Home Blog Page 197

पुणे दळणवळण गतिमान करण्यास येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग; १५२६ कोटी रुपये खर्च केले जाणार प्रथमच वेळेवर अर्थसंकल्प सादर

0

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बारावी सभा मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आज झाली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामध्ये एकूण १२ विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात २०२५-२६ च्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे. ४५९३ कोटी जमा आणि ४२९५ कोटी खर्च असा २९८ कोटी शिलकीच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. पर्यटन, तीर्थक्षेत्र, औद्योगिक परिसराला जोडणाऱ्या रस्ते विकासावर भर दिला जाणार असून त्यावर १५२६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पुण्याचे दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे.

मुंबई येथे झालेल्या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे पाटील, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, मुख्य लेखापाल पद्मश्री तळेकर आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्राधिकरणाच्या विविध विषयांवर चर्चा झाली व विषयांना मंजुरी दिली.

‘अर्बन ग्रोथ सेंटर’

प्रस्तावित नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यांसाठी ६३६.८४ कोटी रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी बैठकीत २०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.’अर्बन ग्रोथ सेंटर’ करीता रस्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी १५२६ कोटी रुपयांची तरतूद केली. पुणे शहर वळण मार्ग, पुणे सातारा आणि पुणे नगर रस्त्यापासून पुरंदर विमान तळाला चांगली ‘ कनेक्टिव्हिटी ‘ तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

इतिहासात प्रथमच वेळेवर अर्थसंकल्प सादर

पीएमआरडीएचे मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष आहेत. पीएमआरडीएची स्थापना झाल्यानंतर आजपर्यंत कधीही वेळेवर अर्थसंकल्प सादर झाला नाही. कारण मुख्यमंत्र्यांना पीएमआरडीसाठी वेळ मिळत नसल्याचे कारण सांगितले जात होते. मात्र, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडात प्रथमच वेळेवर अर्थसंकल्प सादर झाला आहे. त्यामधून ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होईल.

– डॉ योगेश म्हसे पाटील, आयुक्त, पीएमआरडीए

लग्नात घुसला बिबट्या, रेस्क्यु पथकाची रायफल तोंडाने ओढून पोलिसावर झडप; पाहुण्यानं छतावरून उडी मारली

0

एका लग्न सोहळ्यात रात्रीच्या वेळी अचानक एक बिबट्या घुसल्यानं गोंधळ उडाला. परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावऱण निर्माण झालंय. उत्तर प्रदेशातल्या लखनऊमध्ये ही घटना घडलीय. शहरातल्या बुद्धेश्वर एमएम लॉनमध्ये लग्न सोहळा सुरू होता. यावेळी पाहुणे जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धावत सुटले. बिबट्याने रेस्क्यू पथकातील एका कर्मचाऱ्यावर हल्ल्याचाही प्रयत्न केला. जवळपास ८ तास हे रेस्क्यु ऑपरेशन सुरू होतं

बिबट्या लग्न सोहळ्याच्या ठिकाणी घुसल्याचं समजताच जीवाच्या भीतीने सगळे इकडे-तिकडे धावायला लागले. एकाने छतावरूनच उडी मारली. यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. बिबट्या घुसल्याची माहिती समजताच डीएफओ डॉ. सीतांशु पांडे यांच्यासह वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल केली. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर बिबट्याला पकडण्यात आलं. बिबट्याला पकडेपर्यंत लग्न सोहळ्यातील सगळेच घाबरले होते.

घटनास्थळी पोलीस, वन विभागाची टीम आणि प्रशासकीय अधिकारी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला. त्यावेळी लोकांना शांत राहण्याचे आणि वन विभागाच्या टीमला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. बिबट्याच्या रेस्क्यु ऑपरेशनचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. यात पोलीस आणि वन विभागाची टीम पायऱ्यांवर बिबट्याला पाहते. तिथं पोलिसांवरही बिबट्यानं झडप घातली.

बंदुका घेऊन वनविभागाचे अधिकारी पायऱ्यांवरून वरती जात होते. तेव्हा वरच्या बाजूला बसलेल्या बिबट्याने अचानक एका कर्मचाऱ्यावर झडप घातली. बिबट्यानं कर्मचाऱ्याची बंदूक ओढली. शेवटी कसेबसे कर्मचारी पायऱ्यांवरून उतरून बाहेर आले.

व्हिडीओमध्ये दिसतं की बिबट्या एका वन कर्मचाऱ्यावर हल्ला करतो. त्याच्या हातातली रायफल ओढतो. यावेळी इतर कर्मचाऱ्यांपैकी कुणीतरी गोळीबार केल्यानं बिबट्या घाबरून मागे सरकतो. रेस्क्यु पथकातील एक जण म्हणतो की बिबट्याला गोळी लागलीय. जवळपास ८ तास रेस्क्यु ऑपरेशन सुरू होतं. गुरुवारी पहाटे चार वाजता बिबट्याला पकडण्यात आलं.

एकनाथ शिंदे सत्काराची राऊतांची शॉकेबल ‘तांडवलीला’ सुरू असतानाच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया…. ‘त्यांच्या चेहऱ्यावर एक’

0

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला असून ठाकरेंच्या बाजुने शिवसेना खासदार संजय राऊत बॅटींग करत आहेत. या फुटीनंतर संजय राऊत एकनाथ शिंदेंवर सातत्याने हल्लाबोल करताना दिसून येतात. त्यातच, राजधानी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा सत्कार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आला. महाविकास आघाडीचे जनक म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. मात्र, त्यांच्याचहस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार झाल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या जिव्हारी लागलं आहे. त्यामुळेच, संजय राऊतांनी या सत्कार सोहळ्यावर टीका करताना शरद पवारांना लक्ष्य केलं. शरद पवारांनी या सत्कार सोहळ्याला जायला नको होतं, असंच राऊत यांनी म्हटलं. आता, राऊत यांच्या टीकेवर शिवसेना शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया देताना, तू असंच जळत राहा म्हटले. तर, आता खासदार निलेश लंकेंच्या माध्यमातून शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

एबीपी माझाच्या झिरो अवर कार्यक्रमात निलेश लंकेंना प्रश्न विचारण्यात आला होता. संजय राऊत हे सध्या शरद पवारांबद्दल अत्यंत आदराने बोलतात. पण, एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्यानंतर संजय राऊतांनी केलेल्या टीकेमुळे प्रश्न निर्माण झाला आहे. संजय राऊत हे स्वत: बोलत आहेत की, त्यांच्या तोंडून दुसरं कोणी हे वदवून घेत आहेत? असा प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांना विचारण्यात आला होता. त्यावर, मी जेव्हा ही न्यूज पाहिली तेव्हा 6 जनपथ या पवारसाहेबांच्या निवासस्थानीच होतो. तेव्हा ही न्यूज पाहून आम्हीही शॉकेबल झालो. संजय राऊत यांच्याकडून असं वक्तव्य कसं गेलं, असा प्रश्न आम्हालाही पडल्याचे खासदार निलेश लंके यांनी म्हटलं. तसेच, संजय राऊतांनी टीका केल्यानंतर शरद पवारांनीही पहिली रिएक्शन काय दिली हेही लंकेंनी सांगितलं.

सत्कार सोहळ्यावर संजय राऊतांची टीका पाहून पवारसाहेब मिश्कीलपणे हसले. आम्ही 6 जनपथला होतो, पवारसाहेबांनी कुठली प्रतिक्रिया दिली नाही, पण ते मिश्कील हसले, त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मीतहास्य होतं, अशी माहिती निलेश लंके यांनी दिली. त्यामुळे, राऊतांच्या टीकेवर शरद पवारांनी हसून पहिली प्रतिक्रिया खासदार लंकेंच्या माध्यमातून दिल्याचं समोर आलं आहे.

एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले शरद पवार

ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचा मोठा वाटेकरी किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदे यांच्याकडे होती, हे याठिकाणी सांगायला हरकत नाही, असे म्हणत शरद पवारांनी सत्कार सोहळ्यात एकनाथ शिंदेचं कौतुक केलं. तसेच, महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसा जाईल? याप्रकारची काळजी त्यांनी घेतली. ठाणे, नवी मुंबई, मुंबई हा सगळा नागरी भाग आहे. अलीकडच्या ५० वर्षांमध्ये नागरी प्रश्नांसंबंधित जाण असलेला नेता कोण? याची जर माहिती घेतली तर कटाक्षाने एकनाथ शिंदे यांचं नाव घ्यावं लागेल. मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील. म्हणून एक योग्य दिशा देण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं. हे करत असताना कुठलाही पक्षीय अभिनिवेश न ठेवता विविध क्षेत्रातील लोकांशी सुसंवाद ठेऊन राज्य आणि विशेषत: हा नागरी परिसर त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होईल? यामध्ये लक्षकेंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं, याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहिल. त्यामुळे त्यांचा सन्मान होतोय, याचा मला मनापासून आनंद आहे. तो सन्मान कसा होतोय? शिंदे यांचा पुरस्कार! शिंदेंना शिंद्यांचा पुरस्कार! तो ही जावई असलेल्या शिंदेंच्या हातून.. आनंद आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड

0

नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला दारुण पराभव पत्कारावा लागला. राज्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसने विधानसभेची निवडणूक लढवली, पण केवळ 16 जागांवर विजय मिळवण्यात काँग्रेसला यश आले. त्यामुळे, राज्यातील काँग्रेस नेतृत्व बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यातच, नाना पटोले यांनीही आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, नाना पटोले यांनी मंगळवारी दिल्लीवारीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर लवकरच राज्यात काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे, आता महाराष्ट्रात काँग्रेसची कमान कोणाकडे जाणार, काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता लागली असून राज्यातून 4 नावे पुढे येत आहेत. त्यामध्ये, एक नाव मराठवाड्यातील असून दुसरं नाव विदर्भातील आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. मात्र, काँग्रेसचे निष्ठावान आणि आदिवासींसाठी काम करणारे नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दिल्ली दौऱ्यानंतर नाना पटोले यांनी पुढील आठवड्यातच काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचे म्हटले होते. काँग्रेसला राज्यात आता नवा कॅप्टन मिळणार असून याच आठवड्यात नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी या संदर्भात बोलणं झालं असून प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा याच आठवड्यात सुटेल, असा विश्वास नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता. त्यानुसार, आता दिल्लीत महाराष्ट्राच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. त्यामध्ये, कोल्हापुरातील नेते व माजी मंत्री सतेज बंटी पाटील, लातूरमधील नेते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नावाची चर्चा होत आहे. तर, माजी मंत्री व युथ काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या आमदार विश्वजीत कदम यांचेही नाव आघाडीवर आहे. मात्र, या तीन नावांसह सरप्राईजींग नाव म्हणजे बुलढाण्यातील काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राज्यातील काँग्रेसची धुरा देऊन विदर्भातील नेतृत्व देण्याचा प्रयत्नही काँग्रेसच्या विचाराधीन आहे.

नाना पटोले यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी कोल्हापुरात पाटील तर लातुरातून देशमुख यांच्यात स्पर्धा पाहायला मिळत आहे. तसेच, विश्वजीत कदम यांचेही नाव समोर येत आहे. त्यामुळे, मराठवाडा आणि पश्चिम महारष्ट्रातील नेत्यांपैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते की, विदर्भातील हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेसकडून संधी मिळते, हे लवकरच स्पष्ट होईल.

कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?

हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांचही नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी बुलढाण्यातील काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि गांधी घराण्याशी जवळीक असल्याने तेही रेसमध्ये आहेत. काँग्रेसच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमात ते नेहमीच सक्रिय सहभागी राहिले आहेत. सन 2014 ते 19 या काळात बुलढाणा विधानसभेच प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. तर, सध्या राजीव गांधी पंचायत राज संघटनचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात आदिवासी बांधवांसाठी जिवनोत्थान कार्यक्रम सक्रियतेने राबवून आदिवासी बांधवांमध्ये “गळ्यातील ताईत” म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे, विदर्भातील नेत्याला राज्याचे नेतृत्व देऊन काँग्रेसकडून राजकीय डाव टाकला जाऊ शकतो.

परळीच्या फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना बजावली कारणे दाखवा नोटीस

0

छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाइन तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याबाबत २४ फेब्रुवारी २०२५ रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी म्हटले आहे.

मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि ३ मुली तसेच करुणा मुंडे यांच्या २ मुलांचा उल्लेख केला होता. मात्र, करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता.

नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर; हर्षवर्धन सपकाळ होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

0

नवी दिल्ली – विधानसभेतील पराभवानंतर आता काँग्रेसकडून महाराष्ट्रातील संघटनेत बदल करण्यात येत आहे. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष केले जाऊ शकते. सपकाळ हे सचिन राव व मीनाक्षी नटराजन यांच्या जवळचे मानले जातात.

काँग्रेस नेतृत्वाला असे सूचित करण्यात आले की, ज्या नेत्याचा कोणताही व्यवसाय नाही अशा नेत्याला प्रदेशाध्यक्ष करावे. तिसऱ्यांदा आमदार झालेले विश्वजित कदम यांना काँग्रेस नेतृत्व विधिमंडळ पक्षाचे नेते बनविण्यावर विचार करत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाना पटोले यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

राजकीय कारकीर्द अशी…

  • हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
  • महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्रामस्वराज्य निर्मितीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
  • सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिरांचे आयोजन,
  • ग्रामस्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीतील सक्रिय सहभाग असा व्यापक अनुभव आहे.
  • २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी ‘जलवर्धन’ हा जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे राबवून त्याची उपयुक्तता सिद्ध केली.

कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ?

हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांचही नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी बुलढाण्यातील काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि गांधी घराण्याशी जवळीक असल्याने तेही रेसमध्ये आहेत. काँग्रेसच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमात ते नेहमीच सक्रिय सहभागी राहिले आहेत. सन 2014 ते 19 या काळात बुलढाणा विधानसभेच प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. तर, सध्या राजीव गांधी पंचायत राज संघटनचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात आदिवासी बांधवांसाठी जिवनोत्थान कार्यक्रम सक्रियतेने राबवून आदिवासी बांधवांमध्ये “गळ्यातील ताईत” म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे, विदर्भातील नेत्याला राज्याचे नेतृत्व देऊन काँग्रेसकडून राजकीय डाव टाकला जाऊ शकतो.

सुदर्शन घुलेची पुन्हा पोलिस कोठडी; कारण काय? तपास यंत्रणेला ‘हा’ संशय? अनेकजण अडकण्याची शक्यता

0

संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला केज कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सीआयडीने त्याच्या पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, परंतु कोर्टाने तीन दिवस कोठडी सुनावली. संतोष देशमुख खून प्रकरणात सुदर्शन घुले हा न्यायालयीन कोठडीत होता. यापूर्वीही एसआयटीने त्याची पोलिस कोठडी घेतली होती. त्याच्या दोन मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यासाठी आणि मोबाईल लॉक काढण्यासाठी त्याची कोठडी घेण्यात आलेली होती. त्यानंतर तो पुन्हा न्यायालयीन कोठडीत गेला होता. आता पुन्हा १४ फेुब्रुवारीपर्यंत सुदर्शन सीआयडीच्या कोठडीत असेल.

याअगोदर सुदर्शन घुलेची चौकशी ही खून प्रकरणात झाली होती. परंतु आता खंडणी प्रकरणामध्ये सुदर्शन घुलेची चौकशी होणार आहे. त्याच्या मोबाईलमधील डेटा आणि कॉल डिटेल्स व्हेरिफाय करण्यासाठी त्याचं व्हाईस सॅम्पल घेण्यात येणार आहे.

सुदर्शन घुलेवर खंडणी, अपहरण, खून हे तीन गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात वापरलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून तो फरार झाला होता. तसाच तो वाशीला गेला आणि तिथे गाडी सोडून साथीदारांसह पळून गेला. तिथून छत्रपती संभाजी नगर, गुजरात, पुणे असा काही आरोपींनी प्रवास केला. यादरम्यान ते कुणाकुणाशी बोलले, याचा तपास पोलिसांना करायचा आहे. ते सगळे लोक अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सुदर्शन घुलेचं व्हाईस सॅम्पल सीआयडीला हवं आहे.

बुधवारी केजच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी झाली. जे. बी. शिंदे हे सरकारी वकील होते तर अनंत तिडके यांनी आरोपींची बाजू मांडली. खंडणी प्रकरणातल्या तपासामध्ये आणखी नावं पुढे येण्याची शक्यता वर्तवली जातेय. २९ नोव्हेंबर रोजी केज येथील विष्णू चाटे याच्या कार्यालयाबाहेरील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं होतं. त्यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याची सगळी गँग एकत्रित दिसली होती. त्याच दिवशी आवादा कंपनीच्या सुपरवायझरला खंडणी मागण्यात आलेली होती.

लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी.”

0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत राहिली. महिलांना दरमहा १५०० रुपये देणारी ही योजना आहे. ही योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.तसंच या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर किती भार पडला आहे हेदेखील स्पष्ट केलं. तसंच ज्या अपात्र महिलांनी निधी घेतला आहे त्याबाबतही महत्त्वाचं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर ४० ते ४५ हजार कोटींचा भार बजेटवर आल्याने फिस्कल स्पेस कमी झाली आहे. मात्र लाडकी बहीण योजना बंद करणार, ही योजना बंद करणार, ती योजना बंद करणार आम्ही कुठलीही योजना बंद केलेली नाही. ज्या योजना सुरु आहेत त्या चालवणारच आहोत. मी हेदेखील अधिकाऱ्यांना सांगितलं की रिव्हर्स गणित मांडा की आपली प्रगती करण्यासाठी किती गुंतवणूक करायची आहे? किती करु शकतो? २५ हजार कोटींचा फरक पडत असेल तर ते आपण केंद्राकडून विविध योजनांमधून आणता येईल का? याचा विचार आम्ही करतो आहोत. इतर कुठल्या योजनांच्या माध्यमांतून निधी उभा राहिल हे आम्ही पाहतो आहोत. महसुली तूट वाढते आहे म्हणून भांडवली खर्च कमी करायचा या ट्रॅपमध्ये आम्हाला जायचं नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“ज्या अपात्र बहिणींनी निधी घेतला आहे…” काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन थाळी आणि शिवभोजन थाळी या योजनाही बंद करण्याचं कारण नाही. अनेकदा बातम्या आल्यावर आम्हाला कळतं की असा काही निर्णय आम्ही घेणार आहोत. परवाच गयेला ट्रेन्स गेल्या, अयोध्येला ट्रेन्स गेल्या. कुठलीही योजना आम्ही बंद करणार नाही. या योजनांच्या संदर्भात आम्ही आढावा घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र बहिणींनी लाभ घेतला आहे. साधारणतः १० लाख ते १५ लाख एवढी ही संख्या जाऊ शकते. त्यातल्या अनेक बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं सोडणं सुरु केलं आहे. आम्ही ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना आम्ही यापुढे योजनेचा लाभ देणार नाही. कारण आम्ही यासाठी कॅगला उत्तरदायी आहोत. कारण कॅगकडून विचारणा झाल्यानंतर आम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागतं. अशा प्रकारे यापुढे घडू नये म्हणून अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही. मात्र आत्तापर्यंत जो निधी त्यांना मिळाला आहे तो आम्ही परत मागणार नाही. तो निधी त्यांच्याकडेच राहिल. मात्र पात्र महिलांनाच पैसे गेले पाहिजेत यासाठी आम्ही आग्रही आहोत. असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मंत्रालयात काहींना दलालीची सवय लागली आहे-फडणवीस

मंत्रालयात काही लोक पर्मनंट पीए आहेत. काही लोक चांगलेही आहेत. काही लोकांना पीएचं काम करताना दलालीची सवय लागली. त्यामुळे अशा दलालांना बाजूला केलं पाहिजे म्हणून मी सांगितलं की आम्ही सगळी पडताळणी करु आणि त्यानंतर त्या संदर्भातली मान्यता देऊ असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसंच मी अधिकाऱ्यांना १०० दिवसांचा कार्यक्रम दिला आहे. सरकारी कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असली पाहिजे. तसंच अधिकारी कुठल्या वेळेस उपलब्ध असतील ? हे देखील समजलं पाहिजे, अशा सात गोष्टी मी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच सकाळ वृत्त समूहाच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांची मुलाखत पार पडली. या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलं आहे.

आतापर्यंतच्या परिस्थितीत गुन्हाचा प्रकार नाही पुणे पोलिसांचे अभय तरी सोलापूरकरांच्या अडचणीत वाढच? ही नोटीस पुढील कारवाई होणार?

0

पुणे : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले, ज्यानंतर मोठा गदारोळ झाल्याचे बघायला मिळाले. अनेकांनी राहुल सोलापूरकर यांच्यावर जोरदार टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी तर थेट म्हटले की, मी या राहुल सोलापूरकरला झोडणार आहे. आक्षेपार्ह विधानानंतर राहुल सोलापूरकरच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीये. आक्षेपार्ह विधानानंतर राहुल सोलापूरकर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत माफी देखील मागितली.

राहुल सोलापूरकरांच्या अडचणीत होणार वाढ

आता याप्रकरणात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून दखल घेण्यात आलीये. बाबासाहेबांच्या ब्राम्हण असण्याबाबतचे संदर्भ, पुरावे आयोगापुढे सादर करावे. अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आयोगाने म्हटले आहे. यामुळेच आता अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचेही बघायला मिळतंय.

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठे विधान

या प्रकरणाबद्दल बोलताना पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले की, या प्रकरणाचे काही अर्ज आम्हाला मिळाले आहेत. त्याविषयावर माहिती घेण्यात आली आहे. ते व्हिडीओ जुने आहेत. त्यावर खुलासा देखील त्यांनी दिला आहे. आतापर्यंतच्या परिस्थितीमध्ये तो गुन्हाचा प्रकार दिसून येत नाही. आम्ही त्यांचे सर्व व्हिडीओ आणि खुलाश्याचे व्हिडीओ बघत आहोत, असे त्यांनी म्हटले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान

राहुल सोलापूरकर यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर लोक चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सरकारला टार्गेट केले गेले. हे सरकार आले की महापुरूषांचे अपमान केले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. राहुल सोलापूरकरला धडा शिकवणार असल्याचे म्हणतानाही जितेंद्र आव्हाड हे दिसले होते.

“राज्यात मदरसे अतिरेक्यांचे अड्डे” बेकायदेशीरपणे सर्वकाही सुरु होतं..” मंत्री नितेश राणेंची खळबळजनक माहिती

0

“मदरसा शिक्षण संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे? तालिबान जे काही मोठं झालं, ते मोठं करणारे या मदरशांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना? हा प्रश्न मला उपस्थित करायचा आहे. या मदरसाच्या निमित्ताने मी सरकारकडूनही पाठपुरावा करणार आहे की या मदरशांमध्ये नेमकं काय होतं? याचीही चौकशी करण्याचा पाठपुरावा मी स्वत: सरकारकडे करणार आहे. हे मदरसे शिक्षण देण्यासाठी आहेत की अतिरेक्यांना दूध पाजण्यासाठी आहेत? हे मदरसे अतिरेक्यांचे अड्डे तर झाले नाहीत ना? त्यांच्यामध्ये अतिरेक्यांना मोठं केलं जातं. त्यांना खतपाणी टाकलं जातं. देशविरोधी कामं करण्यासाठी या मदरशांचा वापर केला जातो. म्हणून राज्य सरकारकडून राज्यात असलेल्या सर्व मदरशांची सखोल चौकशी व्हावी. आतमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात यावं. मुलांच्या शिक्षणाच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या मदरशांमध्ये अतिरेक्यांना पोसण्याचं काम होत असेल, तर असे मदरसे आम्हाला कशाला पाहिजेत? यमनचा नागरिक मदरशांमध्ये सापडणं म्हणजे किती मोठा धोका आहे?”, असे सवाल उपस्थित करत मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत मदरसा संस्थांवर हल्लाबोल केला आहे.

नितेश राणे पुढे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करेन. त्यांनी फार महत्त्वाची आणि मोठी कारवाई अक्कलकुवा, नंदूरबारमध्ये 10 फेब्रुवारी 2025 ला केलेली आहे. नंदूरबारमध्ये एक मदरसा आहे. त्या मदरशामध्ये फार मोठी कारवाई झाली. त्याच्यामध्ये यमनचा नागरिक सापडला. यमनचा एक शिक्षक सापडला. ही मदरसा बेकायदेशीर पद्धतीने सुरु आहे. यामध्ये पोलिसांनी फार मोठी कारवाई केली. या कारवाईत मदरसा चालवणाऱ्या सर्व लोकांना अटक होत आहे. एक मुलगा फरार आहे, त्यालाही पकडण्याचं काम पोलीस करत आहेत. मदरसे बेकायदेशीर पद्घतीने सुरु आहेत. राष्ट्रविरोधी कारवाया या मदरशामध्ये सुरु होत्या. त्याबाबतीत मुख्यमंत्री फडणवीस आणि पोलीस खातं सखोल चौकशी करत आहेत.

“या मदरसामध्ये बेकायदेशीरपणे सर्वकाही सुरु होतं. काही वर्षांपूर्वी एक हिंदू शिक्षक या मदरशांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. तो आतमध्ये आला म्हणून त्याला चाकूने भोसकलं जातं. त्याच्यावर हल्ला केला जातो. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्रही दिलं आहे. मदरसामध्ये यमनचा अतिरेकी विचाराचा नागरिक सापडला आहे, विशालगडाजवळील मदरसामध्ये काही अतिरेकी राहून गेलेले आहेत. ज्याने देशविरोधात अतिरेकी कारवाया केल्या आहेत, तो ही त्या मदरशामध्ये सापडला होता. म्हणून मला राज्यामध्ये असलेल्या मदरशांवर प्रश्न उपस्थित करायचा आहे”, असंही नितेश राणे म्हणाले.