्रियांका गांधी यांनी म्हटले की, ‘तुम्ही इतिहास उगाळत बसा, मी वर्तमानात जगणारी आहे’.

आपल्या भाषणात प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारला काही मुलभूत प्रश्न विचारले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अन्य सदस्यांनी केलेली भाषणं मी ऐकली. मात्र, या सगळ्यात मला एकच गोष्ट खटकली. अनेकांनी ऑपरेशन सिंदूर, दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि इतिहासाचे धडे दिले. पण या सगळ्या भाषणांमधून एक गोष्ट निसटली. 22 एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात 26 भारतीयांना मारण्यात आले. तो हल्ला कसा झाला आणि का झाला? पहलगाममध्ये दहशतवादी काय करत होते? केंद्र सरकार प्रचार करत असते की, काश्मीरमध्ये आता शांतता आहे, दहशतवाद संपला आहे. पंतप्रधान सांगतात की,काश्मीरला जा, तिकडे जमिनी खरेदी करा. मग पहलगाममध्ये दहशतवाद हल्ला कसा झाला? असा हल्ला होणार, याची माहिती देणारी एकही यंत्रणा आपल्याकडे नव्हती का? हे आपल्या यंत्रणांचं अपयश नाही का? हे आपल्या सुरक्षा यंत्रणांचं खूप मोठं अपयश आहे. याची जबाबदारी कोण घेणार? या हल्ल्याने इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखांनी राजीनामा दिला का? देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला का?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला.

प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणात पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या कानपूरचे रहिवासी शुभम द्विवेदी यांचा उल्लेख केला. सहा महिन्यांपूर्वी शुभमचे लग्न झाले होते. त्यांचे कुटुंब गुणागोविंदाने राहत होते. त्यांचा व्हिडीओ पाहून आजही काळीज विदीर्ण होते. शुभम आपल्या पत्नीसोत काश्मीरला गेला होता. 22 एप्रिलला बैसरन व्हॅलीत चांगले वातावरण होते. तिथे जायची वाट सोपी नाही. बैसरन व्हॅलीत जंगलातून आणि डोंगरातून चढत जावे लागते. तिकडे 22 एप्रिलला लहान मुलं खेळत होती. काहीजण झिपलाईन करत होते. लोक मजेत होते. शुभम आणि त्यांची पत्नी एका स्टॉलवर मजेत उभे होते. तेव्हा समोरच्या जंगलातून अचानक दहशतवादी आले आणि त्यांनी शुभमला मारले. त्यानंतर एक तास दहशतवादी बैसरन व्हॅलीत लोकांना टिपून टिपून त्यांच्या कुटुंबीयांसमोर ठार मारत होते.

शुभम द्विवेदी यांची पत्नी म्हणाली की, ‘मी माझं जग डोळ्यांसमोर संपताना पाहिलं आहे. या संपूर्ण वेळात तिथे एकही सुरक्षारक्षक नव्हता. देश आणि सरकारने आम्हाला अनाथ सोडलं होतं. तिथे सुरक्षा का नव्हती? एक सैनिक का नव्हता? सरकारला माहिती नव्हतं का, इथे रोज पर्यटक येतात. इथे येताना जंगलातून यावं लागतं, काही झालं तर लोक बाहेर कसे पडणार, हा विचार सरकारने केला नव्हता का? त्याठिकाणी साध्या प्राथमिक उपचारांची सोय नव्हती, किंबहुना कसलीच व्यवस्था नव्हती. या लोकांना देवाच्या भरवशावर सोडून देण्यात आले होते. नागरिक सरकारच्या भरवशावर तिकडे गेले आणि सरकारनेच त्यांना देवाच्या भरवशावर सोडून दिले. मला विचारायचं आहे की, ही कोणाची जबाबदारी आहे? नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पंतप्रधान, गृहमंत्री आणि एनएसएसची नाही का? पहलगाम हल्ल्यापूर्वी दोन आठवडे आधी गृहमंत्री अमित शहा काश्मीरला गेले होते, कशासाठी तर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घ्यायला’, याकडे प्रियांका गांधी यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र राज्यातील गाव-खेड्यांचा होणार कायापालट, मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय! वादग्रस्त मंत्र्याबाबत कोणत्याही कारवाईची शक्यता नाही

0

महाराष्ट्र राज्यातील गाव खेड्यांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्यात येणार असून या अंतर्गत चांद्यापासून बांद्यापर्यंत गावकऱ्यांचा विकास करण्याचा राज्य शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार असे एकूण १ हजार ९०२ पुरस्कार दिले जाणार आहेत. ग्रामविकास विभागाच्या वतीने ‘उमेद’- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १० जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) ची उभारणी करण्यात येणार असून यामधून राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करण्याचा निर्णयही या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करताना राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन करण्यासाठी सहकार व पणन विभागाच्या वतीने काम केले जाणार आहे. त्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे सनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यासही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे ग्रामीण विकास, शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ यासंदर्भात आजच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आजच्याच बैठकीत महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यााचाही निर्णय घेतला आहे.

राज्यात कोणकोणते निर्णय घेण्यात आले?

ग्राम विकास विभाग

राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवणार. अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय. एकूण १ हजार ९०२ पुरस्कार दिले जाणार.

ग्रामविकास विभाग

‘उमेद’- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १० जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) ची उभारणी करणार. राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार.

सहकार व पणन विभाग

‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी. राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन होणार. त्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे सनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.

विधि व न्याय विभाग

महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन होणार.

विधि व न्याय विभाग

पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना. या न्यायालयांसाठी पदांना मंजूरी.

जलसंपदा विभाग

वर्धा जिल्ह्यातील बोर मोठा प्रकल्प (ता. सेलू) प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नुतनीकरणाच्या कामासाठी २३१ कोटी ६९ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता.

जलसंपदा विभाग

वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम प्रकल्प (ता. आर्वी ) प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नुतनीकरणाच्या कामासाठी १९७ कोटी २७ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता.

महसूल विभाग

महाराष्ट्र व गोवा वकील परिषद, मुंबई यांना ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्यास मान्यता.

अजितदादांची प्री कॅबिनेट बैठक; सरकारची प्रतिमा मलिन किती वाचवायचं माफ करायचं पण राजीनामा मात्र तेव्हाच

0

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात तासाभरापासून चर्चा सुरू आहे. मंत्रालयातील अजितदादांच्या अँटी-चेंबरमध्ये एका तासांपासून खलबंत सुरु आहेत. दादांनी या बैठकीत कोकाटेंसमोरच नाराजी व्यक्त केली. कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. असे अजित पवारांनी सुनावले. आता माझ्या हातात काहीच नाही. किती वेळा तुम्हाला वाचवायचं, किती वेळा माफ करायचं असा सवाल अजितदादांनी केला.

बोलताना भान ठेवा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात प्री कॅबिनेट बैठक एक तासापासून सुरू आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी ही बैठक सुरू आहे. बोलताना सगळ्या मंत्र्यांनी भान ठेवावं. आपल्या एक वक्तव्यामुळे संपूर्ण सरकार अडचणीत येत आहे. माध्यमांशी बोलताना भान ठेवावं, अशा सूचना अजित पवार यांनी सर्व मंत्र्यांना केल्या. दादांनी नाराजी व्यक्त करत कोकाटेंचे कान टोचले.

तरच मंत्र्यांवर कारवाई

शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाई झाली तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांवर कारवाई होणार असे अजितदादांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे कोकाटेंच्या राजीनाम्याविषयी काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोकाटेंना संधी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही असे समोर येत आहे.

कोकाटे यांच्यावर कारवाई नको तर त्यांना समज देऊयात. कोकाटे यांचे काम चांगले आहे, त्यांना संधी देऊयात असे मत सर्व मंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे मांडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान कोकाटे आणि अजितदादा यांच्यातील बैठक संपली असून ते मीडियाशी न बोलता मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी निघून गेले.

कृषीमंत्री वादात अडकले

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडले आहेत. कृषी मंत्री पद हे ओसाड गावची पाटलकी असल्याचे ते म्हणाले. तर यापूर्वी ढेकळांचा विमा द्यायचा का अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यापूर्वी पण त्यांचे एक विधान चर्चेत आले होते. तर पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत ते रमी खेळत असल्याचे समोर आले होते. त्यांनी रमी खेळत नसल्याचे स्पष्ट केले होते. पण त्यावरून राज्यात विरोधक संतापले होते.

लोकसभेत चर्चा सुरू असतानाच संरक्षण दलांना मोठं यश; पहलगाम हल्ल्यातील लष्कर कमांडर मुसासह 3 दहशतवादी ठार, Army नं बदला घेतला?

0

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन महादेव’मध्ये मोठं यश मिळालं आहे. श्रीनगरजवळील दाचीगाम भागातील लिडवास येथे झालेल्या चकमकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मुसासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

ड्रोनच्या मदतीने मृतदेहांची ओळख

अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी, ड्रोन सर्व्हेलन्समध्ये तीनही दहशतवाद्यांचे मृतदेह दिसल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.

दहशतवाद्यांकडून अचानक गोळीबार, लष्कराचे प्रत्युत्तर

मुलनार परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. या दरम्यान दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकांनी प्रतिकार करत तिन्ही दहशतवाद्यांना ठार केले.

लष्कराची अधिकृत घोषणा

भारतीय लष्कराच्या १५ व्या कॉर्प्स रेजिमेंट चिनार कॉर्प्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर या ऑपरेशनची माहिती देत यशस्वी कारवाईची पुष्टी केली.

२२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यात नेमकं घडलं काय?

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरातील बैसरन पर्वतावरील कुरणावर २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या भ्याड हल्ल्यात २५ भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. गेल्या काही वर्षांतील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो. या हल्ल्यानंतर जगभरातून भारताच्या पाठीशी उभं राहत दहशतवादाचा निषेध करण्यात आला. सोशल मीडियावरही या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

भारताची प्रत्युत्तर कारवाई – ऑपरेशन सिंदूर

हल्ल्यानंतर भारताने मोठी मोहीम राबवत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केलं. या कारवाईत पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या नऊ तळांचा नाश करण्यात आला. या कारवाईनंतर दहशतवाद्यांच्या हालचालींवर मोठं आव्हान उभं राहिलं.

आता ‘ऑपरेशन महादेव’मध्ये खात्मा

नुकत्याच झालेल्या ऑपरेशन महादेवमध्ये, या हल्ल्यामागे असलेल्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मुसाचाही समावेश असल्याचं सुरक्षा दलांनी जाहीर केलं आहे.

बैसरन खोऱ्यात ऑपरेशन महादेवमध्ये दहशतवादी हाशिम मुसाचा खात्मा कसा? एक सिग्नल आणि खेळच संपला…! सविस्तर वाचा

0

काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरमधील महादेव पर्वतावर लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांपैकी एक हाशिम मुसा उर्फ सुलेमान आहे. मुसा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार होता. हा हल्ला २२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झाला होता. मुसा पाकिस्तानी लष्कराच्या विशेष दलाचा सैनिक होता.

ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून उच्च तंत्रज्ञानाची शस्त्रे देखील सापडली आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मुसा बैसरन खोऱ्यापासून सुमारे १०३ किलोमीटर अंतरावर त्याच्या दहशतवादी साथीदारांसह कसा मारला गेला याची साईड स्टोरी जाणून घेऊया.

सुरक्षा एजन्सींच्या मते, पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा एजन्सी भौतिक आणि इलेक्ट्रॉनिक देखरेखीद्वारे दहशतवादी कारवायांवर सतत लक्ष ठेवून होत्या. या काळात भारतीय सुरक्षा एजन्सींना चिनी अल्ट्रा रेडिओ कम्युनिकेशन सक्रिय असल्याचे ठोस संकेत मिळाले. लष्कर-ए-तैयबा या चिनी अल्ट्रा रेडिओचा वापर एन्क्रिप्टेड संदेशांसाठी करते. २०१६ मध्ये, याला WY SMS असेही म्हटले जात असे.

चिनी अल्ट्रा रेडिओ कम्युनिकेशन सक्रिय असल्याचे संकेत मिळताच सुरक्षा यंत्रणांनी कारवाई केली आणि ऑपरेशन महादेव सुरू केले. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या काश्मीर झोनचे आयजीपी विधि कुमार बर्दी म्हणाले की, ऑपरेशन महादेव अजूनही सुरू आहे. सुरुवातीच्या अहवालांनुसार, तीन मृतदेह दिसले आहेत. त्यांची ओळख पटविण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल.

यापूर्वी लष्कराने सांगितले होते की, लिडवास परिसरात गोळीबार सुरू झाला आणि चकमकीत दहशतवादी मारले गेले. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने जंगल परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दल संशयित ठिकाणाजवळ पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यावर, सुरक्षा दलांनी जबाबदारी स्वीकारली आणि दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली.

चकमकीत मारला गेलेला हाशिम मुसा पाकिस्तानी सैन्यातील विशेष दलाचा पॅरा कमांडो होता. पहलगाम हल्ल्याव्यतिरिक्त, ऑक्टोबर २०२४ मध्ये गंदरबलच्या गगनगीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही मुसा सहभागी होता. या हल्ल्यात ६ स्थानिक नसलेले नागरिक आणि एक डॉक्टर मारले गेले. एवढेच नाही तर बारामुल्ला येथील बुटा पाथरी दहशतवादी हल्ल्यातही मुसा सहभागी होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. यासोबतच दोन पोर्टरही मारले गेले. हाशिम मुसासोबत जुनैद भट आणि अरबाज मीर हे देखील या दहशतवादी हल्ल्यात सहभागी होते. २०२४ मध्ये जुनैद भट आणि अरबाज मीर वेगवेगळ्या चकमकीत मारले गेले.

”पहलगाम हल्ल्यानंतर… तर मोदींना डोक्यावर घेवून आम्ही नाचलो असतो” ; अरविंद सावंतांचं लोकसभेत मोठं विधान!

0

लोकसभेत आज(सोमवार) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात अचानक मध्येच युद्धसमाप्तीची घोषणा केली गेल्याचा पार्श्वभूनीवर पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अरविंद सावंत पंतप्रधान मोदींवर टीका करताना म्हणाले, ”तुम्ही बिहारमध्ये गेलात, पण पहलगामला गेला नाहीत. अरे आजपर्यंत तर तुमन्ही मणिपूरलाही गेलेली नाहीत. तुम्हाला काहीच वाईट दु:ख वाटत नाही, तरीही आम्ही तुमचा ढोल बडवायचा का? आम्ही ढोल सैन्याचा वाजवू, तुमचा नाही वाजवणार. तुमचं काय त्यात शौर्य होतं?”

तसेच, जर तुम्ही सैन्याला स्वातंत्र्य दिलं होतं, तर स्वातंत्र्य दिल्यानंतर आणि तुमचे संरक्षण विभागाचे अधिकारी सांगतात की पाकिस्तानचे अधिकारी पायापडत होते, तर मग तुम्ही बिनाशर्त युद्ध समाप्त केलं? त्या अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षाची बडबड तर आजही सुरूच आहे, मीच युद्ध रोखलं, मीच युद्ध रोखलं. पण बिनशर्त का युद्ध रोखलं? जर ते रडत होते तर अट घालयला हवी होती, ते शरणजरी येत होते तरी अटी घालयला हव्या होत्या. काय अटी घातल्या तुम्ही? त्यानंतरही युद्ध सुरूच होतं. आपल्या जम्मूवर हल्ले सुरू होते. नागरिकांच्या वस्त्यांवर हल्ले होत राहिले, आम्ही पाहात रहावं का?” असा सवाल सावंतांनी केला.

याचबरोबर ”आधी तर फार म्हणायचे आम्ही पाकव्याप्त काश्मीर घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. तर आता संधी आली होती, तेव्हा तुम्हाला कोणी रोखलं होतं. आता तुम्ही म्हणातय आम्हाला युद्ध नको बुद्ध हवाय.. तुम्ही जर सैन्याला स्वातंत्र्य दिलं होतं, तर रोखलं का? हीच संधी होती पाकिस्तानला धडा शिकवण्याची, जसा इंदिरा गांधींनी शिकवला होता. पाकव्याप्त काश्मीर जर ताब्यात घेतला असता तर आम्ही पंतप्रधान मोदींना डोक्यावर घेवून नाचलो असतो. तुम्ही जे म्हणताय ना घुस के मारेंगे.. तर ओसामा बिन लादेनला जसं मारलं गेलं ना त्याला म्हणतात घुसून मारणं. जो पाकिस्तान तुमच्यासोबत अशाप्रकारे वागतो, त्या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं बंद करा.” असंही यावेळी अरविंद सावंत म्हणाले.

याशिवाय, आपल्याबाबत सर्वात मोठी वाईट गोष्ट ही आहे की, आपल्या आसापासचं एकही राष्ट्र आपल्याशी बोलत नाही. आपण तर विश्वगुरू आहोत, संपूर्ण जगात फिरतोय २०० देशांमध्ये गेलो. दहशतवादाबाबत आपण बोलतो, पाकिस्तानच्या दहशतवादाच्या मुद्य्यावर आपण तडजोड करत नाहीत, केलीच नाही पाहीजे. त्याबद्दल मी मोदींना धन्यवादही देतो. पण माननीय पंतप्रधान महोदय आपल्या बाजूने संपूर्ण जगात एकही राष्ट्र उभा राहिले नाही. आम्ही केवळ टीका टिप्पणीसाठी इथे उभा नाही आहोत, पण एकही देश आपल्यासोबत उभा राहिलेला नाही. तो इस्रायल उभा राहिला आणि आपण इराणच्या विरोधात उभा राहिलो, जो इराण आपल्याला तेल देतो, पैसे नंतर दिले तरी चालेल तेल घ्या म्हणतो. त्या इराणसोबतचे संबंधही बिघडले, हे आहे आपले पराष्ट्र धोरणं. असं म्हणत अरविंद सावंत यांनी टीकास्त्र सोडलं.

तसेच, ही केळव पहलगामची गोष्ट नाही, तर कारगिलमध्येही आपण ऑपरेशन विजय केलं होतं. त्यानंतही गलवान, डोकलाम होत राहिलं. सीमेवर घुसखोरी सुरूच आहे. चीन घुसखोरी करतोय. कोणी कोणी या युद्धात पाकिस्तानला मदत केली? चीन तर मदत करतच होता, तुर्कीपण करत होता ड्रोन देत होता. तिन्ही देश मिळून हे करत होते. आपल्याला अंतर्मूख होवून आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे, की एकही देश आपल्यासोबत का उभा राहत नाही. आम्ही काय चुकीचं केलं आहे? आंतरराष्ट्रीय नाणे निधीनेही युद्धाच्या वेळीच पैसे दिले. असंही यावेळी अरविंद सावंत यांनी बोलून दाखवलं.

ओला, उबर, रॅपिडो विसरा! थेट सरकारच सुरु करणार खास सेवा! 5 ऑगस्ट रोजी मंत्रालयात संबंधितांची बैठक वाहन खरेदीसाठीही मदत!

0

आता शहरातील आयुष्याचा अ‍ॅप आधारित प्रवासी वाहनसेवा ही अविभाज्य भाग बनला आहे. ओला, उबेर, रॅपिडो या खासगी कंपन्यांच्या वाहनांना रोज मिळत असलेला प्रतिसाद हे याचे प्रमुख उदाहरण आहे. पण, या कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी संप करत प्रवाशांना वेठीस धरले होते. तसंच या कंपनीतील चालकांची वागणूक, प्रवासामधील सुरक्षितता हे मुद्दे देखील अनेकदा चर्चेच असतात. या सर्वांवरचा उपाय राज्य सरकारनं शोधला आहे. राज्य व अ‍ॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

कसे असेल अ‍ॅप?

प्रवासी वाहतुकीसाठी अ‍ॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून मराठी तरुणांना रोजगाराची मोठी संधी मिळणार असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

या ॲपला जय महाराष्ट्र, ‘महा -राईड’, ‘महा-यात्री’ किंवा ‘महा-गो’ यापैकी एखादे नाव देणे प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री (एकनाथ शिंदे आणि अजित पवार) यांच्या अंतिम मान्यतेने हे सरकारी ॲप लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमाअंतर्गत अ‍ॅप विकसित करण्यासाठी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी’ आणि ‘मित्र’ या संस्थेसह खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. यंत्रणेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश यात असून लवकरच अ‍ॅप तयार होणार आहे, असंही सरनाईक यांनी सांगितले.

वाहन खरेदीसाठी मदत!

या माध्यमातून मराठी तरुण- तरुणींना विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून वाहन खरेदीसाठी १० टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे. अशी ग्वाही मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली. ते म्हणाले की, मुंबै बँकेच्या मदतीने बेरोजगार तरुण -तरुणींना अर्थसहाय उपलब्धता होईल.

अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी या संस्थांतर्फे 11 टक्के व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात दिला जाणार आहे. त्यामुळे हे कर्ज बिनव्याजी असल्यासारखे आहे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या अ‍ॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्वानुसार या ॲप ची नियमावली अंतिम टप्यात आहे. सध्या खाजगी संस्था अनाधिकृत ॲप च्या माध्यमातून प्रचंड नफा कमवतात. त्यासाठी त्या कंपन्या चालक आणि प्रवासी यांची लूट करीत आहेत. सरकारकडे यंत्रणा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ मुबलक प्रमाणात असल्यामुळे शासनाने असे ॲप विकसित केल्यास त्याचा फायदा प्रवाशांच्या बरोबर चालकांना देखील होईल.

या संदर्भात 5 ऑगस्ट रोजी मंत्रालयात संबंधितांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर या ॲप निर्मितीचे तंत्रज्ञ व शासकीय अधिकारी उपस्थित असतील, त्यामुळे या बैठकीत या शासकीय ॲपला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

‘पहलगाममध्ये दहशतवादी कसे घुसले, सरकार हे का सांगत नाही? गौरव गोगोईंचा पलटवार

0

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, सोमवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी सरकारला अनेक प्रश्न विचारले. गोगोई म्हणाले की, सरकारने हे का सांगितले नाही की पहलगाम दहशतवादी हल्ला कसा झाला आणि दहशतवादी कसे घुसले? गोगोई म्हणाले की, सरकार 2016 मध्ये जी विधाने करत होती, तीच विधाने आता पुन्हा करत आहे. पुलवामा हल्ल्यानंतरही अशीच विधाने करण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूर वर बोलताना गौरव गोगोईंनी विचारले की, राजनाथ सिंह म्हणाले की, “आमचा उद्देश युद्ध नव्हता, तर का नव्हता? आपण पाकव्याप्त काश्मीर (PoK) कधी घेणार?” असा प्रश्नही त्यांनी केला.

त्यासोबतच ते म्हटले की, उरी हल्ला हा सर्वात वेदनादायक हल्ला होता. उरी आणि पुलवामानंतर पहलगाममध्ये सर्वात भयानक हल्ला झाला आहे. “पाकिस्तानची इतकी हिंमत कशी झाली की तो वारंवार हल्ले करत आहे?” गौरव गोगोई म्हणाले की, पहलगाम हल्ल्याला 100 दिवस उलटून गेले आहेत. परंतु हे सरकार दहशतवाद्यांना न्यायाच्या कचाट्यात आणू शकलेले नाही. तसेच ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्याबाबत केंद्र सरकार उपराज्यपालांच्या मागे लपू शकत नाही. असा थेट हल्लाबोल ही त्यांनी केला.

ऑपरेशन सिंदूर वरील चर्चेदरम्यान, काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “शेवटी, पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कोण घेतो? जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल (LG). जर कोणाला जबाबदारी घ्यायची असेल, तर ती केंद्रीय गृहमंत्री यांनी घ्यावी. केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्र सरकार उपराज्यपालांच्या मागे लपू शकत नाहीत.” असा टोला ही त्यांनी या चर्चेवेळी सरकारला लगावला. गोगोई पुढे म्हणाले, “सरकार इतके कमजोर आणि भित्रे आहे की त्यांनी म्हटले, ‘टूर ऑपरेटर्स लोकांच्या परवानगीशिवाय किंवा परवान्याशिवाय त्यांना बैसरनला घेऊन जाण्यास जबाबदार आहेत.’ पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाहून परतले, पण त्यांनी पहलगामला भेट दिली नाही. त्यांनी एका सरकारी कार्यक्रमात भाग घेतला आणि बिहारमध्ये एका राजकीय सभेला संबोधित केले. जर कुणी पहलगामला गेले असेल, तर ते आमचे नेते राहुल गांधी होते.” असं ही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान यापूर्वी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “कोणत्याही दबावामुळे ऑपरेशन सिंदूर थांबवले गेले” हे म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने आमच्या डीजीएमओंशी संपर्क साधला. कारवाई थांबवण्याची विनंती केली. ही ऑफर या अटीवर स्वीकारली गेली की, हे अभियान फक्त थांबवले जात आहे, जर भविष्यात पुन्हा काही दुस्साहस झाले, तर अभियान पुन्हा सुरू होईल, असं गोगई यांच्या आधी राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच संरक्षण मंत्री म्हणाले की, विरोधी पक्षाचे लोक विचारतात की, “किती विमाने पडली?” हे राष्ट्रीय भावनांचे योग्य प्रतिनिधित्व करत नाही, तर त्यांचा प्रश्न हा असायला हवा की, “दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाले का?” असं ही ते म्हणाले.