Home Blog Page 130

औंरगजेबची कबर ज्या जागेवर ती जागा कुणाच्या मालकीची? मुघल वंशजाचे राष्ट्रपतींना पत्र पाठवून ही मागणी; नाव जाणून बसेल धक्का

0

शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू मुघल बादशहा औरंगजेब छावा चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. औरंगजेबच्या कबरीवरुन महाराष्ट्रात मोठा वाद पेटला आहे. औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्राच्या संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर आहे औरंगजेबच्या कबरीला एएसआय अर्थात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे संरक्षण मिळाले आहे.यामुळे कबर हटवता येत नाही. औंरगजेबची कबर ज्या जागेवर आहे ती जागा ज्याच्या मालकीची आहे त्याचे नाव जाणून धक्का बसेल.

अत्यंत जुलमी आणि क्रूर मुघल शासक अशी औरंगजबेची ओळख होती. मार्च, 1707साली नगरच्या भिंगार किल्ल्यात औरंगजेबाचा मृत्यू 3 झाला. आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची इच्छा होती. औरंगजेबने तसं मृत्यूपत्रच बनवून ठेवले होते. औरंगजेबच्या इच्छेनुसार त्याचा मुलगा आझम शाह यानं खुलताबादमध्ये त्याची कबर बांधली.

आपल्या मृत्यूची चाहूल लागलेल्या औरंगजेबाने त्याचं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं. औरंगजेबानं आपली कबर फक्त 14 रुपये 12 आणे एवढ्याच खर्चात बनवायची असं सांगितलं होतं. त्यात त्याने कबर बांधण्यासाठी किती रुपये खर्च करायचे हे मृत्यूपत्रात लिहीले होते. मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाच्याच इच्छेनुसार सुफी संत शेख झैनुद्दीन यांच्या दर्ग्याच्या परिसरात औरंगजेबाची कबर बांधली. लाल दगडांनी बांधलेली ही कबर अत्यंत साधी आहे. याच दर्ग्यामध्ये हैदराबादच्या निजामासह इतर काही मुघल राज्यकर्त्यांच्याही कबरी आहेत.

औरंगजेबानं आपल्या अखेरच्या टोप्या विणून त्यातून आलेल्या पैशांमधून कबरीची जागा विकत घेतल्याची अख्यायिका आहे. आता मात्र, औंरगजेबची कबर ज्या जागेवर आहे ती जागा वक्फ बोर्डाच्या माकलीची असल्याचा दावा केला जात आहे. औरंगजेबाच्या कबरीचं सरंक्षण करण्याच्या मागणीसाठी मुघल वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी ही वक्फ बोर्डाची असल्याचा दावा केला आहे.

मुघल वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांच्या पत्रात नेमका काय उल्लेख आहे

मी मुघल कुटुंबांचा उत्तराधिकारी आहे. शेवटचे मुघल बहादूर शाह जफर यांचा पणतू आहे. माझे पूर्वज बादशहा औरंगजेब यांची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांची कबर अत्यंत साधी आहे. गेल्या काही दिवसांपासून काही लोकं ही कबर उखडून फेकण्याची मागणी करत आहेत. मात्र औरंगजेब यांचा जन्म भारतात झाला आणि ते भारतातच मेले. भारतीय संविधानानुसार प्रत्येक माणसाला या देशात राहण्याचा आणि इथेच मरण्याचा अधिकार आहे. सध्या औरंगजेबाची कबर वक्फची प्रॉपर्टी आहे आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिपत्याखाली आहे. काही लोक इतिहासाची मोडतोड करत आहे आणि दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. असले प्रयत्न हाणून पाडण्याचे सरकारचे काम आहे. मी राष्ट्रपती महोदय यांच्या लक्षात आणून देत आहे की, औरंगजेबाची कबर आहे त्याचा मी संरक्षक आहे. त्यामुळे माझी विनंती आहे या प्रॉपर्टीचं महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने संरक्षण करावे. तसंच याबाबत योग्य ते आदेश तातडीने संबंधित यंत्रणांना द्यावेत.

भोरला राजवाड्यात संस्थानच्या ३०५ वर्षांच्या परंपरेनुसार पारंपारिक पध्दतीने रामजन्मोत्सव साजरा

0

भोर येथील राजवाड्यात संस्थानच्या ३०५ वर्षांच्या परंपरेनुसार रविवारी (ता.६) दुपारी रामजन्माचा शाही सोहळा पार पडला. भोरचे राजे राजेशराजे पंतसचिव यांनी रविवारी दुपारी बारा वाजता पाळण्याची दोरी ओढून जन्मोत्सवाच्या मुख्य सोहळ्यास सुरवात केली. श्रीरामाचा पाळणा झाल्यानंतर उपस्थितांनी फुलांची उधळण करीत प्रभूरामचंद्राचा जयघोष केला. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता सुवर्णकार कोळसकर अॅन्ड सन्स यांच्या दुकानातून श्रीरामांच्या सुवर्णमूर्तीची (टाक ची) विधीव्रत पूजा करून मूर्ती पालखीतून राजवाड्यात आणली. यावेळी पंतसचिवांचे वंशज आणि संस्थान काळापासून पालखीचा मान असलेल्या घराण्यांचे वंशज उपस्थित होते.

पंतसचिव घराण्यातील आबाराजे पंतसचिवांचे चिरंजीव राजेशराजे, स्वातीराजे, पार्थराजे, ईशाराजे व निमिशाराजे यांच्यासमवेत प्रांताधिकारी डॉ विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, प्रमोद फडणीस, प्रमोद गुजर, राहूल गांडेकर, प्रणव गांडेकर आदींसह राजदरबाराचे मानकरी उपस्थित होते. यावेळी रामजन्मोत्सवात पंतसचीवांचा मान असलेल्या घराण्यातील मान्यवर, माजी नगरसेवक यशवंत डाळ, जगदीश किरवे, सचिन मांडके, राजेश वाझे, आदर्श सागळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी ३ अधिकारी ६० पोलिस कर्मचारी आणि पोलिस पाटलांच्या मदतीने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला.

रामजन्म सोहळ्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता.४) सप्तमीला सायंकाळी स्वातीराजे व योगेशराजे यांनी भोरेश्वर व वडिल घराण्यातील श्रीपाद गांडेकर यांच्या देव्हा-यातील रेणुकादेवी व लक्ष्मीनारायणाला अक्षत दिले. शनिवारी (ता.५) राजवाड्यात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करून पुण्याहवाचन करण्यात आले. रामजन्म सोहळ्यापूर्वी राजवाड्यात सकाळी राजाभाऊ दुसंगे, मधूकर पैठणकर, प्रिती शहा, सुधीर शिरवले, शिवाजी तामकर यांनी गीतरामायनाची गीते सादर केली. रामजन्म सोहळ्यानंतर भोरवासीयांना पंतसचिवांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. दरम्यान शहरातील सर्वच रस्त्यांवर शोभेच्या वस्तूंचे, इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक आणि खाऊच्या स्टॉल्समधून खरेदी करण्यासाठी हजारो महिलांनी गर्दी केली. सम्राट चौकाजवळ उभारण्यात आलेल्या मनोरंजन नगरीमध्ये बालगोपाळांनी खेळण्याचा आनंद लुटला.

रामनवमीचा महोत्सवाची परंपरा ५०० वर्षे सुरु राहणार

भोर संस्थानात १७२० सालापासून श्रीरामनवमीचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. हा उत्सव केवळ पंचसचिव घरण्याचा नसून प्रदेशातील सर्व नागरिकांचा आहे. भोर शहर आणि तालुक्यातील रामभक्तांच्या प्रेमामुळे आणि सहकार्यामुळे श्रीरामजन्मोत्सव सोहळ्याचे पावित्र्य व परंपरा टिकून आहे. आजपर्यंतची ३०० वर्षांची परंपरा पुढील २०० वर्षे सुरु राहून ५०० वर्षांची अखंडीत परंपरा सिध्द होईल असा मला विश्वास आहे.

राजेशराजे पंतसचिव, भोर संस्थान

आजचं हवामान 42 डिग्री पार! महाराष्ट्रावर दुहेरी संकट, अतिउष्णता आणि गारपीट! तुमच्या जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान?

0

मुंबई: अवकाळी पावसाचं कमी झालं असताना आता नवीन संकट आहे. महाराष्ट्रात उष्णतेचा लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. अवकाळी पाऊस आणि तुफान गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. आता गारपीटनंतर महाराष्ट्र मे आधीच होरपळून निघणार आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडून सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे.

दुसरीकडे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात राजस्तानमध्ये देशातील सर्वात उष्ण राज्य म्हणून मागच्या 48 तासात नोंद करण्यात आली आहे. गुजरातकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबई, उपनगर आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी अजूनही गारपिटीचं संकंट म्हणावं तेवढं टळलेलं नाही.

महाराष्ट्रात पुढचे चार दिवस चार डिग्री सेल्सियस अधिक तापमानाची नोंद करण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर 2-4 डिग्री कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. 8 आणि 9 एप्रिल रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये अति उष्ण तापमान राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे.

चंद्रपूर, गडचिरोली, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशीव जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा पुढचे दोन दिवस देण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये 10 एप्रिल रोजी गारपिटीचं संकट असेल असा इशारा हवामान विभागाने दिला. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळमध्ये ४२ डिग्रीपेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. उकाड्याने लोक हैराण झाले आहेत.

10 एप्रिलनंतर पुन्हा वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचं संकट पुन्हा येईल. विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य भारतापासून दक्षिणेपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. तर पश्चिम बंगालच्या खाडीत बाष्पीयुक्त वातावरण तयार झालं होतं. त्यामुळे अवकाळी पावसाचे ढग, आणि सोबत कमालीची उष्णता असे बदल सतत होत आहेत.

“गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री…”, महिला IAS अधिकाऱ्याचा उल्लेख करत एकनाथ खडसे काय म्हणाले?

0

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार आहेत. आज एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ प्रसिद्ध करून गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले.

एकनाथ खडसे म्हणाले, गिरिश महाराजांनाच्या रंगल्या रात्री अशा विषयाखाली एका पत्रकाराने एक क्लिप प्रकाशित केली आहे. त्यात संबंधित पत्रकाराने सांगितलंय की गिरीश महाजानांचे महिला आयएएस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहेत. त्यांचं नाव मला माहितेय पण ते सांगणं उचित होणार नाही.”

अमित शाहांकडे गिरीश महाजनांचे सीडीआर

“मंत्रिमंडळ विस्ताराच्या बैठकीवेळी अमित शाहांनी गिरीश महाजनांना या संबंधित महिला आयएएस अधिकाऱ्याविषयी विचारलं होतं. तेव्हा गिरीश महाजन म्हणाले होते की कामाच्या निमित्ताने माझे अनेकांबरोबर संबंध आहेत. अमित शाहांनी तेव्हा सांगितलं की तुमचे (गिरीश महाजन यांचे) कॉल डिटेल्स माझ्याकडे आहेत. १०० वेळा त्या महिला आयएएस अधिकाऱ्याबरोबर तुझे कॉल झालेले आहेत. पुढे काहीही सांग, तुझा सीडीआर खरं बोलतो. अमित शाहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन संबंधित पत्रकाराने काही प्रश्न उपस्थित केले आहेत”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

मी अमित शाहांना विचारणार आहे

“मला वाटतं, (अमित शाहांकडे असलेले) सीडीआर तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री, असं पत्रकाराने म्हटलंय. मीही अमित शाहांची भेट झाली तर यातील तथ्य किती आहे हे विचारणार आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

गिरीश महाजनांचे संबंध सर्वश्रुत

माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, “गिरीश महाजानांचे हे संबंध अवघ्या राज्याला माहीत आहे. हे आजचं नाही. गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रात ही चर्चा सुरू आहे. या अधिकाऱ्याचे नावही सर्वांना श्रूत आहे. आयएएस अधिकाऱ्यांना मंत्री फोन करत असतील आणि त्यात जर तथ्य असेल तर त्यांना मंत्रि‍पदावर राहण्याचा अधिकार काय? नैतिकता आहे की नाही? बायकांना रात्री फोन करणे योग्य आहे का. सर्वांना हे प्रकरण माहितेय.”

गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर काय?

एकनाथ खडसे यांनी आरोप केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनीही तत्काळ प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी एक गोष्ट सांगितली तर घराबाहेर पडल्यावर एकनाथ खडसेंना लोक जोड्याने मारतील. माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवावा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन. मी कधीही कुणालाही तोंड दाखवणार नाही. तसंच जे काही आहे ते लोकांना दाखव फालतू बडबड करु नको. माझा अंत बघू नका. मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसेंना तोंड काळं करुनच बाहेर पडावं लागेल. घरातलीच गोष्ट आहे पण मी बोलणार नाही. एका भोंदू पत्रकाराला सांगून हा विषय उचलायला लावला आहे, त्यातून हा विषय झाला आहे”, असं प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी दिलं आहे.

भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस त्रिकंद’ युद्धनौकेने दाखवलेल्या तत्परतेने आणि माणुसकीच्या भावनेने वाचविला पाकिस्तानी खलाशाचा जीव!

0

अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस त्रिकंद’ युद्धनौकेने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि माणुसकीच्या भावनेने एका पाकिस्तानी खलाशाचा जीव वाचला आहे. गंभीर जखमी अवस्थेतील या खलाशावर भारतीय नौदलाच्या डॉक्टरांनी वेळेवर शस्त्रक्रिया केल्यामुळे त्याचा जीव तर वाचलाच, त्याची बोटे निकामी होण्यापासूनही वाचली. ही घटना ४ एप्रिल २०२५ रोजी घडली. ‘आयएनएस त्रिकंद’ हे भारतीय नौदलाचे जहाज ओमानच्या किनाऱ्यापासून सुमारे ३५० नॉटिकल मैलांवर गस्त घालत होती. याच वेळी ‘इराणी धोवू अल ओमीदी’कडून तातडीचा संदेश मिळाला. या धोवूवरील एक पाकिस्तानी खलाशी इंजिनवर काम करताना गंभीर जखमी झाला होता. त्याला ‘अब्दुल रहमान हंझिया’ या इराणकडे जाणाऱ्या दुसऱ्या मच्छीमार बोटीवर हलवण्यात आले होते.

आयएनएस त्रिकंदने क्षणाचाही विलंब न करता आपला मार्ग वळवला आणि संबंधित नौका शोधून काढली. या नौकेवर ११ पाकिस्तानी (नऊ बलुच, दोन सिंधी) आणि पाच इराणी खलाशी होते. जखमी खलाशाच्या बोटांना फ्रॅक्चर झाले होते आणि रक्तस्राव सुरू होता. आयएनएस त्रिकंदवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने खलाशाला भूल देऊन शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली.

साखर उत्पादनात महाराष्ट्र पुन्हा पिछाडीवर! ‘या’ राज्याने घेतली आघाडी; देशात किती साखर निर्मिती?

0

देशातील साखर हंगामाची आकडेवारी समोर आली असून सलग तीन वर्ष साखरउत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्र चालू हंगामात मात्र पुन्हा पिछाडीवर पडला आहे. उत्तरप्रदेशात ८७ लाख टन साखरनिर्मिती झाली असून अद्यापही ४८ कारखाने सुरू आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राचा साखर हंगाम संपल्यात जमा असून केवळ ८० लाख टन साखरनिर्मिती झाली आहे.

इंडियन शुगर मिल असोसिएशन आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने मार्चअखेरचा साखरउद्योगाचा आढावा जाहीर केला आहे. यामध्ये देशात आतापर्यंत २४७ लाख टन साखरनिर्मिती झाली असून हंगामाअखेर एकूण २६४ लाख टनांवरच साखरनिर्मितीचे गाडे अडणार असल्याचा सुधारीत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गतहंगामात ३१९ लाख टन साखरनिर्मिती झाली होती. चालू हंगामात साखरनिर्मितीत ५४ ते ५५ लाख टन घट झाली असून त्याचे प्रमुख कारण महाराष्ट्र आहे. साखरनिर्मितीत महाराष्ट्रात तीस लाख टन, उत्तरप्रदेशात साडेनऊ लाख टन तर कर्नाटकता दहा लाख टन इतकी घट दिसून येत आहे.

मागील २०२३-२४ हंगामात महाराष्ट्रात ११० लाख टन तर युपीमध्ये १०४ लाख टन तर २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात १०५ लाख टन तर युपीत १०४ लाख टन (खांडसरी वगळून) साखरनिर्मिती झाली होती. तसेच २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात १३८ लाख टन तर युपीत १०२ लाख टन साखरनिर्मिती झाली होती. तत्पूर्वी २०१६-१७ ते २०२०-२१ या चारही हंगामात युपीने अधिराज्य गाजविले होते. २०१५-१६ पर्यंत मात्र महाराष्ट्राचेच वर्चस्व अबाधित होते. आता पुन्हा एकदा युपीने कारखाने कमी असतानाही महाराष्ट्राची मक्तेदारी मोडीत काढली आहे. मार्चअखेर युपीमधील १२२ पैकी ४८ कारखाने चालू असून ८७ लाख टन साखरनिर्मिती झाली आहे तर महाराष्ट्रात २०० पैकी केवळ सहाच कारखान्यांची धुगधुगी सुरू असून ८० लाख टन साखरनिर्मिती झाली आहे. महाराष्ट्राला साखरनिर्मितीत मागे पडल्याचा फार मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

मार्चअखेर देशातील साखर उत्पादन (लाख टन)

उत्तरप्रदेश १२२-८७.५०

महाराष्ट्र २००-८०.०६

कर्नाटक ८०-३९.५५

गुजरात १५-८.२१

तामिळनाडू ३०-४.१६

अन्य ८७-२८.१३

उत्तरप्रदेश व महाराष्ट्र 10 वर्षाचे साखर उत्पादन (लाख टन)

हंगाम             -युपी       -महाराष्ट्र

२०१४-१५         -७१         -१०५

 

२०१५-१६         -६८         -८२

 

२०१६-१७         -८७         -४२

 

२०१७-१८         -१२०         -१०७

 

२०१८-१९         -११८         -१०७

 

२०१९-२०         -१२६         -६१

 

२०२०-२१         -११०         -१०६

 

२०२१-२२         -१०२         -१३८

 

२०२२-२३         -१०४         -१०५

 

२०२३-२४         -१०४         -११०

 

२०२४-२५         -८७         -८०

आगामी काळात कार्यकत्यांची निवडणूक ‘स्थानिक’मध्ये विजयाचा संकल्प करा; भाजपच्या स्थापनादिनी बावनकुळे यांचे मोठं आवाहन

0

‘नेत्यांच्या निवडणुका संपल्या आहेत. आगामी काळात कार्यकत्यांची निवडणूक आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना कार्यकर्ते निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकांमध्ये विजय मिळवत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष भाजपसह महायुतीचे व्हावेत, यासाठी कार्यकर्त्यांनी विजयाचा संकल्प करावा,” असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. भाजपच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित आभासी कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपचे अध्यक्ष अँड. आशिष शेलार, महासचिव राजेश पांडे यांच्यासह ३६ जिल्ह्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, ”लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला कमी मते मिळाली. त्यानंतर विधानसभेत विजयाचा संकल्प केला. विधानसभेत राज्याच्या जनतेने भाजप- महायुतीवर विश्वास टाकला आणि भाजपने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या. आज भाजपने राज्यात १ कोटी ५१ लाख प्राथमिक सदस्य संख्या पूर्ण केली आहे. यासाठी भाजपच्या १ लाख सक्रिय कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली.

सरकारने घेतलेले जनहिताचे सर्व निर्णय या सदस्यांच्या माध्यमातून राज्यातील १४ कोटी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण संकल्पित व्हायला हवे. तसेच २०२५ मध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपसह महायुतीच्या उमेदवाराला ५१ टक्के मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प करावा. पुढील १५ वर्षे महायुतीचे सरकार राज्याचा विकास करीत राहील,” असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र थांबणार नाही : फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील ४५ वर्षांत भाजपने कधीच लोकशाही सोडलेली नाही आणि घराणेशाही स्वीकारली नाही. भाजप लोकतांत्रिक मूल्यांवर चालणारा हा पक्ष आहे. भाजप कार्यकर्त्यांची मेहनत आणि राज्यातील जनतेने दर्शविलेल्या विश्वासामुळे आज पुन्हा राज्यात भाजप-महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. आम्ही १०० दिवस कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले सरकार कसे पारदर्शक आणि गतिशील आहे हे दाखवून दिले आहे. सरकार अशाच प्रकारे कार्य करीत महाराष्ट्राला देशाच्या सर्वोच्च स्थानावर नेल्याशिवाय थांबणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

वारजे गणपती माथा घरासमोर खेळणाऱ्या बालकाचा टँकरखाली सापडून मृत्यू; टँकर चालक अटकेत

0

पुणे : टँकरच्या चाकाखाली सापडून दीड वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वारजे भागातील गणपती माथा परिसरात घडली. याप्रकरणी टँकर चालकाला अटक करण्यात आली असून, टँकर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधोक्षक महेश वहाळे (वय १८ महिने) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी टँकर चालक सनी प्यारे बारसकर (वय ३३, सध्या रा. वडाचा गणपती मंदिराजवळ, दत्तवाडी, मूळ रा. भैय्यावाडी, सहापूर, जि. बैतुल, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली.

याबाबत सतीश वसंत टिकारे (वय ६५, रा. टिकारे हाईट्स, गणपती माथा, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील गणपती माथा परिसरातील रहिवासी छाया वहाळे यांचा नातू अधोक्षक शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरासमोर खेळत होता. या परिसरातील एका इमारतीतील टाकीत पाणी भरण्यासाठी टँकर आला होता. त्या वेळी टँकर मागे नेत असताना घरासमोर खेळणारा अधोक्षक मागच्या चाकाखाली सापडला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर रहिवाशांनी टँकर चालक बारसकर याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. टँकर चालक बारसकर याला ताब्यात घेण्यात आले. बारसकर याला अटक करण्यात आली असून, टँकर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करत आहेत.

पुणे पीडित कुटुंबियांच्या ‘त्या’ नवजात जुळ्या मुलींविषयी सरकारचा हा निर्णय; ….भेटीनंतर मुख्यमंत्र्यांकडून हे जाहीर!

0

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आगाऊ रक्कम भरण्यास सांगितल्याने गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करता आले नाही. परिणामी या महिलेची दुसऱ्या रुग्णालयात प्रसुती झाली असून त्यांना जुळी मुली झाल्या आहेत. परंतु, दुर्दैवाने प्रसूतीदरम्यान मातेचा जीव गेला. हे प्रकरण राज्यात सर्वत्र गाजतंय. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून त्यांनी पीडित कुटुंबियांची भेटही घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांनी याबाबत एक्सवरून माहिती दिली.

आज पुणे येथे एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित महिलेचे पती, नणंद आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेतली. यावेळी पीडित कुटुंबीयांसोबत भाजपाचे आमदार अमित गोरखे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिले आहे.

भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भेटीबाबत म्हणाले, ‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काल झालेल्या प्रकाराची माहिती मी आज भिसे कुटुंबीयांकडून घेतली. या प्रकरणात संपूर्ण चौकशी होईलच आणि अहवालानुसार कारवाईसुद्धा होईल.

ते पुढे म्हणाले, ‘पण आज त्या कुटुंबापुढे सर्वांत मोठा प्रश्न, त्या जन्माला आलेल्या दोन अपत्यांच्या आरोग्याचा आहे. मुदतपूर्व प्रसुतीमुळे ही दोन्ही अपत्य आज ‘एनआयसीयू’मध्ये आहेत आणि आणखी काही काळ त्यांना तेथे उपचार घ्यावे लागणार आहेत. त्याचा खर्च सुद्धा अधिक आहे. त्यामुळे त्या दोन्ही मुलींचा उपचारांचा खर्च हा मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश मी दिले आहेत.’

अश्विनी बिंद्रे-गोरे हत्याकांड वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे हात रक्ताने माखले; 9 वर्षांनंतर न्याय, अभय कुरुंदकर दोषी

0

अख्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अश्विनी बिंद्रे-गोरे हत्याकांडात नऊ वर्षानंतर न्यायालयाने आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यासह दोघांना दोषी ठरवले. पण या प्रकरणातील राजू पाटील या अरोपीची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुख्य कुरुंदकर यानेच आपल्या साथीदारांसह अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेल सत्र न्यायालयाने कुरुंदकर याला दोषी ठरवले.

अश्विनी बिंद्रे यांचे कळंबोली येथून 2015 मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती. याबाबत स्थापन केलेल्या एसआयटीने 80 जणांची साक्ष घेत कुरुंदकर याच्यासह तिघांवर खूनाचा ठपका ठेवला होता. तपास अधिकारी निलेश राऊत आणि संगीता अल्फान्सो यांनी केलेल्या तपासात कुरंदकर यांनी अश्विनी बिंद्रे यांचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार कुरुंदकर यांच्यासह राजू उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय पाटील, कुंदन भंडारी आणि महेश पडळकर या चौघांची रवानगी तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठे करण्यात आली होती. आता या प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने कुरुंदकर याच्यासह दोघांना दोषी ठरवले आहे. तर या प्रकरणात 11 एप्रिल रोजी निकाल देण्यात येणार आहे.

नऊ वर्षांच्या संघर्षाला यश

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचा 11 एप्रिल 2016 रोजी मुंबईत खून झाला. याप्रकरणी शनिवारी सुनावणी झाली. आता या प्रकरणाला 11 तारखेला नऊ वर्ष होत असल्यानेच 11 एप्रिल 2025 रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. दिवंगत अश्विनी यांचे पती राजू गोरे आणि मुलगी सिद्धी यांनी नववर्ष केलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. पण न्यायालय या प्रकरणात कोणती शिक्षा सुनावणार याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. पती राजू गोरे यांनी तपासादरम्यान दर आठवड्याला सुनावणीसाठी पनवेल जात असत. तसेच या प्रकरणात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतींशी पत्रव्यवहार करत लक्ष वेधण्याचे काम केलं होतं.

हातकलंगले तालुक्यातील आळते येथील अश्विनी बिद्रे या पोलीस दलातील एक धाडसी महिला अधिकारी म्हणून ओळखला जात होत्या. नोकरीला लागण्याच्या आधी त्यांचा हातकणंगले येथील महाराष्ट्र नव निर्माण सेना पक्षाचे कार्यकर्ते असणाऱ्या राजू गोरे यांच्याशी 2005 मध्ये विवाह झाला होता. विविहाच्या एका वर्षातच त्यांना MPSC च्या स्पर्धा परीक्षेत यश आले होते. तर त्या पोलीस उपनिरीक्षक बनल्या होत्या.

2006 मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग पुण्यात झाली होती. यानंतर सांगली आणि रत्नागिरीत देखील त्यांनी काम केलं होतं. तर त्या पोस्टींगवर मुंबईतील कळंबोली येथे दाखल झाल्या होत्या. येथूनच त्यांचे अपहरण झाले होते. जेथून हे प्रकरण उघडकीस आले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे आणि या हत्याकांडातील बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांची पहिली भेट सांगलीत झाली होती. याच ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि त्या मैत्रीचे रूपांतरनंतर प्रेमसंबंधात झाले होते. याच्यातूनच बिद्रे आणि त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता. तर याच मुद्द्यासह लग्नाच्या तकाद्यावरून कुरुंदकर यांच्याशीही अश्विनी बिद्रेंचा वाद झाला होता. याच वादातून अश्विनी बिद्रेंची हत्या झाल्याचेनंतर एसआयटी तपासात समोर आले होते.

कळंबोली येथून अश्विनी बिद्रे यांचे 2015 मध्ये अपहरण झाले होते. यानंतर अश्विनी बिद्रे यांच्याशी कोणताच संपर्क होत नसल्याने पती राजू गोरे आणि मुलगी सिद्धी चिंतेत होते. त्यांनी तक्रार देण्याच्या आधी अश्विनी बिद्रे कर्तव्यावर असणाऱ्या कळंबोली पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली होती. मात्र त्यांना काही माहिती न मिळाल्याने त्यांनी अश्विनी बिद्रे यांच्या मिसींगची तक्रार दिली होती. तसेच अश्विनी बिद्रे ज्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्याचे कुलूप तोडून मोबाईल व लॅपटॉपची तपासणी केली होती.

या तपासणीतून अश्विनी बिद्रे आणि या हत्याकांडातील बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या संबंधाची माहिती समोर आली होती. यानंतरच अश्विनी बिद्रे यांच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट झाल्याच्या संशयावरून कळंबोली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती.

या फिर्यादीत पोलीस निरीक्षक कुरुंदकर यांच्यासह राजू पाटील, महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र राजकीय नेत्यांशी असलेले लागेबांध यामुळे बिद्रे आणि गोरी कुटुंबीयांवर प्रचंड दबाव आणला गेला. पण हा दबाव झुगारून राजू गोरे यांनी दर आठवड्याला पनवेल आणि मुंबई सुनावणीसाठीफेऱ्या मारल्या. इतकंच नाही तर तत्कालिन मुख्यमंत्र्यांची आणि राज्यपाल यांची भेट घेऊन दाद मागितली होती. त्यांच्या या संघर्षाला आता नऊ वर्षानंतर यश आले असून पनवेल न्याय दिलाय. न्यायालयाने आरोपी बडतर्फ पोलीस निरीक्षक कुरुंदकर यांना दोषी ठरवले आहे. आता या प्रकरणात 11 एप्रिल रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे

कुरुंदकर मूळचा कोल्हापूर

बडतर्फ पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. तो आजरा तालुक्यातील असून त्याचे कोल्हापूर शहरातील सम्राट नगर परिसरात आलिशान बंगला आहे. तसेच गावाकडे शेत जमीन आणि मोठे घर देखील आहे.