Home Blog Page 166

बावधन-कोथरूड सांस्कृतिक महोत्सव 2025 उत्साहात संपन्न

0

शनिवार दि. 1 मार्च आणि रविवार दि. 2 मार्च 2025 रोजी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, बावधन, एल. एम. डी. चौक, पुणे येथे आयोजित बावधन-कोथरूड सांस्कृतिक महोत्सव 2025 मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात संपन्न झाला. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा गौरव करणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले, तर समारोप मा. खासदार सौ. सुनेत्राताई अजितदादा पवार आणि पुणे महानगर संघचालक श्री. रविंद्रजी वंजारवाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना सांगितले की, “दिलीप वेडेपाटील हे केवळ नावापुरते लोकप्रतिनिधी नाहीत, तर खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे आणि समाजहितासाठी झटणारे नेतृत्व आहेत. त्यांनी बावधन-कोथरूड परिसराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत. पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सेवा, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी आवश्यक सुविधा यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली बावधन-कोथरूड सांस्कृतिक महोत्सव हा केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर कला, साहित्य, संगीत आणि विचारांना चालना देणारा एक भव्य उपक्रम ठरला आहे. त्यांनी नवोदित कलाकारांना संधी दिली, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला आणि या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक बळ दिले. दिलीप वेडेपाटील यांच्या समाजकार्याची हीच ऊर्जा पुढेही कायम राहो आणि ते यापुढेही जनसेवेसाठी कार्यरत राहोत, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!

बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार प्रदान

महोत्सवात ‘बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ना. चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सौ. सुनेत्राताई अजितदादा पवार, सरसंघचालक रवींद्रजी वंजारवाडकर, खासदार मेधाताई कुलकर्णी, तसेच मा. नगरसेविका सौ. मोनिकाताई मुरलीधर अण्णा मोहळ यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यामध्ये –

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर

सुप्रसिद्ध सिनेअभिनेते प्रवीण तरडे

तालयोगी तबलावादक पं. सुरेश तळवलकर

महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहळ

ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे

पुरस्कार स्वीकारताना भाऊ तोरसेकर आणि प्रवीण तरडे यांनी महोत्सवाच्या भव्य आयोजनाचे विशेष कौतुक केले.

भाऊ तोरसेकर यांचे मनोगत

“हा पुरस्कार केवळ माझ्या वैयक्तिक कार्याचा नव्हे, तर सत्य पत्रकारितेचा आणि निर्भीड विचार मांडणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचा सन्मान आहे. पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून, समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडण्याची जबाबदारी आहे. मी आजवर ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यातही करत राहीन. बावधन-कोथरूड सांस्कृतिक महोत्सव हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, तो कलेला, साहित्याला, क्रीडेला आणि विचारांना चालना देणारा मंच आहे. अशा उपक्रमांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला अधिक बळ मिळते. आयोजक दिलीप वेडेपाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हा महोत्सव भविष्यात अधिक भव्य होवो, हीच शुभेच्छा!”

प्रवीण तरडे यांचे गौरवोद्गार

*”बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार मिळाल्याचा मला अत्यंत अभिमान वाटतो. हा पुरस्कार केवळ माझ्या चित्रपटांमधून महाराष्ट्राच्या मातीतून येणाऱ्या संघर्षाचे आणि संस्कृतीचे दर्शन घडवण्याच्या प्रयत्नांचा सन्मान आहे. मी नेहमीच समाजातील खऱ्या नायकांची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे, आणि आज अशा प्रतिष्ठित मंचावर माझा सन्मान होत असल्याने माझ्या जबाबदारीची जाणीव आणखी वाढली आहे.

हा महोत्सव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि सांस्कृतिक वारशाचे एक मोठे व्यासपीठ आहे. अशा उपक्रमांमुळे आपली कला आणि संस्कृती पुढे जाते, आणि याचे संपूर्ण श्रेय दिलीप वेडेपाटील यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला जाते. त्यांनी हा महोत्सव इतक्या भव्य प्रमाणावर आयोजित करून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान केला, याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन आणि आभार. महाराष्ट्राच्या संस्कृतीला उन्नत करणाऱ्या या महोत्सवाला भविष्यात आणखी मोठे यश मिळो, हीच मा

झ्या मनःपूर्वक शुभेच्छा!”*महोत्सवात मधुवंती बोरगावकर, जसराज जोशी, जयदीप वैध, विदूषी शिल्पा पुणतांबेकर, सावणी दातार कुलकर्णी आणि पं. जसराज अभ्यंकर यांच्या सुरेल गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. तसेच, चर्चासत्रात संगीत, साहित्य आणि समाज यावर विचारमंथन करण्यात आले. संयोजक दिलीप वेडेपाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि सांगितले की, “हा महोत्सव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहे. कलेच्या आणि सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणणे, हेच या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे, हा महोत्सव यंदा पहिल्यांदाच आयोजित केला गेला असून, यापुढे दरवर्षी अधिक मोठ्या प्रमाणावर तो साजरा केला जाईल.”

महोत्सवाच्या आयोजनात चेलाराम हॉस्पिटल, आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज, सुराणा संघवी कन्स्ट्रक्शन्स, वाईस कंस्ट्रक्शन, न्याती कन्स्ट्रक्शन्स आणि के पुणे यांचा मोलाचा सहभाग होता. या भव्य सोहळ्याला भाजपा प्रदेश महामंत्री राजेशजी पांडे, खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार विक्रांत पाटील, आमदार शंकरभाऊ मांडेकर, तसेच ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधानसभेत कोणीतरी गुटखा खाऊन थुंकलं, विधानसभा अध्यक्षांचा संताप व्यक्त – मी ‘त्या’ आमदाराला पाहिलंय, आता.. केलं हे आवाहन 

0

लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषद या केवळ इमारती नाही तर ती लोकशाहीची मंदिरं आहेत. पण याच लोकशाहीच्या मंदिरात लाज आणणारे कृत्य समोर आले आहे. त्याचं झालं असं की, विधानसभेत गुटखा खाऊन एक आमदार तिथेच थुंकल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. दरम्यान, याबाबत विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांना माहिती मिळाली की, कोणीतरी सभागृहात गुटखा खाऊन थुंकलं आहे. जेव्हा विधानसभा अध्यक्ष घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना गुटखा खाऊन तिथे थुंकलेलं दिसून आलं. कोणीतरी विधानसभेत जमिनीवर आणि भिंतींवर देखील गुटखा खाऊन थुंकलेलं आढळून आलं.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ सफाई कर्मचाऱ्यांना बोलावून गुटखा खाऊन थुकंलेलं स्वच्छ करण्यास सांगितलं. यानंतर ते विधानसभेत पोहोचले. तिथे पोहचताच ते म्हणाले की,- ‘आज सकाळी मला कळले की कोणी तरी गुटखा खाऊन सभागृहातच थुकलं आहे. म्हणून मी आलो आणि ते स्वच्छ करून घेतलं. मी व्हिडिओमध्ये त्या सन्माननीय सदस्याला देखील पाहिले आहे. मला कोणत्याही व्यक्तीचा अपमान करायचा नाही. म्हणूनच मी त्याचे नाव घेत नाही.’

https://x.com/ANI/status/1896807637360243099?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1896807637360243099%7Ctwgr%5E3f4270c34e0dcc2c37b47650cdbaa370a85f5324%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.mumbaitak.in%2Fpolitical-news%2Fstory%2Fsomeone-spits-out-gutkha-after-eating-it-in-assembly-speaker-said-i-have-seen-that-mla-foul-strange-incident-in-uttar-pradesh-assembly-3164355-2025-03-05

‘ही विधानसभा सर्वांची आहे’

सतीश महाना पुढे म्हणाले, ‘आतापासून सर्व सदस्यांना माझी ही विनंती आहे. जर त्यांना त्यांचा कोणताही मित्र असे करताना दिसला तर त्यांनी त्याला तिथेच थांबवावे. मी काय म्हणतोय ते समजून घ्या… ही आपल्या सर्वांची विधानसभा आहे. ही केवळ अध्यक्षांची विधानसभा नाही. ही सर्व 403 सदस्यांची समान जबाबदारी आहे.’

‘ही उत्तर प्रदेशातील 25 कोटी लोकांची विधानसभा आहे. त्यामुळे ती स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ते करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. मी कोणाचेही नाव घेणार नाही. त्याने स्वतः येऊन आपली चूक मान्य करावी. जर तो स्वतःहून आला तर ठीक आहे, नाहीतर मी त्याला फोन करेन.’

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया

विधानसभेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जण याला यूपी मॉडेल म्हणत टोमणे मारत आहेत, तर काही जण लिहित आहेत – पुढच्या वेळी, तोच आमदार ते साफ करेल जो तिथे घाण करेल.

बीडमध्ये भाजप कार्यकर्त्याकडून बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल होताच मारहाण केल्याचे कबूल पण यामुळे हे कृत्य केला मोठा खुलासा

0

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला २०२४ ला निर्घृण हत्या करण्यात आली. बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला. बीडमधील गुन्हेगारीचे सत्र संपता संपत नसल्याचे चित्र समोर येत आहे. त्यातच आता बीडच्या शिरुर तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कुख्यात गुंड आणि भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले याने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली होती. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर येत होती. या प्रकरणानंतर अखेर सतीश भोसले यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सतीश भोसले यांनी नुकतंच बीडमधील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना घडलेल्या संपूर्ण प्रकरणाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केली. “त्या व्यक्तीने माझ्या मित्राच्या बायकोची छेड काढली, म्हणून मी मारहाण केली”, असे स्पष्टीकरण सतीश भोसले यांनी दिले.

“मी शांत बसणार नाही”

“मी मारहाण केली आहे. मी कबूल करतो. त्याचे कारण वेगळे आहे. मित्राच्या बायकोची त्यांनी छेड काढली म्हणून मी मारहाण केली आहे. मला पोलिसात जायला हवं होतं. मात्र ती वेळ नव्हती. मला राग आला होता, म्हणून मारहाण केली. कुठल्याही मुली आणि महिलांची छेड काढल्यावर मी शांत बसणार नाही. मला जे योग्य वाटलं ते मी केलं”, असे सतीश भोसले म्हणाले.

“मी पारधी समाजातील लहान कार्यकर्ता आहे. कोविड काळामध्ये माझं हे काम बघा. मी कुठलाही गुंड आणि दहशत करणारा नाही. माझ्याबद्दल चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. मी कुठलाही गुन्हेगार नाही. जी कारवाई होईल त्याला मी सामोरे जाईल”, असेही सतीश भोसलेंनी म्हटले.

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील अमानुष मारहाणीचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत एक पांढरा शर्ट परिधान केलेला व्यक्ती दिसत आहे. या व्यक्तीला एक जण बॅटने मारहाण करताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला काही व्यक्ती उभ्या असल्याचे दिसत आहेत. त्यादेखील त्याला मारहाण करताना दिसत आहे. त्या व्यक्तीला अत्यंत क्रूरपणे मारहाण केली जात आहे.

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मारहाणीचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात होते. यात सतीश भोसलेने बीड जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील एका गरीब व्यक्तीला मारहाण केली. या मारहाणीत संबंधित व्यक्तीचे सगळेच दात तुटले असल्याची माहिती समोर येत आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे पोलिसांसोबतच संबंध असल्याची सुद्धा माहिती समोर आली होती. यामुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता.

संतोष देशमुख क्रूर हत्या चौकशीचा पार्ट टू सुरु! सर्व आरोपींचा पर्दाफाश होईल; …या गोष्टी कोणामुळे घडल्या? ….पाठराखण कोण करत होतं? 

0

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी चार्जशीट दाखल केल्यानंतर आज त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एसआयटी अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी आता तपासाचा पार्ट टू सुरू झाला आहे. पार्ट टू मध्ये सगळ्यांचा पर्दाफाश होईल, असे ते म्हणाले. न्यायालय समितीचे काम लवकरात लवकर चालू करावं, अशी विनंती धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

“येत्या 27 तारखेला चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. आज आम्ही अनिल गुजर यांना भेटलो तपासाबाबत चर्चा झाली. स्पेशल केस म्हणून या तपासाकडे सगळ्यांनी पाहिल आहे. आता हे एक टप्पा झाला आहे. आता या तपासाचा पार्ट टू इथून पुढे चालू होईल. राहिलेल्या आरोपीला पकडायचं हे पोलीस यंत्रणेपुढे आवाहन असणार आहे. पार्ट टू मध्ये राहिलेले जे कोणी आहेत, ज्याच्या कुणामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या, कोण यांचा सगळ्याची पाठराखण करत होता, याची चौकशी होईल. जिल्ह्यातील खून प्रकरण, एवढे गुन्हे कशाच्या जीवावर केले आणि त्या गोष्टीला धरून गुन्हेगारी वाढवली. बीड जिल्ह्यात चुकीच्या गोष्टी करून राज्यात चुकीची ओळख निर्माण केली, त्याचा सगळा पर्दाफाश पार्ट टू मध्ये होईल”, असे धनंजय देशमुख म्हणाले.

“त्याच्यामध्ये काही पण होऊ शकतं. महत्त्वाचा पार्ट इथून पुढे आहे. उघड उघड यामध्ये आरोपी होते, व्हिडीओ आहेत, फोटो आहेत, सीसीटीव्ही आहेत आणि एक आरोपांची कडी जोडली आहे. पडद्यामागून कारनामे करण्याचे षडयंत्र, यांना जे कोणी अभय देत असेल. त्यामध्ये डिपार्टमेंटचे सुद्धा लोक असू शकतात. इतरही लोक असू शकतात, तो तपास लवकर चालू होणार आहे. चार्जशीटचे जे बुलेट पॉईंट काढले आहेत. 53 पानाचे ते मिळाले आहेत. मुख्य चार्जशीट मिळायची बाकी आहे”, असेही धनंजय देशमुख यांनी सांगितले.

“त्यांच्या विरोधात संतापाची लाट”

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत की न्यायालय चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यांनी लवकरात लवकर त्या मार्फत या जिल्ह्याची परिस्थिती अशी का झाली, त्याला कोणता व्यक्ती जबाबदार आहे, कोणती संस्था जबाबदार आहे याचा तपास लवकरात लवकर सुरू व्हावा”, असे धनंजय देशमुखांनी म्हटले.

“माझा न्यायाचा लढा आहे. कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना माझ्या भावाला संपवलं. स्वतःचा भाऊ, स्वतःचा मुलगा समजून या गोष्टी कधी कधी लक्ष दिलं नाही, पाठराखण केली जाते चुकीच्या माणसाचा समर्थन केलं जातं. असं बोटावर मोजण्या इतपत लोक आहेत. सगळे लोक न्यायाच्या भूमिकेत आहेत. जे अन्यायाच्या भूमिकेत चुकीला चूक म्हणणारे जे कोणी लोक नाहीत. त्यांच्या विरोधात संतापाची लाट आहे. आक्रोश आहे. त्या संदर्भात मी काही बोलणार नाही”, असे धनंजय देशमुख म्हणाले.

“मला त्याच्यावर काही बोलायचं नाही”

“येत्या 12 मार्चच्या आधी उज्ज्वल निकम साहेबांची भेट घेण्याचा आमचा मानस आहे. आम्ही त्यांना भेटू चार्जशीटबद्दल त्यांच्याकडून काही गोष्टी आहेत. ज्या दिवशी नामदेव शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली, म्हणून दुसऱ्या दिवशी लगेच मी भेट घेतली. आदल्या रात्री सगळं असत्य सांगितलं गेलं होतं. म्हणूनच पुढच्या दिवशी जे सत्य आहे ते मी सांगायला गेलो होतो. त्यांची जी चूक झाली होती ते म्हटले की अजानतेपणाने मी या गोष्टी बोललो होतो. जे आम्ही पुरावे दिले, ज्या गोष्टी वास्तव आहेत. त्या गोष्टीमुळे आज त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्याच्यावर ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या एकदम चुकीच्या होत्या. हे आज सिद्ध झालं आम्ही सांगितलेल्या गोष्टी खऱ्या होत्या हे पण सिद्ध झालं”, असे धनंजय देशमुख म्हणाले.

“पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आहे, त्यांनी कधी यायला पाहिजे होतं. कधी जायला पाहिजे होतं. हे सगळे मुख्यमंत्र्यांचे अधिकार होते. उपमुख्यमंत्र्यांचे अधिकार होते. त्यांनी प्रतिक्रिया आज दिली, त्यांनी अगोदर कधी दिली असती तर त्यांचा विचार केला असता, राजीनामा झाल्यानंतरची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही”, असे धनंजय देशमुखांनी म्हटले.

धक्कादायक सलग ४ वेळा भाजपाची आमदारकी तरी अनाधिकृत मस्जिदचे काम सुसाट; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या नशिबी हेलपाटेच

0

भाजपाची महाराष्ट्रातील सर्वात पक्की बांधणी असलेला ….पुणे लोकसभा मतदारसंघ! केंद्रीय एक मंत्रीपद आणि राज्यातील दोन(एक कॅबिनेट व एक राज्य) मंत्रिपदे अन् आणि केंद्रीय स्तरावर नव्याने सुरू झालेल्या ‘वक्फ बोर्ड मालकी हक्क’ समितीच्या सक्रिय सदस्य खासदार मेधा कुलकर्णी एवढं सगळं असतानाही पुणे शहराच्या पश्चिमद्वारावर असलेल्या खडकवासला मतदारसंघात सलग ४ वेळा भाजपचा स्थानिक आमदार निवडून येत असलेल्या मतदारसंघात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या नशिबीमात्र निगरगट्ट प्रशासनाच्या समोर हेलपाटेच येत आहेत. पुणे महापालिका आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त, पुणे सहाय्यक आयुक्त अशा विभिन्न ठिकाणी गेली 3 वर्षापासून या अनाधिकृत मस्जिद्दीवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करत असतानाही याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हे मोठे आश्चर्य आहे. विशेष म्हणजे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक होताच पुणे पोलिसांच्या QRT आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या बंदोबस्ताच्या गाड्या मात्र मस्जिद्दीचे संरक्षण करण्यासाठी रातोरात लागतात ही खूप मोठी आश्चर्याची गोष्ट आहे.

पुणे शहराचा विकास होताना पुण्याच्या पश्चिम भागात खडकवासला विधानसभा मतदारसंघातील असलेल्या वारजे माळवाडी याभागामध्ये लोकवस्तीचे स्थलांतर होण्यास सुरुवात झाली आणि !वारजे माळवाडीच्या सर्व डोंगरमाथ्यावरही (सदरील भाग बीडीपी आणि बांधकामास परवानगी नसलेला आहे) सर्वसामान्य नागरिकांचे छोटी-छोटी लोकवस्ती वाढण्यास सुरुवात झाली. सर्वसाधारणपणे पुणे प्रशासनाच्या वतीने कष्टकरी आणि अल्प उत्पादन धारक लोकवस्तीचा भाग म्हणून या भागात होणाऱ्या बांधकामांकडे काहीस दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर मात्र या भागात आत्ता धार्मिक एकीकरण करण्यासाठी अनधिकृत धार्मिक स्थळांचे काम सुरू असून याबाबत वेळीच विचार न केल्यास भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आज मितीला या भागामध्ये सुमारे दीड ते दोन लाख लोकांची लोकसंख्या असताना धार्मिक एकीकरण आणि धुर्वीकरण करण्याच्या हेतूने धार्मिक स्थळांची काम केली जात असून मुळात कोणतीही परवानगी न घेता धार्मिक स्थळांची निर्मिती करणे हे महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे परंतु याबाबत प्रशासनाच्या वतीने कोणताही ठोस निर्णय घेऊन कार्यवाही केली जात नाही.

खडकवासला मतदारसंघातील गोकूळनगर पठार, वारजे माळवाडी  स.नं.५७/२/१, गोकूळनगर पठार, वारजे माळवाडी, पुणे येथेही अशाच प्रकारचे विना परवानगी व अनाधिकृत सुरू असलेल्या धार्मिक स्थळाच्या बांधकाम असून रफीक शेख व मोहम्मद शेख यांच्यामार्गदर्शनात अनधिकृत धार्मिक स्थळांचे काम सुरू असल्याचा तक्रार अर्ज हिंदुत्ववादी संघटनांनी तीन वर्षांपूर्वी केला असून आजपर्यंत त्याचा पाठपुरावा करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या परिपत्रकानुसार कोणत्याही धार्मिक स्थळाच्या बांधकामाकरीता गृह विभागाचा ना हरकत दाखला व महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असते. परंतु सदर नियमांची पायमल्ली करत आजही राजरोसपणे या ठिकाणी संबंधित धार्मिक स्थळांचे काम जोमात सुरू आहे. पुणे महापालिका स्तरावर यावर कारवाई करण्याची अपेक्षा असताना फक्त ‘कागदी घोडे’ नाचवण्याचाच बांधकाम नियंत्रण विभागाला जास्त छंद असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

या धार्मिकस्थळांच्या ठिकाणी बहुसंखेने अनोळखी लोक येत असतात. पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत नमाजपठणाचे मोठ-मोठे आवाज येतात. धार्मिकस्थळाची जागा चारही बाजूंनी पॅक करून घेतली आहे. या भागात ९८ टक्के हिंदू लोकवस्ती असताना अशा धार्मिक स्थळाची गरज काय? एकत्र येणाऱ्या अनोळखी लोकांमध्ये बांग्लादेशी नागरीक असण्याची शक्यता जास्त आहे, महिलांमध्ये व स्थानिक नागरीकांमध्ये असुसरक्षिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली धर्मद्वेष शिकवला गेल्यास भविष्यात देशद्रोही कारवाया होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? अधिवेशन काळातच काँग्रेसचा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

0

राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद न मिळाल्याने नाराज विजय वडेट्टीवार महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. विधानपरिषदेच्या उमेदवारीसह कॅबिनेट मंत्रिपदाची अट विजय वडेट्टीवार यांनी घातली आहे. 11 ते 15 मार्च दरम्यान विजय वडेट्टीवार मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.

विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. त्यानंतर आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर देखील टांगती तलवार आहे. अशावेळी दोन पैकी एक मंत्रिपदाची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे .

राष्ट्रवादीत जाण्याची इच्छा नसलेल्या विजय वडेट्टीवारांचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेले आहेत. विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विजय वडेट्टीवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत 11 ते 15 मार्च या दरम्यान घडामोडी घडणार असल्याची दाट शक्यता आहे. ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात गेली 50 वर्षे काँग्रेससोबत असलेल्या खंद्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

या कार्यकर्त्यांसमोर विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, असे आता सूत्रांकडून समोर आले आहे. विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानपरिषदेची उमेदवारी आणि मंत्रिपद मागितले असल्याची माहिती मिळत आहे.

विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. पुन्हा ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून निवडून यावे लागेल. त्याऐवजी त्यांनी विधानपरिषदेच्या वाटेने विधिमंडळात जाण्याचे ठरवले असल्याचं कळतंय. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी याच महिन्यात पोटनिवडणूक होत आहे. तेव्हा विधानपरिषद व मंत्रिपद द्या, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केल्याचे समोर येत आहे.

मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची मुळीच इच्छा नसलेल्या ब्रह्मपुरी विधानसभेतील गौरव अशोक भैय्याजी, नगरपरिषद माजी गटनेते विलास विखार, माजी नगर परिषद उपाध्यक्ष डॉ. सतीश कावळे, पंचायत समितीचे माजी सभापती नामदेव लांजेवार, सुरेश दर्वे यांसह अनेकांनी मंगळवारी मुंबईत भाजपात प्रवेश केला आणि या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात खिंडार पडले.

पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्प समन्वयकांनी मिळवला कोट्यावधीचा निधी; भाजपमध्ये नाराजी

0

पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात राजकीय पदाधिकाऱ्यांसाठी किती निधी दिला याची उत्सुकता निर्माण झालेली असताना आता सत्ताधारी भाजपमधील नाराजी समोर आली आहे. माजी नगरसेवकांच्या प्रभागात कामांसाठी निधी मिळावा यासाठी ज्यांना समन्वयक म्हणून नेमले होते, त्यांनीच सर्वाधिक निधी स्वतःच्या भागात वळविल्याची चर्चा रंगली आहे. महापालिकेवर प्रशासक असल्याने आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी १२ हजार ६१८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी आयुक्तांनी माझ्याकडे ३० हजार कोटी रुपयांच्या कामाची मागणी राजकीय पदाधिकाऱ्यांकडून केली, पण ज्या मागण्या योग्य होत्या, त्यांचाच समावेश अर्थसंकल्पात केल्याचे स्पष्ट केले.

या अर्थसंकल्पात सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांना, आमदारांना निधी देण्यात आला आहे. तसेच विरोधीपक्षातील प्रमुख माजी नगरसेवकांच्याही पदरात निधी पडलेला आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांनी निधी मिळावा यासाठी दोन पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात आली होती. गेल्या पंचवर्षीकमध्ये या दोन पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत महत्त्वाची पदे भूषविली आहेत.

आयुक्तांकडून अर्थसंकल्प तयार करताना या दोन समन्वयकांकडे कामाच्या याद्या द्याव्यात अशी सूचना पक्षाच्या नेत्यांनी केली होती. त्यानुसार माजी नगरसेवकांनी याद्या दिल्या. या प्रत्येकाला ५ ते १० कोटीचा निधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात काही जणांनाच भरपूर निधी मिळाला आहेत, तर अनेकांना एक कोटीपेक्षा कमी निधी मिळाला आहे.

या समन्वयकापैकी एकाला सुमारे ३२ कोटी रुपये तर दुसऱ्याला २४ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. संघटनेतील एका प्रमुख पदाधिकाऱ्याच्या मतदारसंघात २० कोटी पेक्षा जास्त निधी दिला गेला आहे.

कोथरूड, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा आणि पर्वती मतदारसंघातील वजनदार माजी नगरसेवकांनी सुमारे १० कोटी रुपयांपर्यंत त्याच्या कामांचा अर्थसंकल्पात समावेश करून घेतला आहे. पण ज्या नगरसेवकांनी समन्वयकांकडे याद्या दिल्या, त्यानंतर ते पाठपुराव्यात कमी पडले अशांना खूप कमी निधी मिळाला आहे, अशी माहिती भाजपच्या माजी नगरसेवकांनी दिली.

सर्व पाणीपुरवठा स्त्रोतांचे नियमित क्लोरीनेशन करून त्यावर देखरेख ठेवा; जीबीएसबाबत उपाययोजनेचे दिले आदेश

0

राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) – पुणे महानगरपालिकेला सक्त सूचना जीबीएस निर्बंध करिता तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.‌ राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात फेब्रुवारी २०२५ अखेर संशयित रुग्णांची संख्या २०० पेक्षा अधिक झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. विशेषतः खडकवासला मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्यामुळे याबाबत प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत.

आज महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात आमदार भीमराव तापकीर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना दरम्यान चर्चा उपस्थित केली. त्यांनी खडकवासला मतदारसंघातील पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी, प्रशासनाची प्रत्यक्ष पाहणी व उपाययोजना यासंबंधी प्रश्न विचारले.

यावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी उत्तर देताना सांगितले की, खडकवासला मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्याने प्रशासनाने तात्काळ तपासणी मोहीम हाती घेतली. या भागातील पाणीपुरवठा स्रोतांची तपासणी करण्यात आली असता, पुणे महानगरपालिकेकडून पुरवठा होणाऱ्या पाण्यात क्लोरीनेशन प्रक्रियेतील त्रुटी निदर्शनास आल्या. यामुळे पाणीपुरवठा दूषित होऊन रुग्णसंख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंत्री महोदयांनी स्वतः पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली असता, महानगरपालिकेकडून झालेल्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले. या संदर्भात पुणे महानगरपालिकेला सक्त सूचना देण्यात आल्या असून, पुढीलप्रमाणे तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

-सर्व पाणीपुरवठा स्त्रोतांचे नियमित क्लोरीनेशन करून त्यावर देखरेख ठेवणे.

-दूषित पाणीपुरवठा भागातील पाणी नमुन्यांची तातडीने तपासणी करणे.

-संशयित रुग्णांच्या लक्षणांवर त्वरित उपचारासाठी आरोग्य पथके तैनात करणे.

-स्थानिक नागरिकांना सुरक्षित पाणीपुरवठा आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवणे.

राज्य सरकार नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, या परिस्थितीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना सुरू आहेत.

बीड बनतंय ‘गुन्हेगारीचं हब’! कराडनंतर सुरेश धसांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी समोर, व्यक्तीला अमानुष मारहाण

0

बीडमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. यात एका माणसाला तीन ते चार लोक मारहाण करत आहेत. ही माणसे भाजप आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे.त्यांनी केलेल्या गुंडगिरीच्या घटनेचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला आहे. यानंतर आता पुन्हा खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्त्या अजंली दमानिया यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यात एका माणसाला मारहाण होत असल्याचे दिसून येत आहे. तीन ते चार लोक त्याला अमानुष मारहाण करत आहेत. हे लोक सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहेत. तसेच बीडमधील भाजपचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. अंजली दमानिया यांनी या घटनेला वाचा फोडली आहे. त्यांनी व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.

अंजली दमानियांनी ट्विट करत म्हटलंय की, बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा हा व्हिडिओ पहा. अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हे काय आहे काय ? गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावे. हा मारणारा माणूस सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का ? बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडीओ पहा… असं त्या म्हणाल्या आहेत.

https://x.com/anjali_damania/status/1897285320149991426?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1897285320149991426%7Ctwgr%5Efd817a499ac3d501cd3e8b1161e5bea9371dbea1%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार सुरेश धस यांना सवाल विचारला आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील हा व्हिडिओ आहे. आता या प्रकरणी वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहे.

कर्णधार रोहित शर्मा वनडे क्रिकेटला ठोकणार रामराम?; चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा अंतिम सामना!

0

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा ही रोहित शर्माच्या वनडे क्रिकेट कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. साखळी फेरीत एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत मजल मारली. तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात विजयासाठी 265 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 4 गडी आणि 11 चेंडू राखून गाठला. या सामन्यात रोहित शर्माने 28 धावांची खेळी केली. रोहित शर्माकडून अंतिम फेरीत चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. रोहित शर्मा आता 38 वर्षांचा आहे. टी20 फॉर्मेटमधून त्याने वर्ल्डकप विजयानंतर निवृत्त झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्या वनडे क्रिकेट कारकि‍र्दीची शेवटची स्पर्धा असेल अशी चर्चा आहे. रोहित शर्माने याबाबत काही स्पष्ट केलं नाही. पण बीसीसीआय रोहित शर्माला पुढे संधी देईल की नाही याबाबत शंका आहे. कारण यानंतर वनडे फॉर्मेटमध्ये 2027 मध्ये वर्ल्डकप होणार आहे. यासाठी नव्याने टीम बांधण्याचं बीसीसीआयसमोर आव्हान आहे. त्यामुळे रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळणं कठीण आहे.

रोहित शर्मा त्याचा वनडे क्रिकेट कारकिर्दितील शेवटचा सामना खेळेल असंच म्हणावं लागेल. अंतिम सामन्यात न्यूझीलंड किंवा दक्षिण अफ्रिकेशी लढत होणार आहे. त्यानंतर पुढे दोन महिने आयपीएलचा थरार रंगणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी जाणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्माकडे कर्णधारपद असण्याची शक्यता खूपच कमी आहे. कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे जाईल अशीही क्रीडावर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे, वनडे क्रिकेटचं यानंतर कोणतंच शेड्युल दिसत नाही. त्यामुळे रोहित शर्मा त्याच्या वनडे क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवटचा सामना खेळला असं बोललं जात आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने वनडे क्रिकेटमध्ये दोन आशिया कप जिंकले आहेत. वनडे वर्ल्डकप 2023 विजयाच्या वेशीवर संघ होता. पण अंतिम फेरीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीपर्यंत रोहित शर्माने 55 सामन्यात नेतृत्व केलं आहे. यात 41 सामन्यात विजय मिळवला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची विजयी टक्केवारी ही 74.07 इतकी आहे.