Home Blog Page 199

मोठी बातमी, शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर अजित पवारांच्या भेटीला

0

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर हे विधानसभा निवडणुकीपासून सातत्याने चर्चेत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या निकालानतंर उत्तम जानकर यांनी अनेकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला आहे. यावरुन त्यांनी आंदोलनाचा इशारा देत आमदारकी सोडण्याची तयारीही दर्शवली होती. उत्तम जानकर यांच्याकडून सातत्याने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता उत्तम जानकर हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी आज सकाळी ११ च्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. मुंबईतील मंत्रालयात उत्तम जानकर आणि अजित पवारांची भेट झाली. यावेळी त्या दोघांमध्ये काही मिनिटे चर्चा झाली. उत्तम जानकर यांनी मतदारसंघातील काही कामांसाठी अजित पवारांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले.

ऋषभ पंतचा ज्याने जीव वाचवला, तोच आज जीवन-मरणाशी देतोय झुंज ! विष घेतलं आणि…

0

भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंत हा बराच चर्चेत असतो. दोन वर्षांपूर्वी त्याच्या कारचा मोठा अपघात झाला, त्यामध्ये ऋषभ एवढा जबर जखमी झाला होता की तो जगतो-वाचतो की नाही अशी परिस्थिती उद्भवली होती. मात्र त्यावर जिद्दीने मात करून तो पुन्हा उभा राहिला आणि भारतीय संघात पुनरागमन करत जबर खेळीही केली. मात्र ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा एका तरूणाने त्याचा जीव वाचवला होता. 30 डिसेंबर 2022 मध्ये ऋषभचा हा मोठा अपघात झाला, त्यावेळी रजत नावाच्या तरूणाने त्याचा जीव वाचवला होता. मात्र आता तोच रजत हा जीवन-मरणाशी झुंज देतोय. त्या रजतने गर्लफ्रेंडसह विष प्राशन केल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये त्या तरूणीचा तर विषामुळे मृत्यू झाला आहे मात्र रजत अजूनही जगण्या-मरण्याची लढाई लढत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रजत हा मुझफ्फरनगरमधील शकरपूर येथील माजरा बुच्चा बस्ती येथील रहिवासी आहे. दोन दिवसांपूर्वी रजतने त्यांच्या मुलीला आमिष दाखवून सोबत नेले. त्यानंतर तिला विष पाजण्यात आले, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीची आई कमलेश हिने रजत आणि इतरांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र सध्या रजत याचीच प्रकृती चिंताजनक आहे. शुद्धीवर आल्यानंतर पोलिस त्याचा जबाब नोंदवतील.

पाच वर्षांपासून अफेअर

क्रिकेटपटू ऋषभ पंतचा जीव वाचवणाऱ्या रजतचे गेल्या पाच वर्षांपासून मनू नावाच्या 21 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबीयांना हे नाते मान्य नव्हते. दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला होता. एवढंच नव्हे तर , दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांचे लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवलं होतं. घरच्यांच्या या वागण्यामुळे दुखावलेल्या प्रेमी युगुलाने ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शेतात जाऊन विष प्राशन केले होते. दोघेही बेशुद्ध अवस्थेत शेतात पडल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून त्यांना उत्तराखंडमधील झाब्रेडा येथील नर्सिंग होममध्ये दाखल केले. मंगळवारी उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. तर रजतवर अद्याप उपचार सुरू आहेत.

पंतने गिफ्ट केली होती स्कूटी

30 डिसेंबर 2022 रोजी क्रिकेटपटू ऋषभ पंतचा अपघात झाला तेव्हा रजत हा त्याच्यासाठी देवदूत बनून धावत आला. ऋषभची मर्सिडीज कार डिव्हायडरला जोरात धडकली होती. त्यावेळी ऋषभ हा कारने रुरकीला जात होता. मात्र वाटेतच त्याचा मोठा अपघात झाला. तेव्हाच रजतने मतदीसाठी धाव घेत त्याला रुग्णालयात पोहोचवलं. अपघातात जखमी झालेला ऋषभ पंत हळूहळू बरा झाला आणि अनेक महिन्यांच्या उपचारानंतर क्रिकेटच्या मैदानात परतला. त्यानंतर ऋषभ पंतने रजत आणि अन्य मदतनीस यांना स्कूटी भेट देऊन त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांचे आभार मानले होते. पण तोच रज आज एवढं मोठं, टोकाचं पऊल उचलेल याची कोणीच कल्पना केली नव्हती. एकाचे प्राण वाचवणारा रज आज स्वत:च्याच आयुष्यासाठी मात्र लढत आहे.

अयोध्येतील महान पुजाऱ्याचं निर्वाण, सत्येंद्र दास यांनी घेतला जगाचा निरोप

0

राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन झाल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं दिले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी लखनौ पीजीआयमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आचार्य सत्येंद्र दास यांना 3 फेब्रुवारी रोजी स्ट्रोकनंतर गंभीर अवस्थेत लखनौ पीजीआयच्या न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य प्रदीप दास यांनी सांगितले की, दीर्घ आजारानंतर सकाळी आठ च्या सुमारास लखनऊच्या पीजीआयमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव पीजीआयमधून अयोध्येत आणले जात आहे. शिष्यांनी त्यांचे पार्थिव अयोध्येत नेले आहे. उद्या, 13 फेब्रुवारीला अयोध्येतील सरयू नदीच्या तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नुकतेच पीजीआयने एक हेल्थ बुलेटिन जारी केले होते ज्यात सत्येंद्र दास यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे गंभीर आजार असल्याचे म्हटले होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ‘एक्स’ पोस्ट

सत्येंद्र दास यांनी सुमारे 33 वर्ष राम मंदिराची सेवा केली. फेब्रुवारी 1992 मध्ये ‘वादग्रस्त जमिनी’मुळे रामजन्मभूमीची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर गेली तेव्हा जुने पुजारी महंत लालदास यांना हटवण्याची चर्चा होती. दरम्यान, 1 मार्च 1992 रोजी भाजपचे खासदार विनय कटियार, विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि तत्कालीन विहिंप प्रमुख अशोक सिंघल यांच्या संमतीने सत्येंद्र दास यांची नियुक्ती करण्यात आली. सत्येंद्र दास यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी 1975 मध्ये संस्कृत विद्यालयातून आचार्य पदवी प्राप्त केली होती.

भारताच्या गोलंदाजीचा कणा मोडला, जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, कुणाला संधी?

0

क्रिकेट चाहत्यांना गेल्या काही आठवड्यांपासून ज्याची भीती होती, तेच घडलं आहे. भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज ‘यॉर्कर किंग’ अशी बिरुदावली मिरवणारा जसप्रीत बुमराह आयसीसी चॅम्पिन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आहे. बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. बुमराह स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तसेच बुमराहच्या जागी कुणाला संधी देण्यात आली आहे? याबाबतही बीसीसीआयने सांगितलं आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत

टीम इंडिया काही महिन्यांपूर्वी बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. बुमराहला या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पाठीला दुखापत झाली. बुमराहला या दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर बुमराहवर आवश्यक ते उपचार करण्यात आले. तसेच चाचणीही करण्यात आली. बुमराह त्यानंतर परतला. मात्र त्याला दुखापतीमुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आली नव्हती.

टीम इंडिया मायदेशात परतल्यानंतर बुमराहच्या दुखापतीची अपडेट घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी बुमराहचे रिपोर्ट काढण्यात आले. त्यानुसार मंगळवारी 11 फेब्रुवारीला बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार की नाही? हे निश्चित होणार होतं. बुमराह फिट झालेला असावा, तो चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळावा, अशी अनेक क्रिकेट चाहते प्रार्थना करत होते. मात्र शेवटी बुमराहला दुखापतीमुळे खेळता येणार नाही, असं बीसीसीआयने 11 फेब्रुवारीला रात्री 11 वाजून 27 मिनिटांनी जाहीर केलं.

हर्षित राणाचा समावेश

दरम्यान जसप्रीत बुमराह याच्या जागी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात हर्षित राणा या युवा गोलंदाजाचा समावेश करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. हर्षित राणा याची इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बुमराहचा बॅकअप म्हणूनही समावेश करण्यात आलाय. बुमराह इंग्लंडविरुद्ध पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यांत खेळू शकणार नाही, असं निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. मात्र त्यानंतर बुमराह संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला. त्यामुळे हर्षितला पदार्पणाची संधी मिळाली.

बुमराह बाहेर झाल्याने त्याच्या जागी शार्दूल ठाकुर किंवा मोहम्मद सिराज या दोघांपैकी एकाला संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या जवळचा असल्याने हर्षितला संधी मिळाली, असंही नेटकरी सोशल मीडियावर म्हणत आहेत.

भारतीय संघाचं चॅम्पियन्स ट्रॉफीतील वेळापत्रक

इंडिया विरुद्ध बांगलादेश, 20 फेब्रुवारी, दुबई

इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 23 फेब्रुवारी, दुबई

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 2 मार्च, दुबई

सेमी फायनल-1, 4 मार्च, दुबई

सेमी फायनल-2, 5 मार्च, लाहोर

फायनल, 9 मार्च, लाहोर, टीम इंडिया पोहचल्यास दुबई

10 मार्च, (अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस)

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.

भारतातील ‘या’ दिग्गज कंपनीनं उचललं मोठं पाऊल, 700 कर्मचाऱ्यांना झटक्यात दिला नारळ

0

अलिकडच्या काळात अनेक IT कंपन्यांमध्ये नोकरकपात केली जात आहे. याचा मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. अशातच आता Infosys या भारतातील IT क्षेत्रातील कंपनीनं देखील मोठा निर्णय घेतला आहे. या कंपनीच्या म्हैसूर कॅम्पसमधून सुमारे 700 फ्रेशर्सना कंपनीने काढून टाकले आहे. आयटी कर्मचारी युनियन नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (नाईट्स) यांनी युक्तिवाद केला की या फ्रेशर्सना कंपनीत रुजू झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच काढून टाकले आहे.

अवघ्या सहा महिन्यात सोडली कंपनी

पदवीनंतर दोन वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा आणि शेवटी सप्टेंबर 2024 मध्ये इन्फोसिससोबत काम करण्याची संधी मिळली. पण केवळ सहा महिन्यांत ती नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुळं हा कंपनीत काम करत असलेल्या फ्रेशर्ससाठी मोठा धक्का आहे. हे धक्कादायक आणि अनैतिक असल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली आहे. इन्फोसिसने काही महिन्यांपूर्वीच सुमारे 700 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अखेर आज हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान याच मुद्द्यावर NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी कामगार मंत्र्यांना पत्र लिहून तीन मागण्या केल्या आहेत.

• औद्योगिक विवाद कायदा, 1947 चे उल्लंघन केल्यामुळे, इन्फोसिसवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी आणि प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात यावी.

• कायदेशीर तपास पूर्ण होईपर्यंत पुढील टाळेबंदी रोखण्यात यावी.

• काढून टाकलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना भरपाईसह पुन्हा कामावर घेण्याची मागणी.

NITES ने इन्फोसिसवर आरोप

NITES ने आरोप केला आहे की कंपनीने टर्मिनेशन प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांना धमकवण्यासाठी बाउन्सर आणि सुरक्षा रक्षक देखील तैनात केले आहेत. याबाबत सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ट्वीटरवर एकाने आपला राग व्यक्त केला, हे धक्कादायक आहे. इन्फोसिसकडून त्यांची ऑफर लेटर मिळाल्यानंतर, या फ्रेशर्सनी 2 ते 2.5 वर्षे वाट पाहिली आणि शेवटी सप्टेंबर 2024 मध्ये कंपनीत रुजू झाले. होते. आता अवघ्या सहा महिन्यांनंतर यातील 700 लोकांना कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे.

टेक कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरूच आहे. 2024 मध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते. इंटेल, टेस्ला, मायक्रोसॉफ्टसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी मिळून जवळपास एक लाख 49 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. टेस्ला ते इंटेल आणि सिस्को ते मायक्रोसॉफ्टपर्यंत, अनेक कंपन्यांनी पैशांची बचत करण्यासाठी, त्यांच्या व्यवसायांची पुनर्रचना करण्यासाठी, बदलत्या बाजाराच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या कामगारांची संख्या कमी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार…गुगली अन् जावई; एकनाथ शिंदेची दिल्लीत जोरदार फटकेबाजी

0

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना देण्यात आला. या कार्यक्रमामुळे एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकाच मंचावर पाहायला मिळाले. या कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदेंनी जबरदस्त भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी शरद पवारांच्या गुगलीबद्दल विधान केले.

यंदा दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. त्या निमित्ताने सरहद संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदेंचाही सन्मान करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदेंनी केलेल्या भाषणात शरद पवारांबद्दल स्तुतीसुमन उधळली.

“शरद पवार सदाशिव शिंदेंचे जावई”

“हा पुरस्कार ज्यांच्या नावे आहे ते आहेत महापराक्रमी महादजी शिंदे आणि मी आहे कार्यकर्ता एकनाथ शिंदे. इथे पुरस्कार देताना उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे. ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरीसुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“आजवर मला कधी गुगली टाकली नाही”

“सदाशिव शिंदे हे भारताचे प्रसिद्ध स्पीन बॉलर होते. त्यांची गुगली भल्याभल्यांना कळत नसे. कधी क्लीन बोल्ड होईल ते कळायचे नाही. शरद पवारांचीही राजकारणातील गुगली अनेकांना कळत नाही. कधीकधी बाजूला बसलेल्यांची किंवा बसवल्यांची गुगली ते घेतात. माझे आणि शरद पवारांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहे. त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही. यापुढेही टाकणार नाहीत”, असा विश्वास आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती”

“विचारधारा वेगळी असली तरी वैयक्तिक संबंध सगळ्यांनी टिकवायचे असतात. माझ्यावर कितीही आरोप झाले तरी मी आरोपांना कामातून उत्तर दिले. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून काम केलं. काश्मीर मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या तलवारीच टोक पाकिस्तानकडे होत तेव्हा मी म्हणालो होतो पाकिस्तान वाकड्या नजरेने आपल्याकडे पाहणार नाही. आज बाळासाहेब आणि दिघे साहेब असते तर त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती”, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

हा पुरस्कार मी माझ्या मनाच्या कोपऱ्यात ठेवेल. महाराष्ट्राची सेवा मी मनापासून करत राहील. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी रत्न झाली त्यामुळं आपण मराठी आहोत हे अभिमानाने सांगू शकतो. महादजी शिंदे नसते तर इंग्रज ५० वर्ष आधी आपल्याकडे आले असते. म्हणजे २०० वर्ष आपल्याला इंग्रजांची गुलामगिरी पत्करावी लागली असती. इंग्रजांनी त्यांना ग्रेट मराठा ही पदवी बहाल केली होती, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

‘ते’ CCTV फुटेज समोर येताच धनंजय देशमुख संतापले, पहिल्या दिवसापासून बोलत आहोत की, नेमका काय तपास आमच्या समोर मांडा

0

‘पत्रकारांना सीसीटीव्ही फुटेज सापडतात मात्र, पोलीस यंत्रणांना सीसीटीव्ही फुटेज का सापडत नाहीत? वेळीच सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असते तर माहिती मिळाली असती. कृष्णा आंधळे अद्यापपर्यंत मोकाट आहे. तोच कृष्णा आंधळे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पळताना दिसत आहे.’ असं म्हणत धनंजय देशमुख यांनी या सगळ्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. ‘माझ्या भावाची हत्या करून फरार झालेले आरोपी मोकाट आहेत. कृष्णा आंधळे हा अद्यापपर्यंत पोलिसांना सापडू शकले नाहीत हे दुर्दैव आहे.’ असंही धनंजय देशमुख यावेळी म्हणाले.

नेमकं काय म्हणाले धनंजय देशमुख?

‘आतापर्यंत पाच-सहा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलिसांनी वेळेत सीसीटीव्ही घेतले असते तर कदाचित माहीत झाले असते आरोपी कुठे पळून गेले आहेत. आम्ही पहिल्या दिवसापासून बोलत आहोत की, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलीस नेमका काय तपास करत आहेत हे आमच्या समोर मांडा. खरंतर सीसीटीव्ही शोधून पोलीस यंत्रणेने पत्रकारांना सीसीटीव्ही फुटेज द्यायला हवे होते. मात्र, पत्रकारच हे सीसीटीव्ही फुटेज पोलिस यंत्रणेकडे देत आहेत.’

‘सीआयडी आणि एसआयटी यांचा तपास चांगला सुरू आहे. मात्र, पहिल्या दिवसाचा तपास कोणत्या पद्धतीने गेला यात शंका आहे. आरोपी पोलिसांसमोर पळून जात असतील तर ते कोण शोधणार? पळून जाताना कृष्णा आंधळे देखील दिसत आहे. पण हे सोडून आंदोलन कसे मोडीत काढायचे यावर प्रशासनाने भर दिला.’

‘मोबाइलचे कॉल डिटेल्स काढा.. कारण हे सर्व शंकेच्या भोवऱ्यात आहे. त्यामुळे आम्ही सुरुवातीचा तपास पुन्हा री-इन्वेस्टीगेशन करण्याची मागणी करत आहोत. सुरुवातीच्या चार ते पाच दिवसात काय झालं? आज सर्व आरोपी आत असते, त्यांना शिक्षा झाली असती. केवळ त्याला मिळालेल्या अभयामुळे आरोपी मोकाट आहे.’ असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

पुण्यात GBSचा हाहाकार रूग्णसंख्या 197 वर नोंद 104 रूग्ण डिस्चार्ज; 50 आयसीयूत तर 20रूग्ण व्हेंटिलेटर

0

पुणे : पुण्यात जीबीएस म्हणजेच (Guillain barre Syndrome) गुईलेन बॅरे सिंड्रोमने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. जीबीएस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दिनांक ११ फेब्रुवारीला रुग्णांची संख्याही १९७ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा हा ७ वर पोहोचला आहे.

पुण्यात जानेवारी महिन्यात जीबीएसचा शिरकाव झाला. त्यानंतर दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. पहिल्या रुग्णांचा मृत्यू हा पुण्यातच झाला होता. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी संध्याकाळपर्यंत पुण्यातील जीबीएस रूग्णसंख्या 197 वर पोहोचली आहे. आजही 2 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत जीबीएस रोगाच्या साथीनं 7 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 3 मृत्यू हे संशयित कॅटेगरीत दाखवले आहे. या साथीदरम्यान 104 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून 50 रूग्ण आयसीयूत तर 20 रूग्ण अजूनही व्हेंटिलेटर आहेत.

सोलापूरमध्येही जीबीएसचा शिरकाव

दरम्यान,  पुण्याआधी सोलापूरमध्ये जीबीएसचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. कारण गेल्या मे महिन्यापासून सोलापूरचा 10 वर्षीय जीबीएस बाधीत मुलगा केईएमध्ये उपचार घेतोय.त्यामुळे पुण्याआधी सोलापूरमध्ये जीबीएसचा शिरकाव झाल्याची माहिती आहे.

केईएम रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठ महिन्यापासून रुग्णालयात दोन लहान मुलांवर उपचार सुरू आहेत. ही दोनही मुले सोलापूरची आहे. यातील दहा वर्षाच्या मुलाच्या कुटुंबियांनी सांगितले की, दहा वर्षाच्या मुलाला पाय दुखण्यापासून सुरूवात झाली. त्याला ताप किंवा इतर कोणतीही तक्रार नव्हती.

या मुलाची आई सांगते, आमच्या घरापासून शाळा 3 किलोमीटर अंतरावर आहे.चालल्याने पाय दुखत असतील म्हणून सूरूवातीला आम्ही दुर्लक्ष केले.पण महिनाभर पाय दुखत असल्याची तक्रार कायम असल्याची तक्रार कायम राहिल्याने आम्ही डॉक्टरांकडे गेलो. चाचण्यांमध्ये कमी प्लेटलेट्स आढळले. त्यानंतर तो इतका आजारी पडला की त्याला उठताही येत नव्हते. त्याच्या एमआयआर चाचणीत जीबीएसचे निदान झाले.

पुण्यातील ५५ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य! राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीतील निष्कर्ष

0

पुणे: पुण्यात नांदेडगाव परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा उद्रेक झाला आहे. या परिसरातील पाण्याचे नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यातील ५५ ठिकाणचे पाणी नमुने दूषित आढळले असून, ते पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, जीबीएसच्या रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, एकूण रुग्णसंख्या १८४ वर पोहोचली आहे.

आरोग्य विभागाने जीबीएसचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील पाण्याचे नमुने आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविले होते. नांदेडगाव परिसरात जीबीएसचा उद्रेक झाला असल्याने तेथील सर्वाधिक नमुने होते. या पाण्याच्या नमुन्यांची रासायनिक आणि जैविक तपासणी राज्य आरोग्य प्रयोगशाळेने केली. एकूण ४ हजार ७६१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ५५ पाणी नमुने दूषित आढळले असून, ते पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष प्रयोगशाळेने काढला आहे. पिण्यास अयोग्य आढळलेले सर्व नमुने नांदेड गाव परिसरातील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

राज्यात पुणे विभागात जीबीएसचे सर्वाधिक १७६ रुग्ण आहेत. त्यात पुणे महापालिका ३७, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेली गावे ८९, पिंपरी-चिंचवड महापालिका २६, पुणे ग्रामीण २४ आणि इतर जिल्ह्यांतील ८ रुग्ण आहेत. आतापर्यंत जीबीएसमुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या ४७ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यभरात ८९ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत.

महापालिकेकडून नांदेडगाव परिसरातील चिकनचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत. याचबरोबर अन्न औषध व प्रशासनाने नांदेड गाव परिसरातील हॉटेलमधून खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले आहेत. याचबरोबर रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागात आरोग्य विभागाकडून रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. पुणे महापालिकेने ४६ हजार ५३४ घरांचे सर्वेक्षण केले असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेने २४ हजार ८८३ आणि पुणे ग्रामीणने १३ हजार २९१ अशा एकूण ८४ हजार ७०८ घरांचे सर्वेक्षण केले आहे.

जीबीएस रुग्णसंख्या एकूण रुग्ण – १८४

अतिदक्षता विभागात दाखल – ४७

व्हेंटिलेटरवरील रुग्ण – २१

बरे झालेले रुग्ण – ८९

एकूण मृत्यू – ६

वयोगटनिहाय रुग्णसंख्या

वयोगट – रुग्ण

० ते ९ – २३

१० ते १९ – २१

२० ते २९ – ४२

३० ते ३९ – २३

४० ते ४९ – २६

५० ते ५९ – २६

६० ते ६९ – १६

७० ते ७९ – ३

८० ते ८९ – ४

एकूण – १८४

मंत्रिमंडळ बैठक पालक सचिव कामागिरी मुख्यमंत्री संतापले थेट सोडलं फर्मान; पालघर 2599 कोटी अन् बारामतीसाठी 438.48 कोटी मान्य

0

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षखेखाली पार पडली. आजच्या बैठकीला मंत्री धनंजय मुंडेंची अनुपस्थिति लक्षवेधी ठरली, कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्रिमंडळ बैठकीतच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. मात्र, डोळ्याचे ऑपरेशन झाल्यामुळेच आपण या बैठकीला उपस्थित नव्हतो, असे स्पष्टीकरण मंत्री मुंडेंच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आले आहे. तर, मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत पालक सचिवांना सूचना दिल्या आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरुन राजकीय वाद उफाळला होता, तो अद्यापही शांत झाला नाही. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन हा वाद आजही कायम आहे. त्यातच, पालक सचिवांच्या कामगिरीवर मुख्यमंत्र्‍यांनी मंत्रिमंडळात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यात पालकमंत्रीपदावरुन वाद सुरू असला तरी प्रत्येक जिल्ह्यात पालक सचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. या पालक सचिवांना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कामकाजाचा आढावा घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही काही पालक सचिव हे त्यांना नेमून देण्यात आलेल्या जिल्ह्यातदेखील गेले नाहीत. त्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज पालक सचिवांच्या कामगिरीमुळे मंत्रीमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त केली. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्यासोबत पालक सचिवांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, 11 पालक सचिव अद्यापही आपापल्या जिल्ह्यात गेले नसल्याने मुख्यमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री या विषयावरुन संतप्त झाले होते. तसेच, तत्काळ सर्व पालक सचिवांनी त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन बैठका घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्‍यांनी दिले आहेत. त्यामुळे, पुढील काही दिवसांत आता प्रत्येक जिल्ह्यात पालक सचिव जाऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतील.

मंत्रिंमडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

✅ देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्प, ता. विक्रमगड, जि. पालघरसाठी 2599.15 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली. प्रकल्पातून 69.42 दलघमी पाणीसाठा वसई-विरार महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवला जाईल.

✅ जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना ता. दौंड, बारामती आणि पुरंदर जि. पुणे योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रुपांतरण करण्याच्या कामासाठी विस्तार व सुधारणा अंतर्गत 438.48 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

– जनाईतून दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागात 8350 हेक्टरला सिंचन

– शिरसाईतून बारामती, पुरंदरच्या अवर्षण भागात 5730 हेक्टरला सिंचन

✅ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांत 2019 मध्ये दुरुस्ती करणार