Home Blog Page 103

‘सिंधू पाणी वाटप करार स्थगित केलाच नाही’, बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य, दिला त्या पत्राचा संदर्भ

0

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी नाव विचारून गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे, तसेच पाकिस्थानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भारतानं सिंधू नदी कराराला स्थगिती दिली आहे, यावरून दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, सिंधू नदी पाणी वाटप करार भारत सरकारनं रद्द केला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

पाकिस्तानला पाणी बंद केल्याचं पत्र देण्यात आलं आहे. मात्र पत्रामध्ये कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही. धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही असा कुठेही पत्रात उल्लेख केलेला नाही. याचाच अर्थ सिंधू पाणी वाटप करार भारत सरकारनं रद्द केलेला नाही. माझ्या भाषेत नरोबा कुंजोबा आणि कायद्याच्या भाषेत स्टेटस्को असं हे पत्र आहे.  त्यामुळे त्यांनी जर  जनतेला हे पत्र दाखवलं, तर सरकार नेमकी कुठल्या प्रकारची कारवाई करतय हे समोर येईल. हा गंभीर मुद्दा असून शासनाने याकडे डोळे झाक करू नये, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सिंधू वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून सातत्यानं पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. यावर देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना एका गोष्टीची जाणीव आहे की, भारत पाणी थांबू शकत नाही. कारण ते थांबवण्यासाठी व्यवस्था आहे का ? पावसाळ्यापूर्वी ती व्यवस्था होऊ शकते का ? त्यामुळेच पाकिस्तानचे नेते तुम्हाला उचकावत आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

श्री रामेश्वर पॅनलकडून विरोधक ‘सुपडासाफ’; कर्जदार भागभांडवलदार ठेवीदारांनी ‘किडी’चा केला पक्का बंदोबस्त

0

श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या 32 वर्षातील पारदर्शक कारभारावर विश्वास टाकत कर्जदार भाग भांडवलदार आणि ठेवीदारांनी काल पार पडलेल्या निवडणुकीमध्ये स्व- हितार्थ सभासदांवर निवडणूक लादणाऱ्या श्री नीलकंठेश्वर पॅनलचा ‘शर्म’नाक पराभव करत सिंहगड रोड परिसरात नावाजलेल्या श्री रामेश्वर सहकारी पतसंस्था कारभारात ढवळाढवळ करून संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘किडी’चा पक्का बंदोबस्त केला आहे. काल पार पडलेल्या मतदानामध्ये 90 टक्के मतांची पसंती श्री रामेश्वर पॅनलला देऊन संस्थेची भावी वाटचाल निश्चित करण्याचेही काम सभासदांच्या वतीने करण्यात आले आहे.

आर्थिक स्थिती सधन परिवारातील सर्व संचालक मंडळ, कर्ज वितरणातील नियमितता, संचालक कर्मचारी वर्गाची सौहार्दपूर्ण वागणूक याला पसंती देत श्री. रामेश्वर पॅनल प्रचंड बहुमताने विजयी होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. 32 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था 27000 भाग भांडवलाची संस्था आज ५७ कोटी कारभार करत असून आगामी काळामध्ये सभासदांनी टाकलेल्या प्रचंड विश्वासाच्या जोरावर अनेक अभिमानास्पद टप्पे पार करण्यात येणार असल्याचे संस्थापक बाळासाहेब हगवणे आनंद उत्सव कार्यक्रमांमध्ये जाहीर केले.

श्री रामेश्वर सहकारी पतसंस्थेमध्ये सध्या ठेवी ३३ कोटी पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून असून नव्या संचालक मंडळाच्या सक्रिय सहभागाने यामध्ये प्रचंड वाढ शक्य आहे. त्यातच दरवर्षी पतसंस्थेच्या वतीने केले जाणारे लाभांश वाटप अन् पतसंस्थेमार्फत देण्यात आलेल्या २४ कोटी कर्जाची ही नियमितता लक्षात घेता संस्थेच्या सभासदांच्या मनात ठेवी सुरक्षित असल्याबाबत कोणतीही शंका निर्माण होणार नाही यासाठी नव्या संचालकांनी काम करण्याचा संकल्प केला आहे.

श्री रामेश्वर सहकारी पतसंस्थेच्या पुढील वाटचालीमध्ये सभासदांना आर्थिक साक्षर करण्यासाठी प्रशिक्षण व्यवस्था उभी करणे, पतसंस्थेची उलाढाल आगामी काळात २०० कोटी पर्यत करणे आणि एनपीए दर ०% करण्याचे ध्येय असून नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजक तरूणांना व्यवसाय उभारणी व विकासासाठी सुलभ कर्ज योजना राबविणे, नवीन आकर्षक व्याजदराच्या थेट योजना कार्यान्वित करणे, सभासदांना व्यक्तिगत विमा संरक्षण लाभ देण्याच्या योजना तयार करणे यासाठी श्री रामेश्वर पॅनलने मतदानाच्या दरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सर्व संचालक मंडळ बांधील राहील असेही संस्थापक बाळासाहेब हगवणे यांनी स्पष्ट केले.

श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्था निकाल पत्र नमुना-

अ.क्र  उमेदवाराचे नांव       एकूण वैध मते    निकाल 

दांगट सचिन दशरथ                 १६०७          विजयी

दांगट विकास पंढरीनाथ            १६२३          विजयी

३ गवांडे नागेश कान्हू                    १५५           पराभूत

घुले अभिजीत सोपन                १५९८         विजयी

घुले बाळासाहेब काळूराम          १६१६        विजयी

६ गुंजाळ सोमनाथ नामदेव             १३६        पराभूत

हगवणे बाळासाहेब अर्जुनराव       १६००    विजयी

८ हगवणे राजेंद्र गणपत                   १६००     विजयी

९ जाधव बाळकृष्ण श्रीरंग                १४०      पराभूत

१० लगड देवीदास एकनाथ              १५६३     विजयी

११ मते विलास साधू                       १५३८     विजयी

१२ रोकडे विकास बबनराव               १२६     पराभूत

१३ शर्मा राधेश्याम बन्सीलाल             १६८    पराभूत

१४ शिंदे संजय सुबराव                    १०२      पराभूत

एकुण वैध मतपत्रिका :- १७६०  अवैध मतपत्रिका संख्या :- १३४

श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसस्था मयादित, जयप्रकाश नारायणनगर नांदेड, पुणे संस्थेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपासभापती शेखर दांगट पाटील, नितीन दांगट पाटील, उपमहापौर दिलीपभाऊ बराटे, नगरसेविका वर्षाताई तापकीर, हभप दिलीपभाऊ बराटे, चंद्रकांत पंडित, राम बराटे खडकवासला अध्यक्ष सचिन मोरे, यांच्यासह विविध गावचे सरपंच उपसरपंच सदस्य, अनेक मान्यवर, मतदार बंधू भगिनीसह नवनियुक्त संचालक मंडळाने ग्रामदैवताच्या आशीर्वादानंतर आनंद उत्सव साजरा केला.

पहलगाम सुरक्षेत हलगर्जीपणा पोलिस किंवा सीआरपीएफचाही जवान तैनात नव्हता; हल्ला करणारे दहशतवादी कुठे गेले? एनआयएचा तपास कुठपर्यंत पोहचला?

0

जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यास आता सहा दिवस झाले आहे. परंतु हल्ला करणारे दहशतवादी अजूनही सापडले नाही. हल्लेखोर कुठे गेले आहे? लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. त्यानंतरही त्यांचा ठावठिकाणा अजून समजला नाही. हे दहशतवादी पाकिस्तानात पळून गेल्याचे म्हटले जात आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थनिकांच्या पाठिंब्याने ते लपल्याची आणखी एक शक्यता व्यक्त केली जात आहे.

पहलगाम हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्यात आला आहे. एनआयएकडून मृत्यू झालेल्या पर्यटकांचे नातेवाईक, जखमी झालेले पर्यटक आणि स्थानिक लोकांची चौकशी करण्यात आली. एनआयए या प्रकरणाचा तपासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. तपास संस्थेला काही संकेत मिळाले आहे. त्याच्या आधारावर काम केले जात आहे. लवकरच काही सकारात्मक गोष्टी समोर येतील, असे अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सुरक्षा एजन्सीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पहेलगाममधील सुरक्षा एक चूक आहे. निष्काळजीपणा किंवा समजुतीचा अभाव आहे. त्या ठिकाणी सुरक्षेत हलगर्जीपणा झाला आहे, हे निश्चित आहे. हल्ल्याच्या वेळी बैसरन खोऱ्यात जम्मू-काश्मीरचा कोणताही पोलिस किंवा सीआरपीएफचा कोणताही जवान तैनात नव्हता. तर बैसरणच्या खाली सुमारे ५ किमी अंतरावर सीआरपीएफ कंपनीची चौकी आहे. पर्यटक या चौकीच्या समोरून दरीत पोहोचत होते. सीआरपीएफच्या तीन प्लाटूनपैकी दोन प्लाटून सामान्य गस्तीवर काम करतात आणि एक पोलीस स्टेशन अंतर्गत काम करते.

सुरुवातीला बैसरन खोऱ्यात इतका मोठा हल्ला झाला आहे, त्यावर सुरक्षा यंत्रणेचा विश्वास बसला नाही. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर 45 मिनिटांनंतर पोलीस आणि सीआरपीएफ घटनास्थळी पोहचले. आता बैसरनमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. ज्या भागावर सुरक्षा नाही, त्याठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी आणली जाणार आहे. संवेनशील ठिकाणी पर्यटकांना नो एन्ट्री करण्यात येणार आहे.

हैदराबाद, बॉम्बे, सातारा गॅझेटिअर्स न्या. शिंदे समिती शोध पूर्णत्वास; फक्तं ५८ लाख कुणबी नोंदी,सर्वाधिक नोंद येथे

0

मराठा आरक्षणावरुन राज्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने रान पेटवले होते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमून कुणबी जातीच्या नोंदी शोधून काढल्या. या समितीचा नुकताच चौथा अहवाल मंत्रिमंडळात सादर झाला होता. आता या समितीला आतापर्यंत तब्बल ५८ लाख ८२ हजार ३६५ मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत.

मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येऊ नयेत त्यांना त्यातून आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.या समितीने आतापर्यंत विविध गॅझेट्स आणि कागद नोंदीचा तपास करुन ५८ लाख ८२ हजार ३६५ मराठा कुणबी नोंदी हुडकून काढल्या आहेत.आता या नोंदींचा लाभ २ कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना होणार आहे. आतापर्यंत या नोंदींच्या आधारे ८ लाख २५ हजार ८५१ लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा ओबीसी अर्थात इतर मागासवर्गात समावेश करण्यात आला आहे.

न्या. शिंदे समितीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. या समितीने हैदराबाद गॅझेटिअर्स तसेच बॉम्बे आणि सातारा गॅझेटिअर्समधील नोंदींचाही शोध घेतला आहे. आतापर्यंत समितीला सापडलेल्या ५८ लाख ८२ हजार नोंदींपैकी अमरावती विभागात सर्वाधिक २५,७४,३६९ नोंदी सापडल्या आहेत. तर सर्वात कमी लातूरमध्ये ९८४ नोंदी सापडल्या आहेत.

कोकण विभागात ८,२५,२४७ नोंदी, पुणे विभागात ७,०२,५१३ नोंदी, नाशिक विभागात ८,२७,४६५ नोंदी, छत्रपती संजाभीनगरमध्ये ४७,७९५ नोंदी, अमरावती विभागात सर्वाधिक २५,७४,३६९ नोंदी तर नागपूर विभागात ९,०४,९७६ नोंदी आढळल्या आहेत.

शेवटचा अहवाल सरकारला सादर होणार

कुणबी मराठा नोंदींचा पडताळा करणाऱ्या शिंदे समितीचे काम आता संपत आले असून ते शेवटच्या टप्प्यात  आहे. हैदराबाद गॅझेटिअर्स तसेच बॉम्बे आणि सातारा गॅझेटिअर्सचा शोधही आता संपत आला आहे. जून महिन्यात या समितीचा शेवटचा अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे.

राज्यात उष्णतेची लाट ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ चंद्रपूर 45.8 अंश; येथे 27, 28 एप्रिल रोजी गारपिटीची शक्यता

0

राज्यात सध्या हवामानात कमालीचे बदल होत असून, अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. त्यातच आता विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, अकोला, नागपूर, जालना आणि बीड या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

चंद्रपूरमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 45.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहेत. जळगावमध्ये तापमान 44.3 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. पुण्यात कमाल तापमान 41 अंश आणि नाशिकमध्ये 38 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत तापमान 35 अंशांपर्यंत राहील, परंतु दमट हवामानामुळे उकाडा जाणवेल.

गारपिटी आणि पावसाचा इशारा

विदर्भातील काही भागांत 27 आणि 28 एप्रिल रोजी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद होऊ शकते. लातूर, धाराशिव, सोलापूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. कोकणातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी सावधानता

उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर पडायचं टाळायचं आवाहन करण्यात आलं आहे. पुरेसं पाणी पिणे, हलके कपडे घालणे आणि उष्माघातापासून बचाव करण्याचे सल्ले हवामान खात्यानं दिले आहेत. दुसरीकडे, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. विशेषत: आंबा, काजू आणि द्राक्ष यांसारख्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.

हवामान तज्ज्ञांचे मत

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितले की, “एप्रिल अखेरीस वातावरणात अचानक बदल होत असून, गारपिटी आणि पावसाची शक्यता वाढली आहे.

मराठा-ब्रिटिश युद्ध निशाणी; श्रीमंतराजे भोसलेंची प्रथम तलवार ऑनलाईन विक्रीस; 7000 ग्रेट ब्रिटन पाउंडमध्ये लिलाव होणार अशी चर्चा

0

नागपूरमधील भोसले घरण्याची ऐतिहासिक तलवार चक्क आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाइन विक्रीला काढण्यात आली आहे. श्रीमंत राजे रडुजी महाराज भोसले (प्रथम) यांच्या ऐतिहासिक तलवारीचा लिलाव होणार आहे. दरम्यान, नागपूरकर भोसले घराण्याची तलवार कंपनीपर्यंत इंग्लंडला कशी गेली? असा प्रश्न नागपूरकर, पत्रकार, इथिहासाकर, इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींना पडला आहे.

न्यूयॉर्कचे एक ब्रोकर कंपनीने तलवारीचा लिलावात ठेवला आहे, नागपूरचे संस्थापक श्रीमंत रघुजी महाराज भोसले प्रथम यांची तलवार असल्याचा दावा विक्रीच्या जाहिरातीत कंपनीकडून करण्यात आला आहे. १८५३ ते १८६४ या कालावधीत श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले, दुसरे (उर्फ आप्पासाहेब महाराज) यांच्या नेतृत्वात मराठा विरुद्ध ब्रिटिश युद्ध झाले होते. या कालावधीत ब्रिटिशांनी नागपुरात खजिना लुटल होता, त्यामध्ये कदाचित ही तलवार गेली असावी अशी शक्यता आहे. मात्र ही तलवार विक्री करणाऱ्या कंपनीकडे कशी गेली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Sotheby’s ही ब्रिटिशांची मल्टिनॅशनल कंपनी असून त्याचे मुख्यालय न्यूयॉर्कला आहे. कंपनीत सात हजार ग्रेट ब्रिटन पाउंडमध्ये लिलाव होणार अशी चर्चा आहे. या लिलावामुळे इतिहासकार, पत्रकार, शिवप्रेमी आणि सामान्य जनतेत उत्सुकता आणि प्रश्नांचा काहूर निर्माण झाला आहे. ही तलवार इंग्लंडपर्यंत कशी पोहोचली, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. १८५३ ते १८६४ या कालावधीत झालेल्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी नागपूरच्या भोसले राजघराण्याचा खजिना लुटला होता. यात रत्नजडित दागिने, शस्त्रसाठा आणि तलवारींचा समावेश होता. कदाचित याच लुटीदरम्यान ही तलवार इंग्लंडला गेली असावी, अशी एक शक्यता आहे. दुसरी शक्यता अशी की, एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ही तलवार गुप्तपणे नेली आणि कालांतराने ती विकली किंवा कोणाला भेट दिली असावी.

Inauguration of the International Conference on Skill Development and TVET

0

    

Inauguration of the International Conference on Skill Development and TVET

MoU Signed Between SSPU and UNESCO

Pune, April 25:“Government-run skill development schemes lead to positive outcomes for society. Therefore, ministers should proactively introduce new initiatives for the progress of all,” said Dr. Neelam Gorhe, Deputy Chairperson of the Maharashtra Legislative Council. She was speaking as the chief guest at the inauguration of a one-day international conference on “Skill Development and TVET (Technical and Vocational Education and Training)” organized jointly by Symbiosis Skills and Professional University (SSPU), UNESCO, and NSDC.

The event was presided over by Dr. S.B. Mujumdar, President of Symbiosis. Also present were r. Friedrich Huebler, Head, UNESCO-UNEVOC, Sonam Wangchuk, Founding Director of HIA Ladakh, Shekhar Singh, Commissioner of PCMC, and Dr. Swati Mujumdar, Pro-Chancellor of SSPU.

An MoU was signed between SSPU and UNESCO for global educational exchange, innovative teaching methods, and capacity building.

Additionally, heartfelt condolences were offered for the tragic incident in Pahalgam.

Dr. Neelam Gorhe emphasized, “To bring women into the mainstream of society, their skills and talents should be given greater opportunities. It is essential to focus on encouraging their abilities rather than their appearance. Efforts must be made to underline their importance in society. Furthermore, for sustainable development, skills in rural areas related to environment, water, and health are critically important.”

Sonam Wangchuk stated, “AI and the Internet have drastically changed the world of education. In earlier times, the learning methods required stronger emphasis on intelligence. Along with practical education, spiritual learning is equally important as it passes from one generation to another. The industry today needs skilled manpower. Although new education methods are excellent, practical implementation is crucial. Universities have become mere sources of information; therefore, there should be a transformation in future education systems. In this advanced era, teachers must rethink and change their roles. In the future, bright heads, skilled hands, and compassionate hearts will be the most important elements. Every college and university must become skill-focused.”

Dr. S.B. Mujumdar commented, “In a youthful nation like India, young people’s talents should be nurtured and employment opportunities should be created accordingly. This way, rather than youth seeking jobs, jobs will seek them. A proper synergy between industries and universities should be established and utilized for national progress. Women empowerment is crucial for the country’s development.”

Dr. Swati Mujumdar added, “Following the vision of Prime Minister Narendra Modi’s ‘Skill India’ and ‘Make in India’ initiatives, our university is taking progressive steps. SSPU has a significant contribution to building a developed India. In line with ‘Empowered Women, Empowered Society’, we are focusing on women’s development. Over the past five years, thousands of women have been trained in future-ready skills. We emphasize providing industries with skilled workers needed in the modern era. Teachers play a crucial role in nation-building, and our university works toward supporting and strengthening them.”

Tim Curtis, Director of the UNESCO Regional Office for South Asia (New Delhi), shared his message via video, saying, “With the global youth population growing, major employment challenges will arise. Along with women empowerment, there must be a strong focus on their skill development. In the modern era, AI and sustainable development will play key roles.”

 

भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा सर्व माध्यम वाहिन्यांसाठी आदेश पारित; थेट कव्हरेजपासून ‘परावृत्त’चा सल्ला

0

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवरती झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने कडक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या हालचाली व रणनीती यांच्यासह कोणतेही रिअल-टाइम कव्हरेज, दृश्यांचा प्रसार किंवा “स्त्रोत-आधारित” माहितीवर आधारित वृत्तांकन करू नये असे आदेश पारित करण्यात आले आहेत. संरक्षण आणि इतर सुरक्षा संबंधित ऑपरेशन्सशी संबंधित बाबींवर वृत्तांकन करताना अत्यंत जबाबदारीने वागण्याचा आणि विद्यमान कायदे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्लाही माध्यमांना देण्यात आला आहे. सैन्याच्या सुरक्षेला धोका पोहोचणार नाही याची खात्री करणे ही एक माध्यमांसह सर्वांची सामायिक नैतिक जबाबदारी आहे असेही आदेशात म्हटले आहे.

भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालय उपसंचालक यांनी केबल टेलिव्हिजन (सुधारणा) नियम, २०२१ अंतर्गत नोंदणीकृत टीव्ही चॅनेल्सच्या स्वयं-नियामक संस्था, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या संघटना/संस्था यांना लेखी प्रती पाठवण्यात आल्या आहेत.

भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा माध्यम वाहिन्यांसाठीचा आदेश-

१. राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी, सर्व माध्यम प्लॅटफॉर्म, वृत्तसंस्था आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना संरक्षण आणि इतर सुरक्षा संबंधित ऑपरेशन्सशी संबंधित बाबींवर वृत्तांकन करताना अत्यंत जबाबदारीने वागण्याचा आणि विद्यमान कायदे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

२. विशेषतः: संरक्षण कारवाया किंवा हालचालींशी संबंधित कोणतेही रिअल-टाइम कव्हरेज, दृश्यांचा प्रसार किंवा “स्त्रोत-आधारित” माहितीवर आधारित वृत्तांकन करू नये. संवेदनशील माहितीचा अकाली खुलासा अनवधानाने शत्रुत्वाच्या घटकांना मदत करू शकतो आणि ऑपरेशनल प्रभावीपणा आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आणू शकतो.

३. भूतकाळातील घटनांनी जबाबदार वृत्तांकनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. कारगिल युद्ध, मुंबई दहशतवादी हल्ला (२६/११) आणि कंधार अपहरण यासारख्या घटनांदरम्यान, अनिर्बंध कव्हरेजचे राष्ट्रीय हितांवर अनपेक्षित प्रतिकूल परिणाम झाले.

४. राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यात मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावतात. कायदेशीर जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त, आपल्या सामूहिक कृतींमुळे चालू असलेल्या ऑपरेशन्स किंवा आपल्या सैन्याच्या सुरक्षेला धोका पोहोचणार नाही याची खात्री करणे ही एक सामायिक नैतिक जबाबदारी आहे.

५. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यापूर्वीच सर्व टीव्ही वाहिन्यांना केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (सुधारणा) नियम, २०२१ च्या नियम ६(१)(पी) चे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. नियम ६(१)(पी) मध्ये असे म्हटले आहे की केबल सेवेमध्ये कोणताही कार्यक्रम प्रसारित केला जाऊ नये ज्यामध्ये सुरक्षा दलांच्या कोणत्याही दहशतवादविरोधी ऑपरेशनचे थेट कव्हरेज असेल, जिथे मीडिया कव्हरेज योग्य सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याद्वारे नियतकालिक ब्रीफिंगपर्यंत मर्यादित असेल, जोपर्यंत असे ऑपरेशन पूर्ण होत नाही.”

६. असे प्रसारण केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (सुधारणा) नियम, २०२१ चे उल्लंघन करते आणि त्याअंतर्गत कारवाईस पात्र आहे. म्हणून, सर्व टीव्ही वाहिन्यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी दहशतवादविरोधी कारवाई आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अशी कारवाई पूर्ण होईपर्यंत मीडिया कव्हरेज योग्य सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याद्वारे नियतकालिक ब्रीफिंगपुरते मर्यादित असू शकते.

७. सर्व भागधारकांना विनंती आहे की त्यांनी राष्ट्राच्या सेवेतील सर्वोच्च मानकांचे पालन करून कव्हरेजमध्ये दक्षता, संवेदनशीलता आणि जबाबदारी बाळगत राहावे.

८. मंत्रालयातील सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेने हे जारी केले जाते.

पुणे भाजप शहराध्यक्षच्या ‘व्यायामशाळा घोटाळ्या’ची चौकशी अंगलट?; काँग्रेस कार्यकर्त्याची संरक्षणाची मागणी

0

गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता! मग विरोधातला आवाज असला की त्याच्यावर ठेवली जाणारी पाळत, केल्या जाणारे टार्गेट अन् झुंडशाहीचे वैचारिक हल्ले अंगवळणी पडत असताना पुणे भाजपा शहराध्यक्ष यांच्याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे तो म्हणजे त्यांच्या व्यायाम शाळा घोटाळ्याची चौकशी करा अशी मागणी करणाऱ्या तक्रारदार काँग्रेस कार्यकर्त्यावर 24 तास पाळत ठेवण्याचे काम केले जात आहे. विशेष म्हणजे संबंधित कार्यकर्त्याला आपल्या जीव धोक्यात आल्याची जाणीव झाल्याने तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देत भाजप वरिष्ठांनाही पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ मधील कै भानुदास गेजगे व्यायामशाळा सानेगुरुजी नगर, व लोकमान्य नगर व्यायामशाळा, तसेच कै चंद्रकांत बोत्रे व्यायामशाळा भ्रष्टाचार प्रकरण माहिती अधिकारात अधिकृतपणे माहिती घेऊन उघडकीस आणले. त्यानंतर पुण्यातील अग्रगण्य वृत्तपत्रांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्या छापून गंभीर विषयाला वाचा फोडण्याचे काम केले. याच गोष्टीचा राग मनात धरून सध्या भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे समर्थक कार्यकर्ते लक्ष करत आहेत. कांग्रेस कार्यकर्ते सागर धाडवे यांच्यावर स्थानिक सत्ताधारी नगरसेवकाच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून काल सकाळपासून पाळत ठेवण्यात येत असल्याची लेखी तक्रार पुणे पोलिसांना देण्यात आली आहे.

सागर धाडवे यांनी निवेदनात सांगितले आहे की मी सोसायटीच्या बाहेर पडल्यावर अन् व्यक्तिगत कामासाठी बाहेर आल्यावर माझ्या कधी पुढे कधी मागे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक रागाने पाहत आहेत. माझ्या सोसायटी बाहेरही कालपासून अंदाजे ८ ते १० जणांच्या टोळक्याने मुले उभी राहत असल्याने माझ्या कुटुंबातील सदस्य घाबरले असून मला बाहेर पडण्यास मनाई केली जात आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पुण्याचे पालकमंत्री, पुणे पोलिस आयुक्त, पर्वती पोलिस स्टेशन तसेच हे कृत्य भाजप वरिष्ठांना कळावे मला या भ्रष्टाचारा विरोधातील लढ्यात काही झाल्यास संबंधित सत्ताधारी नगरसेवकासच जबाबदार धरले जावे असे पुण्याचे खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनाही त्यांच्या ई-मेलवर संबंधित प्रकाराची माहिती कळविली आहे. स्थानिक पर्वती पोलिस स्टेशनलाही पत्र देऊन कळविले आहे असून लवकरच या गुंडशाही व झुंडशाहीवर कारवाई होईल ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी ह्याच नगरसेवकाने जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, वकील असीम सरोदे यांच्यावर हल्ला केला होता. ही प्रवृत्ती समाज्यासाठी, भाजपसाठी धोकादायक आहे त्यामुळे तत्पर कारवाई होईल ही अपेक्षा धाडवे यांनी व्यक्त केली आहे.

कोथरूडमध्ये वाहन चोरीच्या वाढते गुन्हे; राष्ट्रवादी युवक तर्फे कोथरूड पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी

0

कोथरूड मध्ये सध्या वाहन चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणत घडण्यात येत आहेत. गुजरात कॉलनी, वानाज कॉर्नर, आझाद नगर सारख्या वरदरळीच्या ठिकाणी सोसायटीमधून पार्क केलेल्या टू व्हिलर गाड्या चोरून नेऊन पेट्रोल संपेपर्यंत फिरवतात व पेट्रोल संपल्यानंतर गाडी कोठेही सोडून जातात, त्यामुळे गाडी वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येते.

गाडी चोरी गेलेली तक्रार कराव्यास व्यक्तींची आपण 24 तास वाट पाहू व त्यानंतर गुन्हा नोंदवू असे पोलीस कडून सांगण्यात येते.व 24 तासानंतर देखिल पोलीस गुन्हा नोंदविण्यास टाळ टाळ करतात. यादकदाचित गाडी चोरट्यानी त्या गाडीचा वापर करून दुसरा कुठला गुन्हा केला तर गाडी मालकाला त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो.
आज राष्ट्रवादी युवक कोथरूड विधानसभेचे वतीने अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी या सर्व प्रकारचे पोलीस निरीक्षक देशामाने साहेब यांना निवेदन दिले आणि वाहन चोरट्यांना पकडून त्यांच्यावरती कडक कारवाही ची मागणी देखील केली.

या वेळी देशमाने साहेब यांनी आठवड्याभरात या चोराचा तपास करून कडक कारवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी ऋषिकेश शिंदे, अमित भगत, अमित नवले, रोहन मिसाळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.