विराट हिंदू संमेलन: नादब्रह्म मैदान परिसर, सिद्धकला वस्ती, वारजे येथे हिंदू शक्तीचा जनजागर! 

0
5

वारजे (पुणे): रविवार, दिनांक २९ मार्च रोजी सिद्धकला वस्ती परिसरातील नादब्रह्म मैदानावर ‘विराट हिंदू संमेलन’ मोठ्या उत्साहात पार पडले. पारंपरिक ढोल पथक व महिला लेझीम पथक यांच्या बरोबर सर्वांची पावले संमेलन स्थळी वळली. कार्यक्रमस्थळी परिसरातील महिला समूहाने काढलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी तसेच सर्व पुरुषांना अष्टगंध व महिलांना हळदीकुंकू,सोनचाफा आणि अत्तर लावून स्वागत करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजआणि भारतमातेच्या मूर्तींचे पूजन, गोमाता पूजन व दीपप्रज्वलन, शंखनाद करून सोहळ्याची सुरुवात झाली. परिसरातील महिला भजनी मंडळे व सप्तसूर संगीत विद्यालय यांनी सुरेल भजनांनी वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर गणेश वंदना व बालगोकुलमच्या मुलांनी पथ नाट्याद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला व कार्यक्रमाची सुरुवात झाली.सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक वार्तापत्राच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अधिक वाचा  गणितज्ञ प्रा. भापकर यांना काश्मीरमध्ये ‘उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ’ पुरस्कार

त्यानंतर परिसरातील मान्यवर व स्वछता कर्मचारी यांचा सत्कार केला. आजच्या घडीला महिला व मुली यांनी दुर्गा बनून स्वसंरक्षण करावे यासाठी प्रात्यक्षिक झाले. स्वारसंगीत प्रस्तुत सुरेल भक्तीगीते व कलानुभूती सेंटर ऑफ कथक यांनी सादर केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गाण्यांवरच्या कथक नृत्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. डॉ. सौ मनीषाताई केतकर यांनी आपल्या मधुर वाणीने पंचपरिवर्तनाची भग्वद्गीतेशी सांगड घालत विषय अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून दिला. संघवक्ते श्री नागेश जी पाटील यांनी संघाची शंभर वर्षांची वाटचाल उपस्थित श्रोत्यांपुढे कथन केली. धर्माचार्य हभप श्री धर्मराज हांडे महाराज यांनी हिंदू संमेलनाची व हिंदु एकतेची आवश्यकता काय हे आपल्या रसरसत्या वाणीने सांगून श्रोत्यांना खिळवून ठेवलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ आरती सिन्नरकर व सौ योगिता मराठे यांनी उत्कृष्ठ पणे केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. तदनंतर उपस्थित श्रोत्यांनी आमरसपुरी सह सुग्रास भोजनाचा आस्वाद लुटला.

अधिक वाचा  राज्यात ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरुवात, शेतकरी आणि उद्योगाच्या हिताचा समतोल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

संमेलनास 2100 हुन अधिक लोकांची उपस्थिती असूनही कोणताही गोंधळ न होता कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. संयोजक, सहसंयोजकांचे उत्तम नियोजन तसेच सर्व स्वयंसेवकांनी, सदस्यांनी, कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम यांनीच सोहळ्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

या सोहळ्याचे संयोजन हभप श्री. धर्मराज हांडे महाराज यांनी केले. सहसंयोजक श्री.श्रीराम ठुसे व श्री संतोष रेगे तसेच मातृशक्ती सह संयोजिका सौ. साकोजी होत्या. कार्यक्रमास नगरसेवक श्री. सचिन दोडके, श्री.भारतभूषण बराटे,सौ हर्षदाताई भोसले, सौ सायलीताई वांजळे, श्री मयुरेश वांजळे,मा. शिक्षण मंडळ अध्यक्ष श्री प्रदीप धुमाळ व मा. विरोधी पक्ष नेत्या सौ दीपालीताई धुमाळ, श्री वासुदेव भोसले यांची विशेष उपस्थिती होती.

अधिक वाचा  ‘विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही पण…’, पाहा शरद पवारांनी कोणाचे टोचले कान