Home Blog Page 57

IPL 2025 : मुंबईची आश्चर्यचकित करणारी रणनीती, या दोन गोलंदाजांनी टाकले शेवटचे षटक

0

आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात, मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सविरुद्ध रोमांचक विजय मिळवून स्पर्धेत आपल्या आशा जिवंत ठेवल्या. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ५ गडी गमावून २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, गुजरातचा संघ २० षटकांत ६ गडी गमावून फक्त २०८ धावा करू शकला. या सामन्याच्या शेवटच्या षटकात एक धक्कादायक घटनाही पाहायला मिळाली. शेवटच्या षटकात २४ धावांचा बचाव करताना, मुंबईने २ गोलंदाजांचा वापर केला.

या सामन्यात, मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी केली आणि आव्हानात्मक धावसंख्या उभारली, ज्यामध्ये त्यांच्या स्टार फलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्युत्तरादाखल, गुजरात टायटन्सची फलंदाजी सुरुवातीला मजबूत दिसत होती, परंतु मधल्या षटकांत मुंबईच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले आणि सामना शेवटच्या षटकात ओढला. गुजरातला शेवटच्या षटकात २४ धावांची आवश्यकता होती आणि मुंबईच्या कर्णधाराने चेंडू त्याच्या वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनकडे सोपवला. रिचर्ड ग्लीसनने षटकाची सुरुवात उत्तम पद्धतीने केली आणि पहिल्या तीन चेंडूंवर धावा काढण्याची एकही संधी गुजरातच्या फलंदाजांना दिली नाही. या ३ चेंडूंवर त्याने फक्त ३ धावा दिल्या आणि मुंबईचा विजय निश्चित केला.

पण तिसऱ्या चेंडूनंतर ग्लीसनच्या मांडीच्या स्नायूंमध्ये अचानक ताण जाणवला, ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. या परिस्थितीत, मुंबईच्या कर्णधाराने तात्काळ निर्णय घेतला आणि षटकातील उर्वरित तीन चेंडू टाकण्याची जबाबदारी तरुण गोलंदाज अश्विनी कुमारकडे सोपवली. या हंगामात फारशा संधी न मिळालेल्या अश्विनीने दोन्ही हातांनी ही संधी साधली. त्याने केवळ दबाव हाताळला नाही, तर आपल्या अचूक गोलंदाजीने गुजरातच्या फलंदाजांना मोठे शॉट्स खेळण्यापासून रोखले. अश्विनीने शेवटच्या तीन चेंडूंवर तंत्रशुद्ध गोलंदाजी केली, ज्यामध्ये एक महत्त्वाचा विकेट देखील होता आणि मुंबईने २४ धावांचा यशस्वीपणे बचाव केला.

तुम्हाला सांगतो की, शेवटचे षटक टाकण्यासाठी मुंबईकडे अनेक पर्याय उपलब्ध होते. रिचर्ड ग्लीसन व्यतिरिक्त, हार्दिक पांड्या, मिशेल सँटनर, नमन धीर आणि अश्विनी कुमार यांचे षटक शिल्लक होते. पण मुंबई इंडियन्सने रिचर्ड ग्लीसनवर विश्वास दाखवला, जो सर्वात अनुभवी गोलंदाज आहे, त्याला टी-२० क्रिकेटमध्ये भरपूर अनुभव आहे. त्याच वेळी, मुंबई इंडियन्सने आगामी मोठ्या सामन्यांना पाहता कोणताही धोका पत्करला नाही. रिचर्ड ग्लीसनला थोडे अडचणीत पाहून, मुंबईने गोलंदाज बदलण्याचा निर्णय घेतला, जो रणनीतीचा एक भाग देखील असू शकतो.

आफ्रिदीसमोर आला दुबईतील भारतीय समुदाय, भारतीय सैन्यावर प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीचा केला सन्मान

0

पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये बरीच तफावत निर्माण झाली आहे. दरम्यान, दुबईतून एक फोटो समोर आला ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. दुबईतील एका कार्यक्रमात भारतीय समुदायाच्या लोकांनी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचे स्वागत केले. त्याच वेळी, ज्या क्रिकेटपटूचे इतक्या उत्साहाने स्वागत करण्यात आले, तो भारताविरुद्ध सतत आग ओकताना दिसला होता.

पाकिस्तान असोसिएशन दुबई (पीएडी) येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचे भारतीय केरळ समुदायाने जोरदार स्वागत केले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि व्हिडिओबाबत वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावरील लोक म्हणतात की एकीकडे क्रिकेटपटू भारतीय सैन्यावर प्रश्न विचारत आहे, तर दुसरीकडे भारतीय समुदाय त्याच क्रिकेटपटूचे स्वागत करत आहे.

आफ्रिदी येताच, भारतातील केरळ समुदायाच्या सदस्यांनी त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम थांबवला आणि “बूम बूम” असे नारे देण्यास सुरुवात केली, जे या अष्टपैलू खेळाडूच्या खेळण्याच्या शैलीशी संबंधित टोपणनाव आहे. या कार्यक्रमात आफ्रिदीला पाहून लोक उत्साहित झाले आणि त्यांनी त्याच्यासाठी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी आफ्रिदी म्हणाला, मला केरळचे लोक खूप आवडतात. आम्ही मैदानात क्रिकेट खेळतो, पण मैदानाबाहेर आम्ही तेच लोक आहोत.

ज्या क्रिकेटपटूसाठी भारतीय समुदायाचे चाहते वेडे झाले होते, हा तोच क्रिकेटपटू होता, ज्याने ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. ऑपरेशन सिंदूरनंतर शाहिद आफ्रिदीने भारतीय सैन्याबद्दल म्हटले होते की ते लढूही शकत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आफ्रिदी म्हणाला होता की, ते आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, आमचे सैन्य इतके प्रशिक्षित झाले आहे की ते आमच्याशी लढू शकणार नाहीत.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, आफ्रिदीने सतत विधाने जारी केली आणि भारताबद्दल प्रश्न उपस्थित केले. पाकिस्तानमधील स्थानिक माध्यमांच्या पत्रकारांशी बोलताना आफ्रिदीने आरोप केला होता की भारत स्वतः दहशतवाद करतो, स्वतःच्या लोकांच्या हत्येसाठी जबाबदार आहे आणि नंतर त्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरतो.

पहलगाम हल्ल्यापासून, शाहिद आफ्रिदी सतत भारताविरुद्ध विधाने करत आहे आणि तो बराच सक्रिय आहे. पहलगाम हल्ल्यानंतर त्याने भारताविरुद्ध बरेच काही सांगितले. आफ्रिदीने काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पुरावेही मागितले. एवढेच नाही तर त्याने भारतीय सैन्याला निरुपयोगी म्हटले.

माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीकडून भारताविरुद्ध सततच्या वक्तव्यांनंतरही दुबईतून समोर आलेल्या चित्राने सर्वांनाच धक्का बसला आहे. क्रिकेटपटू भारताविरुद्ध बोलताना दिसला असताना, भारतीय समुदाय त्याच्यासमोर पडला आहे. भारत सरकारने शाहिद आफ्रिदीच्या भारतातील यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. यासोबतच भारत सरकारने भारतातील क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि बासित अली यांच्या चॅनेलवरही बंदी घातली आहे.

जयंत पाटलांनी ‘त्या’ कृतीनं राजकीय धुरळा उडवला; पुन्हा महायुतीत जाण्याच्या चर्चांना उधाण

0

आगामी स्थानिकसाठी सांगली जिल्ह्यात भाजपने विशेष लक्ष घातले असून, भाजपने नुकताच जिल्हाध्यक्षांसह मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपले टार्गेट फिक्स केलं आहे. त्याच अनुषंगाने महायुतीतील तिन्ही पक्षांनी यांच्याकडे आपले जिल्हाध्यक्ष वाळवा तालुक्याचे नियुक्त केले आहेत.

भाजपनंतर जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या सम्राट महाडिक ग्रामीणची जबाबदारी दिली आहे. यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये जयंत पाटील यांच्याविरोधात महायुती म्हणण्यापेक्षा, सम्राट महाडिक, निशिकांत पाटील आणि आनंदराव पवार अशीच थेट लढत होणार, यात शंकाच नाही. पण लढत होण्याआधीच वाळवा तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता पुन्हा एकदा तापले असून जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. याला कारण ठरली जयंत पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यात झालेली भेट!

वाळवा तालुक्यातील एका विवाह सोहळ्यात आमदार जयंत पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आमने-सामने आले. फक्त आमने-सामनेच आले नाही, तर जयंत पाटील यांनी सम्राट महाडकांचा सत्कारही केला. या सत्कारामुळेच आता या चर्चांना उकळी आली आहे. याआधी देखील त्यांच्या संस्थेच्या कार्यक्रमाला भाजप नेते नितीन गडकरी आले असतानाही, अशा पद्धतीने चर्चा सुरू झाल्या होत्या. तर ते महायुतीत जाणार असल्याचे बोलले जात होते. त्यावेळी जयंत पाटील यांनी, सर्व तर्कवितर्कांना इन्कार देत, त्या फक्त पोकळ चर्चा असल्याचे स्पष्ट केले होते.

यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चेवेळी ते सत्तेत सहभागी होतील असे म्हटले जात होते. पण अजित पवार यांनी या चर्चेतली स्वत: हवा काढली होती. तर जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या निशिकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद दिले. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम लागला होता. यानंतर शांत बसलेली अशा चर्चेंची राळ पुन्हा उठली असून जयंत पाटील महायुतीत जाणार का? असे सवाल होत असून त्यांनी महाडिक यांचा केलेला सत्कार हे त्यामागचे संकेत आहेत, अशीही कुजबूज सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांचीही नुकतीच सातारा इथं भेट घेतली होती. त्यापाठोपाठ त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सांगली दौऱ्यात संवाद साधला होता. तर आता थेट त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांची भेट घेत सत्कार केला. ज्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मानले जात आहेत.

जयंत पाटलांची कुटनीती अन् तर्क

वाळवा-इस्लामपूर मतदारसंघ जयंत पाटलांचा बालेकिल्ला मानला जातो. स्थानिकसह जिल्हा बँक, बाजार समितीवर त्यांचा होल्ड आहे. यामुळे त्यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरूंग लावण्याचा राजकीय डाव, सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाध्यक्ष पदी भाजपने सम्राट महाडिक, अजित पवारांनी भाजपचे आधीचे जिल्हाध्यक्ष आणि आत्ता राष्ट्रवादीत सक्रिय असणारे निशिकांत पाटील, तर एकनाथ शिंदे यांनी आनंदराव पवार यांची नियुक्ती केली आहे.

राजकीय खेळी गुलदस्त्यात

जयंत पाटील शरद पवार यांच्या मुशीत तयार झालेल्या मल्लाप्रमाणे असून तेही तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे आहेत. कधी कोणता डाव खेळतील आणि कधी दुसऱ्याच्या पकडीतून निसटतील हे सांगता येत नाही. आताही त्यांनी तिन्ही जिल्हाध्यक्ष त्यांच्याच मतदारसंघातील असतानाही फक्त महाडिक यांचाच सत्कार केला आहे. यामुळे त्यांची नेमकी राजकीय खेळी कोणती आहे? याबाबत आता तर्क लढविले जात आहेत.

‘धुळे कॅश’ प्रकरण आमदार खोतकरांच्या पीएच्या अडचणी वाढल्या, पोलिस अधिक्षकांना अहवाल सादर होताच मोठी कारवाई

0

विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा नुकताच धुळे आणि नंदुरबारला झाला. या समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्यासाठी पैसे गोळा करण्यात आल्याचा आरोप झाला होता. धुळेच्या शासकीय विश्रामगृहातून कॅश सापडल्याने खळबळ उडाली होती.माजी आमदार अनिल गोटे यांनी विश्रामगृहाच्या खोलीत कॅश होती त्याला खोलीला टाळे ठोकले होते. राज्यभर या प्रकरणाची चर्चा झाली.

ज्या खोलीत कॅश सापडली. ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि विधिमंडळ समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर बूक होती. त्या खोलीतून तब्बल 1.84 कोटी रुपये पोलिसांनी जप्त केले होते.

धुळे कॅश प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार हे गेले नऊ दिवस या प्रकरणाचा तपास करत होते. विश्रामगृहातील नोंदवही आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले होते. या तपासानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना अहवाल सादर केला.या अहवालानंतर पोलिसांनी किशोर पाटील, राजू मोगरे यांच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हादाखल करण्याआधी कायदेशीर अभिप्राय घेण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपाधीक्षक राजकुमार उपासे हे करीत आहेत. प्राप्तिकर विभागातर्फे स्वतंत्र तपास करण्यात येणार आहे.

अनिल गोटे ‘अ‍ॅक्शन मोड’वर

विश्रामगृहात कॅश असल्याचे आणि ती विधीमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांना वाटप करण्यात येण्याबाबत माजी आमदार अनिल गोटे यांनी आरोप केला होता. त्यांनीच हे प्रकरण उजेडात आणले.विश्रामगृहावर ठिय्या देत किशोर पाटील यांच्या कक्षात पाच कोटी रुपये असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांपासून तर पोलिस अधीक्षक आणि विविध यंत्रणांना त्यांनी फोन करून याबाबत कळविले. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अजुनही ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत.

गोटेंकडून खोतकर टार्गेट

कॅश प्रकरणात अनिल गोंटेंनी आमदार अर्जून खोतकर यांना टार्गेट केले आहे. खोतकरांच्या पीएच्याच्या नावे विश्रामगृहातील कक्ष क्रमांक 102 हा 15 मे पासून आरक्षित होता. 15 ते 21 मे दरम्यान अर्जुन खोतकर आणि अंदाज समिती यांच्यासाठी विविध शासकीय अधिकारी, कंत्राटदार आणि यंत्रणांकडे पैशाची मागणी करण्यात आली. त्यासाठी पंधरा कोटी रुपयांचे टार्गेट होते, असा दावा माजी आमदार गोटे यांनी केला होता. आता या प्रकरणात खोतकरांच्या पीएवर गुन्हा दाखल झाल्याने स्वतः खोतकर अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नाही. आपण दौऱ्यावर असताना विश्रामगृहाकडे फिरकलो देखील नाही, असे स्पष्टीकरण अर्जुन खोतकर यांनी आधीच दिले होते.

फडणवीस-शिंदे-अजितदादा केमिस्ट्रीला मतभेदांची नजर? ‘संवादा’चा मुद्दा आत्ताच का काढला ? राजकारण तापलं ‘ही’ आहेत मोठी कारणं

0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत पुन्हा एकदा महायुतीनं सत्ता काबीज केली. खरंतर विरोधी पक्षनेता मिळवण्याइतपत संख्याबळही न मिळाल्यामुळे महाविकास आघाडी एकदमच बॅकफूटला गेली.तर महायुती विनाअडथळा सुसाट विकासाच्या मार्गावर धावेल अशी महाराष्ट्राच्या भोळ्याभाबड्या जनतेला अपेक्षा होती. पण अवघ्या सहाच महिन्यांत महायुतीत वारंवार या ना त्या कारणांनी कधीच्या वादाच्या ठिणग्या तर कधी रुसव्या फुगव्यांनी मतभेद चव्हाट्यावर आणले. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्र्यांपैकी एकाचाही संवाद चांगला नसल्याचं रोखठोक विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

महायुती सरकारमध्ये एकमेकांवर टीका वा कुरघोडीची एकही संधी भाजपसह अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना सोडताना दिसून येत नाही. हे प्रकरण नुसतं महाराष्ट्र किंवा मुंबईपुरतंच मर्यादित न राहता थेट दिल्लीतील भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या कानापर्यंत जाऊन धडकलं. विधानसभा निवडणुकीआधी फडणवीस-शिंदे-अजितदादांची केमिस्ट्रीला सध्या मतभेदांची नजर लागल्याचे दिसून आलं आहे.

विधानसभा निवडणुकीआधी जपून आणि सावध पावलं टाकणार्‍या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपनं निकालात मिळालेल्या 132 जागांमुळे महायुतीत दबावतंत्राचं राजकारण सुरू केलं आहे. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय चाणक्य अमित शाहांनी महाराष्ट्रात महायुती म्हणूनच पुढं जायचं असं ठणकावलं असलं तरी इथलं राजकारण तितकंसं सोपं नाही, हे महाराष्ट्राचं राजकारण कोळून प्यालेल्या फडणवीसांना याची चांगलीच जाणीव आहे.

भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्हीही नेते वेगवेगळ्या विचारधारा आणि कार्यशैलीच्या राजकीय पक्षातून पुढे आलेले नेते आहेत. त्यामुळे निश्चितच या दोन्हीही नेत्यांची काम करण्याची पध्दतीही वेगळीच आहे. याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कार्यशैली आहे.ते प्रचंड अभ्यासू,संयमी,विचारपूर्वक आणि तार्किकदृष्ट्या सगळ्या कसोट्यांवर तावून सुलाखून भाजपच्या मुशीत तयार झालेलं राजकीय व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांचा राजकारणासह प्रशासनावरची पकड मजबूत आहे. पण अशावेळी त्यांनी शिंदे आणि अजितदादांबद्दलची खटकणारी भावना जाहीररित्या मुलाखतीत बोलून दाखवली या पाठीमागं निश्चितच काही राजकीय आराखडे असू शकतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंबाबत संवाद चांगला नसल्याचं वक्तव्य हे त्यांनी शिंदे जे महायुतीच्या अगोदरच्या टर्ममध्ये प्रचंड अॅक्टिव्ह होऊन काम करत होते. ती कार्यपध्दतीची झलक आता फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये आजतागायत दिसून आलेली नाही. फडणवीसांमुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रि‍पदाच्या संधी हुकल्याचं शल्य किंवा डिमांड केलेल्या गृहखातंही भाजपनं न सोडलेल्या शिंदेंनी सरकार राहून अलिप्त राहण्याची भूमिका घेतल्याचं लपून राहिलेलं नाही.

शिंदेंनी सरकारच्या किंवा फडणवीसांनी बोलावलेल्या महत्वाच्या बैठकांना मारलेल्या दांड्यांनी हे सिध्द केलं होतं. त्यामुळे शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारमधील विसंवादाची पुनरावृत्ती टाळून सरकारमध्ये कार्यरत राहावं, अशी भावना फडणवीसांची असू शकतात. पण मूळत: फडणवीसांना शिवसेनेतील नेतेमंडळींच्या वादग्रस्त विधानं आणि विविध कारनाम्यांमुळे महायुती सरकारचा बचाव करताना दमछाक होते,ते टाळण्यासाठी शिंदेंनी या डोकेदुखी ठरणार्‍या नेत्यांना शिस्तीचा मार्ग दाखवणं अपेक्षित असावं.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांच्या कामाच्या झपाट्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसह कुणालाही तिळमात्र शंका नाही. पण ते आपल्या भाषणातून किंवा माध्यमांशी संवाद साधताना काय बोलतील याचा नेम नाही. कधी ते बोलता बोलता विरोधी पक्षांसह मित्रपक्षांच्या नेत्यांबाबतही अडचणीत आणणारी विधानं करुन मोकळे होतात. त्याचे दूरगामी परिणाम सरकारवर होताना दिसून येतो.

तसेच बऱ्याचदा त्यांचा संवादाऐवजी एकतंत्री कारभार हाकण्याकडे कल असतो.तो महायुती म्हणून काम करताना अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. तसेच अजितदादांच्या या कार्यपध्दतीमुळे मित्रपक्षांमध्ये गैरसमजही निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे फडणवीसांनी त्यांच्या संवादाबाबतची भूमिका जाहीररित्या बोलून दाखवली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

महायुती म्हणून पाच वर्षे सरकार चालवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची साथ मिळणंं तितकंच गरजेचं आहे. दोन्ही नेत्यांना सोबत घेऊन सरकार चालवण्याचं कसब फडणवीसांना दाखवावं लागणार आहे. स्थानिकच्या निवडणुकांना सामोरे जाण्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापैकी एकही नेता संवादासाठी चांगला नसल्याचं जाहीररित्या सांगत उणीवेवर बोट ठेवले असण्याची शक्यता आहे.

चारभिंतीच्या आत ही बाब कानावर घालून झाल्यानंतरही परिणाम समोर न आल्यामुळेही कदाचित पुन्हा एकदा फडणवीसांनी ही बाब उघडपणे मांडली असावी. याचवेळी फडणवीसांनी आपल्या वक्तव्याचं दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांना वाईट वाटणार नाही असंही म्हटलं होतं.

‘एक्स्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोण चांगला संवाद साधतो असा सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘दोन्हीही नेते संवाद साधण्यात चांगले नाहीत, असं सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. इतकंच नाहीतर फडणवीसांनी पुढे मला आशा आहे की, मी व्यक्त केलेल्या माझ्या मताबाबत त्यांना वाईट वाटणार नाही आणि ते मला माफ करतील, असंही म्हटलं होतं. यानंतरही महायुतीतलं राजकारण तापलं आहे.

IPS जालिंदर सुपेकरांची ‘डाऊनग्रेड’ बदली; खोट्या कागदपत्रांच्या आधारे शस्र परवाना हगवणे कुटुंबीयांना केलेली मदत भोवली? 

0

महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची कारागृह व सुधारसेवा विभागाच्या महासंचालक पदावरून तडकाफडकी बदली केली आहे. त्यांची नियुक्ती आता उप महासंचालक, गुप्तवार्ता विभाग, राज्य गुप्तवार्ता, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. ही बदली महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 22 नुसार करण्यात आली आहे.

सुपेकर यांचं पूर्वीचं पद म्हणजे कारागृह व सुधारसेवेचे महासंचालक हे एक महत्त्वाचं प्रशासकीय पद मानलं जातं. मात्र त्यांचं नवीन पद हे तुलनात्मकदृष्ट्या अत्यल्प अधिकार असलेलं आणि विभागीय निर्णय प्रक्रियेत फारसं प्रभावी नसलेलं मानलं जातं. त्यामुळेच ही बदली ‘डाऊनग्रेड’ मानली जात आहे.

गृह विभागाच्या आदेशानुसार ही बदली ‘प्रशासनिक कारणास्तव’ करण्यात आल्याचं सांगण्यात आलं असलं तरी पोलीस खात्यात वर्तुळात ही बदली ही शिक्षा म्हणून केल्याची चर्चा आहे. काही वादग्रस्त निर्णय, अंतर्गत मतभेद आणि वरिष्ठ पातळीवरील नाराजीमुळेच सुपेकर यांना दुय्यम पदावर हलवलं गेलं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा निर्णय 30 एप्रिल 2024 पासून तत्काळ प्रभावात आला असून संबंधित आदेश महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

हगवणे बंधूंना मदत

हगवणे बंधूना खोट्या कागदपत्रांच्या आधारे शस्र परवाना देण्यात जालिंदर सुपेकर यांनी मदत केल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा जालिंदर सुपेकर यांची उप महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, येथे तडकाफडकी बदली केल्याची चर्चा आहे.

रवीने देशाशी केली गद्दारी… १४ पाणबुड्या-युद्धनौकांची दिली माहिती आयएसआयला, झाली अटक

0

यूट्यूबर ज्योती मल्होत्राचे प्रकरण अजूनही चर्चेत असतानाच महाराष्ट्रातील एका तरुणाला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. महाराष्ट्र एटीएसने सांगितले की आरोपीचे नाव रवी कुमार वर्मा आहे. रवी हा ठाणे येथील कळवा येथील रहिवासी आहे. तो नौदल गोदीत ज्युनियर मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम करत होता. रवीवर पाकिस्तानला १४ भारतीय पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती दिल्याचा आरोप आहे. आता रवीची चौकशी केली जाईल की त्याने ही माहिती पाकिस्तानला कशी दिली?

महाराष्ट्र एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवी कुमार वर्मा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या दोन फेसबुक अकाउंटशी संपर्कात होता. हे दोन्ही फेसबुक पेज पायल शर्मा आणि इस्प्रीत यांच्या नावाने बनवले आहेत. या दोन्ही फेसबुक पेजवर रवी वर्माने १४ पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती शेअर केली होती. रवीने युद्धनौका आणि इतर जहाजांची महत्त्वाची माहिती आणि फोटो देखील पाठवले होते.

नौदल गोदी क्षेत्रात मोबाईल फोनवर बंदी असल्याने, रवी वर्मा तेथील युद्धनौकांची रचना आणि इतर माहिती लक्षात ठेवत असे. त्यानंतर तो पायल शर्मा आणि इस्प्रीतच्या नावाने बनवलेल्या फेसबुक पेजवर सर्व माहिती शेअर करत असे. तपासात असेही उघड झाले आहे की रवी ही माहिती ऑडिओ आणि टेक्स्ट स्वरूपात पाठवत असे.

रवी वर्मा नोव्हेंबर २०२४ पासून पाकिस्तानी फेसबुक अकाउंटशी संपर्कात होता. महाराष्ट्र एटीएसने सांगितले की, पायल शर्मा आणि इस्प्रीतच्या नावाने पाकिस्तानी गुप्तचर एजंट्सचे फेसबुक अकाउंट बनवले गेले होते. एका प्रोजेक्टसाठी दोन्ही पेजवरून रवी वर्माकडून युद्धनौकांबद्दल माहिती मागवली जात होती. हनीट्रॅपमध्ये अडकलेला रवी वर्मा ही माहिती पायल शर्मा आणि इस्प्रीतला वारंवार पाठवत होता.

दरम्यान, रवी वर्माबद्दल आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली. रवी लवकरच लग्न करणार होता, परंतु एटीएसने त्याला अटक केल्यानंतर त्याचे लग्न मोडले. काही दिवसांपूर्वी त्याच्या आईने नाते निश्चित केले होते. मुलीच्या कुटुंबाने सांगितले की ते त्यांच्या मुलीचा हात देशाशी गद्दारी करणाऱ्या व्यक्तीला देणार नाहीत. फक्त साखरपुडा झाला आणि रवीचे गुपित उघड झाले हे चांगले झाले. जर लग्न झाले असते, तर त्याच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते.

विकासदराची गेल्या चार वर्षांतील नीचांकी घसरगुंडी, ‘उत्पादन’च्या गटांगळीने अर्थव्यवस्थेस धक्का ‘अत्यावश्यक सेवा’ वाढीस ब्रेक?

0

उत्पादन क्षेत्राच्या घसरणीमुळे जानेवारी ते मार्च या तिमाहीतील भारताचा विकासदर ७.४ टक्क्यांपर्यंत घसरला असून पूर्ण वर्षाच्या विकासदराचीही ६.५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. वार्षिक विकासदराची ही गेल्या चार वर्षांतील नीचांकी घसरण असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

गेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) अर्थव्यवस्थेची वाढ ९.२ टक्के दराने झाली होती. भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार आता ३.९ लाख कोटी अमेरिकी डॉलर म्हणजेच ३३०.६८ लाख कोटी रुपये एवढा झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. येत्या काही वर्षांत पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य केले जाईल, असा अंदाज आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या चीनशी तुलना करता या कॅलेंडर वर्षातील पहिल्या तीन महिन्यांतील त्यांचा आर्थिक विकास दर ५.४ टक्के एवढा राहिला आहे.

भारताचा आर्थिक विकास दर जानेवारी ते मार्चदरम्यान ७.४ टक्के होता तर ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान तो ६.४ टक्के एवढा होता. जुलै ते सप्टेंबर- २०२४ दरम्यान तो ५.६ टक्के तर एप्रिल ते जून तिमाहीत तो ६.५ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या जानेवारी ते मार्चच्या तिमाहीत हा दर ८.४ टक्क्यांवर गेला. फेब्रुवारीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या दुसऱ्या अंदाजानुसार हा दर संपूर्ण २०२४-२५ या वर्षासाठी ६.५ टक्के राहील असा अंदाज होता.

मागील वर्षी वेगाने वाढ

मागील आर्थिक वर्षात म्हणजे २०२३-२४ मध्ये सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ३०१.२३ लाख कोटी रुपये होते तर या वर्षीच्या मार्च अखेरीस ते ३३०.६८ लाख कोटी रुपये असेल. ही वाढ ९.८ टक्के एवढ्या दराने झाली आहे. मागील आर्थिक वर्षात उत्पादन क्षेत्राची वाढ १२.३ टक्के दराने झाली होती. ती यावर्षी फक्त ४.५ टक्के दराने झाली आहे. देशाच्या एकंदरीत आर्थिक वाढीतही घसरण झाली आहे. मागील वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राची वाढ ११.३ टक्के दराने झाली होती. ती या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ४.८ टक्के दराने झाली आहे.

‘कृषी’चे उत्पादन वाढले

मागील वर्षीच्या २.७ टक्के दराच्या तुलनेत यावर्षी कृषी क्षेत्राचे उत्पादन ४.६ टक्के एवढे वाढले आहे. यावर्षीच्या शेवटच्या तिमाहीत कृषी क्षेत्र ५.४ टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत ते ०.९ टक्के दराने वाढले होते. मागील वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत बांधकाम क्षेत्र ८.७ टक्के दराने विस्तारले होते. ते यावर्षीच्या शेवटच्या तिमाहीत १०.८ टक्के वेगाने वाढले आहे.

अत्यावश्यक सेवांच्या वाढीस ब्रेक

वीज, नैसर्गिक वायू, पाणीपुरवठा आणि अन्य अत्यावश्यक सेवांचे क्षेत्र चौथ्या तिमाहीत ५.४ टक्के दराने वाढले. तर मागील वर्षीच्या याच तिमाहीत ते ८.८ टक्के दराने वाढले होते. व्यापार, हॉटेल, दळणवळण, दूरसंचार आदी सेवा क्षेत्राची वाढ यावर्षीच्या तिमाहीत ६ टक्के दराने झाली. मागील वर्षीच्या याच तिमाहीत ती ६.२ टक्के होती. अर्थक्षेत्र आणि व्यावसायिक सेवा क्षेत्र यावर्षीच्या तिमाहीत ७.८ टक्के दराने वाढले. मागील वर्षीच्या याच तिमाहीत ते ९ टक्के दराने वाढले होते. सार्वजनिक सेवा संरक्षण आणि अन्य सेवा यांची वाढ मागच्या वेळेस म्हणजे ८.७ टक्के एवढीच राहिली.

‘जीडीपी’च्या वाढीचा वेग (प्रमाण टक्क्यांत) (प्रमाण टक्क्यांत)

जानेवारी-मार्च २०२५ – ७.४

ऑक्टोबर-डिसें. २०२४ – ६.४

जुलै-सप्टेंबर २०२४ – ५.६

एप्रिल-जून २०२४ – ६.५

वार्षिक विकासदर (२०२४-२५) – ६.५

(गेल्या ४ वर्षांतील नीचांकी)

वार्षिक विकासदर (२०२३-२४) – ९.२

उस्मानाबाद स्टेशन आता ‘धाराशीव’, रेल्वेने दिली नाव बदलण्यास मान्यता; नवीन कोड काय असेल ते जाणून घ्या

0

मध्य महाराष्ट्रात असलेल्या उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचे नाव आता अधिकृतपणे बदलण्यात आले आहे. मध्य रेल्वेने उस्मानाबाद रेल्वे स्टेशनचे नाव बदलून धाराशिव केले आहे. मध्य रेल्वेने शुक्रवारी या संदर्भात माहिती दिली. पूर्वी हे स्टेशन उस्मानाबाद म्हणून ओळखले जात होते आणि त्याचा स्टेशन कोड UMD होता. आता त्याचे नवीन नाव बदलून धाराशिव करण्यात आले आहे आणि नवीन स्टेशन कोड DRSV झाला आहे.

महाराष्ट्र सरकारने आधीच उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव केले आहे आणि स्टेशनचे नाव बदलण्याचा प्रस्ताव रेल्वेकडे प्रलंबित होता. त्याच वेळी, रेल्वेने स्टेशनचे नाव देखील बदलून धाराशिव केले आहे. स्टेशनचे नाव बदलण्यासोबतच, स्टेशनचा कोड देखील बदलला आहे. यासंदर्भात एक प्रेस रिलीज जारी करण्यात आली आहे. स्टेशनचे नाव बदलण्यासोबतच, कोड बदलण्याची माहिती देखील प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

नवीन स्थानकाचे नाव आणि कोड इंडियन रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनने मंजूर केले आहे, असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच नाव बदलण्याच्या प्रक्रियेसाठी, मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) १ जून २०२५ रोजी रात्री ११:४५ ते पहाटे ०१:३० पर्यंत तात्पुरती बंद राहील, असेही त्यात म्हटले आहे.

उस्मानाबादचे नाव २० व्या शतकातील हैदराबाद राज्याच्या शासकाच्या नावावरून ठेवण्यात आले. धाराशिव हे या प्रदेशातील ८ व्या शतकातील गुहा संकुलाचे नाव आहे. त्याच वेळी, या गुहेला सांस्कृतिक महत्त्व आहे. उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्याच्या मागणीबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता आणि ८ मे २०२४ रोजी शिंदे सरकारने शहराचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव रेल्वेकडे प्रलंबित होता. रेल्वेने स्थानकाचे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे. याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

Symbiosis Centre for Distance Learning’s “Early Bird” Offer

0

2025–2026: Silver Jubilee Year of Symbiosis Centre for Distance Learning

Pune, 28th May 2025 – Symbiosis Centre for Distance Learning (SCDL) has completed 25 successful years. To commemorate this remarkable journey, the academic year 2025–2026 will be celebrated as the Silver Jubilee Year.

Admissions are now open for the 2025–2026 academic session at SCDL. Students enrolling in this special Silver Jubilee batch will be eligible for the “Early Bird” Offer.

Students can apply for the following programs:

  • Post Graduate Diploma (PG Diploma) – 2 years
  • Post Graduate Certificate – 1 year
  • Diploma – 1 year
  • Certificate Courses – 3 to 6 months
  • Single Courses – 3 months

Students who take admission before 5th June 2025 will be eligible for a discount under the Early Bird Offer. To avail of this offer, use Coupon Code: GEBA05062025 during the admission process. By applying this coupon code, students will receive a discount of ₹500/- on the application fee.

Admissions during the 2025–2026 academic year will be recognized as part of the Silver Jubilee Batch.

To apply and avail the discount, visit https://applynow.scdl.net/ before 5th June 2025.