पुण्यात मतदार यादी पुनरीक्षणाचे फक्त ५५ टक्के काम; आठ दिवसांत उर्वरित ४५ टक्के पूर्ण करण्याचे प्रशासनास आव्हान

0
5

मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) हे नगरसेवकांच्या कार्यालयात बसून सुरू असले तरीही प्रशासनाला या कामाचा वेग वाढवता आलेला नाही. अनेक कर्मचारी संथ गतीने काम करत असल्याने पुण्यात केवळ ५५ टक्के काम झाले आहे.एका आठवड्यात तब्बल ४५ टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. दरम्यान, हे काम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, बचत गटांचे सहकार्य घ्या, अशा सूचना आज स्थायी समितीमध्ये देण्यात आल्या आहेत.

मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आज बैठक झाली. या वेळी भिमाले यांनी कामाच्या गतीबाबत समाधान व्यक्त करतानाच, उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी महिला स्वयं-सहाय्यता बचत गटांप्रमाणेच ‘कमवा आणि शिका’ योजनेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आवश्यकता भासल्यास मदत घ्यावी, असे भिमाले यांनी प्रशासनाला सांगितले. मतदार यादीत नावातील चुका दुरुस्त करणे, पत्ता बदलणे व इतर त्रुटी दूर करण्यासाठी ही शेवटची संधी आहे. ज्या नागरिकांची अद्याप केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसोबत (बीएलओ) भेट झालेली नाही, त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जवळच्या केंद्रावर नोंदणी पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नवं राजकीय वळण मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

प्रशासनाने या मोहिमेसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे शिक्षण, आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवांवर परिणाम झाला आहे का, याची माहिती भिमाले यांनी प्रशासनाकडून मागविली. विशेषतः शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना आरोग्य विभागातील तांत्रिक मनुष्यबळावर ताण निर्माण झाला आहे का, याबाबत त्यांनी विचारणा केली. प्रशासनाने बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, बीएलओच्या माध्यमातून ५५ टक्के काम पूर्ण झाले असून ८ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. बीएलओ नागरिकांना भेटू शकले नसल्यास ते समाजमंदिर, शासकीय कार्यालये व इतर निश्चित केंद्रांवर उपलब्ध राहतील. नागरिकांनी तेथे जाऊन नाव नोंदणी किंवा दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अधिक वाचा  MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्री कार्यालयापर्यंत? यांच मंत्रालयाचे कार्यालय पुन्हा का चर्चेत?

भिमाले म्हणाले, ”यापूर्वी मतदार यादीत २० टक्के नावे ही दुबार, मृत, स्थलांतरित झालेल्‍या नागरिकांची होती. पण एसआयआरमुळे आता ही नावे वगळली जाणार आहेत. त्यामुळे हे काम ५५ टक्के झाले असले तरी प्रत्यक्षात ७० ते ८० टक्के झाले आहे. उर्वरित काम ८ तारखेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.