मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये २००६ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अलीकडेच मुंबई हायकोर्टानं मोठा निकाल दिला होता. सर्व आरोपी निर्दोष असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सर्व आरोपींची सुटका झाली होती. पण हाय कोर्टाच्या या निकालावर आता सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता बाहेर आलेले सर्व आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार की बाहेर राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पण तूर्तास सर्व आरोपी हे तुरुंगाच्या बाहेरच राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टात सरकारकडून नेमका काय युक्तीवाद करण्यात आला. याची माहिती देखील समोर आली आहे. भारत सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हाय कोर्टाच्या निर्णयावर स्थगिती आणण्याची मागणी केली. “आम्ही फक्त निकालावर स्थगिती मागत आहोत, आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची मागणी नाही”, असं तुषार मेहता यांनी कोर्टात सांगितलं.
यावर कोर्टाने म्हटलं की, “सर्व आरोपी आता जामिनावर सुटले आहेत, त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा प्रश्नच येत नाही. काही आरोपी पाकिस्तानी अधिकारी आहेत, त्यांचे काय? असा सवाल देखील कोर्टानं केलं. यावर मेहता म्हणाले, “ते अटक झालेले नाहीत, ते फरार आरोपी आहेत.” सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हाय कोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली आहे. मात्र आरोपींना पुन्हा तुरुंगात परत जाण्याची गरज नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे.
11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या पश्चिम रेल्वे नेटवर्कवरील लोकल ट्रेनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सात बॉम्ब स्फोट झाले होते, ज्यामुळे मुंबई शहर हादरले होते. या हल्ल्यात 180 हून अधिक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या 12 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असून, अभियोजन पक्ष त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे न्यायालयाने नमूद केले. या हल्ल्याला 19 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हा निकाल आला आहे, ज्यामध्ये 180 हून अधिक लोकांचा बळी गेला होता आणि अनेक जण जखमी झाले होते.
राज्यभर सर्वत्र आज आखाड समाप्तीची गटारी अमावस्या साजरी केली जात असताना पारंपरिक हिंदू सणाचे पावित्र्य कायम राखत घराघरांमध्ये हा हिंदू सण साजरा केला जावा यासाठी प्रत्येक रक्तदात्यासाठी १ किलो चिकन किंवा अर्धा किलो मलई पनीर किंवा टी-शर्ट अशी सप्रेम भेट योजना ठेवण्यात आल्यामुळे कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनी परिसरामध्ये आखाड स्पेशल आनंद उत्सव साजरा केला जाणार हे मात्र नक्की!
गेल्या ४० वर्षांपासून वंचित, दुर्लक्षित, गोरगरीब आणि रिक्षा चालकांच्या हक्कांसाठी अथक कार्य करणाऱ्या डॉ. आनंद तांबे यांनी पुणे शहरातील रिक्षा व्यवसायाला नवे स्थान मिळवून दिले. रिक्षा स्टँडची निर्मिती, प्रवासी, रिक्षा चालक व प्रशासन यांच्यातील संबंध मजबूत करणे, तसेच दिव्यांग, अपंग, विधवा महिला, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे. दिल्ली येथील भव्य समारंभात CEDARBROOK UNIVERCITY USA या विद्यापीठाकडून HONORARY DOCTORATE हा बहुमान डॉक्टर आनंद तांबे यांना प्रदान करून त्यांच्या चाळीस वर्षातील सामाजिक कार्याची व अथक परिश्रमाची दखल घेत, हा सन्मान त्यांच्या योगदानाचा व समर्पणाचा खऱ्या अर्थाने गौरव करण्यात आला. डॉक्टर आनंद तांबे यांचा पुण्यातील पहिला रिक्षा चालक मालकांतर्फे डॉ. आनंद तांबे यांचा ‘पुणेरी पगडी’ सन्मान पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या समवेत करण्यात येणार आहे.

