Home Blog Page 60

शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय

0

मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत दहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यापुढे शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला. तसेच इचलकरंजी, जालना महानगरपालिकांना भरपाईपोटी ६५७ कोटी, ३९२ कोटी देण्याच निर्णय घेतला. पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य प्रशिक्षण केंद्रास अनुदान

रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्ट संचलित एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र या मतिमंद प्रवर्गाच्या कार्यशाळेस ७५ अनिवासी विद्यार्थी संख्येस अनुदान तत्त्वावर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयातील आकृतीबंधानुसार शिक्षक आणि शिक्षकेत्तर संवर्गाची एकूण १४ पदे अनुज्ञेय होत असल्याने त्याकरिता येणाऱ्या ५८ लाख ३७ हजार ९०८ रूपयांच्या दरवर्षीच्या खर्चासही मंजुरी देण्यात आली.

विधि व न्याय विभाग

राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक यानुसार 5 हजार 223 टंकलेखकाची एकाकी पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

इचलकरंजी, जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाईपोटी पाच वर्षांत अनुक्रमे ६५७ कोटी, ३९२ कोटी मिळणार

इचलकरंजी आणि जालना या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या महानगरपालिकांना वस्तू व सेवाकर भरपाईपोटी अनुदान देण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यानिर्णयामुळे पुढील पाच वर्षात इचलकरंजी महानगरपालिकेस 657 कोटी व जालना महानगरपालिकेस 392 कोटी रूपयांचा निधी प्राप्त होईल.

शेतीच्या वाटप पत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ

शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 85 नुसार शेत जमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते.

महसूल विभाग

नागपूर मधील पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या करार नाम्यातील अटी व शर्तीमध्ये बदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

१ हजार ३५१ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी

महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या (फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र – एफडीसीएम) १ हजार ३५१ पदाच्या सुधारित आकृतीबंधास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

शालेय शिक्षण विभाग

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालिन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

अंशकालीन निदेशकांना 48 तासिकांच्या अध्यापनाकरिता 12 हजार रूपये मानधन देण्यात येईल. त्यांनी 48 तासिकांपेक्षा अधिक काम केल्यास 200 रूपये प्रती तासिका याप्रमाणे 18 हजार रूपयांच्या मर्यादेत मानधन देण्यास मान्यता देण्यात आली. अंशकालीन निदेशकांव्यतिरिक्त अन्य तज्ञांची सेवा 200 रूपये प्रती तासिका घेण्यास या दराने घेता येणार आहे.

पणन विभाग

“महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प” संस्थेवर पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहणार आशियाई विकास बँक (ADB) सहाय्यित “महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) या प्रकल्प संस्थेवर यापुढे राज्याचे पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहतील. तसेच प्रकल्पाच्या संनियंत्रणासाठी असलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष मुख्य सचिवांऐवजी मुख्यमंत्री असतील असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

कृषि विभाग

राज्यातील कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांच्या पदनामात अनुक्रमे ‘उप कृषि अधिकारी’ व ‘सहाय्यक कृषि अधिकारी’ असा बदल करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील १९५ कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त १९५ कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस होते.

मान्सूनमध्ये विश्रांतीची संधी! मशागत व खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना ‘उघडीप’ मिळणार शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा वाचा सविस्तर….

0

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागांत मुसळधार पावसामुळे शेतीकामात अडथळे निर्माण झाले होते.मात्र, आता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होणार असून, मशागत व खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची ‘उघडीप’ मिळणार आहे.

हीच यादरम्यान शेतीच्या तयारीसाठी एक सुवर्णसंधी ठरू मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर हवामानाचा अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती आहे. माणिकराव खुळे (नि. हवामानतज्ज्ञ, IMD पुणे) यांच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरताना दिसणार असून, शेतकऱ्यांना मशागत व पेरणीसाठी आवश्यक अशी उघडीप मिळण्याची शक्यता आहे.

पावसाचा जोर ओसरणार

आज (२९ मे) पासून ते ३ जून या कालावधीत मुंबई व कोकण वगळता महाराष्ट्रातील इतर २९ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हळूहळू कमी होईल.

 मुंबई व कोकणात मात्र सोमवार, २ जूनपर्यंत पावसाचा जोर टिकून राहणार आहे.

इतर भागात पावसात थोडीशी विश्रांती मिळेल, जी शेतीसाठी फायदेशीर ठरेल.

पावसाचा खंड नाही, पण ‘उघडीप’ मिळणार

  • ३० मे ते १० जून या काळात, महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उघडीप मिळणार आहे.
  • मान्सूनची वाटचाल सुरळीत राहणार असून, त्यात कोणताही अडथळा येणार नाही.
  • ज्या भागांत आतापर्यंत भरपूर पाऊस झाला आहे, तिथे वाफसा स्थितीत मशागत व पेरणीसाठी योग्य हवामान उपलब्ध होणार आहे.
  • ही उघडीप १०-१२ दिवस टिकू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरू ठेवावीत.

मान्सूनची सद्यस्थिती

  •  पुणे आणि मुंबईत पोहोचलेला मान्सून सध्या नगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी तसेच विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोलीच्या दक्षिण भागांपर्यंत पोहोचला आहे.
  • मात्र, पालघर, नाशिक, खान्देश, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अजून मान्सून झेप घेतलेली नाही.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

आतापर्यंत चांगला पाऊस झालेल्या भागांमध्ये मशागत व पेरणीस सुरूवात करता येईल. मात्र ज्या भागांत मान्सून अद्याप पोहोचलेला नाही, तिथे पेरणीची घाई टाळावी.  पावसाची ‘उघडीप’ ही एक संधी असून, त्याचा शास्त्रोक्तरीत्या आणि नियोजनपूर्वक वापर करावा.

यावर्षी मान्सूनची वाटचाल तुलनेत झपाट्याने होत असून, पावसातील ही ‘विश्रांती’ शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरू शकते. आता काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध मशागत सुरू करण्याचा योग्य काळ आहे.

– माणिकराव खुळे निवृत्त IMD Pune.

भाजपा संघटन पर्व: कार्यकर्त्यांनी ग्राऊंडवर उतरून काम करावे! ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा कसबा मतदारसंघाचा दौरा

0

विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज दिल्या. तसेच, मोर्चा आणि आघाडीची कार्यकारिणी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही ना. पाटील यांनी यावेळी दिल्या.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कसबा विधानसभा मतदारसंघाचा प्रवास करुन नवनियुक्त मंडल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर विष्णू कृपा कार्यालयात विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी आ. हेमंत रासने, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी नगरसेवक गणेश बिडकर, शैलेश टिळक, स्वरदा बापट, राघवेंद्रबापू मानकर, राजेंद्र काकडे, प्रमोद कोंढरे, दीपक पोटे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला ना. पाटील यांनी भाजपा संघटन पर्वाअंतर्गत पक्षाची कसबा विधानसभा मतदारसंघातील सर्व मंडलातील आघाड्या-मोर्चाच्यांची कार्यकारिणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ग्राऊंडवर उतरून काम केले. त्यामुळे ना-भूतो-ना भविष्यती विजय मिळाला. आगामी महापालिका निवडणुकीत ही आपल्याला तसेच यश मिळवायचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचना दिल्या.

ते पुढे म्हणाले की, महापालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील. कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करु नये. आपल्याला मिळालेली जबाबदारी योग्य पार पाडावी, अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आपापल्या भागावर विशेष लक्ष केंद्रित करावे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय ठेवावा. जेणेकरून, आणीबाणीच्या प्रसंगातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी त्याचा फायदा होईल.

आयुक्तकृपा भाजप शहराध्यक्ष तुपाशी मासिक भाड्यात ७० टक्के सुट; पुणे मनपा कर्मचाऱ्यांनाही अशीच सुट द्या; काँग्रेसचे निवेदन

0

पुणे:- प्रभाग क्रमांक २९ मधे भाजपचे माजी नगरसेवक, शहराध्यक्ष भाजप मा धीरज घाटे यांच्या ताब्यात असलेल्या पुणे मनपा च्या मालकीच्या अंदाजे ५०० प्रति चौरस फूट कार्यालयास आणि ३००० प्रति चौरस फूट व्यायामशाळेस आयुक्तांनी दिलेल्या मासिक भाड्यातील ७० टक्के सुट याच न्यायाप्रमाणे महानगरपालिकेने सेवकांच्या घरभाड्यात कपात करण्या संदर्भात  काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज पुणे महानगरपालिका आयुक्त श्री राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदन देण्यात आले. पुणे महानगर पालिकेच्या वतीने सानेगुरुजी नगर आंबील ओढा सदाशिव पेठ पुणे येथील बांधण्यात आलेली व्यायामशाळा आणि भाजप नगरसेवक यांच्या कार्यालयाची मालमत्ता विभागाने काढलेली किंमत ३ कोटीच्या दरम्यान आहे, पुणे मनपा क्रीडा विभागाने कै भानुदास गेजगे व्यायामशाळेचे तसेच स्थानिक भाजप नगरसेवकाच्या कार्यालयाचे भाडे पुणे मनपाच्या नियमानुसार ५२०००/- ₹ होत असताना फक्त मनपा कर्मचाऱ्यांच्या सेवकांच्या मुलांसाठी ही व्यायामशाळा आहे असे दाखवून पुणे मनपा आयुक्तांनी ते भाडे २०,००० केले आहे.

सदर निवेदनात पुणे महानगरपालिके च्या सेवेत काम करणारे चतुर्थ श्रेणीमधील स्वच्छता कर्मचारी, विविध विभागातील कर्मचारी यांच्यासाठी पुणे महानगर पालिकेच्या वतीने राहण्यासाठी टाऊन प्लानिंग नुसार सदाशिव पेठ येथे सानेगुरुजी नगर,आंबील ओढा कॉलनी बांधण्यात आली. पण तेथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून (HRA) एच आर ए च्या माध्यमातून १२ ते १५ हजार रुपये घरभाडे कापले जाते पण त्यामानाने त्यांना पुणे मनपा कडून अपुऱ्या सुख सुविधा दिल्या जातात. आजही कर्मचाऱ्यांच्या मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत, अस्वच्छतेने कॉलनी भरून गेली आहे, दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर पाणी पोहचत नाही, सार्वजनिक शौचालयाची अवस्था वाईट झाली असतानाही पुणे मनपा कर्मचारी तिथे राहत आहेत. या सेवकांना घरभाड्यात ७०% कपात करावी. तसेच आज गेली ५० वर्षाहून अधिक काळ इथे अनेक सेवकांची कुटुंब वास्तव्यास आहेत, २०११च्या आधीच्या वास्तव्याचा पुरावा दिल्यास झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांचे हक्काचे घर शासनाकडून दिले जाते तर मग ह्या सेवकांना त्यांची राहती घरे मालकी हक्काची करून द्यायची तजबीज व्हावी. त्यांना त्यांचे राहते घर मालकी हक्काचे करण्यास उपाययोजना करावी आणि त्यांचे जागेवरच पुनर्वसन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

युवक काँग्रेसचे सागर धाडवे यांनी पुणे महापालिका आयुक्तांनी ‘लाडका नगरसेवक’ योजना राबविण्यापेक्षा लाडके पुणे महापालिका स्वच्छता सेवक योजना राबवून त्यांना न्याय द्यावा, भारतीय संविधानातील कलम १४ नुसार कायद्यापुढे सर्व समान या महत्वपूर्ण सिद्धांतानुसार योग्य न्याय द्यावा, वेगवेगळा न्याय देऊन सामाजिक दरी निर्माण करू नये अशी मागणी केली. तर शिवसेना प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी भाडे कमी करण्याचा आयुक्तांचा नियम जो भाजप नगरसेवकाला लागू केला आहे तो त्याच टी पी स्किम मधल्या सानेगुरुजी नगर मधील सेवकांना लागू करावा आणि सर्वांना समान न्याय मिळावा, ३ कोटीची मालमत्ता खिरापत वाटल्यासारखी आयुक्तांनी वाटप केले आहे व्यायामशाळेच्या भाड्यातच नगरसेवकाचे कार्यालय बसविण्याचा प्रकार पुणे मनपा क्रीडा विभागाने आणि विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाने केला आहे.

बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाण सिटी सर्वे प्रक्रियेला सुरुवात – दिलीप वेडेपाटील यांच्या प्रयत्नांना यश

0

पुणे: बावधन खुर्द व बावधन बुद्रुक या गावांचा गावठाण सिटी सर्वे आजपासून औपचारिकपणे सुरू झाला आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी गेल्या ५ वर्षांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक दिलीप अण्णा वेडेपाटील यांचे अथक प्रयत्न आज यशस्वी झाले आहेत. बावधन परिसरातील झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर गावठाण हद्दीचे अचूक आणि कायदेशीर मोजमाप होणे ही गावाच्या भविष्यकालीन विकासासाठी अत्यावश्यक बाब होती. मात्र ही प्रक्रिया अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. याला चालना देण्यासाठी दिलीप अण्णा वेडेपाटील यांनी शासन, महसूल विभाग, आणि जमाबंदी कार्यालयाशी सातत्याने संवाद साधून या विषयाला प्राधान्य देण्याची मागणी केली.

या प्रक्रियेस गती मिळवून देण्यासाठी त्यांनी मा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची विशेष भेट घेऊन बावधन गावातील स्थिती सविस्तरपणे मांडली. या बैठकीदरम्यान जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, उपायुक्त राजेंद्र गोळे, तसेच जमाबंदी नगर भूमापन विभागाचे अधिकारी हे उपस्थित होते. सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आजपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु झाले असून गावठाण हद्द, खाजगी जमिनी, रस्ते, सार्वजनिक जागा, मंदिरे, शाळा, यांचा नकाशा व मालकी हक्कांचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.

सिटी सर्वेचे नागरिकांना होणारे फायदे :
• मालमत्तेवर कायदेशीर हक्क सिद्ध होणार.
• जमिनीच्या नोंदी शासकीय दस्तऐवजांमध्ये समाविष्ट होतील.
• बँक कर्ज, वारसा नोंदणी यांसारख्या प्रक्रियेस सुलभता.
• शासकीय योजना व नागरी सुविधांसाठी अडथळे दूर.
• बावधन गावाच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार.

दिलीप अण्णा वेडेपाटील यांनी यावेळी सांगितले की,
“हा सिटी सर्वे म्हणजे फक्त नकाशा काढण्याची प्रक्रिया नसून, हे गावाच्या विकासाच्या दृष्टीने एक मूलभूत पाऊल आहे. गावातील प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर हक्क निश्चित व्हावा, हीच माझी भूमिका होती. आज ती पूर्ण होताना पाहून समाधान वाटतं. s”या ऐतिहासिक निर्णयामुळे बावधन गावाच्या भविष्यकालीन पायाभरणीत महत्त्वाची भर पडणार असून, येत्या काळात अनेक विकासकामांना गती मिळणार आहे.

अनिल अंबानी यांनी केली १७,६०० कोटींची गुंतवणूक, त्यांना कुठून मिळाले इतके पैसे ?

0

आजकाल अब्जाधीश उद्योगपती अनिल अंबानी यांच्या चेहऱ्यावरील तेज परत येत आहे. त्यांच्या कंपन्यांची कामगिरी सुधारू लागली आहे. नवीन करार मिळत आहेत. व्यवसाय विस्तारत आहे आणि कंपन्यांचे बाजारमूल्यही सुधारत आहे. अशा परिस्थितीत कर्जाचा भार कमी करण्यासाठी त्यांनी १७,६०० कोटी रुपये गुंतवले. इतके पैसे उभारण्याची त्यांची काय योजना होती?

अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल यांनी त्यांच्या व्यवसायाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांच्या व्यवसायात परिवर्तन सुरू झाले आहे. यातील सर्वात मोठा करार म्हणजे जपानी कंपनी निप्पॉनची रिलायन्स कॅपिटलमध्ये गुंतवणूक. या कराराचा परिणाम दिसून आला आणि रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी (रिलायन्स एडीएजी) समूहाचे कर्ज कमी होऊ लागले, परंतु कंपन्यांवर अजूनही दबाव होता. म्हणूनच त्यांनी १७,६०० कोटी रुपये उभारले, पण ते आणले कुठून?

अनिल अंबानी यांच्या समूहातील फक्त दोन सूचीबद्ध कंपन्या, रिलायन्स इन्फ्रा आणि रिलायन्स पॉवर, प्रत्येक वादळानंतर अजूनही उभ्या आहेत, तर त्यांच्या बहुतेक कंपन्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या आहेत. या दोन्ही कंपन्या आणि त्यांच्या उपकंपन्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कर्ज कमी करण्यास सुरुवात केली आणि कर्जाची परतफेड करण्यास सुरुवात केली.

ऑगस्ट २०२४ मध्ये दोन्ही कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून याची सुरुवात झाली. कंपनीने फॉरेन कन्व्हर्टेबल करन्सी बाँड (FCCB) आणि प्रेफरेंशियल इश्यूद्वारे निधी उभारण्यास सुरुवात केली.

दोन्ही कंपन्यांनी मिळून ४५०० कोटी रुपयांचा प्रेफरेंशियल इक्विटी इश्यू जारी केला. याशिवाय, FCCB द्वारे आलेल्या वर्दे पार्टनर्सकडून ७,१०० कोटी रुपये उभारण्यात आले. त्याच वेळी, रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रा या दोघांनीही क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP) द्वारे ३०००-३००० कोटी रुपये उभारले. अशा प्रकारे १७,६०० कोटी रुपये उभारून अनिल अंबानींनी पुनरागमन केले.

अनिल अंबानी समूहाच्या दोन्ही सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज सुमारे ३३,००० कोटी रुपये आहे. अलिकडेच अनिल अंबानींचा व्यवसाय तेजीत आला आहे. त्यांची कंपनी स्वच्छ ऊर्जा आणि संरक्षण व्यवसायावर लक्ष केंद्रित करत आहे. अलिकडेच, रिलायन्स पॉवरच्या अनेक उपकंपन्यांनी भारत आणि परदेशात सौर आणि हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी करार केले आहेत.

दुसरीकडे, रिलायन्स इन्फ्राने जर्मनीच्या राईनमेटलला दारूगोळा पुरवण्यासाठी संरक्षण करार केला आहे. कंपनी रत्नागिरीमध्ये १००० एकरवर एक नवीन संरक्षण कारखाना देखील उभारणार आहे.

Video – पाकिस्तानी खेळाडूचे घृणास्पद कृत्य, भारताकडून झालेल्या पराभवानंतर गैरवर्तन

0

भारताने अलिकडेच १६ वर्षांखालील ज्युनियर डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-० असा पराभव केला. कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे खेळताना, भारतीय खेळाडू प्रकाश सरन आणि तविश पाहवा यांनी सुपर टाय-ब्रेकमध्ये त्यांचे एकेरी सामने जिंकले आणि अंतिम फेरीत भारताचे स्थान निश्चित केले. पण आता या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. खरं तर, व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये, पाकिस्तानी खेळाडू भारताकडून पराभव झाल्यानंतर हस्तांदोलन करताना भारतीय खेळाडूशी गैरवर्तन करताना दिसत आहे.

सामना संपल्यानंतर, भारतीय खेळाडू खिलाडूवृत्ती दाखवत हस्तांदोलन करण्यासाठी गेला. पण पाकिस्तानी खेळाडूने आक्रमक हावभाव केला आणि हस्तांदोलन करुन हात झटकून दिला. नंतर तो परत आला. पण हस्तांदोलन करताना त्याने अचानक अपमानास्पद पद्धतीने भारतीय खेळाडूचा हात झटकला. आता त्याच्या कृत्यावर बरीच टीका होत आहे. दुसरीकडे, चाहत्यांनी भारतीय खेळाडूचे शांत वर्तन, संयम आणि खेळाची प्रतिष्ठा राखल्याबद्दल कौतुक केले.

भारताने पाकिस्तानला हरवले असले, तरी ९-१२ च्या प्लेऑफमध्ये न्यूझीलंडविरुद्ध १-२ असा पराभव पत्करावा लागला, जिथे भारतीय जोडीने दुहेरी सामन्यात सुपर टाय-ब्रेक (९-११) गमावला.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाला. या काळात, दोन्ही देशांच्या क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटींमध्ये सोशल मीडियावर भांडण सुरू झाले. युद्धबंदी झाली असली तरी, अजूनही तणाव दिसून येतो.

पिन, फिंगरप्रिंट की फेस अनलॉक, कोण प्रदान करेल मजबूत सुरक्षा? फोन अशा प्रकारे ठेवा सुरक्षित

0

फोटो, व्हिडिओ, महत्त्वाच्या कागदपत्रांपासून ते बँकिंग तपशीलांपर्यंत, अनेक वैयक्तिक गोष्टी मोबाईल फोनमध्ये सेव्ह केल्या जातात, अशा परिस्थितीत प्रत्येकजण फोनची सुरक्षा मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करतो. फोनच्या मजबूत सुरक्षिततेसाठी, काही फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक वापरतात, तर काही पिन कोड वापरतात. पण या तीन पर्यायांपैकी, सर्वात मजबूत सुरक्षा कोणता देते? तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित आहे का?

फिंगरप्रिंट सेन्सर
सेन्सरमुळे फोन लवकर अनलॉक होतो, म्हणून लोक फोन लॉक करण्यासाठी फिंगरप्रिंट सेन्सर वापरतात, परंतु मजबूत सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर हा चांगला पर्याय नाही. असे मानले जाते की प्रत्येक फिंगरप्रिंट अद्वितीय असतो, परंतु झोपताना सेन्सरवर बोट ठेवून कोणीही फोन अनलॉक करू शकतो, हे नाकारता येत नाही.

फेस अनलॉक
फेस रेकग्निशन तंत्रज्ञान देखील फसवले जाऊ शकते, 2D फेशियल रेकग्निशन असलेले सेन्सर सहजपणे फसवले जाऊ शकतात. परंतु 3D स्कॅनिंग असलेल्या स्मार्टफोनमध्ये (आयफोन) या प्रकारचा धोका कमी असतो.

पिन कोड
फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट व्यतिरिक्त, काही लोक पिन कोड देखील वापरतात. पिन कोड वापरणे हे फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉकपेक्षा अधिक सुरक्षित आहे, यामागील कारण म्हणजे बोटाची किंवा चेहऱ्याची ओळख चोरून पिन कोड हॅक करता येत नाही.

जर तुम्ही थोडा क्लिष्ट पासवर्ड वापरला तर फोनची सुरक्षा मजबूत ठेवता येते. कॅपिटल अक्षरे, लहान अक्षरे, चिन्हे आणि संख्या, मजबूत पासवर्डमध्ये या सर्व गोष्टी असाव्यात जेणेकरून कोणालाही सहजपणे पासवर्ड तोडणे सोपे होणार नाही.

आम्ही तुम्हाला तिन्ही पर्यायांपैकी सर्वात सुरक्षित पर्यायाबद्दल सांगितले आहे, आता फोनच्या मजबूत सुरक्षेसाठी तुम्ही कोणता पर्याय निवडता हे तुमच्यावर अवलंबून आहे.

आयपीएल २०२५ मध्ये स्टेडियममध्ये खूप लोकप्रिय असलेल्या ६ बहिणींनी घातला धुमाकूळ

0

आयपीएल २०२५ दरम्यान, ६ बहिणी खूप लोकप्रिय झाल्या आहेत. कधी स्टेडियममध्ये त्यांची उपस्थिती नोंदवून, तर कधी सोशल मीडियावरील त्यांच्या अपडेट्समुळे, या ६ बहिणी बातम्यांमध्ये होत्या. या ६ बहिणी आयपीएल २०२५ मध्ये खेळणाऱ्या ६ खेळाडूंच्या बहिणी होत्या.

KKR के स्टार खिलाड़ी रिंकू सिंह की बहन नेहा सिंह IPL 2025 के दौरान लगातार सोशल मीडिया पर छाई रहीं. उन्होंने इस दौरान कई पोस्ट भी किए जो कि उनके भाई या KKR के दूसरे खिलाड़ियों से जुड़े रहे. उन्होंने KKR के कई खिलाड़ियों के साथ अपनी तस्वीरें भी खिंचाई. (Photo: Instagram)

केकेआर स्टार खेळाडू रिंकू सिंगची बहीण नेहा सिंग आयपीएल २०२५ दरम्यान सोशल मीडियावर सतत चर्चेत होती. या काळात तिने तिच्या भावाशी किंवा केकेआरच्या इतर खेळाडूंशी संबंधित अनेक पोस्ट देखील केल्या. तिने अनेक केकेआर खेळाडूंसोबत फोटो देखील काढले.

अभिषेक शर्मा की बहन कोमल शर्मा भी IPL 2025 के दौरान लगातार सोशल मीडिया पर छाई रहीं. वो अपने भाई की टीम SRH को उसके आखिरी मैच में चीयर्स करने भी पहुंची थी. इतना ही नहीं उन्होंने अपने फेवरेट क्रिकेटर हार्दिक पंड्या के साथ फिर एक बार फोटो भी खिंचाई. (Photo: Instagram)

अभिषेक शर्माची बहीण कोमल शर्मा देखील आयपीएल २०२५ दरम्यान सोशल मीडियावर सतत चर्चेत होती. ती तिच्या भावाच्या टीम एसआरएचला त्याच्या शेवटच्या सामन्यात चीअर करण्यासाठी पोहोचली होती. एवढेच नाही, तर तिने पुन्हा एकदा तिचा आवडता क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबत फोटो देखील काढला.

शुभमन गिल की बहन शहनील गिल भी IPL 2025 के दौरान लगातार स्टेडियम में देखी गईं. भाई को चीयर करते हुए उन्होंने अपने दोस्तों के साथ स्टेडियम की कई सारी तस्वीरें भी पोस्ट.(Photo: Instagram)

शुभमन गिलची बहीण शाहनील गिल देखील आयपीएल २०२५ दरम्यान स्टेडियममध्ये सतत दिसली. तिच्या भावाला प्रोत्साहन देताना तिने तिच्या मित्रांसोबत स्टेडियमचे अनेक फोटो देखील पोस्ट केले.

ऋषभ पंत का मैच देखने उनकी बहन IPL 2025 के दौरान कभी स्टे़डियम तो नहीं आई. मगर उन्होंने टीवी पर उनका मैच जरूर देखा. पंत ने जब ग्रुप स्टेज के आखिरी मैच में शतक लगाया तो साक्षी ने उस पल को अपनी इंस्टा स्टोरी में शेयर किया था. (Photo: Instagram)

ऋषभ पंतची बहीण आयपीएल २०२५ दरम्यान त्याचा सामना पाहण्यासाठी कधीही स्टेडियममध्ये आली नव्हती. पण तिने टीव्हीवर त्याचा सामना नक्कीच पाहिला. जेव्हा पंतने ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात शतक झळकावले तेव्हा साक्षीने ती क्षण तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला.

पेशे से कोरियोग्राफर श्रेष्ठा अय्यर भी IPL 2025 में पंजाब किंग्स को सपोर्ट करने स्टेडियम में कई बार दिखीं. श्रेष्ठा , श्रेयस अय्यर की बहन हैं. (Photo: Instagram)

व्यवसायाने कोरिओग्राफर श्रेष्ठा अय्यरला आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जला पाठिंबा देण्यासाठी अनेक वेळा स्टेडियममध्ये पाहिले गेले होते. श्रेष्ठा ही श्रेयस अय्यरची बहीण आहे.

मालती चाहर की क्रिकेट में दिलचस्पी जगजाहिर है. हालांकि, IPL 2025 में मालती के लिए थोड़ी दुविधा थी. क्योंकि हर बार वो CSK को सपोर्ट करती थीं. मगर इस बार उनके भाई दीपक चाहर मुंबई इंडियंस से खेल रहे थे. (Photo: Instagram)

मालती चहरला क्रिकेटमध्ये रस आहे हे सर्वज्ञात आहे. तथापि, आयपीएल २०२५ मध्ये मालतीसाठी थोडीशी दुविधा होती. कारण ती प्रत्येक वेळी सीएसकेला पाठिंबा देत असे. पण यावेळी तिचा भाऊ दीपक चहर मुंबई इंडियन्सकडून खेळत होता.

ट्रम्प यांना मिळाले TACO हे नवीन नाव, ते कोणी दिले आणि त्याचा अर्थ काय?

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अलिकडेच TACO हा नवीन व्यापारी नाव देण्यात आले आहे, ज्याचा अर्थ Trump Always Chickens Out, म्हणजेच ट्रम्प नेहमीच शेवटी मागे हटतात. ट्रम्प वारंवार बदलणाऱ्या टॅरिफ निर्णयांमुळे गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ निर्माण करत असताना वॉल स्ट्रीटवर हा शब्द प्रचलित झाला. परंतु आता व्यापारी आणि गुंतवणूकदारांना असे वाटू लागले आहे की ट्रम्प कितीही कठोर पावले उचलण्याची धमकी देतात, तरीही ते शेवटी त्यांच्यापासून मागे हटतात.

ट्रम्प यांनी चीन आणि युरोपियन युनियन (EU) वर टॅरिफची धमकी दिली, तेव्हा या शब्दाची सुरुवात झाली, परंतु नंतर ते त्यांच्या स्वतःच्या विधानांपासून मागे हटले. उदाहरणार्थ, ट्रम्प यांनी यापूर्वी चीनमधून आयात केलेल्या वस्तूंवर १४५% टॅरिफची घोषणा केली होती, जी नंतर १००% आणि नंतर ३०% पर्यंत कमी करण्यात आली. त्याचप्रमाणे, त्यांनी १ जूनपासून EU उत्पादनांवर ५०% टॅरिफ लादण्याची घोषणा केली, ज्यामुळे शेअर बाजार घसरला. परंतु दोन दिवसांनी, ट्रम्प यांनी यू-टर्न घेतला आणि घोषणा केली की ते ९ जुलैपर्यंत वाट पाहतील, कारण EU सोबतच्या चर्चा सकारात्मक दिशेने जात आहेत.

जेव्हा एका पत्रकाराने ट्रम्प यांना ‘TACO’ या शब्दावर प्रतिक्रिया विचारली, तेव्हा ते म्हणाले, “मी मागे हटतो? अरे, मी ते कधीच ऐकले नाही. तुम्ही म्हणत आहात की मी टॅरिफ कमी केल्यामुळे मला हे नाव मिळाले?” ट्रम्प यांनी याला ‘स्ट्रॅटेजिक वाटाघाटी’ म्हटले आणि आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी ते दबावतंत्रांचा अवलंब करतात असे म्हटले.

ट्रम्प यांनी हे पहिल्यांदाच केले नाही. २ एप्रिल रोजी त्यांनी डझनभर देशांवर व्यापक टॅरिफची घोषणा केली होती, जी ९ एप्रिलपासून लागू होणार होती. परंतु ती लागू झाल्यानंतर काही तासांतच त्यांनी चीन वगळता सर्व देशांना ९० दिवसांची मुदतवाढ दिली. याचे कारण शेअर बाजारातील घसरण असल्याचे म्हटले जात होते, तर मुदतवाढीच्या घोषणेनंतर, S&P ५०० निर्देशांकाने २००८ नंतरची सर्वात जलद वाढ नोंदवली.

या संपूर्ण घटनेमुळे वॉल स्ट्रीटवर एक नवीन समज निर्माण झाली आहे की ट्रम्पच्या धमक्यांना खूप लवकर प्रतिक्रिया देण्याऐवजी, वाट पहा कारण ते अखेरीस बाहेर पडण्याची शक्यता आहे. ही विचारसरणी आज वॉल स्ट्रीटवर ‘TACO’ ही नवीन रणनीती बनवत आहे.