Home Blog Page 105

‘स्थानिक’पूर्वी समित्या, जिल्हाध्यक्ष अन् महामंडळाचं वाटप; तारखा ठरल्या निष्ठावंत ‘अ‍ॅडजस्ट’ मध्ये भाजपची दमछाक?

0

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपने महाराष्ट्रात संघटन मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे. संघटनात्मक बांधणीसाठी पक्ष नेतृत्वाकडून महाराष्ट्रात बैठकांचा सपाटा सुरू असून, यातून मंडलाध्यक्ष नियुक्तीवेळी संघटनात्मक पातळीवर उफाळलेल्या वादाची माहिती घेत आहेत. भाजप या दौऱ्यानिमित्ताने राज्य सरकारच्या तालुका, जिल्हा समिती, विशेष कार्यकारी दंडाधिकारी (SEO) आणि महामंडळांवरील नियुक्त्याचा आढावा घेतला जात आहे. ही संघटनात्मक बांधणी करताना, भाजप नेत्यांची तारेवरची कसरत होत आहे. संधी न मिळालेल्या निष्ठावान नाराजांची संख्या वाढणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

भाजपचे आमदार, राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षकांची मुंबईत बैठक झाली. विदर्भाची ऑनलाईन बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तींचे संकेत दिले आहेत. आता कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण राज्य दौऱ्यावर आहेत. यानंतर लवकरच पदाधिकारी, समित्या नियुक्तींना वेग येणार आहे.

या कालावधीत नियुक्त्या होणार

भाजपच्या (BJP) कोअर कमिटी लवकरच विशेष कार्यकारी दंडाधिकारी (SEO), तालुका स्तरावरील 27 समित्या आणि जिल्हा पातळीवरील 32 समित्यांवरील सदस्य, अध्यक्षांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवणार आहे. 1 ते 31 मे रोजी दरम्यान सर्व नियुक्त्या करण्याचा प्रयत्न असेल. राज्य पातळीवरील समित्या, महामंडळांवरील नियुक्ती या 1 ते 30 जूनमध्ये होईल. या नियुक्तींच्या सूत्रांमध्ये महायुतीमध्ये ज्या जिल्ह्यात तीनपैकी ज्या पक्षाची मोठा ताकद आहे, तिथे त्या पक्षाला जवळपास 65 ते 70 टक्के पदे दिली जाणार आहे.

महामंडळाचे वाटप असे होणार

महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये महामंडळ नियुक्तीवरून वाद उफाळण्याची शक्यता आहे. हा वाद टाळण्यासाठी महायुतीमधील प्रत्येक दोन नेत्यांची मिळून समन्वय समिती निर्माण करण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात या समितीच्या बैठका होतील. कोणत्या पक्षाला कोणती महामंडळे द्यायची यावर चर्चा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या समितीच्या अहवालावर एकत्रितपणे निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हाध्यक्षांची निवड 3 मे रोजी पूर्वी होणार

राज्यात भाजप संघटनात्मकदृष्ट्या ताकद वाढवण्यावर भर देत आहे. 78 जिल्ह्यांच्या अध्यक्षांची निवड 3 मे रोजी पूर्वी करण्याच्या हालचाली आहेत. जिल्हाध्यक्षपदासाठी जे निरीक्षक नेमण्यात आले ते पक्षातील 21 प्रकारच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्येकाकडून तीन नावे घेतील. त्यातून सर्वाधिक पसंती मिळेल त्याला जिल्हाध्यक्षपद दिले जाणार आहे. दोन टर्म पक्षाचा सक्रिय सदस्य राहिलेली असेल अशाच व्यक्तीचा जिल्हाध्यक्षपदासाठी विचार होणार आहे.

पुण्याच्या हवामानात बदल! शनिवारी राज्यात वादळी-वाऱ्यासह पावसाचा अलर्ट

0

सूर्याच्या आगीत राज्य भाजून निघत असताना आता वादळी पावसाला पोषक हवामान झाले आहे. शनिवारी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्यात ऊन असह्य होत असून, जमीन अक्षरशः करपून निघत आहे. उकाड्याने घामाच्या धारादेखील त्रासदायक ठरत आहेत. तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान अनुभवायला मिळत आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. तुरळक ठिकाणी गारपिटीची नोंद झाली. कोल्हापुरातील हातकणंगले, सांगलीतील कसबेडिग्रज, जत येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

‎‎शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ‎अकोला आणि चंद्रपूर येथे ४५ अंशांपेक्षा अधिक, नागपूर, ‎यवतमाळ, अमरावती, ‎गडचिरोली, ‎वर्धा येथे ४४ अंशांपेक्षा अधिक, ‎‎जळगाव, ‎जेऊर, ‎मालेगाव, ‎परभणी आणि ‎वाशीम येथे ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

‎शुक्रवारच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान

(अंश सेल्सिअसमध्ये)

‎पुणे (४०.५-२४), ‎धुळे (४२.५-२०.६), ‎जळगाव (४३.२-२५.६), ‎जेऊर (४३.५-२४), ‎कोल्हापूर (३४.३-२२.३)

महाबळेश्‍वर (३२.६-२१), ‎मालेगाव (४३-२४.६), ‎नाशिक (३८.३-२१.९), ‎निफाड (३९.८-२०.५), ‎सांगली (३५.८-२४.६), ‎सातारा (४०.३-२४.६), ‎सोलापूर (४२.३-२८.९), ‎सांताक्रूझ (३३.७-२४.६), ‎डहाणू (३५-२३.९), ‎रत्नागिरी (३३.५-२५.८), ‎छत्रपती संभाजीनगर (४१.४-२६.६), ‎धाराशिव (४२-२५), ‎परभणी (४३.४-२५.६), ‎‎अकोला (४५.२-२७.२)

‎अमरावती (४४.२-२३.९, ‎भंडारा (४२.४-२५), ‎बुलडाणा (४०.६-२७.७), ‎ब्रह्मपुरी (४५.९-२७.४), ‎गडचिरोली (४४-२४), ‎गोंदिया (४२.६-२४.४), ‎नागपूर (४४.४-२३.८), ‎वर्धा (४४-२५.४), ‎यवतमाळ (४४.४-२४)

मेंढरं सांभाळणारा झाला आयएएस, बिरूदेव साहेब होताच सोशल मीडियावर वाढली क्रेझ

0

यूपीएससीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षेत मेंढरं सांभाळाणा-या बिरुने यश संपादन करून आयएएस पदाला गवसणी घातली आहे. यामुळे बिरुची सोशल मिडियावर चांगलीच क्रेझ वाढली असून, आजच्या युवकासमोर त्याने एक आदर्श उभा केला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यमगे (ता. कागल ) येथील बिरदेव डोणे याने देशात ५५१ वी रैंक पटकावत यश संपादन केले आहे. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अक्षरशः सोशल मीडियावर बिरदेव वर अभिनंदनाचा वर्षाव होत असून. मेंढपाळ करणा-या तरूणाची सोशल मिडियावर चांगलीच क्रेझ वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचा आदर्श घेऊन तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

कोण आहे बिरू

कर्नाटकातील बेळगाव येथे मेंढरं राखण्यात रमून गेलेले खडतर परिश्रम, जिद्द चिकाटी ठेवून नियमित पुस्तकांचे वाचन व अभ्यासातील जीव ओतल्याने यशाला गवसणी घातली, विरदेव डोणे बोलताना यांनी व्यक्त केले. आई वडिलांनी व भावाने दिलेली साथ आणि धैर्य यामुळेच यश मिळाल्याचेही त्याने सांगितले.

दहावीत ९६ टक्के, बारावी ८९ टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम येण्याबरोबरच पुणे येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दोन वर्षे दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. दोन परीक्षेत अपयश येऊन देखील न खचता त्याने तिस-या वेळेस यश संपादन केलेच, बिरूदेव डोणे याने मेंढी माऊलीला उचलून घेऊन आपला आनंदोत्सव साजरा केला.

डाक सेवक म्हणून केले होते काम

गंगापूर(ता. भुदरगड)या ठिकाणी डाक सेवक म्हणून दहा महिने नोकरी केली. परीक्षेचा निकाल आहे, पण कधी लागेल याची माहिती नसणाऱ्या बिरूला त्याच्या मित्राने फोन करून ‘भावा, तू जिंकलास, तुझं नाव लिस्टमध्ये आहे’ असा फोन केला. यावेळी बिरू आपल्या मेंढराच्या लोकर कापणीत व्यस्त होता.

मेंढरा मागें फिरणारं पोरगं साहेब होताच महाराष्ट्रात सोशल मिडियावर वर्षाव व सुरु झाला

मेंढर चारता चारता भटकंती करणारं पोरं बिरु साहेब झाला अण् सारा गाव आनंदात न्हाऊन निघाला डाॅ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,शिका संघटित व्हा संघर्ष करा या बिद्र वाक्यांचा मनांवर ठसा उमटवून अठरा विश्व दारिद्र्य असणार पोरं जेव्हा महाराष्ट्र मधून ५५१वी रॅक पटकवत यशाला गवसणी घालतो तेव्हा आभाळ ही छोट वाटतं अशा विविध शुभेच्छांच्या पोस्ट सोशल मिडियावर महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असल्याने बिरू डोणेची सोशल मिडियावर चांगलीच क्रेझ वाढल्याचे दिसून येत आहे.

वक्फ कायद्यांसंदर्भात केंद्राचे कोर्टात प्रतिज्ञापत्र; ‘धार्मिक अधिकारात कोणताही हस्तक्षेप…., व्यवस्थापन आणि पारदर्शिकता येण्यासाठीच

0

वक्त सुधारणा विधेयक संसदेत दोन दिवस एवढा हंगामा होऊन गोंधळ झाला. त्यानंतर बहुमताने हे विधेयक संसदेने मंजूर केले. या विधेयकाचे कायद्यात रुपांतरही करण्यात आले. आता कोर्टात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकेवरील सुनावणी सुरु असताना केंद्र सरकार आता प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. काय म्हटलंय या प्रतिज्ञापत्रात वाचा..

केंद्र सरकारने या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की वक्फ मुस्लीमांची कोणतीही धार्मिक संस्था नाही तर वैधानिक संस्था आहे. वक्फ सुधारणा कायद्यानुसार देखरेख करणाऱ्यांचे काम धर्मनिरपेक्ष असते ती धार्मिक नाही !  हा कायदा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या भावनांचे प्रकटीकरण करतो.  लोकप्रतिनिधींनी या कायद्याला बहुमताने पारित केलेले आहे.

  • वक्फ संदर्भात सरकारने सुप्रीट कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की संसदेने पारित केलेले कायदे घटनात्मकदृष्ट्या वैध मानले जातात. विशेषतः संयुक्त संसदीय समितीच्या ( जेपीसी ) शिफारशींवर आणि संसदेत व्यापक चर्चेनंतर बनवलेले कायद्याबाबत ही बाब स्पष्ट आहे.
  •  केंद्राने सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे की वक्फ सुधारणा कायद्याला आताच अंतरिम स्थगिती देऊ नये. या कायद्याच्या सुधारीत आवृत्तीने कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक अधिकारात हस्तक्षेप झालेला नाही. केवळ व्यवस्थापन आणि पारदर्शिकता येण्यासाठीच या कायद्यात बदल केलेले आहेत.
  • या कायद्यास संसदेत मंजूर करण्याआधी संयुक्त संसदीय समितीच्या JPC एकूण ३६ बैठका झाल्या होत्या, आणि ९७ लाखाहून अधिक शिफारसी आणि हरकती यासाठी आल्या होत्या. समितीने देशातील दहा मोठ्या शहरांचा दौरा करुन जनतेच्या दरबारात जाऊन त्यांचे या कायद्यांसंदर्भातील विचार जाणून घेतले होते.

पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय; कुटुंबाशी संवाद, त्याने पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला

0

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी नाव विचारत गोळीबार केला, या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील देखील सहा जणांचा समावेश आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत, दरम्यान हा हल्ला जेव्हा झाला, त्यावेळी आदिल सय्यद हुसेन हा तरुण देखील तिथेच होता, त्याने तेथील पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दहशतवाद्यांनी त्याच्यावर देखील गोळीबार केला. या घटनेत त्याचाही मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेनंतर आता आदिल हुसेन याच्या कुटुंबाला घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे.

काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. पर्यटकांना खच्चरवरून ने -आण करणाऱ्या आदिल सय्यद हुसेन याचाही या घटनेत मृत्यू झाला होता. त्यानंतर आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आदिलच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्याच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. दहशतवाद्यांनी जेव्हा गोळीबार केला, तेव्हा त्याला आदिलने विरोध केला होता. त्याने दहशतवाद्यांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत त्याचा देखील मृत्यू झाला. त्याच्यावर देखील गोळीबार करण्यात आला. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून आदिल हुसेनच्या कुटुंबाशी  संवाद साधला, तसेच त्याच्या कुटुंबाला घर बांधून देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या

या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत सरकारनं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे, तसेच सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. त्यांना भारत तातडीनं भारत सोडण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. दुसरीकडे भारताच्या या कारवाईने पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे, पाकिस्तानकडून भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानच्या बाजुची वाघा बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे.

फडणवीसांचा ‘पहलगाम’वर ठाकरे गटाच्या अनुपस्थितीवर बोलताना संताप, “…देशाची जनता माफ करणार नाही,”

0

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पाकिस्ताविरोधात महत्त्वाचे पाच निर्णय घेतल्यानंतर सरकारने या बैठकीचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रतिनिधी मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

“मला या गोष्टीचे फार दु:ख आहे. जेव्हा शत्रू आपल्यावर हल्ला करतो, पहलगामसारखा हल्ला केला जातो, तेव्हा भारतीय पक्षांनी राजकारण केलेलं नाही. दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी बांगलादेश युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पूर्णपणे पाठिंबा दिला होता. आज मात्र अल्पमतीने भूमिका घेतली जात आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

…तरी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना समर्थन दिले होते

“भारतात युद्धसदृश परिस्थिती असो, देशावर हल्ला असो किंवा देशाच्या संदर्भात एखादी बाब असो, या देशातल्या राजकीय पक्षांनी कधीही पक्षाकडे पाहिलेलं नाही. बांगलादेशच्या युद्धाच्या काळात देशात पक्षा-पक्षांमध्ये टोकाची लढाई चालू होती. पण वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना समर्थन दिले होते. हीच भारताची परंपरा राहिलेली आहे. पण अशाही परिस्थितीत विरोध करणं, उपहास करणं, मुर्खासारखी विधानं करणं हे जे चाललंय, त्याला देशाची जनता माफ करणार नाही,” असा हल्लाबोल फडणवीस यांनी ठाकरे गटावर केला.

ठाकरे गटाच्या पक्षाचे प्रतिनिधी होते अनुपस्थित

दिल्लीमध्ये पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. या बैठकीचे निमंत्रण ठाकरे गटाला देण्यात आले होते. मात्र संसदेतील ठाकरे गटाचे फ्लोअर लिडर अरविंद सावंत यांनी सरकारला एक पत्र लिहून काही अपरिहार्य कारणामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही, असे कळवले होते. तसेच अशा कठीण परिस्थितीत आमचा पक्ष सरकारसोबत पूर्ण ताकदीने उभा आहे, असेही ठाकरे गटाने केंद्र सरकारला आश्वस्त केले होते.

महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाईन जारी

दरम्यान, राज्य सरकारकडून काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रायीन नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेष विमानाने या नागरिकांना महाराष्ट्रात आणले जात आहे. त्यासाठी काही हेल्पलाईन्सही सरकारने जारी काेलेल्या आहेत.

भारत खरोखर पाकिस्तानात वाहणाऱ्या सिंधू नदीचे पाणी थांबवू शकतो का? काय आहे हा सिंधू जल करार?

0

पहलगाममधल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने थेट 1960 चा सिंधू जल करार स्थगित केला आहे. यामुळे पाकिस्तानचं तोंडचं पाणी पळालं आहे. भारतानं अश्रूंचा बदला पाण्याने घेतल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला. पाकिस्ताननेही शिमला करार रद्द करण्याची धमकी दिली. दोन्हीकडून एकमेकांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होत आहे. असं असलं तरी भारत खरंच सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचं पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखू शकतो का? चला, थोडं खोलात जाऊन बघूया, पण अगदी सोप्या भाषेत!

काय आहे हा सिंधू जल करार?

1960 साली भारत आणि पाकिस्तानने जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार केला. यानुसार, रावी, बियास, सतलज या तीन नद्यांचं नियंत्रण भारताकडे आहे, तर सिंधू, झेलम, चिनाब या तीन नद्यांचं 80% पाणी पाकिस्तानच्या हक्काचं आहे. पाकिस्तानची शेती आणि जवळपास एक तृतीयांश जलविद्युत निर्मिती या पाण्यावर अवलंबून आहे. भारताने याआधी काही जलविद्युत प्रकल्प उभारले, तेव्हा पाकिस्तानने आक्षेप घेतले होते. पण हा करार दोन युद्धं आणि तणावाच्या काळातही टिकून राहिला. आता भारताने तो थांबवल्याने सगळं चित्र बदललंय!

भारताला पाणी अडवणं शक्य आहे का?

तज्ज्ञ सांगतात, संपूर्ण पाणी अडवणं भारतासाठी जवळपास अशक्य आहे. का? कारण भारताकडे सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्यासाठी धरणं किंवा कालव्यांचं जाळं नाही. सध्याचे बहुतांश जलविद्युत प्रकल्प हे ‘रन-ऑफ-द-रिव्हर’ प्रकारचे आहेत, म्हणजे पाणी साठवून ठेवण्याऐवजी त्याचा थेट वापर वीजनिर्मितीसाठी होतो. शिवाय, भारत आपल्या हक्काचं 20% पाणीही पूर्ण वापरत नाहीये! त्यामुळे आता भारतात अशा पायाभूत सुविधा उभारण्याची मागणी जोर धरतेय, ज्या पाणी अडवू किंवा वळवू शकतील.

पाणी ‘हत्यार’ म्हणून वापरलं जाऊ शकतं?

काहीजण म्हणतात, भारत पाण्याचा वापर ‘वॉटर बॉम्ब’ म्हणून करू शकतो का? म्हणजे, पाणी अडवून ठेवायचं आणि अचानक सोडून पाकिस्तानात पूर आणायचा. पण सध्या भारताकडे अशी क्षमता नाही. उलट, असं केलं तर भारतातच पूर येण्याची शक्यता जास्त आहे. कारण हे पाणी साठवण्यासाठी लागणारी यंत्रणा भारताकडे नाही.

भारताला भौगोलिक फायदा कसा?

सिंधू नदीचा उगम तिबेटमध्ये होतो, आणि भारत हा एक अपस्ट्रीम देश आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहावर भारताचा नैसर्गिक ताबा आहे. याआधी भारताने पाकिस्तानला पूरविषयक माहिती शेअर केली होती, पण आता तीही थांबवण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे माजी जलसंधी आयुक्त शिराझ मेमन यांनी तर असंही म्हटलंय की, भारत आधीच फक्त 40% माहिती शेअर करत होता!

आंतरराष्ट्रीय पडसाद काय?

2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर चीनने *ब्रह्मपुत्रा नदी*वर नियंत्रण घेतलं होतं. त्यामुळे भारताच्या या निर्णयाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिसाद मिळू शकतो. पण याचा अर्थ असाही होतो की, पाण्यावरून तणाव वाढण्याची शक्यता आहे.

आता पुढे काय?

भारताला पाणी अडवायचं असेल, तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात धरणं, जलसाठे आणि कालव्यांचं जाळं उभारावं लागेल. याला वेळ, पैसा आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा विचार करावा लागेल. सध्या तरी भारताचा हा निर्णय हा राजकीय संदेश जास्त आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी कमी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण भविष्यात भारताने आपल्या हक्काचं पाणी पूर्ण वापरायला सुरुवात केली, तर पाकिस्तानसाठी ही डोकेदुखी ठरू शकते.

हाफिज सईदचा पहलगाम हल्ल्यात हात, हाशिम मूसाने यापूर्वीही केला होता हल्ला तपास यंत्रणांच्या हाती लागली मोठी माहिती

0

पहलगामजवळच्या बैसरन खोऱ्यात झालेला दहशतवादी हल्ला लश्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवादी गटाने घडवला होता. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांमध्ये बहुतेक परदेशी नागरिक होते आणि त्यांना स्थानिक दहशतवाद्यांनी तसेच कश्मीरमधील त्यांच्या सक्रिय स्लीपर सेलने मदत केली, अशी माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व दहशतवादी 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्करचा प्रमुख हाफिज सईद याच्या थेट संपर्कात होते, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.

हाशिम मूसाने यापूर्वीही केला हल्ला

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , दहशतवाद्यांचे हे विशिष्ट मॉड्यूल कश्मीर खोऱ्यात अनेक दिवसांपासून सक्रिय होते. सोनमर्ग, बूटा पथरी आणि गांदरबल इथे झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमागे याच गटाचा हात असल्याचाही दाट संशय आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये बूटा पथरी येथे झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात भारतीय लश्कराच्या दोन जवानांसह चार लोकांचा बळी गेला होता. त्याच महिन्यात सोनमर्ग येथे बोगदा बांधणाऱ्या मजुरांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात सहा मजूर आणि एका डॉक्टरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पहलगाम हत्याकांडातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या हाशिम मूसाचा पहलगाम हल्ल्याचाही संशयित आहे.

हल्लेखोर जुनैद

लश्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी आणि कुलगामचा रहिवासी जुनैद अहमद भट्ट याची सुरक्षा दलाच्या जवानांसोबत चकमक झाली होती. डिसेंबर २०२४ मध्ये दाचीगाम येथे झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा करण्यात आला होता. त्याच्यासोबत असलेले दहशतवादी तेव्हा पळून जाण्यात यशस्वी झाले होते. हे दहशतवादी जवळच्या जंगलाचा फायदा घेत फरार झाले होते. आतापर्यंतच्या हल्ल्यांमध्ये दिसून आलं आहे की कोणताही मोठा हल्ला झाल्यानंतर दहशतवादी जंगलात लपून बसतात आणि त्यांच्या म्होरक्यांकडून पुढचा आदेश मिळेपर्यंत शांत राहतात.

पहलगाम हल्ल्यात हाफिज सईदची भूमिका काय?

पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या संपर्कात लश्करचा प्रमुख हाफिज सईद आणि त्याचा साथीदार सैफुल्लाह हे दोघे सातत्याने होते असा दाट संशय आहे. हे दोघे पाकिस्तानात बसून या दहशतवाद्यांना काय करायचे ते सांगत होते असे मानले जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानची सेना आणि त्याची गुप्तचर संस्था इंटर-सर्विसेज इंटेलिजेंस (ISI) यांनीही वेळोवेळी मदत केली होती.

हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटामध्ये भारताबाहेरील दहशतवादी असून त्यांना कश्मीरमधील स्लीपर सेल आणि स्थानिकांनीही मदत केल्याचा संशय आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि त्यांच्याबद्दल कोणाला कळू नये याची खात्री बाळगणे हे त्यांचे मुख्य काम असते.

पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशवाद्यांनी एकाच वेळी पाच जणांची हत्या केली, दोघांना खुल्या मैदानात गोळ्या घालण्यात आल्या तर इतरांना बैसरनच्या कुंपणाजवळ गोळ्या घालण्यात आल्या. हे लोकं कुंपण ओलांडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना मारण्यात आले. जे कुंपण ओलांडून पळाले त्यांचा जीव वाचला. हल्ल्यातून वाचलेल्या लोकांनी सांगितले की, हल्लेखोरांनी गोळीबार सुरू करण्यापूर्वी त्यांच्याशी बातचीत केली होती.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी- 

जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी पहलगाम हल्ल्याशी संबंधित तीन संशयितांची रेखाचित्रे जारी केली आहेत. यापैकी दोन पाकिस्तानी नागरिक आहेत. हाशिम मूसा उर्फ ​​सुलेमान, अली भाई उर्फ ​​तल्हा आणि अब्दुल हुसैन ठोकर अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. ठोकर हा काश्मीरमधील अनंतनागचा रहिवासी आहे. पोलिसांनी या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला आणि त्यांना पकडून देण्यासाठी मदत करणाऱ्यांना 20 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

सुरक्षा दलाच्या जवानांनी गुरुवारी बैसरन जवळच्या जंगलात, दहशतवाद्यांच्या गटाने वापरलेले ठिकाण शोधून काढले आहे. या ठिकाणाचा शोध लागल्याने हे दहशतवादी काय करत होते याची माहिती मिळण्यास मदत होईल. भारतीय जवानांनी या भागात शोध मोहीम सुरू केली असून ती तीव्र केली जाणार आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कसून प्रयत्न करत आहेत. स्थानिक नागरिकांकडूनही माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जेणेकरून या दहशतवादी गटाचे नेटवर्क उद्ध्वस्त करता येईल. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

नक्षलवाद विरोधात देशातील सर्वात मोठी कारवाई, 36 तास ऑपरेशन सुरू 700 नक्षलवाघांना १०००० पोलिसांनी घेरले

0

छत्तीसगडमध्ये दहशतवाद विरोधात मोठी कारवाई सुरक्षा दलांनी सुरु केली आहे. छत्तीसगड पोलीस डीआरजी, कोब्रा बटालियन व सीआरपीएफ अशा तीन तुकड्याच्या माध्यमांनी ऑपरेशन सुरु केले आहे. 36 तासांपासून ऑपरेशन सुरू आहे. 700 नक्षलवाघांना दहा हजार पोलिसांनी घेरले आहे. गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांमध्ये मायावी आणि मोस्ट वॉन्टेड कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा या ठिकाणी आहे. चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहे. हिडमा या चकमकीत बचावला आहे.

बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा या पहाडीवर नक्षलवाद्यांचे मुख्य सूत्रधार असलेले नेते वास्तव्य करतात. या भागांत 36 तासांपासून अभियान सुरु करण्यात आले आहे. छत्तीसगड पोलीस डीआरजी, कोब्रा बटालियन व सीआरपीएफ अशा तीन तुकड्याच्या माध्यमांनी ऑपरेशन सुरु केले आहे. या भागांत 700 च्या वर नक्षलवादी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यावर पोलीस बळ वाढवण्यात आले आहे. दहा हजार पोलिसांनी या पहाडीला घेराव केला आहे. साडेचार ते पाच तास चकमक चालली. त्यात सात नक्षलवाद्यांना कंट्स्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले. सध्या चकमक थांबली तरी कोंबिंग ऑपरेशन या भागात सुरूच आहे.

नक्षलवाद्यांचे मोठे नेते हिडमा, देवा यांना टार्गेट करण्यासाठी पोलिसांनी या पहाडीला घेराव केला आहे. हिडमा या चकमकीत थोडक्यात बचावला आहे. सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांना पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद केले आहे. सुरक्षा दलांनी संवेदनशील छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर असलेल्या कर्रेगुट्टा टेकड्यांना वेढा घातला आहे. घनदाट जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला हा परिसर माओवाद्यांच्या बटालियन क्रमांक १ चा अड्डा मानला जातो. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या पलायनाचे सर्व मार्ग बंद केले आहेत.

३१ मार्च २०२६ पूर्वी देशातील नक्षलवाद संपवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही महिन्यांपूर्वीच सांगितला आहे. त्या दृष्टिने देशाला नक्षलमुक्त करण्यासाठी कारवाई सुरु आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांत छत्तीसगडमधील विविध चकमकींत आतापर्यंत जवळपास १५० नक्षलवाद्यांच्या खात्मा करण्यात आला आहे. त्यात एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या एका वरिष्ठ नक्षली नेत्याचा समावेश आहे.

भारताचं मोठं पाऊल, फेब्रुवारी 2021 चा हा करार रद्द? उघड उघड दोन हात करत पाकिस्तानला थेट भिडणार?

0

काश्मीरच्या पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा बळी गेल्यानंतर दिल्लीत सरकारी स्तरावर वेगवान घडामोडी सुरु आहेत. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करुन पर्यटकांचा जीव घेतला होता. हा गेल्या काही वर्षांमधील मोठा दहशतवादी हल्ला आहे. निष्पाप भारतीयांचे बळी गेल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना आणि यामागील सूत्रधारांना आम्ही सोडणार नाही, अशा इशारा दिला होता. आम्ही त्यांच्या कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर शिक्षा त्यांना देऊ. या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी त्यांना शोधून आम्ही शिक्षा करु, असे मोदींनी म्हटले होते. तत्पूर्वी भारताने 1960 साली पाकिस्तानसोबत असलेला सिंधू जल करार रद्द करुन पाकिस्तानला मोठा धक्का दिला होता. यानंतर आता मोदी सरकार आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकारकडून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील असलेली शस्त्रसंधी रद्द करण्यासंदर्भात विचार सुरु आहे. मोदी सरकारचे हे पाऊल युद्धाच्या जवळ जाणारे ठरु शकते. त्यामुळे आता दिल्लीत नेमका काय निर्णय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, भारताकडून शस्त्रसंधी हटवण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरु आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानने सीमारेषेलगतच्या भागात हल्ला न करण्याचे वचन पाळलेले नाही. त्यामुळे आता भारताकडून शस्त्रसंधी हटवून उघड उघड शत्रूशी दोन हात करण्याचा विचार सुरु असल्याचे समजते. शस्त्रसंधी रद्द झाल्यास पाकिस्तानी लष्करावरील दबाव वाढू शकतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फेब्रुवारी 2021 मध्ये शस्त्रसंधी करार झाला होता. मात्र, तेव्हापासून पाकिस्तानात मूळ असलेल्या लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि लहानसहान दहशतवादी संघटनांकडून काश्मीरमध्ये घुसखोरी होत आहे. पाकिस्तानी लष्कराकडूनही अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे हा शस्त्रसंधी करारच रद्द करुन उघडपणे पाकिस्तानशी दोन हात करण्याची योजना भारत सरकारच्या मनात घोळत असल्याची माहिती आहे.

सर्वपक्षीय बैठकीतकाय घडलं?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत गुरुवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, संरक्षणमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी सविस्तर तपशील पुरवला. तसेच केंद्र सरकारने यानंतर घेतलेल्या निर्णयांबद्दलही सर्वपक्षीय नेत्यांना सांगण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ला अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामुळे संपूर्ण देश चिंतेत आहे. त्यामुळे आता भारतीय सरकार याविरोधात कठोर पावले उचलेल, असे सर्वपक्षीय बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी म्हटले की, सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. केंद्र सरकार जे काही पाऊल उचलेल, त्याला विरोधी पक्षाचा पाठिंबा असेल, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.