Home Blog Page 49

पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या देशी झाडांची लागवड व्हावी ; प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे प्रतिपादन

0

पद्मा प्रतिष्ठान, ज्ञानमाउली फाउंडेशनतर्फे ‘जागर पर्यावरणाचा’ कार्यक्रम

पुणे: “माणसाने सिमेंटचे जंगल उभारताना नैसर्गिक संपत्तीवर आघात केला. त्यामुळे निसर्गाचा, पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. जागतिक तापमान वाढ, प्रदूषणाची समस्या जगभर सतावत आहे. अशावेळी पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या सुवर्णपिंपळ, वड, आंबा, चिंच, बांबू यांसारख्या देशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हायला हवी,” असे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘जागर पर्यावरणाचा’सारख्या कार्यक्रमाची आज गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पद्मा प्रतिष्ठान व ज्ञानमाऊली फाऊंडेशन आयोजित ‘जागर पर्यावरणाचा’ कार्यक्रमावेळी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी बोलत होत्या. या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, उद्योजक जवाहरशेठ चोरगे, चाटे शिक्षण संस्थेचे प्रा. फुलचंद चाटे, पद्मा प्रतिष्ठानचे संस्थापक शशिकांत कांबळे, ज्ञानमाउली फाउंडेशनच्या संस्थापिका पुष्पा रणदिवे-कांबळे, पर्यावरण तज्ज्ञ प्रभाकर कुकडोलकर, उद्योजक नितीन हणमघर, हेमंत कांबळे आदी उपस्थित होते.

पर्यावरण संरक्षणात जागतिक पातळीवर योगदान देत असलेले ट्रीमॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, पर्यावरण अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर, उद्योजक तुषार गोसावी, माजी नगरसेविका ज्योती गोसावी, राष्ट्रीय खेळाडू प्रियांका यादव व मयानी कांबळे, गायिका मनीषा निश्चल, सोनाली कांबळे यांना ‘जागर पर्यावरणाचा’ सन्मान देऊन गौरविण्यात आले. सिंहगड रस्त्यावरील मोंटेरोजा सोसायटी क्लब हाऊसमध्ये हा कार्यक्रम झाला. ज्ञानगंगोत्री विशेष मुलांची निवासी शाळा संस्थेला ५१ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा निश्चय करावा. निसर्गातील प्रत्येक घटकाचे, अगदी कीटकाचेही अनन्यसाधारण स्थान आहे. एकेकाळी पुण्याचे पर्यावरण देशात आदर्श मानले जात होते. अलीकडे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. हे टाळण्यासाठी येथील वनराई, टेकडी जतन करण्याची जबाबदारी आपली आहे.”

रुपाली चाकणकर म्हणाल्या, “वाढदिवसाच्या निमित्ताने पर्यावरणाचा जागर करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. आपले आरोग्य चांगले राहायचे असेल, तर पर्यावरणाचे संवर्धन खूप गरजेचे आहे. प्रदूषणाच्या अनेक समस्या माणसाला सतावत आहेत. त्यामुळे आजूबाजूला खूप झाडे लावण्याची गरज आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण यज्ञात सहभाग घेतला पाहिजे.”

विष्णू लांबा म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये एक लाख झाडे लावण्याचा संकल्प कांबळे यांनी हाती घेतला आहे. वृक्षरोपणाच्या या मोहिमेचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. ‘जागर पर्यावरणाचा’ हा कार्यक्रम या मोहिमेचा शुभारंभ आहे. केक कापून, नको तिथे पैशांची उधळपट्टी करून वाढदिवस करण्यापेक्षा हा उपक्रम अतिशय विधायक असा आहे.”

धीरज घाटे यांनीही मनोगत व्यक्त केले. शशिकांत कांबळे यांनी स्वागत केले. जीवराज चोले यांनी प्रास्ताविक केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पुष्पा रणदिवे-कांबळे यांनी आभार मानले.

विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड अध्यात्म-विज्ञानाधिष्ठित वैश्विक शिक्षण शिष्यवृत्ती २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर

0

पुणे : माईर्स एमआयटी विश्वशांती केंद्राद्वारे महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या “विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड अध्यात्म-विज्ञानाधिष्ठित वैश्विक शिक्षण शिष्यवृत्ती २०२५” या मूल्याधिष्ठित शिक्षण व यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये पश्चिम विभाग (सोहम गंभीर)े, मराठवाडा (अथर्व वाघचौरे) आणि विदर्भ (गौरी मुंडोकार) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अशी माहिती परीक्षेचे मुख्य समन्वयक व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माईर्स एमआयटी पुणे या शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाला मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकासाची जोड दिली आहे. संस्थेतून तयार झालेले विद्यार्थी भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून जगात विश्वशांती व राष्ट्रनिर्मितीचे काम करतील. हा उद्देश्य ठेऊन गेल्या १२ वर्षापासून मूल्याधिष्टित शिक्षण व यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षा राज्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. २०२५ या वर्षापासून परीक्षेचे रुपांतर शिष्यवृत्ती मध्ये करण्यात आले आहे.

या परीक्षेसाठी १०वीचा विद्यार्थी बसू शकतो. त्या विद्यार्थ्याला १०वींत ७० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. ही शिष्यवृत्ती त्याला ११वी आणि १२वी या दोन वर्षासाठी दिली जाईल.

विभागात गुणानुक्रमे येणार्‍या विद्यार्थी प्रथम (२५ हजार), द्वितीय (२० हजार), तृतीय (१५ हजार), चतुर्थ (१० हजार) आणि पाचवा (५ हजार) ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

या परीक्षेचा निकाल ः पश्चिम महाराष्ट्र विभागः सोहम संग्राम गंभीरे (प्रथम, संत ज्ञानेश्वर विद्यालय, कोथरूड, पुणे), दर्शन सतीश जगदाळे (द्वितीय,विश्वशांती गुरुकुल, पंढरपूर), आर्य सचिन लोखंडे (तृतीय, अभिनव विद्यालय, पुणे), पायल संदीप बोरुडे(चतुर्थ, ज्ञानगंगा विश्वविद्यालय, शिरूर), वेदिका संतोष बडे (पाचवा, ज्ञानगंगा विश्वविद्यालय, शिरुर )

मराठवाडा विभागः अथर्व अमोल वाघचौरे (प्रथम, कै. दादाराव कराड विद्यालय, अंबाजोगाई), वैभवी तातेराव लहाडे (द्वितीय, श्री सरस्वती विद्यालय, रामेश्वर रूई), आर्या सचिन गडदे (तृतीय, कै. दादाराव कराड विद्यालय,अंबाजोगाई), सुरज विश्वंबर गायकवाड (चतुर्थ, मुकुंदराज विद्यालय, नांदगाव), दिव्या विलास धांडे (पाचवी, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, रांजणगाव)

विदर्भ विभागः गौरी गोपाळ मुंडोकार(प्रथम, श्री शिवाजी विद्यालय,अकोट), पयोष्णी विजय पार्शिवकर (द्वितीय, जनता विद्यालय, पूर्णानगर), सह्याद्री अरविंद कळसकर (तृतीय, जनता विद्यालय, पूर्णानगर), स्वराज नितीन बंड (चतुर्थ , जनता विद्यालय,पूर्णानगर), वैभवी नंदकिशोर अकोटकर (पाचवा, श्री शिवाजी विद्यालय, अकोट )

यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी आवश्यक: डॉ भारतभूषण जोशी

0

कल्पना चावला स्पेस अकॅडमीच्या पहिल्या वर्गाचे उद्घाटन

पुणे / लोणावळा : यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी असावी लागते आणि अशी प्रगतिशील दृष्टी प्रयत्नांनी विकसित करावी लागते, असे मत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ भारतभूषण जोशी यांनी व्यक्त केले.

लोणावळा येथील विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कल्पना चावला स्पेस अकादमीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ॲड. माधव भोंडे, उपाध्यक्ष नारायण भार्गव, संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि इस्रोचे निवृत्त शास्त्रज्ञ प्रा जगदीशचंद्र मठ, राजेंद्र चतुर्वेदी, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क शिक्षणाधिकारी सुनील पोटे, विश्वस्त पंडित विद्यासागर,अभिनेत्री आणि संस्थेच्या विश्वस्त मीनाक्षी शेषाद्री सचिव राधिका भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी देखील आजपर्यंत माणसाला विश्वाच्या एकूण पसाऱ्यापैकी केवळ पाच टक्के माहिती उपलब्ध झाली आहे. या पुढील काळात उर्वरित माहिती उजेडात आणण्याचे काम युवा शास्त्रज्ञांचे आहे. त्यासाठी युवकांना मोठा वाव उपलब्ध आहे, अशी जोशी यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येकाने कल्पना चावला यांच्यासारखे अंतराळवीर व्हावे असे नाही तर अभियंता, शास्त्रज्ञ, कलाकार अशा कोणत्याही भूमिकेतून मानवतेच्या प्रगतीसाठी योगदान दिले जाऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

अंतराळ विज्ञानात भारत जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश असून तो लवकरच प्रथम क्रमांकावर विराजमान होणार आहे. अंतराळ वैज्ञानिक घडविण्याच्या उद्देशाने कल्पना चावला स्पेस अकादमीची स्थापना करण्यात आली असून अत्यंत काटेकोरपणे या अकादमीसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड करताना प्राधान्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. सध्याचे युग हे स्पर्धा करण्याचे नव्हे तर सहकार्य करण्याचे आहे. त्यामुळे या संस्थेसाठी इस्रो, नेहरू स्पेस सेंटर अशा अनेक संस्थांशी सहकार्य करार करण्यात आला आहे, अशी माहिती भार्गव यांनी यावेळी दिली.

कल्पना चावला स्पेस अकादमीच्या अभ्यासक्रमाबद्दलची माहिती जगदीश चंद्र मठ यांनी दिली. उत्सुकताही प्रगतीची जननी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करणे यावर अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे. प्रथम दोन वर्षात अंतराळ विज्ञानाची मूलभूत तत्व विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहे. त्यानंतर अंतराळ विज्ञानातील विविध शाखांपैकी विद्यार्थ्यांना रस असलेल्या शाखेची निवड करून त्या शाखेचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अंतराळ संशोधन संस्थेमध्ये उमेदवारी हा देखील अभ्यासक्रमाचा घटक असणार आहेत. त्याचप्रमाणे यशस्वी शास्त्रज्ञ घडवण्याबरोबरच नीतिवान, भावनिक दृष्ट्या सबळ व्यक्तिमत्व घडविण्यासाठी जीवन विद्येचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे, असेही प्रा मठ यांनी सांगितले.

अंतराळ विज्ञानाचे प्रशिक्षण देणारी कल्पना चावला स्पेस अकादमी ही भारतातील, किंबहुना जगातील एकमेव संस्था असून या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याची ग्वाही राजेंद्र चतुर्वेदी यांनी यावेळी दिली.

सुनील पोटे यांनी संस्थेला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. देवतोष कृष्णा यांनी सूत्रसंचालन केले तर राधिका भोंडे यांनी आभार मानले.

सध्याच्या परिस्थितीत आनंदराज आंबेडकरच समाजाला दिशा देऊ शकतात – उत्तमराव खोब्रागडे

0

मुंबई दि. ३ (रामदास धो. गमरे) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांचे नातू तसेच भैय्यासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या नेतृत्वगुण व कौशल्याच्या जोरावर इंदू मिल ताब्यात घेतली त्यावर न थांबता पुढे जाऊन बौद्धजन पंचायत समिती व पीपल्स एज्युकेशन सोसायटी ताब्यात घेतली व आपण केवळ रक्ताचे वारसदार नसून बाबासाहेबांच्या विचारांचे ही वारसदार आहोत हे पदोपदी सिद्ध केले व एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे म्हणून सध्याच्या परिस्थितीत समाजाला दिशा देऊ शकतात असे माझे प्रांजळ मत आहे” असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचे माजी जिल्हाधिकारी मा. उत्तमराव खोब्रागडे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता या नात्याने केले.

रिपब्लिकन सेना महाराष्ट्र, बौद्धजन पंचायत समिती आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समिती गठीत करण्यात आली त्या सत्कार समितीचे अध्यक्ष यशवंत भैय्यासाहेब भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली इंदू मिलचे प्रणेते, सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा वाढदिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर येथे मोठ्या थाटामाटात व जोशजल्लोष, उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार व सरचिटणीस मनोहर बा. मोरे यांनी धार्मिक पूजाविधी लाघवी व गोडवाणीने संपन्न केला, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत व विनोद काळे यांनी आपल्या प्रभावी व ओजस्वी भाषाशैलीत केले. सदर वाढदिवसाचे औचित्य साधून सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने गीतगायनाचा सुरेल कार्यक्रम सादर केला सोबतच महाराष्ट्रभर विविध रुग्णालयात रुग्णांना फळवाटप व वृक्षारोपण कार्यक्रम करून कार्यकर्त्यांनी सदर वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासली, तसेच पदवीधर अर्पिता गणेश चित्ते हिने ९३.४०% व सिमरन प्रकाश मोरे हिने ९१% गुण मिळवल्याबद्दल तसेच सरपंच सुधीर परशुराम साळवी यांना आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन याठिकाणी वाढदिवसानिमित्त आनंदराज आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी मनिषाताई आंबेडकर, युवानेते ऍड. अमन दादा आंबेडकर आणि त्यांचे सासरे पांडुरंग साळवी, उपसभापती विनोद मोरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी संजीव बौधनकर, केंद्रीय सचिव ऍड. संघराज रुपवते, केंद्रीय प्रवक्ते निवृत्त समाजकल्याण सचिव दिनेश डिंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच भारतीय बौद्ध महासभेचे एच. के. भंडारी, बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे, सरचिटणीस राजेश घाडगे, उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, काकासाहेब खंबाळकर, युवराज धसवाडीकर, विनोद काळे, गजानन तांबे, प्रकाशभाऊ खंडागळे, बाबासाहेब गायकवाड, आशिष गाडे, अमोल रोकडे, माधवदादा जमदाडे, वसंत कांबळे, संजय देखणे, प्रा. राजू सोनसाळे, योगेंद्र चौरे, युवराज बनसोडे, किरण घोंगडे, आशिष गाडे, अमोल रोकडे, नितीन बनसोडे, श्रीपती ढोले, काकासाहेब गायकवाड, भगवान साळवी, राजेश शिनगारे, गटक्रमांक १३ चे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, दर्शन जाधव, मंगेश जाधव, भाई जोशी, प्रकाश भाऊ खंडागळे, डॉ सुशीलकुमार सुर्यवंशी, भगवान साळवी, लवेश लोखंडे, विरेंद्र लगाडे, भय्यासाहेब भालेराव, संतोष पवार, डॉ. सुशीलकुमार सुर्यवंशी, प्रा. सुनील वाकेकर, दिनेश आदमाने, मध्यवर्ती कार्यकारिणी, विश्वस्त मंडळ, महिला मंडळ यांनी आनंदराज आंबेडकरांचे भरभरून कौतुक करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सर्वांचे हे प्रेम बघून आनंदराज आंबेडकर भावुक झाले त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. सरतेशेवटी विनोद काळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

पक्षद्रोही काकासाहेब खंबाळकर यांची रिपब्लिकन सेना पक्षातून हाकालपट्टी

0

मुंबई दि. ७ (वृत्त प्रतिनिधी) रिपब्लिकन सेना महाराष्ट्र या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार काकासाहेब खंबाळकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांची तत्काळ रिपब्लिकन सेना पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.

तरी महाराष्ट्रातील रिपब्लिकन सेनेच्या तमाम कार्यकर्त्यांनी पक्षद्रोही काकासाहेब खंबाळकर यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नये, तसेच सदर पक्षद्रोही सोबत रिपब्लिकन सेनेचा ही कोणताही संबंध राहणार नाही अशी महत्वपूर्ण सूचना रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र सचिव विनोद विठ्ठल काळे यांनी रिपब्लिकन सेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केली आहे.

बौद्धजन सहकारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांचे दुःखद निधन

0

मुंबई दि. ९ (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी, मुंबई विभाग या विभागाचे तरुण तडफदार, ध्येयवादी, मनमिळाऊ, सर्वसमावेशक, खंबीर नेतृत्व असलेले सहकारी संघाचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पांडुरंग जाधव मुक्काम गाव डोडवली, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी यांचे दीर्घ आजाराने दि. ९ जून २०२५ रोजी वयाच्या ५० व्या वर्षी विक्रोळी पार्कसाईड दुःखद निधन झाले.

दिवंगत राजेंद्र जाधव यांनी संघाचा कारभार हाती घेतल्या त्यावेळी एक नवीन ऊर्जा, नवचैतन्य संघात निर्माण झाले होते, त्यांनी अत्यंत काटेकोरपणे सर्व कामांची हाताळणी करत अत्यंत वेगाने व आत्मविश्वासाने कामांना गती दिली, जवळपास निष्क्रिय झालेल्या विभाग क्र. ७ येथे विभाग अध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी आपल्या कामाच्या झंझावाताने विभागाचा कायापालट केला, त्यांची कार्यपद्धती पाहून सर्वांनुमते तालुका अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपविण्यात आली व ती धुरा ही प्रामाणिक व यशस्वीपणे पेलवत असतानाच त्यांना अचानकपणे नैसर्गिकरित्या आजार बळावला, उपचाराकरिता त्यांना केईएम रुग्णालय मुंबई येत भरती करण्यात आले होते त्यानंतर ते वर्षभर घरी जागेवरच होते.

दिवंगत राजेंद्र पांडुरंग जाधव हे मनमिळाऊ, प्रेमळ, सर्वसमावेशक, नेतृत्ववान, क्रियाशील कार्यकर्ते असून संघाच्या दैदिप्यमान वाटचालीस त्यांनी अमूल्य योगदान दिले होते असे झंझावती वादळ आज अचानक शांत झाल्याने संघाच्या मुंबई मध्यवर्ती कमिटीला मोठा धक्का बसला असून त्यांच्या जाण्याने संघाची कधी न भरून निघणारी मोठी हानी झाली आहे तसेच त्यांच्या निधनाने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे अशी भावना मध्यवर्ती कमिटीच्या वतीने व्यक्त होत आहे. असा तरुण तडफदार कार्यकर्ता आपल्यातून निघून गेल्याने गाव मुंबई शाखेत, तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या पवित्र स्मृतीस बौद्धजन सहकारी संघ गाव मुंबई शाखा, आजी माजी विश्वस्त मंडळ, विभाग अधिकारी, संघाच्या पोटसमित्या, तालुक्यातील ६८ गावांच्या कार्यकारिणी मंडळ, सभासद, सदस्य, महिला मंडळ आदी सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ठीक ५:०० वाजता त्यांच्या राहत्या घरून वर्षा नगर, पाण्याची टाकी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे, पार्क साईड, विक्रोळी, मुंबई येथून निघणार असून सदर अंत्ययात्रेस तालुक्यातील सर्वच मान्यवर सभासदांनी उपस्थित राहून स्मृतिशेष राजेंद्र पांडुरंग जाधव यांना अंतिम मानवंदना द्यावी अशी विनंती मुंबई विभाग चेअरमन दीपक मोहिते व चिटणीस संदेश गमरे यांनी संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केली आहे.

“इतिहासकारांनी शंभूचरित्रावर प्रचंड अन्याय केलाय,तो धुवून काढायचं काम नव्या पिढीला करावं लागेल:प्राध्यापक यशवंत गोसावी

0

“इतिहासकारांनी शंभूचरित्रावर प्रचंड अन्याय केलाय,तो धुवून काढायचं काम नव्या पिढीला करावं लागेल. छत्रपती संभाजी महाराज हे असामान्य योद्धा होतेच,परंतु त्यासोबतच धर्मपंडित, न्यायी आणि कित्येक भाषांचे जानकार सुद्धा होते. त्याचं हे रूप देखील अधिक प्रभावीपणे समाजासमोर येणं गरजेचं आहे” असे प्रतिपादन प्रसिध्द शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी मोरया मित्र मंडळ छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात केलं.

मोरया मित्र मंडळ कर्वेनगर यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष आनंद तांबे, यशवंत गोसावी,रेश्मा बराटे यांच्या हस्ते पुजा करुन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी शिवकालीन ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर सुप्रसिद्ध युवा शिवशंभू व्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी सर यांचे व्याख्यान झाले. व्याख्यानानंतर दरवर्षी मोरया मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती निमित्त पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षी २०२५ मोरया रत्न वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत नागरीकांन साठी मोफत आरोग्य शिबीरे राबवुन, वैद्यकीय मार्गदर्शन खुप वर्षे करत आहात .तसेच शालेय विद्यार्थ्यांना सहकार्य तसेच शालेय वस्तू, वह्या पुस्तके कोणतीही जाहिरात प्रसिद्धी न करता, नाव गुपीत ठेवून, सामाजिक बांधिलकी जपत आहे असे डॉ गिरीश अच्युत कामत याना मोरया रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेली 25 वर्षे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत, महिलांच्या हक्कांसाठी तसेच महिला सक्षमीकरण करण्यासाठी संपूर्ण वेळ काम करत असणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांना सहकार्य, तृतीय पंथी, अनाथ आश्रमांसाठी विविध कार्यक्रम करत ,समाजातील महिलांसाठी शैक्षणिक, आरोग्य, आणि सक्षमीकरण करण्यासाठी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. हि कामगिरी अशीच सुरू राहवो म्हणून मोरया मित्र मंडळ कर्वेनगर यांच्या वतीने छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती निमित्त संस्थापक अध्यक्ष स्वप्नल फाउंडेशन,राष्ट्रीय उपाध्यक्ष,अखिल भारतीय भष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती. ब्रिक्स ह्युमन राईट शोभा चंद्रकांत बल्लाळ यांना,मोरया जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मोरया भूषण पुरस्कार विजय शिवाजीराव नायकल यांना देण्यात आला.
त्यानंतर मोरया मित्र मंडळाच्या वतीने संभाजी महाराज जयंती निमित्त राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, शिवकालीन ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ खारवडे श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्षा सौ मधुराताई मुकुंद भेलके, यशवंत गोसावी, सामाजिक कार्यकर्ते विरेश शितोळे, अनिकेत जावळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
चित्र कला स्पर्धा
प्रथम क्रमांक नेत्रा नवनाथ नायकवडी
द्वितीय चैत्राली विनायक शिंदे
तृतीय क्रमांक कृष्णा रंभु शर्मा
उत्तेजनार्थ
कृतीका शिवाजी जाधव
चित्र रंगवणे स्पर्धा
प्रथम क्रमांक
आराध्य सोमनाथ लांडे
द्वितीय क्रमांक
अनमोल हुंदळेकर
तृतीय क्रमांक
सिया गणेश चव्हाण
चतृर्थ क्रमांक
तेजूल शरद पवार
उत्तेजनार्थ
विठ्ठल मच्छिंद्र खूपसे
हर्षिता उमेश शिंदे
कार्तिक नितीन पाटील
राज्यस्तरीय ऑनलाईन वत्कृत्व स्पर्धा १४ वर्षांखालील
प्रथम क्रमांक
काव्या सोमनाथ लांडे (वय ११)
द्वितीय क्रमांकः शिवराज प्रमोद चव्हाण (छत्रपती संभाजी नगर)
तृतीय क्रमांकः अनमोल जितेंद्र हुंदळेकर
उत्तेजनार्थ
गौरवी संदिप राऊत
आद्या सातारकर
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा खुला गट
प्रथम क्रमांक
सोहम वागस्कर (अहिल्या नगर)
द्वितीय क्रमांक
दिशा सपकाळ
तृतीय क्रमांक
सिद्धी चिव्हे
उत्तेजनार्थ :कोमल शिंदे
यावेळी मैत्री प्रतिष्ठान अध्यक्ष विजय खळदकर, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस विष्णुपंत सरगर, गजानन कड, अशोक कदम, आनंद पाटील, ललित दांगट, सचिन धनकुडे, प्रकाश शिंदे, महेश पवळे, मयुर बनकर उस्तवप्रमुख ऋषिकेश जगताप, मंडळाचे अध्यक्ष रोहिदास जाधव, उपाध्यक्ष रोहित दानवले, आणि मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक बाळकृष्ण नेहरकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना केदार मारणे म्हणाले *आम्ही छत्रपती श्री संभाजी महाराजांची जयंती करतो याचं कारण छत्रपती संभाजी महाराज घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोहोचले पाहिजे तसेच छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांच्या रक्तगटाचे माणसं तयार झाली पाहिजे म्हणून आमची मागणी आहे संभाजी महाराजांचा इतिहास शालेय पाठ्य पुस्तकात यावा*
आयोजन मंडळाचे संस्थापक केदार आशा वसंत मारणे यांनी केले.

‘ईद’ला सारसबाग बंद? मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडून निषेध

0

पुणे, ९ जून – बकरी ईदनंतरच्या दुसऱ्या दिवशी ‘बासी ईद’ निमित्त मुस्लिम समाजाच्या कुटुंबांनी सारसबाग परिसरात भेट देण्याची परंपरा असताना, यंदा पुणे महानगरपालिकेने हा बाग बंद ठेवल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. या कृतीचा निषेध करत मुस्लिम सत्यशोधक मंडळ या संस्थेने आज एक अधिकृत पत्रकाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या निर्णयामागे पुण्यातील राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या पत्राचा हवाला देण्यात आला आहे. त्या पत्रात ‘मुस्लीम समाज बासी ईदला सारसबागेत मांसाहार करतो’ अशा गैरसमजातून धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने बाग बंद ठेवावी, अशी शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर PMC प्रशासनाने संबंधित दिवशी सारसबाग बंद ठेवला.

    या कृतीविषयी मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी म्हटले की, “हे केवळ मुस्लिम समाजाच्या नागरी हक्कांवर गदा आणणारे असून, अशा कृतीमुळे अस्पृश्यतेसारखा अमानवी विचार पुन्हा जन्म घेत आहे.”

मंडळाने स्पष्ट केले की, रमजान आणि बकरी ईद हे मुस्लिम समाजाचे दोन प्रमुख सण असून, स्वयंपाकातील मेहनतीनंतर कुटुंबे बागा, सिनेमा गृह आणि इतर करमणुकीच्या ठिकाणी जातात. यावर बंदी घालणे ही फक्त धार्मिक स्वतंत्रतेच नव्हे तर घटनात्मक हक्कांचीही पायमल्ली आहे.

“जर मांसाहारामुळे मंदिर परिसराचे पावित्र्य भंगत असेल, तर सर्वसमाजासाठी तो नियम असावा; केवळ मुस्लीम समाजासाठीच का?” असा सवालही मंडळाने उपस्थित केला. या प्रकारावर मंडळाने खेद व्यक्त करत सांगितले की, या कृतीमुळे केवळ अपमान नव्हे तर मुस्लीम समाजाच्या भारतीयत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. त्यामुळे “बासी ईदला सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय हा संतापजनक असून आम्ही याचा सखेद निषेध करतो,” असे मंडळाने ठामपणे सांगितले आहे.

French Open 2025 : कार्लोस अल्काराज बनला चॅम्पियन, आयपीएलपेक्षा जास्त बक्षीस मिळाले एकाच खेळाडूला

0

जगातील नंबर-२ टेनिसपटू स्पेनच्या कार्लोस अल्काराजने फ्रेंच ओपन इतिहासातील सर्वात लांब अंतिम सामन्यात इटलीच्या जॅनिक सिनरचा ४-६, ६-७ (४), ६-४, ७-६ (३), ७-६ (२) असा पराभव केला आणि फ्रेंच ओपन २०२५ चे विजेतेपद पटकावले. हा सामना ५ तास २९ मिनिटे चालला.

फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकणाऱ्या स्पेनच्या कार्लोस अल्काराजला बक्षीस म्हणून २ लाख ५५ हजार युरो (सुमारे २५ कोटी रुपये) मिळाले आहेत. जे आयपीएल २०२५ पेक्षा ५ कोटी रुपये जास्त आहे. आयपीएलचे विजेतेपद जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २० कोटी रुपये मिळाले. इटलीच्या जॅनिक सिनरला १२ कोटी रुपये मिळाले. महिला गटातही हीच रक्कम देण्यात आली आहे.

रविवार, ८ जून रोजी रोलँड गॅरोसच्या फिलिप चॅटियर कोर्टवर खेळल्या गेलेल्या या टायटल मॅचमध्ये कार्लोस अल्काराझला प्रेक्षकांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. अल्काराझने सलग दुसऱ्या वर्षी फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरीचे जेतेपद जिंकले आहे. तर सिनर पहिल्यांदाच फ्रेंच ओपन फायनलमध्ये पोहोचला आहे. अल्काराझने आतापर्यंत दोन विम्बल्डन (२०२३, २०२४), दोन फ्रेंच ओपन (२०२४, २०२५) आणि एक यूएस ओपन (२०२२) जेतेपद जिंकले आहे.

फ्रेंच ओपन जेतेपदाच्या सामन्यात २-२ अशा बरोबरीनंतर, २२ वर्षीय अल्काराझ आणि २३ वर्षीय सिनर यांनी पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये आपला सर्वोत्तम खेळ दाखवला. ५३ मिनिटांच्या खेळानंतर अंतिम सेट देखील ५-५ असा बरोबरीत पोहोचला. पाचव्या सेटच्या ६७ व्या मिनिटाला दोघेही पुन्हा ६-६ अशा बरोबरीत आले. शेवटी, अल्काराझने टायब्रेकरमध्ये सिनरला संधी दिली नाही आणि सेट आणि जेतेपद दोन्ही ७-६ च्या फरकाने जिंकले.

सलमान खानचे दोन पैलू आहेत… ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्यावेळी सोनाली बेंद्रे का करू शकली नाही सलमान खानशी मैत्री?

0

अभिनेत्री सोनाली बेंद्रे बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीत आहे. तिने उच्च श्रेणीतील कलाकारांसोबतही काम केले आहे. ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटात ती सलमान खानच्या विरुद्ध दिसली होती. चित्रपटात सलमानसोबतची तिची केमिस्ट्री खूप आवडली होती. चित्रपटात दोघांमधील नजाकत आणि कोमल प्रेम तुम्ही पाहिले असेलच. पण खऱ्या आयुष्यात असे नव्हते. सोनाली नुकतीच आली होती आणि त्यावेळी सलमानचा स्वभावही खूप बालिश होता. अशा परिस्थितीत तो सोनालीला चिडवायचा, जे अभिनेत्रीला फारसे आवडले नाही. आता वर्षांनंतर सोनालीने सलमान खानबद्दल खुलासा केला आहे. भाईजानशी संबंधित चित्रपटाची कहाणी शेअर करण्यासोबतच तिने असेही म्हटले आहे की सलमानने वाईट काळात तिच्या तब्येतीबद्दल खूप विचारले होते.

सलमान खानबद्दल बोलताना सोनाली बेंद्रे म्हणाली – सलमान खानला जाणून घेण्यासाठी मला थोडा वेळ लागला. ती एका प्रक्रियेसारखी होती. ‘हम साथ साथ हैं’च्या शूटिंग दरम्यान माझी सलमान खानशी फारशी चांगली मैत्री नव्हती. सलमान खानचे दोन वेगवेगळे पैलू आहेत. एकतर तुम्ही त्याला प्रेम करू शकता किंवा त्याचा द्वेष करू शकता. तो थोडा वेगळ्या प्रकारचा माणूस आहे आणि त्याच्या आयुष्यातील महान पैलूंची मला खूप नंतर प्रशंसा करता आली.

मला हे कसे मांडायचे, ते माहित नाही आणि मला कोणत्याही प्रकारे राजनयिक व्हायचे नाही. पण ‘हम साथ साथ हैं’च्या शूटिंग दरम्यान आमचे नाते इतके मजबूत नव्हते. आमच्याकडे असे अनेक फोटो देखील आहेत, ज्यात मी शूटिंग करत असताना तो वेगवेगळे चेहरे बनवताना आणि मला चिडवताना दिसतो. पण आपण काय करू शकतो. सलमान खान असा माणूस आहे, ज्याच्या आत एक लहान मूल आहे. अभिनेत्री पुढे म्हणाली की हा तो काळ होता, जेव्हा मी इतकी प्रौढ नव्हतो आणि नाराज व्हायचे. यामुळे दोघांची मैत्री कधीच झाली नाही.

सोनालीने सांगितले की कर्करोगादरम्यान सलमान तिला वारंवार फोन करायचा आणि डॉक्टरांनाही सल्ला देत असे. अभिनेत्री म्हणाली- जेव्हा मी कर्करोगावर उपचार घेत होते, तेव्हा मला सलमान खानची एक वेगळी बाजू दिसली. तो सतत माझ्याशी बोलत असे. तो माझ्या पती गोल्डीशी बोलला आणि सतत त्याला विचारत राहिला की माझे उपचार व्यवस्थित चालू आहेत की नाही. तोपर्यंत तो संपर्कात राहिला जोपर्यंत त्याला खात्री झाली की माझे उपचार व्यवस्थित चालू आहेत. पण एकदा तो आमच्या संभाषणाने समाधानी झाला की तो खूप निश्चिंत झाला. त्यामुळे हे सर्व सांगते की तो किती संवेदनशील आणि काळजी घेणारा होता.